Tumgik
#मंत्रिमंडळाचा विस्तार
rebel-bulletin · 1 year
Text
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कुणाला संधी मिळण्याची शक्यता? मोठी बातमी समोर
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत, त्याप्रमाणं लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्टांची नाराजी दूर होणार
https://bharatlive.news/?p=161864 नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्टांची नाराजी दूर ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·      राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू
·      राज्य मंत्रिमंडळाचा याच महिन्यात विस्तार होण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत
·      औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
·      रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी; १२५ कोटी रुपये निधी जाहीर
·      कृषीदिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
·      जुलै महिन्यात सरासरीएवढा पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज  
·      भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या लाऊसान डायमंड लीगचं विजेतेपद
आणि
·      आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य
****
राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथं हा अपघात झाला. टायर निखळल्यानं धावती बस पलटली, आणि दुभाजकाला धडकू��� रस्त्यावर घासत गेल्यानं तिने पेट घेतला, त्यात २८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, आमच्या बुलडाण्याच्या वार्ताहरानं दिली आहे. बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघात स्थळी धाव घेत, मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातातल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
****
अहमदनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण शिवारात टेम्पोला क्रूझर जीपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. यात मंठा तालुक्यातल्या पांगरी गोसावी गावचे संतोष आणि वर्षा राठोड यांच्यासह त्यांच्या १८ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर कुंथलगिरीजवळ दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातल्या कुबेर गेवराई इथले विक्रम कुबेर आणि मुरुमखेडा इथले विठ्ठल दाभाडे हे दुचाकीवरुन पंढरपुरला जात असताना, त्यांना अज्ञात वहानाने धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अक्कलकोट तालुक्यात अपघात होऊन सहा जण ठार तर सात जण जखमी झाले. भाविकांच्या जीपची मालववाहू ट्रकशी धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघातातल्या जखमींना अक्‍कलकोट इथल्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात वणी - सापुतारा मार्गावर मोटार कार आणि खासगी प्रवासी जीप यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघाता वणी इथल्या चौघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.
****
आपलं सरकार हे सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारं आहे,  गेल्या एका वर्षाच्या काळात शासनानं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सातारा जिल्ह्यात १२८ गावातल्या १२२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं ई - भूमीपूजन दूरदृष्य प्रणाली द्वारे काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातले अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,
राज्याचे अनेक प्रश्न असतात, त्यासंदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, अनेक वेळा त्यासंदर्भातल्या बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा आवडता प्रश्न आहे, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दल निर्णय घेतीलच, तर मला असा वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर अंतिम निर्णय घेतील, असं सांगून, मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख आणि अधिक माहिती सांगायला फडणवीस यांनी नकार दिला. आमदार संजय शिरसाठ यांनी मात्र, आठवडाभरात हा विस्तार होईल असा दावा केला आहे.
****
बी�� इथं शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मेटे यांच्या स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारणीचं मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद देण्याच्या मागणीचा, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल बीड इथं पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेची एक जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षानं योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, निवडणुकीत आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.
मेटे यांच्या जयंतीनिमित्त आठवले यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं, मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाची गरज असून त्यास आपला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं, एक हजार कोटी रुपये खर्चाच्या गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या हस्ते झालं, या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना नि:शुल्क दिल्यामुळेच, आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं ते म्हणाले. मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची असल्यानं, शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’, या विषयावर काल झालेल्या रासायनिक परिषदेत ते बोलत होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्यानं उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत, असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.
****
शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आजपासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा ��हागड्या दरात बियाणांची विक्री होईल, त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.
****
केंद्र शासनानं गरीबांना न्याय दिला असल्याचं रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केल्यानिमित्तानं ते काल नाशिक इथं बोलत होते. २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने गरीबांचं सरकार आलं, कोविड काळात हे खऱ्या अर्थाने जाणवल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारने लोकांसाठी राबवलेल्या योजनांचा दानवे यांनी आढावा घेतला. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य भाजपाचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोढा यांनी यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पाच जुलै रोजी गडचिरोलीतल्या गोंडवना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरला भेट देणार असून, सहा जुलै रोजी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
****
शिक्षण ही केवळ शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते. इतकी वर्षं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं असून, केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
****
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल, आज त्यांची जयंती राज्यात आज कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे आज कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या कार्यक्रमात, शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं वाटपही करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
****
जून महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत दहा टक्के कमी पाऊस झाला. जूनमध्ये राज्यात सरासरी १६३ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदाच्या वर्षी केवळ १४८ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ६९ टक्के कमी पाऊस झाला. तर विदर्भ आणि उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सुमारे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस झाला. कोकणात सरासरी पेक्षा २८ टक्के कमी पाऊस पडला.
जुलै महिन्यात सरासरीच्या आसपास पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये झालेली लाऊसान डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. थोड्या वेळापूर्वीच झालेल्या या स्पर्धेत त्यानं ८७ पूर्णांक ६६ मीटर अंतरावर भाला फेकत ही कामगिरी केली. या स्पर्धेत जर्मनीचा भालाफेकपटू दुसऱ्या तर झेक प्रजासत्ताकचा भालाफेकपटू तिसऱ्या स्थानावर राहीला.
यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये देखील नीरजनं विजय मिळवला होता.
****
आशियायी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं भारतानं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत भारतानं इराणच्या संघाचा ४२ - ७२ पराभव करत हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.
****
चीनमधल्या हांगझाउ इथं आशियाई स्क्वॅश मिश्र दुहेरी स्पर्धेत काल भारताला दोन पदकं मिळाली. दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू या भारतीय जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या तिसऱ्या मानांकित जोडीनं दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या जोडीचा दोन - शून्य असा पराभव केला. तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या भारतीय जोडीनं कांस्य पदकाची कमाई केली. सप्टेंबरमधे याच ठिकाणी होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीची ही चाचणी स्पर्धा होती.
****
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता अंगी बाणवावी, असं प्रतिपादन, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयात, ‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा ‘पत्रकारिता’ एक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी केलं.
****
संत वाङ्गमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र, साहित्य अकादमीकडून,''भारतीय साहित्याचे निर्माते'', या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात असल्यानं, आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
****
मराठवाड्यातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेत पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालवण्याचा निर्णय, दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. यानुसार ही विशेष गाडी परवा तीन जुलैपासून दर सोमवारी सकाळी पूर्णा स्थानकावरून निघून, मंगळवारी सकाळी पावणे अकराला तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी येत्या चार जुलैपासून दर मंगळवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी तिरुपतीहून निघेल, आणि बुधवारी दुपारी अडीच वाजता पूर्णेला पोहचेल, दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत युरिया खताचा अतिवापर टाळून पर्यायी नॅनो युरिया खताचा वापर करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य!
Tumblr media
मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडलेला नाही. यावर आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने (Goverment) दाखवून दिलं, असं बच्चू कडू म्हणालेत. सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केलीये. दरम्यान, शिंदे सरकार आल्यानंतर बच्चू कडू पुन्हा मंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार पार पडला नाही. यावरून बच्चू कडूंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ११ महत्त्वाचे निर्णय १) धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा, अतिरिक्त सवलतीही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासोबतच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही घोषणा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. या कॅबिनेट विस्तार त्यानंतर लगेचच गणेशोत्सव होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? या नेत्याने सांगितली तारीख
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Expansion of the State Cabinet ऑगस्टमध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
https://bharatlive.news/?p=115088&wpwautoposter=1691035495 Expansion of the State Cabinet ऑगस्टमध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्य ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान
मुंबई आणि पुण्यासह देशभरातल्या सात शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटी रूपयांचे प्रकल्प उभाण्याची केंद्रीय गृह मंत्र्यांची घोषणा
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदतीसाठी, दीड हजार कोटी रुपये निधीला, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीत पाचपट वाढ तसंच लातूर इथं पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तेलाच्या टँकरला आग लागून चार जणांचा मृत्यू
आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी तीन कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर
****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. देशभरातल्या त्रेचाळीस ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यांमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून, भारताला पुढच्या काळात विकसित राष्ट्र बनवण्याचा उद्देश असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. मातृभाषेतल्या भरती परीक्षांचा देशातल्या तरुणांना मोठा फायदा होत असल्याचं, तसंच मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी लोकांना मदत झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
मुंबई आणि पुण्यासह सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातल्या सात शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जातील, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली आहे. काल नवी दिल्लीत आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता हे यावेळी उपस्थित होते. यामध्ये मुंबई आणि पुण्यासह चेन्नई, कोलकाता बेंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती शहा यांनी दिली.
देशभरातल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी शहा यांनी एकूण आठ हजार कोटींहून अधिक मूल्याच्या तीन योजना जाहीर केल्या. यामध्ये राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पाच हजार कोटींचे प्रकल्प उभारणं, पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणं, तसंच भूस्खलन शमन करण्यासाठी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८२५ कोटी रूपयांची, राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन, या प्रकल्पांचा समावेश आहे.
यासह साडे तीनशे अतिजोखमी आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये, सुमारे एक लाख युवा आपदा मित्र -स्वयंसेवक तयार करण्याचं लक्ष्य निश्चित केल्‍याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आठ हजाराच्या वर आपदा मित्र आहेत.
****
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदत करण्यासाठी, एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात सुधारणा करत, तो आता केंद्र सरकारच्या भत्त्याएवढा करण्याचा निर्णयही, काल घेण्यात आला. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांच्या शिष्यवृत्तीत सरकारनं काल पाचपट वाढ केली.
