#विद्यार्थ्यांचे
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 2 months ago
Text
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेमध्ये घवघावित यश
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य ......
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेमध्ये घवघावित असे यश संपादन केले. किक बॉक्सिंग ,रेसलिंग व स्विमिंग या स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्रा राज्य व विद्यापीठ पातळीवर पार पडल्या यामध्ये श्री रामचंद्र महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री प्रतीक कोकरे यांनी किक बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल व रेसलिंग आणि स्विमिंग मध्ये मध्ये…
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत होणार असल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. • विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानासंदर्भात काँग्रेस साशंक, मतदान आकडेवारीसंदर्भात निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. • राज्य कर्मचारी विमा महामंडळाअंतर्गतही मिळणार आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचे लाभ. • ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, लंपनला सर्वोत्कृष्ठ मराठी वेबसिरीजचा पुरस्कार. आणि • तुळजाभवानी मंदिर विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त, सहा टप्प्यात होणार काम.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमि�� शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. दरम्यान, ही बैठक अतिशय सकारात्मक झाली, यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे, त्यात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश, राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून, त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल, देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे. उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलं आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंग��ने आज आणि उद्या राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिल्या आहेत.
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा 'पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार, मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशा��ा घेण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ काल प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
श्री क्षेत्र आळंदी इथं काल संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात आपेगाव या संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मगावी देखील संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, एकूण सहा टप्प्यात हे काम होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक टप्प्यामध्ये काम करताना पुजारी भाविक यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.
जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी काल सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला इतर राज्यातूनही मागणी आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी याबाबत माहिती दिली, हे सॅनिटरी पॅड आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. कमी किंमतीत आहेत. आणि अत्यंत हायजेनीक आहेत. या सर्व गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गुजरात, मध्यप्रदेश, डेहरादून इत्यादी ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध झालेले आहे. आतापर्यंत जवळ जवळ २५ ते ३० हजार पॅड आपण तिकडे विक्री केलेले आहे. या पॅडमुळे लोकल महिलांना रोजगार सुद्धा मिळत आहे.
राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी क��ण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी क���ंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यावेळी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
हवामान राज्यात पुढचे दोन दिवस सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
aissmseducation · 8 months ago
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्��े ��ेशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
mdhulap · 9 months ago
Link
ICSE ISC Marksheet : ICSE 10वी आणि ISC 12वी विद्यार्थ्यांचे मार्कशीट येथून मिळवा !
0 notes
sanglihaldi · 1 year ago
Text
MPSC Success Story : कुठलाही क्लास न लावता निफाडची गृहिणी बनली क्लास टू अधिकारी; संसार सांभाळत मिळवलं यश!
नाशिक : आजकाल अधिकारी होण्यासाठी लाखो मुलं जीवाचं रान करत असतात. कुटूंबियांपासून दूर राहुन दिवस रात्र एक करत मेहनत घेत असतात. काहीजण तर हजारो रुपयांची फी भरून क्लास लावून स्पर्धा परीक्षा (MPSC Exam) देत असतात. तर काहीजण कोणताही क्लास न ना लावता यशाला गवसणी घालत असतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं तेवढं कमी असतं, अशीच ग्रामीण भागातील आलेली, कोणताही क्लास न लावता अटकेपार झेंडा लावणारी निफाडची वंदना गायकवाड (Vandana Gaikawad) अधिकारी झाली आहे.
for more details click here
1 note · View note
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
डोंगर दर्‍यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात
https://bharatlive.news/?p=133986 डोंगर दर्‍यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात
पाटण : पाटण ...
0 notes
jagdamb · 2 years ago
Text
दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यशाची मोहोर उमटवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
यशाच्या प्रवासाची ही फक्त सुरवात आहे, अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे आपल्या लक्ष्यावर ठाम रहा आणि आपले ध्येय गाठा !!!
#10th #pass #congratulations #abhinandan
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
Tumblr media
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
१० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'आयआयबी फास्ट' चे ऑफलाईन पद्धतीने २ एप्रिल रोजी आयोजन..
Tumblr media
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी २ एप्रिल रोजी ७ ही शाखेत होणार "आयआयबी-फास्ट" नांदेड -- प्रतिनिधी : इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी व आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी, इंजिनीयर किंवा डॉक्टर बनण्याचा खडतर मार्ग अगदी सोपा करण्यासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट कडून इयत्ता ११ वी प्रवेशासाठी महाराष्ट्राचा महाब्रांड आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ची आयआयबी फास्ट (फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेली आयआयबी करियर इन्स्टिट्यूट ही ��ॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील तब्बल २३ वर्षांपासून करत आहे. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, पुणे (शहर), पिंपरी (पुणे) या शाखेत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले जात आहे. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर, इंजिनिअर होणे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते तीच शिस्त आणि उच्च नितीमुल्यांच वातावरण आयआयबी विद्यार्थ्यांना देत असते. दरम्यान डॉक्टर, इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरन असल्याने आयआयबी घराघरात पोहचली आहे. दरम्यान, इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट, जेईई ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आगामी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इन्स्टिट्यूटची आयआयबी फास्ट
Tumblr media
(फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि. २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे "एम्स-५०", संकल्प, मिनीसंकल्प या मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या बॅचसह विविध बॅचेससाठी प्रवेश मिळणार आहेत. देशातील नावलौकिक असलेले तज्ञ प्राध्यापक वर्ग, इन्स्टिट्यूटचे काटेकोर असे सूक्ष्म नियोजन आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे वाढत जाणारा निकालाचा आलेख हे आयआयबी इन्स्टिट्यूटचे वेगळेपण आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी आयआयबी च्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा हेल्पलाईन वरती संपर्क करावा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे.
Tumblr media
डॉक्टर होणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यातच देशातील चांगल्या आणि नामांकित मेडिकल कॉलेज असलेल्या AIIMS तसे IIT या राष्ट्रीय पातळीवरील कॉलेज मधून पूर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. परतू ती मेहनत योग्य दिशेने होत आहे का, 2 वर्ष कशा पदधतीने तयारी करावी व ती परिपूर्ण कशी करावी या सगळ्या बाबीं साठी योग्य शिक्षण, संस्था, आणि शिक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे . आयआयबी इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची नीट, जेईई परीक्षेचे स्वरूप व महत्व समोर ठेवूनच पूर्ण वर्षभराचे काटेकोर नियोजन केले जाते म्हणून नीट निकालात अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने MBBS साठी तर पात्र होतातच त्याच बरोबर अनेक विद्यार्थी AIIMS साठी प्रवेशित होत असतात. गतवर्षीच्या म्हणजेच NEET-२०२२ च्या निकालात महाराष्ट्रातुन पहिल्यांदाच आयआयबीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांना AIIMS मध्ये प्रवेश मिळाल्याचा विक्रम स्थापन झाला आहे. या उत्तुंग यशानंतर आता "AIIMS-५०" ही बॅच सुरू करण्यात आली असून गतवर्षीचा आमचा विक्रम IIB इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच मोडीत काढतील व नवीन विक्रम प्रस्थापित करतील असा दृढ विश्वास आहे. -टीम आयआयबी       ------------------------------------------------------ Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
स्कूल चले हम : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, प्रवेशोत्सव
https://www.rebelbulletin.com/2023/07/16970/.html
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीट परीक्षेतले वाढीव गुण रद्द-संबंधित विद्यार्थ्यांसमोर पुनर्परीक्षेचाही पर्याय
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
नागपूर जिल्ह्यात फटाका कारखान्यात भीषण स्फोट-सहा जणांचा मृत्यू
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन हजारावर विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान
****
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट मधल्या एक हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क-वाढीव गुण रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वाढीव गुण कपात किंवा पुनर्परीक्षा असे दोन पर्याय या परीक्षार्थ्यांना देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. २३ जून रोजी नियोजित असलेल्या या पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल, असंही सरकारनं सांगितलं. वाढीव गुण पडताळणीसाठी स्थापन समितीच्या शिफारसींनुसार सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नीट संदर्भात प्रवेशासाठीचं समुपदेशन थांबवण्यास न्यायालयानं काल पुन्हा एकदा नकार दिला.
दरम्यान, नीट परीक्षेदरम्यान पेपरफुटी झाली नसून, कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार झाला नसल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची, तर पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीनं या नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर यासंदर्भातलं पत्रक काल जारी करण्यात आलं.
****
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलै २०२४ पासून लागू होत आहेत. या नवीन कायद्यांबद्दल “एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज” या ॲपवरुन अधिक माहिती जाणून घेता येईल. ग��गल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वर हे ॲप उपलब्ध आहे. नवीन फौजदारी कायद्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देणारं हे ॲप सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
****
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, सर्वांच्या सहमतीनं सुनेत्रा पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आल्याचं, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
****
विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.
****
नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या धामणा इथं काल फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यात येईल, असं सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन या शिष्टमंडळानं दिलं. यावर सहमती दर्शवत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.
****
मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर या लघुपट- मा��ितीपटांचा समावेश आहे.
****
मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यातला शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त झाला आहे, ही भूमी पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावी, यासाठी विद्यापीठानं पाणी या विषयावर अधिक भर देऊन लोकांचं जीवनमान उंचवावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभात तीन हजार ४२ विद्यार्थ्यांना पदवी, तर ४१ जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
****
स्लोवेनिया इथं झालेली घोडेस्वारी विश्वचषक स्पर्धा भारताच्या श्रृती वोरा हिनं जिंकून इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. श्रृतीने या स्पर्धेत ६७ पूर्णांक सात सहा गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं.
****
भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. गांधीनगर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्याने बल्गेरियाच्या बुद्धिबळपटूचा पराभव केला.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स��पर्धेत इंग्लंडनं ओमानचा आठ गडी राखून पराभव केला. मध्यरात्रीनंतर झालेल्या या सामन्यात ओमाननं दिलेलं ४७ धावांचं लक्ष्य इंग्लंडच्या संघानं अवघे तीन षटकं आणि एका चेंडूत पूर्ण केलं. या स्पर्धेत सध्या अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गीनी यांच्यात सामना सुरु आहे.
काल वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला, तर बांग्लादेशनं नेदरलँड्सचा २५ धावांनी पराभव केला.
****
आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीनं काल शेगाव इथून काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून, पालखीला मार्गस्थ केलं.
****
जादा दराने बियाणे विक्री केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या एका कृषी सेवा केंद्राचा परवाना सात दिवसांसाठी निल���बित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तसंच उपलब्धतेबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असं आवाहन, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे.
****
बोंड अळीपासून संरक्षित असलेल्या आणि कृषी विभागानं शिफारस केलेल्या तसंच कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या बीटी कापूस वाणांची लागवड करण्याचं आवाहन, नांदेड जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे. पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलं आहे. एका गावात एकाच वाणाची लागवड झाल्यास किड नियंत्रण करणं आणखी सोपं होत असल्याची माहितीही कृषी विभागानं दिली आहे.
****
शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारली जात असल्याचा आरोप करत, काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. 
****
जागतिक बाल कामगार दिनानिमित्त हिंगोली इथं काल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाल कामगार कायदा, बाल हक्क आणि संरक्षण, बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक सलोख्याचं वातावरण अबाधित रहावं, यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून काल बीड शहरात सद्भावना रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक पक्ष संघटनेचे, तसंच समाजकार्य क्षेत्रातले मान्यवर, विद्यार्थी, पोलीस प्रशासनातले अधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
परभणी जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना वेग येईल तसंच गरवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.
****
नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.
****
0 notes
aissmseducation · 1 year ago
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखे���ध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍड��्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळती��े प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
लहान मुले निर्मळ मनाची असतात. जे असतात ते बोलून. कधी त्यांचा खोडसाळपणा पोट धरू हसतो. त्यांच्या गोंडस वागण्याने वातावरण आनंदी होते. संस्कृतीच एक क्यूट प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका शिक्षकाने आपल्या पहिल्या वर्गात आपले चित्र बनवले होते. ताक पाखरनी या शिक्षकाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला. यातील काही चित्रे तुम्ही या गुणाचे कौशल्याचे वर्णन कराल तर काही चित्रे तुम्हाला हसू आवरणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
businessworldd · 5 years ago
Text
1001 ब्रँड कथा | कमळ भाषण 莲花演说
//
writen by ZHOU Junjun
Tumblr media
第一个故事
男人拖着疲倦回到家,妻子问:“怎么这么晚回来?是不是外面有人了?”男人忽然感到非常愤怒地对妻子说:“你怎么这么不理解我?”第二天,他们去民政局换了一本证……
पहिली गोष्ट
जेव्हा तो माणूस थकल्यासारखे आणि घरी परत आला तेव्हा त्याच्या बायकोने विचारले, "तू इतका उशीर का केलास? बाहेर कोणी आहे का?" त्या माणसाला अचानक राग आला आणि तो आपल्या बायकोला म्हणाला, "तू मला इतका का समजत नाहीस?" दुसर्‍या दिवशी ते सिव्हिल अफेयर्स ब्युरोमध्ये गेले. प्रमाणपत्र बदलले ...
 第二个故事
课后,老师对学生说:“如果再是这个成绩,我会劝你转校了,跟上你会很吃力。”回家,母亲拿着试卷恨铁不成钢地指责孩子说:“再过一年高考了,你看你该怎么办,你看考得上哪个学校,你看你将来该怎么办!怎么这么不争气呢。”晚间补习,补习老师说:“怎么教了这么多遍,你就是做不对呢?”当晚,学生从补习老师家一跃而下,当场死亡,他才十六岁……
दुसरी कथा
वर्गानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले, “जर हाच वर्ग पुन्हा असेल तर मी तुम्हाला शाळेत बदली करण्याचा सल्ला देईन आणि तुम्हाला पुढे ठेवणे कठीण होईल.” घरी जाऊन आईने मुलावर चाचणीच्या पेपरचा आरोप केला आणि स्टीलचा द्वेष केला आणि म्हणाली, “चला जाऊया एका वर्षाची महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा, आपण काय करावे ते पहाल, आपण कोणती शाळा घेऊ शकता ते आपण पाहू शकता, भविष्यात आपण काय करावे ते पहा! इतके निराश का होऊ नका. "संध्याकाळी शिकवणी, शिक्षक म्हणाले:" इतक्या वेळा कसे शिकवायचे, आपण हे चुकीचे केले आहे का? "त्या रात्री विद्यार्थ्याने शिक्षकाच्या घरावरुन उडी मारून तो जागीच ठार झाला. तो फक्त 16 वर्षांचा होता ...
 第三个故事
十年寒窗苦读,他是有名的学霸,名企招聘会上,面试官对他说:“介绍下你自己。”他说:“啊……嗯……我……我叫……”面试官说:“对不起,请下一位。”走出门,他靠着墙蹲下,把简历���得粉碎……
तिसरी गोष्ट
दहा वर्षांच्या कठोर अभ्यासानंतर तो एक सुप्रसिद्ध विद्यार्थी होता. प्रसिद्ध कंपन्यांच्या जॉब फेअरमध्ये मुलाखत घेणारा त्याला म्हणाला, "स्वतःचा परिचय द्या." मुलाखत घेणारा म्हणाला, "सॉरी, प्लीज." जेव्हा तो दाराबाहेर पडला, तेव्हा त्याने भिंतीकडे रडत आपला बायोडाटा फाडला ...
