नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेड : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठमंगळवारी पहाटे दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. आठ ते दहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याचे सांगण्यात येत आहे. देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. आयोजनाबद्दल वायूसेनेचं कौतुक करत, राजनाथसिंह यांनी वायूसेनेने सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं नमूद केलं. परवा १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खाजगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, स्फोटकं, आणि हत्यारं जप्त करत, घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. सैन्यदल तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये राबवलेल्या या संयुक्त कारवाईत एके ४७ ची तसंच इतर काडतुसं, हातगोळे, आईईडी, आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचं, संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या रविवारी १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे उपराष्ट्रपती या संविधान मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.
****
तीन दिवसीय महालक्ष्मी उत्सवाचा आज समारोप होत आहे. काल पूजन झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आज सायंकाळी विसर्जन होईल, यानिमित्तानं घरोघरी महिला वर्गाकडून विविध पारंपरिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि प���राष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत काल श्री गणेशाची आरती झाली. या परदेशी पाहुण्यांना उकडीच्या मोदकांसह खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी देण्यात आली.
****
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात ‘आपदा मित्र’ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातून ३०० आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक युवतींनी संबंधित यंत्रणेच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केलं आहे.
****
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र तसंच पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
४५व्या फिडे शतरंज ओलिंपियाड स्पर्धेत भारतानं मोरोक्को चा ४-० असा पराभव केला तर महिलाच्या गटात जमैका वर साडे तीन गुणांनी विजय मिळवला. भारताच्या आर. प्रज्ञानानंद ने मोरक्कोच्या तिसिर मोहम्मद ला पराभूत केलं तर विदित गुजराती ने औआखिर मेहदी पियरे ला तसंच हरिकृष्णा ने मोयाद अनस चा पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत भाताच्या वैशालीने अदानी क्लार्क ला हरवत अव्वल स्थान पटकावलं, तानिया सचदेव ने गैब्रिएला वॉटसन चा तर दिव्या देशमुख ने राचेल मिलर चा पराभव केला. बुडापेस्ट इथे १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १ हजार ८०० हून अधिक खेळाडू सहभागी आहेत, यात १९३ संघ खुल्या प्रवर्गात खेळत आहेत.
****
0 notes
Pune: पुण्यातील इंदापूरजवळ एका बसचे दोन्ही टायर फुटल्याने भीषण अपघात ;सुदैवाने जीवितहानी नाही
एमपीसीन्यूज – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून (Pune)दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवाशी बसला अपघात झाला आहे.ही बस पुण्याच्या दिशेने निघाली असतांना इंदापूर पासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे.
टायर फुटल्याने या बसने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली…
0 notes
डीएमआयटी टेस्ट: आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांचे मूल यशस्वी आणि आनंदी जीवन जगावे. मुलाच्या यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि दिशा आवश्यक आहे, परंतु अनेक वेळा हे समजणे कठीण होते की कोणत्या दिशेने मुलाला पुढे नेले पाहिजे. याच संदर्भात, डीएमआयटी (Dermatoglyphics Multiple Intelligence Test) हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपाय आहे, जो मुलाच्या नैसर्गिक क्षमता आणि बुद्धिमत्तेचा शोध…
0 notes
31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ
श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.
एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.
आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.
रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.
लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.
0 notes
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू…
अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती…
नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात...
Horrific accident on Samriddhi highway, seven people died on the spot in the unfortunate incident…
जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला…
View On WordPress
0 notes
उत्तर पूर्व ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील विजयाच्या दिशेने..
0 notes
मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात!
नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले
प्रभाकर आवारी,मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्ग वर आज दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 तसेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/100-new-skill-development-centers-will-be-established-in-maharashtra/
0 notes
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्थनग्न पायी मोर्चा काढला आहे. मंगळवारी सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.****
नागरी उड्डयनाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात पंतप्रधान संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०३५ पर्यंत प्रतिवर्ष ३ अब्ज प्रवाशांना विमान प्रवासात सामावून घेण्यासाठी आशिया प्रशांत उड्डयन क्षेत्राच्या प्रारुप आराखड्यात धोरणात्मक गुंतवणुकीचं आवाहन केलं आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रात महिलांचा समावेश २५ टक्क्यांनी वाढवणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे.
****
तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ होत आहे. भारतासह अनेक देशांचा सहभाग असलेल्या या सर्वात मोठ्या युद्धाभ्यासाचं भारतीय वायुसेनेनं आयोजन केलं आहे. यासोबतच भारत रक्षा विमानन प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आजपासून परवा १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग असेल. सार्वजनिक क्षेत्रांचे संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खाजगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे.
****
धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. इयत्ता बारावी नंतर तंत्रशिक्षण तसंच व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविदयालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल, ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होईल, यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. इयत्ता बारावी मध्ये किमान ६० टक्के गुण असणारे धनगर समाजाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील आणि त्यांना जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
****
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळानं आजपासून अडीच हजार बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल, हे गृहीत धरून आजपासून येत्या २० तारखे दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन आरक्षण सुरू असून, गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं, रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितलं आहे.
****
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी ��िली आहे. लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र तसंच पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने बीड, नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा ' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राबवल्या जाणाऱ्या विविध दैनंदिन उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
आचार्य विनोबा भावे जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं 'दिशा स्वराज्याची' या माहितीपटाचं विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. एमजीएम परिसरातल्या चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृहात येत्या शनिवारी १४ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता हा माहितीपट दाखवला जाईल, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
****
0 notes
Pune : आंबेडकरी जनतेची राजकीय ताकद उभी करणे हेच ध्येय - रामदास आठवले
एमपीसी न्यूज : रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक न्यायाची बूज राखणारा पक्ष (Pune) आहे. आंबेडकरी जनतेला सामाजिक व राजकीय स्तरावर मजबूत करण्यासाठी आपण झटत आहोत. तसेच सत्तेत आंबेडकरी जनतेला चांगले प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न नेहमीच रिपब्लिकन पक्षाने केला आहे. त्यामुळे एक मजबूत राजकीय ताकद उभी करणे हे आपले ध्येय असून, त्या दिशेने आपण सातत्याने वाटचाल करीत राहणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय…
0 notes
मुंबईत भरधाव कारची सहा गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा दुर्दैवी मृत्यू, वरळी सी लिंकवरील घटना
मुंबई: मुंबईत गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. येथे एका भरधाव कारने टोल प्लाझा येथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण जखमी असल्याची माहिती आहे. कार वरळीहून वांद्र्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितले.डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले की, सी लिंकवर टोल प्लाझाच्या १००…
View On WordPress
0 notes
Happy Birthday in Marathi Font
HAPPY BIRTHDAY IN MARATHI FONT ARE SPECIAL OCCASIONS THAT ALLOW US TO CELEBRATE THE GIFT OF LIFE AND EXPRESS OUR LOVE AND APPRECIATION FOR OUR LOVED ONES.
1. आपल्या वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशी आपल्याला खूप शुभेच्छा! (Aplya vaḍhadivasācyā ānandācyā divaśī aplyālā khūp śubhecchā!)
2. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (Vaḍhadivasācyā khūp khūp śubhecchā!)
3. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (Aplyālā vaḍhadivasācyā hārdik śubhecchā!)
4. तुमच्या वाढदिवसाच्या आणि आपल्या आयुष्याच्या सफलतेच्या दिशेने नेहमीच चालत राहो! (Tumacyā vaḍhadivasācyā āṇi aplyā āyuṣyācyā saphalatecyā diśenē nehmic cālat rāhō!)
1 note
·
View note
मावळ श्रीरंग बारणे पिछाडीवर संजोग वाघेरे विजयाच्या दिशेने ?
0 notes