Tumgik
#आसाम विधानसभा निवडणूक
pratiklambat007 · 10 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित करणार असून, त्यानंतर आचारसंहिता लागू होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरता सूचना देण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या दहा वर्षांत देशाने मोठी झेप घेतली असून प्रचंड आर्थिक प्रगती पाहिली आहे. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा मिलाफ करून देश पुढे जात असून, भारताच्या समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशावर भर दिला जात असल्याचं, पंतप्रधानांनी यात नमूद केलं.
अनेक योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरामोहरा बदलला आहे, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, मातृ वंदना योजना, जीएसटीची अंमलबजावणी, कलम ३७० हटवणं, नारी शक्ती वंदन कायदा आणि नवीन संसद भवनाचं उद्घाटन यांचा समावेश आहे. जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळेच हा बदल शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाला नव्या उंचीवर नेऊन विकसित भारत बनवण्याचा संकल्प साकारण्यासाठी देशवासियांनी साथ द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
दरम्यान, पीएम-सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक कुटुंबांची नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच लाखांहून अधिक नोंदणी झाल्याचं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. या योजनेत जास्तीत जास्त नागरीकांनी नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
प्रसार भारतीचे संचालक म्हणून नवनीत कुमार सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला. सेहगल हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
****
अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं अंगणवाडी सेविकांना मोबाइल वाटप काल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. वीज नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जेची सोय केली जाणार असून, त्यासाठी पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
सरहद शौर्याथॉन-२०२४ या स्पर्धेच्या बोधचिन्हाचं आणि संकेतस्थळाचं अनावरण काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. सरहद पुणे, भारतीय लष्कर आणि अर्हम संस्था यांच्यातर्फे येत्या ३० जून रोजी ही स्पर्धा होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या झोजिला युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारकादरम्यान होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत, भारतासह विविध देशातले धावपटू सहभागी होतील. झोजिला युद्धातल्या विजयाचा अमृत महोत्सव आणि कारगिल युद्धातल्या विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी १९ मार्चला होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विविध विद्याशाखेतील एकूण ११ हजार दोन स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल.
****
हिंगोली-मुंबई जन��ताब्दी एक्सप्रेसचं आरक्षित तिकीट हिंगोली इथं पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. सामान्य वेळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेनंतर हिंगोली रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक दोन वरील तिकीट खिडकीतून मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या गाडीचं आरक्षित तिकीट प्रवाशांना घेत येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. आंबेडकर सेनेचा ११ वा वर्धापन दिन येत्या २० मार्चला महाड इथल्या चवदार तळे याठिकाणी होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबावडेगाव या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी सेनेची रॅली जाणार आहे. डॉ. आंबेडकर सेनेचे सेना प्रमुख भाई दिन��र ठोकळ आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष  देविदास लहाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात लक्ष्यनं मलेशियाच्या खेळाडुचा २० -२२, २१ - १६, २१ - १९ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना आज बर्मिंगहम इथं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी सोबत होणार आहे.
****
0 notes
marathinewslive · 4 years
Text
विधानसभा-२०२१-लाइव्ह-विधान-सभा-चुनव-न्यूज-अपडेट्सः बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळ - विधानसभा निवडणुका २०२१ लाइव्ह: बंगाल, आसाम, शुरूसह तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीसाठी मतदान.
विधानसभा-२०२१-लाइव्ह-विधान-सभा-चुनव-न्यूज-अपडेट्सः बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळ – विधानसभा निवडणुका २०२१ लाइव्ह: बंगाल, आसाम, शुरूसह तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीसाठी मतदान.
07:03 एएम, 06-एप्रिल -2021 विधानसभेसाठी मतदान सुरू होते बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. तिसर्‍या टप्प्यातील मतदान बंगालमध्ये आणि तिसर्‍या टप्प्यात आसाममध्ये मतदान होत आहे. आसाममधील अंतिम टप्प्यातील आणि पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानास प्रारंभ. केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यातील मतदानासाठी मतदान सुरू होते.#…
Tumblr media
View On WordPress
#आसाम निवडणूक#आसाम निवडणूक 2021#आसाम विधानसभा निवडणूक#आसाममधील निवडणूक#आसाममध्ये विधानसभा निवडणूक#इंडिया न्यूज इन हिंदी#केरळ निवडणूक 2021#केरळा निवडणूक#केरळात निवडणूक#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#तामिळनाडू निवडणूक#तामिळनाडू निवडणूक 2021#तामिळनाडू मध्ये निवडणूक#तामिळनाडू विधानसभा निवडणूक#तामिळनाडूत विधानसभा निवडणूक#निवडणुकीची तारीख 2021#निवडणुकीची बातमी#निवडणूक 2021#पश्चिम बंगाल निवडणुकीची तारीख 2021#पश्चिम बंगाल निवडणूक#पश्चिम बंगाल निवडणूक 2021#पश्चिम बंगाल निवडणूक 2021 वेळापत्रक#पश्चिम बंगाल निवडणूक आयोग#पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक#पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021#पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक#पुडुचेरी निवडणूक#पुडुचेरी निवडणूक 2021#पुडुचेरी मध्ये निवडणूक#बीजेपी
0 notes
marathinewslive · 4 years
Text
आसाम विधानसभा निवडणूक 2021 कॉंग्रेस लीड महागठबंधनचा विस्तार बीपीएफ आणि आरजेडी असोसिएटेड - आसाम: कॉंग्रेसप्रणीत महाआघाडीचा विस्तार, बीपीएफ आणि आरजेडीचा समावेश
आसाम विधानसभा निवडणूक 2021 कॉंग्रेस लीड महागठबंधनचा विस्तार बीपीएफ आणि आरजेडी असोसिएटेड – आसाम: कॉंग्रेसप्रणीत महाआघाडीचा विस्तार, बीपीएफ आणि आरजेडीचा समावेश
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका शनिवारी आसाममध्ये कॉंग्रेसप्रणीत सहा पक्षांच्या विरोधी महाआघाडीचा विस्तार झाला. आघाडीतही बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आणि राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) सामील झाले आणि त्यांनी आसाममधील तीन-टप्प्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरूद्धची स्थिती आणखी मजबूत केली. बीपीएफचा सध्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेवर राजकीय विधाने जोरदार, कोणाचे काय वाचा, बीजेपी, कॉंग्रेस, टीएमसी
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेवर राजकीय विधाने जोरदार, कोणाचे काय वाचा, बीजेपी, कॉंग्रेस, टीएमसी
पाच राज्यांची सद्य स्थिती – फोटो: अमर उजाला ग्राफिक्स अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका शुक्रवारी निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वक्तृत्व तीव्र झाले आहे. प्रथम, काही पक्षांनी निवडणुकीच्या वेळापत्रकात प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, काहींमध्ये जोरदार…
Tumblr media
View On WordPress
#आसाम निवडणुकीची तारीख#आसाम निवडणुकीची तारीख 2021#आसाम निवडणूक#आसाम निवडणूक 2021#आसाम निवडणूक 2021 चे वेळापत्रक#आसाम निवडणूक आयोग#आसाम विधानसभा निवडणूक#आसाम विधानसभा निवडणूक 2021#आसाम विधानसभा निवडणूक 2021 तारीख#आसाममधील निवडणूक#आसाममध्ये विधानसभा निवडणूक#इंडिया न्यूज इन हिंदी#केरळ निवडणुकीची तारीख 2021#केरळ निवडणुकीचे वेळापत्रक 2021#केरळ निवडणूक 2021#केरळ विधानसभा निवडणूक 2021#केरळमधील विधानसभा निवडणूक#केरळा निवडणुकीची तारीख#केरळा निवडणूक#केरळा विधानसभा निवडणूक#केरळा विधानसभा निवडणूक 2021 तारीख#केरळात निवडणूक#केराळा निवडणूक आयोग#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#तामिळनाडू निवडणुकीची तारीख#तामिळनाडू निवडणूक#तामिळनाडू निवडणूक 2021#तामिळनाडू निवडणूक 2021 चे वेळापत्रक#तामिळनाडू निवडणूक आयोग#तामिळनाडू मध्ये निवडणूक
0 notes
marathinewslive · 4 years
Text
आसाम: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकराझारमध्ये जाहीर मेळावा घेतला, पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे मोठे मुद्दे जाणून घ्या
आसाम: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकराझारमध्ये जाहीर मेळावा घेतला, पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे मोठे मुद्दे जाणून घ्या
{“_ आयडी”: “606573ebb9eef8178e314ac4”, “स्लग”: “आसाम-पंतप्रधान-नरेंद्र-मोदी-सार्वजनिक-रॅली-इन-कोकराझार-ज्ञात-मोठे-पॉइंट्स ऑफ-पीएम-मोदी-स्पीच”, “प्रकार” : “कथा”, “स्थिती”: “प्रकाशित करा”, “शीर्षक_एचएन”: “0 u0915 u094b u0915 u0930 u093e u091d u093e u0930: u092b u0941 9 9 9 9 0 . u091c u093e u0928 u0947 u0902 u092a u0940 u090f u092e u092e u094b u0926 u0940 u0915 u0947 u092d u093e u0937 u0923 u0921…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
पश्चिम बंगाल आसाम केरळ तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लाइव्ह अद्यतने शिवराज म्हणाल्या थेरस वेव्ह ऑफ चेंज बीजेपी टीएमसी आयडमक डावा शाह
पश्चिम बंगाल आसाम केरळ तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लाइव्ह अद्यतने शिवराज म्हणाल्या थेरस वेव्ह ऑफ चेंज बीजेपी टीएमसी आयडमक डावा शाह
गोषवारा पश्चिम बंगाल निवडणुका आठ टप्प्यात होणार आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा 27 मार्च रोजी आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. या मालिकेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान रविवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. कोलकात्यातील कालीघाट मंदिरात त्यांनी पूजा केली आणि देवीचा आशीर्वाद घेतला. अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करण्यास सक्षम राहणार नाहीत, हे कारण आहे - आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करू शकणार नाहीत, हेच कारण आहे
आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करण्यास सक्षम राहणार नाहीत, हे कारण आहे – आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करू शकणार नाहीत, हेच कारण आहे
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका विधानसभा निवडणुकीत आसाममधील एक लाखाहून अधिक मतदार आपले मत देऊ शकणार नाहीत. राज्यातील तीन टप्प्यांच्या निवडणुकीत 1.08 लाख मतदारांना संशयास्पद मानले गेले आहे, त्यामुळे त्यांना मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) नितीन खाडे यांनी शनिवारी ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१: कॉंग्रेस नेते राहुल गांधी थुथुकुडीत दाखल - तामिळनाडूमधील राहुल गांधी म्हणाले: 'भारतात लोकशाही मरण पावली आहे याची खंत आहे')
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१: कॉंग्रेस नेते राहुल गांधी थुथुकुडीत दाखल – तामिळनाडूमधील राहुल गांधी म्हणाले: ‘भारतात लोकशाही मरण पावली आहे याची खंत आहे’)
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी थुथुकुडी जिल्ह्यात दाखल झाले. थुथुकुडी येथे पोहोचल्यानंतर समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.थुथुकुडी येथे एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकार आणि आरएसएसवर जोरदार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
आसाममध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात पाच रुपयांची दारू शुल्क 25 टक्क्यांनी कमी होणार आहे
आसाममध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात पाच रुपयांची दारू शुल्क 25 टक्क्यांनी कमी होणार आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती – फोटो: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका आसाममधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जनतेला हर्ष देण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जात आहेत. आजकाल देशभरात इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ मे २०२१ दुपारी १.०० वा. ****
मुंबई राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी, आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून, १२ वर्षे करण्याचा, आणि प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. तसंच सध्या बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावं लागत आहे, त्यामध्ये बदल करुन, सदरचा कालावधी हा दोन वर्षे करण्याचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं, सद्यस्थितीचा आढावा गृहमंत्र्यांनी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. राज्यातली कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना, त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
****
राज्यातल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देशातल्या काही राज्य सरकारांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं असून, राज्यात अनेक स्तरातून ही मागणी होत असल्याचं, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  
****
जागतिक परिचारिका दिन आज साजरा होत आहे. कोविड-19 च्या लढ्यात पहिल्या फळीत काम करणाऱ्या परिचारिकांना, धन्यवाद देण्याचा हा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देश निरोगी राहण्यासाठी परिचारिका बजावत असलेलं कर्तव्य, आणि त्यांची कामाप्रती बांधिलकी अनुकरणीय असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही, परिचारिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी, राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांना, १७६ कोटी २९ लाख पाच हजार रुपये निधी वितरित केला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर इथल्या विभागीय आयुक्तांना, हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबादसाठी सहा हजार १५४ लाख रूपये, कोकणासाठी एक हजार ६१४ लाख रुपये, पुण्यासाठी दोन हजार ८१० लाख रूपये, नाशिक साठी चार हजार १९९ लाख रूपये, अमरावतीसाठी दोन हजार ९१ लाख रूपये, तर नागपूरसाठी, ७५९ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
****
शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना, शेतीशी निगडीत सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्याच्या दृष्टीने, अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसंच या पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत, “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील, सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणं अनुदानावर उपलब्ध होणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या १५ मे पर्यंत अर्ज करणं बंधनकारक आहे.
****
देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती, या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून, पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड बधितांची संख्या कमी होत असली, तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी जिल्ह्यात आज दुपारपासून २३ मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू केली आहे. या काळात नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण असेल तरच बाहेर पडता येणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सोमवारी हा निर्णय घेतल्यानंतर काल आणि आजही नागरीकांनी बाजारात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीनं शहरातील बाल रोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली, तसंच सर्व रुग्णालयांना २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनेही शंभर खाटांचं बाल रुग्णालय कोरोना बधितांसाठी उभारण्यात येणार आहे.
****
0 notes