 第四个故事
团队准备整整一月,精心编制各种节目,终于迎来了万众期待的年会。董事长在员工热情的掌声中缓步走上讲台,举起话筒方才发觉演讲稿落在座位上,他望着台下黑压压的人群,一双双亮晶晶的眼睛,忽然觉得呼吸急促,头冒冷汗,双脚发抖……他不禁往讲台中间挪了挪,这一挪,却不小心把话筒掉到了地上,台下一下子热闹起来,传来闷声的笑声。他完全慌了神,已不记得演讲稿的内容,有些尴尬地弯下腰捡起话筒咳了两声说:“哈哈,大家,吃好,喝好!谢谢!”然后像逃荒般地窜下台回到座位,连忙拿起纸巾擦拭满头汗水,剧烈的心跳声在耳畔久久不能散去……
चौथी कथा
पथकाने संपूर्ण महिन्यासाठी तयारी केली, विविध कार्यक्रम काळजीपूर्वक संकलित केले आणि शेवटी बहुप्रतीक्षित वार्षिक बैठकीत सुरुवात झाली. अध्यक्ष हळूहळू कर्मचार्‍यांच्या उबदार टाळ्यासह व्यासपीठाकडे गेले आणि भाषण सीटवर पडले हे समजण्यापूर्वी त्याने मायक्रोफोन उंचावला.त्याने स्टेजच्या खाली असलेल्या गर्दीकडे, त्याचे तेजस्वी डोळे पाहिले आणि अचानक डोक्यावर श्वास आणि थंड घामाचा त्रास जाणवला. त्याचे पाय थरथरले ... त्याला मदत करता आली नाही परंतु व्यासपीठाच्या मध्यभागी जाणे शक्य झाले नाही परंतु यामुळे चुकून मायक्रोफोन जमिनीवर पडला आणि प्रेक्षक गोंधळलेल्या हास्याने खळबळ माजले. तो पूर्णपणे घाबरला, आणि भाषणाची सामग्री आठवत नव्हती. तो थोडासा विचित्रपणे वाकला, मायक्रोफोन उचलला आणि दोनदा शांत बसला: "हाहा, प्रत्येकजण, चांगले खा, चांगले प्या! धन्यवाद!" मग तो फरार म्हणून मागे सरला जेव्हा मी सीटवर पोहोचलो, तेव्हा मी त्वरीत कागदाचा टॉवे�� उचलला आणि माझा घाम पुसला. तीव्र हृदयाचा ठोका बराच काळ विखुरला जाऊ शकला नाही ...
 第五个故事
商业路演现场,他拿着一个团队整整一个月不眠不休做出的商业计划书,已经有20万高粘度粉丝,信心十足。当话筒递到他手上,投资人说:“请用三句话说明你的项目。”他说:“呃……我们做的是……是……”投资人说:“谢谢,请下一位。”他黯然坐下,合作伙伴们都黯然低下了头,拍了拍他的肩膀,起身离去……
पाचवी कथा
व्यावसायिक रोड शोमध्ये, त्याने व्यवसायाच्या योजनांची एक टीम आयोजित केली होती ज्यावर तो संपूर्ण महिन्यापासून काम करीत आहे आणि 200,000 उच्च-व्हिस्कोसीटी चाहते मोठ्या आत्मविश्वासाने आहेत. जेव्हा मायक्रोफोन त्याच्याकडे गेला तेव्हा गुंतवणूकदार म्हणाला, "कृपया आपला प्रकल्प तीन वाक्यांमध्ये स्पष्ट करा." तो म्हणाला, "अहो ... आम्ही काय करतो ... आहे ..." गुंतवणूकदार म्हणाला, "धन्यवाद, कृपया." एक. "तो दु: खी बसला, भागीदारांनी सर्वजण डोके टेकले, खांदा लावले, उठले आणि निघून गेले ...
