Tumgik
#गोलंदाजी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही Bangladesh vs India 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने ५० षटकात ८ बाद २७१ धावा केल्या. पण त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार गोलंदाजी केली. Bangladesh vs India 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने ५० षटकात ८ बाद २७१ धावा केल्या. पण त्याआधी भारतीय…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर
तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षीस-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी
आणि
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्या�� आली.
****
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघातले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.
संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितरित करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अ��्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
विराट-हार्दिक विजय हिसकावला : बाबर
Tumblr media
मेलबर्न : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गड्यांनी पराभव केला. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह या त्रिकुटाच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने रोमांचक सामन्यात बाजी मारली. पराभवानंतर बाबर आझम चेहऱ्यावर निराशा दिसत होती. सामन्यानंतर तो म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या जबरदस्त फलंदाजीनं सामना आमच्या हातून निसटला. विजयानंतर भारतामध्ये जल्लोष करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील क्रीडा चाहत्यांमध्ये मात्र निराशाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमनं सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, याचा उलगडा केला आहे. मेलबर्नच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोप्प नव्हते. खासकरुन सुरुवातीच्या दहा षटकांमध्ये पण आम्ही आमच्या रणनीतीवर कायम होतो. त्यानुसार आम्ही गोलंदाजी केली. आम्ही उत्कृष्ट खेळलो. पण हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या भागिदारीनं सामना आमच्या हातून निसटला. त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.   Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
हार्दिकसमोर पाकने बॉल आणि बॅटने शरणागती पत्करली, चाहते म्हणाले- हा चांगला अष्टपैलू आहे
हार्दिकसमोर पाकने बॉल आणि बॅटने शरणागती पत्करली, चाहते म्हणाले- हा चांगला अष्टपैलू आहे
आशिया कप 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो असलेल्या हार्दिक पंड्याने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करत पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात विजयाने केली. टीम इंडिया पाकिस्तानला आशिया कप 2022 पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने तुडवत त्याने आपले नाव कोरले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Video: या बॉलरची अ‍ॅक्शन पाहून लोक अचंबित झाले, बॉलरनेच म्हटले- मी जगातील सर्वात वाईट क्रिकेटर
Video: या बॉलरची अ‍ॅक्शन पाहून लोक अचंबित झाले, बॉलरनेच म्हटले- मी जगातील सर्वात वाईट क्रिकेटर
जॉर्ज मॅकमेनेमी बॉलिंग अॅक्शन: जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. यामुळेच लोकांना हा गेम पाहायला आवडतो आणि त्याबद्दल खूप माहिती आहे. क्रिकेट मैदानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये एकतर फलंदाज विचित्र पद्धतीने आऊट होतो किंवा गोलंदाज अनोख्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतो. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरलअलीकडेच एका…
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 5 years
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं द���ःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्��र्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
granddreamerkingdom · 3 years
Text
गुजरात टायटन्सला बसू शकतो मोठा झटका, हार्दिक पंड्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह
गुजरात टायटन्सला बसू शकतो मोठा झटका, हार्दिक पंड्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह
बेंगळुरू: भारतीय क्रिकेट संघातील ऑलराउंडर हार्दिक पंड्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला आहे. पुढील दोन दिवस तो फिटनेस टेस्ट देईल जेणेकरू आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळण्याची त्याला परवानगी मिळेल. या फिटनेस टेस्टमध्ये सर्वात महत्त्वाचा ��टक असणार आहे तो म्हणजे २८ वर्षीय या खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी मिळते की नाही. गुजरात टायटन्सची पहिली लढत २८ मार्च रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
केकेआरचा दणदणीत विजय
मुंबई-प्रतिनिधी युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्याउर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे. 9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआरने उर्वरीत पर्वाची सुरुवात विजयाने केली आहे. अबूधाबीच्या शेख जायद मैदानात सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत केकेआरने आरसीबीला 92 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
चेन्नई सुपर किंग्सच्या संघात शेन व्हॉटसन परत मुंबई : प्ले ऑफमध्ये दोन महिन्यांचा थरार पार पडल्यानंतर आयपीएलच्या अकराव्या हंगामात आजपासून प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या संघात सॅम बिलिंग्ज ऐवजी शेन वॉटसनला जागा मिळाली आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला क्वॉलिफायर सामना सुरू आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या हैदराबादची लढाई चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध रंगणार आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादच्या संघाने गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने आपल्या नावावर केलेे आहेत. त्यामुळे आजचा सामना हैदराबादची गोलंदाजी विरुद्ध चेन्नईची फलंदाजी असाच रंगणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीचे आव्हान आहे.
1 note · View note
Text
भारत टॉस जिंकताच फलंदाजी घेणार की गोलंदाजी? जाणून घ्या इतिहास
https://bharatlive.news/?p=166128 भारत टॉस जिंकताच फलंदाजी घेणार की गोलंदाजी? जाणून घ्या इतिहास
पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
सैन्यदलाचे विविध शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या राज्यातल्या खेळाडूंचा विधीमंडळात गौरव
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत सादर
आणि
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्टला
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज प्रदान केलेल्या पुरस्कारांपैकी मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश होता. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम् दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी एक कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपये पर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज बोलत होते. वीजदेयकात सवलत देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचं सांगत, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिलाईच्या प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करावं, अशी मागणी दानवे यांनी केली.
मराठवाड्यासाठी घोषीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी ७३४ कोटी रुपयांची आवश्यक असतांना, सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जवळपास ३० लाख फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला, राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं, परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही, असं पटोले म्हणाले. पावसाळा सुरु असताना फेरीवाल्यांवर कारवाई करणं अन्यायकारक असून, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मंगळवारी चर्चेचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील उपाहारगृहात “भरडधान्य महोत्सव” घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय वेद्यकीय शिक्षण परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून, ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने गेल्या २२ जून रोजी नियोजित असलेली ही परीक्षा पुढे ढकलली होती.
****
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर 'दृश्यता' वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर निर्माण करावं, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. विद्यापीठाचा १०९वा स्थापना दिवस आज मुंबईत राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, त्यावे��ी ते बोलत होते. देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असं सांगून विद्यार्थिनींनी पुस्तकासोबत निसर्गाचं देखील ज्ञान घ्यावं, असं आवाहन राहीबाई पोपरे यांनी यावेळी केलं.
****
कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर इथं आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने क्षीरसागर यांनी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेत ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, याच अनुभवातून समस्येचं उत्तर नक्की मिळतं, असं लडकत यांनी सांगितलं.
 ****
0 notes
loksutra · 2 years
Text
स्विंगच्या व्यापाऱ्याने मैदानात पाऊल ठेवताच दाखवला उत्साह, मीम्स शेअर करून लोक म्हणाले- येताच कामाला सुरुवात केली
स्विंगच्या व्यापाऱ्याने मैदानात पाऊल ठेवताच दाखवला उत्साह, मीम्स शेअर करून लोक म्हणाले- येताच कामाला सुरुवात केली
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने येताच कामाला सुरुवात केली आणि झिम्बाब्वेच्या तीन खेळाडूंना स्वस्तात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीपक चाहर मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. ज्याचा पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होत आहे. खरे तर या दौऱ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
जोश हेझलवूड या मोसमातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला, टॉप 5 मध्ये तीन भारतीय खेळाडू
जोश हेझलवूड या मोसमातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला, टॉप 5 मध्ये तीन भारतीय खेळाडू
जोश हेझलवुड मार्को जॅनसेन आवेश खान मोहम्मद सिराज IPL 2022: गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. तर राजस्थान रॉयल्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमधील तिसरा आणि चौथा संघ बनण्यासाठी स्पर्धा करतील. या मोसमात खेळाडूंनी अनेक विक्रम केले. पण असे काही रेकॉर्ड्स होते जे कोणत्याही खेळाडूला आपल्या नावावर जोडायला आवडणार नाही. या मोसमात…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
AUS vs IND : अजिंक्यने पहिल्या दिवशी जडेजाला दिली फक्त तीन षटके, जाणून घ्या रणनिती...
AUS vs IND : अजिंक्यने पहिल्या दिवशी जडेजाला दिली फक्त तीन षटके, जाणून घ्या रणनिती…
सिडनी, AUS vs IND: कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अष्टपैलू रवींद्र जडेजाला फक्त तीन षटकेच गोलंदाजी दिली. यानंतर काही काळ अजिंक्यला चाहत्यांनी ट्रोलही केले. पण एक कर्णधार म्हणून अजिंक्यने जडेजाच्या गोलंदाजीबाबत काही रणनिती नक्कीच आखली असणार. जडेजाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. पण तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जडेजाला फक्त तीनच षटके…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
जलद गोलंदाजावर फिरकीपटू होण्याची वेळ; सामना सुरू असताना पाहा काय झाले
जलद गोलंदाजावर फिरकीपटू होण्याची वेळ; सामना सुरू असताना पाहा काय झाले
एडिलेड: अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी असे काही चित्र पाहायला मिळाले जे पाहिल्यानंतर अनेक जण हैराण झाले. इंग्लंडचा जलद गोलंदाज जो १४० किलोमीटरच्या वेगाने चेंडू टाकत होता त्याने अचानकपणे फिरकी गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. क्रिकेटच्या मैदानावरील हा प्रकार पाहून अनेकांना काही वेळ विश्वास बसला नाही. ऑस्ट्रेलियाच्���ा दुसऱ्या डावातील ३५व्या षटकात इंग्लंडचा जलद गोलंदाज ओली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
भारतीय संघाला मोठा धक्का,उमेश यादवही दुखापतग्रस्त
भारतीय संघाला मोठा धक्का,उमेश यादवही दुखापतग्रस्त
मेलबर्न- मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उमेश यादवला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. त्यामुळे सामना अर्ध्यात सोडून उमेश यादवनं मैदान सोडलं. दुसऱ्या डावातील आठवं षटक टाकत असताना उमेश यादावला हॅमस्ट्रिंगमुळे मैदान…
Tumblr media
View On WordPress
0 notes