#जाणून
Explore tagged Tumblr posts
Text

0 notes
Text
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
बळीराजा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या घटाची मांडणी झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीव��� भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं.तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते.…

View On WordPress
#भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या#Indian weather#Mansoon forcast#Marahashtra farming
0 notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."

21 notes
·
View notes
Text
आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. ��ातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी. एक असा गृहप्रकल्प जो नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे. सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया!
१) आकर्षक प्रवेशद्वार
भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवेशद्वाराकडे पाहूनच येथील रहिवासी किंवा त्यांचे नातलग येथील आलिशान राहणीमानाचा अंदाज लावत असतात. आलिशान राहणीमानाला शोभेल असेच आहे भाग्य गार्डन सिटीचे आकर्षक प्रवेशद्वार.
२) गृहप्रकल्पा अंतर्गत काँक्रीट रोड
भाग्य गार्डन सिटी गृहप्रकल्पांतर्गत काँक्रीट रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाश्यांना चालण्यासाठी सुटसुटीच रस्ते आणि मुलांना देखील ऐसपैस परिसर देण्यात आला आहे..
३) पाण्याचे योग्य व्यवस्थापन
पावसाचे पाणी जमीनीवर पडल्यानंतर ते गटारात मिसळते आणि वाया जाते. परंतु याच पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेच पाणी साठवून वर्षभर वापरता येते. आणि गृहप्रकल्पांतर्गत मुबलक पाणी उपलब्ध होते. या गोष्टीचा विचार करुन भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या कधीच उद्भवरणार नाही.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
2 notes
·
View notes
Text

अमर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भक्तीचा विधी कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी पवित्र पुस्तक ज्ञानगंगा जरूर वाचा ही पुस्तक तुम्हाला निशुल्क तुमच्या घरपोच पत्त्यावर दिली जाते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता किंवा फेसबुकवरील तुम्ही ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल विचारपूस करू शकता
3 notes
·
View notes
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…

View On WordPress
9 notes
·
View notes
Text
Suchitra Sen Birth Anniversary : from Pradip Madgaonkar
बॉलिवूडची पहिली 'पारो', दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारल्यानं होत्या चर्चेत; जाणून घ्या सुचित्रा सेन यांच्याबद्दल...

2 notes
·
View notes
Text
Amitabh Bachchan Shares Kabhie Kabhie Memories | Bollywood Tadka.
Amitabh Bachchan takes a trip down memory lane, sharing heartfelt moments from the iconic film Kabhie Kabhie. Dive into Bollywood tadka, entertainment mix masala, and Bollywood masala with exclusive updates on legendary stars and timeless cinema. Stay tuned for more!
#bollywood masala#entertainment mix masala#bollywood tadka#celebrity interviews#latest marathi movies#latest marathi webseries
0 notes
Text
Price: [price_with_discount] (as of [price_update_date] - Details) [ad_1] आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानांनी संगणक विश्वाची दिशा बदललेली आहे. या तंत्रज्ञानावर विकसन करण्यासाठी वापरण्यात येणारी संगणकीय भाषा म्हणजे 'पायथॉन प्रोग्रॅमिंग' होय. तंत्रज्ञानातील होणाऱ्या बदलामुळे पायथॉन वेगाने विकसित होऊ लागली आहे. संगणकीय भाषा देखील हळूहळू बदलू लागल्या आहेत. पायथॉन प्रोग्रॅमिंगने हा बदल वेगाने आत्मसात केला व आज ती जगभरातल्या सॉफ्टवेअर डेव्हलपर व प्रोग्रॅमर्सची पहिल्या पसंतीची भाषा बनली आहे. पायथॉनचे तंत्र जाणून घेण्यासाठी सर्वच क्षेत्रातील जनता उत्सुक आहे. भविष्यात ही संगणकीय भाषा माहिती तंत्रज्ञान विश्वावर राज्य करणार आहे. त्यामुळे तिची सहज, सोपी व आपल्या भाषेतून सुरुवात करता यावी म्हणून मराठी भाषिकांना वाहिलेले हे पुस्तक. Publisher : Prakrut Prakashan (1 January 2023) Language : Marathi Perfect Paperback : 236 pages ISBN-10 : 819532164X ISBN-13 : 978-8195321643 Reading age : 12 years and up Item Weight : 210 g Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm Country of Origin : India [ad_2]
0 notes
Text

