#मराठीत बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार, राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन • ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, विविध १२ ठराव पारित आणि • आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय, विराट कोहलीचा एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधल्या भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. देशभरातल्या साडे नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण यावेळी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहात नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार असून, राज्यातल्या ९२ लाख ८९ हजार शेतकरी कुटुंबांना एक हजार ९६७ कोटीहून अधिक रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसंच जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं नमूद केलं. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वा��ता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं ते म्हणाले, मुझे यह देखकर भी बहुत खुशी होती है कि आज space sector हमारे युवाओं के लिए बहुत favourite बन गया है। कुछ साल पहले तक किसने सोचा होगा कि इस क्षेत्र में Start-Up और private sector की space कंपनियों की संख्या सैकड़ों में हो जाएगी! हमारे जो युवा, जीवन में कुछ thrilling और exciting करना चाहते हैं, उनके लिए space sector, एक बेहतरीन option बन रहा है।
एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून, आपण एकत्रितपणे छोट्या -छोट्या प्रयत्नांतून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले. आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन, महिला दिनाचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहितीही त्यांनी दिली. या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.
नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असतं, ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. मराठी भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हायला हवी, मराठी भाषेला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं अजित पवार यावेळी म्हणाले, मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही. तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक विषय, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान विद्या मराठीत शिकवणं आवश्यक आहे. मराठी भाषेला अपेक्षीत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी जे काही करावं लागेलं हे महाराष्ट्राचं राज्यशासन निश्चितपणे करेल.
महाराष्ट्रभूमीसाठी सदैव झटत राहू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तालकटोरा स्टेडिअमला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून, मराठी सारस्वतांनी आज आपल्या वि��ारांनी दिल्ली जिंकली असल्याचं, शिंदे म्हणाले. मराठी भाषा वाढायची असेल तर आपल्या घराघरातली मुलं मराठी शिकायला हवीत, असं संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यावेळी म्हणाल्या. प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला उर्जितावस्था येईल, असं सांगताना मराठी भाषा टिकण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी मांडले. दरम्यान, संमेलनाच्या समारोप सत्रात १२ ठराव मांडण्यात आले. राज्य शासनाने बोली भाषा विकास अकादमी विकसित करावी, विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये बोली भाषांचा समावेश करावा, २३ फेब्रुवारी ही संत गाडगेबाबा यांची जयंती बोली भाषा दिन म्हणून साजरी केली जावी आदी ठरावांचा यात समावेश आहे. दरम्यान, देशाच्या राजधानीत एक चांगलं संमेलन पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या… दिल्लीमध्ये संमेलन ही मराठीसाठी नक्कीच फार मोठी गोष्‍ट आहे. आणि ही आमंत्रित संस्था आहे ‘सरहद’. त्यांनी पूर्वी घुमान संमेलन घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होता. परंतू दिल्ली म्हणजे आणखी वेगळी गोष्‍ट आहे, इथे पुष्‍कळ जास्त राजकीय हालचाल आहे. त्यामुळे हे कसं काय त्यांना जमेल असं वाटत होतं. परंतू त्यांनी फार मनापासून आणि यशस्वीपणे हे आयोजन केलं आहे. विषय आम्ही थोडे बदलेले होते नेहमीपेक्षा. तेही लोकांना अतिशय आवडले आहेत. आम्हाला एक चांगल संमेलन देशाच्या राजधानीमध्ये पार पाडण्याचं समाधान मिळतं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचाही काल समारोप झाला. यावेळी विविध २७ ठराव पारित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारं शासकीय अनुदान तात्काळ बंद करण्यात यावं आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तसंच तासिका तत्त्वावरील सर्व मराठी शाळा आणि महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सदर अनुदान वर्ग करावं, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहितांना धर्मांध शक्तींपासून संरक्षण मिळावं, समन्यायी पाणी वाटप धोरणाची त्वरित अंमलबजावणी करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेद टाळावा, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत विधानभवनात झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरु होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेत���त्वातलं शिष्टमंडळ वर्ल्ड हेरि��ेज समितीसमोर पॅरिस इथं तांत्रिक सादरीकरण करणार आहे. राज्य शासनानं ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला २४२ धावांचं आव्हान दिलं. कुलदीप यादवने तीन, हार्दिक पंड्याने दोन, तर हर्षित राणा, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर ४३व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. कोहली प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. तर १५८ झेल घेऊन त्याने भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही केला आहे.
नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने विजेतेपद पटकावलं. छत्रपती संभाजीनगर विभागानं दुसरा, तर पुणे विभागानं तिसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याची आणि त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी वर्गाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. सामान्य जनतेला केंद्रीय अर्थसंकल्प समजण्याच्या दृष्टीकोनातून भाजपनं काल बुलडाणा इथं आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली असल्याचही कराड यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कर्ष युवा महोत्सवसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या या महोत्सवासाठी मराठवाडा विद्यापीठाचा २० जणांचा संघ काल रवाना झाला.
0 notes
akoladivya · 11 months ago
Text
Akoladivya.com सह, तुम्ही सर्वात अलीकडील मराठी बातम्यांबाबत अद्ययावत राहू शकता आणि महाराष्ट्राच्या हृदयाशी कनेक्ट राहू शकता. आता, तुमच्या मातृभाषेत अद्यतने प्राप्त करा!
ताज्या महाराष्ट्राच्या बातम्या मराठीत
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
sindhuprabhat · 1 year ago
Text
Tumblr media
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94
मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर जोरदार टीका ��ेली होती. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांचाही उल्लेख केला होता. त्याला भावना गवळी यां��ी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे टीका केली, त्यामुळे दुख: झाले असल्याचे त्या म्हणाल्या. हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल;…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Video : 'झलक दिखला जा'मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद
Video : ‘झलक दिखला जा’मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद
Video : ‘झलक दिखला जा’मध्ये माधुरी दीक्षित बोलली मराठीत, अमृताच्या आईबरोबर रंगला संवाद Amruta Khanvilkar : झलक दिखला जा शोचा १०वा सीझन सुरू झाला आहे. मराठी कलाकार अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी चर्चेत आहेत अमृतानं नृत्याची प्रेरणा माधुरी दीक्षितपासून घेतली आहे. त्याचा भावना तिनं सगळ्यांसमोर व्यक्त केल्या. Amruta Khanvilkar : झलक दिखला जा शोचा १०वा सीझन सुरू झाला आहे. मराठी कलाकार अमृता…
View On WordPress
0 notes
marathicorner · 5 years ago
Text
Funny😜Comments on Friends👫Photo in Marathi
If you like Funny Comments on Friends Photo in Marathi then this is the right place for you we have some here Best Funny Comments on Friends Pic in Marathi providing for you.
मित्रांनो, तुमच्या फोटोवर Funny Comments on Friends Photo in Marathi मध्ये केलेल्या वेगवेगळ्या funny Comments आहेत. मित्रांच्या फोटो वर Comments देताना मला नेहमीच प्रत्यक्ष चित्रा मधून काहीतरी शोधून funny Comments करायला आवडते. 
मी खाली काही funny Pic Comments Marathi मध्ये दिलेल्या आहेत. तर Best फनी comments for FB in Marathi मध्ये पहा व मला तुमचा अभिप्राय द्या. FB funny comments in Marathi for girl pic | facebook funny Photo comments in Marathi for बॉय.
या लेख मध्ये काय आहे?
New Funny Comments on Friends Photo in Marathi
All ABout are 'Funny Comments on Friends Photo in Marathi' -: आता आपण पहिलेच असेल मराठीत funny कमेंट्स फोटोवर सर्व फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. शायरीच्या या दुनिये मध्ये आता सुधा खूप काही funny कमेंट्स वायरल झाल्या त्या मधील एक म्हणजे "बाटलीत बाटली, काचेची बाटली…. भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂" funny कमेंट्स सर्व फेसबुकवर आहेत.
Corona नंतर आला हंता.. ता��ंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️
 🤣मटकी ला मोड नाही.. अन् राज भावजींच्या च्या कोवळ्या फोटोला तोड नाही😂🤣🤣
कवळ्या कवळ्या तोंडावर... नाजूक नाजूक मिशी.... भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂
भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂
भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक... भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂
दादाची अदा इतकी मस्त की पोरी झाली कोरोनाग्रस्त !!...🤐😜
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा...🤣
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी ! किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
कोरोना नंतर आला आता हंता 😬 भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂
हिच अदा कोरोना ला संपवु शकते 😍 मी शासनाला विनंती करतो की सदर छायाचित्र हे कोरोना विषाणूला दाखवून भारतातून पळवून लावावा👏🤣
इटलीच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, मॅडम चे किती फॅन्स विचारू नका राव🔥🤣😎😂
आडणाव आहे हीच 'खाणे'...आडणाव आहे हीच 'खाणे'...... मग का नाही खाऊ देत ही चणे आणि फुटाणे.....
ताई बनवतात सर्वाना उल्लू ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀 माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀 #कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻
खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून .....खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून.... अन भाऊ ने पप्पी😘 नई दिली तर पोरी बसतात रुसून 😏 😘..😂😂
#भाऊच्या घरात मार्बलची फर्ची ....। म्हणुनच तर मुली म्हणताता... "होणार सुन मी ह्या घरची"
आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा....😉😉
शिकाल तर टिकाल.... आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स��टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣
हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा... भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
 Best Funny Comments on Friends Pic in Marathi
All new "best comment on friends pic in marathi"-: या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी funny comments फोर friends मराठीत लिहित आहे. म्हणून आम्ही खाली तुम्हाला मजेदार funny pic comments for friends देत आहोत ज्या तुम्हाला नक्की  आवडतील.
हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे... भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...🤣🤣🤣
भाऊ दिसायला भोळा आणि लफडे आहे सोळा 😂
काकडी गार आहे# बियरचा बार आहे... आणि भाउंच्या नादाला लागाल तर तिथच स्वर्गाच दार आहे🔥🔥
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣
उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂
भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा.. भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜
कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣
मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, " आलं बया निळू दाजी"!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣
आज तिने आ��च्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे...
तीला बघुन भावाने केस केले उभे ती म्हणाली जा लवकर आण 🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈 🤣🤣😅💦💦
चार चपला हाना...👠🥿 पण चॉकलेट बॉय म्हना😂😂
इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला... 🤣😁
ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा.. पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄
चार चपला हाना, पण हीला पापा कि परी म्हना 😂
देशावर आलेला कोरोनाच संकट टळू दे... आणि माझ्या फोटो वर जे comment करतायत त्यांची लफडी घरी कळू दे...😆
नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear😂😂
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा , इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!! 😂😂😂 😂😂😂
Funny Comments For Friends Pic in Marathi
New and "Funny Comments on Friends Photo in Marathi" -: Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the Facebook, funny Marathi comments on Facebook.
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही... बुलाती हैं मगर जाणे का नही.. 😍😍🔥🔥🔥💥💥💥😷😷😂
तुझी photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌 मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...😍😍😘
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे, भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे🔥🔥🔥🔥🤣🤣
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी़़़़़़़ गॉगल लावून दिसतोय इम्रान हाश्मी☝️☝️🤓🤓🤓😊😊
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न, भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न... 🤣🤣
धान्यातील एक प्रकार आहे जवस... कधी तरी लपव तुझ्या तोंडावरची हवस...😂😂😂🤣🤣
अ हं..! नजरेने वार कोरोना ठार..!🔥😎🤣
अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना ��ाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂
Marathi Funny Comments on Friends Photo
Best Funny Comments on Friends Pic in Marathi for बॉय  -: Facebook Comments in Marathi|Facebook Funny Comments|Funny Comments on Friend Photo|Latest Shayari Comments|Facebook Marathi Shayari Comments
बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक, तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक...😅😆
ताज महाल पेक्षाही फेमस भाऊंची अदा.... पोरींचे काय.. म्हताऱ्या पण फिदा...🤞🔥🔥🔥
Corona वरच्या बातम्या पाहून जीव झाला कावराबावरा...lockdown परवडलं पण तुमच्या कविता आवरा😂😂
देवदास ची आयटम होती पारो, भाऊला पाहून पोरगी बोलती, "ओ भाईईई..मारो मुझे मारो"😂😂😂
गावरान अंडी तळली गावरान तुपात काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात 😂😂😂
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 🤩
तुम्हा सगळयांना खाऊ घालतो बकरा फक्त कमीत करा माझा फोटोवरच्या चकरा🙏
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा... आली पोरगी जवळ की म्हणतो... मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...😎😎🤣
ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣🤣
टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱
पाळण्यात बसून घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 🤦‍♂️🤩😂
दारात बांधली गाय, तिचं सुटलं वासरू... भाऊला बघून पोरी म्हणतेत...... "कुण्या गावाचं आलं पाखरू"
संपत आली जवानी... तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी...😂😂😂
ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा भाऊना पाहुन मुली बोलतात मी तुमची शेव्ंता तुम्हीच माझे अण्णा😂😂😂
दारू ला हिंदित म्हतात शराब || दारू ला हिंदित म्हतात शराब || आंट्या म्हणतात , हाच आमचा अशोक सराफ || 🤣🤣🤣🤣😨😨😨
भाऊंनी फोटो टाकला जुना, तरीपण पोरी म्हणतात हाच माझा गायछाप हाच माझा चुना ❤️
भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻‍♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂😂😂😂
सर्व पोरी बघतात भाऊचा dream कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो Vicco turmeric ayurvedic cream🤣
धन्यवाद भाऊ फोटो टाकुन तुम्ही समस्त मानवजातीवर उपकार केले, पहिले रात्रीची झोप लागत नव्हती तुमचा फोटो १० जणींना पाठवला मग शांत झोप लागायला लागली..... एका जनाने खोटं समजुन डिलीट केलं तर त्याला पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये मारलं..... एकाने पंधरा जणींना पाठवले त्याला भर संचारबंदीत चपटी मिळाली.... 😂😂
गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित! भाऊंचे लग्न जुळवून टाकू या थंडीत 💞💑😃😃
कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी. आम्हाला खायायची आमच्या #dada च्या लग्नात बुंदी 🤩😎😎 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मिसळ सोबत खातात पाव मिसळ सोबत खातात पाव भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात "आला बाबुराव आता आला बाबुराव". 😂😂😜
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
OLD PHOTOS PIC COMMENTS IN MARATHI
Funny Facebook Comments in Marathi
नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi
 FB Marathi Comments For Girl Pic
वरती आम्ही तुम्हाला या विषयी भरपूर Funny Comments on Friends Photo in Marathi here Best Funny Comments on Friends Pic in Marathi मराठी फेसबुक कमेंट्स दिलेलं कसे वाटले नक्की सांगा.
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2JAgFay
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार-सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
आणि
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात मनू भाकर अंतिम फेरीत दाखल
****
रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे प���से जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले –
ही योजना आम्ही निवडणुकीसाठी आणलेली नाही. माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्य या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखतंय. त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे, माझ्‍या लाडक्‍या बहिणींवर कोर्ट, न्यायालय देखील अन्याय करणार नाही. तो देखील न्याय देईल.
ही योजना कायम सुरू राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटरग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन, विविध उद्योगांची उभारणी, आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
****
या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं छत्रपती संभाजीनगर इथं विमानतळावर आगमन झाल्यावर, पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, आदर्श नागरी पतसंस्थेच्या शिष्टमंडळासोबत चिकलठाणा विमानतळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तसंच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
****
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज नियोजित पोलिस भरती रद्द करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उमेदवारांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला, तेव्हाच संबंधितांनी भरती रद्द केल्याची सूचना उमेदवारांना द्यायला हवी होती, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज स्वीकारले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत भरावे लागतील, यासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला अर्जदारांनी बळी पडू नये, असं सांगून मराठीत केलेले अर्ज ��ुन्हा इंग्रजी भाषेतून भरण्याची करण्याची आवश्यकता नसल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यांत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं प्रतिपादन क्षीरसागर यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शहरांच्या नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत सविस्तर आदेश दिले आहेत, त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
दरम्यान, या प्रकरणी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबद्दल भाष्य करण्यास नकार दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात जूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असला तरी त्या तुलनेत पेरण्या केवळ ५६ टक्के झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यभरात सर्वाधिक १३६ मिलिमीटर इतका पाऊस छत्रपती संभाजीनगर विभागात झाला असून त्या खालोखाल नाशिक विभागात ११४, तर अमरावती विभागात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वांत कमी ७० टक्के पाऊस हा नागपूर विभागात झाला आहे.
****
लोकसभेत आज अर्थसंकल्पातल्या आरोग्य सुविधांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा झाली, यामध्ये नंदूरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी आदिवासी भागातल्या सिकल सेल आजाराचा मुद्दा उपस्थित केला. या आजाराच्या निर्मुलनासाठी अद्ययावत संशोधन केंद्रं तसंच रुग्णालयं उभारण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी पाडवी यांनी केली. कोरोना काळात आशा स्वयंसेवकांनी केलेल्या कामाकडे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लक्ष वेधत, त्यांचं मानधन वाढवण्याची मागणी केली.
****
जागतिक कृषी मंच अर्थात वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. मंचाच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगा��े अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँण्टिनिओ गुटेरस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत तिने ५९० गुण मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
तिरंदाजीत रिकर्व्ह सांघिक स्पर्धेच्या मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीसाठी अंकिता भकट आणि धीरज बोम्मादेवरा पात्र ठरले आहेत. बॅडमिंटनमध्ये आज लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीतील लढत होणार आहे. नौकानयनात पुरुष गटात विष्णू सरवानन तर महिला गटात नेत्रा कुमारन यांची स्पर्धा आज होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज कोलंबो इथं नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ५० षटकांत आठ बाद २२९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालगे ५० धावा काढून खेळत होता. भारताकडून अक्षर पटेल��ं सर्वाधिक दोन बळी घेतले आहेत.
****
५५ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १६ ऑगस्ट पर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात जमा करण्याचं आवाहन  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.
****
शेती विकास योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपमध्ये पिकांची अचूक नोंद करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा  प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. तसंच विविध शासकीय सुविधांसाठी ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲपदेखील सुरु करण्यात आले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प एक ऑगस्ट पासून राज्यभर राबविण्यात येत असल्यानं सर्व शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
****
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हिंगोली इथं आज भाजप खासदार अनुराग ठाकू�� यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महा स्वच्छता अभियान शहरात १ ऑगस्ट पासून राबवले जात आहे. एक तास शहराच्या स्वच्छतेसाठी ही या अभियानाची संकल्पना आहे. आज शहरातील सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत या अभियाना अंतर्गत परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थांचा सहभाग लक्षणीय होता.
****
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड इथले रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान, १७ जुलैला त्यांचा मृत्यू झाला होता, त्यांना स्वाईन फ्ल्यूची लक्षणं दिसत असल्याने डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोग शाळेला तपासणी साठी पाठवला होता, त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती, असं या अहवालात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात सोहळा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही
** व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड
बोगस अथवा चढ्या दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई-कृषिमंत्र्यांचा इशारा
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असून, माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या महोत्सवात काल प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान करण्यात आला. राज्यमंत्री मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, अभिनेता रणदीप हुडा आदी मान्यवरांच्या हस्ते सुब्बय्या यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथं ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचं चित्रपटांचं प्रदर्शन केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना काल परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच ��ुवा पुरस्कार काल जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, सौदागर यांनी, उसवण कादंबरीच्या माध्यमातून कष्टकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. ग्रामीण भागातल्या वास्तवाची पुरस्काराच्या रुपाने दखल घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली...
“पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे आणि एकूण राष्ट्रपती झाल्यासारख वाटत आहे आजवर जे लिखाण केलं जे काय आपलं लग्न मांडलं त्याची नोंद घेतली असं वाटत आहे पुरस्कार द��णार आहे आपलं एकूण जगण्याचे लग्नाची नोंद घेतली असे वाटते”
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. सरकारी उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यात बी- बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी २५ दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट ७५ टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.  
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा काल पुन्हा एकदा मु��ांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण ५६ शाळांमध्येही काल प्रवेशोत्सव साजरा झाला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये काल जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र शाळा सुरू झाल्या, तरीही अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शालेय गणवेश शिऊन घेण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अनेक शाळांमधून गणवेश वाटपाला प्रारंभ झाला असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
 टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला.आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४१ धावांनी पराभव केला. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामना सुरू आहे. स्कॉटलंडच्या दोन बाद १०७ धावा झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या  हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार टी.प��.कांबळे यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षातर्फे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लक्कड जवळगा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.   
****
महेश नवमी काल साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं वाद्यांच्या गजरात सजीव देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हर घर पौधा निसर्गसंवर्धन उपक्रमाचा प्रारंभ या निमित्तानं करण्यात आला.
बीड शहरातूनही मिरवणूक काढण्यात आली, आबालवृद्धांचा यात लक्षणीय सहभाग होता.
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘श्री शिवराज्याभिषेक - नव्या युगाचा प्रारंभ’ या केदार फाळके लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाजाचे स्वत्व रक्षण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं प्रतिपादन फाळके यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आजपासून पाच दिवस तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
****
मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. ��ांदेड वगळता, विभागात सर्व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात सोहळा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही
** व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड
बोगस अथवा चढ्या दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई-कृषिमंत्र्यांचा इशारा
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असून, माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या महोत्सवात काल प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान करण्यात आला. राज्यमंत्री मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, अभिनेता रणदीप हुडा आदी मान्यवरांच्या हस्ते सुब्बय्या यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथं ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचं चित्रपटांचं प्रदर्शन केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना काल परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार काल जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, सौदागर यांनी, उसवण कादंबरीच्या माध्यमातून कष्टकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. ग्रामीण भागातल्या वास्तवाची पुरस्काराच्या रुपाने दखल घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली...
“पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे आणि एकूण राष्ट्रपती झाल्यासारख वाटत आहे आजवर जे लिखाण केलं जे काय आपलं लग्न मांडलं त्याची नोंद घेतली असं वाटत आहे पुरस्कार देणार आहे आपलं एकूण जगण्याचे लग्नाची नोंद घेतली असे वाटते”
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. सरकारी उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यात बी- बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी २५ दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट ७५ टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.  
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा काल पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. छत्रपती संभ��जीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण ५६ शाळांमध्येही काल प्रवेशोत्सव साजरा झाला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये काल जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र शाळा सुरू झाल्या, तरीही अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शालेय गणवेश शिऊन घेण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अनेक शाळांमधून गणवेश वाटपाला प्रारंभ झाला असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
 टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला.आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४१ धावांनी पराभव केला. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामना सुरू आहे. स्कॉटलंडच्या दोन बाद १०७ धावा झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या  हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार टी.पी.कांबळे यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षातर्फे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लक्कड जवळगा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.   
****
महेश नवमी काल साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं वाद्यांच्या गजरात सजीव देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हर घर पौधा निसर्गसंवर्धन उपक्रमाचा प्रारंभ या निमित्तानं करण्यात आला.
बीड शहरातूनही मिरवणूक काढण्यात आली, आबालवृद्धांचा यात लक्षणीय सहभाग होता.
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘श्री शिवराज्याभिषेक - नव्या युगाचा प्रारंभ’ या केदार फाळके लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाजाचे स्वत्व रक्षण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं प्रतिपादन फाळके यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आजपासून पाच दिवस तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
****
मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नांदेड वगळता, विभागात सर्व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना जाहीर.
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड.
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट-फुलं तसंच मिठाईने स्वागत.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात दिला जाणारा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा डॉ मुरुगन यांनी केली. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये चित्रपटांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. यंदाच्या मिफमध्ये ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार आज जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप असून, पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं, साहित्य अकादमीनं जाहीर केलं आहे.
