चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक: बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक: बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक: बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
बारामती : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेकीची घटना शनिवारी पिंपरी या ठिकाणी घडली. या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शाईफेकीवर बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य - अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी पूर्ण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास राज्य सरकारची मंजुरी
आणि
खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सकाळी ११ वाजता वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन अर्थमंत्री म्हणून सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, सध्याच्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल.
****
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. नव्या संसद भवनात एक भारत श्रेष्ठ भारताची अनुभूती होत असून, या भवनात सार्थ संवाद होण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या निर्मितीसह अनेक क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात सरकारने पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं, अयोध्येतल्या राम मंदीराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं.
****
दरम्यान, राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण व्यापक, आणि अंतर्मुख करणारं तसंच १४० कोटी भारतीयांच्या एकजुटीचं बळ दाखवणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर हे अभिभाषण दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
****
दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत सादर केल्यावर संसदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यापूर्वी राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सतनामसिंह संधू, आम आदमी पार्टीच्या स्वाती मालिवाल, तसंच नारायण दास गुप्ता यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती जगदीप धनखड यांनी १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची घोषणा केली.
****
मोबाईल फोनच्या विविध भागांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे. या सर्व साहित्यावर आता पंधरा ऐवजी दहा टक्के आयात शुल्क आकारलं जाईल. मोबाईल फोनच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
उत्तरप्रदेश���त वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय या तळघरात नियमित पूजा करत, सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवाल अजित पवार गटानं या सुनावणीत उपस्थित केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी, बृहन्मुंबईचे अपर पोलिस आयुक्त वीरेंद्र यांची, तर परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली झाली आहे. बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालन्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्याही काल बदल्या करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोच्या प्रशासक पदी, तर बीड इथल्या सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांची, पालघर इथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्यशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर तसंच डिसेंबर महिन्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातले रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पॅट स्कॅन करणं आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५७ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकं पटकावली. त्या खालोखाल ३८ सुवर्ण पदकांसह ९८ पदकं मिळवून तामिळनाडूनं दुसरं, तर ३५ सुवर्ण पदकांसह १०३ पदकं जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत काल या स्पर्धेचा समारोप झाला.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते काल लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचं काम प्रगणकांनी विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
नवीन धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना आजपासून स्वस्त दरानं वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नागरिकांना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या वाळू डेपो वरून प्रति ब्रास ६०० रुपये आणि इतर कर ७७ रुपये याप्रमाणे ऑनलाइन प्रणालीद्वारे वाळू विक्री करण्यात येणार आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असंही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि किनवट ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्ह्यातल्या बोधडी इथं हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्तासुरक्षा विषयक मार्गदर्शन करुन माहिती पुस्तिकेचं वाटप केलं.
****
समाज माध्यमांवर मिळणाऱ्या कर्जमाफीच्या आमिषांपासून सावध राहण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. यासंबंधी गैरप्रकार आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसचं अनधिकृत कर्जमाफी मोहिमांबाबत सावधानता बाळगण्याचं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलं असल्याचं ते म्हणाले.
****
0 notes
तेव्हा तुमच्या अध्यात्मिक आघाडीच्या झाकणझुल्याने.., कॅलेंडरवरून वाद पेटला
आज आषाढी एकादशी असून सर्व महाराष्ट्रासाठी हा दिवस पवित्र मानला जातो. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी आज बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा देखील कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला असून मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे .
कालपासून सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या…
View On WordPress
0 notes
शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय...
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार जर आपल्या निर्णय मागे घेत नसतील तर आमचेही राजीनाने घ्या अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी…
View On WordPress
0 notes
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे.
हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय
बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर ��िवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे.
भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले.
कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी
नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळ��� गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत.
Read the full article
0 notes
खा . सुप्रिया सुळे यांच्या एका कार्यक्रमात साडीच्या ‘पल्लू’ला आग
खा . सुप्रिया सुळे यांच्या एका कार्यक्रमात साडीच्या ‘पल्लू’ला आग
पुण्यातील हिंजवडी परिसरात रविवारी कराटे स्पर्धेच्या उद्घाटनावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. बारामतीच्या आमदाराने आपल्या हातांनी आग विझवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मंचावरील टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ती टेबलाजवळ गेली असता तिच्या साडीला खाली ठेवलेल्या दिव्याला स्पर्श झाला आणि आग…
View On WordPress
0 notes
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे -भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे -भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन
औरंगाबाद : बुधवारी औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मंत्री, राज्यपाल, भाजपाचे प्रवक्ते, रामदेव बाबा, यांनी विविध वादग्रस्त वक्तव्य केले असून या सर्वांचा निषेध या जन आक्रोश आंदोलनात करण्यात आला आहे
,कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे…
View On WordPress
0 notes
दशावतार कला ही कोकणचा जीव
दशावतार कला ही कोकणचा जीव
कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष अर्चना घारे;
पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित नाट्यप्रयोगाचे उत्साहात उद्घाटन
सावंतवाडी : दशावतार कला ही कोकणचा जीव आहे. त्यामुळे ती टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी पिंपरी-चिंचवड पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी चिंचवड पुणे…
View On WordPress
0 notes
युवक राष्ट्रवादीच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री छग...
