Tumgik
#दिल्ली पाऊस
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Weather Update: आज दिल्ली-महाराष्ट्रासह 11 राज्यांत पाऊस पडणार, वादळाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या राज्याची स्थिती
https://bharatlive.news/?p=82499 Weather Update: आज दिल्ली-महाराष्ट्रासह 11 राज्यांत पाऊस पडणार, वादळाचा इशारा, जाणून ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मुसळधार पावसामुळे दिल्लीत फ्लाइट सेवेला फटका, प्रचंड ट्रॅफिक जाम
मुसळधार पावसामुळे दिल्लीत फ्लाइट सेवेला फटका, प्रचंड ट्रॅफिक जाम
अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावर किमान सात उड्डाणे वळवण्यात आली आणि 40 सेवांना विलंब झाला. बुधवारी खराब हवामानामुळे किमान 25 विमानांचे निर्गमन आणि 15 विमानांचे आगमन उशीर झाले, असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
#DelhiRains: इंद्रदेव दिल्ली-एनसीआरवर दयाळू होते, मग ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडून लोकांनी अशा प्रकारे व्यक्त केले आपले मन
#DelhiRains: इंद्रदेव दिल्ली-एनसीआरवर दयाळू होते, मग ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडून लोकांनी अशा प्रकारे व्यक्त केले आपले मन
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter दिल्लीला अखेर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळासह पावसाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, खराब हवामानामुळे उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कडाक्याच्या उष्म्यामध्ये सोमवारी झालेल्या संततधार पावसाने लोकांच्या मनाची बाग-बाग बनवली आहे. गेल्या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नवी दिल्ली. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊसमुसळधार पाऊस, गारपीट, थंडीची लाट आणि दाट धुके यांमुळे पुढील तीन दिवस हवामानाची स्थिती आणखी बिघडणार आहे. हवामान विभागाचा अंदाज (IMD forecast) तो दिवस काही ठिकाणी असामान्यपणे थंड असेल. त्याचबरोबर डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस, थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
वेटर ऑनलाईन 27 जुलै, 2021 8:38 एएम | स्कायमेट वेदर टीम दिल्लीत जुलै महिन्यात मॉनसनच्या विमानाने बरेच चांगले प्रसंग उद्भवले. या क्षणी, येथे 14 जुलै आणि 20 जुलै रोजी एएस-पास बारिशसह तापमानातही गिरावट बनी रहा. याव्यतिरिक्त जुलै महिना च्या पर्यटन देखील बारिश काही क्रियाकलाप पहायला मिल होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरासरी मासिक बारिशचा आकडा 187 मिनिटांवर आहे, येथे 281 मिनिट बारिश महिन्यांचा शेवट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
पहिलेवहिले हिमालय ट्रेक...
        २००७ च्या जुलैमध्ये अचानक ठरलं आणि हिमालय ट्रेकला जाण्यासाठी आम्ही चार मित्र सज्ज झालो. रेल्वे तिकिट बुक झाले. बावीस जणांच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो आणि लगेच तयारीला लागलो.   
      चालण्याची सवय नव्हती, म्हणून रोज चालायला सुरुवात केली. गोगाबाबा टेकडीवर आठवड्यातून दोन वेळेस चढणे, जॉगिंग, वॉकिंग याचा भडीमार सुरु केला. महिना दिड महिना चांगलाच सराव केला. ट्रिपला निघायच्या आधी सुचनेप्रमाणे ट्रेक शूज, गरम कपडे, वॉटरप्रुफ सॅक, चॉकलेट्स, ड्राय फ्रुट्स इत्यादी सामान सोबत घेतले आणि १० ऑगस्ट २००७ ला दुपारी दिड वाजता सचखंड एक्स्प्रेसने आमचा प्रवास सुरु झाला. मोठा ग्रुप असल्यामुळे गप्पा गोष्टी करत मजेत प्रवास झाला. प्रवासातच सर्वांची ओळख झाली. दुसर्‍या दिवशी दुपारी दिड वाजता दिल्लीला पोहोचलो आणि स्टेशनवरच फ्रेश होवून तयार झालो. तिथून दिल्ली-डेहराडून जनशताब्दीने बरोबर तीन वाजता निघून संध्याकाळी सातला हरीद्वाला पोहोचलो. स्टेशनबाहेरच काही खाऊन घेतले. तिथून चार पाच मोठ्या टमटम रिक्षामध्ये बसून रात्री नऊ वाजता ऋषिकेशला पोहोचलो. समोर मोटारसायकल व मागे टप असलेला हौदा अशा त्या टमटममध्ये बसून डुग डुग आवाज करत घाटरस्त्यावरून जातांना खूप मजा आली. तिथे एका हॉटेलवर मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. 
