Tumgik
#वाढवल्या
nandedlive · 1 year
Text
Date Farming | खजूर खाल्ल्याने शरिसर होतात अमाप फायदे! म्हणूनच बाजारा
Tumblr media
Date Farming | खजूर ही शरीसाठी प्रचंड फायद्याची मानली जाते. याचमुळे आतापर्यंत, जेव्हा तुम्ही सर्वोत्तम खजुरांबद्दल ऐकले असेल. तेव्हा तुम्ही ते दुबईहून आल्याचेही ऐकले असेल. ईद आणि रमजानच्या काळात दुबईतील खजूर आणि महागड्या खजुरांबद्दल खूप चर्चा होते, मात्र, आता या दुबईच्या खजुरांची जागा राजस्थानी खजुरांनी घेतली आहे. खरं तर, यावेळी राजस्थानमधील अनेक शेतकरी खजूराची (Date Farming ) लागवड करत आहेत. या खजुरीला देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या खजूर आखाती देशांच्या खजूरांपेक्षा स्वस्त आहेत आणि त्यांची चवही त्यांच्यापेक्षा चांगली आहे. राजस्थानमध्ये खजूर कसे वाढत आहेत? काही वर्षांपूर्वीपर्यंत राजस्थानच्या शेतकऱ्यांना तिथे खजुराची शेती करता येईल, याचा विचार करणंही कठीण होतं. मात्र, आता ते शक्य झाले आहे. खरं तर, आता सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी खजूराची अशी विविधता तयार केली आहे जी राजस्थानच्या कोरड्या हवामानात सहज तयार केली जाते. या खजूर विशेषतः राजस्थानच्या पश्चिम भागात वाढतात. या खजुराची खासियत काय आहे? या खजुरांबद्दलची सर्वात लोकप्रिय गोष्ट अशी आहे की त्या रासायनिक मुक्त पद्धतीने वाढवल्या जातात आणि शिजवल्या जातात. खरं तर, या तारखा फिनिक्स डॅक्टीलिफेरा या प्रजातीच्या आहेत. या प्रजातींच्या तारखांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना शिजवण्यासाठी कोणत्याही रसायनाची आवश्यकता नसते. ते रसायनांशिवाय सहज शिजवतात. या खास खजूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक आपल्या शरीराला आतून मजबूत करतात. तर, त्याच्या किमतीचा विचार करता, बाजारात या खजूरांची किंमत आखाती देशांतील खजूरांच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला या तारखा जितक्या फ्रेशर मिळतील तितक्या फ्रेशर तुम्हाला दुबईच्या डेट्स मिळणार नाहीत. कारण तेथून त्यांना भारतात आणण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणूनच तुम्ही याची लागवड करून मालामाल होऊ शकता. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 November 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
शेतकऱ्यांचे विम्याचे प्रलंबित प्रस्ताव पाच दिवसात निकाली काढण्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश
महाराष्ट्राला देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी निश्चित उपाय योजण्यास सुरूवात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेडच्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहूल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका
महागाई तसंच बेरोजगारीच्या प्रश्नावर चर्चेसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी केला जात असल्याचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप
शिवाजी महाराजांची ब्रिटनमधली जगदंब तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील- सुधीर मुनगंटीवार
आणि
ऑस्ट्रेलियातल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा दहा गडी आणि चार षटकं राखून पराभव करत इंग्लंड अंतिम फेरीत.
****
शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशी सूचना, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. राज्यातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात या संदर्भातल्या आढावा बैठकीत दिली. ते म्हणाले:
पीक विमा कंपन्यांना मराठवाड्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडून जे अहवाल घेण्यात आला, त्या अहवालानुसार लातूरची अडचण आहे, बीडची वेगळी अडचण आहे, ती अडचण दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त महोदयांनी कंपन्यावाल्यांनाही बोलले, आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलले. त्या पद्धतीने सर्व मराठवाड्यासहीत महाराष्ट्राची नुकसान भरपाई पाच दिवसाच्या आत पीक विमा कंपन्यांनी नाही दिली तर शेवटी आम्ही केंद्र सरकारकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून.
नैसर्गिक आपत��तीत निश्चित झालेल्या एक हजार ७३  कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी फक्त ९६ कोटी ५३ लाख रुपये रक्कम, तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, पाच लाख शेतकऱ्यांचं सर्वेक्षण झालं आहे. उर्वरित २१ हजार शेतकऱ्यांचं सर्वेक्षण संबंधित यंत्रणेनं तातडीनं करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विम्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीनं त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करावी, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यात पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू असून, राज्याला देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी शासनानं निश्चित उपाय योजण्यास सुरूवात केली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगावमध्ये काल वास्तू रचना, बांधकाम आणि अभियांत्रिकी या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटनं केल्यानंतर ते बोलत होते. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शासन अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत असून, गेल्या तीन महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थावर मालमत्ता हे शेतीनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र असल्यामुळे, या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं अनेक सुविधा दिल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी, आज भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनापासून, अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्ज स्वरुपात उपलब्ध झाला असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या योजनांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक अधिकार दिनी कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
सरकारनं वस्तू आणि सेवा कर - जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीनं करुन अनेक समस्या वाढवल्या असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली भारत जोडो यात्रा काल नांदेड शहरात दाखल झाली, त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींसह काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असं सांगत गांधी यांनी देशात प्रथमच शेतकऱ्यांवरही कर लावण्यात आल्याचं सांगितलं. खतांवर आणि शेती औजारांवरचा जीएसटी कर हा शेतकऱ्यांनाच द्यावा लागत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्यावरुनही गांधी यांनी सरकारवर टीका केली.
****
दरम्यान, गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात जाणार असून, यात्रेसंबंधीची तयारी पूर्ण झाली आहे. हिवरा फाटा इथून ही यात्रा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
****
महागाई तसंच बेरोजगारी, ही मोठी आव्हानं असून, त्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भारत जोडो यात्रेसाठी नांदेड इथं आलेल्या सुळे काल पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या:
बेरोजगारी हे खूप मोठं आव्हान या राज्य आणि देशाच्या समोर आहे. त्याच्यावर चर्चा. महागाईबद्दल. सगळ्याच पातळीवर, सगळ्याच बाबतीत मला महागाई दिसते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मला सातत्यानं वाटतो की महाराष्ट्राच्या समोरचं आव्हान चार मोठे प्रोजेक्टस. मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केलीय की त्यांनी एक असेंब्ली बोलवावी. आणि महागाई आणि बेरोजगारी आणि गेलेले प्रोजेक्टस्‌ याच्यावर एक व्यापक चर्चा व्हावी. आणि चर्चेतून चांगल्या सूचनाच येतील.
मोठे चार प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले यावरही या अधिवेशनात चर्चा करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. देशात महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न आहेत. ते सोडून इतर विषय पुढे आणले जात असल्याची टीका त्यांनी केली. संजय राऊत यांना जो न्याय मिळाला, तोच मलिक आणि देशमुखांना मिळावा अशी अपेक्षा करत, न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं सुळे यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्याचं सांस्कृतिक धोरण २०१० चा फेर आढावा घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही माहिती दिली. नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील. ही समिती बदलत्या परिस्थितीनुसार सांस्कृतिक धोरण सुसंगत करणं, तसंच विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून आणि सर्वसामान्य नागरिकांकडून धोरणाच्या संदर्भात प्राप्त सूचनांनुसार विचारमंथन करुन नवीन धोरणाचा मसुदा शासनाला सादर करेल. समितीचा कालावधी शासन निर्णयापासून १ वर्ष अथवा शासन जोपर्यंत आदेश देईल तोपर्यंतचा असेल, असं शासनानं कळवलं आहे.
****
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी केला जात असून, त्या मोडीत काढल्या जाव्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर काल त्यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले:
केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतायत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं का त्याच्या अंगावर जातायत. बेकायदेशीर पणाने जातायत. आणि हे संपूर्ण देश बघतोय. एकूणच सर्वसामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालय असतं. आणि न्यायालय जर का आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न जर का केंद्र सरकार करत असेल तर देशातल्या तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे.
तुरुंग प्रशासन आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. फडणवीस हेच राज्याचे खरे मुख्यमंत्री आहेत, असं राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले,
काही प्रश्न आहेत. मी तुरूंगात असतांना मला काही प्रश्न दिसलेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तुरुंगातल्या. आणि मला असं वाटतं की गृहमंत्री म्हणून त्यांच्य समोर हे प्रश्न मांडले पाहिजेत. तुरूंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं, तुरुंगातले जे कर्मचार�� आहेत, त्यांच्या वाट्याला ज्या यातना आहेत, मी त्या डोळ्याने पाहिल्यात.
दरम्यान, संजय राऊत यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली तर त्यांना नक्की भेटणार, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
राऊत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पावर यांची देखील भेट घेतली.
दरम्यान, राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवरची सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयानं पुढं ढकलली.
****
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
जेव्हा श्री सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी विजयादशमीच्या पुजेची तलवार होती, जगदंब, जी रत्नजडीत होती, हिरेजडीत होती, ती तलवार ही इंग्रज मोहापोटी घेऊन गेले. पण त्या तलवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श, पवित्र स्पर्श झालाय. आमच्यासाठी ती जगातल्या साऱ्या संपत्तीपेक्षाही अमूल्य अशी आहे. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय, केंद्र सरकारकडे आत्ता आम्ही यासंदर्भातला पत्रव्यवहार सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सुरू केलाय. आणि श्री सुनक यांच्याशीही यासंदर्भामध्ये चर्चा करून ही तलवार महाराष्ट्रामध्ये परत यावी या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत.
****
ऑस्ट्रेलियात ॲडलेड इथं झालेल्या टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल इंग्लंडनं भारतावर दहा गडी आणि चार षटकं राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंड संघानं भारताचा डाव सहा बाद १६८ धावांवर रोखला. हार्दिक पंड्यानं यात सर्वाधिक ३३ चेंडुंमध्ये ६३ धावा केल्या तर विराट कोहलीनं ४० चेंडूत ५० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल उतरलेल्या इंग्लंडच्या संघामध्ये, सलामीवर कर्णधार जोस बटलरनं ४९ चेंडूमध्ये ८० आणि ॲलेक्स हेल्सनं ४७ चेंडूमध्ये सात षटकारांसह ८६ धावा काढून, इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. हेल्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. स्पर्धेतला विजेतेपदाचा सामना आता इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान येत्या रविवारी मेलबर्न इथं होणार आहे.
****
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाकिस्तान - न्युझीलंड उपांत्य सामन्यावर औरंगाबाद इथं ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या सात जणांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमला जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी काल सांगितलं. शहरातल्या राजाबाजार परिसरातल्या एका केश कर्तनालयात सट्टा सुरु असल्याची माहिती समजल्यावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. नागपूरचा सुरेश जाजू आणि औरंगाबादचा पुरब जैस्वाल या दलालांमार्फत हा सट्टा चालवण्यात येत होता, असं पोलिसांनी सांगितलं.
****
संत निरंकारी यात्रेमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, नांदेडहून पानिपतला जाण्याकरता विशेष रेल्वे गाड्यांच्या चार फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हुजूर साहिब नांदेड ते पानिपत ही विशेष गाडी नांदेड इथून १५ आणि २२ नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजता सुटेल. ही गाडी पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड, ग्वालियर, आग्रा, मथुरा, नवी दिल्ली, भोदावल माजरी मार्गे, पानिपतला संध्याकाळी पाच वाजता पोहचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात १६ आणि २३ तारखेला बुधवारी रात्री ११ वाजता पानिपतहून निघून शुक्रवारी संध्याकाळी सव्वा चार वाजता नांदेडला पोहचेल.
****
जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदी संवर्धनाच्या कामात शहरातल्या नागरिकांनी या नद्या आपल्या आहेत या भावनेतून सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं. या नदी  संवर्धनाच्या पाचव्या टप्प्यातल्या कामास काल राठोड यांच्या हस्ते पंचमुखी हनुमान मंदिरपासून सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या पुढल्या काळात `चला जाणू या नदीला` हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, आणि औरंगाबाद जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयातर्फे काल पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात, औरंगाबाद जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचा संघ यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. द्वितीय क्रमांक विवेकानंद महाविद्यालयाच्या संघानं तर तृतीय क्रमांक आय.बी.पी. महिला महाविद्यालय आणि छत्रपती महाविद्यालयाला विभागून देण्यात आला. लोकसेवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लियाकत शेख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
****
राज्यातल्या पाच वैद्यकीय महादियालयांमध्ये अधिष्ठाता पदांच्या नियुक्त्या वैद्यकीय शिक्षन विभागाने काल जाहीर केल्या. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या अधिष्ठातापदी डॉ. संजय राठोड यांची नियुक्ती झाली आहे. लातूरला डॉ. समीर जोशी, उस्मानाबादला डॉ. शिल्पा दोमकुंडावर, नागपुरला डॉ. संजय बिजवे, तर अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. पूर्वा पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
****
३६३ व्या शिवप्रताप दिनानिमित्त काल औरंगाबादमध्ये क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन स्वराज्याचा विचार अटक पासून कटक पर्यंत नेला होता. त्याचं स्मरण म्हणून हा दिवस संपूर्ण देशभर साजरा करण्याचा उपक्रम मराठा क्रांती मोर्चा हाती घेणार असल्याची माहिती विजय काकडे पाटील यांनी यावेळी दिली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या Nexon, Punch, Harrier आणि Tiago ची किंमत किती?
टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या Nexon, Punch, Harrier आणि Tiago ची किंमत किती?
टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या Nexon, Punch, Harrier आणि Tiago ची किंमत किती? भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी TATA मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या अनेक वाहनांच्या आणि व्हेरियंटच्या किमती सरासरी १.१ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सपूर्वी, इतर अनेक वाहन निर्मात्यांनीही खर्च वाढल्यामुळे त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने…
View On WordPress
0 notes
marathiessay · 4 years
Text
Essay On My Favorite Hindi Poet In Marathi
Tumblr media
Essay On My Favorite Hindi Poet In Marathi: हिंदी कविता साहित्य खूप मोठे आणि श्रीमंत आहे. अनेक कवींनी त्यांच्या सुंदर रचनांमध्ये हिंदी कविता भरभराट केल्या आहेत आणि वाढवल्या आहेत. यापैकी कुठल्याही कविरत्नला ‘प्रिय’ म्हणणे खूप कठीण आहे. तथापि, जिथे निवडणूकीची बाब आहे, तेथील राष्ट्रीय कवी स्व. मैथिलीशरण गुप्तला मी माझा आवडता कवी मानतो.
मैथिलीशरण गुप्त भारतीय संस्कृती आणि भारतीय जनतेचे खरे प्रतिनिधी होते. त्यांचे हृदय देशभक्तीने भरून गेले होते. त्यांचे जन्मभूमीचे प्रेम त्याच्या साहित्यातून स्पष्ट होते. भारतीय संस्कृती, इतिहास आणि समाज त्यांच्या कवितेतून दिसून येतो. गुप्ता हिंदी भाषा आणि साहित्याचे कुशल कारागीर होते. वापरण्यास सुलभ हिंदी ही त्यांच्या कवितांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
1 note · View note
darshaknews · 2 years
Text
टेस्लाने अमेरिकेत इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या, 6 हजार डॉलरपर्यंत दर वाढवला
टेस्लाने अमेरिकेत इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या, 6 हजार डॉलरपर्यंत दर वाढवला
नवी दिल्ली. एलोन मस्कच्या मालकीच्या टेस्लाने पुन्हा एकदा यूएसमधील त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत (Tesla EV Price Hike). इलेक्ट्रिक कारच्या अनेक मॉडेल्सच्या किमती $6000 पर्यंत वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि पुरवठा खंडित झाल्यामुळे किमतीत वाढ झाल्याचे टेस्लाचे म्हणणे आहे. त्याचवेळी टेस्लाने आता कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी घातली आहे. कंपनीने चीनमधील कर्मचाऱ्यांच्या…
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years
Text
Jio चा 160 रुपयांचा बंपर प्लॅन, या प्लॅनने Airtel-Vi-BSNL ला टाकले मागे , काय आहे ऑफर...
Jio चा 160 रुपयांचा बंपर प्लॅन, या प्लॅनने Airtel-Vi-BSNL ला टाकले मागे , काय आहे ऑफर…
नवी दिल्ली : Jio च्या अमर्यादित रिचार्ज प्लॅनवर दरवाढीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनंतर, Telco ने त्यांच्या JioPhone योजना देखील बदलल्या आहेत. जिओने सध्याच्या तीन जिओ फोन प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. तथापि, या विभागात एक नवीन योजना (JioPhone नवीन योजना) देखील जोडण्यात आली आहे. JioPhone वापरकर्त्यांना वेगळे डेटा व्हाउचर देणार नाही. तसेच, लक्षात घ्या की JioPhone प्लॅन फक्त JioPhone वर काम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
सप्टेंबरची सुरुवात एलपीजी सिलिंडर दर वाढीने
सप्टेंबरची सुरुवात एलपीजी सिलिंडर दर वाढीने
मुंबई -प्रतिनिधी 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत, त्याची किंमत प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढवली आहे. एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
सरकारच्या या निर्णयाने देणगीदारांना मोठा धक्का दिला, कॉंग्रेसने स्पष्टपणे सांगितले- 'शेतकर्‍यांना गुलाम बनवण्याचा कट रचला जात आहे'
सरकारच्या या निर्णयाने देणगीदारांना मोठा धक्का दिला, कॉंग्रेसने स्पष्टपणे सांगितले- ‘शेतकर्‍यांना गुलाम बनवण्याचा कट रचला जात आहे’
कंपोस्टच्या किंमतीत वाढ अर्थात, मोदी सरकार २०२२ पर्यंत शेतक the्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत स्वत: ला वचनबद्ध असल्याचे दर्शवित आहे, परंतु या वास्तविकतेपेक्षा या भूमिकेपेक्षा वेगळे वास्तव दिसते. देशातील सर्वात जुनी पार्टी कॉंग्रेसने मोदी सरकारविरूद्ध मोर्चेबांधणी केली आहे. खरं तर, केंद्र सरकारने शेतीत वापरल्या जाणा .्या खतांच्या किंमती वाढवल्या आहेत, त्याबद्दल आता कॉंग्रेसने भाजपविरोधात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Text
मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका
मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका
देशातील प्रमुख वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या ( पॅसेंजर व्हेइकल्स) किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या (कमर्शियल व्हेइकल्स) किंमती गेल्या महिन्यातच वाढवल्या होत्या, आणि आता पॅसेंजर वाहनांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आता Tata Motors ची कार खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशाला जास्त झळ…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 September 2021 Time 1.00 to 1.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १५ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संध्याकाळी संसद टीव्हीचं उद्घाटन होणार आहे. लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन्ही वाहिन्या एकत्र करून संसद टीव्हीची निर्मिती करून, त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. संसद टीव्हीवर चार श्रेणींमध्ये कार्यक्रम सादर करण्यात येतील. त्यात संसद आणि लोकशाही संस्थांचे कार्य, शासन आणि योजनांची अंमलबजावणी, धोरणे, इतिहास आणि भारतीय संस्कृती आणि समस्या, निसर्गाच्या समकालीन समस्या या चार श्रेणी असतील.
****
पुढच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या नामांकन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन नोंदणी www.padmaawards.gov.in. या संकेतस्थळावर करता येणार आहे.  देशातील नागरिकांनी समाजातील सर्वच थरांतील निस्वार्थी सेवा करणाऱ्या पात्र व्यक्तींची पारख करून पुरस्कारासाठी शिफारस करावी क���ंवा नामांकने द्यावी असे आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे.  
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ७५ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल ६१ लाख १५ हजार ६९० नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ७५ कोटी ८९ लाख १२ हजार २७७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या २७ हजार १७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २८४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३३ लाख १६ हजार ७५५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४३ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३८ हजार १२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २५ लाख २२ हजार १७१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ५१ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जलविद्यूत आणि पवनऊर्जा प्रकल्पांसाठी राज्यात जेएसडब्ल्यू ही कंपनी ३५ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत काल याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात एक हजार ८७९ हेक्टर जागेवर, पाच हजार मेगा वॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, यामध्ये सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
****
सेवा हमी कायद्यांतर्गत राज्य शासनानं २० सेवा अधिसूचित केल्या असताना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्यात आणखी ८१ अतिरिक्त सेवा वाढवल्या असून, एकूण १४१ सेवा सुरू केल्या आहेत. नाशिकच्या या प्रकल्पाची राज्य शासनाने दखल घेतली असून, सेवा हमी कायद्याचा नाशिकचा पथदर्शी प्रकल्प आता राज्यात राबवण्यात येणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मांढरे यांनी अतिरिक्त ८१ सेवा देताना व्हाट्सअप वर नागरीकांना त्यांच्या अर्जाची ताजी स्थिती कळण्याची व्यवस्था केली आहे. कोविड काळातही जलद निपटारा होत असल्यानं राज्य शासनानं या प्रकल्पाची घेतली आहे.
****
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर मागसवर्गीय- ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं नसून, राज्य सरकारच्या विरोधात आज भाजपतर्फे राज्यात एक हजार ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं शासकीय दूध डेअरी परिसरात आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली.
