#सामन्याला
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होणार आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगम�� सुरू आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध; देशपांडे म्हणाले, बाळासाहेबांना…
https://bharatlive.news/?p=108213 भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध; देशपांडे म्हणाले, ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
शिखर धवनचा इशान किशन, शुभमन गिल सोबतचा डान्स तुम्हाला तुडवेल. पहा | क्रिकेट बातम्या
शिखर धवनचा इशान किशन, शुभमन गिल सोबतचा डान्स तुम्हाला तुडवेल. पहा | क्रिकेट बातम्या
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी, टीम इंडिया हरारे येथे विजय मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेवर हक्क सांगितल्यानंतर टीम इंडिया हरारेमध्ये पोहोचल्यामुळे आत्मविश्वासाने बहरला आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला अवघा एक दिवस बाकी असताना भारताने धडाकेबाज फलंदाजी केली शिखर धवन सहकारी सहकाऱ्यांसोबत…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
समरस्लॅममध्ये रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर मॅच बुक करणे ही WWE ची सर्वात मोठी चूक का आहे?
समरस्लॅममध्ये रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर मॅच बुक करणे ही WWE ची सर्वात मोठी चूक का आहे?
WWE समरस्लॅम 2022 साठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या कारणास्तव, त्याने समरस्लॅम 2022 साठी रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर सामना जाहीर केला आहे. हा सामना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी त्याने हा शेवटचा मॅन स्टँडिंग सामना बनवला आहे. त्यानंतर अनेक चाहते या सामन्याला चुकीचे बुकिंग म्हणत आहेत. अशा परिस्थितीत, या लेखात आम्ही कोक करतो की WWE ने हा सामना बुक करून मोठी चूक का केली आहे. रोमन रेन्सचा चॅम्पियन…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
माउंट माउंगानुई: आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Cricket Match)यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या सामन्याचे लाईव्ह अडपेट महाराष्ट्र टाईम्स सोबत…भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट (India vs Pakistan Cricket Match) >> >> भारताला विजयासाठी एका विकेटची गरज >> राजेश्वरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडी मैदानात​ मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ७ वा  सामना राजस्थान रॉयल्स  विरुद्ध दिल्ली कॅप��ट्ल्स  यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच खेळवण्यात येत आहे. राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. त्यामुळे रिषभ पंतची दिल्ली प्रथम बॅटिंग करत आहे. उभय संघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajnetanewscom · 4 years ago
Text
MI vs RCB Live Score, IPL 2021 | मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या आऊट
MI vs RCB Live Score, IPL 2021 | मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या आऊट
चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) पहिला सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indins) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवण्यात येत आहे. बंगळुरने टॉस जिंकून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळण्यात येत आहे. मुंबईला चौथा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात प्रक्षेपित केलेले दोन्ही उपग्रह एकमेकांपासून १५मीटर अंतरावर दूर असून ते एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. इस्त्रोतर्फे या संदर्भातली माहिती देण्यात आली. लहान अंतराळयान वापरून त्यांना अंतराळात जोडणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेच्या यशस्वी प्रात्यक्षिकामुळं भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि चंद्रावर अंतराळवीर उतरवणं यासारख्या भविष्यातल्या मोहिमांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जटिल तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणारा भारत चौथा देश बनणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.
इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना आवश्यक चीप्स आणि सेमीकंडक्टर्स निर्मितीसाठी पुण्याजवळ रांजणगांव इथं सहा हजार कोटी रुपयांची तरतुद असणा-या इलेक्ट्रानिक क्लस्टरची स्थापना होत असल्याचं केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. पुणे इथं काल प्रगत संगणन विकास केंद्र -सीडॅकला भेत दिली त्यावेळी ते बोलत होते. पुणे- नाशिक रेल्वेमार्गावर नारायणगावच्या जी.एम.आर.टी. या आंतररा��्ट्रीय प्रयोगशाळेवर २३ देश अवलंबून असल्यानं, कोणत्याही परिस्थितीत ही वेधशाळा अन्यत्र हलवणार नाही अशी माहितीही वैष्णव यांनी दिली. तंत्रज्ञान सामान्यांर्यंत पोहोचवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य उद्दिष्ट असून पन्नास टक्क्यांहून अधिक उपकरणं भारतीय बनावटीची असणारं राष्ट्रीय महासंगणकीय मिशनही प्रगती पथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली.
वैष्णव यांनी काल पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या सुसज्ज सभागृहाचं उद्घाटनही केलं. दरम्यान, वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, उत्पादकता, कायद्यांची सुधारणा आणि सर्वसमावेशक विकास हे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतील असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, काल पुण्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं. **** स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त दिल्लीत भारत मंडपम् इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन हजार युवा नेत्यांशी थोड्याच वेळात संवाद साधणार आहेत. विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन होत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आपल्या संदेशांमधून अभिवादन केलं आहे.
शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंच्या ४२७ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली.केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पुजा झाली. यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते.
भारत-आयर्लंड महिला संघांदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत,आजचा दुस-या सामन्याला गुजरातच्या राजकोट इथं थोड्यावेळापूर्वीच सुरुवात झाली.नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं ,मालिकेत पहिला सामना जिंकत एक-शुन्य अशी ��घाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पहिल्या दिवशी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूशी होत आहे. यासह या स्पर्धेत ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली, रोहन बोपण्णा, युकी भांबरी आणि श्रीराम बालाजी हे खेळाडूदेखील भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच टीट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी पंधरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मालिकेतला पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता इथं होणार आहे. सुर्यकुमार यादव संघाचं नेतृत्त्व करणार आहे तर अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी या मालिकेद्वारे एक वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन करत आहे. या मालिकेनंतर इंग्लंड संघ तीन एक दिवसीय सामन्यांची मालिकाही खेळेल. या मालिकेकडे १९ फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या चँपीयन्स चषक स्पर्धेची पुर्व तयारी म्हणून पाहिलं जात आहे.
मराठवाडा आणि उत्तर कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी वादळ होईल. अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी नरेगा अंतर्गत प्रत्येक घरासाठी वैयक्तिक शोषखड्ड्यांची उभारणी करण्याचे निर्देश, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. त्या काल नांदेड इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या.ग्रामपंचायतींनी स्थानिक लोकसहभागातून हे अभियान गतीने राबवण्याचं आवाहन यांनी केलं.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा ICC T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ज्यांना उभे राहून सामना बघायचा आहे त्यांच्यासाठी आयसीसीने ४००० तिकिटे जारी केली आहेत. ICC T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज: दुसऱ्या T20I ला दोन तास उशीर, हे कारण आहे | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज: दुसऱ्या T20I ला दोन तास उशीर, हे कारण आहे | क्रिकेट बातम्या
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याला लॉजिस्टिक समस्यांमुळे विलंब झाला आहे. सोमवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणारा सामना आता भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. “सीडब्ल्यूआयच्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे, त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये महत्त्वपूर्ण संघाचे सामान येण्यास लक्षणीय विलंब झाला आहे. परिणामी, आजचा दुसरा गोल्डमेडल T20 चषक सामना दुपारी 12:30 वाजता…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL 2022: RCB चे '23 एप्रिल' पासून खास कनेक्शन, हे आकडे अतिशय धक्कादायक आहेत.
IPL 2022: RCB चे ’23 एप्रिल’ पासून खास कनेक्शन, हे आकडे अतिशय धक्कादायक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 36 व्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकवर आऊट झाला. त्याचवेळी आरसीबीच्या उर्वरित फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्याने संघ अवघ्या 68 धावांवर आटोपला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) लाजिरवाण्या सामन्याला सामोरे जावे लागले. हा सामना 23 एप्रिल रोजी खेळला गेला आणि या दिवशी RCB ��े त्यांची…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
खुशखबर! टीम इंडियाच्या ‘या’ सामन्यापासून प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश एका सामन्याला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार | #IndvsAus #BoxingDay #AllowMaximum25kSpectators http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/team-india-vs-australia-boxing-day-test-mcg-to-allow-maximum-25k-spectators/?feed_id=15611&_unique_id=5f9a379076a73
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्चपासून पहिली कसोटी मॅच होणार आहे. ही कसोटी विराट कोहलीच्या करिअरमधील १००वी कसोटी आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक स्वरुप आले आहे. त्याच बरोबर या लढतीपासून रोहित शर्मा कसोटी संघाचे नेतृत्व करेल. नुकतीच त्याची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती. वनडे आणि टी-२० मालिके प्रमाणेच आता पहिल्या कसोटी मालिकेत विजयाने सुरूवात करावी अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
सावंतवाडीचा सुपुत्र आज दुबईत मैदान गाजवणार !!! आयपीएलच्या आजच्या कोलकाता आणि मुंबई या सामन्यात सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईकला संधी मिळालीय. काही वेळात सामन्याला सुरुवात होणार असून निखिल त्यावेळी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसेल.
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
विजयी संघ होणार मालामाल
विजयी संघ होणार मालामाल
मुंबई -अक्षय घुगे  मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्य़ा न्यूझीलंड आणि भारत (New Zealand vs India) यांच्यात इंग्लंडमध्ये 18 जूनपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेल्या या सामन्यातील विजयी संघाला कोट्यावधींच्या बक्षिसासह आकर्षक आणि मानाची ट्रॉफी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभा���ीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशात दिली होती.
ग्राहक व्यवहार विभागानं आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशातील खजुराहो इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकासकामांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते केन-बेतवा या देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे, तसंच अकराशे 53 नव्या ग्रामसुशासन इमारतींचीही पायाभरणी करण्यात येणार आहे. केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीज वितरण प्रणाली उभारण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि विदर्भ, मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आणण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली.
नंदुरबार जिल्ह्यात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. १४ डिसेंबरपासून या घोडे बाजाराला सुरवात झाली आहे. यात देश भरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल नोंदवल्या गेली आहे. या बाजारात एक घोडा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विक्रीला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढचे ६ दिवस हा बाजार सुरु राहील, अशी माहीती आमच्या वार्ताहरानं ��िली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठं, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी दरम्यान सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहिम सुद्धा राबविण्यात येणार आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर २७ डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र , उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी तसंच २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
गोंदिया इथं २५ते २८ या डिसेंबर दरम्यान दिव्यांग मुलामुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २० राज्यातील स्पर्धक सहभाग घेणार आहेत. गोंदिया गोलबॉल स्पर्धेचे अध्यक्ष राजकुमार कुथे आणि आरती लिमजे यांनी ही माहिती दिली.
0 notes