#किती
Explore tagged Tumblr posts
Text

1 note
·
View note
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
Hakka Kabir Karim Tu

0 notes
Text

0 notes
Text
तुझ्यासाठीचं माझं प्रेम आहे किती हावरट,
माझ्या ह्रदयाच्या सीमेशी आहे त्याला घृणा;
जगाच्या अंतापर्यंत ही सीमा खेचत नेवून,
ह्या ह्रदयात बनवतो तो आपला एक किल्ला.
#desi academia#desiblr#desi tumblr#dark academia#spilled poetry#spilled ink#poetry#poets on tumblr#marathi#marathiblr#marathi poetry#vichitra vichardhara
32 notes
·
View notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध क��णारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट म��ाठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम व��ळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. ��्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.

तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हण��ात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)

मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)


तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )


हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.


मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )


अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (��च्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपट���चा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी नसून मोक्षप्राप्ती झाली असं म्हणणारे साधु अथवा आज महाराष्ट्रात असलेलं..हे साधू महंत जे प्रकाशझोतात असतात किंवा आणले गेलेंले असतात अशे�� सदर गृहस्थ फार सद्सद्विवेकाचा आव आणून किर्तनादी गप्पा मारताना दुरचित्रवाणी वर दिसतात. देश या असल्या भोंदूंच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ते फार अगोदरच सांगून ठेवलं आहे..
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
N_D_PATIL_25
3 notes
·
View notes
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।
अधिक जानकारी के लिए।
SA True Story Youtube Channel Visit करें जी।
Hakka Kabir Karim Tu

4 notes
·
View notes
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
🇲🇽सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
Hakka Kabir Karim Tu

3 notes
·
View notes
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते ��ेवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
2 notes
·
View notes
Text
गुरुनानकजी_के_गुरु_कौन
👉सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह,
वाहसिक्खां दे गल पड़ी कौनछुड़ावै ता। कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से"वाहेगुरु"शब्द निकला
🙏संत रामपाल जी महाराज ऐप डाउनलोड करें ।
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
#HakkaKabir_KarimTu #gurugranthsahibji #gurudwara #goldentemple #punjab #amritsar #gurbani #satnamwaheguru #waheguru #ekonkar #darbarsahib
#reelsinstagram #gurunanakdevji #gurugranthsahib
#SantRampalJiMaharaj

#santrampalji is trueguru#santrampaljimaharaj#santrampaljiquotes#kabir is real god#sanewschannel#true guru sant rampal ji#jai bajrangbali#satlokashram#jai shree krishna#youtube
3 notes
·
View notes
Text

सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।
#santrampalji incarnationdayधरती पर अवतार#santrampalji is trueguru#santrampaljimaharaj#kabir is real god#kabir is supreme god
3 notes
·
View notes
Text
#सजदेकरे_खुदाईनू_आलम_बड़ा_कबीर
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो
Satguru Rampal Ji Maharaj

2 notes
·
View notes
Text
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।

2 notes
·
View notes
Text

#सत्य_भक्ति_सन्देश सतनामाच्या एका मंत्राची कीमत किती आहे पाहा आज आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर्
2 notes
·
View notes
Text
काकू – Pradip … काय करतोस…
Pradip – माशा मारतोय…
काकू – किती मारल्या?
Pradip – दोन मादी आणि तीन नर…
काकू – तुला कसे माहिती रे…
Pradip – दोन आरश्यासमोर होत्या आणि तीन त्यांना बघत होते…
🤗🤗🤗😛😛😛😏😏😏😩😩😩
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
अंतराळात नऊ महिने राहावं लागलेल्या नासाच्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याच्या, नासाच्या स्पेस एक्स क्रू नाईन या मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नासाच्या पूर्ण पथकाचं अभिनंदन केलं आहे. भारताची कन्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांनी आपल्या दृढता, समर्पण आणि हार न मानण्याच्या भावनेनं सर्वांना प्रेरणा दिली आहे, असं राष्ट्रपतींनी याबाबतच्या संदेशात म्हटलं असून, या अंतराळवीरांचं आरोग्य उत्तम राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. अथक आणि चिकाटीनं प्रयत्न करणं म्हणजे काय, हे या मोहिमेतल्या सर्वांनी जगाला दाखवून दिल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठीच्या ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नांदेड - पुणे रेल्वेला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं. पुणे तसंच हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं अधुनिकीकरण करुन, त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु आहे, त्यानंतर या स्थानकांवरुन रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
आज केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ दिन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दिनानिमित्त या दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९५० साली आजच्याच दिवशी या दलाला राष्ट्रपती ध्वजानं सन्मानित केलं गेलं होतं, याचं स्मरण करत, सीआरपीएफचं शौर्य आणि बलिदान राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नेमका किती आहे, याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमून पुढील पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. सभागृहात याबाबतच्या प्रश्नाला मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचं समाधान न झाल्यानं, अध्यक्षांनी हे निर्देश दिले. राज्यात कुष्ठरोग्यांची संख्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति रुग्ण मिळणारं अनुदान मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलं असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
नागपूर इथं सोमवारी रात्री झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर अकरा पोलीस स्थानकांतर्गत लागू करण्यात आलेली संचारबंदी आजही सुरू असून, केंद्रीय राखीव पोलीस दल-सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त राहूल माखनिकर यांनी सांगितलं आहे.
पुण्यात हिंजवडी इथं एका टेंपोला लागलेल्या आगीत व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल���, तर अन्य काही जण जखमी झाले. आज सकाळी आठ वाजता या टेंपोच्या चालकाच्या केबिनमध्ये आग लागली, त्यावेळी चालक आणि पुढच्या भागात बसलेले कर्मचारी खाली उतरले, मात्र वाहनाचे मागचे दरवाजे उघडू न शकल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होत आहे. या उत्सवासाठी नाशिक शहरात सात ठिकाणी पेशवेकालीन रहाडी असून जमिनीखाली असलेल्या या रहाडी म्हणजेच हौद यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. प्रथेप्रमाणे महिला आणि मानकऱ्यांच्या हस्ते रहाडीचं पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर नैसर्गिक रंग खेळला जाईल. नाशिकमधल्या काही मंदिरांमध्येही रंगोत्सव होत आहे.
धाराशिव इथं जलजागृती सप्ताहाअंतर्गत काल कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मागणी आणि पुरवठा आधारित उपाययोजनांची ओळख तसंच जलसंधारणाच्या कामाची देखभाल आणि दुरुस्ती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात लातूर-नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातल्या नांदगाव पाटी इथल्या अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’ वर प्रशासनाच्या सूचनेवरून लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. या बॅरिकेडमुळे नांदगावकडे जाणारी वाहनं बंद झाल्याने ग्रामस्थांनी काल रस्ता रोको आंदोलन करत बॅरिकेड काढण्याची मागणी केली.
0 notes