****
औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलिस दलाला राज्यात “सर्वोकृष्ट पोलीस युनिट” म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्यातल्या पोलिस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी तसंच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, कायदा सुव्यवस्था राखणं इत्यादी मापदंडाच्या आधारे कामाचं मूल्यांकन करण्यासाठी श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक कार्यालयानं जिल्हा ग्रामीण पोलिस दलाला ‘अ’ श्रेणी दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात पावसा��ं झालेल्या नुकसाग्रस्त भागाची काल महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल पाहणी केली. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिलं. मोताळा तालुक्यातल्या रोहीणखेड, बोराखेडी, अंत्री, वडगांव खंडोपंत इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन सत्तार यांनी,  यंत्रणांनी पंचनामे तातडीनं पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना केली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार? अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील. गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे आधीच सामान्यांना महिन्याचा ताळेबंद मांडताना मोठी कसरत करावी लागत असताना आता पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
FIFA 23 भारतातील किंमती EA द्वारे वाढवल्या जातील, मानक संस्करण प्रभावित
FIFA 23 भारतातील किंमती EA द्वारे वाढवल्या जातील, मानक संस्करण प्रभावित
FIFA 23 23 सप्टेंबर रोजी PlayStation 4, PlayStation 5, Xbox One, Xbox Series S/X, PC आणि Stadia साठी जगभरात लॉन्च होईल. गेम अधिकृत चॅनेलद्वारे प्री-ऑर्डर करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. आता, एक विश्वसनीय टिपस्टर दावा करत आहे की प्रकाशक EA Sports आणि त्याचे भारत वितरक E-xpress यांनी देशात FIFA 23 च्या किमती वाढवल्या आहेत. असे मानले जाते की गेमच्या केवळ प्लेस्टेशन आणि Xbox आवृत्त्यांवर या कथित किंमती…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
होंडा सिटीसह तुमच्या काही आवडत्या गाड्या महागल्या, बघा किती वाढल्या किमती?
होंडा सिटीसह तुमच्या काही आवडत्या गाड्या महागल्या, बघा किती वाढल्या किमती?
नवी दिल्ली. Honda ने सिटी, Amaze आणि WR-V या फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्याचे काही मॉडेल्स 20,000 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. कंपनीने एप्रिलनंतर दुसऱ्यांदा कारच्या किमती वाढवल्या आहेत. सध्या तिन्ही मॉडेल्स आणि त्यांच्या व्हेरियंटमध्ये 11,900 ते 20,000 रुपयांपर्यंत किमतीत वाढ करण्यात आली आहे. चौथ्या पिढीतील होंडा सिटी मध्यम आकाराच्या सेडानमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. नवीन किंमत…
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years
Text
3GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैलिडिटीसह हा Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज...
3GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैलिडिटीसह हा Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज…
Reliance Jio Cheapest Plan : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने स्वस्त आणि सर्वोत्तम डेटा प्लॅनच्या आधारे इतर कंपन्यांना खूप मागे टाकले आहे. आजकाल सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 3GB डेटा मिळतो आणि त्याची वैधता देखील 84 दिवस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Thackeray Vs Shinde: शिंदेंनी वाढवल्या ठाकरेंच्या अडचणी! निवडणूक आयोगाला दिली दीड लाख प्रतिज्ञापत्रे
Thackeray Vs Shinde: शिंदेंनी वाढवल्या ठाकरेंच्या अडचणी! निवडणूक आयोगाला दिली दीड लाख प्रतिज्ञापत्रे
Thackeray Vs Shinde: शिंदेंनी वाढवल्या ठाकरेंच्या अडचणी! निवडणूक आयोगाला दिली दीड लाख प्रतिज्ञापत्रे Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला (Election Commission) टप्प्या टप्प्याने जवळपास दीड लाख प्रतिज्ञापत्रं पाठवली आहेत. Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोकुळच्या दूध दरवाढीचे सत्र सुरूच, जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मोजावे लागणार
गोकुळच्या दूध दरवाढीचे सत्र सुरूच, जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मोजावे लागणार
गोकुळच्या दूध दरवाढीचे सत्र सुरूच, जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मोजावे लागणार Gokul Milk Price: गोकुळ डेअरीने गेल्या १५ महिन्यांत तिसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. १८ जुलैपासून पॅकेज्ड दुग्धजन्य पदार्थ – दही, लस्सी, पनीर आणि ताक यांच्यावर जीएसटी आकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमूलने गेल्या महिन्यात आपल्या उत्पादनांच्या किमतीही वाढवल्या होत्या. Gokul Milk Price: गोकुळ डेअरीने…
View On WordPress
0 notes