Tumgik
#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या
marathinewslive · 2 years
Text
शिंदे सरकारच्या spb 94 च्या वाइन विक्री निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
शिंदे सरकारच्या spb 94 च्या वाइन विक्री निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शिंदे येताच शिवसेना खासदाराचा त्रास संपला, ही फायनान्स कंपनी बँकेचे कर्ज फेडणार
शिंदे येताच शिवसेना खासदाराचा त्रास संपला, ही फायनान्स कंपनी बँकेचे कर्ज फेडणार
धनवर्षा फायनान्स कंपनी 174 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत 230 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच सिटी सहकारी बँकेचा ताबा घेणार आहे. आनंदराव अडसूळ (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: tv9 bharatvarsh महाराष्ट्र भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर येताच आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या शहर सहकारी बँकेचा त्रास जवळपास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर : जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ���२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** नवे रस्ते तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** ज्येष्ठ शेकाप नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव; उद्या कांस्य पदकासाठी सामना
आणि
** औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
****
रस्ते दुरुस्त करताना तसंच नवे रस्ते तयार करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या पुलाचं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. नव्या रेल्वेमार्गामुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना फक्त दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाला जालना इथून जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.
****
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात येणार असल्याचं आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी तसंच सुरु झाल्यानंतर पाल्याला शाळेत आणि वसतिगृहात पाठवण्याआधी पालकांचं संमतीपत्र घेणं बंधनकारक राहणार आहे. तसंच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक तयार करणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचं पालन करणे याबाबतच्या सर्व सूचना आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर सांगोला इथं आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशमुख यांचं अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख यांचं काल रात्री सोलापूर इथं खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, ��रुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गणपतराव देशमुख यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आमदार नरसय्या आडम यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणं आवश्यक असून त्यासाठी प्रत्येक गावातल्या पाणंद रस्त्याचे माती काम आणि मजबुतीकरण होणे गरजेचं असल्याचं मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. योग्य नियोजन आणि आराखडा तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजना गावा-गावात राबवाव्यात, त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
****
नागरिकांनी शासकीय वैद्यकीय सुविधेकडे असलेल्या सेवा लक्षात घेवून शासकीय रुग्णालयांमध्येच उपचार घेण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलं. ते आज परभणी इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. जिल्हयातल्या आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं अल्पसंख्यांक विभागाकडून रुग्णालयासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती पालकमंत्री मलिक यांनी यावेळी दिली. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा चिनी तैपेईच्या ताई झू यिंन हिने २१-१८, २१-१२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. उद्या सिंधूचा चीनच्या ही बिंग जियो हिच्यासोबत कांस्य पदकासाठी सामना होईल.
 भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४-३ अशी मात केली. वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याच्या अपेक्षा कायम आहेत.
थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहिली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.
****
ज्येष्ठ ॲथलीट मान कौर यांचं आज पंजाबमध्ये मोहाली इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, त्या १०५ वर्षांच्या होत्या. वयाच्या ९३ व्या वर्षापासून ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या मान कौर यांनी, त्यांचे पुत्र गुरुदेव यांच्या मार्गदर्शनात, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १७ हून अधिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. २०१९ साली पोलंडमध्ये झालेल्या ॲथेलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक, भालाफेक तसंच ६० मीटर आणि २०० मीटरच्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षी त्यांना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
****
औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्यांची संख्या तीन हजार ४९८ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाने बाधित झालेल्या एक लाख ४७ हजार ३७२ रुग्णांपैकी एक लाख ४३ हजार ५८६ रुग्ण बरे झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४५६ झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त झालेल्या सात रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १८९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले १९८ रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात ६१, आष्टी तालुक्यात ४७, शिरूर २१, गेवराई १८, पाटोदा १६, अंबाजोगाई, वडवणी तसंच केज तालुक्यात प्रत्येकी ९, धारूर ६, तर माजलगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळले. परळी तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही.
****
जालना शहरातल्या कादराबाद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील निजामकालीन मूर्तीवेसचा काही भाग आज सकाळी कोसळला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंगळबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आज शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोविडसारख्या आव्हानात्मक काळात मुगळीकर यांनी दिलेलं योगदान हे लाख मोलाचं आहे या शब्दात पालकमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.
//********//
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ncp targets eknath shinde srikant shinde viral photo on cm chair
ncp targets eknath shinde srikant shinde viral photo on cm chair
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ सिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
mns gajanan kale mocks uddhav thackeray as mamu in munnabhai movie
mns gajanan kale mocks uddhav thackeray as mamu in munnabhai movie
राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि शिवसेना विरुद्ध बी जे पी असा सामना रंगताना दिसत असताना आता शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर तोंडसुख घेताना मनसेलाही खोचक टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
congress mla praniti shinde mocks bjp on rahul gandhi bharat jodo yatra
congress mla praniti shinde mocks bjp on rahul gandhi bharat jodo yatra
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधारी टीका करण्यासाठी या यात्रेची चर्चा करत आहेत, तर विरोधक समर्थन करण्यासाठी यात्रेवर बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर यात्रेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाला यात्रेवरून खोचक टोला लगावला आहे. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांचाही उल्लेख केला होता. त्याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे टीका केली, त्यामुळे दुख: झाले असल्याचे त्या म्हणाल्या. हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल;…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
हृषिकेश देशपांडे गेल्या आठ ते दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी ठरताना दिसतो. गावपातळीपर्यंत पक्षबांधणी, त्याला समविचारी संघटनांची जोड तसेच कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार अशी अनेक कारणे यामागे आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूक २०२४च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
शिवसेना पक्ष��्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मॉल्समध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत शंभूराज देसाई spb 94
मॉल्समध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत शंभूराज देसाई spb 94
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
शंभूराज देसाई यांनी Cm एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचे कारण सांगितले spb 94
शंभूराज देसाई यांनी Cm एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचे कारण सांगितले spb 94
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याचदा दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होते आहे. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जातात, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतो आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
mns sandeep deshpande slams shivsena chief uddhav thackeray on balasaheb thackeray
mns sandeep deshpande slams shivsena chief uddhav thackeray on balasaheb thackeray
मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. यासंदर्भात ���ोलताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
chandrashekhar bawankule replied to uddhav thackeray On dynasty alligation spb 94
chandrashekhar bawankule replied to uddhav thackeray On dynasty alligation spb 94
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या घराण्यावर आणि वंशावरून टीका होते आहे. मात��र, भाजपाच्या तर वंशाचा वाद आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंना यांनी बी जे पी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर केला. त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. हेही वाचा – उद्धव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सीएम एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र spb 94 मध्ये नवीन संवर्धन क्षेत्र मंजूर केले
सीएम एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र spb 94 मध्ये नवीन संवर्धन क्षेत्र मंजूर केले
राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे. हेही वाचा –…
Tumblr media
View On WordPress
0 notes