Tumgik
#सीआयडी
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिरसरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, ९ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी - अधिक करण्यात येईल, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर-धाराशिव सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पावना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
****
नाशिक शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू - काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह २३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन टप्प्यात ही निवडणूक होत असून, मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे.
****
राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. सहज आणि सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातल्या सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्याच्या नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन अधिक रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले अशोक  ठाणेकर हे अराखीव आणि  मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम, तर नांदेड जिल्ह्यातल्या अश्विनी गायकवाड या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. ते काल धाराशिव इथं ऊस उत्पादक शेतकरी स्नेह संवाद मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, तेरणा साखर कारखाना परिसरातल्या साखर कारखान्यापेक्षा ५१ रुपये अधिकचा दर देणार असल्याचं आश्वासनही सावंत यांनी दिलं.
****
जालना शहरातल्या मुलचंद भगवानदास या रेडीमेड कापड विक्री दालनाचे संचालक अलकेश बगडिया यांनी काल स्वत:च्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
sattakaran · 10 months
Text
Dinesh Phadnis Death : ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स याचं निधन
0 notes
loksutra · 2 years
Text
जस्टिन बीबरच्या चेहऱ्याच्या अर्धांगवायूची खिल्ली उडवल्याबद्दल लॉक अप विजेता मुनावर फारुकी ट्रोल झाला.
जस्टिन बीबरच्या चेहऱ्याच्या अर्धांगवायूची खिल्ली उडवल्याबद्दल लॉक अप विजेता मुनावर फारुकी ट्रोल झाला.
टुडे टीव्ही न्यूज: छोट्या पडद्यावर रोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खळबळ उडाली आहे. या ना त्या कारणाने टीव्ही स्टार्स प्रसिद्धीच्या झोतात राहतात. अशीच परिस्थिती आजही पाहायला मिळत आहे. खतरों के खिलाडी 12 चे स्टार्स खूप चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राखी सावंतने तिच्या एक्समुळे पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. मुनव्वर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. दररोज प्रमाणे आजही आपण 5 मोठ्या टीव्ही बातम्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह Go to Source
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
Palghar Lynching Case: बापरे! पालघर साधू हत्याकांडात २५० हून जास्त आरोपी
Palghar Lynching Case: बापरे! पालघर साधू हत्याकांडात २५० हून जास्त आरोपी
[ad_1]
पालघर: येथील गडचिंचलेगावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. ‘लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. (No religious angle in Palghar lynchings,…
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
इंडोनेशियाची राजधानी बाली इथं जी - ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेचा समारोप होत असून, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी - ट्वेंटी देशांच्या पुढच्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद सोपवलं. पुढच्या वर्षी ही परिषद भारतात होणार आहे.
दरम्यान, परिषदेच्या तिसर्या सत्रात डिजिटल परिवर्तन या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. देशात सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढीवर त्यांनी भर दिला. जी - ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात विकासासाठी डेटा हा महत्वाचा विषय असेल, असं त्यांनी सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर गरिबीविरुद्ध चाललेल्या जागतिक लढ्यात महत्वाचा घटक बनू शकतो, तसंच हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत देखील डिजिटल उपाय उपयुक्त ठरू शकतात, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधानांसह जी- 20 राष्ट्रप्रमुखांनी इंडोनेशिया इथल्या कांदळवन प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरणाचं संरक्षण आणि हवामान बदल समस्येवर उपाययोजनांच्या दृष्टीनं कांदळवनांचं महत्व याद्वारे अधोरेखित केलं जात आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असून, कोणताही वाद होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस आजच अभिवादन करणार आहेत. तसंच ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाची देखील पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मुंबईत पहिल्यांदाच तरुणांना रोजगारासाठी मोबाईल व्हॅन, फूड ट्रक आणि टुरिस्ट कारचं वितरणही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या रसायनी पोलीस स्थानकात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतलं जाणार आहे. मेटे यांच्या निधनाची सीआयडी चौकशी करण्यात आली, त्यानंतर आलेल्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ ला मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला होता.
****
भूमी अभिलेख विभागातल्या गट क संवर्गातली रिक्त पदं सरळ सेवेनं भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातल्या विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी ही माहिती दिली. परीक्षेचं विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राबाबत, विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असल्याचं, विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
****
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे निर्मित अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचं अनावरण केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय समजून त्यात संशोधन करण्यात प्रादेशिक भारतीय भाषांमधील शिक्षण मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यानं ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन राज्यात नववा क्रमांक गाठला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वि��ास मीना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या मोहिमेत जिल्ह्यातल्या १८ वर्षांवरील दहा लाख २२ हजार ५१८ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात आजारी आढळलेल्या महिलांची तालुकास्तरावर तपासणी तंज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत असून त्यांना ने आण करण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था आणि आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत केले जाणार असल्याचं मीना यांनी सांगितलं.
****
गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य आणि सांसर्गिक लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के लसीकरण झालं आहे. शासनानं हाती घेतलेल्या"माझा गोठा स्वच्छ गोठा" मोहिमेसाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, सर्वेक्षण पथकंही तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत, येत्या सहा डिसेंबरपर्यंत पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय आणि अनुषांगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
६१ व्या राज्य हैशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला काल औरंगाबाद मध्ये सुरुवात झाली. शहरातल्या तापडीया नाट्य मंदिरात नाट्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दिलीप घारे, डॉ.जयंत शेवतेकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्धाटन झालं.
//**********//
0 notes
shaharvarta11 · 2 years
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
आज टीव्ही बातम्या 23 जून पलक तिवारी डेटिंग वेदांग रैना करिश्मा तन्ना पूल फोटो व्हायरल
आज टीव्ही बातम्या 23 जून पलक तिवारी डेटिंग वेदांग रैना करिश्मा तन्ना पूल फोटो व्हायरल
आज टीव्ही बातम्या: टीव्ही विश्वातील गोंधळ आजही नेहमीप्रमाणे सुरूच होता. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या डेटिंग लाइफचा खुलासा झाला असताना, करिश्मा तन्ना हिने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलमध्ये डुबकी मारली. त्याचा यासंबंधीचा फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे, सर्वांची आवडती मालिका सीआयडी पुनरागमन करत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही मजेशीर आणि मजेशीर बातम्या घेऊन आलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर https://divyamarathi.bhaskar.com/rss-v1–category-5492.xml
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….
वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….
गुरुदत्त हा तसा बऱ्याच दर्दी लोकांच्या काळजाचा विषय आहे. गुरुदत्त हा भारतीय सिनेमात सगळ्यात महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लोकांचं मन जिंकून घेण्याची ताकद गुरुदत्तच्या सिनेमात होती आणि अजूनही आहे त्यात काही वाद नाही. तसं तर गुरुदत्त हा कल्ट सिनेमा दिग्दर्शक म्हणून फेमस आहे, प्यासा, कागज के फूल, भरोसा, साहिब बिवी और गुलाम, चौदहवी का चांद, सीआयडी हे सिनेमे केवळ अप्रतिम आहेत. देख ली जमाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
आयसीजेएस प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
आयसीजेएस प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालय व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (एनसीआरबी) यांच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टम (आयसीजेएस) या विभागातील “पोलिस सर्च’ वर्गवारीमध्ये महाराष्ट्र पोलिसांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.  तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक अर्चना कदम, पोलिस कर्मचारी संदिप शिंदे व प्रियांका शितोळे या पोलिस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
खलिस्तान समर्थक  दहशतवाद्याला नांदेडमधून (Nanded) अटक करण्यात आली आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा (khalistan zindabad force) सदस्य असलेला सरबजीतसिंघ किरट (Sarabjit Singh Kirat) याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली.सरबजीतसिंघ किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू संघटनेचे नेते त्यांच्या रडारवर होते. https://www.instagram.com/p/CLD6vITnjBD/?igshid=1ro9p8tgaxbb0
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर दीड टक्का अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय  
·      राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, पहिल्याच दिवशी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
·      विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी
·      शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      निवडणुकीत राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखता येणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
·      स्वराज्य महोत्सवा अंतर्गत राज्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग  
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८०० रुग्ण, मराठवाड्यात ३७ बाधित
·      पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ, १८ दरवाजे चार फुटानं उघडले
आणि
·      भारत - झिम्बाब्वेत आज पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना
 सविस्तर बातम्या
तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर दीड टक्का अनुदान देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना, चौतीस हजार आठशे छप्पन्न कोटी रुपये देणार आहे. अशा संस्थांमधे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश होतो. बदलती आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, सरकारनं या वित्तीय संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतीच्या दरांचा आढावा घेतला. यामुळे शेतकऱ्याला कृषी क्षेत्रात पुरेसा कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल, तसंच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचं आर्थिक आरोग्य सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
प्रवास, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रासाठी आणिबाणीच्या कर्ज हमी योजनेची मर्यादा ५० हजार कोटी रुपयांनी वाढवण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे हॉटेल, पर्यटन आणि संबंधित क्षेत्रांना चालना मिळेल, असं ठाकूर यांनी सांगितलं. पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी डेटाबेसची व्याप्ती वाढवण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा अर्��मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यावर येत्या २२ आणि २३ ऑगस्टला चर्चा होऊन मतदान होईल, अशी घोषणा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी विविध अध्यादेश तसंच विधेयकं सभागृहात मांडली.
काँग्रेसकडून नाना पटोले यांनी पूर परिस्थितीवर चर्चेची मागणी केली, त्यावर, विरोधी पक्षाच्या आजच्या प्रस्तावात याचा समावेश करण्याची सूचना अध्यक्षांनी केली. राज्यातल्या पूरस्थितीवर राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून, लवकरच त्यावर विस्तृत निवेदन देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.
अधिवेशन कालावधीतल्या विधानसभा तालिका अध्यक्षांची नावं काल जाहीर करण्यात आली. यामध्ये संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.
विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक झाल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचा परिचय उपसभापतींनी सभागृहाला करून दिला.
विधिमंडळाच्या दोन्ही सदनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
दरम्यान, विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, अशा घोषणा देतानाच विरोधकांनी सरकारच्या विरोधातही घोषणा दिल्या.
****
शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य गुन्हे अन्वेषण- सीआयडी विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मेटे यांचं १४ ऑगस्टला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात निधन झालं होतं.
****
येत्या रविवारी, एकवीस ऑगस्टला, बी.एड. आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा तसंच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी सीईटी सेलला यासंदर्भात इमेलद्वारे अर्ज करावा, त्यांना सीईटी परीक्षेची तारीख बदलून दिली जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधीमंडळात केली. अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र डाॉट सी ई टी सेल ॲट जीमेल डाॉट कॅाम या आयडीवर इमेल करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
देशामध्ये २०२१-२२ या वर्षात अन्नधान्याचं उत्पादन तीनशे पंधरा दशलक्ष टनांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं या वर्षातल्या प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज काल जाहीर केला. २०२१-२२ वर्षाचं उत्पादन मागच्या पाच वर्षांच्या अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा पंचवीस दशलक्ष टनांनी जास्त आहे. भात, मका, हरभरा, कडधान्य, मोहरी, तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित आहे.
****
निवडणुकीत राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. निवडणूक काळात मोफत योजनांच्या घोषणांना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, यासंदर्भात एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या मागणीचा याचिकाकर्त्यानं पुनरुच्चार केला. त्यावर, समिती स्थापन करण्याबाबत सगळ्या पक्षकारांनी शनिवारपर्यंत आपआपल्या सूचना द्याव्यात, असे निर्देश न्यायालयानं दिले. आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत, अशी समिती स्थापन करण्याला यापूर्वीच विरोध दर्शवला आहे.
****
काँग्रेय पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षांतर्गत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांच्या राजीनाम्याच्या कारणाबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
****
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळ तसंच केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय मंडळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, माजी मंत्री सर्वानंद सोनोवाल, आदींचा समावेश केला आहे. निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसंच खासदार ओम माथूर यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
रेल्वे प्रवासात बालकांच्या तिकीट प्रक्रियेत काहीही बदल केला नसल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे. पाच वर्षाच्या आतल्या बालकांसाठी स्वतंत्र आसन नको असल्यास, त्यांना तिकीट आकारलं जाणार नाही. मात्र अशा बालकांसाठी स्वतंत्र आसन आरक्षित केल्यास, त्यासाठी पूर्ण तिकीट आकारलं जातं. हा नियम पूर्वीपासून लागू असल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात आलं. एक ते चार वर्षं वयाच्या बालकांना रेल्वे प्रवासासाठी तिकिटं घ्यावी लागतील, अशा आशयाच्या बातम्या भ्रामक असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालय-ईडीनं पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी काल मुंबईत दादर आणि कांजुरमार्ग इथं दोन ठिकाणी धाडी घातल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चौकशीदरम्यान ईडीला दिलेल्या माहितीवरून या धाडी घालण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राऊत सध्या बावीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी ईडी आणखी काही व्यक्तींना समन बजावण्याची शक्यता आहे.
****
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा - जेईई आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा - एनईईटी, या दोन्ही परीक्षा, केंद्रीय विद्यापीठ पदवी प्रवेश परीक्षा - सी ई यू टी मध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेवर विचार करणार असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे. यासाठी या महिनाअखेरपर्यंत एक तज्ज्ञ समिती स्थापन होणार आहे. ही समिती जगभरात होणाऱ्या अशा परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करेल, त्यानंतर याबाबतचा निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सुरू केलेल्या स्वराज्य महोत्सवात राज्यात काल सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विधिमंडळाच्या दोन्ही सदनात तसंच मंत्रालयात मुख्य प्रवेशद्वार आणि त्रिमूर्ती प्रांगणात, समूह राष्ट्रगीत गायन केलं. राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहानं सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं. राज्यभरातल्या विविध शाळा आणि शासकीय, निमशासकीय तसंच खाजगी संस्थांमध्येही विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहानं राष्ट्रगीताचं सामूहिक गायन केलं.
लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे एक हजार नऊशे विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं. यावेळी देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शवणारी प्रतिकृती तयार केली होती.
नांदेड इथं गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुलावर सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी सामुहिक राष्ट्रगीत गायलं.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात शहरातल्या अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या सुकळी गावात शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतशिवारात सामूहिक राष्ट्रगीत गायन करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८०० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७६ हजार १६५ झाली आहे. काल या संसर्गानं सहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर दोन हजार ८१२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १६ हजार ६१५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १६, लातूर दहा, उस्मानाबाद पाच, तर बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.  
****
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची १८ हजारांवर पदं रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक यानुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारे मंजूर पदांपैकी १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात ७८८, औरंगाबाद ६६५, बीड ५८६, जालना २३४ तर हिंगोली जिल्ह्यात ८७ जागा रिक्त असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. राज्यभरातल्या नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा इथल्या शिक्षक पदांचा आढावा घेतल्यास, राज्यातला शिक्षकांच्या रिक्तपदाचा आकडा ५० हजारांवर पोहोचत असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या परतूर इथल्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यास एक लाख रुपयाची लाच घेताना काल पकडण्यात आलं. गजानन सोनकांबळे असं या अधिकार्याचं नाव असून, शेडनेटचं अनुदान देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे चार फुटानं उघडण्यात आले असून, ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पैठण शहर तसंच नदीच्या काठावर असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
****
औरंगाबाद इथं एका महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांनी एका पत्रकाराला अटक केली आहे. सौरभ लाखे असं त्याचं नाव असून, त्याने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या एका महिलेची औरंगाबाद इथल्या ���ाहत्या घरी गेल्या सोमवारी हत्या केली. त्याने मृतदेहाचे तुकडे करून काही अवयव वैजापूर तालुक्यात शिऊर या गावी नेले होते. दरम्यान, औरंगाबाद इथल्या घरातून दुर्गंधी सुटल्याने, नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता, हा प्रकार उघड झाला. आरोपीला पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केल्याचं वृत्त आहे.
****
हिंगोली इथं झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित १८८ प्रकरणं तसंच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत तसंच नगरपालिका, आणि घरकुल योजनेची दाखलपूर्व २४५ प्रकरणं तडजोडीआधारे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात शांताबाई जिजाबा वसू या ६५ वर्षीय महिलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाणं शक्य नसल्यानं, मोटार अपघात वाद निवारण मंचासमोरच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावणीसाठी जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे हे स्वत: पॅनलवरुन उतरुन लॉबीमध्ये बसलेल्या शांताबाईंपर्यंत गेले, त्यांची बाजू ऐकून घेतली, आणि साडे नऊ लाख रुपये नुकसान भरपाईवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढलं.
****
अहमदनगर - पुणे महामार्गावर काल पहाटे झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या आव्हाने गावचे रहिवासी, लग्नासमारंभासाठी पनवेल इथं जात असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीजवळ कंटेनर आणि शाळेच्या बसमध्ये हा अपघात झाला.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
राज्यातील मंत्र्यांच्या बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा – चंद्रकांत पाटील बदल्यानंतरही एक नवा वाद समोर आला आहे | #Maharashtra #Transfer #ChandrakantPatil http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/transfer-scam-in-maharashtra-chandrakant-patil-allegations/?feed_id=6870&_unique_id=5f3540ac25045
0 notes