Tumgik
#फडणवीसांनी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मोदींसमोर फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री शिंदेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, “पहिल्या दिवसापासून विश्वास होता…’
मोदींसमोर फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री शिंदेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, “पहिल्या दिवसापासून विश्वास होता…’
मोदींसमोर फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री शिंदेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, “पहिल्या दिवसापासून विश्वास होता…’ मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
फडणवीसांनी ट्रॅप रचला शेवटच्या मरणाची घटका..
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सतरावी लोकसभा राष्ट्रपतींकडून बरखास्त, नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी निवड
इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजप सरकारविरोधात लढा देण्याचा निर्णय
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांचे राजीनाम्याचे संकेत
जागतिक पर्यावरण दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी, आयर्लंडवर आठ गडी राखून विजय
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा बरखास्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे कालच याबाबतची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, मंत्रिमंडळासह आपला पंतप्रधानपदाचा राजीनामा सादर केला, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कामकाज सांभाळण्याची सूचना राष्ट्रपतींनी मोदी यांना केली आहे. राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळासाठी काल 'रात्रीभोज' आणि निरोप समारंभही ठेवला हाोता.
दरम्यान, दिल्ली इथं काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत घटक पक्षांचे सर्व नेते सहभागी झाले होते, सर्व घटक पक्षांनी मोदी यांच्या नेतृत्वासाठी समर्थनपत्रं दिली. मोदी यांच्या विकसित भारतासाठीच्या कार्यात आपलंही योगदान असेल, असं या नेत्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे या बैठकीला हजर होते. आपण काही मागण्यासाठी नव्हे, तर पंतप्रधानांना सरकार स्थापनेकरता पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.
****
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचीही काल दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह या आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलतांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्न खरगे यांनी, निवडणुकीत मिळालेला जनादेश हा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात असल्याचं सांगत, मोदींच्या नेतृत्वातल्या भाजपच्या हुकूमशाही सरकारविरोधात इंडिया आघाडी सातत्याने लढा देईल, असं नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘The people’s mandate has given a befitting reply to the BJP and their politics of hate, corruption and deprivation.’’
‘‘The INDIA Bloc will continue to fight against the fascist rule of the BJP led by Modi.’’
‘‘We will take appropriate steps at the appropriate time to realise the people's desire not to be ruled by the BJP govt.’’
****
लोकसभा निवडणुकीत राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं, ते म्हणाले...
‘‘हा जो काही भारतीय जनता सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी या ठिकाणी सगळी स्वीकारतो. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला ही विनंती करणार आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्‍टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल.’’
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच पक्षासाठी काम करावं अशी विनंती करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संदर्भात बोलतांना, निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. महायुतीला जागा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या असल्या तरीही मतांची टक्केवारी कायम असल्याकडे आणि काही ठिकाणी ती वाढल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं...
‘‘ही जी कही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले, ती आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या, तरी सुद्‌धा मतं जी आहेत ती intact राहिली आहेत. मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत. आणि मूळ मतदार जो आहे, तो महायुतीबरोबर राहिला.’’
****
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिली.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक सावंत यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी भाजपने शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना पाठिंबा दिल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्रं सादर केली. या जागेसाठी आतापर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
****
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्याची सूचना राज्य विधीमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, आवश्यकता भासल्यास, येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
जागतिक पर्यावरण दिवस काल विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
मुंबईत काल एका विशेष कार्यक्रमात, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बांबू प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले असून, आचारसंहिता संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती दिली. कल्पवृक्ष बांबू पर्यावरण शाश्वतता परिषद २०२४ स्मरणिकेचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीबद्दल तज्ज्ञांनी यावेळी सादरीकरण केलं.
**
छत्रपती संभाजी नगर शहरातल्या विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने शहरातल्या रामनगर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान, झोन क्रमांक सात सह विविध परिसरात सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
**
प्रत्येकाने पर्यावरणपुरक जीवनशैली आत्मसात केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल, असा विश्वास ‘आत्मा’ प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात पोहेटाकळी इथं काल विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांची पर्यावरणाविषयक भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली.
**
लातूर जिल्हा प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा’ उपक्रमाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या रोपवाटिका तसंच सीडबॉल निर्मिती आदी उपक्रमांनाही प्रार��भ झाला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सामाजिक संपर्क माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या दोन जणांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच आक्षेपार्ह माहिती प्रसारित करू नये, असं आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा- दहावीच्या गुणपत्रिका येत्या मंगळवारी सर्व शाळांना वाटण्यात येणार आहेत. त्याच दिवशी दुपारनंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी तसंच पालकांनी यांची नोंद घ्यावी, असं आवाहन ओक यांनी केलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूयॉर्क इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडच्या संघाने दिलेलं ९६ धावांचं लक्ष्य, भारताने १३ व्या षटकात दोन गडी गमावत पूर्ण केलं. येत्या रविवारी नऊ तारखेला भारताचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन या यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी बेल्जियमच्या जोडीचा ७-६, ५-७, ६-१ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात चापानेर, देवगाव रंगारीसह गल्लेबोरगाव परिसरात, पैठण तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काल दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने बाजारपेठेत व्यापारी तसंच ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीला लागले असून, बी -बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; 20 हजार पदे भरणार
मुंबई: आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा फडणवीसांनी केली.त्याशिवाय, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार?, फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Tumblr media Tumblr media
मुंबई | राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांनी धुळवडीनिमित्त आयोजित एका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एकप्रकारे साद घातली आहे. एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. वर्षाचे 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. 365 दिवस शिमगा साजरा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, मी विरोधकांना विनंती करतो, आजपासून मतभेद आणि मनभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
'वेदान्त'च्या मालकांची पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर ह्लाबोल; म्हणाले, "महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची..." | Vedanta Foxconn Project Devendra Fadnavis slams Shivsena as Anil Agarwal committed to investing in Maharashtra scsg 91
‘वेदान्त’च्या मालकांची पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर ह्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची…” | Vedanta Foxconn Project Devendra Fadnavis slams Shivsena as Anil Agarwal committed to investing in Maharashtra scsg 91
‘वेदान्त’ कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी गुजरातला ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ कंपनीचा प्रकल्प उभारण्यासंदर्भातील आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना भविष्यात महाराष्ट्रामध्येही यासंदर्भातील संलग्न प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. ट्विटरवरुन अग्रवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया नोंदवताना विरोधकांना विशेष करुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मस्कतहून युरोपला बोट जात होती, मालक ऑस्ट्रेलियन, फडणवीसांनी दिले अपडेट्स
मस्कतहून युरोपला बोट जात होती, मालक ऑस्ट्रेलियन, फडणवीसांनी दिले अपडेट्स
या संशयास्पद बोटीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ही बोट मस्कतहून युरोपात भटकत रायगड किनाऱ्यावर आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल) मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडले. संशयास्पद बोट उपमुख्यमंत्री बद्दल देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन केले. फडणवीस म्हणाले की, मस्कतहून युरोपला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं… नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामा��्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
View On WordPress
0 notes
Video
youtube
देवेंद्र फडणवीसांनी मला पुढे केलं.. #marathinews #indianpolitician #deve...
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
सतरावी लोकसभा राष्ट्रपतींकडून बरखास्त-पंतप्रधानांचा राजीनामा
देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही राजीनाम्याचे संकेत-मात्र निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा
खासदारांची संख्या एक अंकी झालेल्या भाजपने आत्मचिंतन करावं-विजय वडेट्टीवार यांचा सल्ला
आणि
जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा बरखास्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे आजच याबाबतची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन, मंत्रिमंडळासह आपला पंतप्रधानपदाचा राजीनामा सादर केला, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कामकाज सांभाळण्याची सूचना राष्ट्रपतींनी यावेळी त्यांना केली.
केंद्रीय मंत्रिमंडळासाठी राष्ट्रपतींनी आज 'रात्रीभोज' आणि निरोप समारंभ आयोजित केला आहे.
दरम्यान, दिल्ली इथं आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. आपण काही मागण्यासाठी नव्हे, तर पंतप्रधानांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचीही आज दिल्लीत बैठक होत आहे. विविध घटकपक्षांचे नेते या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत पोहोचत असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमताचं संख्याबळ असल्यानं, सरकार स्थापनेत काहीही अडचण नसल्याचं, भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी नमूद केलं आहे. ते म्हणाले –
दावा कोई भी पेश कर सकता है। बीजेपी और एन डी ए की अलायंस मिलकर वो आकडा स्पष्ट हो गया है, जो दिखाई दे रहा है। रिझल्टस्‌ पुरे आ चुके है। जब एन डी ए अलायंस पार्टनर्स मिलकर बहुमत का आकडा हो रहा है तो सरकार स्थापन करने मे कोई दिक्कत नही है।
****
लोकसभा निवडणुकीत राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं, ते म्हणाले –
हा जो काही भारतीय जनता सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी या ठिकाणी सगळी स्वीकारतो. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला ही विनंती करणार आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्‍टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल.
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थ���त होते, फडणवीसांनी सरकारमध्येच राहूनच पक्षासाठी काम करावं अशी विनंती करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संदर्भात बोलतांना, निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. महायुतीला जागा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या असल्या तरीही मतांची टक्केवारी कायम असल्याचं, काही ठिकाणी वाढल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं –
ही जी कही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले, ती आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या, तरी सुद्‌धा मतं जी आहेत ती intact राहिली आहेत. मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत. आणि मूळ मतदार जो आहे, तो महायुतीबरोबर राहिला.
****
राज्यात भाजपच्या खासदारांची संख्या एक अंकी झाली असून, भाजपने आत्मचिंतन करावं, असा सल्ला विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ऐतिहासिक विजय मिळाला, हे राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं यश असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्रं सादर केली. या जागेसाठी आतापर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
गव्हारे पंडीत सुपडू यांनी अपक्ष म्हणून, रतन राजलदास चावला तसंच महेंद्र मधुकर भावसार, यांनी अपक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज, तर दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे.
****
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्याची सूचना राज्य विधीमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, निवडणूक लढवली गेल्यास २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या मानव पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेपासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला. जमिनीचं पुन:स्थापन, वाळवंटीकरण आणि दुष्काळावर मात, अशी यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.    
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना, शाश्वततेवर आधारित एक चांगलं आणि हरित जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. पृथ्वीचं रक्षण ही आपली मुख्य जबाबदारी असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतांना, मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत बुद्ध जयंती उद्यानात वृक्षारोपण केलं. देशभरात कोट्यवधी झाडं लावण्यासाठी एक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशानं ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम राबवण्यात आली.
****
छत्रपती संभाजी नगर शहरातील विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रामनगर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान, झोन क्रमांक सात यांच्यासह शहरातील विविध परिसरात सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन निसर्गाचा  समतोल कायम राखण्यास मदत होईल असं प्रतिपादन परभणी इथं ‘आत्मा’ प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी केलं आहे. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, नांदेड इथं केंद्रीय संचार ब्यूरो, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग परभणी आणि शिवकृषक ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी तालुक्यात पोहेटाकळी इथं विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्यावर भर द्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी विद्यार्थ्यांची पर्यावरणाविषयक भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
धुळे महानगरपालिकेत आज झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ही झाडं सुमारे ५ वर्षापूर्वी धुळे महानगरपालिका प्रांगणात आजच्या जागतिक पर्यावरणदिनी लावण्यात आलेली आहेत.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने देगलूर बाजारपेठेत व्यापारी तसंच ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीला लागले असून, बी -बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. आज झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खरीपपूर्व मशागतीला गती मिळणार आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
रा��्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी कसे सहमत? ; संभाजीराजे आक्रमक
Tumblr media
मुुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे . संभाजीराजे यांनी कडक शब्दांत ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करतेय का, असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते गडकरींपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारने याबाबत अद्याप काहीही केले नसल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान आणि फडणवीसांनी उत्तर द्यावे राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आधीही केली होती. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भाजपा-मनसे युतीसंदर्भात राज ठाकरे-अमित शाहांची भेट होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत | devendra fadnavis statement on MNS bjp alliance and raj thackeray meeting with amit shah mumbai visit rmm 97
भाजपा-मनसे युतीसंदर्भात राज ठाकरे-अमित शाहांची भेट होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत | devendra fadnavis statement on MNS bjp alliance and raj thackeray meeting with amit shah mumbai visit rmm 97
मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबई दौऱ्यात युतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी राज ठाकरेंना भेटणार असल्याचंही बोललं जात आहे. या सर्व घटनाक्रमानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: 'मध्यरात्री कशी भेटलो' - सीएम शिंदे सर्व काही सांगू लागले तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डोक्यावर हात ठेवला
महाराष्ट्र: ‘मध्यरात्री कशी भेटलो’ – सीएम शिंदे सर्व काही सांगू लागले तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डोक्यावर हात ठेवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इमेज क्रेडिट स्रोत: ANI सीएम शिंदे म्हणाले, ‘फडणवीस माझ्याकडे आले आणि म्हणाले की एकच व्यक्ती शपथ घेणार आहे. हे सांगतानाही ओठांवर हसू उमटले. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर (महाराष्ट्र विधानसभा) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहातील विविध नेत्यांनी अभिनंदन केले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांनी स्वतः चालवली कार; मुख्यमंत्री शिंदे शेजारच्या सीटवर
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांनी स्वतः चालवली कार; मुख्यमंत्री शिंदे शेजारच्या सीटवर
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांनी स्वतः चालवली कार; मुख्यमंत्री शिंदे शेजारच्या सीटवर अमरावती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अमरावती जिल्ह्यातील कामाची पाहणी केली.   समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार असून, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे व…
View On WordPress
0 notes
Video
youtube
देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा..
0 notes