फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले
फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले
फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले
नवी दिल्ली. टेक्नोलॉजीच्या युगात जिथे बरीचशी कामे चुटकीसरशी केली जातात, त्यासोबतचे धोकेही झपाट्याने वाढत आहेत. कधी ओटीपी शेअर केल्यामुळे तर कधी पासवर्डमुळे सायबर फसवणुकीची प्रकरणे समोर येतात. पण दिल्लीत सायबर क्राईमचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत सुरक्षा एजन्सी चालवणारी व्यक्ती सायबर फ्रॉडची शिकार झाली.…
View On WordPress
0 notes
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहि���्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.
- प्रा. डॅा.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती.
0 notes
Emergency Alert Service Alarm - आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट
देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली.
देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रं प्रदान.
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारीत दरानं तत्काळ मदत करण्यासाठी एक हजार पाचशे कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
आणि
बिपरजॉय चक्रीवादळ येत्या गुरुवारी गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता.
****
सरकारी सेवांमध्ये नवनियुक्त सत्तर हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. देशभरातल्या त्रेचाळीस ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यांमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून भारताला पुढच्या काळात विकसीत राष्ट्र बनवण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मातृभाषेतल्या भरती परीक्षांचा देशातील तरुणांना मोठा फायदा होत असल्याचं, तसंच मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी लोकांना मदत झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. स्टार्टअप्स आणि अन्य सरकारी मदत मिळालेले तरुण इतरांना नोकरी देत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. भारताच्या वाहन उद्योगानंही मोठी क��रांती केली असून, दहा वर्षांपूर्वी पाच लाख कोटींच्या आसपास असलेला हा उद्योग आता बारा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
केंद्राच्या एक राष्ट्र एक अंगणवाडी, या विशेष उपक्रमांतर्गत देशभरातल्या सत्तावन्न हजारहून जास्त स्थलांतरित कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी हा उपक्रम उपयुक्त असून, यातून, सहा वर्षांहून लहान बालकं, गर्भवती आणि स्तन्यदा मातांना लाभ मिळू शकेल. महिला आणि बाल विकास मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मोबाईल फोनवर पोषण ट्रॅकर ॲपचा समन्वयानं उपयोग करत स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबियांसाठी ही सुविधा देणं शक्य होणार आहे.
****
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारीत दरानं तत्काळ मदत करण्यासाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात सुधारणा करत तो आता केंद्र सरकारच्या या भत्त्याएवढा करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांच्या शिष्यवृत्तीत सरकारनं आज पाचपट वाढ केली.
लातूर इथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला. पुणे इथं चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करण्याला, तसंच राज्यातल्या अतिरिक्त आणि जलदगती न्यायालयांना मुदतवाढ देण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
याशिवाय,मानसिक आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तींकरता पुनर्वसन गृहं योजनेला आज मान्यता देण्यात आली.
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आजच्या बैठकीतले सर्व निर्णय ऐतिहासिक असून, केंद्राच्या सहकार्यानं राज्याचा विकास होत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काही ठिकाणी निदर्शनाला आलेल्या बोगस बियाणं विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत आपापल्या जिल्ह्यांत पथकं तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.
बियाणं विक्रेते योग्य बियाणं योग्य दरात विकत आहेत की नाही, ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.
****
चढ्या भावानं बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यात नव्यानं कायदा आणण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये चढ्या भावानं बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांचं स्टिंग ऑपरेशन माध्यमांच्या प्रतिनिधींनी आज पैठण इथं केलं. कपाशीच्या बियाणांची विक्री किंमत आठशे ५३ रुपये सरकारनं निश्चित केली असतांना संबंधित विक्रेता साडेबाराशे रुपये किंमतीला हे बियाणं विकत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देतांना सत्तार बोलत होते. वाढीव दरानं बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.
****
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये सौराष्ट्र -कच्छ किनारा या भागात येत्या गुरुवारी संध्याकाळी धडकेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे महानिदेशक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. आज नवी दिल्लीत परिषदेत ते बोलत होते. जमिनीवर धडकल्यानंतर या वादळाचा वेग प्रति तास एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर्स पर्यंत पोचण्याची शक्यता असून, यामुळे गुजरात किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर विशेषत: कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार वृष्टी होण्याची शक्यता असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं.
दरम्यान, या वादळामुळे उद्भवू शकणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत, या भागातल्या पंधरा हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण चौतीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करत, राज्यात संभाव्य चक्रीवादळ उद्भवल्यास केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे व आज एक तेलाचा टॅंकर उलटून त्याला आग लागली. या दुर्घटनेमध्ये दोन जण होरपळले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारया लेनवर एका पुलावर ही दुर्घटना घडली असून, या पुलाखालून जाणाऱ्या दोन गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं वृत्त आहे. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ बंद झाली होती मात्र आता एका बाजूनं वाहतूक सुरू झाल्याचं वृत्त आहे.
****
औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या हज हाऊसचं लोकार्पण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं आज “हज हाऊस टाळं तोडा आंदोलन” करण्यात आलं. हज हाऊसचं बांधकाम पूर्ण झालं तरी हज हाऊसचं लोकार्पण सरकारच्या वतीनं करण्यात आलं नाही. त्यामुळे हज हाऊस खोलो हज हाऊस खोलो अशी घोषणा देत पदाधिकारी दाखल झाले. पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिचारीकांनी वेतनवाढीसाठी आज आंदोलन केलं. परिचारिकांना सुधारित वेतनवाढीतून वगळ्यामुळे राज्यात परिचारिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्यभर महाराष्ट्र शासकीय परिचारिका महासंघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांनी दिली. आमचा प्रश्न न सोडवल्यास राज्यभर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा इंदुमती थोरात यांनी यावेळी दिला.
****
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी लातूर इथे उद्या, चौदा जूनला ‘जागेवर निवड संधी’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात उमेदवारांना थेट मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी, महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी उद्या आवश्यक त्या कागदपत्रांसह लातूर जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
यंदाच्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या एम आर अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीला मात्र पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
//************//
0 notes
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
आईने कान पिळल्यावर फोन तर बंद झाले पण.., आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ओळखीतील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ जर तू फोनवर बोलली नाही तर तुला ठार मारेन ‘ असे देखील तो म्हणाला त्यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेतन नंदकिशोर खलोकर ( वय 21 राहणार शिंगणापूर ) असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
Amazon वर सुरू झाला 'अपग्रेड डेज' सेल, Xiaomi, Realme, Oppo फोनवर बंपर सूट, १४ डिसेंबरपर्यंत ऑफर
Amazon वर सुरू झाला ‘अपग्रेड डेज’ सेल, Xiaomi, Realme, Oppo फोनवर बंपर सूट, १४ डिसेंबरपर्यंत ऑफर
Amazon वर सुरू झाला ‘अपग्रेड डेज’ सेल, Xiaomi, Realme, Oppo फोनवर बंपर सूट, १४ डिसेंबरपर्यंत ऑफर
Amazon smartphone upgrade days sale : Amazon वर Amazon Smartphone Upgrade Days Sale ला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये शाओमी, रियलमी, ओप्पो सह अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.
Amazon smartphone upgrade days sale : Amazon वर Amazon Smartphone Upgrade Days Sale ला…
View On WordPress
0 notes
क्युआरटीचा जवान गणवेशात ए.के.47 सह केतन नागडाच्या सुरक्षेत
नांदेड(प्रतिनिधी)-क्युआरटी पथकाचे जवान खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून वापले जात आहेत. क्युआरटीची एसओपी वाचली असता त्यात खाजगी व्यक्तीला सुरक्षा रक्षक म्हणून क्युआरटी पथकातील जवान देण्याची तरतूद नाही.तो जवान आपल्या गणेवशामध्ये एके 47 ही बंदुक घेवून ही सेवा देत आहे.
��िंदा या देशद्रोही व्यक्तीने नांदेडमधील अनेकांना धमक्या दिल्या, त्यांच्याकडून खंडणी वसुल केली. त्याने पोलीस विभागाला सुध्दा वेगवेगळ्या कारणाने वेठीला धरले होते. त्यात असेही सांगितले जाते की, एका खाजगी व्यक्तीसमोर बसून त्याने मागे माजी पोलीस अधिक्षकांना फोन लावला होता.त्यानंतर त्या पोलीस अधिक्षकांची बदली झाली. अनेक प्रकारे लोकांना फोनवर बोलून धमक्या देवून खंडण्या वसुल केल्या होत्या. त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: सांगितले होते की, मी जवळपास 100 कोटी रुपये खंडणी वसुल केली आहे. नांदेडमधील अनेकांनी याबाबत पोलीसांकडे तक्रार केली नाही. खंडणी देत राहिले. पुढे-पुढे हा प्रतिसाद वाढला या सर्व गॅंगमध्ये काही पोलीसांचाही सहभाग होता. त्यातील एक पोलीस निरिक्षक आज तुरूंगात आहे. ज्यांनी पोलीसांकडे तक्रारी दिल्या. त्यांना पोलीसांनी सुरक्षा रक्षक दिले. काही लोकांनी त्या सुरक्षा रक्षकांचा अतिरेक केला. त्यांचे सुरक्षा रक्षक काढले सुध्दा.
