राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई :- राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20 टक्के, वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र अग्रणी, मुख्यम��त्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईत समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
आणि
चेन्नई कसोटीवर भारताची पकड मजबूत
****
सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले –
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होते, आज सागरी किनारा स्वच्छतेसाठी जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. यावेळी बोलताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं काँग्रेसनं निवेदनात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेडच्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी आहे, यासाठी ८१९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असं प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. ते आज पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. हज हाऊस इथं मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आज एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत आहे, याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि नागरिक यांनी घ्यावा, असं आवाहन सत्तार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ मनीष जोशी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. राज्य, भाषा, धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात देशात होत असल्याचं जोशी यांनी याप्रसंगी सांगितलं. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर पार पडलेल्या आजच्या चर्चासत्रात देशभरातून संशोधक तसंच अभ्यासक सहभागी झाले होते.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची गरज असल्याचं अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवारफेरी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अमीर खान बोलत होते. यावेळी अमीर खान यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाला भेट देऊन शेती विषयक माहिती जाणून घेतली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
****
भाषा हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे, तर विज्ञान हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं कवयित्री नीरजा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा व्यापक अर्थानं विचार करायला हवा. संस्कृती ही व्यापक संकल्पना असून यात भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, परंपरा, धर्म, संगीत, शिल्पकला, चित्रकला, आहारपद्धती, वेशभूषा, उपचार पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या आकलनासाठी विध्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, अस नीरजा यांनी सांगितलं.
****
चेन्नई कसोटीवर भारता��ं पकड मजबूत केली आहे. शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषित केला. शुभमन गिलनं ११९ धावा केल्या, तर रिषभ पंतनं १०९ धावा केल्या. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक बळी टिपला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज असून भारताला सहा बळी घ्यायचे आहेत.
****
0 notes
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. २ : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि…
0 notes
किलेमाहिम किले से वर्ली किले के बीच 9 किलोमीटर का कॉरिडोर और बोट फेरी..
बृहन्मुंबई महानगर पालिका पिछले एक साल से उन किलों को पुनर्जीवित करने के लिए काम कर रही है जो कभी मुंबई की विशेषता हुआ करती थी। इनमें वर्ली और माहिम किले भी शामिल हैं। मुंबई शहर के संरक्षक मंत्री दीपक केसरकर का विशेष ध्यान .. (9 kilometer corridor and boat ferry between Mahim Fort and Worli Fort)
इस्माईल शेखमुंबई– बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) माहिम और वर्ली किला को पुनरुद्धार के साथ-साथ पर्यटन…
0 notes
तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि. १० : समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव…
View On WordPress
0 notes
New Education Policy 2023 | मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार !
0 notes
Maharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं…
Maharashtra Cabinet Portfolio | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Maharashtra Cabinet Portfolio) जाहीर करण्य��त आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
•राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
- चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
- गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
- संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
- धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
- सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय रविंद्र सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
- अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
- दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
- अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
- संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण,
बंदरे
- मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
- अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
Read the full article
0 notes
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री केसरकर
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री केसरकर
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री केसरकर
मुंबई : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नीदेखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही गाड्या आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस धावणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
****
देशभरात आज ईद - ए - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल, असं आग्रही मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. राष्ट्रीय अभियंता दिनानिमितत काल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते. यंदाचा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्फेरोकास्टचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांना देण्यात आला.
****
केंद्राच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे. संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते काल पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद आणि बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार ६५३ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरालगत हर्सूल इथल्या हरसिद्धी माता मंदिरात भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरता २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असं आश्वासन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला आणि मंदिर परिसराची पाहणी केली.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रिकेश मोरे असं या मुलाचं नाव असून, तो गणेशपूर पिंप्री इथला रहीवासी होता. अन्य एका घटनेत गौताळा अभयारण्यातल्या औट्रम घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला आहे. वन्यजीव पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. जखमी बिबट्या धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे घाटातून प्रवास करणार्यांनी सावधानता बाळगावी, असं आवहान वन विभागाने केलं आहे.
****
छत्रपती सं��ाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
0 notes
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
यासंदर्भातील अहवाल आज मंत्री श्री. सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल.…
View On WordPress
0 notes
विधानसभा प्रश्नोत्तरे | खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि.२३ : विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी…
View On WordPress
0 notes
#nbinewsmarathi: दीपक केसरकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एक...
0 notes
कुछ दिन नहीं...2024 तक हमारी सरकार रहेगी, उसके बाद भी आएगी, संजय राउत को किसने सुनाया?
मुंबई: को (Eknath Shinde) के विधायक संजय गायकवाड ने जमकर सुनाया है। उन्होंने कहा कि हमारे बीच में कोई युद्ध नहीं शुरू है, हम सब एक मन वाले लोग हैं। आप अपने बचे हुए 15 विधायकों को संभालें। दरअसल आज सुबह संजय राउत (Sanjay Raut) ने पत्रकारों से बातचीत के दौरान यह कहा था कि शिंदे गुट में जल्द ही बड़ी फूट पड़ेगी और उनके ज्यादातर विधायक बीजेपी (BJP) में शामिल हो जाएंगे। इसी बात पर शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) ने संजय राउत पर पलटवार किया है। गायकवाड कहा कि अगले कुछ दिन ही नहीं साल 2024 तक हमारी सरकार रहेगी और उसके बाद भी हम ही चुनाव जीतकर आएंगे। संजय गायकवाड ने स्पष्ट करते हुए कहा कि हमारे बीच में कोई टोली युद्ध नहीं है। थोड़े बहुत मतभेद हर पार्टी में होते हैं। संजय राउत के पास अब सिर्फ 15 लोग बचे हैं, जितना संभाल सकते हो उन्हें संभालो। हम सभी पचास लोग एक दिल और एक मन के हैं। हमारे नेता एकनाथ शिंदे हैं। इसलिए आपको फिक्र करने की जरूरत नहीं है।
संजय राउत ने क्या कहा था?
उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने सोमवार की सुबह बड़ी भविष्यवाणी की। उन्होंने कहा कि राज्य की शिंदे-फडणवीस सरकार ज्यादा दिनों की मेहमान नहीं है। शिंदे गुट भी कई टुकड़ों में टूट जाएगा। शिंदे गुट के ज्यादातर नेता बीजेपी में शामिल हो जाएंगे और यह बीजेपी (BJP) का लक्ष्य भी है। संजय राउत ने इसके पीछे दो बड़े कारण बताए। उन्होंने कहा कि शिंदे गुट के नेताओं को शिवसेना स्वीकार नहीं करेगी। जिसकी वजह से उनके पास बीजेपी में शामिल होने के अलावा दूसरा कोई विकल्प नहीं बचता है। इसलिए शिंदे गुट के ज्यादातर नेता बीजेपी में शामिल हो जाएंगे। संजय राउत ने शिंदे गुट के मंत्री दीपक केसरकर पर निशाना साधा है। राउत ने कहा कि दीपक केसरकर कहते हैं कि उद्धव ठाकरे को आत्म परीक्षण करने की जरूरत है। अगर उद्धव ठाकरे ने आत्म परीक्षण किया तो शिवसेना को दोबारा एकजुट होने में समय नहीं लगेगा। संजय राउत ने कहा कि जिसको आत्म परीक्षण करना है वह करे। उद्धव ठाकरे के साथ जो लोग हैं वही असली शिवसेना है।
अगर गद्दार लोग हमें आत्मपरीक्षण करने की सलाह देंगे तो यह ठीक नहीं है। राज्य की जनता को यह तय करने का अधिकार है। जो गद्दार हैं, जो पार्टी को छोड़कर गए हैं। उन्हें जनता दोबारा विधानसभा में या लोकसभा में जीतकर नहीं आने देगी। उद्धव ठाकरे के नेतृत्व शिवसेना बढ़ रही है। राउत ने कहा कि लगता है खुद दीपक केसरकर ने आत्म परीक्षण किया है। जिसके बाद वह यह बोल रहे हैं। उनके गुट में और भी कई गुट निर्माण हुए हैं और उनके बीच में अब युद्ध शुरू है। इस तरह की जानकारी भी मेरे पास आई है। http://dlvr.it/SgFrx9
0 notes
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
यासंदर्भातील अहवाल आज मंत्री श्री. सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल.…
View On WordPress
0 notes