 第六个故事
古有贾诩一句话引起百年战乱,亦有张仪三寸不烂之舌抵百万雄狮。历史由人演绎,社会由人诠释,生活由人改变。今天,当我们面对各种繁琐,各种误解,各种质疑,各种矛盾,各种委屈,我们都说,这是人造成的。蓦然回首,三省吾身,这是——沟通——造成的!
सहावी कथा
प्राचीन काळात, जीया यीच्या शब्दांमुळे शंभर वर्षे युद्ध झाले आणि झांग यीची तीन इंच न सडलेली जीभ दहा लाख नर सिंहावर आली. इतिहासाचे स्पष्टीकरण लोक करतात, समाजाची व्याख्या लोक करतात आणि लोक आयुष्यात बदल घडवून आणतात. आज जेव्हा आपण सर्व प्रकारच्या त्रासदायक, सर्व प्रकारच्या गैरसमज, सर्व प्रकारच्या शंका, सर्व प्रकारच्या विरोधाभास, सर्व प्रकारच्या तक्रारींचा सामना करतो तेव्हा आपण सर्वजण असे म्हणतो की हे लोकांमुळे होते. अचानक मागे वळून पाहिले तर तीन प्रांत माझे शरीर आहेत, हे संप्रेषणामुळे होते!
 第N个故事
..........
Nth story
..........
 “莲花演说”源自“舌灿莲花,口吐莲花”,主要形容人口才好,口齿伶俐,能言善道,有如莲花般的美妙。莲花,也有纯洁,正直,吉祥之��。古月今心取“莲花演说”,意其一是人若有纯洁正直的心,逢人多说吉祥的话,这样人们便会心生欢喜,人事顺利,性格也就乐观包容,命运也就更加舒顺。意其二,公众演说,能够能言善道,犹如莲花般的美妙。
"कमळाचे भाषण" "जीभ कमळ, थुंकणे कमळ" पासून उद्भवते. हे प्रामुख्याने लोकसंख्येचे वर्णन करते, बोललेले असते, चांगले बोलू शकते आणि कमळांसारखेच सुंदर आहे. कमळाचा अर्थ शुद्धता, अखंडपणा आणि पवित्रता देखील आहे. गु युजीन यांनी "कमळाचे भाषण" घेतले. त्यामागील एक कारण म्हणजे जर लोक शुद्ध आणि प्रामाणिक अंतःकरणाने बोलले आणि प्रत्येक वेळी चांगले शब्द बोलले तर लोक त्यांच्या अंतःकरणात आनंदी होतील, गोष्टी गुळगुळीत होतील, त्यांचे व्यक्तिमत्त्व आशावादी व सहनशील असेल आणि त्यांचे नशिब आणखीन अधिक असेल. शुशुन. दुसरे म्हणजे, कमळांच्या फुलांप्रमाणेच सार्वजनिक भाषणे दयाळू बोलू शकतात.
 在这个科技日新月异的时代,移动互联网深入到我们生活的方方面面,改变了我们的社交方式,看似缩短了人与人之间的距离。恰恰相反的是,而今“人际交往”却成为大家津津乐道的话题,人们热衷学习“情商”,“智商”,“处理人际关系”。
तंत्रज्ञानाच्या या वेगाने बदलणा age्या युगात मोबाइल इंटरनेटने आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये प्रवेश केला आहे, आमचा समाजकारणाचा मार्ग बदलला आहे आणि लोकांमधील अंतर कमी करत आहे असे दिसते. याउलट, "परस्परसंवाद" हा विषय बनला आहे ज्याबद्दल प्रत्येकजण बोलत असतो. लोक "EQ", "IQ" आणि "आंतरजातीय संबंध हाताळणे" शिकण्यास उत्सुक असतात.
 古月今心说,从他帮助的几千位因公众演说有障碍的学员,他发现经常用正确的方式进行演说训练,不仅让更多的人成功的解决了公众演说障碍,还更加提高了沟通和谈判能力,连同日常人际关系也有积极改善。而今,古月今心已经帮助几千人因为沟通,因为演说问题而遇到困惑的人。而今,莲花演说遍布全国多个一线城市,成为中国极具影响力的互动演说训练机构,收获学员大量赞誉。
गु य��जेनक्सिन म्हणाले की हजारो प्रशिक्षणार्थी ज्यांना सार्वजनिक बोलण्यात अडचण येते, त्यांच्यामधे असे आढळले की बर्‍याच वेळेस योग्य मार्गाने प्रशिक्षण दिल्यास अधिक लोकांना सार्वजनिक बोलण्यात अडथळे यशस्वीरित्या सोडविता येत नाहीत तर सुधारित देखील केले जाते. दैनंदिन परस्पर संबंधांसह संप्रेषण आणि वाटाघाटीची कौशल्ये देखील सुधारली आहेत. आज, गु युजीन झिन यांनी संवाद आणि बोलण्याच्या समस्यांमुळे गोंधळलेल्या हजारो लोकांना मदत केली. आजकाल, लोटस भाषणे देशभरातील बर्‍याच प्रथम-स्तरीय शहरांमध्ये पसरली आहेत आणि चीनमधील सर्वात प्रभावी संवादात्मक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था बनल्या आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांचे खूप कौतुक प्राप्त झाले आहे.
 古月今心过去十二年,把自己的全部心血和精力专注于沟通、演说事业,未来,他将一如既往……他只是希望能够帮更多人解决沟通问题,让他们不会再因为沟通问题失去家庭,不会因为沟通问题失去机会,不会因为沟通问题失去自信,不会因为沟通问题铸就大错后悔终生。
गेल्या बारा वर्षांपासून, गु यूजेनक्सिन यांनी आपले सर्व प्रयत्न आणि ऊर्जा संप्रेषण आणि बोलण्याच्या कारणासाठी वाहून टाकली आहे, भविष्यात, तो नेहमीप्रमाणेच सुरू राहील ... तो फक्त अधिक लोकांना संप्रेषणाच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करेल अशी आशा करतो जेणेकरून ते संप्रेषणाच्या समस्येवर परिणाम होणार नाहीत. जर आपण आपले कुटुंब गमावले तर आपण दळणवळणाच्या समस्यांमुळे संधी गमावणार नाही, दळणवळणातील समस्यांमुळे आपला आत्मविश्वास गमाणार नाही आणि संप्रेषणाच्या समस्यांमुळे आपल्या जीवनाबद्दल खेद ���ोणार नाही.
 沟通,让你学会怎么好好生活;沟通,让你学会怎么面对他人;沟通,让你学会怎么认识自己;沟通,让你学会怎样把握机会;沟通,改变命运,演讲,改变人生……古月今心说:人一生,学会好好说话,你会发现满是惊喜 。 提升演讲,做一个懂得一对多、一对一沟通的人。
संप्रेषण आपणास चांगले कसे जगायचे ते शिकू देते; संप्रेषण आपल्याला इतरांना कसे तोंड द्यावे ते शिकू देते; संप्रेषण आपल्याला स्वत: ला कसे जाणून घ्यायचे हे शिकू देते; संप्रेषण आपल्याला संधी कशी समजून घ्यावी हे शिकू देते; संप्रेषण, नशिब बदलते, व्याख्यान बदलते, जीवन बदलते ... गु यू जिनक्सिन म्हणाले: आपल्या आयुष्यात, चांगले बोलायला शिका, तुम्हाला आश्चर्यचकित केले जाईल. सादरीकरण सुधारित करा आणि एक-ते-अनेक आणि एक-ते-एक संप्रेषण समजणारी व्यक्ती व्हा.
1 note · View note