      सकाळी सहा वाजता तयार होवून खाली आलो. वेळ होता म्हणून घाटावर गेलो. गंगेच्या वाहत्या थंडगार पाण्यात साखळदंडाच्या आत उभे राहून स्नान केले. लक्ष्मण झुला पाहिला आणि परत हॉटेलकडे आलो. बस ��यारच होती. निघे निघेपर्यंत दहा वाजले आणि ट्रेकच्या पहिल्या ठिकाणावर जाण्याचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात चहापाणी करत, गाणे म्हणत, नाच करत, विनोदी किस्से सांगत, बाहेर दिसणार्‍या निसर्गाचा आस्वाद लुटत आम्ही देवप्रयागला पोहोचलो. वरुन खाली पहात असतांना अलकनंदा आणि भागीरथी नदीचा अतिशय विलोभनीय संगम दिसत होता. सरस्वती नदीही या दोन नद्यांना मिळते, पण ती गुप्त असल्यामुळे दिसत नाही. तिथे थांबून भरपूर फोटो काढले आणि पुढे निघालो.
      रस्ता संपूर्ण अरुंद आणि घाटाचा होता. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी अच्छादलेले उंचच उंच पर्वत. आमच्यापैकी एकाला दरीकडे पाहुन चक्कर येत होती. त्यामुळे ज्या बाजूला दरी येईल त्याच्या विरुद्ध बाजूला त्याला बसवावे लागत होते. असे करत प्रवास सुरू होता. हिमालयातल्या रस्त्यांवर अगदी तरबेज ड्रायव्हरच गाडी चालवू शकतो हे लक्षात यायला वेळ लागला नाही. नदीवर असलेल्या अरुंद लोखंडी पुलावरुन बस काढतांना सरावलेल्या ड्रायव्हरलाही कसरत करावी लागायची. हे सर्व पहात पहात आम्ही रुद्रप्रयागला पोहोचलो. बसमधून उतरुन खाली संगमावर गेलो.  
प्रयाग म्हणजे संगम. अलकनंदा आणि मंदाकिनीच्या संगमाचे विहंगम दृश्य पाहून अक्षरश: हरखूनच गेलो. दोन्ही नद्यांच्या पाण्याचे रंग वेगळे होते. संगम झाल्यावर खूप दूरपर्यंत नदीला मधोमध एक रेषा दिसत होती जी दोन्ही पाण्याला वेगवेगळे दर्शवत होती. संगमाच्या ठिकाणी तयार झालेल्या त्रिकोनी पॉईंटवर अगदी टोकावर एक मंदीर बांधले आहे. तिथे जाण्यासाठी नदीच्या खळाळत्या पाण्यातून जावे लागते. कंबरे एवढ्या पाण्यातून साखळदंड घट्ट धरुन जावे लागते. चुकून हात सुटला तर पत्ताच लागण्याची शक्यता नाही एवढ्या गतीने नद्या वहात होत्या. आम्ही अगदी संगमावर पोहोचून तिथल्या मंदिरात जावून दर्शन घेतले. काही वेळ तिथे थांबून ते दृश्य मनात अन कॅमेऱ्यात साठवले आणि परत पाण्यातून चालत बाहेर आलो. अंगावरच कपडे वाळवले आणि बसमध्ये बसून पुढचा प्रवास सुरु केला.
अगस्तमुनी, गुप्तप्रयाग जाताजाता पहात संध्याकाळी सातच्या आसपास सोनप्रयागला पोहोचलो. नद्यांचे संगम पहात असतांना एके ठिकाणी नदी पार करण्यासाठी जुगाड केलेला रोपवे पाहिला. शाळेची मुले, म्हातारी माणसे लोखंडी पाट्यावर बसून नदी क्रॉस करत असलेली दिसली. पहायला ते छान वाटत होते, पण ते पाहुन तिथले जनजीवन किती खडतर आहे याची कल्पना आली.
सोनप्रयागहुन गौरीकुंडला निघालो. रस्त्यात अनेकवेळा मधूनच पाऊस लागायचा, मधूनच निरभ्र आकाश दिसायचे. गौरीकुंडला पोहोचलो तेव्हा रिमझिम पाऊस चालूच होता. राहण्याची व्यवस्था एका घरगुती हॉटेलमध्ये करण्यात आली होती. एका घरातून दुसर्‍या घरात असे एका नंतर एक घरे चढत उंचावर असलेल्या एका हॉटेलमध्ये आमच्या रुम्स होत्या. बाजूला मंदाकिनी जोराने आवाज करत वहात होती. त्यामुळे रुममध्ये बोलतांनाही आम्हाला जोराने बोलावे लागत होते. रात्री हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये खिचडीचे जेवण झाले. सकाळी पाचला बाहेर पडायचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले, त्यामुळे लवकरच झोपलो.
बरोबर चार वाजता उठून गौरीकुंडातील गरम पाण्यात मस्त डुंबलो. थंड वातावरणात या गरम पाण्याने चांगलीच उर्जा मिळाली. गौरीकुंडला देवी पार्वतीचे मंदीर आहे. शंकर आणि पार्वती याच ठिकाणी भेटले होते असे म्हणतात. तसेच याच ठिकाणी गणपतीला हत्तीचे मस्तक लावले गेले अशीही अख्यायिका आहे. गौरीचे दर्शन घेऊन सूचनेप्रमाणे सॅक, रेनकोट, मोजकेच कपडे घेऊन केदारनाथच्या रस्त्याला चालायला लागलो. उजाडत आले होते. निसर्गाचा आनंद घेत वरती चढायला लागलो. तट्टू, पिट्टू, डोली वापरून जाणारे भाविक खूप दिसत होते. पिट्टू म्हणजे एका माणसाच्या पाठीवर अडकवलेली केनची खूर्ची. त्या खूर्चीत मागे तोंड करून बसलेल्या व्यक्तीला घेवून ते तरबेज लोक सरसर चढत होते. आमच्या मागून येवून कित्येक पिट्टू पुढे गेले.
फक्त १४ किलोमिटरचे अंतर चढायला कशाला पाहिजे पिट्टू-घोडे असे म्हणत आम्ही पहिला रपाटा मस्त मारला, पण जसे जसे चढ चढू लागलो तसे पिंडर्‍या आणि मांड्या दुखायला सुरुवात झाली. गोळे येत होते, तसेच पाय ओढत होतो. तशात अचानक जोरात पाऊस सुरु झाला. हिमालयात वातावरण कधी बदलेल याचा नेम नसतो हे ऐकले होते आता प्रत्यक्ष अनुभव आला. रेनकोट चढवून चालू लागलो. पाऊस थांबायला तयार नव्हता. इंचा इंचाने पाय ओढत रामबाड्याला पोहोचलो. रामबाडा म्हणजे यू आकाराच्या वळणावर वसलेली एक छोटी वस्ती होती. तिथे चहा फराळाच्या झोपड्या होत्या. ते पाहुन खूप बरे वाटले. जवळपास सात किलोमिटरचे अंतर म्हणजे निम्मे अंतर पार झाले होते. पावसातच एका छप्परात कुडकुडत बसून चहा घेतला. थंडीत वाफाळणारा चहा पिऊन थोडी तरतरी आली.
आमच्यापैकी बरेचजण पुढे गेले होते. मी, सुहास, फुले आणि सातपुते असे चौघेजण चहा पिऊन निघालो. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. जास्त बसलो तर उठणे कठिण होईल हा जाणत्यांचा सल्ला शिरसावंद्य मानून रखडत खरडत निघालो. आता पिट्टु किंवा तट्टूचे महत्व पटायला लागले होते. पण मनाचा हिय्या करुन आम्ही चालायला लागलो. मजल दरमजल करत शेवटी दुपारी तीन वाजता एकदाचे केदारनाथला महाराष्ट्र धाममध्ये पोहोचलो. रुममध्ये गेल्याबरोबर ओले कपडे बदलण्यासाठी सॅक उघडली तर काय, वॉटरप्रुफ असूनही आत गच्च पाणी भरले होते! सगळे कपडे ओले झाले होते. मग अंगावरचेच कपडे पिळले आणि तेच अर्धे ओले कपडे घालून जाडजुड रजया पांघरुन झोपलो. उत्तराखंडची थंडी म्हणजे काय याचा चांगलाच अनुभव आला होता. वरती ऑक्सिजनची कमतरता असते असे सांगण्यात आले होते. पण कुणाला त्रास झाला नाही.
दोन तास रजईत झोपल्यामुळे अंगात उष्णता आली होती. फ्रेश होवून केदारनाथ मंदीराकडे निघालो. कमळाचे फुल घेऊन देवळात गेलो. भली मोठी शंकराची पिंड पाहून आणि दर्शन घेऊन खूप धन्यता वाटली. फुल वाहून मनोभावे दर्शन घेतले. योगायोगाने संध्याकाळची आरती पहायला मिळाली. उतरंड असलेली मोठी आरती नाचवत ओवाळणार्‍या पुजार्‍यांना पाहून खूप प्रसन्न वाटत होते. प्रसाद घेवून तिथून बाहेर पडून नागा साधूंच्या तावडीतून सुटून रुमवर पोहोचलो. पाऊस थांबला होता, पण थंडी प्रचंड होती. रात्री खिचडी खाऊन गरम रजईत लवकरच झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी पहाटे काहीजण केदारनाथ मंदीराच्या मागे असलेला गांधी ताल (तलाव) पाहून आले. आम्ही उठलो नव्हतो म्हणून आमचे राहून गेले. (हाच तलाव फुटून ते पाणी मंदाकीनी नदीत घुसल्यामुळे केदारनाथची २०१३ साली वाताहात झाली होती!). सकाळी तिथेच भरपेट उपमा खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. उतरतांना काही विशेष त्रास झाला नाही. रमत गमत फोटो काढत खाली उतरलो. गौरीकुंडला पोहोचेपर्यंत अंधारून आले होते. रुमवर जावून ओले कपडे सुकवायला टाकले आणि जेवण उरकून झोपी गेलो. प्रचंड थकव्यामुळे एका क्षणात झोप लागली.
दुसर्‍या दिवशी सकाळी बसमध्ये बसल्यावर समजले की आम्हाला ज्या ट्रेक पॉईंटवर जायचे होते तिथे भरपूर पावसामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. आमच्या टूर प्रमुखाने गाईडसोबत चर्चा करून प्रोग्राममध्ये बदल केला. त्याप्रमाणे आम्ही त्रिजुगी (त्रियुगी) नारायाण या ठिकाणाकडे प्रयाण केले. शंकर पार्वती यांचे लग्न या ठिकाणी झाले होते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता होती. वळणा वळणाचा रस्ता, मध्येच पावसामुळे खचलेल्या, वाहून गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करत, कधी खाली उतरत, बस पुढे गेल्यावर परत बसत असा प्रवास करत भर पावसात संध्याकाळी सात वाजता त्रिजुगी नारायणला पोहोचलो.
गावात संपूर्ण अंधार होता. पाऊस चालूच होता. रहायची व्यवस्था जिथे करण्यात आली होती ते दोन मजली घरच होते. अंधारातच चाचपडत एका खोलीत सामान ठेवले. खाली जेवणाची व्यवस्था केलेली होती. अंधारामुळे चुलीभोवती असंख्य किडे घोंगावत होते. चमचमणारे वेगळ्याच प्रकारचे किडे होते. जेवणात ते मिसळले जातील ही भीती वाटत होती. कसेबसे जेवण उरकले आणि रुमवर गेलो. जिथे झोपलो होतो तिथे नेमके वरुन पाणी टपकत होते. अंगाखाली किडेही येत होते. तशा परिस्थितीतच ती रात्र काढली.
सकाळी बाहेर गॅलरीत उभे असतांना रस्त्यावर एक प्रभात फेरी दिसली. शाळेची मुले आणि मुली गणवेश घालून जयघोष करत ढोल ताशाच्या तालात जात होती. तेव्हा लक्षात आले की आज पंधरा ऑगस्ट आहे. आम्हीही तयार होवून बाहेर पडलो. शंकर पार्वतीच्या विवाहस्थळी गेलो. तिथे दगडामध्ये कोरलेले होम, शंकर पार्वतीच्या पादुका, लग्नासाठी उपस्थित लोकांच्या पादुका या सर्वांचे मनोभावे दर्शन घेतले आणि गावात फेरफटका मारला. चढउतार असलेले ते अगदी छोटेसे गाव होते. प्रभात फेरी निघालेली शाळा दिसली आणि आम्ही आत गेलो. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम चालले होते. मुख्याध्यापकाने आम्हाला व्यासपीठावरच बसवले. आमच्यावतीने आठवले या मित्राने हिंदीतून भाषण केले. तिथले देशभक्तीचे वातावरण पाहून त्याला भावना अनावर झाल्या होत्या. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून आम्ही परत रुमवर आलो.   
बराच वेळ झाला पण बस काही निघत नव्हती. काही वेळाने मित्र मोहनकडून समजले की जिथे जायचे ठरले होते तोही रस्ता पावसामुळे बंद आहे. त्यामुळे दुसरा मार्ग ठरवण्यात आला. त्या मार्गावर बस जावू शकत नव्हती म्हणून तीन ट्रॅक्स जीप मागवण्यात आल्या. शेवटी अकरा वाजता तिथून अखोडी या एका उंच पर्वतावर असलेल्या गावाकडे जाण्यासाठी आम्ही प्रयाण केले. गाणी गात, विनोदी किस्से सांगत मस्त प्रवास चालला होता. अचानक एके ठिकाणी गाड्यांची प्रचंड रांग दिसली. ड्रायव्हरने चौकशी करून सांगितले की ढगफुटीमुळे समोर लँडस्लाईड झाले आहे. दोन तीन दिवस रस्ता ठिक होणार नाही. हे ऐकून आम्ही आवाक झालो. लँडस्लाईड आमच्यासाठी नवीन प्रकार होता. ते पाहण्यासाठी आम्ही चालत पुढे गेलो. भले मोठे डोंगर रस्त्यावर कोसळून अलकनंदेत मिसळले होते. पलिकडचे काहीच दिसत नव्हते. त्यात रिमझिम पाऊस सुरूच होता. तेवढ्यात काही लोक सामान डोक्यावर घेवून लँडस्लाईड ओलांडून पलिकडे जातांना दिसले. आम्हालाही जोश आला आणि परत येवून सर्वांना सांगितले. हो नाही करत सर्वजण तयार झाले. गाड्यातले सामान आम्ही डोक्यावर घेतले अन लँडस्लाईडच्या ठिकाणी पोहोचलो. तो प्रचंड दगडा मातीचा ढिगारा ओलांडू लागलो. चिखलात पाय रुतत होते. तसेच पुढे जात राहिलो. एका दगडावर पाय रोवून मी मागच्या लोकांचे सामान पुढे पाठवू लागलो. तितक्यात सुहास ओरडला ‘अरे मागे पहा तू कुठे उभा आहेस! दगड सटकला तर सरळ नदीत पडशील!’
ते ऐकून मी मागे पाहिले तर काय? खवळलेली अलकनंदा माझ्या पायाखालचा दगड निसटायची वाट पहात वेगाने वहात होती! मी पटकन थोडे वरती येत पलिकडे उतरलो. रस्त्याच्या कडेला बसून थोडी विश्रांती घेतली. पलिकडेही गाड्या आणि लोकांची गर्दी होती. आमचे पाहून काही लोक लँडस्लाईडवर चढायची हिम्मत करू लागले. त्याचवेळी खाकी कपड्यातला एक गार्ड पळत आला आणि ‘बाजू हटो, दूर भागो...’ असे ओरडू लागला. आम्ही तिथून थोडे दूर पळत सुटलो तितक्यात धाड धाड असा भयंकर आवाज करत त्याच लँडस्लाईडवरून परत मोठमोठे दगड, गोटे, माती खाली घरंगळत अलकनंदेत लुप्त होवू लागले. थोडक्यात बचावलो होतो. त्या गार्डने सांगितले की ‘जिस जगह लँडस्लाईड होती है, वहींपर दुबारा होती है. नसीबसे आप बच गये. आगे कहीं ऐसा मत करना.’
देवाचे आभार मानून आम्ही पलिकडे दुसर्‍या जीप ठरवल्या. त्याचवेळी एक माणूस जवळ आला आणि ‘भाईसाब, रास्ता कबतक खुलेगा?’ असे विचारले. तो माझा कॉलेजचा वर्गमित्र राजू आग्रवाल होता. माझ्या डोक्यावर सामान असल्यामुळे त्याने मला ओळखले नाही. मी हसून त्याला कॉलेज स्टाईलमध्ये बोललो तेव्हा त्याने गळाभेटच घेतली. त्याचे सर्व कुटुंब केदारनाथला निघाले होते. पण रस्ता बंद असल्यामुळे दोन तीन दिवस त्यांना तिथेच थांबावे लागणार होते. त्याच्या आईवडीलांना भेटून तिथून निघालो. पाऊस चालूच होता. अखोडीच्या घाटरस्त्यावर एके ठिकाणी रस्ता अर्धा तुटलेला होता. किर्र अंधार पसरलेला होता. कुणीतरी त्या तुटलेल्या भागावर एक फळी टाकून तात्पुरता रस्ता तयार केला होता. ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरायला सांगून अगदी शिताफीने गाडी त्या फळीवरून सहीसलामत पुढे काढली. त्या फळीखालून डोंगरावरून येणारे पाणी धो धो वहात होते आणि खाली खोल दरीत पडत होते. फळी तुटली असती किंवा सरकली असती तर? या विचाराने भर पावसातही आम्हाला घाम फुटला होता! 
घाटा घाटाचा रस्ता, मधूनच तुटलेला रस्ता, जोराने रस्त्यावर पडणारे धबधबे सर्व पार करत एकदाचे आम्ही अखोडी या गावी रात्री नऊ वाजता पोहोचलो. आमच्या गाईडचेच ते गाव होते. त्याने एका शाळेच्या हॉलमध्ये आमची झोपायची व्यवस्था केली. वरच्या पत्र्यातून टपकणारे पाणी चुकवत ती रात्र आम्ही कशीबशी काढली.
दुसर्‍या दिवशी विश्वनाथ डोंगर चढायला सुरूवात केली. गावात बर्‍याच ठिकाणी डोंगरावरून खाली जोराने वहात येणार्‍या पाण्याच्या धारेचा वापर करून पाणचक्क्या केलेल्या होत्या. मोफत पिठ दळायची सोय अशी जवळपास सर्व गावात असते हे कळले. डोंगर चढायला खूप कठिण होते. घनदाट झाडीही होती. कोणत्याही झाडाला हात लावायचे नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. कोणते झाड विषारी आहे हे सांगता येत नव्हते. वाटेत एका ठिकाणी वाहते पाणी पडून खडकात एक कुंड तयार झाले होते. त्या थंडगार पाण्यात आम्ही काहीजणांनी आंघोळ केली. त्यामुळे दुखणारे पाय थोडे मोकळे झाले. दुपारी डोंगर माथ्यावर विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. हिमालयात सर्वच डोंगर उंचच उंच. खालून शिखर दिसणे शक्यच नाही. अशा त्या उंच विश्वनाथ पर्वतावर पोहोचलो आणि थोडा आराम केला. वरच्या कड्यावरून खाली पाहतांना आपण किती उंचावर आलो हे जाणवत होते. ते विहंगम दृश्य मनात साठवत तिथेच बसून मॅगीचे जेवण केले. थंडी, चढउतार, हिमालयातले सतत बदलणारे वातावरण यामुळे तिथे जेवण फारसे जातच नव्हते.