****
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. यासंदर्भात महा डिबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. प्राप्त अर्जातून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून, आवश्यक निविष्ठांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं, कृषी विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला मात्र जनतेने त्याला थारा दिला नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना, महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये सध्या झालेली युती ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हे सांगावं, अशी मागणी केली. शरद पवार यांनी या वेळी बोलतांना, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेतल्या, तेवढ्या जास्ती जागांचा महाविकास आघाडीला ��ाभ झाल्याचं सांगत, उपरोधिकपणे पंतप्रधानांचे आभार मानले.
****
छत्तीसगडमध्ये आज झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मारले गेले, तर दोन सैनिक जखमी झाले. इंडो तिबेट सीमा दल, जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलानं आज बस्तर भागात ही कारवाई केली. सुरक्षा दलांकडून या परिसराची छाननी अद्याप सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आज पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारासह सर्व वर्ग खोल्यांची सजावट करण्यात आली होती. २४० विद्यार्थ्यांनी जपानी भाषेतून जिल्हाधिकारी स्वामी यांच्याशी संवाद साधला.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. तसंच पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करत, माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं.
****
लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. लातूर तालुक्यातील वरवंटी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या बैलगाडीचं सारथ्य केलं. शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात या मुलांचं औक्षण करून आणि गुलाबपुष्प देवून शाळेमध्ये स्वागत झालं. जिल्ह्यातील शाळांमध्ये आज जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र आज शाळा सुरू झाल्या, तरीही राज्यभरातले ४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. राज्य शासनाने या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं सांगत, सरकारचं हे धोरण गुत्तेदारांना पोसण्याचं असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एक आढावा बैठक घेत, आगामी वृक्ष लागवड मोहीम, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांची वृद्धी, शासनाच्या बांबू मिशनची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली. यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेप्रमाणे उद्दीष्ट घेऊन बांबू लागवड करण्यात यावी, यासाठी खासगी शाळांनी तसंच कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश राऊत यांनी दिले.
****
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं. दरवर्षी महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येतं, यावर्षीही या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी आज अकोल्यात दाखल झाली. यंदा पालखीचं पंचावन्नावं वर्ष आहे. शहरातील ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत आलं. पालखी उद्या सकाळी पुढच्या मुक्कामासाठी प्रयाण करण���र आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल.
****
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
IBM चा प्रभाव अनलॉक करणे: मराठी बातम्यांनी नवीन मार्ग उघडले
तांत्रिक नवकल्पना आणि कॉर्पोरेट प्रभावाच्या गजबजलेल्या लँडस्केपमध्ये, IBM एक बेहेमथ म्हणून उभी आहे, सतत डिजिटल जगाची रूपरेषा तयार करत आहे. तथापि, त्याच्या जागतिक ��पस्थितीत, प्रादेशिक बातम्यांमध्ये, विशेषतः मराठीत, IBM च्या प्रवेशामुळे, सर्वसमावेशकता आणि प्रवेशयोग्यतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्रयत्न केवळ IBM ची पोहोच वाढवत नाही तर मराठी भाषिक समुदायांना संबंधित आणि वेळेवर माहिती देऊन सक्षम बनवतो.
IBM च्या भांडारात मराठी बातम्यांचे एकत्रीकरण विविध सांस्कृतिक लँडस्केप्सची सूक्ष्म समज आणि स्थानिक संवेदनशीलता पूर्ण करण्याचे महत्त्व दर्शवते. मराठी, भारतातील प्रमुख प्रादेशिक भाषांपैकी एक, समृद्ध वारसा आणि विशाल प्रेक्षक अभिमान बाळगते मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक विविधतेचे महत्त्व मान्य करते आणि तंत्रज्ञान आणि प्रादेशिक समुदायांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करते.
मराठी बातम्यांमध्ये IBM च्या उपक्रमाचा प्रभाव केवळ भाषिक समावेशकतेच्या पलीकडे आहे. हे मराठी भाषिक प्रेक्षकांशी सखोल संबंध वाढवते, त्यांना IBM चे उपक्रम, सेवा आणि तंत्रज्ञानातील प्रगती त्यांना सोयीस्कर असलेल्या भाषेत गुंतवून ठेवण्यास सक्षम करते हे पाऊल माहितीच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करते, व्यक्तींना माहिती ठेवण्यासाठी आणि डिजिटल युगात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करते.
शिवाय, IBM चा मराठी बातम्यांमध्ये प्रवेश, स्थानिकीकरण आणि सामुदायिक सहभागासाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित करते. हे सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित सामग्री प्रसाराच्या महत्त्वावर जोर देऊन कॉर्पोरेट संप्रेषण धोरणांमध्ये एक प्रतिमान बदल दर्शवते. मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक अडथळ्यांना पार करते आणि मराठी भाषिक भागधारकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासते.
मराठी बातम्यांवरील IBM च्या उपक्रमाचे परिणाम विविध क्षेत्रांमध्ये उमटतात. तळागाळातील नवकल्पना सुलभ करण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यापर्यंत, सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी स्थानिकीकृत दळणवळण माध्यमे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मराठी प्रेक्षकांना तंत्रज्ञान, व्यवसाय ट्रेंड आणि जागतिक घडामोडींवरील बातम्या आणि अपडेट्स उपलब्ध करून देऊन, IBM ज्ञानाचा प्रसार उत्प्रेरित करते आणि डिजिटल क्रांतीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी व्यक्तींना सक्षम करते.
शिवाय, IBM च्या पुढाकाराने भाषिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी आणि प्रादेशिक समुदायांशी सक्रियपणे संलग्न राहण्यासाठी इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे. वाढत्या परस्परसंबंधित जगात, सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी भाषिक बहुलता समजून घेणे आणि त्याचा आदर करणे अत्यावश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:-
प्रमुख मराठी लोगो
अमरावती बातम्या आज मराठीत
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
राणी दुर्गावतीचा वारसा अनावरण: एक मराठी दृष्टीकोन
भारतीय इतिहासाच्या दोलायमान टेपेस्ट्रीमध्ये, राणी दुर्गावती हे नाव धैर्य, लवचिकता आणि अटूट दृढनिश्चयाचा पुरावा आहे. राणी दुर्गावतीबद्दल मराठीत माहिती शोधणाऱ्यांसाठी, तिच्या जीवनाचा आणि वारशाचा प्रवास एखाद्या महाकाव्यासारखा उलगडत जातो आणि या प्रदेशातील राणीच्या शौर्यपूर्ण योगदानाची झलक मिळते.
राणी दुर्गावती, ज्याला राणी दुर्गावती गोंड म्हणूनही ओळखले जाते, ही गोंडवाना राजवंशातील एक उल्लेखनीय राणी होती, जिने 16व्या शतकात म��्य भारतातील गार्हा-कटंगा राज्यावर राज्य केले. तिच्या कारकिर्दीत अपवादात्मक नेतृत्व, धोरणात्मक कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तिच्या प्रजेच्या कल्याणाची वचनबद्धता दिसून आली.
या प्रतिष्ठित राणीच्या जीवनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, मराठीत उपलब्ध असलेल्या समृद्ध ऐतिहासिक कथनांचा शोध घेता येईल, तिच्या लढाईतील विजयांवर आणि तिच्या राज्याची सांस्कृतिक अखंडता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकता येईल. मराठीत राणी दुर्गावतीची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी, ऐतिहासिक लेखाजोखा तिच्या शौर्याचे आणि तिच्या चिरस्थायी वारशाचे स्पष्ट चित्र रेखाटतात.
समकालीन बातम्यांच्या क्षेत्रात, ताज्या घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही IBM मराठी बातम्या शोधत असाल, तर विश्वसनीय स्रोत सर्वोपरि होतात. चालू घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी एक उल्लेखनीय व्यासपीठ म्हणजे mahavoicenews.com. हे प्लॅटफॉर्म विविध विषयांचे सर्वसमावेशक कव्हरेजच पुरवत नाही तर मराठीतील IBM-संबंधित बातम्यांसाठी एक विश्वसनीय स्रोत म्हणूनही काम करते.
अलीकडच्या काळात, तंत्रज्ञान आणि भाषेचे संमिश्रण अधिकाधिक प्रासंगिक बनले आहे आणि IBM या प्रगतीमध्ये आघाडीवर आहे. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे प्रवेशयोग्य आणि अचूक माहितीची आवश्यकता आहे. Mahavoicenews.com एक सेतू म्हणून काम करते, IBM मराठी बातम्या त्यांच्या वाचकांपर्यंत पोचवते, त्यांना तंत्रज्ञान उद्योगातील नवीनतम घडामोडींची चांगली माहिती असल्याची खात्री करून देते.
माहितीने भरलेल्या जगात, विश्वसनीय बातम्या स्रोत आवश्यक मार्गदर्शक बनतात. Mahavoicenews.com हे IBM मराठी बातम्या शोधणाऱ्यांसाठी एक दिवाण म्हणून उभे आहे, जे मराठी भाषिक समुदायातील तंत्रज्ञान-जाणकार प्रेक्षकांसाठी निवडलेल्या लेखांची निवड ऑफर करते.
ऐतिहासिक ज्ञान आणि समकालीन बातम्यांचे अभिसरण माहिती प्रसाराचे गतिमान स्वरूप अधोरेखित करते. राणी दुर्गावतीचा वारसा, जेव्हा मराठीत शोधला जातो तेव्हा भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो, मध्य भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीवर राणीच्या प्रभावाची सर्वांगीण समज प्रदान करतो.
आम्ही डिजिटल लँडस्केप नेव्हिगेट करत असताना, माहितीसाठी विश्वासार्ह स्त्रोतांवर अवलंबून राहणे अत्यावश्यक आहे. Mahavoicenews.com हे एक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे जे केवळ मराठीतील भाषिक आणि सांस्कृतिक बारकावे जपत नाही तर टेकविश्वातील नवीनतम घडामोडी, विशेषत: IBM शी संबंधित असलेल्या वाचकांना सुप्रसिद्ध असल्याची खात्रीही करते.
शेवटी, मराठीतील राणी दुर्गावती माहितीचा शोध आपल्याला इतिहास आणि शौर्याचा मोहक प्रवास घेऊन जातो. त्याच बरोबर, mahavoicenews.com एक समकालीन मार्गदर्शक म्हणून काम करते, IBM मराठी बातम्या तंत्रज्ञान-जाणकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा परस्परसंबंध स्वीकारून, आम्ही mahavoicenews.com सारख्या विश्वसनीय वृत्त स्रोतांद्वारे वर्तमानाच्या नाडीशी जोडलेले राहून भूतकाळाचा आदर करतो.
अधिक माहितीसाठी:-
राणी दुर्गावती माहिती मराठीत  
ibm मराठी बातम्या
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
रंगीत आशीर्वाद: गणपती बाप्पाच्या आवडत्या रंगांचे अनावरण
गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवात पूज्य हत्तीचे डोके असलेला गणपती बाप्पा लाखो लोकांच्या हृदयात पाऊल ठेवतो. भक्त त्यांच्या घरी दैवी उपस्थितीचे स्वागत करण्यासाठी तयारी करत असताना, रंगांची निवड हा उत्साही उत्सवाचा एक महत्त्वाचा पैलू बनतो. रंगछटा��च्या कॅलिडोस्कोपमध्ये, गणपती बाप्पाच्या आवडीचे दोन रंग वेगळे आहेत - जिवंत लाल आणि शुभ हिरवा.
श्रीमंत,उत्कट लाल रंगात गणेशाची गतिशील ऊर्जा आणि उपस्थिती दिसून येते. भक्त त्यांच्या जीवनात देवतेचे स्वागत करतात त्या उत्साहाचे आणि उत्साहाचे ते प्रतीक आहे. दोलायमान लाल रंग उत्सवाचे वातावरण तयार करतात, वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरतात कारण समुदाय प्रिय परमेश्वराची उपासना करण्यासाठी एकत्र येतात.
याउलट, निसर्गाची विपुलता आणि वाढ दर्शवणारा प्रसन्न हिरवा हा गणपती बाप्पाच्या पॅलेटमधील आणखी एक आवडता रंग आहे. हे नवीन सुरुवात, प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक आहे, भगवान गणेशाच्या दैवी गुणधर्मांशी पूर्णपणे संरेखित होते. हिरवीगार सजावट सभोवतालची शांतता आणि शुभतेची भावना आणते, आध्यात्मिक अनुभव वाढवते.
गणेश चतुर्थीच्या वेळी लाल आणि हिरव्या रंगाचे मिश्रण केवळ सौंदर्याच्या पलीकडे जाते; त्याचे गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की या अनुकूल रंगांमध्ये देवतेला वेषभूषा केल्याने त्यांच्या जीवनात दैवी आशीर्वाद, ऊर्जाआणि सौभाग्य आमंत्रित होते. दोलायमान स्पेक्ट्रम दैवी उपस्थितीचे दृश्यमान बनते, जे भगवान गणेशाशी संबंधित बहुआयामी सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंबित करते.
जसजशीगणेश चतुर्थी जवळ येते तसतसे, भक्त सजावट, कपडे आणि उपकरणे यासाठी लाल आणि हिरवा रंग काळजीपूर्वक निवडतात, ज्यामुळे उत्सवाच्या भावनेला अनुसरून रंगांचे सुसंवादी मिश्रण तयार होते. चैतन्यमय वातावरण जीवन आणि अध्यात्माच्या आनंददायी उत्सवाचे प्रतिबिंब आहे, उपासकांमधील एकता वाढवते.
"रंगीबेरंगी आशीर्वाद: गणपती बाप्पाच्या आवडत्या रंगांचे अनावरण" हे शीर्षक या आनंदोत्सवाचे सार समाविष्‍ट करते. निवडलेले रंग केवळ मूर्तींना शोभत नाहीत तर भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा कॅनव्हासही रंगवतात. दैवीहत्तीच्या डोक्याचा भगवान त्याच्या उपस्थितीने घरांवर कृपा करतो म्हणून, दोलायमान लाल आणि शुभ हिरवे केवळ रंगांपेक्षा अधिक बनतात - ते आशीर्वादाचे पात्र बनतात आणि जगभरातील भक्तांच्या हृदयात गणपती बाप्पाचा आत्मा वाहून नेतात.
अधिक माहितीसाठी:-
गणपती बाप्पाचा आवडता रंग
अभ्युदय बँक बातम्या मराठीत
1 note · View note
marathinewslive · 2 years ago
Text
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
भाजप मिशन बारामतीच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांची शरद पवारांची भेट
हृषिकेश देशपांडे गेल्या आठ ते दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी ठरताना दिसतो. गावपातळीपर्यंत पक्षबांधणी, त्याला समविचारी संघटनांची जोड तसेच कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार अशी अनेक कारणे यामागे आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूक २०२४च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
अमित शहांच्या टीकेवर किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes