Tumgik
#दिल्ली हवामान अंदाज
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार
Weather Update: देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, 15 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडी वाढणार नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागात पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंडमध्ये थंडी वाढू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही पारा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 डिसेंबरनंतर थंडी आणखी वाढणार आहे. वास्तविक,…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीच्या काही भागात पाऊस, गारपीट
रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीची नोंद केली. नवी दिल्ली: दिल्लीच्या काही भागांमध्ये गारपीट आणि पावसाने राष्ट्रीय राजधानीतील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक आराम दिला आहे. वेगळ्या पॉकेट्समध्ये जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याची नोंद आहे, ज्यामुळे पारा खाली आला आहे आणि नंतर थंड वाऱ्याची झुळूक आली आहे. रोहिणी, पितामपुरा आणि पश्चिम विहारमधील लोकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
[Hindi] दिल्लीत बारिश परत, या आठवड्यात पावसाळ्याच्या आसारा / दिल्लीत या आठवड्यात जास्त पाऊस पडेल, हवामान सुखद राहील
वेटर ऑनलाईन 27 जुलै, 2021 8:38 एएम | स्कायमेट वेदर टीम दिल्लीत जुलै महिन्यात मॉनसनच्या विमानाने बरेच चांगले प्रसंग उद्भवले. या क्षणी, येथे 14 जुलै आणि 20 जुलै रोजी एएस-पास बारिशसह तापमानातही गिरावट बनी रहा. याव्यतिरिक्त जुलै महिना च्या पर्यटन देखील बारिश काही क्रियाकलाप पहायला मिल होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरासरी मासिक बारिशचा आकडा 187 मिनिटांवर आहे, येथे 281 मिनिट बारिश महिन्यांचा शेवट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नवी दिल्ली. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊसमुसळधार पाऊस, गारपीट, थंडीची लाट आणि दाट धुके यांमुळे पुढील तीन दिवस हवामानाची स्थिती आणखी बिघडणार आहे. हवामान विभागाचा अंदाज (IMD forecast) तो दिवस काही ठिकाणी असामान्यपणे थंड असेल. त्याचबरोबर डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस, थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात आकाश ढगाळ होते आणि हलका पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार
नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार आहे. केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार आहे. त्यानंतर लगेचच 30 मे रोजी भारतात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तो तीन दिवस आधीच केरळात मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. देशभरात…
View On WordPress
5 notes · View notes
kokannow · 3 years
Text
शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!
शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!
नवी दिल्ली : देशावर कोरोना संकटाचे सावट असताना एक दिलासादायक बातमी गुढी पाडव्याच्या मूहुर्तावर समोर आली आहे. देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.देशात यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये एकूण सरासरीच्या १०३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्‍दी ध्‍वजाचं पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
****
भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.
****
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
****
उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.
****
चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.
****
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगून, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
****
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
****
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
दिल्ली बातमीः नऊ वर्षांत सर्वाधिक लोकप्रिय 14 फेब्रुवारी - पुन्हा विक्रम झाला; 14 फेब्रुवारी हे दिल्लीतील सर्वात गरम आहे
दिल्ली बातमीः नऊ वर्षांत सर्वाधिक लोकप्रिय 14 फेब्रुवारी – पुन्हा विक्रम झाला; 14 फेब्रुवारी हे दिल्लीतील सर्वात गरम आहे
दिल्लीत बदलते हवामान … – फोटो: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका कित्येक दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारीचा व्हॅलेंटाईन डे नऊ वर्षातील सर्वात गरम होता. कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस ओलांडले. त्याआधीचा एक दिवस, उन्हाळ्याने पाच वर्षांचा विक्रम मोडला होता. हवामानशास्त्रज्ञ असा अंदाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
मुसळधार दिल्ली पावसाने हजेरी लावली, अधिक पाऊस अपेक्षित | दिल्लीत मानूसनी भारी बारिश आणि पावसाची आशा
मुसळधार दिल्ली पावसाने हजेरी लावली, अधिक पाऊस अपेक्षित | दिल्लीत मानूसनी भारी बारिश आणि पावसाची आशा
दिल्लीच्या बारिश ने दिल्लीवासियांसह खूप लांबपर्यंत लुका-छिपीचा खेळ खेळला आहे. दरअसल, या वर्षाच्या दक्षिण मान्सूनच्या भीतीने 16 दिवस देरी पासून 13 जुलै रोजी दिल्ली पोहोचले. दिल्लीत मानसूनची सामान्य तपासणीची तारीख 27 जून आहे. सुरुवात होण्यापूर्वी, दिल्लीमध्ये 18 जुलैपर्यंत कोणतीही महत्त्वाची बारिश गतिविधी पाहिली गेली नाही. दरअसल, काल पासून बादल छापा. हरियाणा आणि रेटिंग्जच्या आसपासच्या भागातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
नवी दिल्ली: उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील पाच दिवसांत किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘कोल्ड डे’ सारखी परिस्थिती निर्माण होईल. पंजाब का मौसम, हरियाणा येथे थंडीची लाट येऊ शक���े. -उत्तर प्रदेश (UP IMD हवामान अंदाज), राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी सांगितले की पंजाब, हरियाणा, दिल्ली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते, नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा प्रंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान, या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारी राष्ट्रांचे महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसि��घे, मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनौथ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या शपथविधी समारंभानंतर या नेत्यांची राष्ट्रपती भवनात बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहू, असंही खर्गे म्हणाले. खर्गे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व, पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैद्राबाद इथं आज सकाळी निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ईनाडू समूह आणि रामोजी चित्रपटसृष्टीचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुखः व्यक्त केलं आहे. देशानं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावलं असून पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त राव यांची दृष्टी सामाजिक उत्थानासाठी रुजलेली होती, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रामोजी राव भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानानं पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली. देशाच्या विकासाबद्दल त्यांना अत्यंत तळमळ होती, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामोजी राव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षण आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिला, अशी माहिती जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी ते आज माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटीत सर्व समाजातील गावकऱ्यांनी उपोषणाला पाठींब्याचं लेखी पत्र दिल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
****
यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल बियाणं वितरीत केलं आहे, आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरोचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचीही शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टेक्सास इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेश संघानं श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघानं निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल बांग्लादेश संघानं १९ षटकात आठ गडयांच्या मोबदल्यात विजय मिळवला. 
अन्य एका सामन्यात अफगानिस्तान संघानं न्यझिलंड संघाचा ८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तान संघानं २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मात्र, न्यझिलंड संघाचे ७५ धावांतच सर्व गडी बाद झाले.
****
दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही ��टना घडली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं, राज्यात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करुन दिले आहेत. या टप्प्यात अकरा लोकसभा मतदार संघांमध्ये, मतदानासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी या सर्व जिल्ह्यांची प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त ठिकाणी रवाना झाले आहेत. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदारयादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात २०२२ ते २०२७ या कालावधीत उल्लास- नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानात सहभाग घेऊन ४ लाख २५ हजार ९०६ जण साक्षर झाले आहेत. यामध्ये ६६ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तब्बल ९६ हजार ५१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याचं राज्याच्या शिक्षण संचालनालयानं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून या अभियानात सहभागी झालेल्या निरक्षरांची साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील विभागांमध्ये, २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी, प्रवेश चाचणी परीक्षा-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश होणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. सीईटीसाठी १५ ते २५ मे दरम्यान नोंदणी केली जाणार असून, त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान संबंधित विभागांमध्ये ऑफलाइन पद्धतीनं सीईटी होणार आहे.
सीईटीचे ५० टक्के आणि अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरून गुणवत्तेनुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी होणार असून, सीईटी परीक्षाही स्वतंत्रपणे आयोजित केलेली आहे. १०० गुणांच्या चा परीक्षेत एकूण ५० प्रश्न विचारले जातील, असं विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे आहे.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसची आज रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाच्या कामांसाठी जालना जिल्ह्यात कोडी आणि रांजणी रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि शनिवारी काही गाड्या उशिराने धावणार आहेत. तर धर्माबाद-मनमाड ही गाडी आजपासून चार ऑगस्टपर्यंत धर्माबाद ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेसाठी, भारतीय कुस्तीपटू अमन शेरावतनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. ही कामगिरी करणारा अमन हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. तुर्कियेतल्या इस्तंबूलमध्ये जागतिक कुस्ती ऑलिंपिक पात्रता फेरीत त्यानं ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात विजय मिळवला.
दरम्यान, भारताच्या दिपक पुनियाला ८६ किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित करता आलं नाही.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. चेन्नईच्या एम. ए. चिंदबरम क्रीडा संकुलात हा सामना होईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.
****
येत्या २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा विभागानं दिला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपासपथक एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.
सक्तवसुली संचालनालय तसंच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळं त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. गुजरात राज्यात  दाखल असलेल्या गुन्हामध्ये मध्यस्थी म्हणून पोलिस निरीक्षक वारे याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये आधीच स्विकारले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर वारे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा नवापूरमधील संतप्त नागरीकांनी नवापूर पोलिस ठाण्याबाहेर जमत त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री नवापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
छत्रपती संभाजी नगर इथं शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, भुमरे यांनी काही वेळापुर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
****
मतदारांमध्ये मतदान जागृती ��ोण्याकरता सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' हा सायक्लोथॉन उपक्रम बीड जिल्ह्यात, येत्या रविवारी २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन 'मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा', असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी स्वीपच्या माध्यमातून सेंट फ्रान्सिस माध्यमिक शाळेत काल मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आलं. या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. यावेळी  आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच शासकीय, खासगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, काल या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतला हा चौथा विजय तर गुजरात टायटन्सचा पाचवा पराभव ठरला आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes