Tumgik
#दुधाच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Excess Of Milk: दुधाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो ‘हा’ जीवघेणा आजार ?
Excess Of Milk: दुधाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो ‘हा’ जीवघेणा आजार ?
Excess Of Milk: दुधाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो ‘हा’ जीवघेणा आजार ? नवी दिल्ली – शरीरातील कॅल्शिअमचा पुरवठा करण्यासाठी दूध (milk) हे नेहमीच एक उत्तम स्त्रोत मानले जाते. दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, हे आपण सर्वांनी लहानपणापासूनच ऐकलं असेल. याच कारणामुळे लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची, तसंच भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशी शिफारस करण्यात आली होती.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौ-यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न रोखत सैन्यानं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं. काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांपैकी दोघांना मारल्यानंतर या परिसरात शोध मोहीम सुरू असून, सैन्यानं या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूरसारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर मंत्री पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या हदगाव तालुक्याला भेट दिली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारनं सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नांदेडच्या दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे परभणी भागातल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
****
स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱया नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणार्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
भारतीय गिधाड, या धोक्यात असलेल्या आणि विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी प्रजातीसाठी नागपूरच्या पेंच अभयारण्यात जटायू ग्राम मित्र, हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये, गावातले पशुपालक आणि इतर लोक जंगलातल्या एका विशिष्ट ठिकाणी नैसर्गिकरीत्या मरण पावलेल्या पशुपक्षांचे मृतदेह टाकतील, ज्यामुळे गिधाडांना अन्न मिळणं निश्चित होईल. पशुपक्षांचे मृतदेह ठरलेल्या ठिकाणी नेऊन टाकण्या-या लोकांना वाहतुकीचा खर्च दिला जाणार आहे. हा प्रकल्प सध्या एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायकवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरासह, मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Alandi: श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं मंदिरात दूध वाटप
एमपीसीन्यूज -आज दि.26 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (Alandi)व श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं भक्तांना माऊलीं मंदिरात दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच आज श्रावणी सोमवार निमित्ताने श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी शिव भक्तांना सुद्धा या दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.शिवसेना आळंदी शहर प्रमुख (शिंदे गट)राहुल चव्हाण यांच्या तर्फे या…
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
दुधक्रांतीमुळं नष्ट झालेल्या गायी आज ‘वेचूर अम्मा’मुळं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतायेत
दुधक्रांतीमुळं नष्ट झालेल्या गायी आज ‘वेचूर अम्मा’मुळं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतायेत
दूध उप्तादन करणाऱ्या देशात आपला भारत अख्ख्या जगात टॉपला आहे. म्हणजे २०२० च्या एका रिपोर्टनुसार तर एकट्या भारतातून १९८ मिलियन मेट्रिक टन एवढं दूध उत्पादन करण्यात आलं होत. आता भारत दूध उत्पादनात आघाडीवर येण्यामागचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहितेय, ते म्हणजे १९७० ची दूध क्रांती. वर्गीस कुरीयन यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या क्रांतीमुळे देशात दुधाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळाली.  पण दूध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
लबाडी की जाहिरात?...आयआयएम माजी विद्यार्थ्यांनी स्थापना केली: टॅग केलेल्या दुधाच्या पॅकेट्सवरून ट्विटरवर वाद सुरू झाला.
लबाडी की जाहिरात?…आयआयएम माजी विद्यार्थ्यांनी स्थापना केली: टॅग केलेल्या दुधाच्या पॅकेट्सवरून ट्विटरवर वाद सुरू झाला.
दुधाच्या पाकिटावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. वास्तविक, पॅकेटवर ‘Founded by IIM Alumni’ असा टॅग आहे. म्हणजे, आयआयएमच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केले. आता या प्रकरणाची ट्विटरवर चर्चा सुरू झाली आहे. दुधाच्या या पॅकेटबाबत ट्विटरवर वाद सुरू झाला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter दुधाचे पाकीट (दुधाचे पाकीटखरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवता? साधारणपणे लोक फुल क्रीम, डबल टोन्ड किंवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
#बाळंतपण ‘शेक शेगडी’ आणि सायन्स.
‘जान्हवी’ ची डिलीव्हरी सुखरूप पार पडली. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून झाल्यावर आज ती डिस्चार्ज घेऊन घरी जाणार होती. नेहमी प्रमाणे राउंडला गेल्यावर तिला तपासले आणि सर्व काही ठीक आहे म्हणून सांगितल्यावर जान्हवी च्या आईने तक्रार करत म्हटले,
‘ डॉक्टर ही काही शेक शेगडी मालीश करायला तयार नाही, आज काल हे सगळं जूनं झालाय म्हणते तुम्हीच समजावा आता ; मला तीच हे वागणं अजिबात पटत नाहीये ; जुन्या पद्धती कधी चुकीच्या असतील का डॉक्टर?
हा संवाद आज काल आम्हा स्त्री रोग तज्ञा ना नेहमीच झालाय म्हणून आज आपण आपल्या पद्धती आणि त्यामागचे सायन्स समजावून घेऊ या आणि मग त्या पद्धती पाळायचा की नाही हा निर्णय स्वतः चा स्वतः घेऊया.
१. पहिली प्रथा म्हणजे डिलीव्हरी नंतर सव्वा महिना किंवा ४० दिवस बाहेर न पडणे,काम न करणे .
४० दिवस किंवा सव्वा महिना हा काळ म्हणजे गर्भपिशवी पुन्हा पूर्वी सारखी होण्यासाठी लागणारा काळ होय. गर्भधारणे मुळे झालेले शारीरिक बदल पूर्वस्थितीत येण्यासाठी बरोबर इतकाच वेळ हवा असतो म्हणून ही प्रथा पूर्वजांनी पाडली असावी. प्रेग्नन्सी मध्ये स्त्रीची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते
( pregnanacy is an immunosuppressive state) ती वाढण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो . कोणतेही इन्फेक्शन या काळात पटकन होतात . हे टाळण्यासाठी घराबाहेर पडणे टाळण्याची प्रथा आहे.
आपल्या भारतात हवे द्वारे पसरणारा सगळ्यात कॉमन आजार म्हणजे टी. बी.! भारत या या आजारा मध्ये अनेक वर्षे पहिल्या नंबर वर आहे.याआणि प्रतिकार शक्ती कमी झाली की तो होण्याचे चान्सेस वाढतात.मग ती रिस्क कमी करण्यासाठी साठी लोकांच्या मध्ये मिसळणे टाळण्यासाठी साठी बाळंतिणी ला घर��बाहेर पडणे आपल्या पूर्वजांनी मना केले असावे हे त्यामागचे सायन्स आहे.
पाश्चात्य देशात टी.बी.अगदी दुर्मिळ आहे म्हणून तिथल्या ओल्या
‘बाळंतिणी’ लगेच बाहेर पडतात ड्राईव्ह करतात.
दुसरे कारण म्हणजे हा काळ आई आणि बाळाला एकमेका बरोबर ऍडजस्ट करायला मिळावा आणि बाळंतिणी ला विश्रांती मिळावी हा ही हेतू या मागे असतो. हे ही सायन्स च्या दृष्टीने बरोबर आहे
२. गार पाण्यात हात न घालणे...
नवीन आईला पुरेशी झोप मिळत नाही,
स्तनपान करण्या मध्ये बाळाचे आवरण्या मध्ये बराच वेळ जातो व त्याकरता बरीच एनर्जी पण लागते. त्यामुळे हे करत असताना तिला घरकामाचे टेन्शन नको म्हणून तिला गार पाण्यात हात घालू नको म्हणतात. (कपडे धुणे भांडी घासणे, फारशी पुसणे ही कामे गार पाण्याने करतात आणि अशी कष्टा ची कामे ओल्या बाळंतिणीने करू नयेत हे त्या मागचे सायन्स आहे, म्हणजे तिची एनर्जी बाळासाठी आणि तिच्यासाठी राखली जाईल)
३.मालीश ---- डिलीव्हरी नंतर चे मालीश हा एक ‘सोहळा’ असतो. रोज तेल लावून मसाज करून बाळ
बाळंतिणीला आंघोळ घालणे आणि मग मस्त शेक देणे यात वेळ कसा निघून जातो कळत नाही.
मालीश करण्याचे फायदे
१. अंग आणि पाठदुखी कमी होते डिलीव्हरी आणि नंतर सतत स्तनपाना साठी बसून बसून अंग आणि पाठ दुखायला लागते .मालीश हा त्यावर उत्तर उपाय आहे
२. मसल्स रिलॅक्स होतात
३. स्ट्रेस आणि टेन्शन कमी होण्यास मदत होते.
जागरण आणि एकदम बदलेले टाईम टेबल , प्रत्येक बाबतीत आत्ता पर्यंत मोकळे जगायची सवय असते आणि आता एकदम सगळे बदलून बाळा प्रमाणे सगळे सतत ऍडजस्ट करावे लागते त्यामुळे नवीन आई ला हा बदल स्ट्रेस आणि टेन्शन देणारा असतो. ‘मालीश’ मुळे स्ट्रेस कमी होतो हे सायंटिफिकली समोर आले आहे.
४. योग्य पद्धतीने स्तनाचा मसाज केल्यास दुधाच्या गाठी होत नाहीत.
५. हार्मोन्स मुळे त्वचेमध्ये जे बदल झालेले असतात ते जाऊन कांती नितळ आणि मऊ होते.
असे अनेक फायदे मालीश मुळे होतात.
मालीश करताना घ्यायची काळजी
१. मालीश करणारी बाई अनुभवी असावी
२. सीझर नंतर टाके काढले की मालीश करावे
३. सीझर असेल तर पोटाचे मालीश टाळावे.
आज काल तुम्ही गुगल वर सर्च केल्यास ‘डीलीव्हरी नंतर च्या मालीश’ चे स्पेशल कोर्स उपलब्द्ध आहेत आणि स्पेशल पॅकेजेस पण!
४.शेक देणे--- कोळशाची शेगडी पेटवून त्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधी टाकून ती शेगडी पूर्वी बाळ बाळंतिणीच्या कॉट खाली शेक देण्यासाठी ठेवत असत .
शेक घेण्याचा उपयोग हा inflamation कमी करण्यासाठी होतो. इतर वेळी ही काही दुखत असेल तर आपण शेकायची पिशवी घेतो च की... तसेच नॉर्मल डिलीव्हरी नंतर चे टाके शेकून त्याच्या भोवतीचे inflamation कमी करणे हा या शेकाचा हेतू असतो तो बरोबरच आहे. तसेच पाठदुखी कमी होण्यासाठी ही शेकाचा उपयोग होतो.
आयुर्वेदिक औषधे घालून केलेला धूर हा बाळंतिणीची खोली निर्जंतुक होण्यासाठी उपयुक्त ठरतो.
इथे मला हे ही सांगायचे आहे की शेक शेगडी साठी लागणारी कॉट तात्पुराती भाड्याने मिळते त्यामुळे तो ही फार मोठा प्रश्न नाही.
४. आहार – डिलीव्हरी नंतर चा भारतीय आहार हा अगदी योग्य आहार आहे. या मध्ये परंपरेने चालत आलेले काही पदार्थ समाविष्ट असतात. मेथी लाडू , डिंक लाडू , हाळीव लाडू आणि खीर, खसखसी ची खीर इत्यादी. याचा उपयोग हा रक्त वाढणे , कॅल्शियम वाढणे, दूध चांगले येणे या साठी होतो. म्हणजे ही पध्दत ही सायन्स च्या दृष्टीने बरोबरच आहे .
बाळं तिणी च्या आहारात पालेभाज्या, मूग आणि तूर डाळ, खोबरं लसूण चटणी याचा समावेश असतो . हे सर्व पदार्थ पचायला हलके, आणि प्रोटीन युक्त असतात त्याची शरीराला झीज भरून येण्यासाठी गरज असते आणि ��ाळाला ही पचायला हे पदार्थ हलके पडतात .
काही पदार्थ खाऊ नका म्हणतात जसे बटाटा , वांगे, हरभरा डाळ , तेलकट तिखट मसालेदार पदार्थ कारण हे पदार्थ ‘वातूळ’ असतात आणि आईच्या दुधातून ते बाळाला गेले की बाळाला पचायला जड जातात.
५.कानात कापूस घालणे--- वर म्हटल्याप्रमाणे ही प्रथा ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे. भारतात हवे द्वारे पसरणारे आजार जसे की सर्दी ,खोकला ,टी बी हे कॉमन आहेत आणि कानातले इन्फेक्शन घशात जायला वेळ लागत नाही म्हणून एक्स्ट्रा काळजी म्हणून कानात बोळे घालतात.पण आज काल चांगल्या अँटिबायोटिक मुळे जर तुम्हाला नको वाटत असेल तर ही प्रथा पाळली नाही तरी ठीक आहे असे वाटते.
६. बाळाचे बारसे – १२ किंवा १३ व्या दिवशी करण्याची पद्धत ही सायंटिफिक दृष्टीने योग्य आहे. तुम्हाला माहीतच असेल की परदेशात तर जन्मा आधीच बाळाचे नाव ठरवलेले असते.
बाळाला जितक्या लवकर नाव मिळते तितक्या लवकर त्याची स्वतः ची ओळख त्याला मिळते. त्याच्या नावाची त्याला सवय लवकर होते आणि मग आपण त्या नावाने हाक मारल्यावर बाळ नॉर्मल रिस्पॉन्स देते का हे ही समजते जसे की नावाने हाक मारली की डोळे वळवणे, मान वळवणे, हसून प्रतिसाद देणे इत्यादि नॉर्मल वाढीची लक्षणे आहेत.
जर लवकर नाव च ठेवले नाही आणि बबड्या, सोन्या, मन्या अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला बोलवत राहिलो तर ते बाळ ही गोंधळून जाते .
थोडक्यात बाळाच्या ‘ब्रेन स्टीम्युलेशन’ साठी बाळाला लवकरात लवकर नाव ठेवणे योग्य आहे.
कोणतीही गोष्ट पिढ्या न पिढया अनेक वर्षे तग धरून उभी आहे म्हणजे तिला नक्की काहीतरी भक्कम पाया ( strong base)आहे नाहीतर ती इतके वर्ष टिकली च नसती नाही का? कदाचित आपल्याला हा पाया माहीत नसेल . त्यामुळे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पडताळून घेऊन फॉलो करायला काहीच हरकत नाही.
खरोखरच आनंदाने सव्वा महिना आपण फक्त आपल्या बाळा साठी आणि आपल्यासाठी दिला तर त्यातून दोघांना ही फायदाच आहे की ! बाळ आणि आई यांच्या मध्ये त्यामुळे सुंदर भावबंध तयार होईल तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही पुढच्या अनेक बारीक सारीक तक्रारी टळतील नाही का ?
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ
0 notes
samarthnews · 3 years
Text
केज तालुक्यात साडेपाच लाखाचा बनावट विषारी खवा केला नष्ट.
केज तालुक्यात साडेपाच लाखाचा बनावट विषारी खवा केला नष्ट.
  केज दि.१७ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील उमरी फाट्यावर असलेल्या व्हर्टिकल फूड्स राधा-कृष्ण कंपनीत आय.पी.एस. पंकज कुमावत व अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दि.२४ नोव्हेंबरच्या रात्री छापा टाकून दुधाच्या पावडर मध्ये रुची तेल टाकून त्या पासून बनावट खवा तयार करण्याचे साहीत्य जप्त करून शिल केले होते.जप्त केलेले साहित्य दि.१७ डिसेंबर शुक्रवार रोजी एका खड्यात टाकून नष्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट आणणारा 
पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र ५० लाख लिटर दूध भेसळीचे असल्याने दर देता येत नसल्याचा मुद्दा कपोलकल्पित आहे. भेसळीच्या या चर्चेमुळे राज्याच्या डेअरी उद्योगावर संकट येऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संघाने दिला आहे.  दुधाच्या भेसळीबाबत संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार, कोशाध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
गाय दुधाच्या खरेदी दरात कपात केल्याबद्दल ‘गोकुळ’समोर निदर्शने
https://bharatlive.news/?p=156721 गाय दुधाच्या खरेदी दरात कपात केल्याबद्दल ‘गोकुळ’समोर ...
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौर्यावर असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीची आरती करुन दर्शन घेतलं. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासह, मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत.
दरम्यान, शाह यांच्या उपस्थितीत काल मुंबईत राज्यातल्या प्रमुख भाजप नेत्यांची विशेष बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
****
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं आयोजित सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत सातव्या दिवसापर्यंत देशभरात एक कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित २० लाखापेक्षा जास्त उपक्रमांचा समावेश होता.
****
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा परिषद आयोजित केली आहे. चिंतन शिबिर नावाच्या या परिषदेत देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाजकल्याण विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. उपेक्षित समाजाच्या कल्याणाच्या उद्देशानं विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर या शिबिरात चर्चा करण्यात येईल.
****
शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातल्या शेतमालाला वाढीव बाजारभाव मिळाल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा शेतकर्‍यांना होत आहे. शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्यानं, या योजनेला शेतकरी आणि बाजार समित्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या २०२३-२४ या हंगामामध्ये राज्यातल्या ६७ बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे दोन लाख ७७ हजार क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला. त्यावर ३६ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांच्या कर्जाचं वाटप शेतकर्‍यांना करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली.
****
सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा, २४५वा रथोत्सव आणि संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा काल पार पडला. गणपती मंदिर ते जवळच्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भाविकांहस बाराबलुतेदारांनी हा रथ ओढला. रथासमोरचे मानवी मनोरे, झांजपथक यामुळे हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पाच लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहराचा देखील पाणी प्रश्न मिटला आहे. याशिवाय मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे. शिवाय जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा अशा मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
****
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम... मुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी डोंबिवली : पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने पॉज संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग,साधना सभरकर,उनिशिया वाझ,पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.या उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.वीस लिटर दुध हे साईसेवा वृद्धाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून पोज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले. #webnewswala #paws #pawsdogdaycare #mahashivratri #mahadev #mahakal https://www.instagram.com/p/CMUsxUanjDB/?igshid=1s7tg5m08g7z8
0 notes
hallomanojposts · 4 years
Text
*दूध ठेवून बाजूला जाताच त्याने दुधाच्या किटली  चां ताबा घेतला.....*
*दूध ठेवून बाजूला जाताच त्याने दुधाच्या किटली  चां ताबा घेतला…..*
अकोले, ता.१०:सकाळी सात वाजता दूध घेऊन जाणाऱ्या सौ. अंजनाबाई राजाराम भोईर या बांगार वाडी गावातून मधल्या रस्त्याने राजूर कडे निघाल्या रस्त्यात जड झाले म्हणून त्यांनी किटली ठेवली नी रस्त्याच्या कडेला उतरल्या त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या अचानक किटली जवळ आला नी त्यांनी मोठ्याने जांभळी दिली. त्याच्या आवाजाने अंजनाबाई अर्धमेल्या झाल्या त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रस्त्याच्या कडेला असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
रूतलेल्या कँटरला बाजू देताना कळणेत ट्रकला अपघात ​दोडामार्ग :​ ​चुकीच्या बाजूने जावून बाजूपट्टीत रूतलेल्या दुधाच्या टँकरला बाजू देवून दोडामार्गच्या दिशेने जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता सोडून उजव्या बाजूला गेला आणि बाजूपट्टीवरील चिखलात रूतला.​हा ​अपघात आज सकाळी बांदा दोडामार्ग मार्गावर कळणे येथे झाला.
0 notes
amhikastkar · 3 years
Text
हे 5 हर्बल टी आपल्याला निरोगी ठेवतील
हे 5 हर्बल टी आपल्याला निरोगी ठेवतील
ग्रीन टी आम्ही आपल्या दिवसाची सुरुवात एका कप चहाने करतो. कारण आपल्याला असे वाटते की चहा आपला थकवा दूर करून ऊर्जा देते. परंतु जर तुम्हाला अधिक चहा पिणे देखील आवडत असेल तर काळजी घ्या, चहा पिणे आरोग्यास हानिकारक आहे. चहाच्या पानांमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त आहे. एक कप चहा सहसा 20 ते 60 मिलीग्राम कॅफिन असते. ज्यामुळे शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी होते. म्हणून, दुधाच्या मिश्र चहाऐवजी हर्बल चहा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Chhatrapati Sambhajinagar :हृदयद्रावक! खेळताना दुधाच्या कढईत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
https://bharatlive.news/?p=135627 Chhatrapati Sambhajinagar :हृदयद्रावक! खेळताना दुधाच्या कढईत पडून चिमुकल्याचा दुर्देवी ...
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चं उद्‌घाटन
तांत्रिक अडचणींमुळे जालना तसंच परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना तर टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हणत न्यायालयानं या योजनेच्या विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे आपल्या ट्वीटर खात्यावरुन आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी नमूद केलं.
शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी, न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब आणि विरोधकांना चपराक असल्याचं म्हटलं आहे.
****
महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं आज महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन करण्यात आलं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल असं तटकरे यावेळी म्हणाल्या.
****
अर्थसंकल्पात दुग्धव्यवसायाला सहाय्य करण्यासाठी उपाययोजनांची गरज अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी आज लोकसभेत व्यक्त केली. पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन विभागाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत त्यांनी या विषयाकडे लक्ष वेधलं. दुधाच्या उत्पादनखर्चावर बाजारभाव ठरावा, दुधाला किमान हमीभाव मिळावा, तसंच आवश्यक पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीसह अन्य उपाययोजना करण्याची मागणी लंके यांनी केली.
****
देशभरात आतापर्यंत ५० लाखांहून अधिक कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत नावनोंदणी केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा लाखावर कामगारांचा समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्��ात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांसाठी सरकार काम करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० आणि ३५ -अ हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल समाज माध्यमावरील एका संदेशात आपल्या भावना व्यक्त करत, मोदी यांनी हा राष्ट्राच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचं नमूद केलं.
****
बांग्लादेशात उद्भवलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीमाना देत, देश सोडल्याचं वृत्त आहे. शेख हसीना यांच्या ढाका इथल्या निवासस्थानी शेकडो आंदोलकांनी घुसखोरी केली, त्यानंतर हसीना यांनी सुरक्षित स्थळी तात्पुरता आसरा घेत, सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने देश सोडल्याचं वृत्त बांग्लादेशातल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
बांग्लादेशात १९७१ च्या युद्धातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केलं आहे. पोलिस आणि आंदोलकांच्या चकमकीत आतापर्यंत शंभराहून अधिक लोक मारले गेले आहेत. या देशाच्या सैन्यप्रमुखांनी देशवासियांनी शांततेचं आव्हान केलं आहे.
दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जालना इथं विविध शिवमंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथंही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ई-पॉस मशीनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे स्वस्तधान्य वाटपात अडचणी येत असल्यानं जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी आज ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात आणून जमा केल्या. या मशीनचे सर्व्हर सातत्यानं डाऊन राहत असल्यानं दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होत आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना त्यांच्या स्तरावर ऑफलाईन पध्दतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्यावतीनं तहसीलदारांकडे करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
परभणी शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी आज याच कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं, ई पॉस मशीनवर तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे नागरिकांना धान्य वितरण करण्यासाठी अडचणी येत असल्याची तक्रार या स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून त्यांच्याविरोधात कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. तर अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. तर महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरन पहल सहभागी होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. टेबल टेनिसच्या सांघिक प्रकारात भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज भारतीय टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसंच युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा येत्या ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर पंचायत समिती इथं आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या मालधे इथं गिरणा नदीपात्रात कालपासून अडकलेल्या १५ मच्छीमारांची आज विशेष हॅलिकॉप्टरने सुटका करण्यात आली. मासेमारीसाठी गिरणा नदीपात्रात गेलेल्या या मच्छीमारांना पुर अचानक वाढल्याने नदीपात्रात मध्यवर्ती असलेल्या खडकावर आसरा घ्यावा लागला होता. आज सकाळी नाशिकच्या गांधीनगर इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांनी या खडकावर हेलिकॉप्टर उतरवत, मच्छीमारांना टप्प्याटप्प्याने नदीकाठावर आणून सोडलं.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाचा जोर कमी होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या गंगापूर धरणातून दोन हजार घनफुट प्रतिसेकंद, दारणा धरणातून ८ हजार ९४२ घनफुट प्रतिसेकंद तर कडवा धरणातून १एक हजार ४६२ घनफुट प्रति सेकंद वेगाने विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes