अहंकाराचा फुगा फुटला , विरोधी पक्षनेत्यांची नावे घेऊन मते मागायची मोदींवर वेळ
देशात आगामी काळात 2024 लोकसभा निवडणूक आणि त्याआधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये जर पराभव झाला तर 2024 ची लोकसभा निवडणुक भाजपला लढवणे अत्यंत अवघड होणार आहे सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे काहीही करून विधानसभा निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने आता भाजपच्या निवडणूक यंत्रणेकडून…
View On WordPress
0 notes
Palamu:अवैध संबंध में पति ने की पत्नी की साड़ी से गला दबाकर हत्या, गिरफ्तार
Palamu: सतरबवा थाना क्षेत्र के सलैया गांव में अवैध संबंध के शक में पति ने पत्नी की गला दबाकर हत्या कर दी। पुलिस ने आरोपित पति को घटना के कुछ घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया है। पति की निशानदेही पर महिला का शव सलैया गांव से एक किलोमीटर दूर औरंगा नदी किनारे से बरामद किया है। मृतका की पहचान फुगा देवी (24) पति विजय परहिया के रुप में की गई है। पुलिस ने शव को पोस्टमार्टम एमआरएमसीएच मेदिनीनगर में…
View On WordPress
0 notes
चेतासंस्थेची शल्यकथा : चैतन्यानुभूती..
चेतासंस्थेची शल्यकथा : चैतन्यानुभूती..
चेतासंस्थेची शल्यकथा : चैतन्यानुभूती..
तिच्या डोक्याच्या सी टी स्कॅनमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीला मोठय़ा आकाराचा फुगा असल्याचं लक्षात आलं
डॉ. जयदेव पंचवाघ
रक्त थंड, मेंदूचं कार्य आणि हृदयही बंद.. अशा अवस्थेतसुद्धा पाम रेनॉल्ड्स यांची ‘जाणीव’ शाबूत कशी काय राहिली?
‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या परमहंस योगानंद यांच्या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी त्यांचे गुरू श्री…
View On WordPress
0 notes
लहान मुलासारखा फुग्यांसोबत खेळताना दिसला डॉगी, व्हायरल व्हिडिओ तुमचे मन जिंकेल
लहान मुलासारखा फुग्यांसोबत खेळताना दिसला डॉगी, व्हायरल व्हिडिओ तुमचे मन जिंकेल
फुगा ही अशी वस्तू आहे की लहान मुले आणि प्राणी देखील ते पाहून खूप आनंदी होतात. त्यामुळे श्वानप्रेमींना अनेकदा फुग्यांसोबत पोट धरून खेळायला आवडते आणि कुत्र्यांनाही फुग्यांसोबत खूप मजा येते.
कुत्र्याचा मजेदार व्हिडिओ
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही खूप मजा येते. पाहिलं तर ग��मतीच्या बाबतीत माणूस आणि प्राणी यांच्यात फारसा फरक नाही. त्याची कृती, खोडसाळपणा, मस्ती हे सगळे…
View On WordPress
0 notes
कुस्ती स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी सुत्तुर मठाचे महंत श्री शिवरात्री देशिकेंद्र स्वामी आणि आमदार मेरिथिंब्बे गौडा हे नायट्रोजन फुगा फुटल्याने झालेल्या दुर्घटना स्थळी असल्याने महंत आणि आमदार सोबत ४ लोकांना दुखापत झाली. . . . #Wresting #Competition #Inauguration #Suttur #Mutt #Mahant #Shivratri #Deshikendra #Swami #MLC #mysuru #MerrythombbeGouda #4People #Nitrogen #Baloon #Blast #Fire #Attact #Injured #Accidental #News #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BtiYZyeB7Rg/?utm_source=ig_tumblr_share&igshid=xx8u62djsq4o
1 note
·
View note
सूर्यनमस्कार का घालायचे?
आपल्याला शाळेत आठवी, नववी मध्ये शरीर शास्त्रात शिकवले आहे की, आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे.
आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा Volume किती? हे कसे? विचार चालेना!
एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.
सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.
दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी १० ते १२ सूर्यनमस्कार घातले, तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेलच.
सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते.दररोज १२ ते १५ सूर्यनमस्कार घालायला १० ते १५ मिनीटे लागतात. सुर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो.
*सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ*
१. ॐ मित्राय नमः : ‘सूर्यावर आमचे, निसर्गाचे, पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे. काळाची परिवर्तने तो घडवून जीवन देतो म्हणून मित्र.
२. ॐ रवये नमः : रवि म्हणजे श्रेष्ठ. सर्व तेजांत सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून रवि.
३. ॐ सूर्याय नमः : सूर्य म्हणजे प्रगती, पराक्रम.
४. ॐ भानवे नमः : वैभव देतो आणि वैभव राखतो तो भानू.
५. ॐ खगाय नमः : सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो, सावरतो, गती देऊन अंतरिक्षात फिरतो; म्हणून तो खग. या गतीमुळेच दिवस, रात्र, ऋतू, अयन, संवत्सर असे कालचक्र निर्माण होते; म्हणूनच तो खग.
६. ॐ पुष्णे नमः : पुष्टी देतो तो पूषन्. अन्न-वस्त्र समृद्धी देतो तो पुषन्.
७. ॐ हिरण्यगर्भाय नमः : विश्वगोलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो हिरण्यगर्भ. ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा तो हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचे सारसर्वस्व. तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ.
८. ॐ मरीचये नमः : किरणे विस्तारीतो तो मरीची. सूर्यकिरणे नाना वर्णांची, नाना गुणधर्मांची असतात. काही किरणे अन्नधान्य पिकवतात, काही जीवनसत्त्वे आणि जीवन देतात, काही रोगजंतू नष्ट करतात, तर काही जीवनाला ऊर्जा पुरवतात; म्हणून तो मरीची.
९. ॐ आदित्याय नमः : पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ, ते मूलत्व प्रकाशित करतो, तो आदित्य.
१०. ॐ सवित्रे नमः : चेतना जागवतो, प्रेरणा देतो आणि परमात्मज्ञान देतो, तो सवितृ. वेदातील सर्वश्रेष्ठ, गायत्रीमंत्राची देवता, तो सवितृ.
११. ॐ अर्काय नमः : वेदमंत्रांना ‘अर्क’ म्हणतात. वेदांना ॐ ची (ॐ मधूनच वाणी प्रकटली) प्रेरणा देतो, तो अर्क.
१२. ॐ भास्कराय नमः : प्रकाश, प्रज्ञा, प्रतिभा देतो, तो भास्कर.
0 notes
सरकारी नोकर भरती सुरू करा
सरकारी नोकर भरती सुरू करा
मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने २०२१ या नव्या वर्षात शासकीय सेवेत सध्या रिक्त असलेल्या एक लाखापेक्षा जास्त पदांसाठी सुधारित महापोर्टल तयार करून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने…
View On WordPress
0 notes
फुगा का फुटला याचे चिंतन करणार का?; शिवसेनेचा फडणवीसांना टोला फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेवर 'कॅग'नं ताशेरे ओढताच शिवसेनेनं भाजपला घेरलं आहे. शेवटी 'नाव मोठं लक्षण खोटं' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
0 notes
*व. पु. काळेंची भन्नाट २५ वाक्ये*
*१. गगनभरारीचं वेड*
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*२. झुंज*
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*३. कॅलेंडर*
भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.
*४. संघर्ष कुठपर्यंत?*
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
*५. पडावं तर असं!*
आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.
*६. परिपूर्णता?*
जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
*७. नको असलेला भाग*
दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
*८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ*
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
*९. समस्या*
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
*१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?*
प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
*११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान*
समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.
*१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'*
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.
*१३. पळू नका*
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.
*१४. पाठीची खाज*
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..
*१५. माफी*
माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.
*१५. खर्च-हिशोब*
खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.
*१६. गैरसमज*
गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.
*१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान*
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
*१८. अपेक्षा-ऐपत*
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.
*१९. अपयशाची भीती*
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.
*२०. खरी शोकांकिका:*
बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.
*२१. कौतुकाची खुमारी*
कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.
*२२. झरा आणि डबकं*
वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
*२२. कागद-सर्टिफिकेट*
सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.
*२३. रातकिड्याचा आवाज*
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.
*२४.फुगा किती फुगवायचा?*
एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.
*२५ हरवण्यासारखं घडवा*
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. **** लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार उद्या सायंकाळी थांबणार; तर तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांना शपथ आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारा संशयित मनोज अग्रवाल याला जालन्यात अटक हिंगोली तालुक्यात यात्रेतला फुगा हवेत उडून झालेल्या अपघातात एका बालकाचा मृत्यू आणि भावना दुखवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या उमेदवार, उर्मिला मातोंडकर तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल **** लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार उद्या मंगळवारी सायंकाळी थांबणार आहे. प्रचारासाठी अखेरचे दोनच दिवस शिल्लक असल्यानं, विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराचा वेग, आता शिगेला पोहचत आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात २० राज्यं आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, अंदमान - निकोबार, लक्ष्यद्वीप, तेलंगणा आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा - गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ - वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. **** निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, त्यानंतरच या तिसऱ्या टप्प्याचं चित्र स्पष्ट होईल. या तिसऱ्या टप्प्यात येत्या २३ एप्रिलला जळगाव, रावेर, अहमदनगर, पुणे, बारा��ती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदूर्ग, रायगड आणि मराठवाड्यातले औरंगाबाद आणि जालना या चौदा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. **** निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, मराठवाड्यातल्या सहा मतदार संघांसह राज्यातल्या एकूण दहा मतदार संघांमध्ये, पुढच्या आठवड्यात, अठरा एप्रिलला मतदान होणार आहे. या सर्व मतदार संघांमध्येही प्रचार सभा तसंच दिग्गज नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांना वेग आला आहे. **** उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात असलेल्या, लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं उद्या मंगळवारी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय रिपब्लीक�� पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रचार सभेला उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे. **** भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ परभणी, हिंगोली आणि अकोला मतदार संघात सभा घेतल्या. महायुतीचे परभणी इथले उमेदवार संजय जाधव, हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील, अकोल्याचे उमेदवार संजय धोत्रे यांच्यासाठी घेतलेल्या या सभांमध्ये मुंडे यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जाती - पातीचे राजकारण करत असल्याची, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातली आश्वासनं, पूर्ण न करता येणारी आणि देश विघातक असल्याची टीका केली. **** परभणी तसंच लातूर इथं, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनुक्रमे आलमगीर खान आणि राम गारकर यांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतल्या. देशातल्या सद्यस्थितीचं सर्वांनी आत्मपरिक्षण करून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं. **** परभणी लोकसभा मतदार संघात महायुतीचे संजय जाधव, काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यात मुख्य लढत होत आहे. या मतदार संघाबाबत अधिक माहिती देत आहेत, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये... शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव यांना शिवसेनेची गाव पातळीपर्यंतची शिवसैनिकांची साखळी आणि भारतीय जनता पक्षानं युती होण्यापूर्वी स्वतंत्र लढण्यासाठी केलेल्या तयारीचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मोठी प्रचार यंत्रणा उभारली असून दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. बहुजन वंचित आघाडीचे आलमगीर खान हे निवडणूक रिंगणात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर या निवडणुकीत त्यांना निवडून येण्याची आशा आहे. मागास वर्गीय - मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांची गोळाबेरीज जर त्यांच्या नावावर जमा झाली, तर त्यांना या मतदारसंघातून निवडून येनं अवघड नाही. मात्र या क्षणी त्यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे, हे खरे. रमेश जायभाये. **** यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राजीव सातव यांनी काल वाशिम शहरात अनेक ठिकाणी छोट्या सभा - बैठका घेतल्या. **** नागपूर जिल्ह्यात रामटेक लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे कृपाल तुमानेंच्या प्रचारासाठी काल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. भाजपा - शिवसेना आणि रिपाई हे पक्ष ‘राष्ट्रप्रेमा’च्या विचारधारेवर एकत्र आल्याचं त्यांनी नमूद केलं. **** औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा - शिवसेना महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खुलताबाद तालुक्यात खिर्डी इथं काल प्रचार सभा घेतली. **** महाराष्ट्र क्रांती सेनेनं शिवसेना - भाजप महायुतीला विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. काल मुंबईत महायुतीच्या बैठकीनंतर, महाराष्ट्र क्रांती सेनेचे नेते सुरेश पाटील यांनी, हा निर्णय जाहीर केला. या निवडणुकीत उभे राहिलेले संघटनेचे सर्व १५ उमेदवार आज माघार घेणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती नंद्राजोग नवी दिल्ली इथून बदली झाल्यानंतर मार्च २०१७ पासून राजस्थान उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. **** आयपीएल क्रिकेट सामन्यांवर चालत्या मोटारीतून सट्टा लावणारा संशयित मनोज अग्रवाल याला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल ताब्यात घेतलं. या कारवाईत पोलिसांनी पाच लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे, संशयिताकडून ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या अन्य चार जणांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** जालना जिल्ह्यातल्या, अंबड तालुक्यातल्या नांदी इथं अवैध धंद्यांविरुध्द कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावानं दगडफेक केली. उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्यासह एक कर्मचारी यात जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांचं एक पथक नांदी इथं पाठवण्यात आल्याची माहिती अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांनी दिली आहे. **** हिंगोली तालुक्यात काल यात्रेत लहान मुलांचा उड्या मारण्याचा फुगा हवेत उडून झालेल्या अपघातात एका बालकाचा मृत्यू झाला, तर अन्य चार बालकं जखमी झाली. कनेरगाव नाका इथल्या संगमेश्वर संस्थानात, भागवत सप्ताहानिमित्त भरलेल्या यात्रेत काल दुपारी हा अपघात घडला. **** बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात निवडणूक कामकाज प्रशिक्षणासाठी उभारलेला मंडप, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोडून पडला. काल दुपारी ही घटना घडली. या घटनेतल्या किरकोळ जखमींवर अंबाजोगाई इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. **** मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार, उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते सुरेश नखुआ यांनी केलेल्या तक्रारीवरुन पवई पोलिस स्थानकात हा गुन्हा नोंदवण्यात आला. **** हातकणंगले मतदारसंघातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका जाहीर सभेत शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल लेखी तक्रारीवरून, शेट्टी यांना नोटीस बजावत, २४ तासांत खुलासा करण्यास सांगितलं होतं, शेट्टी यांनी खुलासा न केल्यानं, हा गुन्हा नोंदवण्यात आला. **** स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हाध्यक्ष पदासह संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक अशोक चव्हाण यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देत असताना, आपल्या संघटनेनं मात्र काँग्रेस सोबत आघाडी केली. यामुळे, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जावू नये, म्हणून राजीनामा देत असल्याचं, इंगोले यांनी, संघटनेचे ��ध्यक्ष राजू शेट्टी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. **** उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात, भाजप – शिवसेना – आरपीआय – रासप - शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांच्या प्रचारार्थ काल कळंब इथं संयुक्त कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. **** बीड जिल्ह्यात गेवराई इथं काल निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट याबाबत मार्गदर्शन केलं. **** नांदेड इथं काल, मतदान जनगागृतीसाठी ‘एक पाऊल मतदानासाठी’ पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला. ***** ***
0 notes
होळी खेळायचा किळसवाणा प्रकार; वीर्याचे फुगे मुलीवर फेकले नवी दिल्ली : होळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थीनीवर वीर्याने भरलेला फुगा फेकून मारला आहे. २४ फेब्रुवारीला ही घटना घडली. सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही काही पहिली घटना नाही अशी पहिल्यांदाच नाही, असे प्रकार वारंवार होत असल्याचे काहींनी म्हटले आहे. एक मुलगी बस स्टोपवर त्यावेळी एका घोळका तिथे आला आणि तिच्यावर फुगा फेकला. या प्रकारविरोधात दिल्ली युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.
0 notes
D.Ed | गुरुजी व्हायचंच नाही की काय? औरंगाबादेत डीएड कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकेनात, जागा 2500 नि अर्ज आले 250!
D.Ed | गुरुजी व्हायचंच नाही की काय? औरंगाबादेत डीएड कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकेनात, जागा 2500 नि अर्ज आले 250!
D.Ed | गुरुजी व्हायचंच नाही की काय? औरंगाबादेत डीएड कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकेनात, जागा 2500 नि अर्ज आले 250!
D.Ed. admission: कधीकाळी गुरुजी होण्याचे कोण सूख होते. मास्तर होण्याची एक लाट संपूर्ण राज्यात आली होती. पण नोक-यांचा फुगा फुटला नी ही लाट ओसरली. आता डीएड कॉलेजकडे विद्यार्थीही फिरकत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात भरमसाठ पीक आलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना(D.Ed. Colleges)…
View On WordPress
0 notes
रस्त्याने जाणाऱ्या ऑटोवर मुलांनी फुगा मारला, मग असे काही घडले ऑटो अनेक मीटरपर्यंत ओढत राहिला... व्हिडिओ पहा
रस्त्याने जाणाऱ्या ऑटोवर मुलांनी फुगा मारला, मग असे काही घडले ऑटो अनेक मीटरपर्यंत ओढत राहिला… व्हिडिओ पहा
सध्या सोशल मीडियावर होळीचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
होळीचा धक्कादायक व्हिडिओ
प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मुलांची होळी (होळीचा व्हायरल व्हिडिओदिवस खूप मजेशीर असतात, रस्त्यांपासून ते गल्लीबोळात त्यांच्या मस्तीचे कारनामे पाहायला मिळतात. बर्याच वेळा मुलांची गंमत पाहणाऱ्यांना ती खूप गंमतीशीर वाटते, त्याच वेळी त्यांची…
View On WordPress
0 notes
*व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये*
*व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये* *१. गगनभरारीचं वेड* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. *२. झुंज* वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. *३. कॅलेंडर* भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर. *४. संघर्ष कुठपर्यंत?* आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते. *५. पडावं तर असं!* आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल. *६. परिपूर्णता?* जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की.. *७. नको असलेला भाग* दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. *८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ* पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ? *९. समस्या* अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं. *१०. प्रो��्लेम्स कुणाला नसतात?* प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो. *११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान* समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते. *१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'* जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात. *१३. पळू नका* प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच. *१४. पाठीची खाज* पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते.. *१५. माफी* माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे. *१५. खर्च-हिशोब* खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो. *१६. गैरसमज* गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो. *१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान* शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. *१८. अपेक्षा-ऐपत* घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते. *१९. अपयशाची भीती* माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते. *२०. खरी शोकांकिका:* बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण. *२१. कौतुकाची खुमारी* कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही. *२२. झरा आणि डबकं* वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस! *२२. कागद-सर्टिफिकेट* सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं. *२३. रातकिड्याचा आवाज* रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो. *२४.फुगा किती फुगवायचा?* एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता. *२५ हरवण्यासारखं घडवा* आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य! --------- अशा प्रकारचे किती तरी messages आपण रोज वाचतो. पण त्यातील 10/20 टक्के तरी आत्मसात करावयाचा प्रयत्न केला तर किती तरी चांगला परिणाम आपल्याच आयुष्यात दिसतील. प्रत्येकाने प्रयत्न करावा ही विनंती.
0 notes
जत्रा = फुगा = अानंद. #जत्रा #अानंद #प्रविणअस्वले #फुगा #मुलगी #लोकं #नाशिक #देवळाली #म्हसोबामहाराज #गुलाबी #महाराष्ट्र #fair #streetphotography #streetLight #India #pravinaswale #fair #pink (at Devlali, Nasik)
0 notes
५ महिन्यात ५ हजार लोकं कमी केलेत, स्टार्ट-अप्सचा फुगा देखील फुटण्याचा मार्गावर?
५ महिन्यात ५ हजार लोकं कमी केलेत, स्टार्ट-अप्सचा फुगा देखील फुटण्याचा मार्गावर?
५ महिन्यात ५ हजार लोकं कमी केलेत, स्टार्ट-अप्सचा फुगा देखील फुटण्याचा मार्गावर?
आपल्याकडे एक म्हण आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. भार��ाच्या अर्थव्यवस्थेत सध्या तसंच काहीतरी होत असल्याचं दिसत आहे. करोनानंतर जोमात निघालेल्या अर्थव्यस्थेच्या गाडीचा वेग कमी झाल्याची चिन्ह आहेत. त्यात अर्थव्यस्थेचा कणा असलेल्या आयटी क्षेत्रावर देखील मंदीचं वारं घोंगावू लागला आहे. अन् त्यात आता स्टार्टअप्सची…
View On WordPress
0 notes