आज पाहिलेला एक क्युआरटी जवान ए.के.47 ही बंदुक घेवून एका व्यक्तीच्या मागे-मागे चालत होता. तो व्यक्ती नांदेडमधील आहे. त्यांचे नाव केतन नागडा असे आहे. क्युआरटी जवान सोबत आहे हे पाहुन क्युआरटी पथकाची एसओपी पाहिली असता त्यात क्युआरटी पथकातील जवान खाजगी व्यक्तीला सुरक्षा रक्षक म्हणून देता येत नाही असे लिहिलेले आहे. क्युआरटी पथक स्थापन झाले तेंव्हा एखाद्या ठिकाणी अचानक उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी क्युआरटी पथकाचा वापर व्हावा असे नमुद आहे. क्युआरटी पथकाचाच जवान पाहिजे हा खाजगी व्यक्तींचा अट्टहास का असेल हे नकळण्याइतपत अवघड नाही. ए.के.47 ही बंदुक घेवून एक पोलीस जवान आपल्या गणवेशात खाजगी व्यक्तीच्या मागे-मागे फिरत असेल तर त्याचा परिणाम समाजावर काय होईल. हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. अनेक व्हिआयपी लोकांसोबत पोलीस जवान सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यातील एसपीयु विभागाचे ते जवान साध्या सफारी या गणवेशात असतात. मग क्युआरटीचाच जवान आणि तो सुध्दा गणवेश आणि ए.के.47 सह सुरक्षा रक्षक म्हणून हवा आहे हे पाहुन जरा अजबच वाटते. सध्या रिंदा भारतातच नाही अशी परिस्थिती आहे. रिंदा है तो हम जिंदा है असे म्हणणारी त्याची भक्त मंडळी त्यातील काही लोकांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तुरूंगात टाकले आहे. काही जण सध्या परागंदा आहेत. तरीपण रिंदाच्या नावावर क्युआरटीचा जवान ए.के.47 सह केतन नागडाच्या सेवेत दिला आहे.
Read the full article
0 notes
Pradip (फोनवर बायकोला) : तू खूप गोड आहेस... तुझी आठवण येतेय
पत्नी : (खूश होऊन) चला काहीतरीच तुमचं…
Pradip : तू माझी राजकुमारी आहेस...
बायको : (हुरळू जाते, लाजते आणि लाडानं म्हणते) खूप खूप थँक यू पतीदेव. बाकी काय चाललंय तुमचं.
Pradip : काही नाही. मला काहीच काम नव्हतं. रिकामा बसलो होतो, म्हटलं जरा तुझी थट्टा करू.
😃😃😃🤗🤗🤗😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
Bandya (फोनवर बायकोला) : तू खूप गोड आहेस... तुझी आठवण येतेय
पत्नी : (खूश होऊन) चला काहीतरीच तुमचं…
Bandya : तू माझी राजकुमारी आहेस...
बायको : (हुरळू जाते, लाजते आणि लाडानं म्हणते) खूप खूप थँक यू पतीदेव. बाकी काय चाललंय तुमचं.
Bandya : काही नाही. मला काहीच काम नव्हतं. रिकामा बसलो होतो, म्हटलं जरा तुझी थट्टा करू.
😃😃😃🤗🤗🤗😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
1 note
·
View note
सापडलेल्या मोबाईलने रिकामटेकड्याने घडवलं ' नको ते ' प्रकरण , सोलापुरातून बेड्या
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एक विकृत व्यक्ती राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क करून अश्लील संभाषण करत असायचा. सोलापूर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याच्या निशाण्यावर केवळ महिला पोलीस आणि महिला पोलीस अधिकारीच असायच्या हे देखील समोर आलेले आहे. यवतमाळ येथील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला त्याने फोन केलेला होता…
View On WordPress
0 notes
' मूड बनवायचा ' म्हणून बायकोचे विवस्त्र फोटो, पुण्यातील प्रकार
‘ मूड बनवायचा ‘ म्हणून बायकोचे विवस्त्र फोटो, पुण्यातील प्रकार
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून पुणे येथील ही घटना आहे. कामानिमित्त पती बाहेर गेल्यानंतर तो त्याच्या पत्नीला फोनवर चक्क विवस्त्र अवस्थेत फोटो पाठवण्याची जबरदस्ती तिला करत होता त्यानंतर त्याने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक कृत्य करून तिला यातना दिल्या. अखेर त्याच्या या प्रकाराला पत्नी माहेरी आली आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर…
View On WordPress
0 notes
' मूड बनवायचा ' म्हणून बायकोचे विवस्त्र फोटो, पुण्यातील प्रकार
‘ मूड बनवायचा ‘ म्हणून बायकोचे विवस्त्र फोटो, पुण्यातील प्रकार
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून पुणे येथील ही घटना आहे. कामानिमित्त पती बाहेर गेल्यानंतर तो त्याच्या पत्नीला फोनवर चक्क विवस्त्र अवस्थेत फोटो पाठवण्याची जबरदस्ती तिला करत होता त्यानंतर त्याने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक कृत्य करून तिला यातना दिल्या. अखेर त्याच्या या प्रकाराला पत्नी माहेरी आली आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर…
View On WordPress
0 notes