0 notes
राज्यातील युवकांची स्वप्नं चुरगळून गुजरातच्या युवकांना स्वप्नं दाखवली, राष्ट्रवादीच्या नेत्याने निशाणा साधला
राज्यातील युवकांची स्वप्नं चुरगळून गुजरातच्या युवकांना स्वप्नं दाखवली, राष्ट्रवादीच्या नेत्याने निशाणा साधला
राज्यातील युवकांची स्वप्नं चुरगळून गुजरातच्या युवकांना स्वप्नं दाखवली, राष्ट्रवादीच्या नेत्याने निशाणा साधला
मुंबईः गुजरातमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह विरोधकांकडून भाजपचे अभिनंदन केले जात आहे. त्यामुळे आता राज्यातील विरोधी गटाकडूनही नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरची सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार
बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीची कारवाई; मुंबईसह सहा ठिकाणच्या कार्यालयांवर छापेमारी
· १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं १२ ते १७ जानेवारी दरम्यान नमो चषक २०२४ स्पर्धेचं आयोजन
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरची सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. या याचिकेसंदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे आजपासून संकलित केली जाणार असून, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी तसंच उलटतपासणी होईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अखेरचा युक्तिवाद केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत याबाबत निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
नाशिक इथं नियोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरू' या शुभंकराचं, बोधचिन्हाचं तसंच बोधवाक्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण झालं. या महोत्सवाचं १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भासाठी वैधानिक विकास महामंडळ तत्काळ पुनर्स्थापित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, महामंडळांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि मराठवाडा तसंच विदर्भातल्या जनतेला न्याय द्यावा, असं म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या बारामती ॲग्रो कंपनीतल्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या पथकाने काल मुंबईसह सहा ठिकाणी छापे मारले. बारामती ॲग्रो ही कंपनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची असून, बारामती तालुक्यात पिंपळी इथं या कंपनीचं मुख्यालय आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी काल, सकाळपासून कंपनीच्या सहा कार्यालयात तपास मोहिम सुरू केली. याप्रकरणी गेल्या वर्षी रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी माय जीओव्ही पोर्टलवर एक कोटीपेक्षा अधिक नोंदणी झाल्याचं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान परवा सोमवारी, आठ जानेवारीला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
या यात्रेत गेल्या ५० दिवसांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संख्येनं १० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लाभार्थ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना घेऊन जात आहे.
**
ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात विश्रांती चौक इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधला. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
या यात्रेत काल नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यांनी आपले अनुभव त्यांनी या शब्दांत कथन केले...
****
सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना, नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात काल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सावंत यांच्या हस्ते घंटा वाजवून शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरवला जावा, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली. खासदार श्रीनिवास पाटील, संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्��क्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल कोरोनाच्या १४ हजारांहून अधिक चाचण्यांमधून १४६ नव्या रुग्णांचं निदान झालं आणि १२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ९३१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातले ९५ टक्के गृहविलगीकरणात आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे सात नवे रुग्ण आढळून आले.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अविष्कार महोत्सवाचं उद्घाटन काल उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते झालं. आजच्या परिस्थितीत विद्यापीठीय चौकटीच्या बाहेर विचार, संशोधन आणि कृती करणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ असल्याचं, भोगले यावेळी म्हणाले. दोन दिवसीय या महोत्सवात ३७० संघानी नोंदणी केली असून, ५६७ संशोधकांचा समावेश आहे. या स्पर्धेतून ४८ संघाची निवड राज्यस्तरीय अविष्कार महोत्सवासाठी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल मराठ्यातल्या पाच लघु चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. मराठवाड्यातल्या युवा कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उद्देशानं मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशनच्या वतीनं ही लघुपट स्पर्धा घेण्यात आली.
****
धाराशिव इथं हिरकणी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ��ा महोत्सवाचं उद्घाटन झालं. या पाच दिवसीय महोत्सवात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले असून महिलांसाठी उद्योजकीय तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक संघटनेच्या वतीने जिल्ह्यात येत्या १२ ते १७ जानेवारी दरम्यान नमो चषक २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ॲथलेटिक्स, जम्परोप, डॉजबॉल, धनुर्विद्या सारख्या नव्या क्रिडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ५१ क्रीडा प्रकारात २५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू दोन हजार पंच स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.
****
नवी मुंबईत झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा नऊ खेळाडू राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १४२ धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी ४८व्या षटकात पूर्ण केलं. शेफाली वर्मानं ६४, स्मृती मंधानानं ५४ धावा केल्या. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर इथं विशेष मतदार नोंदणी शिबीरात तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली. या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे कागदपत्रं नसली, तरी मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती, उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल एका घरावर छापा टाकून जवळपास चार लाख किमतीचा २० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव इथली यात्रा दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेत कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल तसंच लावणी महोत्सव होणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ही यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचं त्या म्हणाल्या.
****
0 notes
सुप्रियाताई सुळे यांची शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून बदनामी
सुप्रियाताई सुळे यांची शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून बदनामी
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला…
View On WordPress
0 notes
संवेदनशील रुपालीताई..शांताबाई कोपरगावकरांसाठी सुस्तावलेली यंत्रणा कामाला
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आपल्या संवेदनशीलतेसाठी ओळखल्या जातात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अहमदनगरच्या कोपरगाव येथील बस स्टैंडवर उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या शांताबाई कोपरगावकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला होता आणि त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक जणांना अश्रू अनावर झालेले होते .
शांताबाई कोपरगावकर एकेकाळी लावणी गाजवणाऱ्या कलाकार…
View On WordPress
0 notes
शरद पवार यांच्या नजरेतून उद्धव ठाकरे कसे ? आत्मचरित्रात काय लिहिले ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीना सत्र सुरु केले आहे. शरद पवार यांचा हा निर्णय जसा धक्कादायक आहे त्याचप्रमाणे त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामधूनही अनेक बाबी उघड झाल्या आहेत.…
View On WordPress
0 notes
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री; आता सुप्रिया सुळे यांचे बॅनर!
मुंबई : भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर हे पद कोणाला मिळणार याची आतापासूनची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे.
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित पवार यांचं बॅनर लागलं होतं. ज्यात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा… अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता. तर त्याआधी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर त्यांचाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read the full article
0 notes