#कॅलरीज
Explore tagged Tumblr posts
balancedlifeinmarathi · 1 year ago
Text
योगाने वजन कसे कमी करावे ? Yoga For Weight Loss In Marathi 
Yoga For Weight Loss In Marathi वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी योग हा एक प्रभावी आणि आनंददायक मार्ग असू शकतो. हे केवळ कॅलरीज बर्न करण्यास मदत करत नाही तर सजगता, शरीर जागरूकता आणि एकूणच आरोग्यास प्रोत्साहन देते. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात योगाचा समावेश कसा करावा याच्या काही टिपा येथे आहेत.
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
कंटोला: एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी
कांटोला, ज्याला मणक्याचे करवंटी किंवा तिळगुळ म्हणूनही ओळखले जाते, ही एक अनोखी आणि बहुमुखी भाजी आहे जी भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्याच्या विशिष्ट काटेरी बाह्य आणि कोमल मांसासह, कांटोला हा विविध प्रदेशातील विविध पाककृतींमध्ये एक लोकप्रिय घटक आहे.
कंटोला हा लौकी कुटुंबातील आहे आणि त्यात भरपूर पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. त्यात कॅलरीज कमी आहेत आणि आहारातील फायबरने भरलेले आहे, जे निरोगी आहार राखू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवते. याव्यतिरिक्त, कंटोला अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देतात.
भारतीय पाककृतीमध्ये, कँटोला विविध पदार्थांमध्ये वापरला जातो, ज्यात करी, स्ट्री-फ्राईज, सूप आणि लोणचे यांचा समावेश आहे. त्याची सौम्य चव आणि किंचित कडू चव मसाले आणि मसाल्यांबरोबर चांगली जोडते, ज्यामुळे डिशमध्ये खोली आणि ��टिलता वाढते. कँटोला बहुतेक वेळा इतर भाज्या, मांस किंवा मसूर यांच्याबरोबर मिसळून चवदार आणि पौष्टिक जेवण बनवले जाते.
कंटोलाचा आस्वाद घेण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे कंटोला भजी, जीरे, हळद आणि तिखट यांसारख्या मसाल्यांनी तयार केलेली एक साधी आणि चवदार तळणी. कांटोला मसाले, औषधी वनस्पती आणि शेंगदाणे यांचे चवदार मिश्रण देखील भरले जाऊ शकते, नंतर ते कोमल आणि चवदार होईपर्यंत शिजवले जाऊ शकते.
त्याच्या स्वयंपाकासंबंधी वापराव्यतिरिक्त, पारंपारिक भारतीय औषधांमध्ये त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी कंटोला देखील महत्त्वाचा आहे. पचन सुधारणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणे यासह विविध आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते. मधुमेह, संधिवात आणि श्वसनाचे विकार यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही कंटोलाचा वापर केला जातो.
कांटोला ही एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी आहे जी विविध प्रकारचे पाक आणि आरोग्य फायदे देते. पारंपारिक पदार्थांमध्ये आनंद लुटला किंवा आधुनिक पाककृतींमध्ये समाविष्ट केलेला असो, कांटोला जेवणात चव, पोत आणि पौष्टिक मूल्य जोडते. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांच्या विपुलतेने, कंटोला भारतीय पाककृती आणि संस्कृतीत कायम राखला जातो आणि साजरा केला जातो.
अधिक माहितीसाठी :-
नेहा पांडसे मालिका
अमरावती आवाज
0 notes
recipesdownloadsin · 2 years ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Weight Loss: शरीराला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत? जाणून घ्या संतुलित वजनासाठी आहाराची योग्य मात्रा
Weight Loss: शरीराला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत? जाणून घ्या संतुलित वजनासाठी आहाराची योग्य मात्रा
Weight Loss: शरीराला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत? जाणून घ्या संतुलित वजनासाठी आहाराची योग्य मात्रा सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन राखण्यासाठी सुमारे २००० ते २५०० कॅलरीज आवश्यक असतात. वजन वाढणे ही लोकांच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. ते तासन्तास जिममध्ये व्यायाम करतात, आहारावर नियंत्रण ठेवतात आणि विविध उपायांचा अवलंब करतात, तरीही…
View On WordPress
0 notes
nandedlive · 3 years ago
Text
नारळ पाणी - फायदे -२
Tumblr media
नारळपाणी हा निसर्गाचा अदभूत चमत्कार समजला जातो. त्यामुळे नारळात पाणी आणि देवाची करणी असा वाक्यप्रचार प्रचलीत आहे. अत्यंत कठीण ��वच असलेल्या शहाळयामध्ये गोड, मधुर आणि भरपूर पौष्टिक घटक असलेले व तहान भागविण्याची क्षमता असलेले थंडगार पाणी असते. या नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या नारळ पाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. प्रामुख्याने नारळपाण्यात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे गुण आहेत. त्यामुळेच की काय आजारी रूग्ण, वृध्द माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञाच्या मते नारळपाणी पिण्याची सकाळची वेळ (उपाशी पोटी) अत्यंत चांगली असते. कारण आपल्या शरिराला या वेळी उर्जेची जास्त गरज असते. नियमितपणे नारळपाणी पिल्याने आपल्या शरिरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. ज्यामुळे दिवसभर उल्साहीत व तरतरीत वाटते. ___ नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, खनिजे, इलेक्ट्रोलाईटस इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ९४ टक्के शुध्द पाणी व चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आरोग्यासाठी नारळ पाणी अत्यंत गुणकारी असते. नारळ पाणी हे एक उत्तम प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सुध्दा आहे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते व त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगापासून आपल्या शरीराला संरक्षण मिळते. यासाठी प्रत्येक माणसाने अगदी नियमितपणे एक शहाळेकिंवा एक ग्लास नारळ पाणी पिल्याने त्यांच्या आरोग्यावर चांगले परिणाम झालेले दिसून येतात. त्यामुळे व्यायाम अथवा शारीरिक कष्टाची कामे करणा-या लोकांनी नियमितपणे नारळ पाणी पिणे अत्यंत उपयोगी आहे. उपयोग :- १) पाण्याची कमतरता :- नारळ पाण्यात जवळजवळ ९४ टक्के शुध्द व नैसगींक पाणी आहे. त्यामुळे शहाळयाचे पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. नारळपाणी पौष्टिक असून गोड असले तरीही साखर मुक्त आहे. गोड व मधूर चवीच्या नारळ पाण्यात पिष्ठमय पदार्थ, चरबी व कॅलरीज अत्यंत कमी असतात. उन्हातून प्रवास झाला असेलकिंवा अती कष्टाचे काम केले असेल तेंव्हा नारळपाणी घेतल्यास शरीरात झालेली पाण्याची उणिव भरून निघते त्यामुळे नारळपाणी हा थंड पेयासाठी चांगला व आरोग्यदायी पर्याय आहे. २) त्वरीत उर्जा :- नारळ पाणी झटपट उर्जा मिळविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. व्यायामकिंवा विविध खेळामध्ये जास्त प्रमाणात शारिरीक हालचाली झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते त्यासाठी नारळपाणी पिल्याने त्वरीत शक्तीकिंवा उर्जा मिळते. शारिरीक हालचालीमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस कमी होतात. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. नारळपाण्यामध्ये खनिजे (पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम) आणि इलेक्ट्रोलईटस भरपूर असतात. त्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा ��टकन मिळते व शरीर ताजेतवाने होते. ३) पचनसंस्था :- इत�� पोषक तत्वाबरोबरच नारळ पाण्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चयापचय क्रि या चांगली होऊन बध्दकोष्ठतेची समश्या उद्भवत नाही. नारळ पाण्यात असलेले जैव एन्झाईम अन्नाचे पचन वाढविण्यास मदत करतात. तसेच नारळ पाणी पिल्याने शरीराची सामू पातळी संतुलीत राहते. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. ४) ऍन्टीऑक्सिडंट :- नारळ पाणी ऍन्टीऑक्सिडंटसने समृध्द असलेले आहे. नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सारखे कार्य करतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आजारासोबत लढा देऊन आपली सुरक्षा वाढवतात. ५) हँग ओव्हर :- नारळ पाणी हा हँगओव्हर उतरण्यासाठी नैसगीक उपाय आहे. जास्त दारू पिल्यानंतर लोक हँगओव्हर (डोके दुखणे, गरगरणे) होतात. कारण अल्कोहलमुळे शरीराचे निर्जलीकरण होते आणि तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् कमी होतात. नारळ पाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस पुन्हा पुर्ववत होऊन दारूची नशा हळु-हळु कमी होऊन हँग ओव्हर नाहिसा होतो. ६) रक्तपुरवठा :- नारळ पाण्यामुळे आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये दाहक विरोधी व रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे रक्त वाहिन्या मधील आजार आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्यास रक्त पुरवठा सुरळीत होतो. ७) कोलेस्टेरॉल नियंत्रण :- नारळ पाणी अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा समृध्द असा स्त्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यासाठी नियमितपणे नारळपाणी सेवन केल्याने दीर्घ काळापर्यंत उच्च कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. ८) लघवी वर्धक :- नारळ पाणी पिल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. लघवीचे प्रमाण वाढल्याने सुक्ष्मजंतूच्या संक्रमणापासून संरक्षण मिळते. ज्यामुळे मुत्रमार्गात संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर लघवी जास्त झाल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात व मुत्रंिपडाचे आरोग्य चांगले राहते. ९) मळमळ :- प्रामुख्याने गर्भवती महिलांमध्ये गरोदर पणाच्या सुरूवातीच्या पहिल्या व तिस-या महिन्यापर्यंत चक्कर येणे, थकवा वाटणे अथवा मळमळ करणे अशा समश्या असतात. यावर नारळपाणी अत्यंत उपयुक्त नैसगीक औषधी उपाय आहे. नारळपाणी पिल्याने थकवा, मळमळकिंवा चक्कर येणे ही प्रवृत्ती दूर होऊन आराम मिळतो. १०) कमी कॅलरीज :- नारळ पाण्यात नैसर्गीक साखरेचे प्रमाण अत्यल्प असते याशिवाय पिष्ठमय पदार्थाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळी नारळ पाणी पिल्यास आपल्या शरीरातील जास्तीचे उष्मांक (उर्जा) वाढत नाही. सामान्यत: एक कप नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला सुमारे ४५ ते ४६ कॅलरीज मिळतात. ज्या इतर फळाच्याकिंवा रसाच्या तुलनेत अत्यंत कमी असतात. ११) उलटया-जुलाब :- नारळ पाण्याचे सेवन उलटया आणि जुलाबावर अत्यंत उपयुक्त आहे. कारण नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. नारळ पाणी पिल्याने पोटात होणारी जळजळकिंवा अल्सर (जखमा) सुध्दा कमी होतात, त्यासाठी नारळ पाण्यात ंिलबाचा रस मिसलन दोन ते तीन दिवस नियमित पणे पिल्यास उलटया व जुलाब कमी होऊन आराम मिळतो. १२) शरीर डिटॉक्स :- नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपुर असते. पोटॅशियममुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते त्यामुळे पोट स्वच्छ होऊन पोटाचे आरोग्य चांगले राहते व तसेच पचनसंस्था सुधारण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्याने संपूर्ण शरिराचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो. १३) केसांची मजबती :- नारळ पाण्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो आम्लासारखी पोषक घटक असतात. ज्यामुळे टालचा भाग उत्तेजीत होऊन केस मजबूत व चमकदार होतात. -प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९ Read the full article
0 notes
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
*भेंडी.....एक पॉवर हाऊस*
माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.
इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.
या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील ��ुबलक असते. शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो ः कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त���व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्‍या साखरेचे प्रमाण रोखले जाते.
भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो.
हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते. या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो....
*|| भेंडी खा निरोगी रहा ||*
विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे.
भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्या��ना निरोगी ठेवते.
*मधुमेहींसाठी औषध*
दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.
