#महाराष्ट्रात पूर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्यानव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेल उत्सव 2024 चं आयोजन केलं होतं. यात विविध मंत्रालयातील दोनशेपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि जपान यांच्यातल्या डिजीटल संबंधाना बळकट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे मंत्री तारो कोनो यांच्यासोबत बैठक घेतली. भविष्यात होऊ घातलेल्या तांत्रिक विकासाच्या मुद्यावर डिजीटल क्षेत्रात उभय राष्ट्रात मदत कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यात वैष्णव यांनी जपानच्या रेल्वे तसंच दळणवळण मंत्र्यांशी चर्चा करत रेल्वे, पर्यटन आणि परिवहन क्षेत्रातल्या मुद्यांवर भर दिला आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कर तैनात करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. शहरातल्या गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था करण्यात आली, याबाबतची माहिती महाजन यांनी घेतली.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या ठिकाणी पर्यायी मार्गांचं काम करण्यात आलं आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल, असं चव्हाण म्हणाले. कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, रायगड- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी आपल्या गावाकडं जात आहेत. मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक जण पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, असं प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात काल शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचं आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचही वाघमारे म्हणाले.
****
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव - २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठीच्या ��ारितोषिकांचं काल वितरण करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जिल्ह्यातल्या छत्तीस उत्कृष्ट आणि वीस उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ज भारतीय खेळाडू ऍथलेटीक्समध्ये पदकांसाठी खेळणार आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दीपेश कुमार खेळणार आहे. तर, उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमार, भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामनी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉट पूट एफ-५७ प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी मैदानात उतरतील.
****
0 notes
Text
Floods and landslides in Maharashtra महाराष्ट्रात सतत पूर आणि दरडी कोसळण्यामागची कारणं काय आहेत?
https://bharatlive.news/?p=112670 Floods and landslides in Maharashtra महाराष्ट्रात सतत पूर आणि दरडी कोसळण्यामागची कारणं काय ...
0 notes
Text
Weather Update : IMD कडून महाराष्ट्रात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात
पुणे : उन्हाळ्यात देशातील हवामानात (Weather Update) मोठा बदल झाला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस…

View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र पाऊस: पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट, एनडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले
महाराष्ट्र पाऊस: पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट, एनडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले
महाराष्ट्रात पावसामुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे प्रतिमा क्रेडिट स्��ोत: पीटीआय गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी, वैनगंगा, इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांना पूर आणि मुसळधार पावसामुळे 40 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना बुधवारपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पाऊस आणि पूरमहाराष्ट्रात पाऊस आणि पूर) परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या…

View On WordPress
0 notes
Text
राज्यात सर्वदूर पाऊस; मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागांत पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही चांगला पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे. लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीलायक पाऊस झाला नव्हता. शुक्रवारी सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळनंतर मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. हिवरा येथील पूल वाहून गेला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे हिवरा (जगताप) येथील अजनसरालगत असलेला हिवरा येथील पूल वाहून गेला आहे. अचानक पूल वाहून गेल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून घर जवळ करावे लागत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस; नदी, नाल्यांना पूर नांदेड जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नांदेड, अर्धापूर, हदगाव, बिलोली, धर्माबाद, उमरी, किनवट, मुखेड, मुदखेड, नायगाव या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूरमधील नदी, नाल्यांना पूर येऊन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, श्रावस्ती नगर, जुना कौठा, तरोडा नाका परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर येऊन सेलगाव, देगाव, गणपूर, कोंढा, मेंढला या ब-याच गावांचा संपर्क तुटला आहे. नंदुरबार जिल्ह्यात ७८ मिलीमीटर पावसाची नोंद नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून बळिराजाला दमदार अशा पावसाची प्रतीक्षा होती. अखेर नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत नंदुरबार जिल्ह्यात दमदार असा पाऊस झाला असून, या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे बळिराजा समाधानी झाला आहे. हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. हे पाणी नदीपात्रातून थेट गवात शिरले आहे. गावातील सर्वच घरांत हे पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत मुसळधार रत्नागिरी जिल्ह्यात ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच रायगडमध्येही चांगला पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक भरले सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पाचगणीला पाणीपुरवठा करणारे वेण्णा लेक भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगला पाऊस अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुक्यांमध्ये संततधार पाऊस झाला. सुमारे चार तास संततधार पावसाने हजेरी लावल्याने काही भागातील दुबार पेरणीचे संकट टळ��े आहे. गेल्या एक आठवड्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असला तरी अहमदनगरच्या दक्षिण भागात म्हणावा असा पाऊस झालेला नव्हता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी पाऊस झाल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील जवळपास सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. Read the full article
0 notes
Text
राज्यात जलसंधारण विषयावर जागृती व्हावी : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे - महासंवाद
राज्यात जलसंधारण विषयावर जागृती व्हावी : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
पुणे, दि.१९: पश्चिम महाराष्ट्रात पूर व्यवस्थापन आणि जलसंधारणाविषयी कामांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच जलसंधारणाबाबत ग्रामीण भागात योग्य जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने पूर व आपत्ती व्यस्थापनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.…
View On WordPress
0 notes
Text
केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी
0 notes
Text
सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे. :माजी खा. राजू शेट्टी .
सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे. :माजी खा. राजू शेट्टी .
शेतकरी पुत्रांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारावे-रविकांत तुपकर गौतम बचुटे/केज :- सरकार शेतकऱ्यासोबत वैऱ्या सारखे वागत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही, कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये महापूर झाला आणि पाहणी करायला आता पथक पाठवले. मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सद्या अंधेरी नगरी…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीच्या संघर्षातून मुक्त करणं, हेच सरकारचं उद्दीष्ट-विकसित भारत संकल्प यात्रेतल्या जनसंवादात पंतप्रधानांचं प्रतिपादन
पश्चिम महाराष्ट्रातलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेची मंजुरी
नागरिकांच्या आरोग्यासाठी "राईट टू हेल्थ" कायदा आणणार-आरोग्यमंत्री तानाजी सावंत
पोलिस प्रशिक्षण कार्यक्रमात बीडच्या राजश्री बारगजे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार
आणि
नेमबाज वरुण तोमर आणि ईशा सिंग यांचा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित
****
सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीच्या संघर्षातून मुक्त करणं, हेच आपल्या सरकारचं उद्दीष्ट असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना समाजातल्या शेवटच्या प���त्र गरजूपर्यंत पोहोचवणं हाच विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या संवादात देशभरातल्या हजारो लाभार्थ्यांसह, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार तसंच इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरात पदमपुरा भागात विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दाखवण्यात आला. गृहनिर्माण आणि इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला आणि भारताच्या विकासाची शपथ दिली.
****
धाराशिव इथं आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासह नागरिकांनी पंतप्रधानांचा संवाद पाहिला. प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमदार पाटील यांनी लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्पनेची शपथ दिली, तसंच आयुष्यमान कार्डाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पार्डी इथं नागरिकांनी पंतप्रधानांचा संवाद कार्यक्रम ऐकला. यावेळी उपस्थितांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यातल्या धसाडी इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरीकांनी उत्साहात स्वागत केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले, तसंच आरोग्य तपासणी करण्यात आली.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लक्ष्मण शिंदे आणि मनीषा शिंदे यांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले..
****
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यव्यापी "जनता दरबार" हा उपक्रम राबवण्याचं जाहीर केलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मुंबई इथल्या शिवसेना राज्य संपर्क कार्यालय, "शिवालय" इथून उद्या १० जानेवारी पासून होणार आहे. महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर दानवे यांनी टीका केली.
****
कोल्हापूर, सांगली भागातलं पूर व्यवस्थापन करणं आणि पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणं, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पात जागतिक बँक सुमारे दोन हजार ३२८ कोटी रुपये, तर राज्य सरकार ९९८ कोटी रुपये, असं योगदान देणार आहे. एकिकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणं यातून शक्य होणार आहे.
****
पुणे लोकसभा जागेसाठी तातडीनं पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला, सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगानं याबाब��ची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
****
बिल्कीस बानो प्रकरणातल्या ११ दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या या दोषींची १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुटका झाली होती. या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार गुजरात सरकारला नव्हे तर महाराष्ट्र सरकारला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हा गुन्हा गुजरातमध्ये घडला होता तरी त्याची सुनावणी महाराष्ट्रात झाली होती.
****
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात काल दुसऱ्या दिवशी पिंपरी -चिंचवड शहरातल्या विविध नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये ‘तेरवं’ हे प्रायोगिक नाटक, 'चाणक्य', 'घाशीराम कोतवाल' तसंच मध्यप्रदेशातील प्रायोगिक नाटक 'रा धा' आदी प्रयोग सादर झाले.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं २० जानेवारी पासून ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेला सुरूवात होत आहे. यासाठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांकडून १५ तारखेपर्यंत ऑनलाईन पध्दतीनं प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
****
राज्यातल्य��� नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी लवकरच "राईट टू हेल्थ" कायदा आणणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. काल धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांचे अतिदक्षता कक्ष, अत्याधुनिक प्रयोगशाळा आदी विकास कामांचे भूमिपूजन सावंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सावंत यांच्या हस्ते परंडा इथंही १०० खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि १०० खाटांच्या महिला रुग्णालयाचं भूमिपूजन काल करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या टाकळी गावातल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलीस राजश्री बारगजे यांनी, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. खंडाळा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात हे नऊ महिन्यांचं प्रशिक्षण नुकतंच पूर्ण झालं. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार हटकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
भारतीय नेमबाज वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. इंडोनेशियात जकार्ता इथं झालेल्या आशियायी ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावलं. ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवणाऱ्या भारतीय नेमबाजांची संख्या आता १५ झाली आहे.
****
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत काल विविध जिल्हा व��कास योजनांच्या प्रारूप आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. लातूर जिल्ह्यासाठी तीनशे तेवीस कोटी रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी ६३४ कोटी ५२ लाख रुपये, परभणी ३९० कोटी रुपये, धाराशिव १७२ कोटी १२ लक्ष ३८ हजार रुपये, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
****
रब्बी हंगामात शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करण्याचे निर्देश, राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामं मार्च अखेर पूर्ण करण्याची सूचनाही भुमरे यांनी दिली. पैठण तालुक्यातल्या ४२ गावांचा आणि विविध विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत अधिकाधिक पात्र लाभार्थींना कर्जवाटप कारण्याच्या सूचना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिल्या आहेत, ते काल जालन्यात यासंदर्भातल्या बैठकीनंतर बोलत होते. महामंडळामार्फत आणखी विविध योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, टँकर चालकांचा कोणताही संप प्रस्तावित नसून, नागरिकांनी इंधन भरून घेण्यासाठी गर्दी करू नये, असं आवाहन, जिल्हा पेट्रोल वितरक संघटनेचे अध्यक्ष अकील अब्बास यांनी केलं आहे. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करून विनाकारण अतिरिक्त इंधन भरून घेऊ नये, असं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात सांगितलं आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या रामपिंपळगाव इथं एका पशुपालकाच्या १८ शेळ्या, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. गेल्या पाच दिवसांत या बिबट्याने २८ शेळ्या मारल्या आहेत. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे असं आवाहन वन परिमंडळ अधिकारी दिनेश मोरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने काल हानिकारक मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शहरातल्या ७३ मांजा आणि पतंग विक्री दुकानांची तपासणी केली असता सात दुकानांतून दोन हजार ६० मीटर हानिकारक मांजा जप्त करून संबंधित विक्रेत्यांना दंड ठोठावण्यात आला.
****
0 notes
Text
Floods and landslides in Maharashtra महाराष्ट्रात सतत पूर आणि दरडी कोसळण्यामागची कारणं काय आहेत?
https://bharatlive.news/?p=112669 Floods and landslides in Maharashtra महाराष्ट्रात सतत पूर आणि दरडी कोसळण्यामागची कारणं काय ...
0 notes
Text
���ाष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी 1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,…

View On WordPress
0 notes
Text
Maharashtra: नदीला पूर, नवरीचं गाव ओलांडून; थर्माकोलच्या होड्या करून निघाल्या सगळ्या मिरवणुका, आज माणसाचं लग्न!
Maharashtra: नदीला पूर, नवरीचं गाव ओलांडून; थर्माकोलच्या होड्या करून निघाल्या सगळ्या मिरवणुका, आज माणसाचं लग्न!
लग्नाच्या मिरवणुकीत थर्माकोल गेला, आज मित्राचं लग्न प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील करोरी ते चिंचोली असा सात किलोमीटरचा प्रवास पुराच्या पाण्यात थर्माकोलवर बसून मिरवणुकीने पार करून एक आदर्श घालून दिला. लग्नासाठी पुरुष काय करत नाही. एक वरात इतका वेडा निघाला की थर्माकोलमध्ये त्याची मिरवणूक निघाली. जीवावर खेळून जीवनसाथी भेटण्याची तळमळ काय असते, असा प्रश्न…

View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी 1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली. महाराष्ट्रासह आंध्र…
View On WordPress
0 notes
Text
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही? ः राजू शेट्टी
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही? ः राजू शेट्टी
[ad_1]
मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये पूर आल्यावर तातडीने मदत केली. परंतु महाराष्ट्रात अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊन देखील अद्याप मदत जाहीर केली नाही. महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, ��ाजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्ताने माजी खासदार शेट्टी सांगली जिल्ह्याचा दौरा करून पंढरपूर…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 September 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
मुंबईत गणपती विसर्जनाच्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
केंद्र सरकारपुढे राष्ट्रवादी काँग्रेस झुकणार नाही, - पक्षाध्यक्ष शरद ��वार
राज्य सरकारनं अतिवृष्टी पीडितांना जाहीर केलेली मदत योजना फसवी असल्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पैठणला सत्कार आणि जाहीर सभा
जिल्हा परिषद शिक्षकांचा मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडल्याच्या विरोधात, औरंगाबादमध्ये सन्मान मोर्चा
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं मध्यप्रदेशात नरसिंहपूर इथं निधन
आणि
आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं श्रीलंकेला विजेतेपद
****
राज्यात काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाळूज महानगर आणि तिसगाव परिसरातल्या नदी, नाल्यांना पूर आला, या पुरात तीन राजस्थानी महिला वाहून गेल्या. वाळूज अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. यामध्ये दोर्घींना वाचवण्यात यश आलं असून, एका महिलेचा शोध लागलेला नाही. फुलंब्री तालुक्यातल्या खामगावामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं तर अनेक घरांमध्ये पाणी घुसलं. दरम्यान, या पावसाने औरंगाबाद लगतचा हर्सुल तलाव भरून वाहू लागला आहे. जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रत्येकी चार फुट उघडण्यात आले असून, ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
अंबड तालुक्यातल्या मसई तांडा इथं काल अंगावर वीज कोसळून श्रीराम जाधव या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी शेतात काम करत असताना पाऊस आल्यामुळे जाधव हे झाडाच्या आश्रयाला थांबले. त्याच वेळेस झाडावर वीज कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
दरम्यान, परतूर तालुक्यातल्या लोअर दुधना धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघण्यात आले असून, नदीपात्रात सहा हजार ६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेड शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. शहरालगतच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्य���त आले आहेत. लोहा तालुक्यातल्या लिंबोटी प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गो��ावरी आणि मन्याड नदीला पूर आला असून, नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या चिखली, आमसरी, सुजातपुर, पिंप्री देशमुख, लांजुड परिसरात मका तसंच कपाशी पिकाचं नुकसान झालं आहे. खामगाव परिसरात चिखली, आमसरी भागात शेतामधला मका मुसळधार पावसामुळे पूर्णपणे आडवा पडला. प्रशासनानं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
****
येत्या दोन दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. याकाळात विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं मराठवाड्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या, तर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे.
****
मुंबईत प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या वादातून, शनिवारी ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात काल दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणी विभागप्रमुख महेश सावंत आणि चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून, त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्यात जालना आणि वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी याठिकाणचे ड्रायपोर्ट, कृषिमाल निर्यातीचे हब व्हावेत, अशी अपेक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमानं काल नागपूर इथं, ‘शेतीसाठी ड्रोनचे महत्त्व’ या विषयावरच्या चर्चासत्रात गडकरी बोलत होते. ड्रायपोर्टवरून कृषी मालाची वाहतूक होते, पण आता ही ठिकाणं कृषी माल निर्यातीची केंद्रं व्हायला हवीत, असं ते म्हणाले. रासायनिक आणि सेंद्रीय औषध फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी आहे. सध्या ड्रोनची किंमत अधिक आहे, मात्र केंद्र शासन किसान ड्रोन योजना आणत आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना करुन देता येईल, असं गडकरी यांनी सांगितलं. राज्यातल्या कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
****
देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन, केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी काल डोंबिवली इथं संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या प्रगतीमध्ये आपण सर्व आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करू शकतो, असं ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक बांधणी कार्यक्रमात ठाकूर यांनी, काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. ब्रिटीशांच्या विचाराने चालणारा काँग्रेस पक्ष आज भारत जोडण्याची यात्रा करत आहे, मात्र त्यांनी नेहमीच तोडण्याचं काम केलं असल्याचा थेट आरोप अनुराग सिंह यांनी केला.
****
सरकारी संस्थांचा दबाव, तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकारपुढे राष्ट्रवादी काँग्रेस झुकणार नाही, असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा तरुण पक्ष असून, नव्या पिढीचं नेतृत्व तयार होत असल्याचं ते म्हणाले. महिला सन्मान, शेतकर्यांचे प्रश्न, चीनशी सीमावाद यासरख्या मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
****
राज्य सरकारनं अतिवृष्टी पीडितांना जाहीर केलेली तीन हजार कोटींची मदत योजना फसवी असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे निकष एक हेक्टरने वाढवून सुद्धा, प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणं आवश्यक असताना, सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याचं दानवे म्हणाले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले, त्यासाठी कोणतीही मदत नाही देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी त्यांनी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते पैठणकडे रवाना होतील. पैठण इथं मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि आपेगाव इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. सायंकाळी ते औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी काल सभास्थळाची पाहणी केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७०१ रुग्ण आढ���ले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १० हजार ८३२ झाली आहे. या संसर्गानं काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ५६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ५६ हजार ३२४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य आठ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सहा हजार २२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या १५, औरंगाबाद चार, जालना तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडल्याच्या विरोधात, शिक्षक भारती या संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमखास मैदानापासून सुरु झालेल्या या शिक्षक सन्मान मोर्चात, आपल्या विविध मागण्यांचे फलक घेवून जिल्ह्यातल्या शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेत आमदार प्रशांत बंब यांचा निषेध व्यक्त करत, त्यांच्यावर टीका करण्यात आली.
****
लम्पी या जनावरांमधल्या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृती दल गठीत करण्याची मागणी, किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे. किसान सभेचे अध्यक्ष डॉ अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केलं आहे. तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध आणि उपचार या दोन्ही पातळीवर काम करावं, लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या भागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे, अशा मागण्या नवले यांनी या निवेदनातून केल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. १३ ते २२ सप्टेंबर या काळात जिल्ह्यातल्या सर्व गावात ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं असून, जिल्ह्यातले सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात उमरगा, कळंब, भूम, परंडा, लोहारा या तालुक्यात जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं, लसीकरण हाती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि १७ सप्टेंबरला साजऱ्या होत असलेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर, काल बीड शहरापासून ते बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर, १६ किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी राधाविनोद शर्��ा यांच्या हस्ते काल सकाळी या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी एकूण पाच हजार ९७० वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत सर्व स्तरातल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
****
बी रघुनाथ महोत्सवाला कालपासून परभणी इथं प्रारंभ झाला. येत्या १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात काल सायंकाळी एक पुस्तक एक दिवस या विषयावर. अमोल उदगीरकर यांच्या न-नायक या पुस्तकावर मान्यवरांचं भाष्य झालं. आज सायंकाळी कवी संमेलन, उद्या सायंकाळी प्राचीन भारतीय मंदिरे या विषयावर दीपा मंडलिक यांचं व्याख्यान, तर परवा समारोपाच्या दिवशी राहुलदेव कदम यांचं गजल गायन होणार आहे.
****
पणजी इथं झालेल्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन -२०२२ मध्ये, औरंगाबाद इथल्या मुक्त सृजन साहित्य पत्रिका यांच्या वतीनं दिला जाणारा, राज्यस्तरीय कै. नारायणराव दहिफळे मुक्त सृजन ललितगद्य स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मानव विद्याशाखेच्या अधिष्ठाता, पदव्युत्तर मराठी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे यांच्या, 'पळसबंध', या ललित पुस्तकाला हा पुरस्कार, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
****
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं काल मध्यप्रदेशात नरसिंहपूर इथं निधन झालं, ते ९९ वर्षांचे होते. गुजरातमधलं शारदा पीठ तसंच आणि बद्रीनाथ इथल्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. त्यात सुमारे १५ महिने तुरुंगवास भोगला होता. राम मंदिर लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
श्रीलंकेनं आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १७० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल पाकिस्तानचा संघ १४७ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
Maharashtra Political Crisis: राज्यात पूर आला असताना पाहुणचार कसला करताय?; गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन
Maharashtra Political Crisis: राज्यात पूर आला असताना पाहुणचार कसला करताय?; गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन
Maharashtra Political Crisis: राज्यात पूर आला असताना पाहुणचार कसला करताय?; गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन एकनाथ शिंदे इतर आमदारांसोबत गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असताना तृणमूल काँग्रेसनेही आता यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत थांबलेल्या गुवाहाटीमधील हॉटेलबाहेर…
View On WordPress
0 notes