शिंदे येताच शिवसेना खासदाराचा त्रास संपला, ही फायनान्स कंपनी बँकेचे कर्ज फेडणार
शिंदे येताच शिवसेना खासदाराचा त्रास संपला, ही फायनान्स कंपनी बँकेचे कर्ज फेडणार
धनवर्षा फायनान्स कंपनी 174 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत 230 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच सिटी सहकारी बँकेचा ताबा घेणार आहे.
आनंदराव अडसूळ (फाइल फोटो).
प्रतिमा क्रेडिट स्रोत: tv9 bharatvarsh
महाराष्ट्र भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर येताच आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या शहर सहकारी बँकेचा त्रास जवळपास…
View On WordPress
0 notes
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड
राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ���२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** नवे रस्ते तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** ज्येष्ठ शेकाप नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव; उद्या कांस्य पदकासाठी सामना
आणि
** औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
****
रस्ते दुरुस्त करताना तसंच नवे रस्ते तयार करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या पुलाचं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. नव्या रेल्वेमार्गामुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना फक्त दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाला जालना इथून जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.
****
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात येणार असल्याचं आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी तसंच सुरु झाल्यानंतर पाल्याला शाळेत आणि वसतिगृहात पाठवण्याआधी पालकांचं संमतीपत्र घेणं बंधनकारक राहणार आहे. तसंच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक तयार करणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचं पालन करणे याबाबतच्या सर्व सूचना आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर सांगोला इथं आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशमुख यांचं अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख यांचं काल रात्री सोलापूर इथं खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, ��रुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गणपतराव देशमुख यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आमदार नरसय्या आडम यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणं आवश्यक असून त्यासाठी प्रत्येक गावातल्या पाणंद रस्त्याचे माती काम आणि मजबुतीकरण होणे गरजेचं असल्याचं मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. योग्य नियोजन आणि आराखडा तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजना गावा-गावात राबवाव्यात, त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
****
नागरिकांनी शासकीय वैद्यकीय सुविधेकडे असलेल्या सेवा लक्षात घेवून शासकीय रुग्णालयांमध्येच उपचार घेण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलं. ते आज परभणी इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. जिल्हयातल्या आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं अल्पसंख्यांक विभागाकडून रुग्णालयासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती पालकमंत्री मलिक यांनी यावेळी दिली. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा चिनी तैपेईच्या ताई झू यिंन हिने २१-१८, २१-१२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. उद्या सिंधूचा चीनच्या ही बिंग जियो हिच्यासोबत कांस्य पदकासाठी सामना होईल.
भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४-३ अशी मात केली. वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याच्या अपेक्षा कायम आहेत.
थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहिली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.
****
ज्येष्ठ ॲथलीट मान कौर यांचं आज पंजाबमध्ये मोहाली इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, त्या १०५ वर्षांच्या होत्या. वयाच्या ९३ व्या वर्षापासून ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या मान कौर यांनी, त्यांचे पुत्र गुरुदेव यांच्या मार्गदर्शनात, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १७ हून अधिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. २०१९ साली पोलंडमध्ये झालेल्या ॲथेलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक, भालाफेक तसंच ६० मीटर आणि २०० मीटरच्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षी त्यांना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
****
औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्यांची संख्या तीन हजार ४९८ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाने बाधित झालेल्या एक लाख ४७ हजार ३७२ रुग्णांपैकी एक लाख ४३ हजार ५८६ रुग्ण बरे झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४५६ झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त झालेल्या सात रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १८९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले १९८ रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात ६१, आष्टी तालुक्यात ४७, शिरूर २१, गेवराई १८, पाटोदा १६, अंबाजोगाई, वडवणी तसंच केज तालुक्यात प्रत्येकी ९, धारूर ६, तर माजलगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळले. परळी तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही.
****
जालना शहरातल्या कादराबाद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील निजामकालीन मूर्तीवेसचा काही भाग आज सकाळी कोसळला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंगळबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आज शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोविडसारख्या आव्हानात्मक काळात मुगळीकर यांनी दिलेलं योगदान हे लाख मोलाचं आहे या शब्दात पालकमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.
//********//
0 notes