#वेळ
Explore tagged Tumblr posts
Text
अहंकाराचा फुगा फुटला , विरोधी पक्षनेत्यांची नावे घेऊन मते मागायची मोदींवर वेळ
देशात आगामी काळात 2024 लोकसभा निवडणूक आणि त्याआधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये जर पराभव झाला तर 2024 ची लोकसभा निवडणुक भाजपला लढवणे अत्यंत अवघड होणार आहे सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे काहीही करून विधानसभा निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने आता भाजपच्या निवडणूक यंत्रणेकडून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fde3e10e24d3d3d3296528a412987a40/10d86a6fdff78dd5-57/s540x810/67d5ef85399aa708fd8eec11ebb720c05cff4d4c.jpg)
View On WordPress
0 notes
Text
माझ्या डावीकडे तू एका वहीत काहीतरी लिहत होतास पण रोमन अक्षरांतले ते शब्दं मी वाचले नाहीत सिनेमा हॉलमध्ये अंधार व्हायला अजून वेळ होता पण त्या गोष्टींच्या अंधारात तुझे शब्दं टिकणार नाहीत
जागेत बसून डोळे वळवले डावीकडे, तरी तुझं लेखन वाचायची हिंमत झाली नाही असती हिंमत तर निर्लज्जपणे तुझे शब्दं त्या कृत्रिम प्रकाशात वाचून काढले असते मग ते मला पटतात का, पटत नाहीत का, या सगळ्याचा विचार करून तुझी कवटी कोरली असती व त्यातले विचार चावून गिळले किंवा थुकले असते
पण नजरेला रोखून मी माझ्या फोनचा पडदा पाहत बसलो तेच ते डिस्कॉर्डवरचे संदेश, तेच ते टंब्लरवरचे पोस्ट पण मनात तुझ्या मांडीवरची ती वही, काळ्या पेनाची ती अक्षरं कोणतं कारण काढू, की ज्याने मला त्यांच्यातला अर्थ मिळेल?
तसाच विचार झाला, की तुझे ते हस्तलिखित शब्द जर का इंटरनेटवर कोणत्यातरी अमेरिकन सर्व्हरच्या कोपर्यात बसले असते तर ते मी मोकळ्या मनाने वाचू शकलो असतो, समजू शकलो असतो तशीच तू तुझी वही बंद करून पायाजवळच्या बॅगेत टाकलीस
#marathi#indian languages#कविता#happened to me yesterday#felt like turning it into a poem#first of many? we can only hope#काव्य
16 notes
·
View notes
Text
थंड झुळुके सोबत आज पाहा मिसळले ऊन,
आज जणू की मित्र जाहले हे विरोधी गुण...!
मग स्वारी ही उन्हाची गारद करती धुके,
आणि या दवबिंदूंचे घेती गोड मुके...!
चिमुकले हे दवबिंदूं ना झाला पाहा तो हर्ष,
किरणांच्या मिठीमध्ये यांचा पाहा ना तो उत्कर्ष!
होतो जेव्हा या किरणांचा दवब���ंदूंशी मेळ,
स्पर्श करण्यासाठीही नसतो येथे वेळ,
क्षणिक असते हे वत्सल्याचे दृष्य,
आणि मग पर्णाहून दव होतो अदृश्य...
-ऋshikesh
#poems#literature#poems and quotes#poetic#marathi poetry#books#कविता#marathi#maharashtra#spilled poetry#prose#strategies#elon musk
3 notes
·
View notes
Text
🙏सत्संग 🙏सत्संग 🙏सत्संग🙏
तारीख :-
22/12/2024 (रविवार)
⌚वेळ
सकाळी :-10:00 ते दुपारी 1:00 पर्यंत
पत्ता :-
कल्याण भवन शिवतीर्था जवळ, सैनिक लॉन्स समोर संतोषी माता चौक धुळे.
💫लोकेशन :-
https://maps.app.goo.gl/3bfp3NJopL3JxiW67
☎️ संपर्क :-
8208727652
8669029645
7775839320
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/98c8d910a35f38f8610c9cfd6feb3281/006644fd91ddefca-02/s540x810/f97a8a93b55afde6182edfa71fb01d9f33bfe867.jpg)
3 notes
·
View notes
Text
49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि ��ाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व प्रथम, त्यांच्या जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचणींना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:, भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) स���पून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होते��. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8bcfc2c1da8ceba06d94f8ce37b79463/bfe60cde92e4ce53-f4/s1280x1920/1344b4c1f6c61bb1279a06ea3378b7ed69ce8945.jpg)
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी ति��डे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bc551a649dff4211349914ffcb31a3de/bfe60cde92e4ce53-5d/s540x810/018d7ec37e2c279051bef3723fdab13baa85e55c.jpg)
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. ��िच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत ���स्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/18df813d3e96113a4ccffd07c5582b5e/bfe60cde92e4ce53-8a/s540x810/b6330250b5247100aac53a8f12f3cedcf17307e5.jpg)
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes
·
View notes
Text
फेब्रुवारीतच एप्रिल-मे इतका उकाडा ; देशातून 'हा' ऋतू नामशेष होईल, तज्ज्ञांचा इशारा | Weather changes Why February feels like April Experts warn for climate patterns and its impact imd alert
Weather News : हवामान बदल आणि त्यांचे परिणाम…. या विषयी मागील काही वर्षांमध्ये बरंच लिहिलं, बोललं गेलं. आता मात्र त्यावर विचार करण्याची वेळ आही आहे कारण… — À lire sur zeenews.india.com/marathi/india/weather-changes-why-february-feels-like-april-experts-warn-for-climate-patterns-and-its-impact-imd-alert/883579/amp
0 notes
Text
कधी कधी तुमच्यासाठी महत्वाच्या "एका" नात्याला जपण्यासाठी तुमच्याशी निगडित इतर नात्यांवर तुमच्याकडून सहजपणे पण नकळत अन्याय होत जातो. पुढे गेल्यावर जेव्हा ही प्रभावित नाती "व्यक्त" होवू लागतात तेव्हा आपल्या वागण्याने त्यांच्या मनात वेळोवेळी रुतलेले काटे, त्याच्या जखमा प्रसंगी भळाभळा वाहू लागतात. तुम्ही स्तब्ध होता. "इतकी घुसमट" आपण सोबत असूनही कधीच का वाचू शकलो नाही ह्याची खंतही वाटते पण वेळ नावाची गोष्ट नेहमीप्रमाणे निघून गेलेली असते...
एखादं पुस्तक वाचताना आपल्याला आवडलेल्या पानावरच रेंगाळत इतर पानांवरील शब्द अर्थहीन समजून ते पुस्तक त्याच पानावर संपवावे असंच काहीसं घडतं....मनमानसी
0 notes
Text
हळदी-कुंकू समारंभाचे स्नेहपूर्ण आमंत्रण
मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू समारंभ यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक मराठी संस्कृतीच्या साक्षीने साजरा होत आहे. हा मंगल सोहळा आपल्या उपस्थितीने अधिकच रंगतदार व संस्मरणीय होईल.
📅 दिनांक: २ फेब्रुवारी २०२५ ⏰ वेळ: सायं. ६:०० ते ८:३० 📍 स्थळ: हनुमान मंदिराजवळ , हनुमान चौक, मुलुंड पूर्व.
सौभाग्याच वाण आणि सावित्रीचा वसा घेऊन ह्या आनंदोत्सवात सामील व साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. आपल्या सहवासाने आणि शुभेच्छांनी हा क्षण अविस्मरणीय बनवूया.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8016e83b529545b483a9803d20e62ff3/e0fba9e1a62fad92-46/s540x810/3e447c93890015968243022c97f048f4593b3463.jpg)
मौनी अमावस्या, जो 2025 में आएगी, हिंदू कैलेंडर में एक महत्वपूर्ण दिन है, जो आध्यात्मिक जागरण और चिंतन के लिए समर्पित है। यह दिन लाखों भक्तों द्वारा मनाया जाता है, जो इसे मौन और प्रार्थना के क्षण के रूप में मानते हैं। इस दिन से जुड़े अनुष्ठान व्यक्ति को दिव्य से गहरे संबंध स्थापित करने में मदद करते हैं, जो शांति और जागरूकता लाते हैं। यदि आप मौनी अमावस्या 2025 की सही तारीख और इस आध्यात्मिक आयोजन के महत्व के बारे में जानना चाहते हैं, तो इस दिन की तैयारी करना महत्वपूर्ण है।
मौनी अमावस्या 2025 का महत्व
2025 में मौनी अमावस्या एक विशेष दिन होगी, जब लाखों लोग उपवास, ध्यान और मौन प्रार्थनाओं के अनुष्ठानों में भाग लेंगे। भक्तों का विश्वास है कि इस दिन मौन रहना आध्यात्मिक लाभ देता है और मन को शु��्ध करता है। यह दिन दान के लिए भी एक महत्वपूर्ण अवसर है, जब लोग दूसरों की भलाई के लिए योगदान देते हैं और आनेवाले साल में समृद्धि की कामना करते हैं।
वेळ आमवशा 2025 के बारे में अधिक जानकारी, जैसे समय और धार्मिक अनुष्ठान, के लिए आप आधिकारिक वेबसाइट पर जा सकते हैं: मौनी अमावस्या 2025।
मौनी अमावस्या 2025 का पालन कैसे करें
मौनी अमावस्या 2025 का पालन एक गहरे आध्यात्मिक अनुभव का अवसर होता है। लोग अक्सर मंदिरों में जाते हैं, पवित्र नदियों में स्नान करते हैं और दिन को शांतिपूर्वक चिंतन में बिताते हैं। इस दिन लोग दान भी करते हैं, जिससे समाज में बदलाव आता है। नारायण सेवा संस्थान इस दिन पर कई कार्यक��रमों का आयोजन करता है, और आपकी दान राशि से एक बड़ा बदलाव आ सकता है। उनके प्रयासों के बारे में अधिक जानने के लिए आप यहां क्लिक करें: मौनी अमावस्या 2025।
मौनी अमावस्या और महा कुम्भ 2025
मौनी अमावस्या के आयोजन के साथ-साथ, 2025 में महा कुम्भ का भव्य आयोजन भी होगा, जो दुनिया के सबसे बड़े आध्यात्मिक सम्मेलनों में से एक है। यदि आप दोनों आयोजनों में भाग लेने की योजना बना रहे हैं, तो यह जानना आवश्यक है कि ये दोनों एक साथ आध्यात्मिक नवीकरण की यात्रा में कैसे मेल खाते हैं। अधिक जानकारी के लिए यहां क्लिक करें: महा कुम्भ 2025।
आपका योगदान मायने रखता है
इस आध्यात्मिक अवसर पर यह न केवल आत्मिक शांति पाने का समय है, बल्कि दूसरों की मदद करने का भी समय है। आप नारायण सेवा संस्थान के दान अभियानों में सहयोग करके एक बड़ा बदलाव ला सकते हैं। इस मौनी अमावस्या पर, आप एक महान कारण के लिए दान करें और इसका सकारात्मक प्रभाव बनाएं। यहां क्लिक करें और योगदान दें: दान करें।
निष्कर्ष
मौनी अमावस्या 2025 एक शक्तिशाली अवसर है, जो आध्यात्मिक विकास, आत्म-चिंतन और दान के लिए है। इस दिन से जुड़े रीति-रिवाजों का पालन करके और दान देने के माध्यम से, आप अपनी आध्यात्मिक यात्रा को और अधिक प्रगति कर सकते हैं और दूसरों के जीवन में सकारात्मक बदलाव ला सकते हैं। नारायण सेवा संस्थान के साथ इस पवित्र अवसर को श्रद्धा और दया के साथ मनाने में शामिल हों।
#MauniAmavasya2025#MauniAmavasyaSnan#MouniAmavasya#MaghiAmavasya#AmavasyaRituals#MauniAmavasyaSignificance#SpiritualPurification#HolyDip#MauniAmavasyaCharity#MauniAmavasyaTime#MauniAmavasyaImportance#MauniAmavasyaMeaning#CharityOnMauniAmavasya
0 notes
Text
ज्यांनी हे शहर बांधले, ते केव्हाच वारले पुढच्या जन्मी ते या शहरात भोकं पाडायला आले
तिचा चेंडू कधी इथल्या गटारात हरवलेला, आता या चौकात तिला थांबायला वेळ नाही या शहरात कुठेही जाण्यासाठी लढावं लागतं, तरीच पावलांचं संगीत ऐकायला वेळ नाही
आठवणी टाकल्या बाथरूमच्या फरशीवर, फुलांच्या साबणाने धुवून काढल्या, तरी पुढच्या दिवशी पुन्हा तीच गर्दी, तीच जागा, त्याच पावलांवर त्याच मृतांच्यांचे तेच आत्मे
तिची ती आवृत्ती गटारात बुडली, आणि तिची आणखीन एक आवृत्ती बुडली सिमेंटात एक आवृत्ती वाहून गेली साबणासह, एक गेली गाणी किंचाळत, आणि एक राहिली म��झ्याकडे
#marathi#indian languages#कविता#poem#poetry#काव्य#अरे देवा यानं अजून कविता लिहिल्या आहेत#काय करायचं याचं
8 notes
·
View notes
Text
पे अँड पार्किंगवरून खून पडायची वाट पाहताय का ?, शुक्रवार सकाळचा ‘ तो ‘ व्हिडिओ किरण काळे यांनी केला शेअर
पे अँड पार्किंगवरून खून पडायची वाट पाहताय का ?, शुक्रवार सकाळचा ‘ तो ‘ व्हिडिओ किरण काळे यांनी केला शेअर
शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे अँड पार्किंगची रक्कम वसुली करणाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटला. गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे द्या. नाहीतर तुमच्या गाड्या इथून हलवा. इथे गाड्या लावायच्या नाहीत, असे मनपाचे असल्याचे सांगत काही महिला नागरिकांना म्हणू लागल्या. हा वाद काही वेळाने चांगलाच हमरी तुमरीवर आला. नागरिकांनी या वसुलीला जोरदार वि��ोध करत…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. • सर्व शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रणाली विकसित करण्याची मुख्यमंत्र���यांची सूचना. • अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामुळे सर्जनशीलतेला व्यासपीठ-केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांचे गौरवोद्वार. • हिंगोली जिल्ह्यात सारंगवाडी इथं भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी. आणि • नांदेड मेडिकल फाऊंडेशनचा सेवा पुरस्कार "शुभंकरोती फाऊंडेशन" संस्थेला जाहीर.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी २०२६ मध्ये संपणार आहे, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे आयोगाच्या शिफारशी मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले… केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिये 8th Pay Commission के मंजुरी दे दी है। प्रधानमंत्रीजी ने एक रेग्युलर रिदम के साथ पे कमिशन बनाने का जो एक संकल्प लिया है, उसके हिसाब 2016 मे सेवंथ पे कमिशन स्टार्ट हुआ था, तो 2026 मे इसका टर्म कंप्लिट होता है।
७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं स्पेस डॉकिंग प्रयोगाअंतर्गत अवकाशात उपग्रहांची जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इस्रोनं सामाजिक माध्यमावर ही घोषणा केली. या तंत्रज्ञानात यश मिळवणारा भारत हा जगातला चौथा देश बनला आहे.
राज्यातल्या नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याची सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत होते. राज्यात विविध विभागांच्या ९६९ सेवांपैकी ५३६ सेवा आपले सरकार पोर्टलवर तर ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. उर्वरित सुमारे ३४३ सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्या��नी दिले.
राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचं, मुख्यमंत्र्यांनी ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये आम्ही इनोव्हेशन सिटी ही तयार करू. ज्या प्रकारे गिफ्ट सिटी तयार झाली आहे, तशा प्रकारे इनोव्हेशनचा फोकस असलेली सर्व प्रकाराने उपयुक्त अशा प्रकारची एक इनोव्हेशन सिटी आम्ही तयार करणार आहोत. आणि अतिशय वेगाने. With the speed, we want to create this city.
शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा, यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात याबाबत झालेल्या बैठकीत बोलत होते. शासनाने शेत रस्त्यांचं वर्गीकरण केलं आहे, त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्याच्या सूचना बावनकुळे यांनी यावेळी केल्या.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार कमी करण्यात आला आहे. शिरसाट यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे.
अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामुळे सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्वार केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू काढले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते काल बोलत होते. महोत्सव समितीच्या वतीने जाजू यांचा सत्कार करण्यात आला. एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महोत्सव विशेषांकाचं, जाजू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. काल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मास्टर क्लास या सदरात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार तिग्मांशू धुलिया तसंच आशुतोष गोवारीकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
दरम्यान, एमजीएम विद्यापीठाच्या शार्ङ्गदेव महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. महागामीच्या वतीनं आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात दररोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सादरीकरणात यंदा ज्योती हेगडे यांचं रुद्र वीणा वादन, दशावतार प्रयोग, सुखद मुंडे आणि समूहाचं पखवाज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन, आदी सादरीकरणांसह दररोज सकाळी दहा वाजता शार्ङ्गदेव प्रसंग या व्याख्यानमालेसह, शार्ङ्गदेव प्रवाह या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात शार्ङ्गदेव स्पंदन हे प्रदर्��नही पाहता येणार आहे. महोत्सवाचं हे १६ वं वर्ष आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या सारंगवाडी इथल्या डोंगरावर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी भाजीचा महाप्रसाद आयोजित केला जातो. काल या ऐतिहासिक यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली. सुमारे दीड लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे… परिसरातील शेतांमध्ये पिकलेल्या ४० प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या व कंदमुळे यांचा समावेश असलेल्या १४० क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. भाजीच्या महाप्रसादाचे सेवनाने वर्षभर रोगराई होत नाही अशी गाढ श्रद्धा असलेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
नांदेड मेडिकल फाऊंडेशनचा सेवा पुरस्कार "शुभंकरोती फाऊंडेशन" या सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम या स्वरुपातले हे पुरस्कार येत्या २२ तारखेला प्रदान करण्यात येणार आहेत.
बीड इथं महारेशीम अभियानाअंतर्गत चित्ररथाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात केली. हे अभियान नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. राज्यात बीड जिल्हा रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकावर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळ��लं आहे… सध्या बीड जिल्ह्यात सुमारे साडे पाच हजार शेतकरी रेशीम उद्योगात कार्यरत आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विभागाकडून शासनमान्य कोष खुली बाजारपेठ उभारण्यात आली असून यामध्ये होणाऱ्या कोष खरेदीत बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. उसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख मागे पडून आता बीडची रेशीम उत्पादक जिल्हा म्हणून ओळख निर्माण होत आहे. रवी उबाळे आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेले आणि होऊ घातलेले मोठ्या गुंतवणूकीचे पायाभुत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करतांना, प्रकल्पाचं नियोजन तसंच प्रगतीचं मूल्यमापन होणं आवश्यक असल्याचं, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध विभागांचे १२० यंत्रणा प्रमुख आणि कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भटक्या विमुक्त प्रवर्गातल्या नागरिकांना त्यांच्या पालावर जावून विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमाचं, छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी कौतुक केलं. हा उपक्रम म्हणजे संवेदनशील प्रशासनाचं उत्तम उदाहरण असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय मिनी सरस २०२५ या महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल झालं. या प्रदर्शनात १२ जिल्ह्यातल्या बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात वीज देयक थकबाकीपोटी ९४८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात वीज देयकांची थकबाकी ३६० कोटी रुपयांवर पोहोचली असल्यानं, ही थेट कारवाई करण्यात येत असल्याचं, महावितरण कंपनीकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक प्राध्यापक हेमंत पाटील यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते झालं. हे ग्रंथ प्रदर्शन येत्या २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
धाराशिव इथल्या हजरत शमशुद्दीन गाझी यांच्या ७२० व्या उर्स निमित्त काल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संदल मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने कव्वाली गायन, मुशायरा यासारखे विविध कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
नांदेड इथ निवडणूक कामकाजात सहकार्य करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा काल जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. या शाळेने सर्व बाबींचे भरीव सहकार्य केल्यामुळे शाळेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
0 notes
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण का�� करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
1 note
·
View note
Text
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
Pradip बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..
0 notes