#विजेते
Explore tagged Tumblr posts
Text
मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे…विशेष लेख
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन जगात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे स्मरण करत असताना मराठीतील कितीतरी चांगले शब्द काळाच्या ओघात लोप पावले आहेत असे शब्द हुडकून बोली भाषेत त्याचा सर्वांनी वापर केला पाहिजे,केवळ मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल बोलून तिला घासून लख्ख करण्यापेक्षा दरवेळी मराठीच्या…

View On WordPress
0 notes
Video
youtube
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची राधाकृष्ण मुळी यांनी घेतलेली मुलाखत - भाग: २
0 notes
Text

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत ��हे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणार��� ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या क��र्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
Text
Pune : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणेचा संघ विजयी
एमपीसी न्यूज -आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) पुणे येथे 24 ऑगस्ट 2024 रोजी (Pune)आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीची (AWES) विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एपीएस पुणेच्या स्पर्धकांनी उत्तम वक्तृत्व कौशल्य आणि सखोल विचारसरणी प्रदर्शित करत, स्पर्धेचे विजेते पद पटकावले. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेला कायदेशीर अस्तित्व आणि अधिकार दिले जावेत’, या विषयावरील वादविवाद…
0 notes
Text

🏏🏆 आयसीसी टी20 २०२४ विजेते! 🏆🏏
टीमचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे भारताने आयसीसी टी20 २०२४ चषक जिंकला आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण देश अभिमानाने उजळला आहे. रोमहर्षक क्षण आणि अफाट खेळ, तुम्ही खऱ्या विजेत्यांची ओळख करून दिली आहे. अशाच आणखी विजयांसाठी आणि अविस्मरणीय आठवणींसाठी! 🎉🎉
#ICCT20#Champions#Cricket#Victory#Pride#TeamIndia#IndiaWinWorldCup#T20WorldCupFinal#RohitShamra#भारतीयक्रिकेटटीम#WorldChampions
0 notes
Text
लॉटरी पूर्वीच झाले म्हाडाचे विजेते..! पाहा विजेत्यांची नावे । Mhada lottery result
Mhada lottery result : पुणे मंडळाने अर्जदारांची अंतिम प्रा��ूप यादी जाहीर केली आहे. पहिली प्रारूप यादी 18 जून रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर 24 जून रोजी अंतिम प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रारूप यादी तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन पाहू शकणार आहात. या म्हाडाच्या लॉटरीत एकूण उपलब्ध घरांची संख्या 4,877 होती. या घरांसाठी एकूण 47,490 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहे. त्यात 668 अर्जदार…
youtube
View On WordPress
0 notes
Text



राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती या सामाजिक संस्थेतर्फे अहिल्यानगर (नगर) शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, ‘राम मंदिर से रामराज्य’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाला नगरकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 notes
Link
0 notes
Text
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कॅरम स्पर्धेत ‘अशोक केदारी’ विजेते
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कॅरम स्पर्धेत ‘अशोक केदारी’ विजेते
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कॅरम स्पर्धेत ‘अशोक केदारी’ विजेते पुणे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंहगड रस्ता परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अशोक केदारी यांनी कासम शेख यांचा 25-24, 25-22 असा तब्बल तीन तास चाललेल्या अतीतटीच्या लढतीत पराभव केला व विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत जवळपास दिडशे स्पर्धक सहभागी झाले होते.…

View On WordPress
#‘अमृत#अशोक#आताची बातमी#आयोजित#कॅरम#केदारी’#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#महोत्सवानिमित्त#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#विजेते#स्पर्धेत#स्वातंत्र्याच्या
0 notes
Text
14 वर्षीय मोहम्मद फैज 'सुपरस्टार सिंगर 2' चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले
14 वर्षीय मोहम्मद फैज ‘सुपरस्टार सिंगर 2’ चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले
14 वर्षीय मोहम्मद फैज ‘सुपरस्टार सिंगर 2’ चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले ,
View On WordPress
#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही नवीनतम गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#मोहम्मद फैज#सुपरस्टार गायक 2#सुपरस्टार गायक 2 चे विजेते नाव#सुपरस्टार गायक 2 फिनाले#सुपरस्टार गायक 2 बक्षीस रक्कम#सुपरस्टार गायक 2 विजेता#सुपरस्टार गायक 2 विजेता राज्य#सुपरस्टार सिंगर 2 चे विजेते नाव#सुपरस्टार सिंगर 2 फिनाले#सुपरस्टार सिंगर 2 विजेता#सुपरस्टार सिंगर 2 स्पर्धक मणी
0 notes
Text
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्यत: अमेरिकन टेनिसपटू पीट सॅम्प्रासने 2002 मध्ये 14 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले तेव्हा त्याच्या विक्रमाच्या जवळपास कोणीही नव्हते. येत्या दोन दशकांत एक नव्हे तर तीन खेळाडू हा विक्रम मोडतील, असे क्वचितच कोणी वाटले असेल. प्रथम रॉजर फेडररने त्याचा विक्रम मोडला, नंतर नदाल आला आणि शेवटच्या सामन्यात जोकोविचने पीट सॅम्प्रासलाही मागे टाकले. गेल्या दोन दशकांत टेनिस जगतात…
View On WordPress
#ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या शर्यतीची टाइमलाइन#नोव्हाक जोकोविच ग्रँड स्लॅम टाइमलाइन#नोव्हाक जोकोविचची ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन#फेडरर जोकोविच आणि नदाल यांच्यात ग्रँड स्लॅम स्पर्धा#फेडरर नदाल आणि जोकोविचची शर्यत#राफेल नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेते टाइमलाइन#राफेल नदालचा २२ ग्रँडस्लॅमपर्यंतचा प्रवास#राफेल नदालचा २२ ग्रॅन स्लॅमपर्यंतचा प्रवास#राफेल नदालच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन#रॉजर फेडरर ग्रँड स्लॅम टाइमलाइन#रॉजर फेडररच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल - पंतप्रधानांना विश्वास • येत्या पाच वर्षात राज्यात दहा हजार सहकारी संस्था उभारण्याचं धोरण - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती • बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ सुधीर रसाळ यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत काल रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या य���जनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू आणि दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘अब आनेवाले पच्चीस साल भारत के भविष्य के लिये, दिल्ली के भविष्य के लिये बहोत ही महत्वपूर्ण है। ये पच्चीस साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुये देखेंगे। ये भारत को आधुनिकता के एक नये दौर से गुजरते हुये देखेंगे। जब भारत दुनिया की तिसरी बडी आर्थिक ताकत बनेगा।’’
राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून, येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल, असं ते म्हणाले. सहकारी दूधसंघात अध्यक्ष आणि राजकारणी लोकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे हे क्षेत्र अडचणीत आलं आहे, सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलं.
पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल��या क्रमांकावर असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल राज्यातल्या विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या सात उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली जात आहेत, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामं हाती घेतल्याचं फडणवीस म्हणाले. “गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत, ती अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत. आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत, त्यांच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील, तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत, हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. ते मेट्रोचे असो, रस्त्यांचे असो, ते हायवेजचे असो, ते एयरपोर्टचे असो, ते पोर्ट चे असो, सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेल आहेत, आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत.’’ महारेल या कंपनीला दिलेली कामं त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कारवाई करत आहेत, जे दोषी आहेत, त्या कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. या प्रकरणी नीट तपास आणि चौकशी होऊ द्यावी, याचा उपयोग निव्वळ राजकारणासाठी करु नये, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीनी त्याठिकाणी कारवाई करतायत. निर्धाराने कारवाई होतेय. या प्रकरणामध्ये काहीही झालं, तरी कोणालाही वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, जे जे दोषी आहेत. आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोकं दादागिरी करतात, जे लोकं हप्ते वसुली करतात, अशा सर्वांवर जरब बसवायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे यासंदर्भातली योग्य कारवाई चाललेली आहे. त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयास आहे.’’
बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुण्या�� काल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनावणे, भाजपचे सुरेश धस, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील सहभागी झाले होते. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे, अंजली दमानिया यांच्यावर समाज विघातक कृत्य अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड इथल्या नागरीकांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून संगठन पर्व सदस्य नोंदणी महाभियान काल राज्यभर राबवण्यात आलं. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीमबाग इथल्या महात्मा फुले सभागृहात, सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजप सदस्यत्व नोंदणीचा शुभारंभ केला.
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचा काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील, सुमती रसाळ, डॉ. दादा गोरे, उपस्थित होते. तर्कशुद्ध मांडणी हे रसाळ सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असल्याचं मत, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. ज्ञानाच्या क्षेत्रात उणिवा दाखवणं हेच मोठं काम असून, त्या स्वीकारता आल्या पाहिजे, असं रसाळ यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केलं.
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटीकरणासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणारं कुटुंब यासाठी पात्र असून, २६ जानेवारी रोजी अशा कुटुंबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सुमारे चार लाख ७२ हजार ३७९ कुटुंब सहभागी होणार आहेत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळावा यासाठी सोयाबीन खरेदीला ४५ दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांनी काल यासंदर्भा�� माहिती दिली. सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आलेलं नाही, याकडे रावल यांचं लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या विविध स्पर्धांचं बक्षिस वितरण काल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालं. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचं व्यासपीठ असल्याचं, ते यावेळी म्हणाले. दरम्यान, स्पर्धांच्या काल शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड आणि अश्व शर्यत पार पडली. यासोबतच शासकीय कार्यक्रमांचाही काल समारोप झाला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी दरम्यान होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ च्या हिवाळी सत्रातल्या प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र परीक्षा आणि मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. राज्यातल्या विविध २३५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या वस्सा इथं 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा काल पार पडली. यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री केंद्र मिळावं यासाठी जागृती विक्री केंद्राचं उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं.
परभणी जिल्ह्यातले पाणंद, शेतरस्ते, शिवार रस्ते खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आजपासून १८ फेब्रुवारी पर्यंत मोहीम राबवण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काकीनाडा - नांदेड विशेष रेल्वे आज आणि १३ जानेवारीला दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी नांदेड इथून सटेल.
0 notes
Text
गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२१ येथे विजेत्यांची यादी पहा - th 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये छाया 'द किरीट', विजेत्यांची यादी पहा
गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२१ येथे विजेत्यांची यादी पहा – th 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये छाया ‘द किरीट’, विजेत्यांची यादी पहा
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका पुढील महिन्यात rd rd व्या अकादमी पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची नावे उघडकीस आली आहेत. कोरोना साथीच्या कारणामुळे 78 व्या ग्लोडन ग्लोब पुरस्कारांना आभासी पद्धतीने घोषित केले गेले. या कार्यक्��माचे आयोजन टीना फे आणि अॅमी फॉलर यांनी केले होते. या…
View On WordPress
#गोल्डन ग्लोब#गोल्डन ग्लोब 2021#गोल्डन ग्लोब पुरस्कार#मुकुट#वेब मालिका मुकुट#सुवर्ण ग्लोब 2021 विजेते#हिंदी मधील मनोरंजन बातम्या#हिंदी मध्ये हॉलिवूड बातम्या#हॉलिवूड हिंदी न्यूज
0 notes
Text
सरकारला 'नापसंत' व्यक्तींना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं : अमर्त्य सेन
सरकारला ‘नापसंत’ व्यक्तींना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं : अमर्त्य सेन
नोबल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी देशात विरोध आणि चर्चेचं स्थान ‘मर्यादित’ झाल्याचं सांगत चिंता व्यक्त केलीय. ‘ज्य�� व्यक्ती सरकारला पसंत नाहीत अशा व्यक्तींना ते दहशतवादी घोषित करू शकतात तसंच त्यांना कैदेतही टाकू शकतात. आंदोलन तसंच स्वतंत्र विचार-विनिमयाच्या वेळाही संक्षिप्त केल्या जातात किंवा संपुष्टात आणण्यात येतात. कन्हैया कुमार, खालिद किंवा सेहला रशीद यांसारख्या तरुण…
View On WordPress
#Amartya Sen#Mamata Banerjee#Modi government#nobel laureate winner#अमर्त्य सेन#अर्थशास्त्रज्ञ#नोबल पारितोषिक विजेते#ममता बॅनर्जी#मोदी सरकार
0 notes
Photo

ओळखू शकाल यांना ? राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते,कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी आपल्या ह्यातील अनेक नामवंत मल्ल घडवले.
Can you recognize them? National Gold Medal Winner, the son of kolhapur district, who made many famous malla in his name.
4 notes
·
View notes
Text
नांदेडात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन | संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..

टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार
नांदेड – प्रतिनिधी येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि प्रदर्शनांचे आयोजन. तज्ज्ञांद्वारे प्रकल्प ��धारित रोमांचक शिक्षण सत्रे, ज्ञान आणि अनुभव सादर करण्यासाठी क्रॉस बॉर्डर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, असा कर्तृत्वाची ओळख करून देणार व्यापक व्यासपीठ या ठिकाणी लाभणार असल्याचे प्रतिपादन आयोजक श्री बालाजी गायकवाड यांनी केले आहे.. तंत्रज्ञानाशी निगडीत स्पर्धेचे आयोजन व्दा���े तंत्रज्ञानातील कौशल्य सादर करण्याची संधी निर्माण करून आम्ही तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये रस निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असून संधींचा महासागर शोधण्यासाठी तयार असलेल्या महत्त्वाकांक्षी मनांसाठी टेक्नोफेस्ट एक सशक्त व्यासपीठ आहे .. टेक्नोफेस्ट हा विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील सर्वात मोठा एक्स्पो ठरणार आहे या अंतर्गत
अर्डिनो चॅलेंज,ड्रोन चॅलेंज,रोबोट चॅलेंज व सर्व तंत्रज्ञानावरील आधारीत विविध प्रोजेक्टस् चे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे, या सादरीकरणातून विविध फेऱ्यानंतर अंतिम विजेते घोषित करण्यात येणार आहेत .. टेक्नोफेस्ट एक्सपो साठी नांदेड जिल्हयातील सर्व शाळा आमंत्रित असून त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील इंजिजिरींग,कॉम्प्युटर, आर्टिफिशिअल इंटलिजन्स्, रोबोटिक्स्,ड्रोन, सॉफ्टवेअर कंपनीज्, तंत्रज्ञानाशी निगडीत व्यावसायिक संस्था यांचा सहभाग असणार आहे अशी माहीती पोर्टल ईन्फोसिस् च्या वतीने देण्यात आली आहे.. टेक्नोफेस्ट चे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे आहे की माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वारस्य असलेल्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसोबत अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आधारित विविध कौशल्ये सादरीकरणासाठीचे चे व्यापक व्यासपीठ निर्माण करणे हा आहे . टेक्नोफेस्ट एक्स्पो हा उद्योग, शैक्षणिक, सरकारी आणि राज्य संस्थांमधून येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणारा ठरेल तसेच ��ाज्यातील सर्वात मोठ्या टेक्नोफेस्ट प्रदर्शनात दहा हजांरापेक्षा जास्त अभ्यागतांसमोर शैक्षणिक आणि तंत्रज्ञान नवकल्पना, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची ही संधी असणार आहे. स्पर्धेसाठी पारीतोषिकाचे स्वरुप हे प्रत्येक गटातून प्रथम,व्दितीय,तृतीय अशा प्रकारे असेल त्याबरोबरच सहभागी संस्थामधून सर्वात उत्कृष्ट सादरीकरणास इंटेलिजन्स् अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क: विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोबोटीक्स् .. तंत्रज्ञान काळाची गरज ..

आज जग हे अटोमोशन, ईलेक्ट्रिक कार व आणखी आधुनिक तंत्रज्ञानाकडे चालले आहे. फक्त सर्वसाधारण इंजिनिअरींग डिग्री करून पुरेसे नाही तर अद्ययावत शिक्षण जसे कि Robotics, Internet of Things (IoT), Artificial Intelligence (AI), Python, C, C++ programming, Virtual Reality (VR) हि काळाची गरज बनलेली आहे. औद्योगीक क्षेत्रातील प्रगती पाहता पुणे मुंबई,बेंगलोर,चैनई सारख्या ठिकाणचे पालक (मुख्यतः कंपनीत नोकरी करणारे) जागरुक असल्यामुळे या सर्व कौशल्य विकासा कडे वैयक्तिक लक्ष देतात. शाळेत असल्यापासूनच मूलांच जडण घडण सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने करतात आणि तेंव्हा कुठे हिच शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या रोबोटिक स्पर्धेत ��िविध प्रकारची पारितोषिक सुद्धा मिळवतात, आधुनिक जीवन हे यंत्रामुळे जास्त सोयीचे आणि -सुखकारक होत आहे. दैनंदिन जीवनात हे तंत्रज्ञान अत्र वस्त्र निवारा याबरोबरीने महत्त्वाचे होत चालले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण वापरत असलेला स्मार्टफोन आणि इंटरनेट. याच्याही पुढे जावून इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), Artificial Intelligence (AI), रोबोटिक्स, ड्रोन, ॲड्रॉइड अॅप्स आदी प्रणाली आपल्या प्रगतीच्या नवनवीन वाटा घेऊन येत आहेत. सभोवतालचे जग बदलत आहे आणि येणाऱ्या दशकामध्ये व्हर्चुअल रियालिटी (VR), Augmented Reality (AR), AI आणि IoT यावर आधारित अर्थव्यवस्थेची उभारणी होणार आहे. किंबहुना अशी अर्थव्यवस्था असणारे देश हे जास्त प्रभावी आणि बलशाली असतील. तंत्रज्ञानातील प्रगतीची गती पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये काळानुरूप तसेच मुळातून बदल करायचा असेल तर ज्ञानासोबत प्रत्यक्ष यंत्र बनवून पाहणे या बाबीवर शालेय शिक्षणापासून भर दिला गेला पाहिजे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता

ड्रोन’ हा ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा नव्या संदर्भातील उपयुक्त आविष्कार. विशेष संशोधनापोटी ‘ड्रोन’ची निर्मिती झाली व त्याचे बहुविध उपयोग सर्वांना लक्षात आले व तेही अल्पावधीत! त्यामुळेच ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा केवळ प्रयोग न ठरता, त्याचे उपयोग व्यक्तीपासून व्यवसायापर्यंत व शेतीपासून शासनव्यवस्थेपर्यंत सर्वत्र उपयोगात येत असून, त्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली ते पाहणे अर्थातच लक्षणीय ठरते.आता हेच बघा ना, दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील ‘स्काय मोबिलिटी’ या कंपनीने आपल्या ग्राहकांची साधने व वस्तू विविध ठिकाणी पोहोचवि��्यासाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे १५०० तास ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे केला आहे. कंपनीचा हा प्रायोगिक प्रयत्न होता व त्याला अपेक्षेहून अधिक यश प्राप्त झाले, हे विशेष! कंपनीने या दरम्यान महत्त्वाचे कागदपत्र व दस्तावेज वैद्यकीय अहवाल, कोरडी वनौषधी, काही विशेष सामान यांची वाहतूक यशस्वीपणे करण्याचा शुभारंभ व्यावसायिक स्वरुपात केला. ‘ड्रोन’चा वापर प्रशासनिक स्तरावर होण्याचा अन्य यशस्वी प्रयोग टपाल खात्यातर्फे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातही करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या कच्छच्या सुमारे ४६ किलोमीटर वाळवंटी प्रदेशात टपाल वाहतूक ‘ड्रोन’द्वारे करण्यात आली. ‘ड्रोन’ला या परिसरात वापराची परवानगी यावर्षी जूनमध्येच देण्यात आली, हे यासंदर्भात उल्लेखनीय. मुख्य म्हणजे, याठिकाणी वापरण्यात आलेले ‘ड्रोन’ पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे होते. या ‘ड्रोन’ची निर्मिती विशेषत: कृषीविषयक कामासाठी ‘लो-टेक वर्ल्ड एव्हिशन’ या ‘स्टार्ट अप’ कंपनीद्वारे करण्यात आली.भारतीय रेल्वेनेसुद्धा आपल्या कामकाजाला ‘ड्रोन’च्या उड्डाणाची जोड दिली आहे. रेल्वेने आपल्या प्रकल्प व्यवस्थापन व विशेषत: पूल निरीक्षण या जटिल कामांसाठी ‘ड्रोन’चा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे व अधिकार्यांच्या मते अद्ययावत व वेगवान तंत्रज्ञान हे ‘ड्रोन’ आधारित कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व त्याचा रेल्वे प्रशासन आणि कामकाजाला कमी वेळ व श्रमात मोठा फायदा होत आहे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानचा उपयोग शेतीपासून वस्तूपुरवठा, निगराणी, दळणवळण या विविधकामी होऊ शकतो, हे सिद्ध झाले. दिल्ली-पानीपत या सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात आपल्या पाईपलाईनची निगराणी व निगा राखण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने ‘ड्रोन’चा वापर सुरु केला, हा पथदर्शी प्रयत्न यशस्वी ठरल्याने त्याचे अनुकरण केले जाऊ लागले. शेतकर्यांच्या समूहशेतीपासून खाण कंपन्यांपर्यंत ‘ड्रोन’चा वापर केला जाऊ लागला व त्याचा वाढतच गेला. आर्डीनो तंत्रज्ञान Arduino: एक विहंगावलोकन Arduino काय आहे?

Arduino ही एक तंत्रज्ञान आहे ज्याने टेक समुदायामध्ये अधिक रुची निर्माण केली आहे आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसच्या भविष्याबद्दल बर्याच संभाषणात ते दिसले आहे. Arduino एक तंत्रज्ञान आहे जे स्मार्ट डिव्हाइसेस अधिक प्रवेश करण्यायोग्य आणि प्रचलित आहे, प्रोटोटाइप आणि डिझाइनर, प्रोग्रामर आणि प्रासंगिक वापरकर्ते एकत्रित प्रयोग करून. या इंद्रियगोचर बद्दल अधिक जाणून घ्या आणि हे तंत्रज्ञान उद्योगासाठी महत्त्वाचे का आहे. Arduino प्लॅटफॉर्म आश्चर्यजनक अष्टपैलू आहे, आणि मायक्रोकंट्रोलर विकास सह प्रारंभ करण्यासाठी शोधत असलेल्या वापरकर्त्यांना बरेच पर्याय प्रदान करते. प्लॅटफॉर्मच्या इन आणि बहिष्कारांची जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही नमुना प्रकल्पांचा प्रयत्न करणे. नवीन पातळीवरील प्रकल्प आपल्याला मंच, आयडीई आणि प्रोग्रामिंग भाषेसह स्वतःला परिचित करण्यास अनुमती देतात. हे प्रकल्प कल्पनांना Arduino प्लॅटफॉर्म काय सक्षम आहे याबद्दल काही संकेत प्रदान करणे आवश्यक आहे, त्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची मूलभूत समज आवश्यक आहे. या कल्पनांनी स्वतःचे प्रोटोटाइप प्रकल्प तयार करण्यापूर्वी एक चांगला प्रारंभ बिंदू प्रदान केला पाहिजे. Arduino शिल्ड Arduino प्लॅटफॉर्मची अष्टपैलुता ही त्याच्या सर्वात मोठ्या मालमत्तेपैकी एक आहे, आणि Arduino शील्ड हे ज्याद्वारे साध्य करता येते त्यापैकी एक आहे. Arduino shields मॉड्यूलर ऍड-ऑन मुळ Arduino प्लॅटफॉर्मला विस्तारित करते जे त्याची क्षमता कनेक्टिव्हिटी, सेंसर, आणि आऊटपुट्सचे क्षेत्र आहे, इतरांदरम्यान. येथे आपण Arduino ढाल संकल्पना, आणि बर्याच ढाल प्रकारांची अनेक उदाहरणे पाहू शकता, हे स्पष्ट करताना की Arduino शील्ड इतके महत्त्वाचे का आहे अधिक » Arduino उॉनो Arduino विकास सह उडी घेत मध्ये स्वारस्य त्या साठी, एक निर्णय awaits; बर्याच संख्येतील अरडिनो आकृत्या अस्तित्वात आहेत, कारण बहुतेक अनुप्रयोगांची संख्या अलीकडे, तथापि, एक वर्णन, Arduino Uno सुरुवातीला साठी अब्राहम facto मानक निवड म्हणून उदयास आली आहे. इतर विशिष्टतांव्यतिरिक्त Arduino Uno कसे सेट करते ते शोधा आणि हे Arduino च्या जगाशी परिचय करून देण्यासाठी एक ठोस व्यासपीठ का प्रतिनिधित्व करते? इंटरमिजिएट / अॅडव्हान्स अर्डिनो प्रोजेक्ट आयडियाज काही मूलभूत प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, आपण या प्लॅटफॉर्मची मर्यादा ताणून त्यांचे परीक्षण करणार्या Arduino प्रकल्पांसाठी काही प्रेरणा शोधत असाल. या दरम्यानचे आणि प्रगत Arduino प्रकल्प विविध प्रकारच्या शिष्टाचार स्पॅन की मनोरंजक अनुप्रयोग तयार करण्यासाठी RFID, टेलीमेट्री, प्रणोदन, वेब APIs , आणि अधिक महत्वाची तंत्रज्ञान जसे प्लॅटफॉर्म एकत्र. जर आपण आपल्या Arduino प्रयोगांना रोबोटिक्स किंवा कनेक्टेड डिव्हाइसेसच्या जगात विस्तारित करण्यास इच्छुक असाल तर हे पाहण्यासाठीचे एक ठिकाण आहे. विज्ञान प्रदर्शनांचे फलित काय?

विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानाविषयाची माहिती जाणून घेण्यास आवडते तसेच ते नवी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते.. त्यामुळे ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची पातेक्षित दाखवली जातात… विज्ञान - तंत्रज्ञानावर आधारलेलं प्रदर्शन.. विज्ञान हा एक पद्धतशीर मार्ग आहे ज्यामध्ये ज्ञान मिळविण्यासाठी आणि कौशल्य सुधारण्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग ��ांचा समावेश आहे; तंत्रज्ञान हे विज्ञानाचा व्यावहारिक अनुप्रयोग आहे जे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. विज्ञान हा एक पद्धतशीर अभ्यास आहे आणि तंत्रज्ञान त्यातूनच बाहेर पडते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालतात म्हणजेच वैज्ञानिक प्रगती नेहमीच तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर होते आणि नंतरचे केवळ आधीचेच निहितार्थ असते. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे टिम पोर्टल ईन्फोसिस .. डॉ.संतोष खमितकर, मा.संचालक स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, बालाजी गायकवाड, पोर्टल ईन्फोसिस, नांदेड, गजेंद्र ढोले, एमआयटी कॉलेज, वसमत, डॉ.दत्ता अंबेकर, न्युट्रीशनिस्ट, लातूर, महेंद्रसिंह गौर, सिंग अडव्हऱटायझिंग, नांदेड, वेदांत अवचार, नांदेड , मारोती सवंडकर, नांदेड , मिलिंद राजूरकर, संगणक अभियंता, नांदेड, कु.नक्षत्र गायकवाड,नांदेड , कु.अश्विनी पाटील, नांदेड Read the full article
0 notes