#कोकण
Explore tagged Tumblr posts
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात काप���न झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच स्वीकृत करण्यात आला आहे.
विकसीत भारत २०४७ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे, याविषयी माहिती दिली.
कोकण विभागातील म्हाडाच्या सदनिका आणि भूखंड विक्रीची संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल ठाणे इथं काढण्यात आली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यात आलं.
राज्यातील १६ कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नामशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानानं त्या अद्ययावत ठेवल्या जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल पुण्यात सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली,त्यावेळी ते बोलत होते. कृषी पणन मंडळात प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करावी, याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच तज्ज्ञ सल्लागाराची मदत घ्यावी, अशा सूचनाही रावल यांनी यावेळी दिल्या.
शाळांमध्ये आरटीई अंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक प्रक्रिया असून यात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय लॉटरी पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड होते आणि पात्र तसंच प्रतिक्षाधीन बालकांची यादी शाळानिहाय घोषित केली जाते. पालकांना बालकांच्या आरटीई प्रवेशासाठी काही प्रलोभनं दिली जात असतील, तर त्या प्रलोभनांना बळी न पडता त्याबाबतची माहिती जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावी. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असं प्राथमिक शिक्षण संचालनालयानं कळवलं आहे.
गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्यासाठी डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृती दलानं सादर केलेल्या आराखड्याची येत्या एक एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यासाठी आदिवासी विभागामार्फत २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनाला सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या. राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार करावा, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वित्त विभागाकडे सादर करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं.
प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम-२०२५ आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील १५ हजारांहून अधिक आदिवासी यामध्ये सहभागी होतील. सह�� दिवसांच्या या महोत्सवात, सर्व सहभागी आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याची प्रतिज्ञा घेणार आहेत. बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २०२५ हे वर्ष आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ३७ हजार ८० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याची माहिती महाकुंभ मेळा प्रशासनानं दिली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्��ाने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या, सेना दल दुसऱ्या, मध्य प्रदेश तिसऱ्या आणि महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय पुरुष संघानं ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका २-० अशी गमावली होती. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरत आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी कटकमध्ये तर शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.
मुंबई ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताची प्रार्थना ठोंबरे आणि नेदरलँडसची एरियन हार्टोनो जोडीचा सामना नाओ हिबिनो आणि ओक्साना कलाश्निकोवा जोडीविरुद्ध आहे. महिला एकेरीच्या १६ व्या फेरीत आज अंकिता राणा, श्रीवल्ली रश्मिका, माया राजेश्वरन या भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत.
0 notes
mayurabanavali · 30 days ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
कोकण महोत्सवाचे आयोजन मुलुंड मध्ये मा नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी यांनी केले. काल ह्या महोत्सवाला कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. या स्थानिक आमदार मिहिरजी कोटेचा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक कॅलेंडर प्रदान केले व नवीन वर्षाच्या शुभेच्या दिल्या .
0 notes
marmikmaharashtra · 5 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/love-triangle-in-the-series-chhotya-biochi-big-swapnam/
0 notes
sadguruswamisamarth · 5 months ago
Text
कोकण प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवते Kokan Adnavavarun Kuldevate #kuldevta #barapach #ravalnath
Kuldevat Youtube Playlist Link :
https://www.youtube.com/playlist?list=PL26KNY7sFvNcsPVScYxIxmHeiAJsEN6lW
Follow the DATTAPRABODHINEE NYAS channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaaSq9oK5cDE7kwVvZ2o
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज : https://forms.gle/4kXGqHxzdMjKk5t77
0 notes
mazhibatmi · 6 months ago
Text
Hawaman Andaj Today: IMD नुसार, आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशासह किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान मिझोराम, त्रिपुरा यासह गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जारी केले आहे. IMD ने म्हटले आहे की, गुजरात आणि राजस्थानमध्ये 28 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. तर कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर..
0 notes
mdhulap · 1 year ago
Link
कोकण रेल्वेत भरती - Konkan Railway Recruitment 2023, जाहिरात क्र: CO/P-R/1C/2023 & CO/P-R/2C/2023, मुलाखतीचे ठिकाण.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून धावणार
https://bharatlive.news/?p=184125 कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून ...
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार-नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर इथं ‘घाटी रुग्णालया’च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं वित्त मंत्री अजित पवार यांचं आश्वासन
केंद्रसरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रेचं आयोजन
आणि
विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी-बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ
****
मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे ५३ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले –
महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, आणि त्याचे सर्वेक्षणाचे आपण टेंडरदेखील काढले. मला हा विश्वास आहे, की आता येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू. आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आपण हा निर्धार केला, की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपण दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सरकारला तीन रुपये प्रतियुनीट दराने मिळणार आहे, पुढची पाच वर्ष वीजेचे दर कमी करून, घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ दिला जाणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले –
मागच्या काळामध्ये दरवर्षी आपण नऊ टक्के भाववाढ केली. पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे आपले वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. आणि सांगताना मला आनंद वाटतो, पुढचे पाचही वर्ष दरवर्षी वीजेचे भाव आम्ही कमी करत जाणार आहे. घरगुती वीजेचे भाव आणि औद्योगिक वीजेचे भावदेखील.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही देत जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत, बीडची वैभवशाली ओळख जगासमोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.
जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे-पाटील, तसंच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सतिष चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात आठ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे इथं कोकण विभागातील म्हाडाच्या सदनिकांची सोडत आज शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा, असे सांगतानाच त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासण्यात येईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. पवार यांनी आज जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याच��� २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा, असे निर्देश पवार यांनी दिले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून, त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं, तसंच जिल्ह्यातली ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत, पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देऊन त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान केलं. त्रिवेणी संगमावर पोचण्यासाठी पंतप्रधानांनी यमुना नदीतून बोटीने प्रवास केला, त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली. त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून, कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही त्यावेळी भक्तिमय झालं होतं, अशा भावना पंतप्रधानांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या.
****
केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत आहे. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा येत्या ६० ते ९० दिवसांत २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ६ हजार ६७३ ग्रामपंचायतींना, देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन, चा भाग असलेल्या या यात्रेचा उद्देश, जलसंधारण आणि मातीच्या नापिक होण्याबद्दल जनजागृती करणं, हा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज झाली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू असून, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वे सेवेची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ‘��्लॉट नं. शून्य’, या नाटकानं या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या ‘लपंडाव’ या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
****
सोलापूर इथल्या प्रतिष्ठित लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा सोलापूरचे लेखक संग्राम गायकवाड यांना मनसमझावन या कादंबरीसाठी, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना, ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे’ या आत्मपर लेखनासाठी आणि मुंबईच्या सुमती जोशी यांना बंगाली कथांच्या मराठी अनुवादासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पंचवीस हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सोलापुरी चादर, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या नऊ तारखेला सोलापूर इथं हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
जगत गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांचं आज देहू इथं आकस्मिक निधन झालं. ते तीस वर्षांचे होते. श्रीक्षेत्र देहूगाव इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यविधी होत आहेत.
****
परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वीस ते पंचवीस दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचं निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ही मुदतवाढ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे.
****
सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता आणि अवलंबित, यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन या विभागानं केलं आहे. तसंच याआधी दाखल केलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आणून द्याव्यात, असंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
बीड इथे येत्या आठ तारखेला अखिल भारतीय उर्दू कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसैन यांच्या जयंतीनिमित्त या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड शहरातल्या अमन लॉन्स या ठिकाणी संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळात हे संमेलन होणार आहे
****
0 notes
hindirashtranews · 1 year ago
Text
Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 :- महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे /कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई ( गट- ड) संवर्गातील 100 पेक्षा जास्त असणारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रशिद्ध झालेली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांनी शिपाई या रिक्त पदाकरिता उमेदवारांनी अर्ज करवा. उमेदवारांनी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने www.urban.maharashtra.gov.in किंवा https://dtp.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून विहित नमुन्या�� सादर करावा.
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 मधील शिपाई पदासाठी आवश्यक वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम निवड पद्धत कशाप्रकारे होणार आहे हे व इतर तपशील पाहण्यासाठी भेट द्या:-
https://naukarbharti.com/town-planning-and-valuation-departmentmaharashtra-recruitment-2023/
Follow this link to join Naukarbharti Telegram✉️ group:
https://t.me/+E1R06w-G0FYzMTRl
👍Like Our Naukarbharti Facebook Page https://www.facebook.com/profile.php?id=100092634662253&mibextid=ZbWKwL
Tumblr media
0 notes
projobsindia · 1 year ago
Text
DTP Maharashtra Recruitment 2023। महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांची भरती
DTP Maharashtra recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना http://www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 2 years ago
Text
एकावेळी एक दिवस
माझ्या लहानपणी शिक्षणाची सुरवातीची वर्षं मी कोकणात राहिलो होतो.त्या दिवसात सर्व देशाची गरीबी लोकांच्या हात धरून मागे लागली होती. कोकण त्याला अपवाद कसा असेल.जगात नाही तिकडची गरीबी कोकणात होती.आमची परीस्थितीती त्यामानाने बरी होती. माझ्या वर्गात दत्तू नांवाचा माझा मित्र होता.कधी कधी मी त्याच्या घरी जायचो.त्याची आई माझं प्रेमळपणे स्वागत करायची. मी त्यांच्या घरी गेलो की,तिला आनंदही व्हायचा आणि काहीशी…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Today's Weather Update | बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायमच; जाणून घ्या कोण कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस?
Tumblr media
Today’s Weather Update | राज्यात सध्या उन्हाळा ऋतू संपला असून मान्सून सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे राज्यात मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, राज्यात मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न पडला आहे. अशातच, आता कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Today’s Weather Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण राज्यातही चांगला पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कुठे होणार मुसळधार पाऊस?
आज कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कोकण इत्यादी जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागातील धबधबे आता सक्रिय होऊन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. राज्यातील काही भागांत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज उत्तर प्रदेशच्या वायव्य भागामध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामानातील बदलांमुळे उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवला आहे.
यलो अलर्ट जारी
दरम्यान, हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सध्या कोकण घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. Read the full article
0 notes
happyharmonypuppy · 2 years ago
Link
मुंबई, रायगड, अलीबाग सहित कोकण के जारी हुई चेतावनी, अरब सागर में बन रहा चक्रवात कोकण में बाढ़ आने की चेतावनी https://insightnewsstories.com/?p=8878/Warning-issued-for-Konka-including-Mumbai-Raigad-Alibag-Cyclone-forming-in-Arabian-Sea-Flood-alert-in-Konkan/ #Monsoon #MumbaiRains #Mumbai #Maharashtra #मानसून #IMD
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शासन आपल्या दारी : गट कर्ज (Loan) व्याज (interest) परतावा (repayment) योजनेसाठी आजच करा अर्ज
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या गट कर्ज (Loan) व्याज (interest) परतावा (repayment) योजनेची माहिती देण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes