“रेटून खोटं बोलण्याची विद्यमान आमदारांना सवय”, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
“रेटून खोटं बोलण्याची विद्यमान आमदारांना सवय”, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
“रेटून खोटं बोलण्याची विद्यमान आमदारांना सवय”, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
पुसेगाव (प्रतिनिधी) – खोटं बोल पण रेटून बोल ही विद्यमान आमदारांची सवय आहे. महाराष्ट्रासह आपल्या साताऱ्याला राजकीय संस्कृती असून एक वाईट प्रवृत्तीचा आणि खुनशी राजकारणाचा लोकप्रतिनिधी लाभला हे दुर्दैव आहे. सगळ्याच बाबतीत त्यांची भूमिका खोटं बोलण्याची असते, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी विद्यमान आमदार महेश शिंदे यांचे…
View On WordPress
0 notes
नारायण राणेंची बोलण्याची पद्धत..
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव राज्यसभेत मंजूर-कामकाज संस्थगित.
माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक केल्यास कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची सूचना.
परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्यसरकार याच अधिवेशनात कायदा आणणार.
झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी.
आणि
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथे सुरुवात.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित झालं, त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आपल्यासारखा राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची संधी मिळाली, असंही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान घोषणा देत सभात्याग केला. सभापती जगदीप धनखड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, ते जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. विरोधकांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं, असा सल्लाही सभापतींनी दिला.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, पंतप्रधानांच्या काही विधानांवर आपल्याला बोलण्याची संधी न दिल्यानं, आपण सभात्याग केल्याचं सांगितलं.
तत्पूर्वी, राज्यसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर, उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची कोणतीही अडवणूक केल्यास, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं, तसंच प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या योजनेत नोंदणीसाठी अधिवास प्रमाणपत्राऐवजी पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांकरता महिलांनी सेतुसुविधा केंद्रात गर्दी करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
माझी आपणा सर्व माताभगिनींना विनंती आहे, की आपण कुठल्याही सेतू केंद्रावर किंवा तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आता उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखलासुद्धा काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या योजनेसाठी रहिवासी दाखल्याऐवजी आपल्याकडे असलेलं ओळखपत्र, आपल्याकडे असलेला शाळेचा दाखला, जन्माचा दाखला यासाठी सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहेत, त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. त्यामुळे कृपा करून आपण गर्दी करू नका.
****
परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी परीक्षेतल्या गैरप्रकारांच्याविरोधात कायदा करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज विधान परिषदेत बोलतांना फडणवीस यांनी, याच अधिवेशनात याबाबतचं विधेयक सदनात सादर होईल, असं सांगितलं. आपल्या सरकारनं दोन वर्षाच्या कार्यकाळात एक लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम केला आहे, यापैकी ७७ हजार ३०५ युवकांना रोजगार उपलब्ध करून ��िला असून, पुढच्या तीन महिन्यात सुमारे ३० हजारावर नोकऱ्यांची नियुक्तीपत्रं दिली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य सरकारने ७० लाख उमेदवारांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली असून, पोलिस भरतीतही सुमारे ४० हजार पदं भरण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
****
गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा यासारख्या कोणत्याही सार्वजनिक कामांकरता विनामूल्य जमिनी मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.
****
मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचं, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना आपल्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. या निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं, उपसभापतींनी सभागृहात सांगितलं. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्रात आढळलेल्या झिका विषाणूच्या काही प्रकरणांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांसाठी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सगळ्या राज्यांनी याबाबत सतत दक्ष राहावं आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
राज्य सरकारनं झिका विषाणू संसर्गाबाबतची सद्यस्थिती एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत या संसर्गाचे आठ ते दहा रुग्ण आढळून आल्याचं यात म्हटलं आहे. हा विषाणू डासामार्फत पसरत असल्यानं नागरिकांनी, काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे. यापूर्वी एरंडवणे भागातल्या चार आणि मुंढवा परिसरातल्या दोन रुग्णांना झिकाचं निदान झालं आहे. या सात रुग्णांमध्ये पाच महिला असून त्यापैकी दोघी गर्भवती आहेत.
****
नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानाला आज नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सुरुवात झाली. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पूरक पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता समूहांना खेळते भांडवल हे सहा निर्देशांक १०० टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानात महत्त्वपूर्ण क्षेत्रातल्या एकूण चाळीस निर्देशकांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाचं ���द्या परंडा इथे उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात वडवणी, जालना जिल्ह्यात बदनापूर तसंच परतूर आणि हिंगोली इथंही या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
संत मुक्ताबाईच्या पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत.
अमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची पालखी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथे मुक्कामी येत आहे, उद्या ही पालखी वाळूजला पोहोचणार आहे.
****
0 notes
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078
२०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले.
गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता.
मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती.
दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला …
दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता.
आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरो��ी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले.
मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत .
सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय.
– वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे)
९६१९२७७७३७
Source link
Read the full article
0 notes
For New YouTubers : आपल्या YouTube Channel साठी Best Logo, Banner Art व Video साठी Thumbnail बनवा
Here & Now : या वृत्ताच्या शेवटी सर्व मटेरिअल उपलब्ध
For New YouTubers साठी सुवर्णसंधी : एक चांगला व उत्कृष्ट YouTuber बनण्यासाठी आपल्यामध्ये काही गुण व कला-कौशल्य असणे आवश्यक आहे. केवळ थोड्याच लोकांमध्ये हे गुण व कला-कौशल्य जन्मजात असते, तर काहींना ते शिकून घ्यावे लागते. शेवटी प्रत्येक गुण व कला-कौशल्य शिकून घ्यावे लागते, आत्मसात करावे लागते. Creativity अर्जित करावी लागते. जसे बोलण्याची…
View On WordPress
0 notes
माफ करा तुकोबा... तुकोबा तुम्हाला संप्रदायात यांनी राहूच दिले नाही खरे तुकोबा वारकऱ्यांना पाहूच दिले नाही कीर्तनात सांगून ज्यांनी तुम्हाला वैकुंठाला नेले त्यांनी किर्तन सोडून कीर्तनाचे धंदे चालू केले तुमचे नाव चालते यांना पण विचार चालत नाही तुमच्या बदनामीवर कुठला कीर्तनकार बोलत नाही वारकरी संप्रदाय यांनी आता धर्माला बांधला आहे भोळ्या भाविकांचा असाच यांनी खेळ मांडला आहे तुम्ही असता तर हातून यांच्या वीणा खेचला असता तुमच्या विद्रोहाने बिचारा वारकरी तर वाचला असता तुम्ही असता तर वारकऱ्यांची कमाल झाली असती तुम्हाला बोलण्याची बागेश्र्वराची मजाल झाली नसती माफ करा तुकोबा भाविक आता लाचार झाले आहे कारण हजारो मनुवादी कीर्तनकार झाले आहे -अज्ञात (at Dehu Road Pune Maharashtra) https://www.instagram.com/p/CoCoQB7MY4H/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे- अजित पवार
चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे- अजित पवार
चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे. त्यांच्या स्वभावाला औषध नाही. ते बोलले की मिडीयाला खाद्य मिळत असल्याची अशी बोचरी टीका राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या गुरुजन गौरव पुरस्कारावेळी अजित पवार बोलत होते.
२०२४ च्या निवडणुकीला संपूर्ण बारामतीदेखील आमच्याकडे असेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते रात्रीचे मुख्यमंत्र्यांना भेटत…
View On WordPress
0 notes
शाहीद आफ्रिदी म्हटल्याप्रमाणे ट्विटरला लाल दिसत आहे भारतीय खेळाडूंनाही गौतम गंभीर आवडला नाही | क्रिकेट बातम्या
शाहीद आफ्रिदी म्हटल्याप्रमाणे ट्विटरला लाल दिसत आहे भारतीय खेळाडूंनाही गौतम गंभीर आवडला नाही | क्रिकेट बातम्या
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी एक असा क्रिकेटर आहे, ज्याला अशा गोष्टी बोलण्याची सवय आहे ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या तोंडात वाईट चव येते आणि अनेकदा भारतीय क्रिकेटपटू देखील. त्याने यापूर्वीही भारत आणि भारतीय क्रिकेटपटूंबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत आणि क्रिकेट चाहत्यांकडून खूप टीका सहन करूनही तो आपले मार्ग बदलण्यास तयार नाही अस��� दिसते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उच्च…
View On WordPress
0 notes
किरीट सोमैया हाजीर हो! राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे आव्हान
किरीट सोमैया हाजीर हो! राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे आव्हान
शिंदे फडणवीस सरकारने नुकताच आपला मंत्रिमंडळ शपथविधी पूर्ण केल��� असून यात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघा मंत्र्यांना कॅबिनेट पदाची शपथ दिली आहे. संजय राठोड यांच्या विरोधात पुजा चव्हाणच्या आत्महत्येचा तर अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्यात आपल्या दोन्ही मुलींच्या नावे बोगस प्रमाणपत्रे मिळवण्याचा आरोप आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या गैर कारभारा विरोधात बोलण्याची…
View On WordPress
0 notes
झलक दिखला जा १० साठी नागीन ३ अभिनेता पर्ल व्ही पुरी पोहोचला
झलक दिखला जा १० साठी नागीन ३ अभिनेता पर्ल व्ही पुरी पोहोचला
झलक दिखला जा १० साठी नागीन ३ अभिनेता पर्ल व्ही पुरी पोहोचला
झलक दिखला जा 10: आता ‘नागिन 3’ अभिनेता पर्ल व्ही पुरी याला ‘झलक दिखला जा 10’ साठी अप्रोच करण्यात आले आहे. या शोबाबत निर्माते आणि अभिनेते यांच्यात बोलण्याची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.
झलक दिखला जा 10: टीव्हीचा पॉवरफुल रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ पुन्हा एकदा त्याच्या नव्या सीझनसह धमाका करायला सज्ज झाला…
View On WordPress
0 notes
Narayan Rane Live : पंतप्रधानांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का? - नारायण राणे
https://bharatlive.news/?p=81392
Narayan Rane Live : पंतप्रधानांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का? - नारायण ...
0 notes
मोदींची खोटं बोलण्याची गॅरंटी संजय सिंह..
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन-सरकारी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
राजर्षी शाहू महाराज यांना शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
आणि
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारताचा इंग्लंडशी तर दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानशी सामना
****
अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ घटक पक्षाच्या नेत्यांनी बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून समाजवादी पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसचे के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेलं. उभय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुढच्या पाच वर्षात बिर्ला हे सदनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या पाच वर्षात १७व्या लोकसभेनं बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऐतिहासिक कायदे पारित केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अध्यक्ष ओम बिर्ला विरोधकांना बोलण्याची, मत मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून सेवेची संधी दिल्याबद्दल ओम बिर्ला यांनी सदनाचे आभार मानले. आपल्या या भाषणात अध्यक्षांनी आणिबाणीचा उल्लेख करत, १९७५ साली आजच्या दिवशी देशावर लादलेल्या आणिबाणीची हे सदन निंदा करत असल्याचं, नमूद केलं. अध्यक्षांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर सदनाचं काम���ाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. दरम्यान, संसद भवनाच्या बाहेर सत्ताधारी खासदारांनी आणिबाणीविरोधात फलक झळकावत निदर्शनं केली.
****
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. १२ ��ुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या चहापानाचा कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले सन्माननीय सदस्य, दोन्ही सदनांचे आमदार, तसंच वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या चहापानानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी-एनआरसी हे दोन्ही कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचं, वडेट्टीवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफी करावी अशी मागणी या अधिवेशनात करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलतांना, नीट प्रमाणेच इतर परीझा आणि भरती प्रक्रियेतही गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला अनुपस्थितीवरूनही दानवे यांनी टीका केली.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदार संघात सुमारे ४६ टक्के, मुंबई शिक्षक मतदार संघात ६१ पूर्णांक ४४ शतांश, कोकण पदवीधर मतदार संघात ४८ टक्के, तर नाशिक शिक्षक मतदार संघात सरासरी ६४ पूर्णांक ४१ शतांश टक्के मतदान झालं. मतमोजणी एक जुलैला होणार आहे.
दरम्यान, विधान परिषदेतला कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या सदस्यांना उद्या दुपारी ३ वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात छोटेखानी समारंभात निरोप दिला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी प्रभारी विभागीय आयुक्त जगदिश मिनीयार यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी गावडे यांचं पुष्पगुच्छ देवून स्वागत केलं.
दरम्यान, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश पाठक यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांतून शाहूमहाराजांना अभिवादन करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ट्विट संदेशातून शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रा आणि समता दिंडीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
नांदेड शहरातून आज समता दिंडी काढण्यात आली. शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन निघालेल्या या समता दिंडीत आबालवृद्धांनी सहभाग घेतला.
लातूर इथंही समाज कल्याण विभागाच्यावतीनं आज समता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक इथून या दिंडीला सुरुवात झाली. या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
****
एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत” ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मिळाले आहे. ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला दहा लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
या स्पर्धेसाठी विभागनिहायही बक्षीसं जाहीर झाली असून, तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसं देण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
****
किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन आणि युनिसेफने लैंगिक समानता परिवर्तन कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, एसईआरटीच्या उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे आणि शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून या बाबतच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं.
पहिल्या टप्प्यामध्ये ८-१६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळ-आधारित लैंगिक समानता परिवर्तनात्मक कार्यक्रम राबवण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्याचा प्राथमिक भर हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये “मीना राजू मंच” कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यावर असणार आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान तसंच भारत आणि इंग्लंड दरम्यान उपांत्य सामना होणार आहे. त्रिनिदाद इथं सकाळी सहा वाजता दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तर रात्री आठ वाजता गयाना इथं भारत आणि इंग्लंड दरम्यान सामना होणार आहे.
****
0 notes
माजलगाव प्रकरण... मुख्याधिकारी भोसले यांच्या भावाला अटक; इतर आरोपी मात्र अद्याप फरार. https://beed24.in/majalgaon-case-chief-officer-bhosales-brother-arrested-the-other-accused-is-still-absconding/
*आता झटपट इंग्लिश,*
*Xpert इंग्लिशमध्येच बोला!!*
√ *स्पोकन इंग्लिश.*
√ *10वी स्पेशल इंग्लिश.*
√ ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा.
🎯 *हजारोंच्या पटीत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा इंग्लिशचा एकमेव क्लास.*
🎤 *आता इंग्लिश बोलण्याची 💯%खात्री फक्त आणि फक्त Xpert इंग्लिश मध्येच.*
*Xpert English Classes*
प्रशांत नगर, घुगे हॉस्पिटल जवळ, अंबाजोगाई
7276114044 / 9307440407
1) 👇 *नवीन विद्यार्थ्यांनी* क्लास करण्यासाठी Hello English.. मेसेज पाठवा.. https://wa.me/message/W23W5KAPCISKB1
2) 👇 FB पेज लाईक करा.. https://www.facebook.com/Xpert-English-Classes-105109861768800/
3) 👇 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.. https://youtu.be/rRA_dDQkpok
=================
0 notes
दीपिका पदुकोण ग्लॅम्स अप मुंबई आणि कसे
दीपिका पदुकोण ग्लॅम्स अप मुंबई आणि कसे
दीपिका पदुकोणचे शहरात छायाचित्र
दीपिका पदुकोण अलीकडेच मुंबईतील एका कार्यक्रमात स्नॅप करण्यात आले आणि ती प्रवेशद्वाराकडे जात असताना, अभिनेत्रीने तिच्या सभोवतालच्या सर्वांना आश्चर्यचकित केले. का पाहणे सोपे आहे – अभिनेत्री साध्या काळ्या चमकदार साडीत कार्यक्रमाला उपस्थित होती. आम्हाला अधिक बोलण्याची गरज आहे का? व्हिडिओमध्ये, द गेहरायान अभिनेत्री तिच्या चेहऱ्यावर मोठे स्मित घेऊन कार्यक्रमस्थळी प्रवेश…
View On WordPress
0 notes
' भाजप है तो मुमकीन है ' , रोहित पवारांच्या त्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
‘ भाजप है तो मुमकीन है ‘ , रोहित पवारांच्या त्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची बाजू जोरकसपणे मांडताच राज्यातील भाजप नेत्यांचा मात्र तिळपापड झाला. राज्याच्या हिताच्या गोष्टी बोलण्याची वेळ येते तेंव्हा काही न बोलणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र ��डणवीस लगेच राज्य सरकारवर टिका करायला आतुर झालेले असतात. राज्य शासनावर टिका करण्याआधी त्यांनी आपल्या कार्यकाळातील पेट्रोल-डिझेलवरील कर रचना बघायला हवी आणि राज्य शासनाची आजची भूमिका समजून घ्यावी, असा टोला…
View On WordPress
0 notes