#सुप्रिया सुळे
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 21 days ago
Text
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण , पोलिसांना बोलण्याचा अधिकार आहे मारण्याचा नव्हे
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण , पोलिसांना बोलण्याचा अधिकार आहे मारण्याचा नव्हे
परभणी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ही हत्या आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणीत केलेला आहे.  सुप्रियाताई सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी देखील भेट दिली आणि आंदोलकांशी देखील संवाद साधला.  सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत • नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी • राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या ४३ बांगलादेशी लोकांना डिसेंबर महिन्यात अटक • शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी सहा जानेवारीपर्यंत करत��� येणार • शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ आणि • छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं काल सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातली विविध पर्यटन स्थळं गर्दीनं फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानं यासाठी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तसंच राज्यपालांनी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देतांना, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील करण्यासाठी 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नव्या वर्षात दुप्पट नव्हे, तिप्पट जोमाने राज्यातल्या जनतेच्या सुखसमृध्दीसाठी काम करण्याची ग्वाही दिली.
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन लाईन चौपाटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देशाच्या विविध भागातून नागरिक हा नजारा पाहण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नाशिक शहरात काल सायंकाळी स्वामी मेळा मित्र मंडळाच्या वतीने पंचवटीतील रामकुंड इथं सहस्रदीप प्रज्वलित करण्यात आले. याशिवाय विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपान करू नये हा संदेश देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दूध वाटप करण्यात आलं, तसंच नशाबंदी मंचच्या वतीने व्यसनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र उत्साह दिसून आला. मध्यरात्री बारा वाजता तरुणाईनं जल्लोष करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. या निमित्त आतिषबाजीही करण्यात आली. ** बीड इथं काल सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या नेतृत्वात बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. जालना इथं नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं कालपासून कोरेगाव भीमा इथं दाखल झाले आहेत. ��ुणे पोलिसांकडून याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी कळवलं आहे… ‘‘काल पुण्यात सीआयडी समोर शरण आलेले वाल्मिक कराड यांना सीआयडी ने जुजबी चौकशीनंतर पुण्यातून केज इथं आणलं. आणि उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, कराड यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.’’ रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी - बीड
दरम्यान, सीआयडीसमोर हजर होण्यापूर्वी कराड यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून, पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले.. “या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.’’ ** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. ते क��ल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याच्या विरूद्ध पुरावा असेल त्याच्या विरोधात कडक क��रवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘काय वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधावर कुणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या संदर्भात पोलीस वेळोवेळी निर्णय करतील, पोलीस ब्रिफींग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही.’’
दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरातल्या सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज उद्यापर्यंत बंद राहणार आहे. या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीकरता, सरपंच संघटनेनं राज्यभरात कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या ४३ बांगलादेशी लोकांना डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक-एटीएसने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडसह अकोला, नाशिक आणि मुंबईत विक्रोळी भागात शोधमोहीम राबवून, ही कारवाई केली. यापैकी नऊ लोक गेल्या चार दिवसांत पकडल्याचं एटीएसच्या पत्रकात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला अधिक गती देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भातला अहवाल १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करावा, तसंच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी, विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही माहिती दिली. नोंदणीची ही मुदत काल संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची महितीही रावल यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू आहेत.
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवा��ी सुरुवात होईल. ११ जानेवारीला शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्र�� काढण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरण योजनेला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती, गुंठेवारी वसाहतीमधल्या मिळकत धारकांनी आपले नियमितीकरणाचे प्रस्ताव विहित मुदतीत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावे, नियमितीकरण न केलेल्या मालमत्तांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. यासाठी नोंदणीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.
छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच ३२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली. या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं, मिनियार यांनी सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘छत्रपतीसंभाजीनगरमध्ये ३२ इलेक्ट्रीक बसेस, प्लस प्रधानमंत्री योजनेच्या आपल्याकडे आणखी १०० सिटी बस येणार आहेत. परंतू या बसेस येण्यापुर्वी आपल्याला त्याची जी पुर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पाँईट असणे अपेक्षीत आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि जाधववाडी या ठिकाणी जो आता सिटीबसचा डेपो बनतोय त्याठिकाणी ते होणार आहे.आणि त्यामाध्यमातून आपल्याकडे बसेस येतील आणि त्यानुसार आपले रुट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील.’’
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हा मेळावा होणार आहे.
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pune : शिक्षणात मातृभाषेविषयी प्रेम, अस्मिता, आस्था आणि राज्य व देशाविषयीचा इतिहास असावा - सुप्रिया सुळे
Pune : शिक्षणात मातृभाषेविषयी प्रेम, अस्मिता, आस्था आणि राज्य व देशाविषयीचा इतिहास असावा – सुप्रिया सुळे – MPC…
0 notes
automaticthinghoagiezine · 7 months ago
Video
youtube
अजित दादा बदलले सुप्रिया सुळे यांचा खुलासा..
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
भुजबळ-जरांगे यांची जुंपली, सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे
https://bharatlive.news/?p=184456 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया ...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शरद पवारांना धमकी | शरद पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार : सुप्रिया सुळे
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री; आता सुप्रिया सुळे यांचे बॅनर!
