#होणार”
Explore tagged Tumblr posts
Text
तब्बल ६ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात ऋषी सक्सेनाचं दमदार पुनरागमन
स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा…

View On WordPress
#Aai Kuthe Kay Karte#Rishi Saxena#Rishi Saxena In Aai Kuthe Kay Karte#Star Pravah#ऋषी सक्सेना झळकणार आई कुठे काय करते मालिकेत#स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री
2 notes
·
View notes
Link
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट - Asha volunteers Diwali gift to be given along with salary increase
0 notes
Text
#Maharashtra Board HSC Results#बारावी चा निकाल उद्या जाहीर होणार#Maharashtra HSC result 2023 date and time announced#HSC Result 2023
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या का��ात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या स�� आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळ�� होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.

तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघा��चे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्��र्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)

मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)


तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )


हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.


मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बा�� पटेल ,उमेश कुलकर्णी )


अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
2 notes
·
View notes
Text

या अमरग्रंथाच्या वाणीने संपूर्ण विश्वामध्ये पुन्हा स्वर्गाप्रमाणे सुख-शाती प्रस्थापीत होणार आहे पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
2 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३

प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.

सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदीराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत, म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या मंदीराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी, या मंदीर्च्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.
****
तिथीनुसार शिवजयंती आज राज्यात ठीकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. या निमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४५ फुटी पुतळ्याचं अनावरण करत त्यांना अभिवादन केलं.
नागपूर शहरात महाल परीसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पंचामृतानं अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ��ोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
****
विधानसभेत आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. मागच्या अडीच वर्षात राज्य झपाट्यानं पुढे गेलं असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
****
भारतीय कापूस महामंडळ - सीसीआय मार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सीसीआय ने लांब धाग्याच्या कापसाला सात हजार ५२१ हमीभाव दिला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातली १५३ रिक्त पदं येत्या महिन्याभरात भरली जातील अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. या संदर्भात भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
****
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुघल शासक औरंगजेब याच्याशी तुलना केल्याचा भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत निषेध केला. हा महाराष्ट्राचा अपमान असून सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं.
****
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी हे आज अर्ज भरणार आहेत. विधान परिषदेतले पाच सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. या शेतकऱ्याने पाण्यासाठी जीव दिला, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरस्कार नको पाणी द्या अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील आणि इतर आमदार उपस्थित होते.
****
नाविन्यपूर्ण 5G-संचालित तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्याच्या उद्देश��ने दूरसंचार विभागाने 5G इनोव्हेशन हॅकेथॉन २०२५ ची घोषणा केली आहे. या उपक्रमात प्रसारण, आरोग्य, कृषी, औद्योगिक क्षेत्रांतील विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांच्या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या नवेपक्रमांना प्रोत्साहीत केले जाईल.
****
राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा सांगली जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या जवळपास २२० गावात कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. या चित्ररथावर विविध शासकीय योजनांचे फलक, तसंच ध्वनीफितीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून त्यांना माहिती दिली जाणार आहे.
****
0 notes
Text
मी वसंतराव चित्रपटाचा JioCinema वर होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला JioCinema होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे…

View On WordPress
#Amey Wagh#Anita Date#Anita Date Kelkar#Ghei Chhand#Jio Cinema#JioCimema#Me Vasantrao#Mi Vasantrao#Pushkaraj Chirputkar#Rahul Deshpande#मी वसंतराव#मी वसंतराव चित्रपटाचा JioCinema वर होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
0 notes
Text
‘ त्या ‘ खोट्या माहितीमुळे पीडित महिलेचेच चारित्र्यहनन , वकिलावर कारवाई होणार का ?
0 notes
Text
बायको : अहो, आपले पैसे दुप्पट कधी होणार…
Pradip : अगं… मी करुन देतो ना…
बायको : तुम्ही कसे करणार…
Pradip: नोटांचे बंडल घे… आणि ते आरश्या समोर ठेव… झाले की नाही काही सेकंदात पैसे दुप्पट..
😃😃😃😅😅😅🤣🤣🤣😍😍😍
1 note
·
View note
Text
बायको : अहो, आपले पैसे दुप्पट कधी होणार…
Bandya : अगं… मी करुन देतो ना…
बायको : तुम्ही कसे करणार…
Bandya : नोटांचे बंडल घे… आणि ते आरश्या समोर ठेव… झाले की नाही काही सेकंदात पैसे दुप्पट..
😃😃😃😅😅😅🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
When I'll be in LOVE ❤️
When I'll be in love, I'll be the totally different person for him...that you can't even imagine एक सम��ुद्दार, प्रामाणिक, mature व्यक्ती offcourse childish for him..but I'll be different person you'll be ever seen.. जेव्हा मी प्रेमात पडेल ना तेव्हा I might be in प्रेमात अंधळी झालेली आरू जिला त्याच्या शिवाय काहीच दिसत नाही...आणि त्या गोष्टी पण करेल ज्या तिला cringe वाटतं होत्या.when I'll be in love ना ज्या गोष्टी मी कोणालाच नाही ना सांगत त्या गोष्टी मी त्याला सांगेल.. त्याचं मी ऐकून घेईल...जर तो म्हणाला ना आज हे हे घाल मी ते घालून जाईल...आणि मला माहितेय तो माझा बंदा आहे कसली बंधन तो माझ्यावर टाकणार नाही...पण पण पण त्याला ती गोष्ट आवडते म्हणून ती गोष्ट त्याच्यासाठी करेल even though I don't like it...
When I'll be in love मी त्याला रोज विचारेल जेवलास का?
कारण look guys if you're not asking him or her "have you eaten?" Then what's the point of your relationship??? जेवण केलं का is mandatory thing to ask in relationships...
मला काही खास नकोय फक्त त्याच्याबरोबर चालत चालत फिरायचय आणि नुस्त बोलायचय...
When I'll be in love त्याचा नुसता आवाज जरी आला ना तरी माझ्या हृदयाच्या धडधडन्याचा वेग वाढेल..आणि त्याच्या तिथं असन्यानच एक वेगळीच feeling येइल म्हणजे की अंगावर काटा येणं, लाजणं आणि हे त्याने notice करण argbhhh...म्हणजे मी जेव्हा प्रेमात असेल ना तेव्हा माझी हिम्ममत पण नाही होणार की त्याचा फोटो zoom करून बघेल...well Only share my food with my close onse okay?? I'll share my lunch dinner or whatever meal I have I'll share with him... I'll try to cook for him...when I'll be in live अचानक मी नीटनेटकी राहायला लागेल...सगळे days celebrate करेल. Matching bracelet किंवा रिंग किंवा chain घालेल..म्हणजे almost त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हीच काय मी पण माझ्याकडून expect नसतील केल्या but only when I'll be in LOVE....
0 notes
Text
67. संबद्ध आणि असंबद्ध
श्रीकृष्ण आपल्याला खात्री देतात की अनासक्तीने कृती केल्याने, म्हणजे आसक्ती आणि अलिप्ततेच्या पलीकडे जाऊन, व्यक्ती सर्वोच्च स्थितीला प्राप्त करतो (3.19) आणि राजा जनकाचे उदाहरण देतो, ज्याने केवळ कृतीद्वारे सिद्धी प्राप्त केली (3.20).
श्रीकृष्ण सांगतात की विलासात मग्न असलेला आणि अनेक जबाबदाऱ्या असलेला राजासुद्धा सर्व कार्ये अलिप्ततेने करून परमात्म्याला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपणही आपल्या परिस्थितीला न जुमानता याच मार्गाने सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो.
इतिहासात अशी फार कमी उदाहरणे आहेत जिथे दोन ज्ञानी व्यक्तींनी ��ंवाद साधला असेल. असाच एक संभाषण राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र यांच्यात आहे, ज्याला अष्टावक्र गीता म्हणून ओळखले जाते, जे साधकांसाठी सर्वोत्तम मानले जाते.
असे म्हणतात की एकदा एका गुरूंनी आपल्या एका शिष्याला, जो लंगोटी आणि भिक्षेची वाटी घेऊन राहत होता, राजा जनकाकडे त्याच्या शेवटच्या पाठासाठी पाठवले. तो जनकाकडे येतो आणि त्याला आश्चर्य वाटते की त्याच्या गुरूंनी त्याला या माणसाकडे का पाठवले जो ऐशोआरामात राहतो पण गुरूंच्या आज्ञेनुसार तो राजवाड्यातच राहतो. एके दिवशी सकाळी जनक त्याला आंघोळीसाठी जवळच्या नदीवर घेऊन जातो. डुबकी मारताना त्यांना बातमी मिळते की राजवाडा जळून खाक झाला आहे. विद्यार्थ्याला त्याच्या लंगोटीबद्दल काळजी वाटते तर पालक निश्चिंत राहतात. त्याच क्षणी विद्यार्थ्याच्या लक्षात आले की सामान्य लंगोटीची देखील आसक्ती आहे आणि ती सोडण्याची गरज आहे.
आसक्तीशिवाय कार्य करणे ही गीतेची मूळ शिकवण आहे. ही संबद्ध असण्याची तसेच असंबद्ध असण्याची अवस्था आहे. भौतिक जगात, एखाद्याला पूर्णपणे संबद्ध पाहिजे आणि दिलेल्या परिस्थितीत सर्वोत्तम कार्य करावे लागेल. त्याच वेळी, तो आंतरिकपणे असंबद्ध आहे कारण अशा कृतींचे परिणाम त्याच्यावर होणार नाहीत. परिणाम केलेल्या प्रयत्नांनुसार असू शकतात किंवा ते पूर्णपणे विरुद्ध असू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत, तो चिंतित किंवा अस्वस्थ नाही. ‘कार्य-जीवन’ संतुलन राखण्याची ही गुरुकिल्ली आहे.
1 note
·
View note
Text
Sony Marathi’s New Show Searches for Talent – A Blend of Bollywood Masala, Bollywood Tadka, and Celebrity Interviews.
Sony Marathi launches an exciting talent show, blending Bollywood Masala, Bollywood Tadka, and exclusive Celebrity Interviews. The show aims to discover Maharashtra's finest talent, celebrating tradition with a modern twist. Stay tuned for engaging performances, star-studded appearances, and all the Bollywood buzz you love. Don’t miss this ultimate entertainment experience!
#bollywood masala#entertainment mix masala#bollywood tadka#celebrity interviews#latest marathi movies#latest marathi webseries
0 notes