Tumgik
#रोहित शर्मा विधान
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर
तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षीस-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी
आणि
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघातले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.
संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिं���ुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितरित करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
आपल्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात विजयासह केल्यानंतर, रोहित शर्माने रविवारी सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात नाबाद 175 धावा करत एकूण 9 बळी घेतले. यासह तीन दिवसांत श्रीलंकेवर डाव आणि २२२ धावांचा मोठा विजय नोंदवण्यात संघाला…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
इमाम उल हकचे विराट कोहली किंवा रोहित शर्मावर मोठे विधान कोणाकडे फलंदाज म्हणून अधिक प्रतिभा आहे
इमाम उल हकचे विराट कोहली किंवा रोहित शर्मावर मोठे विधान कोणाकडे फलंदाज म्हणून अधिक प्रतिभा आहे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची फलंदाजीतील खराब कामगिरी हा भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेचा विषय आहे. कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2022 मध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना, त्याने ओव्हल येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले. कोहलीचा फॉर्म सतत घसरत राहिला. इंग्लंडविरुद्धच्या दोन T20 सामन्यांमध्ये तो फक्त 12 धावा करू शकला आणि नंतर दुखापतीमुळे तो पहिल्या एकदिवसीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ENG vs IND: ‘टीम मध्ये एक खेळाडू नाहीय, तोच टीम इंडियासाठी झटका’, संजय मांजरेकरांच महत्त्वाचं विधान
ENG vs IND: ‘टीम मध्ये एक खेळाडू नाहीय, तोच टीम इंडियासाठी झटका’, संजय मांजरेकरांच महत्त्वाचं विधान
ENG vs IND: ‘टीम मध्ये एक खेळाडू नाहीय, तोच टीम इंडियासाठी झटका’, संजय मांजरेकरांच महत्त्वाचं विधान इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी चिंता वाढवून ठेवली आहे. कारण सराव सामन्यातच कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit sharma) शुभमन गिल, (Shubhaman Gill) हनुमा विहार आणि श्रेयस अय्यर फ्लॉप ठरले. मुंबई: इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी…
View On WordPress
0 notes
shahar-e-aman · 3 years
Photo
Tumblr media
व्यापारी व चौरसिया समाज के दो दर्जन लोगों ने थामा सपा का दामन समाजवादी पार्टी के महानगर अध्यक्ष सै०इफ्तेखार हुसैन के समक्ष चौक नैनी व कटरा के दो दर्जन लोगों ने सपा ज़िला सचिव विकास चौरसिया के नेत्रित्व मे सपा का दामन थाम कर शहर उत्तरी शहर दक्षिणी व शहर पश्चिमी के सपा प्रत्याशीयों को जिता कर लखनऊ भेजने का संकल्प लिया।कीडगंज मे शहर दक्षिणी विधान सभा के प्रत्याशी रईस चन्द्र शुक्ला के केन्द्रीय कार्यालय पर नगर महासचिव रवीन्द्र यादव रवि के संचालन मे समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव की व्यापारी किसान नौजवान छात्र छात्राओं बेरोज़गारों व महिलाओं के प्रति घोषणा पत्र मे किए गए वायदो से प्रभावित होकर समाजवादी पार्टी को व्यापारीयों व चौरसिया समाज का समर्थन देने की घोषणा की।शहर दक्षिणी के प्रत्याशी रईस चन्द्र शुक्ला के चुनाव का संचालन कर रहे आशीष शुक्ला ने सभी को लाल टोपी व माला पहना कर स्वागत करते हुए आभार व्यक्त किया।वहीं पसमान्दा समाज के अध्यक्ष मो०सलमान सिद्दीकी ईरिक्शा डीलर्स आपरेटर वेलफेयर ऐसोसिएशन के सचिव अली मंसूरी व अन्य सदस्यों ने भी अपना समर्थन सपा के प्रत्याशीयों को देते हुए महानगर अध्यक्ष सै०इफ्तेखार हुसैन को पसमान्दा समाज की सूची व ईरिक्शा डीलर्स आपरेटर वेलफेयर ऐसोसिएशन का मांग पत्र सौंपा।मांग पत्र को नगर अध्यक्ष इफ्तेखार हुसैन ने राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव को प्रेक्षित करने और उनकी मांगों को सपा के ऐजेण्डे मे शामिल करवाने का आश्वासन दियख।सपा की सदस्यता लेने वाले प्रमुख व्यापारीयों में दिलीप चौरसिया ,गोपाल चौरसिया ,योगेश चौरसिया ,सप्पू चौरसिया ,राजू चौरसिया ,अवि चौरसिया ,रितू चौरसिया ,रेखा चौरसिया ,रिशभ चौरसिया ,अश्विनी चौरसिया ,सफदर हुसैन ,संतोष वर्मा ,बब्लू जायसवाल समेत अन्य लोगों ने समाजवादी पार्टी की जीत सुनिश्चित कराने का भरपूर सहयोग का भरोसा दिलाया।कार्यक्रम में सै०इफ्तेखार हुसैन ,रवीन्द्र यादव ,शुऐब खाँ ,अपना दल कमेरावादी के महानगर अध्यक्ष मो०आबिद उर्फ नय्यर आब्दी ,पार्षद नेम यादव ,सै०मो०अस्करी ,मधुकर मिश्रा ,अब्बास नक़वी ,मो०तहज़ीब अली ,शाहिद अब्बास रिज़वी ,आशीष शुक्ला ,अरशद ज़ैदी ,ज़ामिन हसन ,राजेश शर्मा ,सौरभ यादव रामा ,रोहित यादव ,जयभारत यादव ,मो०सऊद ,मो०हसीब ,निरज वर्मा ,सुधीर निषाद आदि उपस्थित रहे। @socialist_akhileshyadav @samajwadiparty_official (at Prayagraj, U.P) https://www.instagram.com/p/CZ9Tcoiv1en/?utm_medium=tumblr
0 notes
lokkesari · 4 years
Text
बेरोजगारी समेत अन्य मुद्दों पर युवा कांग्रेस ने किया सरकार के खिलाफ प्रदर्शन / फूंका पुतला।
New Post has been published on http://lokkesari.com/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d.html
बेरोजगारी समेत अन्य मुद्दों पर युवा कांग्रेस ने किया सरकार के खिलाफ प्रदर्शन / फूंका पुतला।
ऋषिकेश दिनांक 11 फरवरी 2021_ प्रदेश सयोंजक सोशल मीडिया गौतम नौटियाल के नेतृत्व में ऋषिकेश रेलवे रोड स्थित कांग्रेस भवन में युवा कांग्रेस ने भाजपा सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है।
कांग्रेस भवन में सरकार के खिलाफ जमकर हुई नारेबाजी के बीच गौतम ने कहा कि प्रदेश में बढ़ती हुई बेरोजगारी पर सरकार किसी भी तरह का ठोस कदम नहीं उठा रही है। देश व प्रदेश में बेरोजगारी बढ़ने से युवा हताश है। महंगाई के कारण गरीबों की परेशानी बढ़ गई है। देश का किसान दो माह से अधिक समय से अनशन पर है, लेकिन केंद्र सरकार उनकी बात नहीं सुन रही है। आंदोलन दबाने के लिए अपनाए जा रहे हथकंडे निंदनीय हैं।
इस अवसर पर प्रदेश सचिव गौरव राणा ने कहा कि बजट ने भी लोगों को मायूसी दी है। कहा कि इस कोरे वादों वाली भाजपा सरकार को सत्ता से हटाना होगा। केंद्र सरकार महंगाई पर लगाम लगाने में पूरी तरह नाकाम हो चुकी है। सरकार मंहगाई पर लगाम नहीं लगाती तो युवा कांग्रेस सड़कों पर उतर कर भाजपा सरकार की दमनकारी नीति का विरोध करेगी। जिला महासचिव आर्यन गिरी ने कहा कि केंद्र सरकार ने आम जनों के जेब पर बड़ा डाका डाला है। खाद्य पदार्थ से लेकर अन्य चीजों पर बढ़ती महंगाई पर सरकार को लगाम लगाना चाहिए व जनता को राहत देनी चाहिए। इस अवसर पर जिला महासचिव आर्यन गिरी , पूर्व जिला महासचिव जयपाल सिंह , पूर्व जिला महासचिव एकांत गोयल , पूर्व जिला सचिव अमित पाल , पूर्व छात्रसंघ अध्यक्ष गौरव राणा , जिला सचिव बुरहान अली , जिला महासचिव अजय राजभर , प्रदीप सिंह , देव छेत्री , सौरव थापा ,अजय कुमार ,अनुष रावत , रोहित जयसवाल , विधान गौतम ,अविनाश मल्होत्रा ,हिमांशु सिंह , शिवम बिरला ,साहुल कुमार ,सागर चौहान , रवि कुमार ,अजय कुमार ,सौरभ वर्मा , भरत , राहुल पांडेय , अशोक शर्मा , इत्यादि भारी सख्या में युवा कांग्रेसजन मौजूद रहे।।
0 notes
onlinekhabarapp · 6 years
Text
चीनमा एनआरएनए तदर्थ समिति गठन
ग्वान्जौ/ चीनमा गैरआवासीय नेपाली संघ (एनआरएनए) गठन गरिएको छ । सुदेशकुमार झाको नेतृत्वमा ११ सदस्यीय तदर्थ कमिटी गठन गरिएको हो ।
गतवर्ष नयाँ कार्यसमिति चयन हुन नसकेपछि अन्तर्राष्ट्रिय समन्वय परिषद्ले चीनका लागि अमृता थापालाई गतवर्ष नै आईसीसी सदस्यमा नियुक्त गरेको थियो ।
अन्तर्राष्ट्रिय समन्वय परिषद् एवं आइसीसी सदस्य थापाकै पहलमा संस्थाको विधान बमोजिम सदस्यता नविकरण गर्ने, साधारण सभा गर्ने र नयाँ कार्यसमितिको लागि निर्वाचन गराउनेसम्मको जिम्मेवारीसहित सम्पूर्ण चीनबाट प्रतिनिधित्व हुनेगरी तदर्थ कमिटी गठन गरिएको हो ।
