#होणार”
Explore tagged Tumblr posts
Text
तब्बल ६ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात ऋषी सक्सेनाचं दमदार पुनरागमन
स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा…
View On WordPress
#Aai Kuthe Kay Karte#Rishi Saxena#Rishi Saxena In Aai Kuthe Kay Karte#Star Pravah#ऋषी सक्सेना झळकणार आई कुठे काय करते मालिकेत#स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री
2 notes
·
View notes
Link
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट - Asha volunteers Diwali gift to be given along with salary increase
0 notes
Text
#Maharashtra Board HSC Results#बारावी चा निकाल उद्या जाहीर होणार#Maharashtra HSC result 2023 date and time announced#HSC Result 2023
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट नि��्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोर���मॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्��ॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, का��ीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे ��घितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्श��
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला च��ंगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमध���े,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
या अमरग्रंथाच्या वाणीने संपूर्ण विश्वामध्ये पुन्हा स्वर्गाप्रमाणे सुख-शाती प्रस्थापीत होणार आहे पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
2 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंह��सन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
��सेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली संयुक्त समिती हा अहवाल सादर करेल. दिलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीने मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं तसंच विरोधी पक्षांकडून अहवालावरील त्यांच्या असहमतीच्या नोंदी सादर केल्या आहेत.
****
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज सुरु आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास ३५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृ��्तात म्हटलं आहे.
****
देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरीकांपासून सावध राहण्याचं आवाहन. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून, अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, देशातल्या युवकांनी अशा राष्ट्र विरोधी घटकांचे मनसुबे हाणून पाडावे, असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने आयोजित परिषदेत ते काल बोलत होते. युवकांनी यापुढे आपल्या अस्तित्वासंदर्भातली आव्हानं ओळखून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी आर्थिक राष्ट्रवाद मनात रुजवण्याची गरज असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्याची घोषणा आणि सर्व स्तरावर कर टप्प्यात फेरबदल केल्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कर व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारला अपेक्षित नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत ७५ टक्के कर दात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमाने प्रचार करत आ��ेत. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी येत्या बुधवारी पाच तारखेला मतदान होणार आहे; तर आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
****
आयुर्वेद ही सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती असून, यात संशोधन, नवोन्मेश आणि स्टार्टअप सुरु करण्यासाठी, आयुष मंत्रालय चालना देणार असल्याचं, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या, आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन काल जाधव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात आयुष औषधी केंद्रांचं जाळ उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची राज्यातली एकंदर रुग्णसंख्या १५८ झाली आहे. ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात तर २१ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये अचानक केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं, याबाबत वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर सेलेनियम धातूमुळे केस गळती होत असल्याचा अहवाल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआर ने दिला आहे. धान्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेनियमचा वापर केला जातो; मात्र हा घटक अन्नधान्यामधून अतिरिक्त प्रमाणात नागरिकांच्या शरीरात गेल्यामुळे केस गळती सुरू झाल्याचं आय सी एम आर नं म्हटलं आहे.
दरम्यान, खामगाव इथल्या धान्य गोदामांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
नाशिकजवळ सापुतारा घाटात खाजगी प्रवासी बसला झालेल्या अपघातात पाच भविकांचा मृत्यू झाला, तर १७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धार्मिक पर्यटनासाठी निघालेल्या मध्य प्रदेशातल्या भाविकांची बस २०० फूट दरीत कोसळून हा अपघात झाला.
****
टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यानं पटकावलं आहे. काल झालेल्या सामन्यात त्याने सध्याचा विश्वविजेता डी गुकेशवर विजय मिळवला. प्रज्ञानंदा आणि गुकेश दोघेही १३ फेर्या��नतर साडे आठ गुणांसह बरोबरीत होते.
****
सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे.
****
0 notes
Text
कुष्ठरुग्ण शोध अभियान व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा
सोलापुर दि. 28:- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम- कुष्ठरुग्ण शोध व उपचार अभियान- दिनांक 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 सोलापूर जिल्ह्यात सदर कुष्ठरूग्ण शोध व उपचार अभियान राबविण्यात ये�� आहे. समाजातिल निदान न झालेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर शोधुन त्वरीत बहुविध औषधोपचारखाली आणणे, नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणार प्रसार कमी करणे, समाजात…
0 notes
Text
मी वसंतराव चित्रपटाचा JioCinema वर होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला JioCinema होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे…
View On WordPress
#Amey Wagh#Anita Date#Anita Date Kelkar#Ghei Chhand#Jio Cinema#JioCimema#Me Vasantrao#Mi Vasantrao#Pushkaraj Chirputkar#Rahul Deshpande#��ी वसंतराव#मी वसंतराव चित्रपटाचा JioCinema वर होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
0 notes
Text
आता खेळ मोठा होणार!
तुमची कल्पकता आहे का एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या स्टोरीसारखी ?
मग आम्ही शोधतोय अशा #GraphicDesigner ला !
ज्याचे डिझाईन अनेक ब्रँड सुपरहिट करतील !
आवश्यक कौशल्ये
#PhotoSHOP
#CorelDRAW
🚩 सोशल मीडिया आणि बँडिंग अनुभव |
🚩 कल्पक विचार आणि नव्या ट्रेंडची जाण !
📍 Shaniwar Peth, Pune
📞 9049494938 | 8626020202
0 notes
Text
सरकारची पिंक ई रिक्षा योजना महिला भगिनींसाठी होणार रोजगाराचं साधन , महापालिकेकडून मदतीसाठी नंबर जाहीर
सरकारची पिंक ई रिक्षा योजना महिला भगिनींसाठी होणार रोजगाराचं साधन , महापालिकेकडून मदतीसाठी नंबर जाहीर
नगर शहरात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सध्या सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलेला असून सरकारकडून आलेली पिंक इ रिक्षा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन वाहनपरवाना दिला जाणार आहे. रिक्षांच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरून ही रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार असून महिलांनी पिंक रिक्षासाठी महापालिकेत अर्ज करून लाभ घ्यावा असे…
0 notes
Text
परफेक्ट फिनिश मिळवा - कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्ससह!
कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स वापरून आपल्या पेंटिंग प्रोजेक्ट्ससाठी मजबूत व सुंदर पाया तयार करा! आपल्या भिंतींवरील किंवा छतांवरील असमान पृष्ठभाग, भेगा आणि खडबडीतपणा काढून टाकण्यासाठी कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स सर्वोत्तम उपाय आहेत.
��ा निवडावे कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स?
भेगा भरण्यासाठी योग्य: भिंतींवरील व इतर पृष्ठभागांवरील भेगा व खड्डे सहज भरून काढण्यासाठी.
स्निग्ध व सपाट पृष्ठभाग: पेंटिंगसाठी परफेक्ट बेस तयार करून सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी.
टिकाऊ व वापरण्यास सोपे: वापरण्यासाठी सहजतेसह मजबूत व टिकाऊ साहित्य.
प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्टची सुरुवात योग्य बेसपासून होते!
कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्समुळे तुमचे काम केवळ सोपेच होणार नाही, तर गुणवत्तेतही उत्कृष्टता प्राप्त होईल. भिंती, छत, किंवा डिटेलिंग - कोणत्याही पृष्ठभागावर काम करताना कबावतच्या प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रोजेक्टला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट बनवा. परिपूर्ण रंगकामासाठी योग्य पाया का महत्त्वाचा आहे?
तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतींना सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारा लूक देण्यासाठी पाया मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कबावतच्या पुट्टी पट्ट्यांसह, तुम्हाला गुळगुळीत आणि भव्य पृष्ठभाग मिळतो, ज्यामुळे तुमचे रंगकाम अजूनच उठून दिसते.
कबावत स्टील पुट्टी पट्ट्यांचे फायदे:
भेगा आणि खड्डे भरून पृष्ठभाग परिपूर्ण बनवतो.
पेंटसाठी उत्कृष्ट आणि गुळगुळीत पाया तयार करतो.
टिकाऊपणा आणि सहज हाताळणीसाठी खास डिझा��न केलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
📞 82096 17061 | 98218 25663📧 [email protected]🌐 कबावत ब्रश कंपनी वेबसाइट 📷 इंस्टाग्राम
तुमच्या रंगकामाची सुरुवात आता करा!
🛒 ऑनलाइन खरेदी करा: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/roller-brushes.html
हमसे जुड़ें: क्रिएटिव आइडियाज़ और अपडेट्स के लिए हमें इंस्टाग्राम पर फॉलो करें यहां।
~https://www.instagram.com/p/DCy2EeLtWj5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
For more information or to request a consultation, visit their website: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸 Instagram - https://www.instagram.com/kabawatbrush/
📘 Facebook - https://www.facebook.com/kabawatbrushcompany/
📌 Pinterest - https://in.pinterest.com/kabawatb/
🧵 Thread - https://www.threads.net/@kabawatbrush
🥁 Tumblr - https://www.tumblr.com/kabawatbrush
▶️ YouTube - https://www.youtube.com/@KabawatBrushCompany
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061 / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd.
+91-9004590039
Follow us on Social Media
🌐 Website - https://tvminfo.com/
📸 Instagram - https://www.instagram.com/tvm_infosolution/
📘 Facebook - https://www.facebook.com/people/Tvm-Info-Solutions-Pvt-Ltd/61555896761755/
🔗 Linkedin - https://in.linkedin.com/company/tvminfo
▶️ Youtube - https://www.youtube.com/@tvminfosolutions
#कबावतस्टीलपुट्टीस्ट्रिप्स#स्निग्धपृष्ठभाग#पेंटिंगआवश्यकता#फिनिशिंगपरफेक्शन#कबावतगुणवत्ता#SmoothWalls#PaintingTools
0 notes
Text
Oppo Reno 13 Series: Oppo कंपनी लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली Oppo Reno 13 सीरिज लॉन्च करणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 9 जानेवारी 2025 रोजी येणाऱ्या Oppo Reno 13 आणि Oppo Reno 13 Pro स्मार्टफोन्सकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू शकता. या सीरिज मध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि प्रीमियम डिझाईन पाहायला मिळणार आहे.
0 notes
Text
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
सातारा दि.०३ (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ग्रामविकास…
View On WordPress
0 notes
Text
Fertilizer Subsidy : खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार | केंद्र सरकारची नवी योजना!
Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आता मोठा बदल करत असून, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याची तयारी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चावर नियंत्रण येईल आणि खतांचा वापरही प्रभावी होईल, असा सरकारचा दावा आहे.
0 notes