लातूर इथं पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे इथं चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करणं, अतिरिक्त आणि जलदगती न्यायालयांना मुदतवाढ देणं, मानसिक आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तींकरता पुनर्वसन गृहं योजना, स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ, चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करणं, आदी निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यात काही ठिकाणी निदर्शनाला आलेल्या बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत आपापल्या जिल्ह्यांत पथकं तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकावेत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना यावेळी दिले. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकत आहेत की नाही, ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
चढ्या भावानं बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यात नव्यानं कायदा आणण्यात येणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं चढ्या भावानं बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांचं स्टिंग ऑपरेशन माध्यमांच्या प्रतिनिधींनी काल केलं, यासंदर्भात प्रतिक्रीया देतांना सत्तार बोलत होते. कपाशीच्या बियाणांची विक्री किंमत आठशे ५३ रुपये सरकारनं निश्चित केली असतांना, संबंधित विक्रेता साडेबाराशे रुपयांना हे बियाणं विकत असल्याचं समोर आलं आहे. वाढीव दराने बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा - नीट चा निकाल जाहीर झाला आहे. तमिळनाडू इथला प्रबंधन जे तसंच आंध्रप्रदेशातला वरूण चक्रवर्ती या दोघांनी ९९ पूर्णांक ९९ शतांश टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत उत्तरप्रदेशातले सर्वाधिक उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्या खालोखाल महाराष्ट्र आणि राजस्थानातले उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
****
गडचिरोली शहरातल्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत १८ वर्षांखालच्या २१ बाल कामगारांना मुक्त करण्यात आलं. जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, स्पर्श संस्थेचा कैलास सत्यार्थी चिल्र्ड्रेन फांउडेशन एक्सेस टु जस्टीस प्रकल्प, चॉईल्ड लाईन आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
आदिवासी विभागातल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करता बाह्यस्रोताद्वारे ही सेवा घेण्याचा शासनानं घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरातल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काल नाशिक इथून मंत्रालयाकडे जाण्याच्या लाँग मार्चची सुरुवात केली. आदिवासी विकास विभाग वर्ग तीन आणि चार रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च सुरु करण्यात आला आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्याबाबत तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेतली. बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुरुवारी संध्याकाळी गुजरातमध्ये सौराष्ट्र -कच्छ किनारा या भागात धडकेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याचे महानिदेशक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता मोहपात्रा यांनी वर्तवली आहे. दरम्यान, या वादळामुळे उद्भवू शकणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत, या भागातल्या पंधरा हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण चौतीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
****
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात काल तेलाचा टँकर उलटून त्यानं जागीच पेट घेतला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हा टँकर कठड्याला धडकून उलटला, त्यानंतर या टँकरमध्ये असलेल्या ऑईलनं लगेच पेट घेतला. त्यावेळी पुलाच्या खाली असलेल्या प्रवाशांवर आगीचा गोळा पडला, त्यामुळे दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुलाखालच्या दोन- तीन गाड्यांना देखील आग लागून नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी तीन कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला. तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही, अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती न झाल्यानं, कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडता येत नव्हतं. कालवा दुरुस्तीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिचारिकांनी वेतनवाढीसाठी काल आंदोलन केलं. राज्यभर महाराष्ट्र शासकीय परिचारिका महासंघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांनी दिली. आमचा प्रश्न न सोडवल्यास राज्यभर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी लातूर इथं आज ‘जागेवर निवड संधी’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात उमेदवारांना थेट मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी, महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी उद्या आवश्यक त्या कागदपत्रांसह लातूर जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी जिल्हा प्रशासन वेरूळ महोत्सवासह विविध उपक्रम राबवत असून, येत्या सप्टेंबर महिन्यात औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या जागतिक पर्यटन परिषदेत एक हजार टूर ऑपरेटरचा सहभाग राहणार असण्याची अपेक्षा आहे.
****
0 notes
marathibatmi11 · 2 years
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महाराष्ट्र मंत्रिमंडळ: संजय राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपने आत्महत्येचे प्रकरण उद्धृत केल्याने वाद निर्माण झाला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ: संजय राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपने आत्महत्येचे प्रकरण उद्धृत केल्याने वाद निर्माण झाला.
यवतमाळमधील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्यावर पुण्यातील महिलेच्या आत्महत्येचा आरोप आहे. मुंबई : संजय राठोड – एकेकाळी टिकटोक स्टारच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले बंडखोर सेनेचे आमदार – महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाजपसोबतच्या युतीमध्ये प्रथमच सार्वजनिक मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रिगर हे भाजपच्या राज्य युनिटच्या उपाध्यक्षा चित्रा…
Tumblr media
View On WordPress
0 notes