कोणता वेद परमेश्ववराची विस्तूत माहिती सांगतो हे जाणून घेण्यासाठी संत रामपाल जी महाराज यांचे लिखित पुस्तक ज्ञान गंगा हे पुस्तक अवश्य वाचा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 February 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन. • सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला प्रारंभ. • वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदत वाढ. आणि • अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणं हा सुवर्णयोग-ज्येष्ठ कवयित्री रसिका देशमुख यांचं प्रतिपादन.
बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत प���्रकार परिषदेत बोलत होते. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर बँक खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम काढता येईल. सध्या अशा प्रकरणात ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतात. विमा योजनेची खरेदी केल्यानंतर एक वर्षापर्यंत ग्राहकांना त्याबाबत फेरविचार करता येईल, असं नागाराजू यांनी सांगितलं. वर्षभराच्या मुदतीत ग्राहकांना विमा योजना आवडली नाही तर या योजनेच्या प्रीमियमपोटी भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल, असंही नागाराजू यांनी सांगितलं.
सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग MSME साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. अर्थसंकल्पाच्या संदर्भात विविध उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमात त्यांनी या योजनेची सुरुवात केली. या योजनेमुळे MSME ना यंत्रसामग्री किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज तारणमुक्त स्वरुपात उपलब्ध होईल. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारनं या योजनेची घोषणा केली होती. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात पुरेशा तरतुदी नसल्याचं विरोधकांचे आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावले, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यातल्या गुंतवणूकदारांनाही मिळतो आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळेच संरक्षण उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाने विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण भागातील शाळांशी संपर्क वाढवावा असं आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुण्यात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात ते आज बोलत होते. आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्यासाठी, या संपूर्ण समस्येचं विद्यापीठाने अध्ययन करावं, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला, त्याची तपासणी सुरू आहे. योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही बाबी प्रलंबित होत्या, त्याचं उत्तर सरकारनं दिलं आहे, लवकरच या प्रकरणाचा ��िकाल लागेल आणि राज्य सरकार तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ��िवडणुका घेईल, अशी आशाही बावनकुळे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगानं विकासाचं काम सुरु असल्याचं, बावनकुळे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि संपर्क अधिकाऱ्यांच्या मदतीनं नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवले जात आहेत. जनता दरबारातही अनेक प्रश्न जनतेनं मांडले असून, त्यावर काम केलं जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एचएसआरपी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे. आता येत्या ३० एप्रिल पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असं आवाहन परिवहन विभागाने केलं आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने विभागीय हातमाग कापड स्पर्धा येत्या २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विणकरांनी उद्या १८ तारखेपर्यंत आपले वस्त्र नमुने पाठवावे, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपायुक्त प्रशांत सदाफुले यांनी केलं आहे. विभागातील हातमाग विणकर सहकारी संस्था, महामंडळे, खासगी आणि इतर क्षेत्रातील हातमाग विणकरांना स्पर्धेसाठी नमुने पाठवता येतील, असं सदाफुले यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या, राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी परवा १९ फेब्रुवारीला होणार आहे. छत्रपतींचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पूर्णाकृती पुतळा इथं उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याची आतली संरचना पूर्णतः स्टेनलेस स्टीलची असणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या नोएडा इथल्या कारखान्यात हा पुतळा तयार केला जात आहे.
९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या साहित्यिक रसिका देशमुख यांनी, या संमेलनाबाबत बोलतांना, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावं, हा सुवर्णयोग असल्याचं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या… हे संमेलन दिल्लीत व्हावे हा मला एक सुवर्णयोग वाटतो. आणि खरोखरच ही प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला असं वाटतय आपली जबाबदारी वाढली आहे. आता मराठीचं मराठीपण जपणं हे जास्त आपल्याला आता कटाक्षानं करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्या��क त्यांना या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. म्हणजे तो प्रत्यक्ष सोहळा डोळ्यानं बघणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे.
दरम्यान, दिल्लीतल्या या नियोजित साहित्य संमेलनातल्या एका व्यासपीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात येणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी आज बीड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भातलं पत्रं अखिल भारतीय साहित्य मंडळाकडून मिळाल्याचं चांदणे यांनी सांगितलं.
पुस्तके ही माणसाला उर्जा प्रदान करतात, असं ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने भरवण्यात आलेल्या 'परभणी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन केशव वसेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रत्येकाने वाचनसंस्कृती ही जोपासलीच पाहिजे, असं आवाहनही वसेकर यांनी यावेळी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली कामं तातडीने पूर्ण करण्याची सूचना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी आज या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती, त्यात त्यांनी ही सूचना केली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाचाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांच्यासमवेत दानवे यांनी आढावा घेतला.
बीड शहरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आमदार संदीप क्षीरसागर संयुक्त बैठक घेतली. शहरात रस्त्याचे काम सुरु असलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन काही ठिकाणी नादुरुस्त आहे. पुढील दोन दिवसांत सर्व प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश क्षीरसागर यांनी सर्व विभागाला दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रीय भौगोलिक ज्ञानावर ग्रामीण विभागातील जमिनीचं सर्वेक्षण-नक्शा प्रकल्पाचा उद्या प्रारंभ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने शहरी भागातील जमिनीची ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करून अद्यावत तसेच अचूक नकाशे तयार करण्याचा नक्शा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कुंटूर तांडा इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्र आणि तर्कशास्त्राच्या पेपरच्यावेळी चार विद्यार्थ्यांना कॉपी करतांना आज माध्यमिक बो��्ड आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने पकडलं. जिल्ह्यात आज १०७ केंद्रावर २३ हजार ३६१ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ६९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. तर २९२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचं निदर्शनास आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्कूल बस चालकांना आता चारित्र प्रमाणपत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे. नुकतीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने स्कूल बस चालकांना चारित्र प्रमाणपत्राची सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड पोलीस दलातील पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत अमोल ससाणे यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त परवा लातूर इथं ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या पदयात्रा पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकार्यांनी आज घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या.
बीड इथं उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त युवकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशिल उचले यांनी केलं आहे.
0 notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."

