#एकनाथ शिंदे भाजप सरकार
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• युवकांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, पंतप्रधानांचा विश्वास • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काम करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन • राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात यावर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या होणार दाखल • प्रयागराज इथं शाही स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात आणि • छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्प
भारताची युवाशक्ती लवकरच विकसित राष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता, प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील, असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं. देश अनेक क्षेत्रात आपलं लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, ‘‘भारत ने हर परिवार को बँक अकाऊंटसे जोडने का लक्ष्य रखा। आज भारत का करीब करीब हर परिवार बँकिंग सेवा से जुड चुका है। भारत ने गरीब महिल���ओं की रसोई को धुयें से मुक्त करने का संकल्प लिया। हमनें दस करोड से अधिक गॅस कनेक्शन देकर इस संकल्प को भी सिद्ध किया। आज कितने ही सेक्टर्स मे भारत अपने लक्ष्यों को तय समय से भी पहले हासिल करके दिखा रहा है।’’
यावेळी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं. या उपक्रमाद्वारे ज्या सूचना आणि कल्पना तरुण नेत्यांकडून केल्या जातील, त्या राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली. एक लाख नव्या तरुण लोकांना राजकारणात आणण्याचा मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या कार्यक्रमाला दहा जानेवारीपासून सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातल्या जवळपास तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधला, तसंच दहा विषयांवरल्या सर्वोत्कृष्ट निबंधांच्या संकलनाचं प्रकाशन केलं.
दरम्यान, स्वामी विवेकानंद यांना काल त्यांच्या जंयतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
विधानसभा निवडणुकीत राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं, असं प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते काल बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केलं. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, असं सांगत शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीतही विधानसभेसारखाच विजय मिळवायचा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपचं उद्दिष्ट असल्याचं नमूद केलं. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्णशिखर असल्याचं गडकरी म्हणाले.
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.च्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून, याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते काल ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ��ोलत होते. यावेळी १७ नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल, असं सरनाईक म्हणाले.
पुण्यात होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात यंदा प्रथमच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर चर्चा होणार असल्याची घोषणा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मराठी संस्कृती जगभरात नेण्यासाठी विश्व मराठी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र या संमेलनाचा पॅटर्न बदलला असून, मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी या ग्रंथांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं आजपासून महाकुंभ मेळा सुरू झाला. आज पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान पार पडलं. यासाठी प्रशासनानं सर्व तयारी केली असून, भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षात प्रयागराज शहरात १० ठिकाणी ५५ हजार चौरस मीटरवर ६३ प्रकारची १ लाख २० हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या ४७२व्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह, राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव यावेळी उपस्थित होते. यानिमित्त, छत्रपती संभाजीनगर इथं दुचाकी फेरी काढण्यात आली. बीड शहरात जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादनासाठी नागिरक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरात राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवा निमित्त त्यांच्या जिवनचरित्राचं सामुहिक वाचन, सामुहिक महाआरती करण्यात आली. जालना शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत निघालेल्या दुचाकी फेरीमध्ये आमदार अर्��ुन खोतकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती - राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं काल उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम झाला. देवगिरी शासकीय औद्यो��िक प्रशिक्षण संस्थेतर्फे या अंतर्गत गेल्या नऊ तारखेपासून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेच्या उद्योजक होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये सध्या १७ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे, याच्या सकारात्मक परिणामांचा वेध घेणारा हा वृत्तांत.. ‘‘या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था, स्मार्ट क्लासरूम, सिंथेटिक टर्फ सह क्रीडांगण, आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गुणवत्तेची पंचसूत्री हा प्रकल्प राबवला जात आहे. या विविध उपक्रमांमुळे मनपाच्या सिल्क मिल प्राथमिक शाळेची केंद्र शासनाने PM Shri स्कूल म्हणून तर नारेगाव आणि बनेवाडी इथल्या दोन शाळांची, राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मनपाच्या किराडपुरा शाळेला गौरवण्यात आलं आहे.’’
खो-खो विश्वचषक स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये सुरुवात होत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर तर महिला संघाचं नेतृत्व बीड जिल्ह्यातली प्रियंका इंगळे करत आहे. डीडी स्पोर्टस वाहिनीवरुन रात्री साडे आठ वाजेपासून सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर ११६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकात पाच बाद ३७० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ सात खेळाडू गमावत २५४ धावांवर सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
धाराशिव इथल्या व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातले प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार शामराज यां��ा भारत सरकारचं पेटंट मंजूर झालं आहे. जलचर प्रजाती नियंत��रण पद्धतीच्या उपकरणासाठी हे पेटंट मंजूर करण्यात आलं. या उपकरणाद्वारे मत्स्यपालानातील पाण्याची गुणवत्ता आणि प्रजातीचं आरोग्य, याचं निरीक्षण करता येतं.
चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात काल बस अपघाताचा मोठा अनर्थ टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. यात ती घाटातल्या झाडांना अडकून अपघात टळला.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, "कारभार दिसला नाही पण..." | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, “कारभार दिसला नाही पण…” | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि बी जे पी सरकार��ा लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत शिंदे स��कारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले,…
Tumblr media
View On WordPress
#eknath shinde#MVA सरकार#Sharad Pawar Comment on Eknath Shinde#एकनाथ शिंदे#एकनाथ शिंदे भाजप सरकार#गुजरात सरकार#गुजरात सरकार मुख्यमंत्री#देवेंद्र फडणवीस#नरेंद्र मोदी#पंतप्रधान#पंतप्रधान नरेंद्र मोदी#महाराष्ट्र राज्य संकट#महाराष्ट्र वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प#महाराष्ट्र सरकार#महाराष्ट्राचे मुख्यमंत्री#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#वेदांत गुजरातला का शिफ्ट झाला#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरातला शिफ्ट#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित#वेदांत फॉक्सकॉन बातम्या#वेदांत फॉक्सकॉन मराठी बातम्या#वेदांत फॉक्सकॉन राजकरण#वेदांत फॉक्सकॉन राजकारण#वेदान्त फॉक्सकॉन गुजरातला#वेदान्त फॉक्सकॉन बातम्या#शरद पवार
0 notes
loksutra · 3 years ago
Text
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
महाराष्ट्र सरकारने अजित पवारांना तोच देवगिरी बंगला दिला आहे ज्यात ते उपमुख्यमंत्री म्हणून राहत होते आणि विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यात राहायचे होते. अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार गेले, सत्ता बदलली. अजित पवार त्याचा दर्जा आणि स्थान बदलले. पण त्याचा बंगला बदलणार नाही. त्यांचे देवगिरी बंगला प्रबळ होईल. महाराष्ट्र सरकार ज्या बंगल्यात ते उपमुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years ago
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना झाले. ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दोन्ही देश केवळ मजबूत व्यापार आणि ऊर्जेबाबतच भागीदार नाहीत तर पश्चिम आशिया क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी तसंच समान हितसंबंधातही भागीदार आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
संसद भवनात झालेल्या निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कथित हल्ला आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन खा��दारांना दुखापत झाल्याच्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. भाजपच्या तक्रारीवरून राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप खासदार अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह खासदार बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांनी गुरुवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानेही नागालँडच्या महिला खासदार फांगनॉन कोन्याक यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित गैरवर्तनाची स्वत:हून दखल घेतली आहे.
जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास समिती स्थापन केली आहे. काल सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. दीक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी आमच्यासाठी महत्वाचं स्थान आहे, इथं आल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं त्यांनी यावेळी म्हटलं. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही देशाचा कारभार चालवत आहोत, राज्य शासनाच्या वतीनं तालुकानिहाय संविधान भवन बांधण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या जालना बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहराल्या मुख्य बाजारातली बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानं बंद असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी पक्षाचे नेते राजेश टोपे उपस्थित होते.
दरम्यान, बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर इथं उपायुक्त असुन त्यांची पोलिस अधिक्षक म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलिस अधिक्षक म्हणून शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
राज्यात ४२ मंत्री आहेत, पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत आज ते बोलत होते. विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्ताधारी सदस्यच करीत आहे, ही गंभीर परिस्थिती असून याची उत्तरं सरकारनं द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ कोटी ३२ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली. या प्रकरणी बँकॉकहून येणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिक्षकांना शैक्षणिक कामांतून मुक्‍त करा, अशी आग्रही मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी आणि इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्‍यानं राज्‍यातील शिक्षकांत तीव्र असंतोष असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं.
आज पहिला जागतिक ध्यान दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकांना शांती आणि कल्याणाच्या भावनेनं जीवन जगण्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आहे. संयुक्त महासभेनं या संदर्भात भारतानं सहप्रायोजित केलेला ठराव नुकताच एकमतानं मंजूर केला होता. आज या निमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भारताच्या स्थायी मिशनचे प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. लक्षावधी लोक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात, प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ध्यान अभ्यासाचं नेतृत्व केलं.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"...तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल" जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
“…तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
वेदान्त-प्रकल्प गुजरातला वळवल्यावरून महाराष्ट्रातील तापलेलं राजकीय वातावरण आता शांत होताना दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्��ा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन सरकार पाडेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही...'
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही…’
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. फडणवीसांच्या या निर्णयामुळे राजकीय पंडितांनाही धक्का बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंचा भाजपलाच जोर का झटका!
Tumblr media Tumblr media
Picture Credit/Facebook/Eknath shinde मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेने��े 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपलाच जोर का झटका दिला आहे. शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका देणारा भाजप अजूनही आपला प्रचार थांबवण्याच्या मनस्थितीत नाही.दोन्ही दिवशी मुंबईत … अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes