#महिन्यात
Explore tagged Tumblr posts
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e3149e24e065a19b26adeb6629505b13/d714693e0abab8a8-fc/s540x810/bda23bc3e7c099ca3e5ebae5fb960c0d033c18ef.jpg)
21 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. ��ावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं साडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात देशभरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Text
खासदार निलेश लंके यांनी घेतली मनपा कार्यालयात आढावा बैठक , काय होते विषय ?
खासदार निलेश लंके यांनी महापालिका कार्यालयात आढावा बैठक घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केलेली आहे सोबतच शहरातील गॅस पाईपलाईनचे काम चार महिन्यात पूर्ण करण्याच्या देखील निलेश लंके यांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत . खासदार निलेश लंके यांनी शहरातील इतरही सफाई कामगार , नेहरू मार्केट , भाजी विक्रेते , गॅस पाईपलाईन , गाळेधारकांची…
0 notes
Text
Champions Trophy 2025 Indian Team: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाही�� झाला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला मोहीम सुरू करेल. टीम इंडियाला बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर टीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या पाकिस्तानशी होईल. हा शानदार सामना दुबईमध्येही खेळला जाईल. भारतीय संघ 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध गटातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल.
0 notes
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य हे खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
Text
Fraud Case in Pune : दामदुपटीला पोलीसही पडले बळी; गुन्हे दाखल होऊनही अविनाश राठोड सापडेना
Pune Scam News : 'बार्शीच्या विशाल फटे'ची आठवण करून देणारे पुण्यात राठोड प्रकरण
पुण्यात शेकडो लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपायांचा गंडा घातल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यात काही पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, दामदुप्पटीचे आमिष दाखवून पोलिसांनाही गंडा घालणारा बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक पत्नीसह फरार आहे.
या प्रकरणी बाणेर (Pune Crime) रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड आणि त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राठोडकडे गुंतवणूक करणाऱ्या सुमारे वीस पोलिसांसह शंभरहून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपी अविनाश राठोड (Avinash Rathod) याची एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी कंपनी पुण्यात २०११ पासून काम करीत आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना दर महिन्याला मूळ रक्कमेतील पाच टक्के व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. त्याने लोकांना काही प्रमाणात परतावेही दिले. त्यातून विश्वास संपादन झाल्याने गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या काळात जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन आता राठोड फरार झाला आहे. या फसवणुकीला काही पोलिसही बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Pune Police या गुंतवणूकदारांमध्ये डॉक्टर, अभियंते, पोलिसांसह अनेक श्रीमंत नागरिकांनी लाखो रुपायंची गुंतवणूक केली आहे. गेल्या ११ महिन्याने राठोडकडे सुमारे ७०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ती रक्कम घेऊन तो फरार झाला आहे.
दरम्यान, बंद कार्यालय पाहून गुंतवणूकदारंनी राठोड आणि त्याची पत्नीला वारंवार फोन केले. फोनला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
या प्रकरणी चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिसांसह अनेक नागारिकांनी तक्रारी दिल्या आहे. मात्र पोलिसांना आठवड्यापासून फारर राठोड व त्याच्या पत्नीचा शोध घेता आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 notes
Text
Weather Update : देशातील हिवाळी हवामानाचा अचूक अंदाज आणि पावसाच्या शक्यतेचा
Weather Update : हिवाळी हवामानाचा अनुभव यावर्षी वेगळा राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात देशातील बहुतांशी भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्रात उत्तरेकडील भाग वगळता इतर भागांमध्ये थंडीचा जोर तुलनेने कमी राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, गुजरात, आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंड लाटांच्या कालावधीचा अनुभव मात्र दीर्घकाळासाठी असेल.
0 notes
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे. १…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3063617a9f0c74b356cc9c8a5ca343df/33734721ee1f5947-ff/s540x810/f6ae891b7b0f15f1fa200af7367cf4d8665e0a73.jpg)
View On WordPress
0 notes
Text
आपल्या ई-कॉमर्स गेमला वाढवा Shiprocket Engage 360 सह! 🚀✨
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/872d8b8d74874f6cd0d7ae59130d6fe3/e92e7e628993290a-01/s540x810/2c9b9397ba521c2dde8b6490264d33c2a8850aa5.webp)
नमस्कार Tumblr कुटुंब! 👋
आपण एक ऑनलाइन विक्रेता आहात जो आपल्या ग्राहकांच्या सहभागाला पुढील स्तरावर नेऊ इच्छित आहे? भेटा Shiprocket Engage 360ला—आपल्या ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आपले अंतिम साधन!
🌟 Shiprocket Engage 360 का?
मल्टी-चॅनेलमॅजिक: ईमेल, एसएमएस, आणिपुशनोटिफिकेशन्स च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांशी सहजपणे पोहोचा.
स्वयंचलितअवेसमनेस: ऑर्डर अपडेट्स आणि वैयक्तिकृत संदेश सेट करा ज्यामुळे आपले ग्राहक लूपमध्ये राहतात, कोणत्याही मेहनतीशिवाय.
फीडबॅकफ्रेंडली: आपल्या उत्पादने आणि सेवा आणखी चांगली करण्यासाठी मौल्यवान फीडबॅक गोळा करा.
प्रोमोपॉवर: लक्षित प्रमोशनल कॅम्पेन लॉन्च करा ज्यामुळे विक्री वाढेल आणि वफादारी मजबूत होईल.
स्मार्टएनालिटिक्स: काय कार्यरत आहे आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी विस्तृत अंतर्दृष्टी मिळवा.
📈 आपल्यालाआवडतीलअसेफायदे:
+२५% ग्राहकवफादारी
+२०% विक्रीवाढ
-३०% ग्राहकसहाय्यचौकशी
+३५% ग्राहकसंतुष्टी
💸 परवडणाऱ्यायोजना:
स्टार्टर: फक्त ₹९९९/माह – लहान व्यवसायांसाठी परफेक्ट!
प्रोफेशनल: ₹२,४९९/माह – उन्नत वैशिष्ट्यांसह पॅक्ड.
एंटरप्राइज: कस्टम प्राइसिंग – आपल्यासाठी विशेषरीत्या तयार केलेले!
🎁 विशेषऑफर: आता साइन अप करा आणि आपल्या पहिल्या महिन्यात ५०% सूट मिळवा! याची चूक करू नका!
👉 www.shiprocket.in/engage360 येथे भेट द्या आणि आपल्या व्यवसायाला उड्डाण करा! 🚀
0 notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e3149e24e065a19b26adeb6629505b13/a0f0f17e40fc8751-3d/s540x810/1b7ac871476dd19b007e7c96d673c6536e4237a7.jpg)
17 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभषाणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरु राहणार आहे. दरम्यान, लोकसभेत काल या चर्चेत सहभाग घेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये सामाविष्ट केली गेली, असं सांगून त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे हे आरोप फेटाळून लावले.
राज्यात विशेष करून पुणे शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम - जी बी एस रुग्णांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात सल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. या आजारावर लागणारी औषधं राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं त्यांनी काल दूरस्थ माध्यमातून घेतलेल्या बैठकीत सांगितलं. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी नड्डा यांनी जीबीएस आजारासंबंधी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे १६३ संशयित ��ुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२७ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं त���ासातून निश्चित झालं आहे. हा आजार वाढण्याची कारणं शोधण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली. काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून, त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
गडचिरोलीत काल दोन नक्षली दाम्पत्यांनी, जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे शरणागती पत्करली. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एसीएम आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांवर सुमारे २८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. अशोक सडमेक आणि वनिता दोहे तसंच साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा अशी या नक्षली दांपत्त्यांची नावं आहेत. दरम्यान, गडचिरोलीत पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलिस ठाणं सुरू केलं आहे. मुख्यालयापासून २०० किलोमीटर अंतरावर नेलगुंदामध्ये दीड हजारापेक्षा जास्त पोलिसांनी ही कामगिरी केली. नक्षलवाद्यांचं प्रशिक्षण स्थळ तसंच दोन राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रात हा भाग आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.
दिव्यांग उमेदवारांना कुठल्याही विशिष्ट निकषाची पूर्तता न करता परीक्षेसाठी लेखनिक सुविधा द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. यापूर्वी केवळ ४० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांना लेखनिक वापरण्याची मुभा होती. एका उमेदवारानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं, लेखनिकांसाठी असलेला वैधता कालावधी वाढवण्याचे, तसंच येत्या दोन महिन्यात या सर्व निर्देशांचं पालन करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एकसमान टोल आकारणी धोरण तयार करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय परिव���न आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. रस्त्यांच्या परिस्थितीविषयी प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सरकार संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथं आयोजित ३७ व्या पक्षीमित्र संमेलनाचा काल समारोप झाला. पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून पक्षीसंवर्धन, निसर्ग आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं जात आहे हे उल्लेखनीय असून, याबाबतचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायला हवा असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. या दोन दिवसीय संमेलनात पक्षी संवर्धनाशी संबंधीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली, तसंच जायकवाडी इथं पक्षी निरीक्षण करण्यात आलं.
नांदेड विभागात रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करण्यासाठी सर्व ७० स्थानकांवर QR कोड सुविधा विस्तारीत करण्यात आली आहे. सर्व रेल्वे प्रवाशांनी तिकिट खरेदीसाठी या सुविधेचा वापर करण्याचं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नीति सरकार यांनी केलं आहे.
0 notes
Text
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ ह्या ‘ महिन्यात , तब्बल इतक्या ठिकाणी रखडल्यात निवडणुका
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ ह्या ‘ महिन्यात , तब्बल इतक्या ठिकाणी रखडल्यात निवडणुका
22 तारखेला सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सुनावणी असून राज्य सरकार यावेळी कोणती भूमिका घेते यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सकारात्मक भूमिका राज्य सरकारने मांडली तर सर्वोच्च न्यायालय प्रलंबित खटले निकाली काढू शकते, असे झाले तर एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या 29 महापालिका , 257 नगरपालिका , 36…
0 notes
Text
सागरा प्राण तळमळतो.
कोकणात आता मे महिना चालू झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. भर पावसात मी एकदा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. भर पावस���त कोकणातल्या समुद्रावर छत्री किंवा रेनकोट पुरा पडत नाही. एवढा वारा असतो. पण मे महिन्यात मात्र जेव्हा शहरात खूप उकाडा असतो अशावेळी समुद्रावर साधे कपडे घालून वाऱ्याची मजा घ्यायला खूप उत्साह येतो. काल मी चौपाटीवर वाळूत बसलो होतो. आणि माझ्या मनात विचार आला, माझा समुद्राच्या,…
0 notes
Video
youtube
दोन महिन्यात सरकार साडी चोळी सुद्धा देईल..
0 notes