*भेंडीचे १० फायदे*
हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील
*तर नक्की वाचा हे 10 फायदे,*
१. कँसर -भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.
२. हृदय
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
३. डायबिटीज
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
४. अनीमिया
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयरन हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.
५. पचनतंत्र
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.
६. हाडांना मजबुत बनवते
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हीटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.
७. इम्यून सिस्टम
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.
८. डोळ्यांचा प्रकाश
भेंडीमध्ये व्हिट्रमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.
९. गर्भावस्था
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे ��क पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
१०. वजन कमी करण्यात
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते..
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय
फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय
स्टार्टअप या नुसत्या एका शब्दानं तळपायापासून ते पार मस्तकापर्यंत फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाइब्स येतात. म्हणजे कसं ना तूम्ही सकाळ सकाळी एखादं सफरचंद खाल्ल तर त्याच्या कॅलरीज तुम्हाला दिवसभर मिळतात. तसचं दिवसातल्या एका स्टार्टअपच्या स्टोरीनं  पॉझिटिव्ह कॅलरीज देण्याचं काम भिडू करत असतो. आता स्टार्टअपच्या स्टोऱ्या नुसत्या वाचण्या आणि ऐकण्यापेक्षा आपणही स्वत: चं काहीतरी सुरु करावं असं तुमच्या डोक्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
priyankagondane24 · 4 years ago
Photo
Tumblr media
🟪 *वेबिनार* 🟪 ************ *White Flour - A WHITE POISON* *मैदा - एक पांढरे विष* _________________________ दिनांक - १२ मे २०२१ बुधवार सकाऴी ७.३० आणि संध्याकाळी ७.४५ वाजता _________________________ मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात. 👉🏼 मैदा कसा तयार होतो ? 👉🏼 मैद्याच्या पदार्थांचे सेवन आजकालच्या फास्ट जीवनशैलीत का वाढते आहे ? 👉🏼 मैद्याने पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात का ? 👉🏼 मैदा आणि रक्तदाब, मधुमेह, वजनवाढ, कोलेस्ट��रॉल यांचा काही संबंध असतो का ? 👉🏼 मैद्यात किती कॅलरीज आणि किती पोषण असते ? मैदा हे कशा प्रकारे एक पांढरे विष आहे, जे अनेक रोगांना निमित्त ठरते ? याबद्दल आपण जरा माहिती घेऊया या सेशनमध्ये. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत *अमित कुलकर्णी सर* (nutrition coach of indian legend cricket team 2020 2021) लिंकसाठी संपर्क (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/COugQ0aAiwQ/?igshid=18h2ftghdbogg
0 notes
biobritte2018 · 5 years ago
Photo
Tumblr media
Healthy Dry Oyster Mushrooms मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर आहारात मशरूमचा समावेश करणं फायदेशीर ठरेल. कारण मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.सध्याच्या काळात लोकं कमी श्रम करून लगेच थकतात. म्हणूनच नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो. मशरूमध्ये व्हिटामीन डी असतं. त्यामुले मशरूम खाल्याने हाडांना मजबूती मिळण्यासाठी मदत होते. मशरूममधील शरीरासासाठी आवश्यक असलेले घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरतात. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933 अधिक माहिती घ्या: http://www.mushroom-food.in/ https://www.facebook.com/biobritte.agro https://www.biobritte.co.in/ #MUSHROOM LEARNING CENTER KOLHAPUR PHONE: 9923806933 We are #mushroom supplier, #mushroom #seeds supplier. #mushrooms, #mushroombenefits, #mushroomhealth, #mushroomfood, #biobritte (at Mushroom learning Center Kolhapur) https://www.instagram.com/p/B_5LgOoBlx7/?igshid=xpkrwk8h7l2d
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
कंटोला: एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी
कांटोला, ज्याला मणक्याचे करवंटी किंवा तिळगुळ म्हणूनही ओळखले जाते, ही एक अनोखी आणि बहुमुखी भाजी आहे जी भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्याच्या विशिष्ट काटेरी बाह्य आणि कोमल मांसासह, कांटोला हा विविध प्रदेशातील विविध पाककृतींमध्ये एक लोकप्रिय घटक आहे.   कंटोला हा लौकी कुटुंबातील आहे आणि त्यात भरपूर पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. त्यात कॅलरीज कमी आहेत आणि आहारातील फायबरने भरलेले आहे, जे निरोगी आहार राखू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवते. याव्यतिरिक्त, कंटोला अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देतात.   भारतीय पाककृतीमध्ये, कँटोला विविध पदार्थांमध्ये वापरला जातो, ज्यात करी, स्ट्री-फ्राईज, सूप आणि लोणचे यांचा समावेश आहे. त्याची सौम्य चव आणि किंचित कडू चव मसाले आणि मसाल्यांबरोबर चांगली जोडते, ज्यामुळे डिशमध्ये खोली आणि जटिलता वाढते. कँटोला बहुतेक वेळा इतर भाज्या, मांस किंवा मसूर यांच्याबरोबर मिसळून चवदार आणि पौष्टिक जेवण बनवले जाते.   कंटोलाचा आस्वाद घेण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे कंटोला भजी, जीरे, हळद आणि तिखट यांसारख्या मसाल्यांनी तयार केलेली एक साधी आणि चवदार तळणी. कांटोला मसाले, औषधी वनस्पती आणि शेंगदाणे यांचे चवदार मिश्रण देखील भरले जाऊ शकते, नंतर ते कोमल आणि चवदार होईपर्यंत शिजवले जाऊ शकते.   त्याच्या स्वयंपाकासंबंधी वापराव्यतिरिक्त, पारंपारिक भारतीय औषधांमध्ये त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी कंटोला देखील महत्त्वाचा आहे. पचन सुधारणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणे यासह विविध आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते. मधुमेह, संधिवात आणि श्वसनाचे विकार यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही कंटोलाचा वापर केला जातो.   कांटोला ही एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी आहे जी विविध प्रकारचे पाक आणि आरोग्य फायदे देते. पारंपारिक पदार्थांमध्ये आनंद लुटला किंवा आधुनिक पाककृतींमध्ये समाविष्ट केलेला असो, कांटोला जेवणात चव, पोत आणि पौष्टिक मूल्य जोडते. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांच्या विपुलतेने, कंटोला भारतीय पाककृती आणि संस्कृतीत कायम राखला जातो आणि साजरा केला जातो. अधिक माहितीसाठी :- नेहा पांडसे मालिका अमरावती आवाज
0 notes
jaypakrhe · 5 years ago
Photo
Tumblr media
Motivation बहाने कैलोरी नहीं जलाती हैं. खोट्या सबबी कॅलरीज जाळत नाहीत
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
झपाट्याने जळते पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, जिम-डाएटशिवाय होतं वेटलॉस, खा हा 1 पदार्थ
झपाट्याने जळते पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, जिम-डाएटशिवाय होतं वेटलॉस, खा हा 1 पदार्थ
झपाट्याने जळते पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, जिम-डाएटशिवाय होतं वेटलॉस, खा हा 1 पदार्थ वजन वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. लठ्ठपणापासून आराम मिळवण्यासाठी लोक वजन कमी करण्याच्या विविध टिप्स वापरत असतात. तसे, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाणे टाळणे. पण या व्यतिरिक्त लोक इतर…
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Photo
Tumblr media
भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात #भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० #हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. #पुणे, #जळगाव, #धुळे, #अहमदनगर, #नाशिक आणि #सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी - ९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % #bhendi #bhindi #ladyfingers #ladyfinger #veggies #lockdown #maharashtra #pune #jalgaon #dhule #ahmednagar #nashik #satara #tarkari (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/B-7EVVAlbOM/?igshid=zziu792tza2d
0 notes
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
Tumblr media
*बीट (कंदमुळे)*
बीटाचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो.
१०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि ४३,००० कॅलरीज असतात.
*आरोग्यासाठी फायदे*
▪️ रक्तदाब कमी होतो.
बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक अॅसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक अॅसिडमुळे रक्तवाहिन्य प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम.
▪️ हृदयासाठी गुणकारी.
बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचं असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका रोखण्याचं काम नायट्रेट करतं. बीटमध्ये असलेले फायबर्स कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडला नियंत्रित करण्याचं काम करतात.
▪️ वजन कमी करण्यासाठी उत्तम.
फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं. फायबर्स तुमची भूक कमी करण्याचं काम करतात. फायबर असलेलं अन्न घेतल्याने पोट भरलं असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते आणि परिणामी वजन कमी होतं.
▪️ मेंदू तल्लख होतो.
नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नायट्रेटमुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात. रक्तवाहिन्या प्रसारण पावल्यामुळे मेंदूपर्यंत जास्तीतजास्त रक्त पोहोचतं. रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने मेंदू जोशाने काम करू लागतो.
▪️ त्वचा तजेलदार दिसू लागते.
बीटरुट्सम��्ये विटॅमीन आणि खनिज मोठ्याप्रमाणात असतात. विटॅमीन आणि खनिजांमुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलेजन प्रथिनांची वाढ होते.
▪️ डोळ्यांसाठी गुणकारी.
बीटमध्ये असलेल्या विटॅमीन अ च्या मुबलकतेमुळे मोतीबिंदू होण्याचा धोका टळतो. तसेच वयोमानामुळे येणाऱ्या अंधत्वावर प्रतिबंध लागतो.
▪️पचनशक्ती वाढते.
बीटमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पोटात दुखणे, बद्धकोष्ठ सारखे त्रास होत नाहीत.
▪️ अशक्तपणा कमी होतो.
बीटमध्ये असलेलं लोहाचं प्रमाण अशक्तपणावर (रक्तक्षय) मात करतं. लोह या खानिजामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटमध्ये असलेल्या विटॅमीन क मुळे लोह जास्तीतजास्त शोषून घेण्यास मदत होते.
▪️ जळजळ कमी होते.
बीटला लाल रंग देणाऱ्या बेटालिन रंगद्रव्यात औषधी गुणधर्म सुद्धा असतात. जळजळ होणे आणि सूज येणे या समस्या बेटालिनमुळे कमी होतात.
▪️ कॅन्सरचा धोका कमी होतो.
बीटमध्ये असलेल्या बायोअक्टीव्ह कंपाउंडमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत.बीटच्या या फायद्यावर अजूनही पूर्ण संशोधन व्हायचं आहे
0 notes
priyankagondane24 · 4 years ago
Photo
Tumblr media
🟪 *वेबिनार* 🟪 ************ *White Flour - A WHITE POISON* *मैदा - एक पांढरे विष* _________________________ दिनांक - १२ मे २०२१ बुधवार सकाऴी ७.३० आणि संध्याकाळी ७.४५ वाजता _________________________ मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात. 👉🏼 मैदा कसा तयार होतो ? 👉🏼 मैद्याच्या पदार्थांचे सेवन आजकालच्या फास्ट जीवनशैलीत का वाढते आहे ? 👉🏼 मैद्याने पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात का ? 👉🏼 मैदा आणि रक्तदाब, मधुमेह, वजनवाढ, कोलेस्टोरॉल यांचा काही संबंध असतो का ? 👉🏼 मैद्यात किती कॅलरीज आणि किती पोषण असते ? मैदा हे कशा प्रकारे एक पांढरे विष आहे, जे अनेक रोगांना निमित्त ठरते ? याबद्दल आपण जरा माहिती घेऊया या सेशनमध्ये. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत *अमित कुलकर्णी सर* (nutrition coach of indian legend cricket team 2020 2021) लिंकसाठी संपर्क (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/COugNGAHo08/?igshid=rn1ek42f52jo
0 notes
krushinama-blog · 6 years ago
Text
जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे
जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे
अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते. जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी.
अननस (प्रती 100 ग्रॅम) मध्ये उपस्थित पोषक घटक:
ऊर्जा: 50 किलो कॅलरीज फायबर: 1.4 ग्रॅम,…
View On WordPress
0 notes