Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 22.02.2025 ‘ وقت: صبح 08:30
0 notes
Text
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 22 فروری 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.02.2025 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
मराठी भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं खुली केली-९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
भाषा समृद्ध होण्यासाठी सामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेण्याची गरज संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्याकडून व्यक्त
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण
आणि
दहावीच्या परीक्षेला सुरुवात-बदनापुरात पेपर फुटल्याच्या वृत्ताचं जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडन
****
मराठी भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं खुली केली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार आता प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाला प्राधान्य देत असून, इंग्रजी भाषेअभावी प्रतिभावंतांना दुर्लक्षित करणाऱ्या विचारांना थांबवलं अस��्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. मराठीतल्या नामवंत साहित्यिक आणि लेखकांचा त्यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
‘‘लोकमान्य तिलक ने गीता रहस्य भी मराठी में ही लिखी थी। लेकिन, उनकी इस मराठी रचना ने पूरे देश में एक नई ऊर्जा भर दी थी।
साथियों, मराठी भाषा और मराठी साहित्य ने समाज के शोषित, वंचित वर्ग के लिए सामाजिक मुक्ति के द्वार खोलने का भी अद्भुत काम किया है। ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, महर्षि कर्वे, बाबा साहेब आंबेडकर, ऐसे कितने ही महान समाज सुधारकों ने मराठी भाषा में नए युग की सोच को सींचने का काम किया था।’’
संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, मावळते अध्यक्ष रविंद्र शोभणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निमंत्रक संजय नहार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात, हे संमेलन मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं अधिक जवळ आणणारं असल्याचं सांगितलं.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं सत्र पार पडलं. यावेळी मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्याकडून तारा भवाळकर यांनी संमेलनाची सूत्रं स्वीकारली. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी, प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्त्वाची असल्याने, सामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असं प्रतिपादन केलं.
दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत होत असलेल्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध विषयावर परिसंवाद, आदी कार्यक्रम होत आहेत.
संमेलनानिमित्त काल सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने वेरुळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वर दर्शन आणि वेरुळ लेणीला भेट दिल्यावर दुपारी ती�� वाजेनंतर त्यांचं हेलिकॉप्टरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
‘‘कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या दीक्षांत समारंभात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त पात्र विद्यार्थी तसंच पीएच.डी संशोधकांना पदव्या प्रदान करण्यात येतील. एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांनी या सोहळयात पदवी घेण्यासाठी अर्ज केले आहेत.
दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन, आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत.’’
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक आज होणार आहे. बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून, १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परिक्षा देत आहेत.
दरम्यान, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा खुलासा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे. खरी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेलीच ���ाही, काही दुकानदारांनी बनावट प्रश्नपत्रिकांच्या छायाप्रती विकल्याचं पांचाळ यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करुन देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती, तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरीत जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आणि तो रेजिस्टंट मध्ये काही लोकांनी तेथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पेपर फुटीचा असा कोण��ाही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही.’’
जालना जिल्ह्यात तळणी इथल्या जिल्हा परिषद प्रशालेत गर्दी केलेल्या पालकांना पोलिसांच्या मदतीनं परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
बीड जिल्ह्यात १५३ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता सात भरारी पथकांसह १५६ बैठे पथक नियुक्त केले आहेत.
****
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना काल नांदेड इथं सुरुवात झाली. श्री गुरूगोविंदसिंहजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे अडीच हजार कर्मचारी नांदेडमध्ये आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात काल दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एक बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातले तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांनी मराठवाडा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षपद तसंच शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्षपद भूषवले. त्यांच्या पार्थिव देहावर काल तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. ते तुळजापूर नगरपरिषदेत नगरसेवक तसंच विविध समितीचे सभापतिपदी कार्यरत होते.
****
अश्लिल चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी गुजरात पोलीसांनी काल लातूर इथून एका तरुणाला अटक केलं. प्रज्वल तेली असं या तरुणाचं नाव असून तो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी इतर राज्यातून आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुशासन निर्देशांकामध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल यासाठी सर्व विभागांनी कसोशीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, या य��जनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून, ज्या शेतक-यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल, त्यांनी तो घेऊन जावा, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 21.02.2025 وقت: رات 09:15
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 February 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. • उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभ तसंच संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं उद्घाटन. • राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जालना जिल्ह्यात पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा. आणि • महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात.
नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. विज्ञान भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, ९७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, निमंत्रक संजय नहार, उपस्थित आहेत. भाषा बोलली तर ती जिवंत राहते, कारण भाषा ही जैविक गोष्ट आहे, भाषा ही जोडणारी गोष्ट असली पाहिजे, असं तारा भवाळकर यांनी यावेळी भाषेची महती सांगताना नमूद केलं. एक स्त्री साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, तर गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध प्रादेशिक भाषांबद्द�� पंतप्रधान संवेदनशील असतात, असं उषा तांबे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं. मराठी ��नाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं अधिक जवळ आणणारं हे संमेलन असून, इतर भाषिकांच्या सूचनाही यात विचारात घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. महिला साहित्यिकाला संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला याबद्दल आनंद व्यक्त करत असल्याचं, शरद पवार यावेळी म्हणाले. काश्मीरी गायिकेनं गायलेलं महाराष्ट्र राज्यगीत या उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण ठरलं. संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं उद्घाटन सत्र होणार आहे. त्यात गेल्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन, आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही उपराष्ट्र्पती भेट देणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून, १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा खुलासा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे. याठिकाणी काही स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी काही बनावट प्रश्नपत्रिका विकल्याचं आणि खरी प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर न आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले… दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करुन देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती, तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरीत जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आणि तो रेजिस्टंट मध्ये काही लोकांनी तेथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही. मात्र, पेपर कॉपीमुक्त ठेवण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याशी काही पालकांनी वाद घातल्याचं आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात १५३ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता सात भरारी पथकांसह १५६ बैठे पथक नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी याकरता स्वच्छ आणि मोकळी हवा येईल असे परीक्षा केंद्र निवडण्यात आले आहेत.
राज्यातल्या खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; तसंच या मैदानांमध्ये खेळाडूंसाठी स्वच्छतागृहं आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा एसटी भाड्यात सवलत, अशा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली.
��ुंबई उच्च न्यायालयात तीन अतिरिक्त स्थायी न्यायमूर्तींच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं मंजुरी दिली आहे. यामध्ये न्यायमूर्ती शैलेश प्रमोद ब्रह्म, फ़िरदोश फिरोज पूनीवाल आणि जितेंद्र शांतिलाल जैन यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायलाही कॉलेजियमनं मंजुरी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या, कॅलिफोर्निया इथल्या विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवण्यात न आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागानं दिली आहे.
सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट, येत्या १५ जूनला होणार असून, या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिली. उमेदवारांना २४ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहेत. तर, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात झाली. श्री गुरूगोविंद सिंघजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. तर, खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते, महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली असल्याचं, राजेशकुमार यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचं सांगितलं. येत्या तेवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे अडीच हजार कर्मचारी नांदेडमध्ये आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, या योजनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून, ज्या शेतकऱ्यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल,त्यांनी तो घेऊन जावा, असं प्रशासनानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात आज दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एक बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यात साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळानं वर्ष २०२४-२५ करता थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनेसाठी मातंग समाजातल्या इच्छुक लाभार्थ्यांनी येत्या पाच मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप संमेलनातून केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारे नेतृत्त्व तयार होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सोल लीडरशीप संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यावेळी उपस्थित होत. राष्ट्र उभारणीसाठी नागरिकांचा विकास खूप महत्त्वाचा असून, स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची स्थापना विकसित भारताच्या प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध परिसंवाद, असे कार्यक्रम होणार आहेत.
****
केंद्र सरकारनं समाजमाध्यमांवरील विविध प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसाठी भारतीय कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत नियमावली जारी केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी कायद्यानं प्रतिबंधित असलेला कोणताही कंटेंट प्रसारित करू नये आणि कंटेंटचे वयानुसार वर्गीकरण करावं अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे.
****
देशात मागच्या दहा वर्षात आरोग्यावर होणारा खर्च चौसष्ट टक्क्यांवरून घटून सुमारे एकोणचाळीस टक्के इतका झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५, या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह राष्ट्रीय आरोग्य योजना आणि अन्य अशा योजनांमधून पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमुळे खर्चात ही घट झाल्याचं ते म्हणाले. देशातली सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या या योजनांअंतर्गत येते, असं नमूद करत, नुकतंच सत्तर वर्षांवरच्या सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करून घेण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाहन बाँबनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज दोन व्यक्तींना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथून या दोघांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अभय शिंगणे आणि महेश वायाळ अशी या दोघांची नावं असून, त्यांची मुंबईत गोरेगाव पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे. काल एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरू करून चोवीस तासात संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
****
पीक विमा कंपनीकडे असलेला नव्व्याण्णव कोटी रुपयांचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या मागणीसह परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, नाफेडनं शिल्लक सोयाबीनची खरेदी करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी इथं गोदावरी नदीपात्रात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या या दहावीच्या परिक्षांमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात शिक्षण विभागानं सात भरारी पथकांसह एकशे छप्पन्न बैठी पथकं स्थापन केली आहेत. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक पूर्णवेळ उपस्थित राहणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक कोणत्याही क्षणी परीक्षा केंद्रावर अचानक येऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपली मातृभाषा जपण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी कटीबद्ध राहू या, असं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ब गटातल्या संघांदरम्याचा हा पहिलाच सामना आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.02.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
दिल्लीत९८व्याअखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.संमेलनाचंउद्घाटन दुपारी साडेतीन वाजतापंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याहस्तेहोणारआहे. संमेलनाच्याअध्यक्षडॉक्टरताराभवाळकरयांच्यासहसंमेलनाचेस्वागताध्यक्षशरदपवार, मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयावेळीउपस्थितअसतील. तालकटोराक्रीडा संकुलातल्या छत्रपतीशिवाजीमहाराजसाहित्यनगरीततीनदिवसचालणाऱ्यायासंमेलनात, मान्यवरांच्यामुलाखती, बहुभाषिककवीसंमेलन, विविध परिसंवाद, असेकार्यक्रमहोणारआहेत.
यासाहित्यसंमेलनासाठीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीदोनकोटीरुपयांचाअतिरिक्तनिधीमंजूरकरतएकूणचारकोटीरुपयांचानिधीउपलब्धकरूनदिलाआहे.
****
एकोणिसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर सुरू होत आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक राणा या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित होते. येत्या दोन मार्च पर्यंत चालणा-या या महोत्सवात मराठीसह बंगाली, तामिळ, इंग्रजी, अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण होणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथे संत श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन उत्सव साजरा झाला. तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात काकडा, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धर्मिक कार्यक्रम झाले. यावर्षी प्रगट दिन उत्सवात १००१ दिंड्यांनी सहभाग घेतल्याचं आणि जिल्हाभरातल्या मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एकतीस लाख लोकांनी पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांनाही आता महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कैद्यांना कारागृहाच्या आवारातच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान,महाकुंभाच्याशेवटच्याआठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेनं तयारी केली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांच्याबाहेरअतिरिक्त विशेष व्यवस्था तयार करण्यात आली असून, प्रवाशांना त्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या नियोजित वेळेनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.
****
२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका सांगता झाली. या महोत्सवात जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वेच्या ‘आरमंड’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचं महाराष्ट्र शासनाचं ‘प्रभात’ पारितोषिक मिळालं; तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सांगळा’ या चित्रपटाला मिळालं. मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'स्नो फ्लॉवर' या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल दाभाडे यांनातरसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छाया कदम यांना जाहीर करण्यात आला.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण, तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत बावीस कोटीरुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळेलातूर शहरातल्या सर्व लाभार्थीना महानगरपालिकेमार्फत दोनदिवसातनिधी वा��प करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.यायोजनेच्यालाभार्थ्यांनीमहापालिकेच्यासंबंधितअधिका-यांशीसंपर्कसाधूनयानिधीचालाभघ्यावा, असंआवाहनलातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
****
मध्यआसामच्यावरचक्रीवादळाचीस्थितीउत्पन्नझाल्यामुळेदेशाच्याईशान्यभागातआजविजाआणिढगांच्यागडगडाटासहमुसळधारवादळीपाऊसह��ण्याचाअंदाजहवामानविभागानंवर्तवलाआहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.02.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
0 notes
Text
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 21 فروری 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.02.2025 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 21.02.2025 ‘ وقت: صبح 08:30
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
��त्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त
शासनाच्या फसवणूक प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड - न्यायालयाकडून जामीनही मंजूर
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
आणि
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर सहा गडी राखून विजय
****
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल ७१ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. त्यापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध परिसंवाद, आदी कार्यक्रम होणार आहेत.
दरवर्षी साहित्य संमेलनासाठी दोन कोटी रुपये निधी दिला जातो, मात्र वाढता खर्च आणि संमेलनाचं वेगळेपण यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या संमेलनासाठी अतिरिक्त दोन कोटी रुपये, असा एकूण चार कोटी रुपये निधी देण्यास, विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
दरम्यान, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा वाढवणं आणि टिकवणं, ही मराठी भाषिकांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या...
‘‘केवळ कुठेतरी सरकारी शिक्कामोर्तब झालं म्हणून भाषेसारख्या गोष्टीचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यातनं काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. शासनाकडून मराठी भाषिकांना, संस्थाना, विद्यापीठांना किंवा नवीन येणाऱ्या साहित्यीकांना, संशोधकांना काही आर्थिक साहाय्य होऊ शकेल. त्याने प्रकाशन संस्था निघू शकतील आणि निघाव्यात आणि त्याच्यासाठी मराठी जाणकार भाषिकांनी जास्त प्रयत्न करायला पाहिजे. नुसता दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. तो दर्जा वाढवणं आणि टिकवणं हे माणसांच्या,भाषिकांच्या हातात आहे.’’
दरम्यान, संमेलनाध्यक्ष भवाळकर आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी काल संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.
****
१९ वं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर आजपासून सुरू होत आहे. या मैदानात उभारण्यात आलेल्या मलिक अंबर नगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.अशोक राणा यांची निवड करण्यात आली आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीने भूमिपूजन, आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही ते भेट देणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प असून, येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ��्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट अप इन्क्युबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले...
‘‘ऑरिक की बिल्डींग है, उसमे बीस हजार स्केअर फीट का एक कौशल्य विकास केंद्र, स्टील डेव्हलपमेंट सेंटर बनाने का कल निर्णय लिया है। साथ ही साथ लगभग दस हजार स्केअर फीट का स्टार्टअप इनक्यूबेशन हब बनाने का भी निर्णय लिय��� गया है। वहा पर कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, एक अस्पताल बन रहा है वहा पर, एक युनिवर्सिटी आ रही है। साथ ही साथ स्कुल हो व्हॅक्रीसीएशन फॅसीलीटी हो इन सब चिजो की और ध्यान केंद्रीत करते हुये हम इस पुरे औद्योगीक क्षेत्र को महाराष्ट्र की और देश की शान बनाने के लिये संकल्पीत है।’’
****
राज्याचे कृषिमंत्री सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना काल नाशिकच्या न्यायालयानं दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. १९९५ ते १९९७ या कालावधीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ शिवाजी कोकाटे यांनी, आपल्याला स्वतःचं घर नसल्याचे खोटे कागदपत्र देऊन, नाशिकमध्ये उच्चभ्रू वसाहतीत मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवलं, तसंच आपल्या नावावर २ सदनिका घेतल्याचा आरोप, माजी मंत्री तुकाराम दिघेाळे यांनी केला होता. यासंदर्भातला खटला २८ वर्ष चालल्यानंतर काल न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. कोकाटे बंधूंनी जामीनासाठी अर्ज दाखल केला, न्यायालयानं तो मान्य करत, जामीन मंजूर केला.
दरम्यान, राजकीय वैमानस्यातून हा प्रकार झाला असून, यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तसंच काँग्रेसनं कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
****
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना सामान्य भविष्य निर्वाह निधी जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असून, अंतिम पेन्शन प्रकरणांचा तपशीलही ऑनलाइन पाहता येणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून,१६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे.
****
��ांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र गोरठे इथल्या वरद प्रतिष्ठानच्या वतीने प्राध्यापक ललिता गादगे यांना काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २७ फेब्रुवारीला गोरठा इथं आयोजित पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन तर अक्षर पटेलनं दोन बळी घेतले. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारताच्या संघाने शुभमन गीलच्या शतकी खेळीच्या बळावर ४७व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. शुभमन प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, शमी हा सर्वात जलद दोनशे बळींचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने काल एकशे चाराव्या एकदिवसीय सामन्यात दोनशे बळी घेत, अजित आगरकरचा १३३ सामन्यात हा टप्पा गाठण्याचा विक्रम मोडला. तर कर्णधार रोहीत शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधल्या ११ हजार धावा काल पूर्ण केल्या.
****
नांदेड इथं राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज होणार आहे. महसूल विभागातले जवळपास अडीच ते तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, याअंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धांना काल सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात पुणे विभागाने छत्रपती संभाजीनगर विभागाचा सात धावांनी पराभव केला.
****
संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन काल सर्वत्र साजरा झाला. शेगाव इथं सुमारे अडीच लाखावर भाविकांनी महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगर इथंही गजानन महाराज मंदिरासह विविध ठिकाणी गजानन विजय ग्रंथांचं पारायण करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल नळदुर्ग इथं ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं तसंच इतर आरोग्य संस्थांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या जुनूना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने निलगाईला उडवल्यानं अकोला -पूर्णा मार्गावरची रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
0 notes
Video
youtube
آکاشوانی خبریں‘ تاریخ: 20.02.2025 وقت: رات 09:15
0 notes