Tumgik
#सोडली
mnaasilveira · 2 months
Text
कृतीत पवित्र आत्मा
______________________________________________________________ ______________________________________________________________ पन्नाशीतला एक अनोळखी माणूस अचानक माझ्याजवळ आला, जेव्हा मी 8 ऑगस्ट, 2012 रोजी प्रोव्हिडन्स, RI मधील सेंट पायस व्ही च्या डॉमिनिकन चर्चच्या मागच्या बाजूला कम्युनियनसाठी माझी जागा सोडली. “इथे खूप थंडी आहे! तुम्ही चर्च सोडत आहात का?” त्याने मला विचारले. “नाही, मी…
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
30. पाणी, वाळू आणि दगडावर लिहिणे    
श्रीकृष्ण म्हणतात की सांख्ययोग (2.11-2.38) बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर ते आता योग म्हणजे कर्मयोगाचे स्पष्टीकरण देतील, ज्याचा अभ्यास माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल (2.39).
सांख्य योग सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो एक नष्ट न करता येणारे चैतन्य आहे (जाणीव) ज्याला मरण नाही. या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण कर्मयोगाचा माध्यमातून हेच सांगू इच्छितात. त्यामुळे, या संदर्भात कर्मबंधन आणि योग समजून घेण्याची गरज आहे.
योगाचा शब्दशः अर्थ एकत्र येणे असा होतो आणि गीते मध्ये विविध संदर्भांमध्ये त्याचा वापर केला जातो. श्रीकृष्ण समतेला योग म्हणतात (2.48). हे धनंजय! तू आसक्ती सोडली पाहिजे आणि परिपूर्ण आणि अपूर्ण यांच्यात समानता राखली पाहिजे. समतेला योग म्हणतात. तसेच श्लोक 2.38 मध्ये, कृष्ण अर्जुनाला सुख-दु:ख, विजय-पराजय आणि नफा-तोटा यांची बरोबरी करून युद्धाची तयारी करण्यास प्रोत्साहित करतो.
आपल्या कर्मांमुळे उमटलेले चांगले-वाईट प्रभाव किंवा ओरखडे आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या अंतर्बाह्य प्रतिक्रिया यांचा कर्मबंधनामध्ये समावेश होतो. त्यांना निष्पक्ष पॅटर्न्स म्हटले पाहिजे. हे प्रभाव आपल्या नेणिवेतून आपल्या वर्तनाला दिशा देत असतात आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करावयास सांगतात.
जे प्रभाव सुख आणि लाभ देतात त्या प्रभावांना चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो. त्याच वेळी आपण दु:ख आणि तोटा यांना दूर सारत असतो. हे दोन्ही प्रभाव जितके खोलवर असतील तितके त्यांना चिकटून राहणे किंवा त्यांच्यापासून दूर जाण�� यांची तीव्रता अधिक असते.
या प्रभावांची ताकद ही दगड, वाळू आणि पाणी यांच्यावर लिखाण करण्यासारखी असते. जेव्हा दगडावर लिखाण केले जाते तेव्हा ते खोलवर उमटते आणि दीर्घकाळ टिकून राहणारे असते. वाळूवरचे लिखाण कमी काळ टिकते आणि पाण्यावर लिहिलेले तर क्षणात नाहीसे होते.
कर्मयोग आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतो आणि आपल्याला इतके ‘सरल’ करतो की कशाचाच आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही, कशाचाच ताण येऊ शकत नाही. पाण्यावरील प्रभाव नमूद करताना श्रीकृष्ण हेच सांगत असतात.
0 notes
7304510638 · 4 months
Text
0 notes
sanjayprajapati · 4 months
Text
1 note · View note
pandurangkoli · 4 months
Text
घरचा बार असून दारू सोडली बारचं,मुलाच भविष्य काय? | Nashik | Sant Rampal ...
youtube
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते, नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा प्रंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान, या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारी राष्ट्रांचे महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनौथ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या शपथविधी समारंभानंतर या नेत्यांची राष्ट्रपती भवनात बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहू, असंही खर्गे म्हणाले. खर्गे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व, पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैद्राबाद इथं आज सकाळी निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ईनाडू समूह आणि रामोजी चित्रपटसृष्टीचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुखः व्यक्त केलं आहे. देशानं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावलं असून पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त राव यांची दृष्टी सामाजिक उत्थानासाठी रुजलेली होती, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळजीवाहू पंतप्��धान नरेंद्र मोदी यांनीही रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रामोजी राव भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानानं पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली. देशाच्या विकासाबद्दल त्यांना अत्यंत तळमळ होती, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामोजी राव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षण आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिला, अशी माहिती जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी ते आज माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटीत सर्व समाजातील गावकऱ्यांनी उपोषणाला पाठींब्याचं लेखी पत्र दिल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
****
यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल बियाणं वितरीत केलं आहे, आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरोचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचीही शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टेक्सास इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेश संघानं श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलं��ाजी करताना श्रीलंका संघानं निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल बांग्लादेश संघानं १९ षटकात आठ गडयांच्या मोबदल्यात विजय मिळवला. 
अन्य एका सामन्यात अफगानिस्तान संघानं न्यझिलंड संघाचा ८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तान संघानं २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मात्र, न्यझिलंड संघाचे ७५ धावांतच सर्व गडी बाद झाले.
****
दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
****
0 notes
vishnulonare · 4 months
Text
घरचा बार असून दारू सोडली बारचं,मुलाच भविष्य काय? | Nashik | Sant Rampal ...
youtube
#KabirParmatma_PrakatDiwas
#SantRampalJiMaharaj
अवश्य ऐका हा इंटरव्यू- घरचा बार असून दारू सोडली बारचं मुलांच भविष्य काय? -अमृत तुलसीराम देवरे|Nashik| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
shobha12sblog · 4 months
Text
घरचा बार असून दारू सोडली बारचं,मुलाच भविष्य काय? | Nashik | Sant Rampal ...
youtube
1 note · View note
sanjay-ronghe-things · 5 months
Text
झाली कशी दशा
दिशा न उरली आताझाली कशी दशा ।जो तो पाळतो फक्तआहे पैशाची नशा । बोलताना शब्द कसेअसे उर्मट ती भाषा ।शांत वाटतो अजूनहीगरीब तो वेडापिशा । सोडली नाही कुणीचमनातली ती आशा ।सांज ढळते दिवस सरतोघेतो करून हशा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
thediscoveredwriter · 5 months
Text
प्रेमाची आशा!
शंकेची भिंत जेव्हा हळूहळू कोसळली, संशयाच्या सावटांनी जेव्हा जागा सोडली, विश्वासाच्या किरणाने हृदयाला वेढले. आपुलकीच्या उष्णतेने मन प्रफुल्लित झाले. तुमच्या हास्याने जे काही सांगितले, ते नजरेने ऐकले, हृदयाने ओळखले. तुमच्या नजरेतल्या गोडव्याने जे काही व्यक्त केले, ते मनाने सांगितले, आत्म्याने स्वीकारले. आता कोणतीही तक्रार नाही, कोणतीही खंत नाही, नाही नात्यात कोणताही दुरावा, कोणतीही अडचण…
View On WordPress
0 notes
Video
youtube
भाजप बरोबर गेलो तरी सेक्युलर भूमिका सोडली नाही..
0 notes
bandya-mama · 10 months
Text
Tumblr media
Kimi Katkar Birthday : Wishes From Bandya Mama
चित्रपटसृष्टीत होणा-या शोषणामुळे या अभिनेत्रीने सोडली होती फिल्म इंडस्ट्री, एकेकाळी बोल्ड सीन्स देऊन एकवटली होती चर्चा
0 notes
pradip-madgaonkar · 10 months
Text
Kimi Katkar Birthday : Wishes From Pradip Madgaonkar
चित्रपटसृष्टीत होणा-या शोषणामुळे या अभिनेत्रीने सोडली होती फिल्म इंडस्ट्री, एकेकाळी बोल्ड सीन्स देऊन एकवटली होती चर्चा
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सोलापूर : मोहोळ तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक; एसटीच्या काचा फोडून टायरची हवा सोडली
https://bharatlive.news/?p=182970 सोलापूर : मोहोळ तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक; एसटीच्या काचा फोडून टायरची ...
0 notes
nandedlive · 1 year
Text
कॉंगे्रसचे माजी नगरसेवक हबीब बागवान एका पायाने अधु असतांना ते पळून गेल्याचे शिमला पोलीसांचे ढोंग
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-एका पायाने अधु असलेल्या माजी कॉंगे्रस नगरसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांनी पलायन केलाचा कांगावा शिमला पोलीस करीत असली तरी ते काही खरे वाटत नाही. 19 जुलैपासून पोलीसांच्या ताब्यात असलेल्या हबीब बागवानचा पत्ता आजपर्यंत लागलेला नाही.हा प्रकार लोकशाहीतील प्रशासनिक प्रणालीवर प्रश्न उभा करणारा आहे. नांदेड येथून 19 जुलै रोजी हबीब बागवान यांची चार चाकी गाडी रोखून दुसऱ्या एका चार चाकी गाडीत आलेल्या शिमला(हिमाचल प्रदेश) पोलीसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात माहिती देवून चार चाकी गाडीत नेले. त्यांच्याविरुध्द 6/2023 असा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. 20 जुलै रोजी इटारसी गावात हबीब बागवान यांचा प्रवासी कोठडीचा आदेश न्यायालयातून घेतला. त्यानंतर हबीब बागवान धौलपूर रेल्वे स्थानकावरून पळून गेल्याचा गुन्हा भरतपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. धौलपूर आणि भरतपूर दोन्ही राजस्थानमधील जिल्हे आहेत. मग हबीब बागवान धौलपूरहून पळून गेले तर त्या प्रकरणाचा गुन्हा भरतपूर पोलीस ठाण्यात कसा दाखल करण्यात आला? यामुळे प्रशासनिक लोकांनी मिळून या प्रकरणातील तक्रारदार अनुप पाल यांच्या ताब्यात तर दिले नाही ना? अशी शंका यायला लागली आहे. हबीब बागवान हे एका पायाने अधु आहेत . अशा परिस्थितीत सुध्दा ते पळून कसे जातील? शिमला पोलीसांनी आणलेली चार चाकी गाडी त्यांनी इटारसीमध्ये सोडली आणि तेथून ते रेल्वेने प्रवास करू लागले. आपल्याकडे चार चाकी गाडी असतांना त्यांनी रेल्वेतून का प्रवास केला? या अनेक प्रश्नांमुळे शिमला पोलीस प्रशासन आणि गुन्हा क्रमांक 6/2023 चे तक्रारदार अनुप पाल यांनी काही तरी खलबत रचल्याचा अंदाज येतो. खरे तर त्या गुन्हा क्रमांक 6/2023 मध्ये हबीब बागवान यांचे नाव आरोपी या सदरात नाहीच. त्या तक्रारीमध्ये त्यांचे वडील अब्दुल रहिम बागवान यांचे नाव आरोपी म्हणून आहे. हबीब बागवानला घेवून गेल्यानंतर तेथे जाऊन परत आले त्यांचे बंधू शकील बागवान यांनी सांगितले की, अनुप पालला दिलेले धनादेश हबीब बागवान यांच्या नावाचे होते. परंतू त्यांचे नाव एफआयआरमध्ये नाही. एकूणच घडलेला प्रकार ढोंग वाटण्यासारखाच आहे. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीचं कामकाज २७ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या ६ ते २७ जानेवारी दरम्यानच्या या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून अंतिम करण्यात आलं आहे. उद्या ६ जानेवारीवापासून याचिकेसंदर्भातील कागदपत्रं आणि पुरावे जमा करण्यास सुरुवात होईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी, उलटतपासणी घेतली जाईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळं २७ जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळं आणि दोन-चार लोकांमुळं संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असून त्याला कोणीही मारू शकत नसल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार तथा संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे.
नवव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मधल्या आयनॉक्स, प्रोझोन मॉल इथं जावेद अख्तर यांची दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मुलाखत घेतली, त्यावेळी अख्तर बोलत होते.
भाषा कायम आपल्या सोबत असते. भाषेमध्ये आपली संस्कृती दिसते. भाषा सोडली की आपण आपली मुळं सोडली असा अर्थ होतो. भाषा एकमेकांसाठी बोलण्यासाठी होती, मात्र आज भाषेमुळं बोलणं बंद होण्याची वेळ आली आहे आणि हे चिंताजनक असल्याचं ते म्हणाले.
****
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातल्या महिला शेतकरी अग्रेसर आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला आहे. या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या प्रयोगांची माहिती देण्यात आली आहे. 
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात राज्यातल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. येत्या ५० वर्षांचा विचार करुन राज्यातली विकास कामं सुरू आहेत, असं सांगत या कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुयोग्य नियोजन करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वाहतुकीचंही नियोजन करण्यासोबत प्रकल्पासाठी भूमी देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचं वितरण ताबडतोब करण्यात यावं असंही प���ार म्हणाले. पुणे मेट्रो मार्गातल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळखुर्द इथं लग्नाची मिरवणूक चालु असताना डिजे अंगावर पडल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल घडली. मृतांमध्ये बाळासाहेब हरिभाऊ खताळ, भास्कर राधु खताळ यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
****
बीड जिल्ह्यात येत्या काळातील निवडणुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकत्रित लढणार आहेत. काल बीड जिल्ह्यातल्या केज इथं प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. 
****
चंद्रपूर इथं आज नवा विश्वविक्रम बनणार आहे. या ठिकाणी होत असलेल्या चांदा कृषी महोत्सवात सुप्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ विष्णू मनोहर, तब्बल सहा हजार सातशे पन्नास  किलो भरडधान्यांची मिलेट खिचडी बनवत असून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
****
वाशिम इथं अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढ तसंच निवृत्ती वेतन योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी आंदोलन कर्त्यांनी केल्या.
****
0 notes