संध्याकाळी परत गावात पोहोचलो. इतके प्रचंड थकलो होतो की शाळेच्या हॉलमध्ये गेल्यावर जशा अवस्थेत पडलो तसेच झोपलो. पाठीवरची सॅक काढायचेही त्राण नव्हते. रात्री गाईडने जबरदस्तीने उठवले आणि खिचडीचे जेवण दिले. पाय चांगलेच सुजले होते. आम्ही एकमेकांचे पाय चोळून दिले तेव्हाच थोडा आराम पडला.
सकाळी परतीचा प्रवास होता. गाईडच्या घरी चहापान झाले. गावात प्रत्येकाच्या घराभोवती बटाट्याच्या बागा दिसत होत्या व बहुतांश महिलाच शेतीचे काम करतांना दिसत होत्या. या प्रवासात आमच्या एक लक्षात आले की हिमालयातले सर्व महिला व पुरुष अगदी काटक शरीरयष्टीचे होते. ढेरी असलेला एकही माणूस दिसला नाही.
गाईडच्या घरीच आम्ही महाराष्ट्रातून आलो असल्यामुळे मुंबईत राहून आलेले काही लोक आवर्जून भेटायला आले. त्यांच्यासोबत गप्पा मारत चहापान झाले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पुढे कुठे लँडस्लाईड लागू नये अशी देवाला प्रार्थना केली आणि टिहरीकडे प्रयाण केले.
टिहरी जवळ आले अन अचानक गाड्या थांबल्या. समोर मोठा जमाव दिसत होता. एक मोठे लागडाचे खोड रस्त्यावर आडवे टाकले होते. आम्ही जवळ जावून चौकशी केली तेव्हा समजले की टिहरी धरणाचे धरणग्रस्त लोक पुनर्वसनाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करत होते. आता किती वेळ लागेल सांगता येत नव्हते. आम्ही त्या लोकांची ओळख करून घेतली. गप्पा मारत त्यांच्यासोबतच रस्त्यावर मांडी घालून बसलो. त्यांच्याबरोबर घोषणाही दिल्या. पोलिसांचा फौजफाटा आला होता, पण कुणी काहीच करत नव्हते. दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी आले. त्या लोकांसोबत त्यांची चर्चा झाली. शेवटी तीननंतर रस्ता मोकळा झाला आणि आम्ही टिहरीला पोहोचलो. धरणावरूनच रस्ता जात असल्यामुळे संपूर्ण टिहरी धरण व्यवस्थित पाहता आले. दोन डोंगरांना जोडणारा काँक्रिटचा भला मोठा उंच बांध टाकून हे धरण तयार करण्यात आले आहे. त्याच्या कॅचमेंट एरीयात अनेक गावे गडप झाली होती. त्यामुळेचे तिथे नेहमी धरणग्रस्तांची आंदोलने होतात हे लक्षात आले.
टिहरीत पोहोचल्यावर एवढ्या दिवसात पहिल्यांदाच पोळी भाजी वरण भात असे जेवण मिळाले. मनसोक्त जेवण करून तिथून निघून रात्री नऊ वाजता ऋषीकेशला पोहोचलो. पहिल्या दिवशी थांबलेल्या हॉटेलेमध्येच मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी सकाळीच हरीद्वारला पोहोचलो. तो संपूर्ण दिवस मोकळा होता.  हर की पौडी, मन्सा देवी, चंडी देवी, गंगा आरती या सर्वांचे मनोभावे दर्शन घेतले. मन्सादेवीला रोप वे चा आनंद घेतला. स्फटिकाची माळ पाच हजारावरून घसरत खाली येवून पन्नास रुपयाला विकत घेतली. तेवढीच हरीद्वारची आठवण. रात्री एका हॉटेलमध्ये ��ेवण करून तृप्त मनाने रात्रीच्या ट्रेनने दिल्लीकडे प्रयाण केले.
