लग्नात नवरीने केले असे काही कि वऱ्हाडी पळत सुटले !
https://bharatlive.news/?p=83699
लग्नात नवरीने केले असे काही कि वऱ्हाडी पळत सुटले !
जळगाव मिरर / १० ...
0 notes
Guidelines For Weddings लग्नाला यायचंय, 'करोना' कृपेनं आधी क्वारंटाइन व्हायचं हं!
Guidelines For Weddings लग्नाला यायचंय, ‘करोना’ कृपेनं आधी क्वारंटाइन व्हायचं हं!
[ad_1]
नगर:करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक नियमावली करण्यात येऊ लागली आहे. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात तर बाहेरगावातून लग्नाला येणाऱ्या मंडळींनी थेट संस्थात्मक क्वारंटाइन कक्षातच थांबावे लागणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत. ( Guidelines For Weddings in Ahmednagar )
वाचा: करोना विरुद्ध लढाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार
करोना…
View On WordPress
0 notes
लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे - गझलगायक - प्रसिद्ध कवी वऱ्हाडी झटकाकार...
नवीन लेख : रूप सज्जनाचे - गझल
लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे - गझल - प्रसिद्ध कवी वऱ्हाडी झटकाकार श्री रमेश ठाकरे यांच्या आवाजात.
मी जेव्हा गझल हा काव्यप्रकार हाताळण्यास सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकपणे 'शेती' हाच विषय गझल मध्ये घेऊन आलो. तेव्हा त्यावेळेसचे काही तत्कालीन गझलसम्राट माझ्या गझलेवर तुटून पडलेत. गझल हा "सभ्य" काव्यप्रकार असल्याने गझलेत शेती विषयाला स्थान असू शकत नाही. त्यामुळे माझी गझल ही http://gangadharmute.blogspot.com/2022/09/blog-post_11.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गंगाधर मुटे's
0 notes
केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क अंतरपाट धरला ; वऱ्हाडी मंडळी अवाक. https://beed24.in/union-minister-of-state-for-railways-raosaheb-danve-had-a-good-time-the-congregation-present-was-amazed/
0 notes
गांधेली ग्रामस्थांनी वऱ्हाडींना धो धो धुतले ; मुलीचे त्याच मांडवात दुसऱ्याशी लावले लग्न
औरंगाबाद : थाटामाटात लग्नाला सुरुवात विवाह सोहळाही जल्लोषात पार पडला . मात्र , स्वयंपाक अन् मानपानावरून वाद होऊन नवरदेव रुसला . ग्रामस्थांनी समजूत घालायचा प्रयत्न केला तेव्हा मुंबईकर असलेले हायफाय वऱ्हाडी हमरीतुमरीवर आले . त्यांनी टिंगलटवाळी सुरू केली वधूकडील एका ज्येष्ठ नागरिकाचे धोतर ओढून त्याची मस्करी केली . ग्रामस्थांनी निर्वाणीचा इशारा देत सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला . मात्र , नवरदेवासह…
View On WordPress
0 notes
व्हायरल व्हिडिओ: 51 ट्रॅक्टर घेऊन वराची मिरवणूक निघाली, लोक म्हणाले- 'तो नक्की कोणत्यातरी पेट्रोल पंपाचा मालक असेल'
व्हायरल व्हिडिओ: 51 ट्रॅक्टर घेऊन वराची मिरवणूक निघाली, लोक म्हणाले- ‘तो नक्की कोणत्यातरी पेट्रोल पंपाचा मालक असेल’
51. वऱ्हाडी मिरवणुकीसह ट्रॅक्टर घेऊन बाहेर पडले
इमेज क्रेडिट स्रोत: ANI
हा व्हायरल व्हिडिओ राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचा आहे, जिथे 51 ट्रॅक्टर आणि 150 लग्नाच्या मिरवणुकीसह वर आपल्या वऱ्हाडींना घेऊन येणार आहे.
लग्नसराईचा सीझन येताच सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या व्हिडिओंचा पूर येतो. असे एकापेक्षा एक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत, जे आश्चर्यचकित करण्यासोबतच लोकांना हसवतात आणि गुदगुल्या करतात. असे अनेक…
View On WordPress
0 notes
Viral Video : मच्छरांसाठी धूर केला अन् वऱ्हाडी पळाले; लग्नसोहळा सुरू असताना धक्कादायक प्रकार
Viral Video : मच्छरांसाठी धूर केला अन् वऱ्हाडी पळाले; लग्नसोहळा सुरू असताना धक्कादायक प्रकार
Viral Video : मच्छरांसाठी धूर केला अन् वऱ्हाडी पळाले; लग्नसोहळा सुरू असताना धक्कादायक प्रकार
Viral News In Marathi : लग्नसोहळा सुरू असताना मच्छरांना पळवण्यासाठी एका व्यक्तीनं मंगल कार्यालयात धूर केला. परंतु त्यामुळं लग्नात आलेल्या वऱ्हाडींना नाक बंद करून बाहेर पळावं लागलं.
Viral News In Marathi : लग्नसोहळा सुरू असताना मच्छरांना पळवण्यासाठी एका व्यक्तीनं मंगल कार्यालयात धूर केला. परंतु त्यामुळं…
View On WordPress
0 notes
नगर ब्रेकिंग..चांदणी चौकात रस्ता अडवून वऱ्हाडींची मस्ती , अकरा जणांवर गुन्हे
नगर ब्रेकिंग..चांदणी चौकात रस्ता अडवून वऱ्हाडींची मस्ती , अकरा जणांवर गुन्हे
नगर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून लग्नानंतर घरी जाताना वऱ्हाडी मंडळींनी मस्ती करत रस्त्यात गाडी थांबून फटाके वाजवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.
फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मदन मिर्झा मोहम्मद, जीशान जहागीरदार, सोहेल शेख, अश्रफ नदीम जहागीरदार, सलमान शेख, रेहान…
View On WordPress
0 notes
नगर ब्रेकिंग..चांदणी चौकात रस्ता अडवून वऱ्हाडींची मस्ती , अकरा जणांवर गुन्हे
नगर ब्रेकिंग..चांदणी चौकात रस्ता अडवून वऱ्हाडींची मस्ती , अकरा जणांवर गुन्हे
नगर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून लग्नानंतर घरी जाताना वऱ्हाडी मंडळींनी मस्ती करत रस्त्यात गाडी थांबून फटाके वाजवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.
फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मदन मिर्झा मोहम्मद, जीशान जहागीरदार, सोहेल शेख, अश्रफ नदीम जहागीरदार, सलमान शेख, रेहान…
View On WordPress
0 notes
' राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना बायको अन काँग्रेस.. '
‘ राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना बायको अन काँग्रेस.. ‘
नगरचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करताना ‘ महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना जनतेने नाकारले आहे. सर्वांनी स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन केलेले आहे. हे सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लग्न आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत असल्याने त्यांची मनमानी सुरू आहे तर शिवसेना मुक्या बायकोसारखी आहे. तिला बोलता येत नाही. काँग्रेसजन वऱ्हाडी आहेत. ज्यांना…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
** आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याकडून व्यक्त
** उद्योजकता तसंच रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध - केंद्रीय मंत्री नारायण राणे
** बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार; एक जण जखमी
** हिंगोली जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश
आणि
** निरोगी जीवनशैलीचे मूळ पारंपारिक भारतीय आहारशास्त्रात असल्याचं आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचं प्रतिपादन
****
देशात आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्यक्त केली आहे. यासाठभ देशभरात सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रम आणि सण उत्सव साजरे करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिक निर्बंध हटवावेत, रात्रीची संचारबंदी रद्द करावी, असं भल्ला यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर कोविड स्थितीचा आढावा घ्यावा तसंच कोविड प्रतिबंधक नियमांचं पुरेपूर पालन करावं, असंही भल्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते आज सिंधुदूर्ग जिल्ह्यात ओरोस इथं एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्फूर्ती अर्थात पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी पुरवठा योजना, मधु अभियान आणि कुंभार सशक्तीकरण योजनेची काटेकोर अंमलबजावणीची ग्वाही राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा राणे यांनी यावेळी केली. २०० कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. राणे यांनी या प्रसंगी एमएसएमई रूपे कार्डची देखील सुरुवात केली. उपस्थित एमएसएमई उद्योजकांना या एमएसएमई रुपेच्या पहिल्या संचातल्या कार्डांच वितरण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
देश आत्मनिर्भर करण्यात संपूर्ण योगदान देण्याचा संकल्प करण्याचं आवाहन विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा ७१ वा दीक्षांत समारंभ काल पार पडला, त्यावेळी अध्यक्षीय भाषणातून राज्यपाल मार्गदर्शन करत होते. कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठात कोरोना काळातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करून विद्यापीठातल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.
****
शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी गैरप्रकाराच्या तपासात आतापर्यंत १ हजार ७७८ शिक्षक अपात्र असल्याचं निष्पन्न झालं आहे. हे सर्वजण अपात्र असूनही त्यांना पात्र ठरवल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. या गुन्ह्यात आणखी बारा जणांचा सहभाग समोर आला असून, सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज गोळीबार होऊन एक जण जखमी झाला. नोंदणी कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीच्या कारणावरून दोन गटात वाद झाले, त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही
****
हिंगोली जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलं आहे. कळमनुरी तालुक्यातील बेलथर इथं होत असलेल्या या दोन बालविवाहांपैकी एका विवाहातले वधुवर तर एका विवाह सोहळ्यातली वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली होती. बालविवाह प्रतिबंधक समिती आणि बाळापूर पोलिस या गावात पोहोचतात वऱ्हाडी मंडळी आणि वधू-वराचे नातेवाईक पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
****
निरोगी जीवनशैलीचे मूळ पारंपारिक भारतीय आहारशास्त्रात असल्याचं प्रतिपादन आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या विज्ञान सप्ताहात डॉ दीक्षित बोलत होते. निरोगी जीवनासाठी दिवसभरातून फक्त दोन वेळा जेवण करणं उपयोगी आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी प्राचीन तसंच आधुनिक अशा दोन्ही संशोधनांचा दाखला दिला. दिल्ली इथल्या दीनदयाल संशोधन संस्थेचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, प्राचीन काळातल्या समृद्ध आणि वातावरणाला अनुरुप जीवनशैलीपासून दूर गेल्यामुळे आज कॅन्सर आणि इतर अनेक आजार वाढत असल्याचं नमूद केलं.
या सप्ताहात आज दुपारच्या सत्रात वायू प्रदूषणाला पर्याय असणारी इलेक्ट्रिक वाहनं तसंच भारताच्या भू विज्ञान संशोधनाची प्रगती दाखवणाऱ्या माहितीपटांचं प्रसारण करण्यात आलं.
****
येत्या सोमवारी २८ फेब्रुवारीला सर्व शासकीय, निमशासकीय, आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल आणि खाजगी शिकवणी वर्गांनी तंबाखूमुक्त शपथ घ्यावी, असे निर्देश नांदेड जिल्��ाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं असून, हा उपक्रमही त्याचाच भाग आहे. तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा अहवाल २ मार्च पर्यंत सादर करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनानं केली आहे.
****
परभणी रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर उतरवलेल्या सार्वजनिक वितरण योजनेच्या धान्य साठ्याची डुकरांनी नासधूस केली आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्याकरता मालगाडीतून काल धान्याचा साठा दाखल झाला. मालगाडीतून थेट ट्रकद्वारे धान्याचा साठा गोदामांमध्ये हलवणं आवश्यक होतं, परंतू याकडे दुर्लक्ष झाल्याने ही नासाडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथं एका वाहनातून नेण्यात येणारा ३३५ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची अदाजे किंमत ३० लाख २६ हजार ७९० रुपये इतकी आहे. याप्रकरणी तीन संशयीतांच्या विरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
#❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🔸संत गाडगे महाराज.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: वणीभुषण न्युजपेपर्स व चॅनल्स गृप
*----------------------- अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार संपादक वणीभुषण, ----------------------*
*जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव (शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.*
*संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.*
*गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.*
*माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.*
*समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत.*
*गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आ��ले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.*
*बालपण.*
*गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.*
*सामाजिक सुधारणा.*
*१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले.*
*त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. . महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.*
*'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.*
*संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश.*
*भुकेलेल्यांना = अन्न.*
*तहानलेल्यांना = पाणी.* *उघड्यानागड्यांना = वस्त्र.*
*गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत.*
*बेघरांना = आसरा.*
*अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार.*
*बेकारांना = रोजगार.*
*पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय.*
*गरीब तरुण-तरुणींचे = लग्न.*
*दुःखी व निराशांना = हिंमत.* *गोरगरिबांना = शिक्षण.*
*हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!*
*संक्षिप्त चरित्र.*
*गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले. १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.*
*आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात, 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.' १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली. गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. . गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.*
*गाडगेबाबा आणि बाबासाहेब. आंबेडकर.*
*१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.*
*गाडगेबाबांचे विचार.*
*एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्���्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."*
*संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.* ******** अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार, विधी कंसल्टंसी, मुंबई..
*स्त्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
1 note
·
View note
नवरदेव बाहेर बसला नाचत अन आत तरुणीने दुसऱ्यासोबत घेतले सात फेरे
नवरदेव बाहेर बसला नाचत अन आत तरुणीने दुसऱ्यासोबत घेतले सात फेरे
22 एप्रिलला लग्नाचा मुहूर्त दुपारी 4 वाजताचा पण नवरदेवच गावात उशिरा पोहोचला आणि दारुड्या वऱ्हाडी मंडळींसोबत नाचत बसला. लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचं बघून वधू पित्याने नवरदेवाची वाट न बघता मंडपात असलेल्या नात्यातीलच दुसऱ्या मुलाशी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला आणि त्यानंतर धिंगाणा घातला म्हणून प्रस्तावित नवरदेवाला चोप देऊन माघारी पाठवून देण्यात आले . बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेची सध्या जोरदार…
View On WordPress
0 notes
VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल
VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल
VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल
भारत सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. पारा ४४ अंश पार करण्याच्या मार्गावर आहे. घरातील लोक कूलर वगैरेच्या साहाय्याने थंडावा घेत असताना, कामावर असलेले लोक सावली आणि थंड पेयांचा अवलंब करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वरातीतला…
View On WordPress
0 notes
नवरदेव बाहेर बसला नाचत अन आत तरुणीने दुसऱ्यासोबत घेतले सात फेरे
नवरदेव बाहेर बसला नाचत अन आत तरुणीने दुसऱ्यासोबत घेतले सात फेरे
22 एप्रिलला लग्नाचा मुहूर्त दुपारी 4 वाजताचा पण नवरदेवच गावात उशिरा पोहोचला आणि दारुड्या वऱ्हाडी मंडळींसोबत नाचत बसला. लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचं बघून वधू पित्याने नवरदेवाची वाट न बघता मंडपात असलेल्या नात्यातीलच दुसऱ्या मुलाशी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला आणि त्यानंतर धिंगाणा घातला म्हणून प्रस्तावित नवरदेवाला चोप देऊन माघारी पाठवून देण्यात आले . बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेची सध्या जोरदार…
View On WordPress
0 notes