Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन
नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन
नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्रीमती अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन…
View On WordPress
0 notes
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले .
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार…
View On WordPress
0 notes
श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा उदया शुभारंभ
श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा उदया शुभारंभ
सावंतवाडी खरेदी-विक्री संघ निवडणूक
भाजप नेते आ. नितेश राणे यांची उपस्थिती
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर राहणार उपस्थित
रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार आहे. राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवस्थानाकडे सकाळी ११ वाजता…
View On WordPress
0 notes
सर्वच नवे मंत्री कोट्यधीश | शिंदे मंत्रिमंडळात ७० टक्के मंत्री कलंकित
भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वांत श्रीमंत मंत्री
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याच्या ३९ दिवसांनी मंगळवारी महाराष्ट्रात शिंदे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात एकूण १८ जणांना कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ जणांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळातील प्रत्येक जण कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत भाजपचे मलबार हिल्स मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे २ कोटींची मालमत्ता पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे आहे.
शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १२ मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील काही जणांवर गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर १८, तर उपमुख्यमंत्र्यांवर ४ गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच सध्याच्या शिंदे मंत्रिमंडळात असे ७० टक्के मंत्री कलंकित आहेत.
मंत्रिमंडळातील भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक ९ गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध ६, मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत, तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे, तर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
शिंदे गटातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक ९ गुन्ह्यांची नोंद पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध आहे. त्याखालोखाल ८ गुन्ह्यांसह अब्दुल सत्तार यांचा क्रमांक लागतो, तर संजय राठोड यांच्याविरुद्ध ४ गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान, शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
Read the full article
0 notes
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण…
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण…
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण…
Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.
Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.
Go to…
View On WordPress
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी
राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना
महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आणि
नांदेडचे खासदार वसंतराव चव��हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.
****
दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले .
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार…
View On WordPress
0 notes
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
प्रकाश परबांच्या माध्यमातूनच तळवडे गावात विकासाची गंगा आली
प्रकाश परबांच्या माध्यमातूनच तळवडे गावात विकासाची गंगा आली
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर
कै. प्रकाश परब यांच्या विविध सामाजिक उपक्रमांनी चौथ्या स्मृतिदिनी आदरांजली
सावंतवाडी : तळवडे गावच्या विकासात प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी गावात विकासाची गंगा आणली. त्यामुळे त्यांच्या स्मृती कधीही कोणाच्या मनातून पुसल्या जाणार नाहीत, अशी भावनाराज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यांतील तळवडे येथे आयोजित…
View On WordPress
0 notes