आईसीसी सदस्य थापाले सम्पूर्ण सस्यहरुलाई पदभार ग्रहण गराउँदै विविध कारणले एक वर्ष नेतृत्वविहीन रहेता पनि अब भने अन्तर्राष्ट्रिय समन्वय परिषद्बाट आएको जिम्मेवारी समयमै पूरा गरी एनआरएन चीनको गरीमालाई जोगाइराख्न अनुरोध गरिन् ।
तदर्थ समितिको उपाध्यक्षमा प्रदीप न्यौपाने, विनोद तिमल्सिना, रोहित अग्रवाल, महासचिवमा सुशील बेल्बासे, सचिवमा तीर्थ पौड्याल, कोषाध्यक्षमा यमबहादुर क्षेत्री (ओम) रहेका छन् ।
यस्तै, महिला संयोजकमा रञ्जिता आचार्य, युवा संयोजकमा बलराम तामाङ्ग -लामा) चयन भएका छन् भने सदस्यहरुमा ज्योती शिलवाल, राजेन्द्र जमकट्टेल, बुद्धि प्रसाद शर्मा, मुकेश श्रेष्ठ,सुरज न्यौपाने, तुलसी न्यौपाने,सविता बर्तौला र डा. किशोर छन्त्याल रहेका छन् । तदर्थ समितिको पहिलो बैठक समेत बसेको छ ।
बैठकले डिसेम्बर ८ र ९ मा हङ्गकङ्गमा हुन गइरहेको एशिया प्रशान्त क्षेत्रीय सम्मेलन एवं महिला सम्मेलनका लागि एक हजार डलर र अन्तर्राष्ट्रिय समन्वय परिषद्को योजना सिन्धुलीगढी दरबार जिर्णोद्वारका लागि एकलाख रुपैयाँ सहयोग गर्ने निर्णय गरिएको छ ।
संस्थाको कोष शुन्य रहेकाले पहिलो बैठकबाटै पैतालिस हजार युयान अर्थात साढे सातलाख रुपैयाँ बराबरको रकम कोषमा जम्मा गरिएको छ ।
0 notes
Photo
Tumblr media
#राजस्थान शिक्षक महासंघ पदाधिकारी आज @sandeepbjpkota से मिले और नवीन पेंशन योजना को बन्द कर पुरानी पेंशन योजना को लागू करने के लिए ज्ञापन दिया ओर मेने इस मुद्दे को विधान सभा में उठाने के लिए आश्वाशन दिया ज्ञापन देने वालो में संघ के श्याम सुंदर शर्मा, रमीज़ राजा, शकील अहमद, रूपेश गप्ता,रोहित प्रजापति, निर्मल कुमार, पृथ्वी सुमन, देवीलाल आदि शिक्षक साथी मौजूद रहें || (at Dadabadi) https://www.instagram.com/p/BmsXILKgv0m/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1ky011hzprw09
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
सैन्यदलाचे विविध शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या राज्यातल्या खेळाडूंचा विधीमंडळात गौरव
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत सादर
आणि
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्टला
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज प्रदान केलेल्या पुरस्कारांपैकी मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश होता. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम् दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी एक कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिक��णाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपये पर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज बोलत होते. वीजदेयकात सवलत देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचं सांगत, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिलाईच्या प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करावं, अशी मागणी दानवे यांनी केली.
मराठवाड्यासाठी घोषीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी ७३४ कोटी रुपयांची आवश्यक असतांना, सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जवळपास ३० लाख फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला, राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं, परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही, असं पटोले म्हणाले. पावसाळा सुरु असताना फेरीवाल्यांवर कारवाई करणं अन्यायकारक असून, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मंगळवारी चर्चेचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील उपाहारगृहात “भरडधान्य महोत्सव” घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय वेद्यकीय शिक्षण परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून, ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने गेल्या २२ जून रोजी नियोजित असलेली ही परीक्षा पुढे ढकलली होती.