17 notes
·
View notes
Text

Prasad Oak Birthday : Wishes From Bandya Mama
मराठी सिनेमासृष्टील अष्टपैलू कलाकार प्रसाद ओक अजूनही चाहत्यांच्या मनावर करतोय राज्य; जाणून घ्या कारकीर्द!
0 notes
Text
शिवजयंतीचा उत्सव – संधी तुमच्या व्यवसायाला ओळख मिळून देण्याची आणि तुमच्या ग्राहकांचा विश्वास वाढवण्याची
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, शौर्य आणि पराक्रम जाणून घ्या आमच्या शिवजयंती स्पेशल ब्लॉगमध्ये! यंदा शिवजयंती दणक्यात साजरी करा आणि खास शुभेच्छा पोस्टर, बॅनर्स, ऑफर अॅड्स, व्हॉट्सअॅप स्टिकर्स AdBanao Poster Maker अॅपवर मिळवा.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा ......
इतिहासाच्या पटलावर अनेक राजे महाराजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा ना झाला ना होईल. रयतेचा राजा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांनी रयतेच्या सुखासाठी अवघ आयुष्य दिल असा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण AdBanao Festival Poster Maker च्या शिवजयंती Special blog मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती पाहणार आहोत.
0 notes
Text
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो आणि स्नायूंना कमजोर करतो. अनेक लोकांना याबद्दल ��ंभ्रम असतो की GBS हा संसर्गजन्य आहे का, तो इतरांना पसरू शकतो का, आणि त्याची कारणे व उपचार काय आहेत. या व्हिडिओमध्ये, डॉ. सम्राट जानकर या आजाराविषयी सखोल माहिती देतात आणि त्यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे गैरसमज दूर करतात. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही GBS संदर्भात चिंता असेल, तर ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. योग्य निदान, लक्षणे, उपचार आणि सावधगिरी याबद्दल जाणून घ्या आणि आरोग्याविषयी जागरूक राहा!
#gastroenterologist#Gastrointestinal Surgeon#laparoscopic surgeon#surgical gastroenterologist#hernia specialist#piles specialist#fistula treatment#bariatric surgery#achalasia cardia treatment#gallbladder surgery specialist#abdominal wall reconstruction surgery
0 notes