#महाराष्ट्र कोविड 19
Explore tagged Tumblr posts
manvadhikarabhivyakti · 5 months ago
Text
महायुति या महा विकास अघाड़ी - महाराष्ट्र में महिला सुरक्षा की तस्वीर अपरिवर्तित
कोविड-19 महामारी के कारण लगाए गए देशव्यापी लॉकडाउन के दौरान भी महाराष्ट्र में महिलाओं के खिलाफ अपराधों की संख्या में कमी नहीं आई। राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) के आंकड़ों के अनुसार, उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली महा विकास अघाड़ी सरकार के कार्यकाल के दौरान, महाराष्ट्र में हर दिन औसतन 109 महिलाएं अत्याचार का शिकार हुईं। दुर्भाग्य से, स्थिति आज भी जस की तस बनी हुई है। बदलापुर के एक स्कूल…
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिस���व्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय ���ुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक  विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय ��ौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव कथन केले.
बाईट - कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे, जि.परभणी
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र कोरोना अपडेट: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढला तणाव, गेल्या 24 तासात संसर्गाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले; ५ रुग्णांचा मृत्यू झाला
महाराष्ट्र कोरोना अपडेट: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढला तणाव, गेल्या 24 तासात संसर्गाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले; ५ रुग्णांचा मृत्यू झाला
केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ हजार ३६९ नवे रुग्ण आढळले आहेत. 1,402 रुग्णांनी व्हायरसवर मात केली आहे ही दिलासादायक बाब आहे. आता राज्यात 25 हजार 570 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना विषाणू (कोरोनाविषाणू) प्रकरण���ंना पुन्हा एकदा वेग आला आहे. त्याच वेळी, एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendsfashion27 · 4 years ago
Photo
Tumblr media
महाराष्ट्र में कोविड-19 के 6,738 नए मामले , 91 और मरीजों की मौत मुंबई: महाराष्ट्र में कोरोना वायरस संक्रमण के 6,738 नये मामले सामने आने के बाद बुधवार को संक्रमितों की कुल संख्या बढ़कर 16,60,766 हो गई.
0 notes
krazyshoppy · 2 years ago
Text
RTI से बड़ा खुलासा- महाराष्ट्र में 2021 में एक तिहाई मौतों का गुनाहगार है डेल्टा वैरिएंट
RTI से बड़ा खुलासा- महाराष्ट्र में 2021 में एक तिहाई मौतों का गुनाहगार है डेल्टा वैरिएंट
Maharashtra Covid-19: साल 2021 में जब भारत के सभी अस्पताल कोविड -19 की डेल्टा लहर (Delta Wave) से जूझ रहे थे. इस दौरान देश की आर्थिक राजधानी महाराष्ट्र (Maharashtra) में होने वाली मौतों के ग्राफ में बीते साल की तुलना में अचानक उछाल आया था. यहां साल 2021 में सभी वजहों से होने वाली कुल मौतों की संख्या बीते साल 2020 से बढ़कर 20.47 फीसदी तक जा पहुंची थी. इस साल इस राज्य में साल 2020 की तुलना में 9.47…
View On WordPress
0 notes
studycarewithgsbrar · 2 years ago
Text
कोविड -19 - टाइम्स ऑफ इंडिया के कारण माता-पिता को खोने वाले कॉलेज के छात्रों के शिक्षा खर्च को वहन करने के लिए महा सरकार
कोविड -19 – टाइम्स ऑफ इंडिया के कारण माता-पिता को खोने वाले कॉलेज के छात्रों के शिक्षा खर्च को वहन करने के लिए महा सरकार
मुंबई, 22 अगस्त (पीटी)-महाराष्ट्र के मंत्री चंद्रकांत पाटिली सोमवार को कहा कि राज्य सरकार उन कॉलेज छात्रों की शिक्षा का खर्च वहन करेगी जिन्होंने अपने माता-पिता दोनों को खो दिया है कोविड-19 महामारी. राज्य के उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री ने विधानसभा के पटल पर कांग्रेस विधायक शिरीष चौधरी के एक सवाल का जवाब देते हुए यह घोषणा की। “931 स्नातक और 228” स्नातकोत्तर छात्र कोविड -19 महामारी के कारण विभिन्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rudrjobdesk · 3 years ago
Text
Corona Update: हर दिन डरा रहा कोरोना, मरीजों की संख्या में बढ़ोतरी जारी, महाराष्ट्र और दिल्ली में सबसे ज्यादा मामले
Corona Update: हर दिन डरा रहा कोरोना, मरीजों की संख्या में बढ़ोतरी जारी, महाराष्ट्र और दिल्ली में सबसे ज्यादा मामले
Image Source : FILE PHOTO कोरोना मरीजों की संख्या में बढ़ोतरी जारी Highlights देशभर में बीते 24 घंटे में कोविड-19 के 12,213 नए मामले बीते 24 घंटे में 11 कोरोना मरीजों की हुई मौत महाराष्ट्र और दिल्ली में सबसे ज्यादा मामले Corona Update: देश में कोरोना की रफ्तार कम होने का नाम नहीं ले रही है। करीब 4 महीने बाद कोरोना के सबसे ज्यादा केस दर्ज किए गए हैं। केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय की ओर से आज जारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
दिल्ली में मैन्क को लेकर नहीं बनें
दिल्ली में मैन्क को लेकर नहीं बनें
दश में कोरोना महामारी अहिजी रूपह खत्ती नहीं हुई है मौसम में मौसम में भी संक्रमण ठीक हो गया है। पूरे राज्य में अच्छी तरह से हटा दिया गया है। गुडी डडवा और इससे पहले सरकार ने फैसला किया। दिल्ली में भी ऐसी ही बैठक होती है। यह सही है कि यह सही नहीं है। सरकारी के लिए से ये जानकारी दी गई है। त्योहारों से पहले सबसे पवित्रमहाराष्ट्र में मंत्री जितेंद्र आव्हाड ने इस राज्य में पूरे राज्य में वायु प्रदूषण को…
View On WordPress
0 notes
lazypenguinearthquake · 3 years ago
Text
आईपीएल 2022: स्टेडियमों के अंदर 25% भीड़ की अनुमति | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
आईपीएल 2022: स्टेडियमों के अंदर 25% भीड़ की अनुमति | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: का 15वां संस्करण इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल), जो शनिवार को मुंबई में शुरू होने वाला है, इसमें 25 प्रतिशत की वृद्धि होगी भीड़ उपस्थिति स्टेडियमों में, आयोजकों ने बुधवार को कहा। शनिवार को वानखेड़े स्टेडियम में गत चैंपियन चेन्नई सुपर किंग्स के साथ कोलकाता नाइट राइडर्स के साथ आकर्षक लीग चल रही है। आईपीएल की एक विज्ञप्ति में कहा गया है, “यह मैच एक महत्वपूर्ण अवसर होगा क्योंकि आईपीएल का…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजप���यी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक  विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले...
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र लसीकरण: राज्यातील ७५ टक्के तरुणांना दुहेरी डोस, लसीकरण युद्धपातळीवर सुरू
महाराष्ट्र लसीकरण: राज्यातील ७५ टक्के तरुणांना दुहेरी डोस, लसीकरण युद्धपातळीवर सुरू
जगात कोरोनाविरु��्धचे युद्ध सुरूच आहे. या एपिसोडमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दावा केला आहे की, सरकारने ७५ टक्के तरुणांना कोरोना लसीचा दुप्पट डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. प्रतीकात्मक चित्र देशात कोरोनाविरुद्धची लढाई सुरूच आहे. या भागात महाराष्ट्र (महाराष्ट्र) सरकारने ७५ टक्के तरुणांना कोरोनाची लस दिल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. (कोविड 19 लस) च्या दुप्पट डोस (दुहेरी डोस)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
NCP MLC दावा: शाळा बंद, मुलींची लहान वयात लग्ने यामुळे मुलांना शेतात काम करावे लागले
NCP MLC दावा: शाळा बंद, मुलींची लहान वयात लग्ने यामुळे मुलांना शेतात काम करावे लागले
एज्युकेशन डेस्क, अमर उजाला द्वारे प्रकाशित: देवेश शर्मा अपडेटेड सोम, 17 जानेवारी 2022 12:09 PM IST सारांश औरंगाबादमधील एका आमदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – फोटो: सोशल मीडिया बातम्या ऐका बातम्या ऐका औरंगाबादमधील एका आमदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
krazyshoppy · 3 years ago
Text
कोरोना के बढ़ते मामलों के बीच मुंबई में ओमिक्रोन सब वेरिएंट के 4 मरीज मिले
कोरोना के बढ़ते मामलों के बीच मुंबई में ओमिक्रोन सब वेरिएंट के 4 मरीज मिले
Omicron Sub-Variants: महाराष्ट्र (Maharashtra) में एक तरफ कोरोना (Corona) के मामलों में तेजी से बढ़ोतरी हो रही है वहीं इसी बीच कोरोना के नए वेरिएंट (Omicron Subvariant) के केस मिलने से चिताएं और बढ़ गई हैं. राज्य सरकार द्वारा दी गई जानकारी के अनुसार मुंबई (Mumbai) में 14 मई से 24 मई के बीच 4 मरीज ओमिक्रोन के सब वेरिएंट से संक्रमित हुए हैं. 3 मरीज B.A4 वेरिएंट से संक्रमित थे वहीं 1 मरीज B.A5…
View On WordPress
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
आईपीएल 2022: मैचों में भीड़ बढ़ाना चाहती है महाराष्ट्र सरकार | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
आईपीएल 2022: मैचों में भीड़ बढ़ाना चाहती है महाराष्ट्र सरकार | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
मुंबई: महाराष्ट्र सरकार भीड़ क्षमता बढ़ाने की इच्छुक आईपीएल 2022 अप्रैल के पहले सप्ताह से 50% तक, लेकिन बीसीसीआई इस मुद्दे पर अभी भी “दो-दिमाग” में है, एक विश्वसनीय स्रोत ने टीओआई को बताया। “कोविड -19 मामलों की संख्या में भारी गिरावट के साथ, राज्य सरकार आईपीएल -15 में भीड़ की क्षमता को 50% तक बढ़ाने की इच्छुक है। भूतपूर्व आईसीसीबीसीसीआई और एमसीए अध्यक्ष शरद पवारमें एक प्रमुख खिलाड़ी एमवीए राज्य…
View On WordPress
0 notes
lazypenguinearthquake · 3 years ago
Text
कोविड की वृद्धि के बीच महाराष्ट्र ने कड़े प्रतिबंध: पूरी सूची | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
कोविड की वृद्धि के बीच महाराष्ट्र ने कड़े प्रतिबंध: पूरी सूची | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: महाराष्ट्र सरकार ने शनिवार को कोविड -19 के प्रसार को रोकने के लिए 10 जनवरी से रात के कर्फ्यू सहित सख्त प्रतिबंधों की घोषणा की, जिसके कारण दैनिक संक्रमण में तेज वृद्धि हुई है। यहां राज्य सरकार द्वारा लगाए गए नए प्रतिबंध हैं: * रात 11 बजे से सुबह 5 बजे तक रात का कर्फ्यू 10 जनवरी से लगाया जाएगा *सुबह 5 बजे से रात 11 बजे तक अधिकतम 5 लोगों की आवाजाही की अनुमति *स्विमिंग पूल, जिम, स्पा,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाच्या योगदानावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त; महाराष्ट्र दौरा आटोपून राष्ट्रपतींचं दिल्लीकडे प्रस्थान.
राज्य विधिमंडळाचं १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मुंबई इथं पावसाळी अधिवेशन.
काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडून ��ंडन.
आणि
शाळांनी भू-वारसा स्थळांच्या सहली आयोजित कराव्यात - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन.
****
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान फार मोठं असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत राजभवनातल्या भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांच्या दालनांपैकी आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती बोलत होत्या. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून, राष्ट्रपतींनी अभिवादन केलं.
