Tumgik
#चेंगराचेंगरी
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
बिहारच्या जहानाबाद इथल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन तीन महिलांसह सात भाविकांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गया इथल्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत. स्थानिक विक्रेते आणि भाविकांमध्ये काही कारणाने वाद झाल्याने मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली, मंदिर परिसर अतिशय अरुंद असल्याने चेंगराचेंगरीमुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं, पोलिस अधिक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं.
****
बडतर्फ प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचे ५२ किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरू असल्याची माहित मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
****
महसूल पंधरवड्यानिमित्त नांदेड इथं काल एक धाव सुरक्षेची ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. विविध आपत्ती संदर्भात युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या अनेक शाळा - महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम २० ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत ११९ कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल, त्यांनी २० ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
****
राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४ पूर्णांक ११ टक्के, तर अमरावती विभागातल्या प्रकल्पांमध्ये ६० पूर्णांक १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाची पाणी पातळी वाढल्यानं आज धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढील महिन्यात हरियाणा इथ महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा होणार असून, त्याला वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीग असं नाव देण्यात आल आहे. त्यामध्ये १५ देशातले महिला संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि २०३६ मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दावेदारीला बळ प्राप्त व्हाव, या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, पोलँड, अरजेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत 1800-11-7800 या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
ठाकरेंच्या काळात चेंगराचेंगरी झाली, मात्र आम्ही राजकारण केले नव्हते; बावनकुळेंचे प्रत्युत्तर
https://bharatlive.news/?p=104512 ठाकरेंच्या काळात चेंगराचेंगरी झाली, मात्र आम्ही राजकारण केले नव्हते; ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
राजस्थानच्या खातू श्याम मंदिरात चेंगराचेंगरीत ३ ठार, २ जखमी
राजस्थानच्या खातू श्याम मंदिरात चेंगराचेंगरीत ३ ठार, २ जखमी
पहाटे पाचच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. नवी दिल्ली: राजस्थानमधील सीकर येथील खातू श्यामजी मंदिरात सोमवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. आज चांद्र कॅलेंडरचा 11 वा दिवस शुभ मानला जातो दर्शन खातू श्याम जी यांचे…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी
मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी कंबर कसली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये पोहोचले. या सभेला तुफान गर्दी झाली होती. पण मोदींचं भाषण सुरु असतानाच अचानक पळापळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्या आहेत. यानंतर मोदींनी अवघ्या १४ मिनिटात भाषण आटोपतं घेतलं.
मोदींची सभा…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
चल भाऊ जेवायला... ऐकताच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली, तुम्ही पण पहा हा मजेशीर व्हिडिओ
चल भाऊ जेवायला… ऐकताच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली, तुम्ही पण पहा हा मजेशीर व्हिडिओ
मिरवणुकीत जेवणासाठी चेंगराचेंगरी झाली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram लग्नाचा व्हिडिओ: सोशल मीडियावर दावा केला जात आहे की हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाराटी कसे खायला एकत्र धावतात आणि तिथे चेंगराचेंगरी होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नसमारंभात बनवलेले स्वादिष्ट पदार्थ (लग्नाचे जेवण) आनंद घेण्यासारखे काहीतरी आहे. तुमच्या लक्षात आले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
blogkatta · 7 years
Text
चेंगराचेंगरी आणि आपण
नवीन लेख : माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आताशा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून http://majhiyamana.blogspot.com/2017/09/blog-post.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ माझिया मना
0 notes
jsonawane008-blog · 7 years
Video
instagram
मध्य रेल्वेचं परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत २० ते २५ जण जखमी झाले असून बऱ्याच प्रवाशांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्य मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि जो-तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या पुलावर धावता धावता काही जण खाली पडले. त्यांच्या अंगावर काही प्रवासी पडले, तर अनेक जण त्यांच्या अंगावर पाय देऊन स्वतःला वाचवण्यासाठी धावत सुटले. काहींनी पुलावरून उड्याही मारल्या. त्यात अनेक प्रवासी जखमी झाले, तर मृतांचा आकडाही २२ पर्यंत पोहोचला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. रेल्वेमंत्री मुंबईत परळ-एलफिन्स्टन पुलावरील गर्दीचा विषय अनेक वर्षं चर्चेत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या पुलावर पोलीस तैनात करावे लागतात, इतकी गर्दी इथे होते. परळ टर्मिनस करण्याची चर्चा अनेकदा झाली, पण ठोस कृती काहीच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय तापणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज मुंबईत आहेत. त्यामुळे ते याबाबत काय घोषणा करतात, हे पाहावं लागेल. (at Parel railway station)
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Photo
Tumblr media
एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू मुंबई / प्रतिनिधी : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी होवून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर या दुर्घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांचा एकच हलकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सहा प्रवासी जखमी झाले आहेत.मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणा-या या पुलावर नेहमी गर्दी होते. अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
0 notes
Text
रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 85 ठार, शेकडो जखमी
https://bharatlive.news/?p=89905 रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 85 ठार, शेकडो जखमी
गुरुवारी ...
0 notes
Text
येमेन : रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 78 जण ठार
https://bharatlive.news/?p=89756 येमेन : रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 78 जण ठार
येमेनची ...
0 notes
Text
निपचित पडलेल्या महिला, प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दीत अडकलेली ॲम्ब्युलन्स; आव्हाडांच्या त्या व्हिडिओने खळबळ
https://bharatlive.news/?p=89072 निपचित पडलेल्या महिला, प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दीत अडकलेली ॲम्ब्युलन्स; ...
0 notes
Text
पाकिस्तान : पिठासाठी रोजच चेंगराचेंगरी, संकट ओढवलं तरी कुणामुळे? नेते, लष्कर की कोर्ट?
https://bharatlive.news/?p=80346 पाकिस्तान : पिठासाठी रोजच चेंगराचेंगरी, संकट ओढवलं तरी कुणामुळे? नेते, ...
0 notes
Text
Pakistan: कराचीमध्ये गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी, 12 ठार
https://bharatlive.news/?p=78985 Pakistan: कराचीमध्ये गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी, 12 ठार
पाकिस्तानची ...
0 notes
Text
Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानमध्ये रेशन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
https://bharatlive.news/?p=78825 Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानमध्ये रेशन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी, 11 जणांचा ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 24 November 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २४ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 November 2022
Time 07.10 AM to 07.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सीमा भागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
हृदयरोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टेंट्सचा राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश
नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारची आणखी ९५ प्रकल्पांना तत्वतः मंजुरी
केंद्राची मदत घेऊन विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यास भाग पाडावं- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्य सरकारकडे मागणी
औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाची समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद डी.लिट पदवी जाहीर
हिंगोलीत मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याकरता आंदोलन
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी जाहीर, चार हजार मतदार घटले
आणि
उस्मानाबादमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
सीमा भागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं, तिथल्या ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला असून, या ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं विधान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर, बोलताना मुख्यमंत्री म्हणाले...
Byte…
पाण्यावाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही. आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या, प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत ते लवकर युद्ध पातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही. आणि हा जो काही जुना वाद आहे, तो न्यायालयात प्रलंबित आहे. आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे, सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा हा ठराव दहा वर्ष जुना असल्याचं नमूद केलं. त्यानंतर तिथे पाणीटंचाईवर उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या, असं त्यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कोणतंही गाव राज्यातून बाहेर जाणार नाही, उलट बेळगाव, कारवार निपाणीसह मराठी भाषिक गावंच राज्यात सामील करून घेणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
Byte…
२०१२ साली त्यांनी ठराव केला होता, आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, २०१२ ची मागणी आहे. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाहीये. पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेळगाव, कारवार, निपाणीसहीत हे आमचे गावं आहेत, ते सगळे आम्ही पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल नागपूर इथं गोवारी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी मोर्चा आणला होता, या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते.
****
हृदयरोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टेंट्सचा राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. विशेषज्ञांच्या समितीनं केलेल्या शिफारशींनंतर आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्टेंट्स ची उपलब्धता आणखी सुलभ होणार असून, राष्ट्रीय फॉर्मास्युटिकल मूल्यन प्राधिकरणाला कोरोनरी स्टेंटच्या किमती ठरवता येणार आहेत.
****
नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं आणखी ९५ इथेनॉल प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे देशातल्या वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमतेत सुमारे ४०० कोटी लिटरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल बनवणाऱ्या या प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प धान्यावर आधारित, २० प्रकल्प मळीवर आधारित तर उर्वरित सात प्रकल्प धान्यासह मळीवर आधारित ���सतील, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली आहे. हे प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करुन रोजगाराच्या हजारो संधी ग्रामीण भागात निर्माण करतील. गेल्या एप्रिल महिन्यात या योजनेला मान्यता मिळाली असून २४३ प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची हाताळणी संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं करणार असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी काल गोऱ्हे यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन, सर्व विषयांवर संवेदनशीलतेनं आणि समन्वयाच्या भूमिकेतून मार्ग काढण्याचा दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या १९ डिसेंबरपासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन होणार आहे.
****
पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नसून, केंद्राची मदत घेऊन विमा कंपन्यांना रक्कम लवकरात लवकर देण्यास भाग पाडावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेणं आवश्यक असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ द्यावा, तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, आदी मागण्याही पवार यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नये, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही, राज्य सरकारने प्रभाग रचनेचं काम सुरू करण्याचे आदेश दिल्यानं, याचिकाकर्ते पवन शिंदे यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. प्रभाग रचनेबाबतचे आदेश तातडीने मागे न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 
****
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली असून, त्यांना जीवनावश्यक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. गोखले यांना काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विक्रम गोखले यांनी भूमिका साकारलेला ‘गोदावरी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयातून त्यांना सुटी मिळताच त्यांनी चित्रीकरण पूर्ण केलं. गोखले यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे कुटुंबीय माहिती देतील, असं दीनानाथ रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. देशाचे युवा नेते म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल पाटणा इथं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही सदिच्छा भेट घेतली.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन स्वयंअर्थसहायित विद्यापीठानं समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ्गमय पंडित डी.लिट पदवी जाहीर केली आहे. विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा रविवार २७ नोव्हेंबरला होणार आहे. कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमजीएम हे मराठवाड्यातलं पहिलं स्वयंअर्थसहायित विद्यापीठ २०१९ पासून कार्यन्वित झालं असून, २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षादरम्यान विविध शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये १०९ पदवी, २९१ पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
****
बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दहा आरोपींना दोषी ठरवलं असून, त्यांना विविध रकमांचे दंड आणि एक ते सात वर्षापर्यंत कालावधीचा तुरुंगवास ठोठावला आहे. दोषींमधे दोन बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज सहा खासगी कंपन्यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिकंदराबाद शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन तो निधी इतरत्र वळवून बँकेला चार कोटी ५७ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप या दहा जणांविरोधात होता.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला खाम नदी पुनरुज्जीवन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या कामगिरीबद्दल, फिक्की वॉटर पुरस्कारानं काल नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्ष नैना लाल किदवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
जालना जिल्ह्यात हंगामी स्थलांतरामुळे बाधित होणाऱ्या मुलांच्या संरक्षणबाबत संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि युन��सेफ यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या उपक्रमात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज यांच्या वतीने जालना जिल्ह्यातल्या स्थलांतरामुळे बाधित होणाऱ्या मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे.
****
हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी काल हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंगोली -मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. या मागणीसाठी आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखून धरली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलं. या आंदोलन प्रकरणी रेल्वे कायद्या नुसार १७ आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी चार गटात एकूण १२२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्राप्त अर्जांपैकी तर १३ जणांचे अर्ज अवैध ठरले असून, यादी संदर्भात एकूण ४० अपीलं दाखल झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. विद्या परिषदेच्या जागांसाठी दाखल सर्वच ३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अधिसभा, विद्या परिषद आणि विविध अभ्यास मंडळासाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबरला होणार आहे.
****
शेतातली विहीर ही शेतकऱ्यांची खरी श्रीमंती असून ती टिकवून ठेवावी, तसंच जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापेक्षा कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून समृद्धी साधावी, असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात ७५ ठिकाणी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींचं, काल जल पूजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी पाण्याचं संरक्षण, संवर्धन आणि जपवणूक करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वेळेत वैद्यकीय सुविधा रुग्णांना पुरवण्याचे आदेश परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय, पालम आणि पूर्णा ग्रामीण रुग्णालयाची तपासणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. मुख्यालयात न थांबणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. २०१७च्या तुलनेत या मतदारसंघात तीन हजार ९९७ मतदार कमी झाल्याचं आढळून आलं. या यादीसंदर्भात दावे आणि हरकती नऊ डिसेंबर पर्यंत दाखल करता येतील, असं मतदार नोंदणी अधिकार्यांनी कळवलं आहे. 
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे . उपांत्य फेरीत राज्याच्या पुरुष संघाचा सामना कोल्हापूर सोबत, तर महिला संघाचा सामना दिल्ली सोबत होणार आहे. काल झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी विजय मिळवला तर महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जयमनं कॅनडाचा एक - शून्य असा, तर स्पेननं कोस्टारिकाचा सात - शून्य असा पराभव केला. जपाननं चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीला दोन - एक असं पराभूत केलं, तर मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यातला सामना बरोबरीत सुटला.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागतर्फे, जागतिक वारसा सप्ताहानिमित्त इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागामध्ये आज दुपारी, डॉ.जे.सिंधु यांचं, ’बौध्द मुर्तिशास्त्र-एक अवलोचन,’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन विभागप्रमुख डॉ.पुष्पा गायकवाड यांनी केलं आहे.
****
जागतिक वारसा स्थळ सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं आज हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तू, आणि सांस्कृतिक वारशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन जनजागृती संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संत गोरोबा काका मंदिर, पाण्यात तरंगणाऱ्या विटा, उत्खननात आढळलेला बौध्द स्तूप, त्रिविक्रम मंदिर, वस्तू संग्रहालय अशा विविध स्थळांचा समावेश या हेरिटेज वॉकमधे करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
आर्थिक मागास प्रवर्गाची उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये असताना अडीच लाख रुपयांवरील उत्पन्न आयकरपात्र का-चेन्नई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल.
सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर बेळगाव, कारवार निपाणीसह मराठी भाषिक गावं राज्यात सामील करून घेणार-उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार.
साहित्यिक-विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना एमजीएम अभिमत विद्यापीठाकडून डी.लिट जाहीर.
राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश.
आणि
खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी फिक्की वॉटर पुरस्कारानं औरंगाबाद महापालिका सन्मानित.
****
देशात वार्षिक आठ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आर्थिक मागास प्रवर्गात समावेश होत असताना अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्नावर आयकर का भरावा लागतो, असा सवाल चेन्नई उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं केला आहे. न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला याबाबत नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाव्यतिरिक्त, खंडपीठाने वित्त मंत्रालयाला देखील याचं उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे.
****
नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं आणखी ९५ इथेनॉल प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे देशातल्या वार्षिक इथिनॉल उत्पादन क्षमतेत सुमारे ४०० कोटी लिटरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल बनवणाऱ्या या प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प धान्यावर आधारित, २० प्रकल्प मळीवर आधारित तर उर्वरित ७ प्रकल्प धान्यासह मळीवर आधारित असतील, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली. हे प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करुन रोजगाराच्या हजारो संधी ग्रामीण भागात निर्माण करतील. गेल्या एप्रिल महिन्यात या योजनेला मान्यता मिळाली असून २४३ प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
****
सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यावर बोलत होते. जत तालुक्यातल्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले –
पाण्यावाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्य���चा विचार करणार नाही. आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या, प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत ते लवकर युद्ध पातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही. आणि हा जो काही जुना वाद आहे, तो न्यायालयात प्रलंबित आहे. आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे, सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा हा ठराव दहा वर्ष जुना असल्याचं सांगितलं. कोणतंही गाव राज्यातून बाहेर जाणार नाही, उलट बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक गावंच राज्यात सामील करून घेणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
२०१२ साली त्यांनी ठराव केला होता, आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, २०१२ ची मागणी आहे. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाहीये. पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेळगाव, कारवार, निपाणीसहीत हे आमचे गावं आहेत, ते सगळे आम्ही पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर इथं गोवारी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी मोर्चा आणला होता, या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते.
****
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असुन त्यामागं कोणताही घातपात किंवा तिची हत्या झाली नसल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आपल्या तपास अहवालात केला आहे. २८ वर्षीय दिशानं सुशांतसोबत काही काळ काम केलं होतं. सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळं सीबीआयनं सुशांतच्या मृत्यू प्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन स्वयंअर्थसहायित विद्यापीठानं समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ्गमय पंडित डी.लिट पदवी जाहीर केली आहे. विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा रविवार २७ नोव्हेंबरला होणार आहे. कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसहायित विद्यापीठ २०१९ पासून कार्यन्वित झालं असून २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षादरम्यान विविध शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये १०९ पदवी, २९१ पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी डावानं विजय मिळवण्याची परंपरा कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा द्यावा लागणार आहे. आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी विजय मिळवला तर महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला खाम नदी पुनर्जीवन आणि सांड पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या कामगिरीबद्दल फिक्की वॉटर पुरस्कारानं आज नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी ह्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्ष नैना लाल किदवई आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी आज हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. या मागणीसाठी आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखून धरली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट जवळ ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. आळंदीहून कर्नाटकातल्या इंडी गावाकडे निघालेल्या चारचाकीची येणाऱ्या ट्रकशी धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका चिमुकल्यास दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर यांनी दिली.
****
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ई-पोझ मशिनचे सर्वर डाऊन असल्यानं गर्दी दिसून येत आहे. मशीन चालू बंद होत असल्यानं रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनानं ही समस्या लवकर सोडवली नाही तर महासंघ तीव्र आंदोलन करुन ई-पोज मशिन पुढील महिन्यात सरकारकडे जमा करेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
****
शेतातील विहीर ही शेतकऱ्यांची खरी श्रीमंती असून ती टिकवून ठेवावी, तसंच जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापेक्षा कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून समृद्धी साधावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड, जिल्ह्यात ७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींचं आज जल पूजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी पाण्याचं संरक्षण, संवर्धन आणि जपवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
जागतिक वारसा स्थळ सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं उद्या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तू, आणि सांस्कृतिक वारशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन जनजागृती संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संत गोरोबा काका मंदिर, पाण्यात तरंगणाऱ्या विटा, उत्खननात आढळलेला बौध्द स्तूप, त्रिविक्रम मंदिर, वस्तू संग्रहालय अशा विविध स्थळांचा समावेश या हेरिटेज वॉकमधे करण्यात आला आहे.
****
0 notes