****
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर 'दृश्यता' वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर निर्माण करावं, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. विद्यापीठाचा १०९वा स्थापना दिवस आज मुंबईत राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असं सांगून विद्यार्थिनींनी पुस्तकासोबत निसर्गाचं देखील ज्ञान घ्यावं, असं आवाहन राहीबाई पोपरे यांनी यावेळी केलं.
****
कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर इथं आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने क्षीरसागर यांनी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेत ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, याच अनुभवातून समस्येचं उत्तर नक्की मिळतं, असं लडकत यांनी सांगितलं.
 ****
0 notes
darshaknews · 3 years
Text
बीसीसीआयने रोहितचा व्हिडिओ शेअर केला, हिटमॅन म्हणाला – मी कसोटी संघाचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते
बीसीसीआयने रोहितचा व्हिडिओ शेअर केला, हिटमॅन म्हणाला – मी कसोटी संघाचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते
कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या पहिल्या विजयाचे कौतुक करताना बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये या शानदार विजयाच्या काही खास क्षणांसोबतच कर्णधार रोहित शर्माचे शब्दही ऐकायला मिळत आहेत. आपण भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार होऊ असे त्याला कधीच वाटले नव्हते असे तो म्हणताना ऐकू येतो. रोहित म्हणतो, ‘मी या यादीचा एक भाग बनलो ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. खरे सांगायचे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 04 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक जूलै ०४ २०२४ दुपारी १.०० वा.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून, या संघाने आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मुंबईत मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, या संघातले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे मुंबईकर खेळाडू उद्या महाराष्ट्र विधान भवनाला भेट देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली.
****
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यानुसार आता तीन हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात तसंच ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय सुरू करणं अनिवार्य होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचा अहवाल ३० दिवसांच्या आत मागवला जाईल आणि त्यानुसार या कर्मच्याऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार प्रसाद लाड यांनी अर्धा तास चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. बेस्टच्या क��्मचाऱ्यांचे थकलेले पगार, कोविड भत्ते, ग्रॅच्युइटी, त्यांना कायम नियुक्त्या देणं, पदोन्नती, इत्यादी मुद्दे लाड यांनी आपल्या प्रश्नात उपस्थित केले होते. या सोबतच मागे थांबवण्यात आलेली कर्मचारी भरती पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं काम वेगानं करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच बैठक झाली. खासगी कंपन्यांसोबतच काही सरकारी यंत्रणांनीही हे काम हाती घ्यावं, जेणेकरून या कामाला गती येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन इमारतींमधल्या घरांशी संबंधित विविध मुद्द्यांवर आमदार विजय गिरकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
प्रवाशांच्या समस्या तसंच तक्रारी वजा सूचना यांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण होण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ - एस टीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेतील. आणि त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ही माहिती दिली.
****
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत नव्यानं ५२ ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या, परंतु त्यांना एलजीडी कोड मिळाला नसल्यानं १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नसल्याचं, इथल्या सरपंचांनी सांगितलं आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या ५२ गावातील सरपंचांनी येत्या ८ जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं येत्या रविवारी ‘लातूर हरितोत्सव २०२४’चं आयोजन करण्यात आलं आहे. शहराच्या गंजगोलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात रोपवाटिकांच्या कक्षांसोबतच महिला बचतगटांचे तृणधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे कक्षही सहभागी होणार आहेत.
****
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या पंढरपूर आषाढी दिंडीनं आज वाळूजकडे प्रस्थान केलं. छत्रपती संभाजी नगर नजिक दौलताबाद इथं काल ही दिंडी मुक्कामी आली होती. याठिकाणी आज सकापासूनच भाविकांनी दिंडीत दर्शनाचा लाभ घेतला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशि�� बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना संसदीय नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच झालेल्या एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सदनात आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
****
दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आजही गदारोळ झाला. या मुद्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला, तर अंबादास दानवे यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांचं निलंबन करण्याची मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर, ‘सर्व घटनेचं ध्वनिचित्रमुद्रण बघून योग्य ती कारवाई करू’, असं आश्वासन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं. मात्र, तरीही गदारोळ न थांबल्याने उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ न थांबल्यानं दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केलं.
दानवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
विरोधकांनीही त्याला घोषणाबाजीने उत्तर दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना, राहुल गांधी यांचं ते विधान फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असल्याचं सांगत, त्या विधानाचं समर्थन केलं. तसंच, लोकसभेतल्या वक्तव्यांचा विधिमंडळाच्या कामकाजाशी काहीही संबंध नसताना आणि बाहेरचे विषय सभागृहात न मांडण्याचा नियम असून, हा मुद्दा आज सभागृहात लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६५ कोटीं रुपयांच्या प्रस्तावाला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरातल्या वाहनतळ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी समिती पाठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनीही यासंदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी केली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि चवदार तळे सुशोभीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना वडेट्टीवार यांनी केली.
****
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी, या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देत, जरांगे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुधारणा केली जाईल, असं सांगितलं
****
नवव्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या तसेच सुर्यकुमार यादवसह संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करत विधानसभेने सर्वानुमते अभिनंदनपर प्रस्ताव संमत केला.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. योगेश टिळेकर थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही आज अर्ज भरला. विधानसभा सदस्यांमधून ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
****
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मतं मिळवून विजयी झाले. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत दोन जागांवर महायुती, तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट पार करून सासवड इथं मुक्कामी थांबेल, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा हडपसर इथं तर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर इथं होणार आहे
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त 
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पं��रपूरकडे मार्गस्थ
आणि  
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय म���ंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअ�� क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. 
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
shahar-e-aman · 3 years
Photo
Tumblr media
सपा महानगर युवजन सभा की कमेटी गठित-21सदस्यों को दिया गया मनोनयन पत्र समाजवादी पार्टी के महानगर कार्यालय चौक मे समाजवादी पार्टी की यूथ विंग युवजन सभा की महानगर कमेटी गठित करते हुए उनहे माल्यार्पण के उपरान्त मनोनयन पत्र सौंपा गया।महानगर अध्यक्ष सै०इफ्तेखार हुसैन की अध्यक्षता व महासचिव रवीन्द्र यादव रवि के संचालन मे हुए मनोनयन कार्यक्रम मे वरिष्ठ नेताओं की उपस्थिति मे युवजन सभा के महानगर अध्यक्ष संदीप सिंह सत्या ने नरेन्द्र निषाद , अभिषेक यादव ,संदीप कुमार और शानू हाशमी को युवजन सभा का महानगर उपाध्यक्ष नामित किया।अधिवक्ता रोहित यादव युवजन सभा के महानगर महासचिव अखिलेश यादव की संस्तुति व प्रदेश अध्यक्ष नरेश उत्तम पटेल के अनुमोदन से पहले ही नामित किए जा चुके हैं।वही प्रशान्त आर्य को कोषाध्यक्ष बनाया गया।शहर उत्तरी विधान सभा के अध्यक्ष प्रियांशू यादव शहर दक्षिणी विधान सभा अध्यक्ष शीबू यादव तो शरद कुमार शहर पश्चिमी विधान सभा के अध्यक्ष बनाए गए।हुसैन अहमद , विपिन महाजन ,पंकज यादव ,मोनू यादव ,प्रियांशू द्विवेदी ,पंकज प्रियम , अंशुमान शुक्ला ,अज़हर अहमद ,दीपक शर्मा को युवजन सभा का महानगर सचिव नामित किया गया।सोनू सोनकर ,उज्जवल यादव ,सत्येन्द्र विश्वकर्मा ,रणविजय सिंह ,संजीव राज भारतीया को कार्यकारिणी सदस्य के रुप मे युवजन सभा की महानगर कमेटी मे जगहा मिली।सभी नवनियुक्ता पदाधिकारीयों को फूल माला पहना कर अखिलेश यादव के मिशन 2022 को जीतने के लिए डट कर कार्य करने की नसीहत देते हुए बधाई दी गई।सै०इफ्तेखार हुसैन ,रवीन्द्र यादव ,विजय वैश्य ,महेन्द्र निषाद ,इसरार अन्जुम ,मोइन हबीबी ,दीनेश यादव ,वज़ीर खाँ ,महबूब उसमानी ,रीता मौर्या ,सै०मो०अस्करी ,अभिमन्यु पटेल ,ओ पी यादव ,अटल पाण्डेय ,मो०अज़हर ,आशीष पाल ,पंकज साहु ,शिवशंकर विश्वकर्मा ,मशहद अली खाँ ,अब्दुल्ला तेहामी ,सै०आसिफ हुसैन ,सै०मो०हामिद ,मो०हसीब ,आसिफ अन्सारी ,ताहिर उमर ,शिव ओम सिंह पटेल ,चन्द्रवंशी शशिभाल सिंह यादव ,रितेश प्रजापति ,विशाल सिंह आदि ने नवनियुक्�� पदाधिकारीयों को बधाई दी। #samajwadiparty #rashidjamal #shahareaman #sapa https://www.instagram.com/p/CTuFEO8p3QA/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      मराठवाड्यासह विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार.
·      कोविड केंद्रांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करणार, विनयभंग प्रकरणी औरंगाबादच्या कोविड केंद्रामधला डॉक्टर बडतर्फ.
·      दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीनं होणार - शालेय शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण.
·      राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ.
·      वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर.
·      राज्यात आठ हजार ९९८ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ८९० बाधित, दहा जणांचा मृत्यू.
आणि
·      इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक गडी बाद २४ धावा.
****
मराठवाड्यासह विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. राज्यात वैधानिक विकास मंडळं अस्तित्वात नसली तरी ही मंडळं अस्तित्वात आहेत असं गृहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सुत्रानुसारच करण्यात येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणू संसर्ग संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या संसर्गामुळे राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे वस्तू आणि सेवाकराच्या परताव्याची ३२ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारनं ही थकबाकी तातडीनं देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
राज्याचा सन २०२०-२१ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री, अजित पवार आज विधीमंडळात सादर करणार आहेत. यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशनं डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधीमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१’ सादर केल्यानंतर, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजीटल स्वरुपात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.
****
राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून ही कार्यप्रणाली राज्यातल्या सर्व कोविड केंद्रांसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. औरंगाबाद इथल्या कोविड केंद्रामध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित डॉक्टरला चौकशीत तथ्य आढळल्यानं तात���काळ बडतर्फ केल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सभागृह सुरू होताच भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. ही घटना दुर्दैवी असून झालेलं कृत्य वाईट आहे, त्यामुळे गांभीर्य लक्षात घेत प्रथमिक चौकशी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. सखोल चौकशी अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असंही पवार म्हणाले.
****
जळगाव शहरात शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत दिली. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला. पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्यातल्या विविध शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचं ही त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला असून राज्य शिक्षण मंडळानं पेपर पॅटर्न निश्चित केला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. पहिली ते नववीच्या परीक्षां संदर्भात शाळांना लवकरच सूचना दिल्या जातील अशी माहिती काल शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांना तेरा ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी लागू करणार असल्याचंही मंत्री गायकवाड यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं  उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शासनानं तेरा ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या आहेत, असंही गायकवाड म्हणाल्या.
****
राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन काल विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा करता येतात का, अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली. त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं.
****
येत्या एक एप्रिल पासून वीज दरात दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य वीज नियामक आयोगानं तसे आदेश राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. इंधन समायोजन कर एफ ए सी निधीचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फा���दा देण्याचे आदेश आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत. आगामी पाच वर्षांसाठी राज्यातल्या वीज ग्राहकांचे वीजदर कसे असावेत हे ही राज्य नियामक आयोगानं जाहीर केलं असून यानुसार महावितरणच्या घरगुती देयकात एक टक्का कपात करण्यात आली आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर करून, या खात्याचा कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यायला काल मंजुरी दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. ठाकरे यांनी काल हा राजीनामा स्वीकारून, तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. राजीनामा मंजूर केल्यावर राठोड यांच्याकडच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा अशी विनंतीही ठाकरे यांनी केली होती.
****
राज्यात काल आठ हजार ९९८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ८८ हजार १८३ झाली आहे. काल ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५२ हजार ३४० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार १३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ४९ हजार ४८४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ८५ हजार १४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ८९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, जालना जिल्ह्यातल्या चार तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३५७ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १३१, नांदेड १२५, बीड ८८, लातूर ५७, परभणी ४३, उस्मानाबाद ४५, तर हिंगोली जिल्ह्यात ४४ नवे रुग्ण आढळून आले.
****
दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी काल जारी केले. पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे ऑनलाईन तसंच दूरस्थ पध्दतीनं सुरु ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिर परिसरात तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त होणारा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल घेतला आहे.
****
गेल्या दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात खासगी रुग्णालयातही कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरण सुरु झालं आहे. खासगी रुग्णालयात आधार कार्ड किंवा तत्सम ओळखपत्राच्या आधारे ‘ऑफलाईन’ नोंदणी करुन लस दिली जात आहे. या लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख आणि लसीकरण प्रमुख डॉक्टर सतीष हरदास यांनी केली. जिल्ह्यात १६ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आल्याचं हरदास यांनी सांगितलं. ते म्हणाले –
कोविडच्या लसीकरणासाठी आपल्या जिल्ह्यामधे शासकीय संस्था आतापर्यंत १६ ठिकाणी आपण लसीकरण सुरू केलेलं आहे. चार मार्चला आपण काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पण लसीकरण सुरू केलं आहे. अहमदपूर तालुक्यामधे किनगाव आहे, शिरूर ताजबंद आहे, लातूर तालुक्यामधे बोरी आहे. किल्लारीला पण आज लसीकरण सुरू केलेलं आहे. आता वरचेवर आपण यानंतर सेंटरची संख्या वाढवत आहे आणि आपण लसीकरण जे आहे ते प्राथमिक आरोग्य स्तरापर्यंत कसं जाईल याचं पण नियोजन आपण करत आहोत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण विशेष वाङमय पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे. तसंच विख्यात नाटककार शफाअत खान यांना ग्रामीण रंगभूमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार, आणि दिप्ती राऊत यांना प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या तिन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं सुरु झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक गडी बाद २४ धावा झाल्या आहेत. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या गोलंदाजी समोर इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावात आटोपला. इंग्लंडच्या वतीनं बेन स्टोक्सनं ५५ तर डॅनिअल लॉरेन्सनं ४६ धावा केल्या. भारताच्या वतीनं अक्षर पटेलनं ४, आर. अश्विननं ३, मोहम्मद सिराज यानं दोन तर वॉशिंगटन सुंदरनं १ गडी बाद केला. काल खेळ थांबला तेव्हा, सलामीवर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर खेळत होते.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं काल आठवडी बाजारात, कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनानं कारवाई केली असून तात्काळ चाचणी न करणाऱ्याया दहा दुकानदारांच्या दुकांनांना टाळं ठोकलं. तर शहरात विना मास्क फिरणाऱ्या ४४ जणांवर दंडात्मक कारवाई करत यांच्या कडून ८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
****
जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राच्या वतीनं ‘चला लग्नाबद्दल बोलू या’ विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा वैयक्तिक आकांक्षा यावर तज्ञांचं मार्गदर्शन होणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उस्मानाबादचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला काल स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकानं कंधार तालुक्यातल्या चिखल इथून अटक केली. त्यांच्याकडून ३३ दुचाकींसह २९ दुचाकींचे सुटे भाग जप्त केले आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत २७ लाख ७ हजार ८५ रूपये असल्याची माहिती पोलिस विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी विविध मतदार संघातून एकूण ४६ उमेदवारी अर्ज दाखल  झाले आहेत. यात बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर, प्रविण पाटील चिखलीकर, गंगाधर राठोड या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे.
****
उस्मानाबाद तालुका खरेदी-विक्री संघातर्फे हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला हरभरा या खरेदी केंद्रावर आणावा असं आवाहन करण्यात आलं आहे. हा हरभरा ५१०० रूपये प्रति क्विंटल दरानं खरेदी केला जाणार आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी -मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे प्रशासकीय मान��यतेचे अधिकार पुर्वीप्रमाणे पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेल्या अनेक गावातल्या प्रस्तावांना वारंवार मागणी करूनही अद्याप मान्यता मिळाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक काल शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या सर्व शाळांमध्ये आवश्यक फर्निचर, विद्युत व्यवस्था इतर सुविधा निर्माण कराव्यात, परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी दोन पथकं तयार करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
** कोवीड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणार - उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
** श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीमेवरून विधानसभेत गोंधळ
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे २६ नवे रुग्ण
आणि
** चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या २०५ धावांच्या उत्तरात भारताच्या एक बाद २४ धावा  
****
राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करुन लागू करण्यात येणार असून ही कार्यप्रणाली राज्यातल्या सर्व कोविड केंद्रांसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद इथल्या कोविड केंद्रामध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित डॉक्टरला चौकशीत तथ्य आढळल्यानं तात्काळ बडतर्फ केल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सभागृह सुरू होताच भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. ही घटना दुर्दैवी असून झालेलं कृत्य वाईट आहे, त्यामुळे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक चौकशी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. सखोल चौकशी अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असंही पवार म्हणाले.
****
श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा करता येतात का, असा मुद्दा काँगेस पक्षाच्या नाना पटोले यांनी उपस्थित केल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केलं होतं. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपती राजवट लागली तर रडू नका तसंच घटनेची पायमल्ली करु नका, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला. पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारिमधल्या ५६७ रुग्णालयांपैकी ३२३ आरोग्य संस्थांची अग्नीशामक तपासणी करण्यात आली आहे. १७० संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाही सुरु असून त्यातल्या ७४ संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज दिली आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती असल्यानं अंगणवाडीतल्या बालकं आणि गर्भवतींना पोषण आहार पुरवण्याचं कंत्राट महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह स्टेट फाऊंडेशन संस्थेला दिलं असून संसर्ग स्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थानिक महिला मंडळ आणि बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करण्यात येईल, असं महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज सांगितलं. सदस्य धर्मराव आत्राम यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात गेल्या वर्षापासून संसर्गाची साथ असल्यानं अंगणवाडीस्तरावर दिला जाणाऱ्या गरम ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर अंगणवाडी केंद्र सुरु करण्यात येतील असंही ठाकुर यांनी सांगितलं.
****
ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगा अंतर्गत निधीचा चौथा हप्ता दोन महिन्यांत देण्यात येईल, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
****
राज्यातल्या कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत बांधण्याच्या योजनेबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान,कुष्ठरोग शोध अभियानामध्ये डिसेंबर २०२० अखेर राज्यात ५२८१ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी ४५० लहान मुलं आढळल�� असल्याचं एका उप प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितलं. राज्यात गेल्या आठ फेब्रुवारीपासून सक्रिय कुष्ठरोग शोध अभियान नियमित सनियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचंही राज्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे २६ नवे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात सध्या २२३ रुग्णांवर या संसर्गासाठी उपचार सुरू आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये दोन रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
****
राज्यात काल ६ हजार ५५९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ७७ शतांश टक्के झालं आहे. काल ९ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २१ लाख ७९ हजार १८५ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे. ब्राझिल देशातून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. ब्रिटन तसंच युरोप, पश्चिम आशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या नागरिकांनादेखील देखरेखीखाली ठेवण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या कल्याणासाठी नोंदणी प्रक्रिया जलदगतीनं सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये मजुरांच्या स्थलांतराबाबत आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांबाबत मुंबई इथं बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी डॉ. गो-हे बोलत होत्या. राज्यात सुमारे २८ लाख ५५ हजार संघटित कामगार आहेत तर असंघटित कामगारांची संख्या तीन कोटी ६५ लाखांच्या जवळपास आहे.
****
भारतानं अहमदाबाद इथं आज सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लडंचा डाव २०५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर पहिल्या डावात एक बाद २४ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा रोहित शर्मा आठ तर चेतेश्र्वर पुजारा १५ धावा काढून खेळत होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करलेल्या इंग्लंड संघाचा डाव या सामन्यातही गडगडला. अक्षर पटेलनं ६८ धावांत चार, आर. अश्र्विननं ४७ धावांमध्ये तीन आणि मोहम्मद सिराजनं ३४ धावांमध्ये दोन गडी बाद केले. बेन स्टोक्सनं ५५ धावा केल्या. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दोन- एक अशी आघाडी घेतलेली आहे.
****
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचं स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. सायनाला थायलंडच्या पी. चायवानकडून तर कश्यपला स्पेनच्या पी. एबीयनकडून पराभूत व्हावं लागलं. प्रणित, सौरभ वर्मा, अजय जयराम दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. पी. व्ही. सिंधूनंही सहज विजय नोंदवत पुढली फेरी गाठली आहे.
****
कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दाबानं पाणीपुरवठा करण्याचं तंत्र मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रदीप काळबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आयआयटीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यानी विकसित केलं आहे. प्रा. काळबर यांचं पाणी पुरवठा याविषयावर संशोधन सुरु असून त्या संशोधना अंतर्गत हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातल्या सफाळे मधल्या नंदाडे आणि चाफानगर या दोन पाड्यात प्रायोगिक तत्त्वावर नुकताच सुरु करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर - औंढा रस्त्यावर भरधाव वाहनानं आज सकाळी दिलेल्या धडकेमध्ये एक दुचाकीस्वार मृत्यूमुखी पडला. जिंतूर शहरापासून पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पुंगळा गावाजवळ पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात `माझा गाव, सुंदर गाव` उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि शोषखड्डे करण्याची मोहिम सुरू आहे. परभणी तालुक्यातील मांडाखळी या ग्रामपंचायतीमध्ये आज या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून ग्राम स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपीपरी तालुक्यामध्ये धानापूर इथं मुख्य मार्गावरच्या श्री.रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर साहित्य आणि कापूस खाक झाला. दूर्घटनेवेळी कारखान्यात असलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्हा परिषदेच्या १५ जागांचं नव्यानं आरक्षण काढून दोन आठवड्यात निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. ज्या गटांमध्ये संबंधित जाती अथवा जमातीची पुरेशी लोकसंख्या नाही तिथल्या जागा आरक्षित करण्यात आल्यानं ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्यानं आरक्षण उठवण्याची त्यांची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर आता धुळे जिल्हा परिषदेत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सध्याच्या जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.
****
नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा बाजारातल्या माथाडी कामगारांनी आज अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. कांद्याच्या गोणींचं वजन ५० किलो पेक्षा जास्त असल्यानं या गोणी उचलणं नियमात बसत नसल्याचं कामगरांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीही याच मागणीसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं, त्यावेळी बाजार बाजार समिती आणि व्यापा-यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही कोणताही तोडगा न निघाल्यानं काम बंद आंदोलन करण्यात आलं.
//******//
0 notes