त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपूजा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. संस्थानच्या वतीनं साईबाबांची मूर्ती देऊन राष्ट्रपती तसंच राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं. शिर्डीहून राष्ट्रपतींनी वायूदलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी आडनावाच्या वक्तव्यावरील शिक्षेवरील पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. राहुल गांधी यांना या संदर्भात सुनावलेल्या दोन वर्ष तुंरूगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत सुरत सत्र न्यायालयानं गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आलं आहे.
****
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मुंबई इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.
****
येत्या ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान “महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. आज झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषद शतकपूर्तीचा काल��ंड मानला जातो. मात्र कोविड-19 मुळे हा महोत्सव साजरा करणे शक्य न झाल्यामुळे यंदा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्त्वाची विधेयकं, ठराव, प्रस्ताव यांचं पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचं प्रकाशन यासारख्या विविध उपक्रम तसंच कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात येणार आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
****
बुलढाणा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात सामील झाले. त्यांनी आज अधिकृतरित्या पाठिंबा देण्याचं जाहिर केलं. शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्या आज परळी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. अशा प्रकारच्य��� बातम्यांमुळे एखाद्याची विश्वासार्हता संपते, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे माध्यमांनी खात्री करुन बातम्या द्याव्या, असं त्या म्हणाल्या. चुकीचं वृत्त देणाऱ्या माध्यमाविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेली अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात्रा मार्गावरील हवामान सुधारल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. काल संध्याकाळपर्यंत ८५ हजार भाविकांनी श्री अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, उत्तराखंडमधल्या चमोली इथं डोंगरावरून दगड पडल्यानं बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या दहा दिवसांत हा महामार्ग चौथ्यांदा बंद झाला आहे.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ नुकत्याच झालेल्या खासगी बस जळीत कांडाच्या तपासात संबंधित बसचालक अपघातावेळी मद्यधुंद असल्याचं न्यायवैद्यक अहवालातून समोर आलं आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, बसचालक शेख दानिशच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्के अधिक अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे, तर बसचालकाच्या मद्यपानामुळे घडला होता का, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. ३० जूनला मध्यरात्री ही बस दुभाजकाला धडकून पेटल्यामुळे २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
****
यंदा आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे पाच हजार विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यामधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, २७ कोटी ८८ लाख रुपये इतकं उत्पन्न झाल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. यात्रेसाठी औरंगाबादसह मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
****
विद्यार्थ्यांना भू-वारसा स्थळांविषयीची माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त शाळांनी भू-वारसा स्थळांची सहली काढाव्यात असं आवाहन केंद्रीय कोळसा आणि खनिज राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. केंद्रीय खनिज मंत्रालय आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्यावतीनं औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा इथं आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भू वारसा स्थळांच्या जनजागृती मोहीमेअंतर्गत ‘अजिंठा लेणी एक भू वारसा स्थळ’ हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दानवे बोलत होते.
राज्यात अजिंठा- वेरूळ लेणी, लोणार, महाबळेश्वर मधील पाचगणी पठार, अहमदनगर जिल्ह्यात निघोज आणि गडचिरोली जिल्ह्यात वडधम ही भू वारसा स्थळे असून या ठिकाणी शैक्षणिक सहल काढून त्यांच्या विषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी असं दानवे यावेळी म्हणाले‌. प्रस्तावित जालना - जळगाव १७४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी लवकरच भू संपादन प्रक्रिया सुरू होईल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिलं. अजिंठा लेणीमुळे गावातल्या शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी होणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे अब्दुल सत्तार यांनी यावेळी लक्ष वेधले. जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोडसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
****
सामुहिक सेवा केंद्र धारकांनी पीक विमा नोंदणी करताना अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी आयुक्त, सुनील चव्हाण यांनी केलं आहे. काही सामुहिक सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याचं विभागानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. याआधीचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांना कार्यालयाच्या वतीनं निरोप देण्यात आला. त्यांची सिंधुदूर्ग इथं जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी मुदखेड तालुक्यातल्या शाळांना भेटी दिली. शिक्षकांचे पाठ निरीक्षण, शालेय पोषण आहाराची पाहणी, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शालेय मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आदी उपक्रमांची पाहणी बिरगे यांनी यावेळी केली.
****
0 notes