#किती
Explore tagged Tumblr posts
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/29240e69c3fb416ae53990309ba1170c/95049fd05bedb1a6-10/s540x810/95ec561be5270455ff419ba77b39d41f7e70ec32.jpg)
1 note
·
View note
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
Hakka Kabir Karim Tu
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7415228cb516888f317c43873dec7367/6969dbac0e56485a-f4/s540x810/27b82f0ce4769038399ec0d664fdf1c93127c14e.jpg)
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bdb8850b6d9e43b465603f2f8c2b07e5/8befb7141b7e7174-6d/s540x810/ea5a0284ad412f5f7dc104f9ad0d59c9efcee322.jpg)
0 notes
Text
तुझ्यासाठीचं माझं प्रेम आहे किती हावरट,
माझ्या ह्रदयाच्या सीमेशी आहे त्याला घृणा;
जगाच्या अंतापर्यंत ही सीमा खेचत नेवून,
ह्या ह्रदयात बनवतो तो आपला एक किल्ला.
#desi academia#desiblr#desi tumblr#dark academia#spilled poetry#spilled ink#poetry#poets on tumblr#marathi#marathiblr#marathi poetry#vichitra vichardhara
32 notes
·
View notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,स��िन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. ��िथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिस��ड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/43e75c51ad88f50c41974ec386941c9f/595949c2f680a691-02/s540x810/564baee3c7e54d7ad08a9d4ea1cdff11ed289ad5.jpg)
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघ��्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad218e13580e96d2dc6c6ffd4ebefeec/595949c2f680a691-88/s540x810/7cd9b5988d8784416668b9587501131615acf653.jpg)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/497f1dc4a43cfd1e131f2da51a648db0/595949c2f680a691-e6/s540x810/3e7c724b379878b4cd8604f5e8e930d6d9124a37.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0cd7c695216e4371f0bcb4d0c30aa829/595949c2f680a691-e7/s250x250_c1/6c30a4a7f8fb764928ef7650bdda3bcb8f700cca.jpg)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/12742f1a8c9e303265a3cc4fa9bbf745/595949c2f680a691-7b/s540x810/848d0ba9815ec96b6bfd1af030f3e7ac194ad74e.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/62be719c20425e3fbea331a94da032be/595949c2f680a691-15/s500x750/8d741612e091dc599d092fd442356d693bd3ae5f.jpg)
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/064a3a2771c0e7f7db7afb49f7afed7b/595949c2f680a691-33/s250x250_c1/236fa2053778834bde4a2c84047707be3dfb2729.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2383007deaeb0618f97267b568f12444/595949c2f680a691-e0/s250x250_c1/be8b3dd78dcfe99fda439379e5c722a5041b9658.jpg)
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/76e14bed4fbf166c0a0b94602e013bb4/595949c2f680a691-c5/s400x600/f97d3fcf76e8ab9b0711369e59d5ba6c349363df.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d9119e2e133189cd4fc84637a6eef350/595949c2f680a691-83/s400x600/d11f16c83437d077a7ba0e405357cf5783dda494.jpg)
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलां��री जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपट���चा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी नसून मोक्षप्राप्ती झाली असं म्हणणारे साधु अथवा आज महाराष्ट्रात असलेलं..हे साधू महंत जे प्रकाशझोतात असतात किंवा आणले गेलेंले असतात अशें स��र गृहस्थ फार सद्सद्विवेकाचा आव आणून किर्तनादी गप्पा मारताना दुरचित्रवाणी वर दिसतात. देश या असल्या भोंदूंच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ते फार अगोदरच सांगून ठेवलं आहे..