पहाटे दिल्लीला पोहोचून स्टेशनवरच फ्रेश झालो. दुकाने उघडल्यावर पहाडगंज मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली. दुपारी दिड वाजता सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसून, प्रवासात औरंगाबादला येणार्‍या एका जपानी मुलाबरोबर गप्पा मारत, दुसर्‍या दिवशी २२ ऑगस्ट २००७ रोजी सकाळी साडे आकरा वाजता औरंगाबादला सुखरूप पोहोचलो आणि त्याबरोबरच ढगफुटी, लँडस्लाईड, भयानक घाट, तुटलेला रस्ता, कडाक्याची थंडी, रोपवे, उंच पर्वत रांगा, लोखंडी अरुंद पुल, रस्ता रोको, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, पक्षी या सर्वांचा अनुभव घेवून आमच्या पहिल्यावहिल्या थरारक हिमालयाच्या ट्रेक ची सांगता झाली....
नितीन कंधारकर
औरंगाबाद.                                                   
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार आहे. केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार आहे. त्यानंतर लगेचच 30 मे रोजी भारतात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तो तीन दिवस आधीच केरळात मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. देशभरात…
View On WordPress
5 notes · View notes
kokannow · 4 years
Text
५ दिवस पावसाची शक्यता
५ दिवस पावसाची शक्यता
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून  देशामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.      हवामानाचा अंदाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसा��ुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Cyclone Mandous: मंडूस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत चार ठार; चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीची नोंद केली. नवी दिल्ली: दिल्लीच्या काही भागांमध्ये गारपीट आणि पावसाने राष्ट्रीय राजधानीतील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक आराम दिला आहे. वेगळ्या पॉकेट्समध्ये जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याची नोंद आहे, ज्यामुळे पारा खाली आला आहे आणि नंतर थंड वाऱ्याची झुळूक आली आहे. रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
बिहारमध्ये पुराचा कहर, उत्तर प्रदेशात पावसानंतर आजारांचा धोका, या राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा
बिहारमध्ये पुराचा कहर, उत्तर प्रदेशात पावसानंतर आजारांचा धोका, या राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने कहर केला आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशातील परिस्थिती सुधारू लागली आहे. हिमाचल, दिल्ली, महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. बिहारमधील अनेक भागात पुराचे पाणी तुंबले आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय सध्या देशाच्या अनेक भागात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
पावसाळ्यात कारमध्ये अनेक प्रकारचे दोष येऊ शकतात, विमा पॉलिसी कशी निवडावी?
पावसाळ्यात कारमध्ये अनेक प्रकारचे दोष येऊ शकतात, विमा पॉलिसी कशी निवडावी?
नवी दिल्ली. मान्सून आता देशाच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत वाहनचालकांना पाणी साचणे, खड्डे आणि खराब रस्त्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इंजिनच्या पार्ट्समधील बिघाडासह वीज, पाण्यामुळे अनेक प्रकारचे बिघाड होऊ शकतात. एकूणच, पावसात कारचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, तुम्ही नेहमी अशा विमा पॉलिसीची निवड करावी जी या सर्व दोषांना…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] बंगालची खाडी बनल्यानंतर खालील दबाव क्षेत्र, मध्य भारत मध्ये भारी बारिशचा संकेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा विकास होतो, भारताच्या मध्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे
[Hindi] बंगालची खाडी बनल्यानंतर खालील दबाव क्षेत्र, मध्य भारत मध्ये भारी बारिशचा संकेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा विकास होतो, भारताच्या मध्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान बातम्या आणि विश्लेषण 22 जुलै, 2021 6:07 दुपारी | स्कायमेट वेदर टीम स्कायमेटद्वारे जाता आलेल्या पूर्वानुमानानुसार आज 22 जुलै रोजी बंगालच्या खादीच्या उत्तर पश्चिमी भागाच्या वरच्या भागाच्या नवीन भागाचा भाग बनला आहे. गेल्या 48 घंट्यांमधून त्या क्षेत्रावर चक्रवाती चक्रवाती वा हवा्यावरील क्षेत्राचा प्रभाव, जुलैच्या दुस दबाव्या क्रमांकाचा दबाव क्षेत्र आणि मानसूनचा तिसरा चरण बंगालच्या खादीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
Viral Video : …अन् खुद्द आमदार उतरले पुराच्या पाण्यात! नवी दिल्ली : मान्सूनच्या काळात देशातील अनेक ठिकाणी पाऊस अक्षरश: कोसळतोय. धुवाँधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती
0 notes