#चॅम्पियन्स ट्रॉफी
Explore tagged Tumblr posts
mazhibatmi · 17 days ago
Text
Champions Trophy 2025 Indian Team: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला मोहीम सुरू करेल. टीम इंडियाला बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर टीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या पाकिस्तानशी होईल. हा शानदार सामना दुबईमध्येही खेळला जाईल. भारतीय संघ 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध गटातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवा��ी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल-मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
विधान परिषदेच्या सभापतिपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड.
२०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी.
आणि
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी घेणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट.
****
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला. सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्याच्या उद्देशाने अत्यंत घाईगडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं, हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात कालही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदार फागनोक कोन्याक यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सदनाबाहेरच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत सभापतींकडे तक्रार केली.
दरम्यान, संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपाच्या खासदारांनी आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत धक्का लागून पडल्याने जखमी झाले. आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सारंगी यांनी केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी याचा निषेध करत, राहुल गांधी यांनी या वर्तनाबद्दल माफी मागावी, असं म्हटलं आहे.
या धक्काबुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली.
या प्रकरणी, भाजपनं राहुल गांधी यांच्याविरोधात तर काँग्रेसनं भाजप खासदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या समर्थकांनी काल रा��्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीसह अनेक ठिकाणी आंदोलनं केली.
दरम्यान, ��ोणताही राजकीय पक्ष किंवा खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत.
****
मागच्या सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा ���ेला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं, त्यावेळी ते म्हणाले.
आज यानिमित्त या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की, कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत.
लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं. नऊ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आपण देणार असून, तीन महिन्यात सौरपंपाची जोडणी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढतांना, सध्या ईव्हीएमसोबत कार्यरत असलेली व्हीव्हीपॅट यंत्रणा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतल्यासारखंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानाच्या टक्क्याबाबत, टपाली मतदानाबाबत, तसंच इतरही अनेक मुद्यांवर घेतलेल्या आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उदाहरणं देत निरसन केलं. जनतेनं दिलेला कौल विरोधकांनी स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच, विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची असून, आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन देत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत, अशी टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमि��ीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनेबाबत विधानसभेत बोलत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम शिंदे यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजूरी देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात हजार ४९० कोटी २४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा समावेश आहे. पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगितलं. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी या चर्चेत सहभागी होत, आपल्या मतदार संघातल्या विविध रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघून पाच महिने उलटून गेल्यावरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. विहित मुदतीत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. 
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
****
पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने, तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल स्पष्ट केलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा समावेश आहे. स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
पुढच्या वर्षी भारतात होणारी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, तसंच २०२६ मध्ये भारत-श्रीलंकेत होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकातल्या भारत पाक सामन्यांसाठी हाच नियम लागू राहणार आहे.  
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात येत्या मंगळवारपर्यंत सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. या सुशासन सप्ताहात जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केलं आहे.
हा जो सप्ताह आहे तो केंद्र सरकारने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सप्ताह मध्ये ज्या काही सर्व सामान्य जनतेच्या -गोरगरिबांच्या ऑन लाईन आणि ऑफ लाईन दोन्ही प्र��ारच्या तक्रारींचा निपटाला करायचा आहे मी आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपण या सप्ताह मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या विभागाशी बंधित असतील त्या विभागाशी आपण संपर्क करावा.
****
हिंगोली जिल्ह्यात २४ डिसेंबरदरम्यान सुशासन सप्ताह पाळला जात आहे. काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे नागरिकांची सनद वाचनाने या सप्ताहास प्रारंभ झाला. आज याअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग परिसरातल्या कुरनूर पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीपैकी, १३ कोटी ९७ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. १० गावांतल्या तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
दरम्यान, टेंभुर्णी- लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने ५७४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली.
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं.
****
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये "देश का प्रकृती परीक्षण" अभियानाचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाकडूनही शहराच्या विविध भागात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी, नागरिकांना या अभियानात आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
जालना तालुक्यात इंदेवाडी इथं जमिनीच्या फेर दुरुस्तीसाठी २० हजार रुपये लाच घेणाऱ्या तलाठ्यास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. शिवदास प्रेमसिंग पवार असं या तलाठ्याचं नाव आहे.
****
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्र���तील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. ��का सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
loksutra · 3 years ago
Text
भारत एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सफाया करेल, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा - टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल! असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केला आहे
भारत एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सफाया करेल, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा – टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल! असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केला आहे
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणतो की, सध्याच्या भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्व पांढऱ्या चेंडूच्या आयसीसी स्पर्धा (टी२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या पाहिजेत. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने मिळवलेल्या विजयानंतर मायकेल वॉनने हे वक्तव्य केले आहे. भारतीय संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ICC Media Rights: वर्ल्डकप-चॅम्पियन्स ट्रॉफी ‘या’ चॅनलवर दिसणार, झी आणि डिस्ने यांच्यात मोठा करार
ICC Media Rights: वर्ल्डकप-चॅम्पियन्स ट्रॉफी ‘या’ चॅनलवर दिसणार, झी आणि डिस्ने यांच्यात मोठा करार
ICC Media Rights: वर्ल्डकप-चॅम्पियन्स ट्रॉफी ‘या’ चॅनलवर दिसणार, झी आणि डिस्ने यांच्यात मोठा करार ZEE Entertainment ने Disney Star सोबत एक करार केला आहे. त्यानुसार, ZEE आता २०२४-२७ या कालावधीत भारतात टीव्हीवर ICC पुरुषांचे इव्हेंट्स प्रसारित करेल. डिस्ने स्टारने या वर्षी जूनमध्ये आयपीएल टीव्हीचेही हक्क मिळवले होते.  ZEE Entertainment ने Disney Star सोबत एक करार केला आहे. त्यानुसार, ZEE आता…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
विश्वचषकाचे श्रेय धोनीला दिल्याने हरभजन संतापला, म्हणाला- बाकीचे खेळाडू लस्सी प्यायला गेले का?
विश्वचषकाचे श्रेय धोनीला दिल्याने हरभजन संतापला, म्हणाला- बाकीचे खेळाडू लस्सी प्यायला गेले का?
महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र 2011 च्या विश्वचषक विजयाचे श्रेय धोनीला मिळाल्याबद्दल हरभजन सिंगने धोनीवर निशाणा साधला आहे. हरभजन सिंगवर निशाणा साधला भज्जी चालू… पण एमएसचा द्वेष नाही pic.twitter.com/4tXxc90lt6 — अर्घ्य डे (@91_arghya) ११ एप्रिल २०२२ स्टार…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IPL: महेंद्रसिंग धोनी हा 6 चे द्विशतक करणारा एकमेव कर्णधार आहे, फक्त डेव्हिड वॉर्नर 50 मध्ये अर्धशतक ठोकू शकला आहे.
IPL: महेंद्रसिंग धोनी हा 6 चे द्विशतक करणारा एकमेव कर्णधार आहे, फक्त डेव्हिड वॉर्नर 50 मध्ये अर्धशतक ठोकू शकला आहे.
एमएस धोनी आयपीएल रेकॉर्ड: एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 220 सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 219 षटकार मारले आहेत. कर्णधार म्हणून त्याने आयपीएलमध्ये 203 षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला 4 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. आयसीसीच्या तीनही प्रमुख विजेतेपदे (ODI विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. एमएस धोनीच्या…
Tumblr media
View On WordPress
#एमएस धोनी कारकिर्दीतील सर्वोत्तम#एमएस धोनी मुले#एमएस धोनी विकिपीडिया#एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी#एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी#एमएस धोनीची निव्वळ संपत्ती#एमएस धोनीची पत्��ी#एमएस धोनीची मुले#एमएस धोनीचे छंद#एमएस धोनीचे वय#जीव धोनी#झारखंड#झिवा धोनी#धोनीचे रेकॉर्ड#फार्म हाऊस#महेंद्र सिंग धोनीचा फोटो#महेंद्र सिंग धोनीच्या लग्नाची तारीख#महेंद्रसिंग धोनी#महेंद्रसिंग धोनी कुठून आला?#महेंद्रसिंग धोनी चरित्र मराठी#महेंद्रसिंग धोनी वय#महेंद्रसिंग धोनी संपर्क क्रमांक#महेंद्रसिंग धोनीचा फोटो#महेंद्रसिंग धोनीची पत्नी#महेंद्रसिंग धोनीचे टोपण नाव काय आहे?#महेंद्रसिंग धोनीने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला?#रांची#होळी २०२२
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
एमएस धोनीने तरुण राजवर्धन हंगरगेकरला दिला हा खास सल्ला, कुठे सुधारणा करायची आहे
एमएस धोनीने तरुण राजवर्धन हंगरगेकरला दिला हा खास सल्ला, कुठे सुधारणा करायची आहे
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नवीन खेळाडू राजवर्धन हंगरगेकर आणि शिवम दुबे यांच्याशी विनोद केला आणि त्यांना त्यांचे फुटबॉल कौशल्य सुधारण्यास सांगितले. आपल्या नेतृत्वाखाली भारताला तीन ICC विजेतेपदे (ICC 2007 T20 विश्वचषक, 2011 ODI विश्वचषक आणि 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकून देणारा MS धोनी, India Cements ने आयोजित केलेल्या आभासी संभाषणात राजवर्धन हंगरगेकर आणि शिवम दुबे…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
टीम इंडियाच्या या दोन फलंदाजांनी गेल्या 9 वर्षात सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकली आहेत
टीम इंडियाच्या या दोन फलंदाजांनी गेल्या 9 वर्षात सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकली आहेत
टीम इंडिया विराट कोहली रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत. त्यात सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराटच्या नावावर एक खास विक्रम आहे. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 च्या फायनलनंतर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत हे दोन्ही खेळाडू वनडे…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
Chelsea Beat Manchester City 1-0 To Win Champions League Title
Chelsea Beat Manchester City 1-0 To Win Champions League Title
पोर्तो येथे यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर ट्रॉफीसह चेल्सीचा कर्णधार सेसार अझपिलिकुइटा पोर्तो, पोर्तुगाल: शनिवारी झालेल्या पोर्टो येथे झालेल्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीवर १-० असा विजय मिळविल्यामुळे चेल्सीने चॅम्पियन्स लीग जिंकून दुस won्यांदा जिंकला. पेप गार्डिओलाने तिस last्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या स्वप्नाचा नाश केला. . हॅव्हर्ट्झने एस्टर्दो दो ड्रॅगओ येथे अर्ध्या-वेळेच्या तीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 June 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ जून २०१७ दुपारी १.००वा. ****
राज्यातले शेतकरी आज संपावर गेले आहेत. भाजीपाला तसंच दुधाची विक्री शेतकऱ्यांनी बंद केली असून, शहरं तसंच महानगरांकडे जाणारा शेतमाल आज सकाळपासून थांबला गेला. बाजार समित्या तसंच अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत, लासलगाव सह कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणलेला नसल्यानं बाजार समित्याध्ये शुकशुकाट आहे. मध्यरात्री चांदवड- मनमाड चौफुलीवर दुधाच्या टँकर मधल्या ८०० पिशव्या फोडून रस्त्यावर दूध ओतण्याचा प्रकार घडला. निफाड तालुक्यातल्या नैताळे इथं संपाला हिंसक वळण लागलं असून, शेतकऱ्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. आंबे, चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे ट्रक जप्त करत ते रस्त्यावर फेकून देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील मह्रळ खुर्द येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून निषेध केला. सातारा जिल्ह्यातल्या सर्व पथकर नाक्यांवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातल्या मोठ्या पथकर नाक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध बाजारात आणले नाही, तर भूम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संकलन केलेलं दुध रस्त्यावर ओतून दिल्याचं वृत्त आहे. अहमदनगर इथंही मुंबईकडे जाणारा शेतमाल टाकळी ढोकेश्वर इथं अडवण्यात आला असून, रस्ता बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   राज्यात इतरत्रही संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. **** विमुद्रीकरणाचा निर्णय हे भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं मोठं पाऊल असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षात अर्थ मंत्र���लयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला. वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यावर देशात मोठा बदल घडून येईल, असं ते म्हणाले. **** देशाचा आर्थिक विकासाचा दर २०१६-१७ या वर्षात सात पूर्णांक एक दशांश टक्के इतका झाला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं ही माहिती प्रसिद्ध केली. विमुद्रीकरणानंतर कृषी क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्राच्या विकासात अडथळे निर्माण झाल्याचं या महितीत म्हटलं आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीचा दर सहा पूर्णांक एक दशांश टक्के राहील्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे. या वर्षात ८७ टक्के चलनाचं विमुद्रीकरण झालं आहे. **** आधार कार्ड धारकांची बायोमॅट्रीक माहिती सुरक्षित असून, कोणत्याही सायबर हल्ल्याचा त्यावर परिणाम झाला नाही, असं भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आधारबद्दलच्या अत्याधुनिक सायबर सुरक्षा संकलनाची माहिती द्यायला प्राधिकरणानं नकार दिला आहे. माहितीच्या अधिकाराखाली याबाबत विचारणा करण्यात आली होती. **** औरंगाबाद शहरालगत असलेल्या हर्सुल तलाव परिसरात जांभूळवन विकसित केलं जात असून, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं पालकमंत्री रामदास यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जांभुळवनास भेट दिली. याठिकाणी मसाला पीके घेण्यात यावी, आणि त्याचं योग्य नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कदम यांनी आज औरंगाबाद शहरातल्या महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ६० किलोमीटर लांबीच्या नालेसाफई कामांची पाहणीही केली. **** आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा आजपासून लंडन इथं सुरु होत आहे. पहिला सामना आज इंग्लंड आणि बांग्लादेश दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतासह आठ देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. येत्या रविवारी एजबेस्टन इथं भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. **** पॅरीस इथं सुरु असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांनी पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि तीची कझाकिस्तानची जोडीदार यारोस्लाव्हा श्वेडोव्हा यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला. **** ग्रामीण घरकुल योजनेतल्या घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या कुटुंबांना, ५०० चौरस फुट जागा ��रेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सुटला असून, जर गावात जागा नसेल, तर गावाबाहेर जागा घेऊन त्या ठिकाणी एकत्रित सर्व जाती धर्मांचे लोक राहणार असल्याचं, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या. ****
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 June 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ जून २०१७ दुपारी १.००वा. ****
राज्यातले शेतकरी आज संपावर गेले आहेत. भाजीपाला तसंच दुधाची विक्री शेतकऱ्यांनी बंद केली असून, शहरं तसंच महानगरांकडे जाणारा शेतमाल आज सकाळपासून थांबला गेला. बाजार समित्या तसंच अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत, लासलगाव सह कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणलेल��� नसल्यानं बाजार समित्याध्ये शुकशुकाट आहे. मध्यरात्री चांदवड- मनमाड चौफुलीवर दुधाच्या टँकर मधल्या ८०० पिशव्या फोडून रस्त्यावर दूध ओतण्याचा प्रकार घडला. निफाड तालुक्यातल्या नैताळे इथं संपाला हिंसक वळण लागलं असून, शेतकऱ्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. आंबे, चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे ट्रक जप्त करत ते रस्त्यावर फेकून देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील मह्रळ खुर्द येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून निषेध केला. सातारा जिल्ह्यातल्या सर्व पथकर नाक्यांवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातल्या मोठ्या पथकर नाक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध बाजारात आणले नाही, तर भूम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संकलन केलेलं दुध रस्त्यावर ओतून दिल्याचं वृत्त आहे. अहमदनगर इथंही मुंबईकडे जाणारा शेतमाल टाकळी ढोकेश्वर इथं अडवण्यात आला असून, रस्ता बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   राज्यात इतरत्रही संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. **** विमुद्रीकरणाचा निर्णय हे भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं मोठं पाऊल असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षात अर्थ मंत्रालयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला. वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यावर देशात मोठा बदल घडून येईल, असं ते म्हणाले. **** देशाचा आर्थिक विकासाचा दर २०१६-१७ या वर्षात सात पूर्णांक एक दशांश टक्के इतका झाला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं ही माहिती प्रसिद्ध केली. विमुद्रीकरणानंतर कृषी क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्राच्या विकासात अडथळे निर्माण झाल्याचं या महितीत म्हटलं आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीचा दर सहा पूर्णांक एक दशांश टक्के राहील्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे. या वर्षात ८७ टक्के चलनाचं विमुद्रीकरण झालं आहे. **** आधार कार्ड धारकांची बायोमॅट्रीक माहिती सुरक्षित असून, कोणत्याही सायबर हल्ल्याचा त्यावर परिणाम झाला नाही, असं भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आधारबद्दलच्या अत्याधुनिक सायबर सुरक्षा संकलनाची माहिती द्यायला प्राधिकरणानं नकार दिला आहे. माहितीच्या अधिकाराखाली याबाबत विचारणा करण्यात आली होती. **** औरंगाबाद शहरालगत असलेल्या हर्सुल तलाव परिसरात जांभूळवन विकसित केलं जात असून, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं पालकमंत्री रामदास यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जांभुळवनास भेट दिली. याठिकाणी मसाला पीके घेण्यात यावी, आणि त्याचं योग्य नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कदम यांनी आज औरंगाबाद शहरातल्या महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ६० किलोमीटर लांबीच्या नालेसाफई कामांची पाहणीही केली. **** आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा आजपासून लंडन इथं सुरु होत आहे. पहिला सामना आज इंग्लंड आणि बांग्लादेश दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतासह आठ देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. येत्या रविवारी एजबेस्टन इथं भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. **** पॅरीस इथं सुरु असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांनी पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि तीची कझाकिस्तानची जोडीदार यारोस्लाव्हा श्वेडोव्हा यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला. **** ग्रामीण घरकुल योजनेतल्या घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या कुटुंबांना, ५०० चौरस फुट जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सुटला असून, जर गावात जागा नसेल, तर गावाबाहेर जागा घेऊन त्या ठिकाणी एकत्रित सर्व जाती धर्मांचे लोक राहणार असल्याचं, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या. ****
0 notes