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
N_D_PATIL_25
3 notes
·
View notes
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।
अधिक जानकारी के लिए।
SA True Story Youtube Channel Visit करें जी।
Hakka Kabir Karim Tu
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/39483c353d78afd2d398e5b3dbff0b98/736cf09b31ccf464-24/s540x810/d425fc00c42d8d34f9f74b5cd3f4a1ef8bbf50a8.jpg)
4 notes
·
View notes
Text
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
🇲🇽सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला।
Hakka Kabir Karim Tu
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d9a07a136981eb92ff89004e5fa7e96b/7b2befc021a0abd2-3c/s540x810/cdcb8d892e64e55b9d64032889836e5fa906f787.jpg)
3 notes
·
View notes
Text
गुरुनानकजी_के_गुरु_कौन
👉सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह,
वाहसिक्खां दे गल पड़ी कौनछुड़ावै ता। कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से"वाहेगुरु"शब्द निकला
🙏संत रामपाल जी महाराज ऐप डाउनलोड करें ।
#गुरुनानकजी_के_गुरु_कौन
#HakkaKabir_KarimTu #gurugranthsahibji #gurudwara #goldentemple #punjab #amritsar #gurbani #satnamwaheguru #waheguru #ekonkar #darbarsahib
#reelsinstagram #gurunanakdevji #gurugranthsahib
#SantRampalJiMaharaj
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d5f9dc25b311e78c72f3057a28b29ad8/894810104c47d69d-69/s540x810/9542c52f79e35319c8292454f3301054606ecc65.jpg)
#santrampalji is trueguru#santrampaljimaharaj#santrampaljiquotes#kabir is real god#sanewschannel#true guru sant rampal ji#jai bajrangbali#satlokashram#jai shree krishna#youtube
3 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7437279a403a98302c40c236f8486215/8bab025045929c5f-bc/s540x810/c9123cedb2e7045624894b35b383c69fcd1afccd.jpg)
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।
#santrampalji incarnationdayधरती पर अवतार#santrampalji is trueguru#santrampaljimaharaj#kabir is real god#kabir is supreme god
3 notes
·
View notes
Text
#सजदेकरे_खुदाईनू_आलम_बड़ा_कबीर
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो
Satguru Rampal Ji Maharaj
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e4b025ecae90e002b01d3bd864704656/8e3e44a17cf99e2e-6a/s540x810/74455d92996104286c30898a28a054b98f455cde.jpg)
2 notes
·
View notes
Text
सूक्ष्मवेद में बताया गया है कि
झांकी देख कबीर की नानक किती वाह।
वाह सिक्खां दे गल पड़ी कौन छुड़ावै ता।।
अर्थात कबीर साहेब को सतलोक में सर्व सृष्टि के रचनहार के रूप में देखने के बाद श्री नानक जी के मुख से "वाहेगुरु" शब्द निकला। क्योंकि नानक जी को जिंदा महात्मा के रूप में कबीर साहेब ही मिले थे जो उनके गुरु थे।
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e9d110bfcb183399e6bdad0e856f49d2/58276ba3b120b0e2-3a/s540x810/2e93e713bdd840813d29bf6e49e47c1230c3f44c.jpg)
2 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ae5c438808a6ceb4f7824eed273ae2cd/f47871b20fde501d-9c/s540x810/108311f2f594c7b8db4e2080b0eca239a4c5fac8.jpg)
#सत्य_भक्ति_सन्देश सतनामाच्या एका मंत्राची कीमत किती आहे पाहा आज आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर्
2 notes
·
View notes
Text
काकू – Pradip … काय करतोस…
Pradip – माशा मारतोय…
काकू – किती मारल्या?
Pradip – दोन मादी आणि तीन नर…
काकू – तुला कसे माहिती रे…
Pradip – दोन आरश्यासमोर होत्या आणि तीन त्यांना बघत होते…
🤗🤗🤗😛😛😛😏😏😏😩😩😩
2 notes
·
View notes
Text
IND vs ENG : दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये, मॅचच्या वेळेत बदल? - Marathi News | India vs england 2nd odi live and digital streaming know all details marathi news | TV9 Marathi
India vs England 2nd Odi Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली होती. दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? — À lire sur www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-vs-england-2nd-odi-live-and-digital-streaming-know-all-details-marathi-news-1346928.html/amp
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
राज्यातल्या वाढीव मतदारसंख्या प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
तीन दिवसीय वैदिक संमेलनाला रत्नागिरीत प्रारंभ
आणि
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक
****
देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आज ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५’ या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या लोह क्रांतीमुळे नजीकच्या सर्व जिल्ह्यांना लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वर्धन लिथियमच्या ४२ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत आहे.
दरम्यान, गडचिरोली इथलं लोहखनिज देशातील उच्च दर्जाचं असून त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत, येत्या पाच वर्षात देशातील स्टील हब म्हणून उदयास येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमास अनेक मंत्री, उद्योग समुहाचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
****
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या ३९ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली, ते म्हणाले –
हमने इलेक्शन कमिशन को पांच बार बोला है, की हम आरोप नही लगा रहे है। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर्स लिस्ट मांग रहे है। लोकसभा की फाईनल वोटर लिस्ट। ��ेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फायनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। तीनों राजनईक पार्टीयां, विपक्ष की पार्टींयां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही है। मैने पार्लमेंट मे बोला, हमारे सब नेतोओं ने बोला इलेक्शन कमिशन हमे लिस्ट नही दे रही। उनकी जिम्मेदारी बनती है, की जल्दी से जल्दी लोकसभा, विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एन सी पी, शिवसेना अँड काँग्रेस पार्टी को पकडा दे। क्यों की हम इस इन्वेस्टीगेशन को एंड तक ले जाना चाहते है।
दरम्यान, काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशन ने दिलेलं आहे. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले इलेक्शन कमिशन ने सांगितलेलं आहे.आता ही जी काही तयारी राहुल गांधींची चालली आहे, ती दिल्लीमध्ये प्रचंड मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे जो पर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.
दरम्यान, गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. काँग्रेसचे धर्मवीर गांधी, समाजवादी पार्टीचे शिवपालसिंह यादव, तृणमूक काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आदी खासदारांनी अर्थसंकल्पावर टीका केली, तर भाजपचे राव राजेंद्रसिंह यांच्यासह इतर सदस्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदीचं स्वागत केलं.
****
देशात माता मृत्यू दरात ८३ टक्क्यांनी घट झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिल��. सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचं हे फलित असल्याचं नड्डा म्हणाले. बालमृत्यूदरातही ६९ टक्के घट झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर माता आणि बाल मृत्यूदरात अनुक्रमे ४२ टक्के आणि ५५ टक्के घट झाल्याकडे नड्डा यांनी लक्ष वेधलं.
****
देश हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाला एक नवीन मार्ग दाखवत ��हे, असं प्रतिपादन नवीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. देशाने नुकतीच शंभर गिगावॅट सौरऊर्जा क्षमता ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली. २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा क्षमतेचं महत्त्वकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ४० कोटी भाविकांनी स्नान केलं आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्यस या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत मकरसंक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या तीन पर्वण्यांवर जगभरातून आलेल्या भाविकांनी अमृत स्नान केलं, कुंभमेळा अजून १९ दिवस चालणार असून, भाविकांची ही संख्या ५० कोटींहून अधिक होऊ शकते, असा अंदाज उत्तरप्रदेश सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्रिवेणी संगमावर धार्मिक अनुष्ठानात सहभागी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठण इथं आज गोदावरी प्रगट दिनानिमित्त जलपूजन करण्यात आलं. पैठण इथल्या कृष्णकमल तीर्थावर भक्तांच्या मांदियाळीत हा सोहळा पार पडला. गोदावरी नदीमध्ये पुष्पवृष्टी करून महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
****
संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे, तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असल्याचं, रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीत इथं आज तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी केली.
दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विविध वेशभुषेतले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना पोलिसांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं अटक केली. झांबड यांच्यावर वर्षभरापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून झांबड फरार होते. या प्रकरणी बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. आज सकाळी अटक झाल्यानंतर झांबड यांना आजच न्यायालयासमोर हजर करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथमच आज देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरीकाने आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र ॲनाटोमी ऍक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागातल्या विद्यार्थांना शिक्षणासाठी दानात मिळालेल्या या मृतदेहांचा उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पाच लाख ६५ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गावनिहाय शिबीरं घेण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी या शिबिराचा लाभ घ्याव, असंही चौधर यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात आलं असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या १२वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, आणि जालना या चार जिल्ह्यातून १ हजार ४०८ महाविद्यालयातले एक लाख ८५ हजार ३०० विद्यार्थी १२वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी मंडळाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं असून, ४६० परीक्षा केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत.
****
0 notes