Tumblr media
मुंबई : भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर हे पद कोणाला मिळणार याची आतापासूनची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वड���ल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित पवार यांचं बॅनर लागलं होतं. ज्यात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा… अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता. तर त्याआधी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर त्यांचाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"...तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल" अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
“…तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल” अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल,  सुप्रियाताई म्हणाल्या की ?
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल,  सुप्रियाताई म्हणाल्या की ?
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यादेखील तसेच खासदार निलेश लंके हे देखील यावेळी उपस्थित होते. खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना , ‘ पारनेरच्या बाजारतळावर आता ऐतिहासिक सभा होत आहे. माझ्या माता भगिनींनी मला दिल्लीत पाठवले आहे तर राणी लंके यांना देखील सर्वाधिक मताधिक्याने विधानसभेत पाठवल्याशिवाय…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 December 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ३१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. • मस्साजोग हत्या प्रकरणी आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण. • शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय. • शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ. आणि • सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत विकासकांना येणाऱ्या अडचणी नियमित बैठका घेऊन सोडवाव्यात तसंच यासंदर्भातील अहवाल १५ दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारी पूर्वक लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तत्पुर्वी त्यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे.
वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे. सरकारने आता यापुढचं काम करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना आव्हाड यांनी, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले.. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याच्या विरूद्ध पुरावा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…… काय वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधावर कुणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या संदर्भात पोलीस वेळोवेळी निर्णय करतील, पोलीस ब्रिफींग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज पुढचे दोन दिवस बंद राहणार आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीसाठी सरपंच संघटनेनं राज्यभरात आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला शेतकरी आणि शास्त्रज्ञ असा सुसंवाद कार्यक्रम घेण्यात येतो. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र -२ च्या वतीने गेल्या १०५ महिन्यांपासून हा उपक्रम निशुल्क रित्या राबवला जात आहे. उद्या सकाळी साडे अकरा वाजता, कृषी विज्ञान केंद्रात १०६ व्या सुसंवाद कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन केंद्राच्या विस्तार शिक्षण विभागाचे विषय विषयतज्ञ डॉ बसवराज पिसुरे यांनी केलं आहे. सद्यस्थितीमधील पशुधन व्यवस्थापन, मोसंबी बहार व्यवस्थापन, आंबा मोहोर व्यवस्थापन,नैसर्गिक शेती व के वि के चे विविध उपक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपल्या शेतीसाठी लाभ करून घ्यावा.
राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावल बोलत होते. नोंदणीची ही मुदत आज संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू आहेत.
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जानेवारीला शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा काढण्यात येणार आहे.
आज ३१ डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहेत. न्यूझीलंड इथं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोष आणि उत्साहात करण्यात आलं. याठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा शब्दात राज्यपालांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. अहिल्या नगर जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळांवर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांच्या स्वागतासाठी कापडी तंबू उभारण्यात आले आहेत. यासह घाटघर रतनवाडी व्हॅली इथं नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.
बीड इथं आज ��रत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थित होत्या. व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच ३२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली. या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं, मिनियार यांनी सांगितलं. ते म्हणाले.. छत्रपतीसंभाजीनगरमध्ये ३२ इलेक्ट्रीक बसेस, प्लस प्रधानमंत्री योजनेच्या आपल्याकडे आणखी १०० सिटी बस येणार आहेत. परंतू या बसेस येण्यापुर्वी आपल्याला त्याची जी पुर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पाँईट असणे अपेक्षीत आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि जाधववाडी या ठिकाणी जो आता सिटीबसचा डेपो बनतोय त्याठिकाणी ते होणार आहे.आणि त्यामाध्यमातून आपल्याकडे बसेस येतील आणि त्यानुसार आपले रुट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. यासाठी नोंदणीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. ही मुदत आज संपणार होती.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी संबधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.
दक्षिण मध्य रेल्वेनं उद्यापासून रेल्वेच्या वेळापत्रकात काही गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. बदललेल्या वेळापत्रकाची प्रत मोठ्या स्थानकांवर लावण्यात आली असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: 'ओ भोगी, योगींकडून काही तरी शिका', अमृता फडणवीस यांनी घेतली ठाकरे सरकारची खरडपट्टी, मग जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर
महाराष्ट्र: ‘ओ भोगी, योगींकडून काही तरी शिका’, अमृता फडणवीस यांनी घेतली ठाकरे सरकारची खरडपट्टी, मग जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर
शरद पवार यांची कन्या अमृता फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आज (29 एप्रिल, शुक्रवार) खासदार सुप्रिया सुळे (NCP) यांनी अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला आपली प्रतिक्रिया दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे (राज ठाकरेमशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
मतदानाच्या दिवशी पैसे वाटले सुप्रिया सुळे..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
"आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
https://bharatlive.news/?p=179918 "आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", काय म्हणाल्या सुप्रिया ...
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? सुप्रिया सुळे यांचा सवाल
संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? सुप्रिया सुळे यांचा सवाल
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याची आशाही मावळली आहे. त्यानंतर त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत, केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes