Tumgik
#घ्यायचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही
Video: बोल्ड कसं घ्यायचे हे बघून घ्या; सिराज, उमरानची वादळी गोलंदाजी, सुंदरने संधी सोडली नाही Bangladesh vs India 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने ५० षटकात ८ बाद २७१ धावा केल्या. पण त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार गोलंदाजी केली. Bangladesh vs India 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने ५० षटकात ८ बाद २७१ धावा केल्या. पण त्याआधी भारतीय…
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 6 months
Text
16. गुणातीत होणे 
श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही कर्मासाठी कुणीही कर्ता नसतो. निसर्गाचा भाग असलेल्या सत्व, रज आणि तम गुण यांच्यातील परस्परसंवादाचा परिणाम म्हणजे कर्म.
दु:खापासून मुक्ती हवी असेल तर या तीन गुणांच्या पार जाणे आवश्यक आहे असा उपदेश श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत. गुणातीत कसे व्हायचे हे अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा तो मनुष्य नेमका कसा असतो हे ही त्याला समजून घ्यायचे आहे.
गीतेत नमूद केलेल्या द्वंद्वातीत (विरोधाभासांच्या पल्याड जाणे), दृष्टा (साक्षी) आणि समत्व या तीन विषयांची आपण या अगोदरच चर्चा केली आहे. या तिघांच्या संयोगातून गुणातीत अवस्था गाठता येते, असे श्रीकृष्ण म्हणतात.
श्रीकृष्णाच्या मते ज्या व्यक्तीने गुणातीत अवस्था गाठली आहे त्याला याची जाणिव असते कि गुणांचा गुणांशी संबंध येत असतो आणि म्हणून तो साक्षीभावाने त्याकडे बघतो. एखाद्या विशिष्ट गुणाची त्याला विशेष ओढही नसते आणि त्यापासून तो दूर ही जात नाही.
गुणातीत हा एकाचवेळी द्वंद्वातीत ही असतो. सुख-दु:खाचे ध्रुव समजून तो दोन्हींप्रती तटस्थ राहतो. स्तुती आणि टीकेच्या बाबतीत तो तटस्थ आहे कारण त्याला माहित आहे की हे तीन गुणांचे उत्पादन आहेत. त्याचप्रमाणे तो मित्र आणि शत्रूंबद्दल तटस्थ असतो, हे समजून घेतो की आपणच आपले मित्र आहोत आणि आपले शत्रू देखील आहोत.
भौतिक जग हे दोन टोकांमध्ये विभागले गेले आहे आणि त्यांच्यातील तोल कुणा एका बाजूला झुकणे हे नैसर्गिक आहे. दुसर्‍या बाजूने विचार केला तर असे लक्षात येते की सतत झुलत असलेल्या लोलकालाही एक स्थिर बिंदू आवश्यक असतो. भगवान श्रीकृष्ण या स्थिर बिंदूबद्दल सांगतात जेथे आपण पोहोचले पाहिजे आणि झुलण्याचा भाग न होता त्याकडे म्हणजेच द्वंद्वाकडे साक्षीभावाने बघितले पाहिजे.
गुणातीत व्यक्ती हा सोने, दगड आणि मूठभर माती यांना सारखेच महत्व देतो. या उदाहरणावरून हे सांगायचे आहे की तो कोणत्याच एका गोष्टीला जास्त किंवा कमी महत्व देत नाही. वस्तू जशा आहात तसेच त्यांचे मूल्यमापन तो करीत असतो, इतरांनुसार नाही.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की गुणातीत म्हणजे कर्ता भाव सोडणारा. हे तेव्हा घडते जेव्हा आपण आपल्या अनुभवातून समजतो की प्रत्येक गोष्ट स्वतःच घडते आणि कर्त्याचे त्यात फारसे योगदान नसते.
0 notes
shrikrishna-jug · 7 months
Text
हर सुखात,हर दुःखात पराई होत असते
प्रेम विक्षिप्त असते,मस्तीखोर असतेहर सुखात,हर दुःखात पराई होत असते ज्योत सांगे पतंगा तू जा दूर निघूनमाझ्यासम जाळ होईल,समीप येऊनऐकेना तो,त्याला घ्यायचे स्वतः जळून प्रेम विक्षिप्त असते,मस्तीखोर असतेहर सुखात,हर दुःखात पराई होत असते राहते कुणी पडद्या आड शरमुन जाऊननजर किती चुकवावी,प्रीयतमा पासून मन बसायचे असेल तर ते बसले ही जातेहर सुखात,हर दुःखात पराई होत असते प्रेम विक्षिप्त असते,मस्तीखोर असतेहर…
View On WordPress
0 notes
dixitsantosh · 10 months
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रू��ाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
way2more · 10 months
Text
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना | AbsoluteNamo Shetkari 2nd Installment
   नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होईल याबाबत तारीख सांगण्यात आली आहे.ज्या शेतकरी मित्रांना पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना तो कधी मिळेल तसेच नमोचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल दुसरा हप्ता येण्याची तारीख किती असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तरी पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
तर मित्रांनो केंद्र सरकारने मदत दिलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनाच राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी निधी ( Namo Shetkari Yojana 2 Installment Date ) या योजनेसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 93 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाहीये.सध्या राज्य शासनाकडून दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन हे सुरू आहे.
1 note · View note
stocknewssmartnews · 11 months
Text
तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का , कमोडिटी म्हणजे काय ?
Tumblr media
एक वस्तू, एक मूलभूत कच्चा माल किंवा प्राथमिक कृषी रत्न, सोने, तेल, गहू किंवा कॉफी यांसारख्या खजिन्यांमध्ये व्यापाराचे आकर्षण दर्शवते. या मौल्यवान वस्तू, मानकीकरणाद्वारे चिन्हांकित, हातांमध्ये सहजतेने नाचतात, अदलाबदल करण्यायोग्य आणि प्रतिष्ठित. वस्तू एका चमकदार युगुलात उलगडतात: मजबूत, कठिण वस्तू - निसर्गाचे वरदान, धातू आणि ऊर्जा; कोमल, मऊ वस्तू - कापणीचा आनंद, कृषी पराक्रम आणि पशुधनामध्ये जिवंत संपत्ती. कमोडिटी मार्केट्सच्या भव्य थिएटरमध्ये, जेथे नशीब बनावट आहे, खरेदीदार आणि विक्रेते व्यवहारात पायरोएट करतात. उत्पादक, ग्राहक, सट्टेबाज आणि गुंतवणूकदार स्टेजला शोभा देतात, त्यांची कथा गुंफलेली असते. वस्तूंची किंमत सिम्फनी पुरवठा आणि मागणीच्या तालावर बदलते, भौगोलिक-राजकीय घटना आणि आर्थिक सोनाटाद्वारे कोरिओग्राफ केलेले. ज्यांना वस्तूंच्या सोनेरी स्पर्शाची इच्छा आहे त्यांच्यासाठी अनेक मार्ग आहेत. या खजिनांशी जोडलेल्या कंपन्यांच्या किमयामध्ये गुंतवणूक करा किंवा कमोडिटी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सच्या थेट बॅलेमध्ये भाग घ्या. जागतिक व्यापार क्षेत्रामध्ये, कमोडिटी मार्केट हे कंडक्टर आहेत, ऑर्केस्ट्रेटिंग किमतीचे प्रकटीकरण, जोखीम बॅले आणि लिक्विड क्रेसेंडोज - बाजारातील सहभागींच्या सिम्फनीमध्ये सामील होण्याचे धाडस करणार्‍या सर्वांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम.
0 notes
nandedlive · 1 year
Text
Loan | 'बँकांनी मारले सरकारने तारले' ! शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Tumblr media
Loan| शेती हा ग्रामीण भागात मोठ��या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. हे भांडवल उभे करण्यासाठी बहुतेक शेतकरी पीककर्ज घेतात. मात्र पीककर्ज (loan) घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातले मोठे कारण म्हणजे बँकांच्या अटी ! यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज घेणे मोठ्या दिव्यासारखे वाटू लागले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना जाचक अटी लादणाऱ्या बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर बँकांवर एफआयआर दाखल करा शेतकऱ्यांना पीककर्ज घ्यायचे असेल तर काही बँका सिबिल स्कोअर मागत आहेत. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून इथून पुढे बँका शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागत असतील तर त्यांच्यावर एफआयआर ( FIR) दाखल करून कारवाई करण्यात यावी. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. CIBIL Score | सिबील स्कोअर म्हणजे काय ? कोणत्याही व्यक्तीला बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास त्याची संपूर्ण माहिती बँकांना‎ “सिबिल”च्या माध्यमातून कळते. ती व्यक्‍ती कोणत्या बँकेची‎ थकबाकीदार आहे का याची माहिती यामध्ये येते.‎ तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले व नियमित‎ परतफेड होत असेल अशा व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो. त्यामुळे त्यांना त्वरित कर्ज मिळते. म्हणून पीककर्ज देण्यास बँकांचा नकार दरम्यान शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या कर्जाची थकबाकी बँकांकडे असते. म्हणजेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणे जमत नाही. यामुळे त्यांचा सिबील स्कोअर चांगला नसतो. या कारणास्तव बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना जाचक अटी लावत आहेत. Read the full article
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
आता शेतकऱ्यांचे पण बळी सरकारला घ्यायचे आहेत का ?
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकरणात स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध आढळून येत असून प्रकल्प अधिकारी आल्यानंतर चक्क रस्त्यावर झोपून रस्ता अडवल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याकारणाने विरोधी पक्षनेते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी फेसबुकवर आपली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Easy Chicken Fried Rice Recipe | चिकन फ्राईड राइस रेसिपी सोप्या पद्धतीने बनवा एक  सोपी चिकन फ्राईड राईस रेसिपी जी निश्चितच खूप चविष्ठ आहे – प्रत्येक वेळी! तुम्हाला ज्या दिवशी अशा प्रकारचे रात्रीचे जेवण  घ्यायचे असेल त्या दिवसांत काम करण्यासाठी तुम्ही हे बेस रेसिपी म्हणून वापरू शकता किंवा प्रमाण दुप्पट करा आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या जेवणाच्या तयारीचा एक भाग म्हणून बनवू शकता.  https://sudhirmalekarblog.blogspot.com/2023/03/easy-chicken-fried-rice-recipe.html
Tumblr media
0 notes
gitaacharaninmarathi · 7 months
Text
12. मनावर नियंत्रण
अर्जुन मनाची तुलना वायूशी करतो आणि त्यावर नियंत्रण कसे आणावे हे त्याला जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून संतुलन साधले जावे. श्रीकृष्ण म्हणतात की हे निश्चितच अवघड आहे पण वैराग्य सरावाने ते साध्य करता येते.
इंद्रियांद्वारे गोळा केलेली माहिती सुरक्षित किंवा असुरक्षित असी विभाजित करण्यासाठी मेंदू विकसित झाला आहे. हे करण्यासाठी मेंदू स्मरणशक्ती वापरतो. या क्षमतेने उत्क्रांतीच्या काळात आम्हाला जगण्यास आणि समृद्ध होण्यास मदत केली.
मेंदूची हीच क्षमता अंतर्गत निर्णयासाठी देखील वापरली जाऊ शकते, ज्याला जागरूकता म्हणतात. आपले विचार आणि भावना यांची जाणीवपूर्वक पुनरावृत्ती करून आपण आपल्या मेंदूची निर्णय क्षमता वाढवू शकतो. आजच्या आधुनिक युगात संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशाच प्रकारे तंत्रज्ञान वापरले जात आहे. भगवान श्रीकृष्ण हे आंतरिक सामर्थ्य अभ्यासातून विकसित करण्याचे संकेत देत आहेत कारण ती नैसर्गिकरित्या येत नाही. न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून, हे नवीन न्यूरल पॅटर्न तयार करण्यासारखे आहे.
वैराग्य समजून घेण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध असलेला राग समजून घेणे. राग म्हणजे आपल्या प्रकट जगातील भौतिक सुखांच्या मागे धावणे आहे जसे बाह्य सौंदर्य, रोजगार आणि भौतिक सुविधा. द्वंद्वाच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक रागाचा शेवट हा वैराग्यात होतो. मात्र, आपले सगळे लक्ष हे रागावर केंद्रित झालेले असते आणि आपण वैराग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करतो.
स्टॉइसिझम सारखी काही तत्त्वज्ञाने ही मृत्यू जो वैराग्याचे अंतिम टोक आहे या संकल्पनेचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्याला ‘Memento Mori’  असे म्हणतात, म्हणजे मृत्युला वारंवार भेटत राहणे. यामध्ये, मृत्युची आठवण राहावी म्हणून ते लोक कामाच्या ठिकाणी किंवा घरी महत्वाच्या जागेवर कुठले तरी स्मृतिचिन्ह ठेवतात (Memento) जेणेकरून मृत्युची भावना सातत्याने जागृत राहावी. भारतीय तत्त्वज्ञानानुसार त्याला स्मशान वैराग्य असे म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही वैराग्याचा सराव केला तर त्यामुळे तुमचा मेंदू केंद्रस्थानी स्थिर होईल.
लॉकडाउनच्या काळाने आपल्याला वैराग्याच्या क्षणांची झलक दाखविली आहे. वैराग्याची किंचितही जाणिव झाल्यास, आपल्याला शांतता आणि आनंद मिळविण्यासाठी गरजेचे असलेले संतुलित मेंदूचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.
0 notes
shrikrishna-jug · 1 year
Text
माझा कवीमित्र
मला आठवतं, ज्यावेळी मी शाळेत शिकत होतो त्यावेळी आमच्या मराठीच्या तासालाजे गुरूजी आमचा तास घ्यायचे त्यांचं नाव कारखानीस होतं.हे प्रसिद्ध कवी होते आणिटोपण नावाने ओळखले जात.मला आत्ता त्यांचं टोपण नाव आठवत नाही पण सांगण्याचा मुद्दा हा की आमच्या त्या वयात एक प्रसिद्ध कवी आमचा मराठी तास घ्यायचे हे मलामी मोठा झाल्यावर आठवून धन्य, धन्य वाटायचं. हा विषय अशासाठी काढला की,माझा वर्ग मित्र,मधुकर भागवत,जो…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Lal Kitab Dhanu Rashifal 2023 धनू राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय
Lal Kitab Dhanu Rashifal 2023 धनू राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय
Lal Kitab Dhanu Rashifal 2023 धनू राशिभविष्य 2023 आणि अचूक उपाय Sagittarius zodiac sign Dhanu Rashi lal kitab 2023 : धनू राशीसाठी पुढील वर्ष 2023 कसे राहील? तुमची मेहनत करिअर, नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होईल का? पुढील वर्ष तुमच्यासाठी कसे असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? नक्कीच तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की लाल किताबानुसार तुमचे भविष्य कसे असेल ? धनु राशीचे अचूक अंदाज आम्ही तुम्हाला…
View On WordPress
0 notes
Text
एकटेच जायचे
जीवनाचे हेच सत्यएकटे यायचे एकटेच जायचे । आयुष्यभर खपून सारेहवे नको ते जमवायचे । अनंत यात्रेला निघाल्यावरइथेच सोडून सारे जायचे । लोभ मोह माया मत्सरसगळेच सोबत बाळगायचे । आपलेही कधी जातात दूरसांगा सोबत काय घ्यायचे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
राम गोपाल वर्मा यांना ब्रूस लीचे चुंबन घ्यायचे होते
राम गोपाल वर्मा यांना ब्रूस लीचे चुंबन घ्यायचे होते
प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा आपल्या चित्रपटांसोबतच तो आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली आणि त्यादरम्यान त्याने असे काम केले जे चर्चेत आले आहे. राम गोपाल वर्मा लोकप्रिय मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली बद्दल बोललो. ब्रूस लीचे व्यक्तिमत्त्व, त्याची स्क्रीन प्रेझेन्स, त्याचे डोळे या सर्वांचा तो चाहता असल्याचे त्याने सांगितले. राम गोपाल वर्मा यांनी तर ब्रूस लीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Words in Marathi
तपशील
[tapśīl], noun (masculine), plural तपशील [tapśīl]
a detail, a particular
Tumblr media
या स्पर्धेत भाग घ्यायचे तपशील मला सांगा. [yā spardhet bhāg ghyāyče tapśīl malā sāṅgā] Give me the details on how to participate in this contest. (lit. tell me the details of how to take part in this contest)
---
Origin
Arabic تَفْصِيل‎ [tafṣīl] (detail, narrating in detail, division into chapters, inventory, explicitness), from the Arabic root ف ص ل [f-ṣ-l], used to form words relating to shedding or separation.
---
Related Words
तपशीलवार [tapśīlvār] - (adj.) detailed
तपशीलवारपणा [tapśīlvārpaṇā] - (n.) particularity
38 notes · View notes
nandedlive · 1 year
Text
श्री.गुरूजी रुग्णालयात 22 एप्रिल रोजी 0 ते 6 वयोगटातील बालकांना मोफत सुवर्ण प्राशन
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-वय गट 0-6 या वयोगटातील बालकांना अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर श्री.गुरूजी रुग्णालयात मोफत सुवर्ण प्राशनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुवर्ण प्राशन लहान बालकांसाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट वाढीसाठी बहुमोल मानले जाते. श्री.गुरूजी रुग्णालयाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार अक्षयतृतीया या शुभमुहूर्तावर दि.22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत 0 ते 6 वयोगटातील बालकांना कुशल डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण प्राशनामुळे मुलांच्या आरोग्याला फायदा होतो. विशेषत: त्यांची स्मृती सुधारते, पचनशक्ती वाढते आणि प्रतिरक्षा प्रणाली बळावते. या सुवर्ण प्राशन शिबिरात आपल्या 0 ते 6 वयोगटातील बालकांना सुवर्ण प्राशन करून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाव नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 9370638837 देण्यात आला आहे. श्री.गुरूजी रुग्णालय डॉ.एम.जी.बजाज ईस्टेट, छत्रपती चौक पुर्णा रोड नांदेड येथे आहे. जनतेने या मोफत सुवर्ण प्राशन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गुरूजी रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. Read the full article
0 notes