Tumgik
#मशीद
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाबरी मशीद विध्वंसाला 30 वर्षे : कटुता विसरून अयोध्याची पुढे वाटचाल, भीती नाही, संशय नाही
बाबरी मशीद विध्वंसाला 30 वर्षे : कटुता विसरून अयोध्याची पुढे वाटचाल, भीती नाही, संशय नाही
बाबरी मशीद विध्वंसाला 30 वर्षे : कटुता विसरून अयोध्याची पुढे वाटचाल, भीती नाही, संशय नाही अयोध्या- अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर तीन दशकांनंतर, तीर्थक्षेत्रातील लोक सर्व कटुता विसरून पुढे सरसावले आहेत आणि भीती आणि संशयाऐवजी मंगळवार मशिदीच्या विध्वंसाचा तिसावा वर्धापनदिन सामान्य दिवसाप्रमाणे घेत आहेत. बाबरी मशीद विध्वंसाच्या वर्धापनदिनानिमित्त अयोध्येत पूर्वीप्रमाणे पोलीस छावणी आणि चिलखती…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य-अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
मराठा आरक्षण अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांकडून न्यायालयात आव्हान
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा आरती करण्यास न्यायालयाकडून परवानगी
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
****
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी भावी पिढीने कायम स्मरण करावं, असं काम करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या -
आज जो युवा स्कुल-कॉलेज मे है, उनके सपने बिलकुल अलग है। हम सभी का यह दायित्व है की, अमृत पिढी के सपनों को पुरा करने मे कोई कसर बाकी ना रहे। विकसित भारत हमारी अमृत पिढी के सपनों को साकार करेगी। इसलिये हम सभी को एक साथ मिलकर संकल्पो की सिद्धी के लिये जुडना होगा। वर्ष 2047 पर्व देखने के लिये अपने साथ तब इस सदन मे नही होंगे। लेकिन हमारी विरासत ऐसी होनी चाहिये की तब की पिढी हमे याद रखे।
राष्ट्रपतींनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अयोध्येतल्या राम मंदिराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. थेट परकीय गुंतवणूक दुपटीनं वाढली असून, देश योग्य दिशेनं प्रगती करत असल्याचं त्या म्हणाल्या. कलम ३७०, तिहेरी तलाक, भारताचं जी-20 चं अध्यक्षपद, अर्थव्यवस्थेत वृद्धी, कोविड काळातलं व्यवस्थापन, आदी मुद्यांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या नऊ फेब्रुवारीपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या साक्षात्काराचं पर्व असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सकारात्मक पाऊलखुणा सोडण्याची संधी असून, सर्व खासदारांनी ही संधी सोडू नये आणि सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाचा सर्वस्पर्शी विकास होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -
जब चुनाव का समय निकट होता है, तब आम तौर पर पूर्ण बजट नही रखा जाता है। हम भी उसी परंपरा का निर्वाह करते हुये पूर्ण बजट नई सरकार बनने के बाद हम आपके समक्ष लेकर करके आयेंगे। इस बार एक दिशानिर्देशक बाके कर ले करके देश की वित्त मंत्री निर्मलाजी हम सब के सामने कल अपना बजट पेश करने वाली है। मुझे विश्वास है की देश नित्य प्रगती की उंचाईयों को पार करता हुआ आगे बढ रहा है। सर्वस्पर्शी विकास हो रहा है।
****
लोकसभा आणि राज्यसभेच्या १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. मागील अधिवेशन काळात कामकाजात व्यत्यय आणल्या प्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सरकारनं केलेल्या विनंतीवरुन राज्यसभेचे सभ��पती आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी हे निलंबन मागे घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
****
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या नुसार ज्ञानवापी परिसरातील 'व्यास का तहखाना' इथं हिंदूंना पूजा आरती करता येणार आहे. सन १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबिय या तळघरात नियमित पूजा करत, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारही बाजूंनी प्रशासनानं लोखंडी कठडे लावल्यामुळे या तळघरात जाणं शक्य नव्हतं. सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सगेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका, या याचिकेत मांडण्यात आली आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्ह्यात गार्डी इथं जाऊन बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही बाबर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ठाण्यातील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध खंडणी प्रकरणातल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग-सीबीआयनं मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या सर्वाविरोधातले आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असं सीबीआयनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारीत अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या करारामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, रोजगाराभिमुख पदवी आणि विविध संधी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, असा विश्वास कुलगुरू संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
****
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार १० गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक कंपनी, तसंच १० गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विपणन सुविधेसाठी समूह संकलन केंद्राची उभारणी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पेट स्कॅन करणं आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या स्पर्धेत ५३ सुवर्ण पदकांसह एकूण १५० पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. १०३ पदकांसह हरियाणा दुसऱ्या, तर ९१ पदकांसह तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.  या स्पर्धेत जलतरणाच्या ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या ऋषभ दास तसंच आलेफिया धनसुरा यांनी पुरुष तसंच महिला गटात सुवर्ण पदक पटकावलं
दरम्यान, लडाखमध्ये येत्या दोन फेब्रुवारीला खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात होणार असून, या स्पर्धेचं शुभंकर आणि बोधचिन्हाचं काल अनावरण करण्यात आलं.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते आज लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचे काम विहित मुदतीत प्रगणकांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
0 notes
Video
youtube
बाबरी मशीद संघर्ष यात्रा बाळासाहेब ठाकरे.. #news #indianpolitician #mumb...
0 notes
loksutra · 2 years
Text
नाशिकमध्ये पोलीस झाले कडक - अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाच्या पठणावर बंदी, न केल्यास कारवाई होणार
नाशिकमध्ये पोलीस झाले कडक – अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाच्या पठणावर बंदी, न केल्यास कारवाई होणार
(सिग्नल फोटो) 2 एप्रिल रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथील भाषणात राज ठाकरे यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर न काढल्यास त्यांचे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवतील, असा इशारा दिला होता. महाराष्ट्र (महाराष्ट्र) मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी ३ मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
PHOTO : अशी असेल अयोध्येतील भव्य 'धन्नीपूर मशीद'
PHOTO : अशी असेल अयोध्येतील भव्य ‘धन्नीपूर मशीद’
अयोध्येजवळच धन्नीपूर गावात सरकारकडून मशिदीसाठी देण्यात आलेल्या पाच एकड जागेवर हे बांधकाम होणार आहे. इथे उभारल्या जाणाऱ्या मशिदीची रचना सर्वांसमोर सादर करण्यात आलीय. जुन्या बाबरी मशिदीपेक्षा भव्य आकाराच्या या मशिदीत एकाच वेळी जवळपास दोन हजार लोक नमाजासाठी उपस्थित राहू शकतील, असं सांगण्यात येतंय. सोबतच संपूर्ण मशिदीला पर्यावरणपुरक मार्गाने म्हणजेच फक्त सौरऊर्जेच्या सहाय्याने वीजपुरवठ्याची सोय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
बाबरी मशीद प्रकरणी त्रिसदस्यीय समितीचा सुप्रीम कोर्टात सादर
बाबरी मशीद प्रकरणी त्रिसदस्यीय समितीचा सुप्रीम कोर्टात सादर
बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज तीन मध्यस्थांनी आपला अहवाल सिलबंद पाकिटातून सादर केला. या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचे कोर्टाने आधीच म्हटले आहे. दरम्यान, जमीन वाद प्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थ समितीने आधीही कोर्टात अहवाल सादर केला होता.
याआधी ८ मार्च रोजी अयोध्या प्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीची…
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाबरी मशीद विध्वंसाला आज 30 वर्ष पुर्ण;’हिंदू महासभेने केली घोषणा मशिदीत होणार हनुमान चालिसाचं पठण’
बाबरी मशीद विध्वंसाला आज 30 वर्ष पुर्ण;’हिंदू महासभेने केली घोषणा मशिदीत होणार हनुमान चालिसाचं पठण’
बाबरी मशीद विध्वंसाला आज 30 वर्ष पुर्ण;’हिंदू महासभेने केली घोषणा मशिदीत होणार हनुमान चालिसाचं पठण’ मथुरा – अखिल भारतीय हिंदू महासभेने आज हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केल्यामुळे मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह संकुलात आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.  या घोषणेनंतरच श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाहच्या आसपासच्या भागात सतर्कता वाढवण्यात आली असून प्रत्येक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरीत करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
बाबरी मशीद पतनाबाबत बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मत
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
आंदोलनात सार्वजनिक नुकसान केल्या प्रकरणी नांदेडच्या शिवसेनेच्या माजी आमदारांसह १९ जणांना पाच वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख ६० हजार रुपयांचा दंड
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स संघावर ६ गडी राखून विजय
****
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर नुकसानाचे पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल धाराशिव तसंच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले...
‘‘गारपिटीमुळे झालेलं नुकसान आहे, हे मोठं नुकसान आहे. आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि युद्‍धपातळीवर पंचनामे होतील. आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल. आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी सरकार जे आहे शेतकऱ्यांचं आहे. आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचं झालेलं जे नुकसान आहे, त्याच्यामध्ये एन डी आर एफ नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून राज्य शासनाच्या वतीनं दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.’’
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मोर्डा गावातल्या द्राक्ष बागेची पाहणी करत शेतकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यातल्या वाडी बामणी शिवारातल्या नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी तसंच माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, तसंच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यावेळी उपस्थित होते.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट आणि ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यावेळी उपस्थित होते‌. पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तत्काळ उभारणी‌करण्याचे, तसंच वनकुटे गावातल्या घरांची पडझड‌झालेल्या‌ बावीस कुटुंबांना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ घरं उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना दहा किलो गहू आणि तांदुळाचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या मागणीचं पत्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावं, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
बाबरी मशीद पतनाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अशा वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाटील यांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वत: पदाचा राजीनामा द्यावा, असं ठाकरे म्हणाले. बाबरी प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खटला चालल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. ते म्हणाले...
‘‘बाबरी पाडल्यानंतर मुंबई वाचवली ती शिवसेनाप्रमुखांनी आणि बहाद्दर शिवसैनिकांनी वाचवली. आणि ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलतायत जे शिवसैनिक नव्हतेच. तर त्यांनी अडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे, मुलाखत आहे, ती मुलाखत ऐकावी. त्याच्यात त्य��ंनी स्पष्ट म्हटलंय, की ती लोकं जी घुमटावर चढली होती ती मराठी बोलणारी होती. आणि ते प्रमोद महाजन काय किंवा कोणाचं ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. मग त्याच्यानंतर ज्या काही केसेस टाकल्या गेल्या त्या केसेसमध्ये सुद्‍धा आरोपी नंबर एक, आरोपी नंबर दोन. मी स्वतः त्या वेळेला शिवसेनाप्रमुखांसोबत लखनौ कोर्टात गेलो होतो.’’
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना, चंद्रकांत पाटील यांनी मात्र, आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगत, बाळासाहेबांचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे. 
****
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही असंही पवार म्हणाले. अदानी उद्योग समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही, मात्र विरोधी पक्ष याबाबत आग्रही असल्यास त्यांना विरोध करणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत चौथ्या पक्षाला स्थान नाही, असंही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. राजकीय व्यक्तींनी परस्परांवरची टोकाची आणि वैयक्तिक टीका टाळली पाहिजे, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं. 
दरम्यान काल सायंकाळी उशीरा उद्धव ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतली. दीड तासाच्या या भेटीत उभयतांमध्ये विविध राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस २८ मे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. सावरकरांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचं असेल तर त्यांचा जन्मदिवस साजरा करणं आवश्यक असल्याचं, सामंत यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात सोळा आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणालाही पाठिंबा देणार नाही, राष्ट्रवादीची त्यानंतर कोणतीही भूमिका नसेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.पी. पारडीवाला यांच्या पीठानं सर्व राज्यांना शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि सॅनिटरी पॅडचा पुरवठा याबाबत माहिती देण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेत मासिक पाळी व्यवस्थापन हा शिक्षणात मोठा अडथळा असल्याचं म्हटलं आहे. यावर केंद्र सरकारच्या वतीनं महान्यायअभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात बाजू मांडली. राज्यांनी विद्यमान धोरणांची माहिती दिल्यास केंद्रही त्याप्रमाणे धोरण राबवू शकतं, असं भाटी यांनी सांगितलं. त्यावर न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना चार आठवड्यांच्या आत मासिक पाळी स्वच्छता धोरण लागू करण्याचे निर्देश दिले.
****
आंदोलनात सार्वजनिक नुकसान केल्या प्रकरणी नांदेडच्या शिवसेनेच्या माजी आमदार अनुसया खेडकर यांच्या सह १९ जणांना काल नांदेड न्यायालयानं पाच वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २००८ मध्ये राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असतांना, महागाईच्या विरोधात आंदोलन केलं होतं. हिंगोली गेट परिसरात तत्कालीन आमदार खेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं, त्यात काही बस जाळण्यात होत्या तसंच पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद सलीम मोहम्मद यासीन आणि मनीषा पवार हे जखमी झाले होते. या प्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये माजी आमदार खेडकर यांच्यासह, त्यांचे पुत्र महेश खेडकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आदींचा समावेश आहे.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई इथं हे भूखंड आहेत. या जागेत असलेल्या कथित बंगल्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तीन ग्रामसेवक, माजी सरपंच, सदस्य यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. 
****
थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. सामाजिक न्याय आणि दलितांचं सशक्तीकरण, यासंदर्भात महात्मा फुले यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचं स्मरण आपण करत असून, त्यांचे विचार लाखो लोकांना आशा आणि शक्ती देतात, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- महाज्योतीच्या वतीनं काढण्यात आलेल्या अभिवादन फेरीत आमदार हरिभाऊ बागडे आणि सहकार मंत्री अतुल सावे सहभागी झाले.
डॉक्टर आंबेडकर जयंती महासमितीच्या वतीनंही महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
लातूरमध्येही काल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काल निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वं��ित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे. भुमरे यांनी काल जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या जेऊर, निपाणी, औराळा आणि फुलंब्री तालुक्यातल्या कान्हेगाव आणि बाबरा या गावांमधल्या, पाऊस आणि गारपीटबाधित शेतांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी यावेळी निपाणी ते औराळा दरम्यानच्या रस्त्यांचीही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
इंडियन प्रिमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं विजयासाठई दिलेलं १७३ धावांच लक्ष्य, मुंबई इंडियन्स संघानं ४ गडी गमावत पूर्ण केलं.  
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १८ एप्रिल पासून सुरू होणार आहेत. तर पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम तसंच इतर परीक्षा ३ मे पासून सुरू होणार आहेत. याबाबतचं सविस्तर वेळापत्रक आणि परीक्षा केंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे
****
हिंगोली इथं कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार पोलिस जमादाराचा मृत्यू झाला. सुरेश बांगर असं त्यांचं नाव आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातली बैठक आटोपून ते कळमनुरीकडे जात असताना, हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबई : मालवणी येथील मशिदीसमोर लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्या भावावर गुन्हा दाखल.
मुंबई : मालवणी येथील मशिदीसमोर लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्या भावावर गुन्हा दाखल.
पोलिसांनी मशिदीसमोर लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त पोलिसांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मशिदीत येताच नमाज पठण सुरू झाले. त्याचवेळी मिरवणुकीतील काही सदस्यांनी मशिदीसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रामनवमीच्या दिवशी मुंबईची मालवणी (मुंबई)मालवणी) परिसरातील मशिदीसमोर लाऊडस्पीकर बसवणे (मशिदीबाहेर लाऊड ​​स्पीकर) मुंबई पोलिसांसोबतचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
अन्यथा देशात तीस हजार मशिदींवर आम्ही दावा ठोकू , वातावरण तापवण्याचा प्रयत्न ?
अन्यथा देशात तीस हजार मशिदींवर आम्ही दावा ठोकू , वातावरण तापवण्याचा प्रयत्न ?
देशातील नागरिक सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारी याने परेशान असताना मूळ प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत अशातच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी ज्ञानवापी मशीद ही हिंदु संस्कृतीचे शिवलिंग असल्याचे पुरावे आहेत म्हणून या ठिकाणी रोज शिवलिंगाची पूजा झाली पाहिजे आणि मुस्लिमांनी समजूतदारपणा दाखवून मशिदीचा ताबा सोडावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
अन्यथा देशात तीस हजार मशिदींवर आम्ही दावा ठोकू , वातावरण तापवण्याचा प्रयत्न ?
अन्यथा देशात तीस हजार मशिदींवर आम्ही दावा ठोकू , वातावरण तापवण्याचा प्रयत्न ?
देशातील नागरिक सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारी याने परेशान असताना मूळ प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत अशातच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी ज्ञानवापी मशीद ही हिंदु संस्कृतीचे शिवलिंग असल्याचे पुरावे आहेत म्हणून या ठिकाणी रोज शिवलिंगाची पूजा झाली पाहिजे आणि मुस्लिमांनी समजूतदारपणा दाखवून मशिदीचा ताबा सोडावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
अयोध्येत होणार सर्वांत मोठी मशीद; बाबरचे नाव वगळले
https://bharatlive.news/?p=165430 अयोध्येत होणार सर्वांत मोठी मशीद; बाबरचे नाव वगळले
मुंबई; पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
धाराशिव तसंच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; आठवडाभरात मदतीची ग्वाही.
राज्यातल्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयात सोळा आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणालाही पाठिंबा नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार.
शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
आणि
थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
****
धाराशिव जिल्ह्यात गेल्या शनिवारी झालेल्या वादळी पावसानं झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यात तुळजापूर तालुक्यातल्या मोर्डा गावातल्या द्राक्ष बागेची पाहणी करत शेतकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यातल्या वाडी बामणी शिवारातल्या नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यावेळी उपस्थित होते.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट आणि ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणीच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते‌. पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे, तसंच वनकुटे गावातल्या घरांची पडझड झालेल्या बावीस कुटुंबांना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ घरं उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना दहा किलो गहू आणि तांदुळाचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली, ते म्हणाले –
गारपिटीमुळे झालेलं नुकसान आहे, हे मोठं नुकसान आहे. आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि युद्‍धपातळीवर पंचनामे होतील. आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल. आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी सरकार जे आहे शेतकऱ्यांचं आहे. आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचं झालेलं जे नुकसान आहे, त्याच्यामध्ये एन डी आर एफ नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून राज्य शासनाच्या वतीनं दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
****
बाबरी मशीद पतनाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अशा वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाटील यांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वत: पदाचा राजीनामा द्यावा, असं ठाकरे म्हणाले. बाबरी प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खटला चालल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना, चंद्रकांत पाटील यांनी मात्र, आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगत, बाळासाहेबांचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही असंही पवार म्हणाले. अदानी उद्योग समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही, मात्र विरोधी पक्ष याबाबत आग्रही असल्यास त्यांना विरोध करणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत चौथ्या पक्षाला स्थान नाही, असंही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. राजकीय व्यक्तींनी परस्परांवरची टोकाची आणि वैयक्तिक टीका टाळली पाहिजे, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस २८ मे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. सावरकरांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचं असेल तर त्यांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे सामंत यांनी या पत्रात म्हटलं होतं.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात सोळा आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणालाही पाठिंबा देणार नाही, राष्ट्रवादीची त्यानंतर कोणतीही भूमिका नसेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.पी. पारदीवाला यांच्या पीठाने सर्व राज्यांना शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि सॅनिटरी पॅडचा पुरवठा याबाबत माहिती देण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेत मासिक पाळी व्यवस्थापन हा शिक्षणात मोठा अडथळा असल्याचं म्हटलं आहे. यावर केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात बाजू मांडली. राज्यांनी विद्यमान धोरणांची माहिती दिल्यास केंद्रही त्याप्रमाणे धोरण राबवू शकतं, असं भाटी यांनी सांगितलं. त्यावर न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना चार आठवड्यांच्या आत मासिक पाळी स्वच्छता धोरण लागू करण्याचे निर्देश दिले. केंद्रांनी सर्व राज्यांशी समन्वय साधून एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करावं, जेणेकरून ते राज्यांच्या समायोजनासह प्रभावीपणे लागू करता येईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. सामाजिक न्याय आणि दलितांचं सशक्तीकरण, यासंदर्भात महात्मा फुले यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचं स्मरण आपण करत असून, त्यांचे विचार लाखो लोकांना आशा आणि शक्ती देतात, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- महाज्योतीच्या वतीनं काढण्यात आलेल्या अभिवादन फेरीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
डॉक्टर आंबेडकर जयंती महासमितीच्या वतीनंही महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
चित्रपट अभिनेता सलमान खान याला मारण्याची धमकी देणारा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या डोळखांब इथून अटक करण्यात आलेली ही व्यक्ती एक विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
येत्या तेरा ते पंधरा तारखांदरम्यान मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. त्यानुसार तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत, चौदा तारखेला जालना वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांत आणि पंधरा तारखेला नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
loksutra · 3 years
Text
मशिदीसमोर हात जोडून प्रार्थना करताना काश्मीर फाइल्सचे संचालक विवेक अग्निहोत्री यांचा जुना फोटो व्हायरल झाला आहे.
मशिदीसमोर हात जोडून प्रार्थना करताना काश्मीर फाइल्सचे संचालक विवेक अग्निहोत्री यांचा जुना फोटो व्हायरल झाला आहे.
विवेक अग्निहोत्री जामा मशिदीसमोर प्रार्थना करताना: सध्या सोशल मीडियावर काश्मिरी पंडितांचा मुद्दा गाजतो आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्द्यावर बनवलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सोशल मीडियापासून ते सर्वत्र चर्चा होत आहे. नुकतेच केरळ काँग्रेस आणि अनुपम खेर यांच्यात या चित्रपटावरून वाद झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यानंतर लोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
बाबरी मशिदीबाबत ओवेसी यांनी केले 'हे' वक्तव्य, म्हणाले...
बाबरी मशिदीबाबत ओवेसी यांनी केले ‘हे’ वक्तव्य, म्हणाले…
[ad_1]
नवी दिल्ली:राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ते येत्या ५ ऑगस्टला मंदिर बांधण्याच्या भूमिपूजन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणआर आहेत. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (AIMIM) नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात…
View On WordPress
0 notes