#मोदीजी
Explore tagged Tumblr posts
Text
भगवद्गीता पर शपथ: ब्रिटेन में भारतीय संस्कृति और राजनीति का समागम
चित्र साभार गूगल ब्रिटेन की संसद में हाल ही में एक ऐतिहासिक और सांस्कृतिक महत्वपूर्ण घटना घटी, जब भारतीय मूल के सांसदों ने भगवद्गीता पर हाथ रखकर अपनी शपथ ली। इस घटना ने ब्रिटेन में भारतीय संस्कृति की प्रगाढ़ता को एक नई पहचान दी है और यह साबित किया कि भारतीय मूल के लोग ब्रिटिश राजनीति में महत्वपूर्ण स्थान रखते हैं। भारतीय मूल की सांसद शिवानी राजा, ईसाई सांसद बाब ब्लैकमैन (कंजरवेटिव पार्टी), और…
0 notes
Text

अरविंद केजरीवाल का बयान- अगले साल 75 वर्ष के होने पर पीएम मोदी राजनीति से संन्यास ले लेंगे।
इस बयान पर आपकी क्या राय है ?
0 notes
Text
भारतीय जाति व्यवस्था: एक ऐतिहासिक एवं सामाजिक अध्ययन
भारतीय जाति व्यवस्था: एक ऐतिहासिक एवं सामाजिक अध्ययनभूमिकाभारतीय समाज की संरचना में जाति व्यवस्था का महत्वपूर्ण स्थान रहा है। यह केवल एक सामाजिक ढांचा नहीं, बल्कि एक संपूर्ण जीवन प्रणाली थी, जो कुटुंब और गोत्र पर आधारित थी। इस शोध पत्र में जाति व्यवस्था के मूल, इसके ऐतिहासिक संदर्भ, औपनिवेशिक हस्तक्षेप, और आधुनिक परिप्रेक्ष्य को विस्तार से विश्लेषण किया जाएगा।1. जाति व्यवस्था का मूल और कुटुंब…

View On WordPress
#राष्ट्रीय स्वयंसेवक संघ#लोकसभा मोदीजी भाजपा मध्यप्रदेश#अमेज़न प्रोडक्ट#अमेरिका#अमेरिका अमेरिकन संस्कृति राजनीति समाज#इसरो अमेरिका मंगल गृह मानव वस्ति#ताकि यह अधिक से अधिक पाठकों तक पहुंचे। इसके लिए विभिन्न रणनीतियों का पालन कि#बंंजारा पोस्ट आफिस रोजगार व्यापार ग्रामीण विकास डाक विभाग#भाजपा#सहकारिता#Banjara
0 notes
Video
youtube
सत्यपाल मलिक जैसों की बोलती बंद । इनका नफरती अभियान भी नहीं रोक सका मोदी...
#youtube#मोदीजी २०२४ का चुनाव सिर्फ हिन्दुस्तनसे नहीं बल्कि दुनियासे चुनाव जीते है मोदीजी ====================== विद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरे��द्र मोदी यांचा आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद. • आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्रासह दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची घोषणा. • छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार-दोन सैनिकांना वीरमरण. • दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक-धावपटू ऐश्वर्या मिश्राचीही सुवर्णपदकाला गवसणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयुर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विषद केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला आता जाणवतोय की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इनव्हॉल्ह्व केलेले आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचादेखील विचार केलाय. भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत, त्या परीक्षांमधले जे टॉपर आहेत, ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एकंदरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री म���दीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो. विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी ��ाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार. या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून,अक्षयावत आणि बडे हनुमान मंदीरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभा केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्यास या क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर इथं काल 'आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. सहकार क्षेत्रातल्या चुका लपवण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा, असं बागडे यांनी सूचित केलं. सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीत असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन, सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी केलं.
आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्यात येणार असून, दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्यात येणार आहे. काल आनंदवनात मित्र मेळा या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून, आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन सहा हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार वरुन सहा हजार पर्यंत वाढवल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते, या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं, ही बाब गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले… मानवी संवेदन�� याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं, समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार, आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर याठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोकं येतात, आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालोत, अशा प्रकारची भावना निर्माण होतेय. पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे, ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी वाटचाल आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले, तर दोन सैनिकांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना चार गडी राखून जिंकत भारताने मालिकेत दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल ओडिशात कटक इथं झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३०४ धावा केल्या. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर हे आव्हान ४५ व्या षटकात पार केलं. ९० चेंडूत ११९ धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना परवा १२ तारखेला अहमदाबाद इथं होणार आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं, तर महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत मुंबईच्या ऐश्वर्या शर्मा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १२० पदकं जिंकली असून, २९ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांसह पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, ४२ सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या तर ३१ सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून, त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं काल राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्य रसिक उपस्थित होते.
धाराशिव इथल्या नॅचरल उद्योग समुहाने तयार केलेल्या ‘फर्मंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर’ या सेंद्रीय खताची, राष्ट्रीय केमिकल्स् अॅण्ड फर्टिलायझर या राष्ट्रीयकृत कंपनीला विक्री करण्याचा शुभारंभ काल करण्यात आला. राष्ट्रीय केमिकल्स् अॅण्ड फर्टिलायझर या कंपनीचे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ विपणन अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेंद्रीय खतामुळे सुपीक जमिनीची गुणवत्ता वाढणार असल्याचं, नॅचरल उद्योगचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी यावेळी सांगितलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोह पार पडला. अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे, या शब्दांत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने काल पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५४ हजार ६८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. या विस्तारीत इमारतीमुळे सर्वांना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणा��्यांना न्याय मिळेल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत भारतीय नागरीकांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकार निष्क्रिय असून मौन बाळगत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने धाराशिव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त आज ध्वजारोहणाने विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.
0 notes
Text
विधासभा का प्रचार करे Best BJP Poster Maker app के साथ
विधानसभा चुनाव 2024 के लिए BJP का प्रचार अब Adbanao App से और भी आसान! जानें, कैसे आप BJP के लिए आकर्षक पोस्टर्स और डिजिटल प्रचार पोस्टर्स सिर्फ एक क्लिक में बना सकते हैं। अभी Adbanao App डाउनलोड करें और प्रचार को नई ऊंचाइयों तक पहुंचाएं।
भारतीय जनता पार्टी एक प्रबल पार्टी है, जो हर चुनाव में अपना सिक्का जमाती है। देश का विक���स और हर भारतीय की जरूरते समझकर काम करने वाली राजनैतिक पार्टियां बहुत कम होती है। भारतीय जनता पार्टी इसमें सबसे ऊपर आती है। नरेंद्र मोदीजी का विकास का vision और लगातार विकास का काम ही पार्टी को दूसरे से अलग बनाता है।
0 notes
Text

आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के जन्मदिवस पर उनके दीर्घ, स्वस्थ और सुखी जीवन की कामना करता हूँ।
Wishing honourable PM Shri Narendra Modiji a long, healthy and happy life.
0 notes
Video
youtube
मोदीजी का भाई भारत को लुट कर भाग गया पाक जाहिल व्यक्ति 🤡🇵🇰 #pakistani
0 notes
Text


ICAR द्वारे विकसित 109 जैव-संवर्धित आणि हवामान-अनुकुल वाणांचे प्रकाशन..
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ICAR द्वारे विकसित केलेल्या 109 जैव-संवर्धित आणि हवामान-अनुकुल वाणांना समर्पित केले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेडच्या वतीने या वाणांची शेतकऱ्यांना ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी विविध पिकांच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या वाणांबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. #ICAR #जैवसंवर्धितवाण #हवामानअनुकूलवाण #कृषी #शेतकरी #शेतकरीसमाज #भारतीयकृषिअनुसंधानसंस्था #नवीनवाण #बियाणे #शेतकरीउत्पादन #कृषिपरिवर्तन #महाराष्ट्र #भारत #कृषिविज्ञान #शेतकरीमित्र #कापूस #ज्वारी #बाजरी #कृषिजागरूकता #नवीनतंत्रज्ञान #ICAR #biofortifiedcrops #climatechange #agriculture
0 notes
Text
राष्ट्रगौरव की अवहेलना: विदेशी शक्तियों की चाल और विपक्ष की राजनीति
भारतीय प्रधानमंत्री को रूस का सर्वोच्च नागरिक सम्मान मिलना, निस्संदेह, भारत के लिए गर्व की बात है। लेकिन यह सफलता विदेशी ताकतों के मोहरे, जो मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री पद से वंचित करने के लिए प्रतिबद्ध हैं, के लिए पचाना मुश्किल हो रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपने तीसरे कार्यकाल में विकसित भारत के संकल्प के साथ, देश को शक्तिशाली देशों में शामिल करने और इसे तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाने…
0 notes
Text
कांग्रेस नेता के बिगड़े बोल, कहा, नरेंद्र मोदीजी याद रखिए, एक दिन लोग प्रधानमंत्री आवास पर कब्जा कर लेंगे; जानें पूरा मामला
Sajjan Singh Verma on Bangladesh: बांग्लादेश में आरक्षण विरोधी छात्र आंदोलन के कारण शेख हसीना को प्रधानमंत्री पद से इस्तीफा देकर भारत में शरण लेनी पड़ी। उन्हें वहां जान का खतरा था। इस बीच आज मोहम्मद यूसुफ की अगुवाई में 18 स��स्यों वाली अंतरिम सरकार शपथ लेने जा रही है। इस बीच भारत में विपक्ष के नेता लगातार मोदी सरकार पर हमला बोल रहे हैं। बुधवार को एमपी कांग्रेस के वरिष्ठ नेता सज्जन सिंह वर्मा ने यह…
0 notes
Text
Trump, Musk, and Modi: The Triveni Sangam of Politics, Innovation, and Organization
Trump, Musk, and Modi: The Triveni Sangam of Politics, Innovation, and OrganizationIntroductionThe three most influential personalities in the world—Donald Trump, Elon Musk, and Narendra Modi—have achieved extraordinary success in their respective fields. These leaders have revolutionized politics, business, and innovation in their own ways, challenging the traditional systems.When we view their…
#राष्ट्रीय स्वयंसेवक संघ#लोकसभा मोदीजी भाजपा मध्यप्रदेश#अमेरिका अमेरिकन संस्कृति राजनीति समाज#बंंजारा पोस्ट आफिस रोजगार व्यापार ग्रामीण विकास डाक विभाग#भाजपा#भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ#रोजगार के अवसर एसबीआई बंंजारा आदिवासी#Gypsy Banjara Roma Gor Gwar
0 notes
Video
youtube
PM Narendra Modi’s Indication To Take Stern Decisions In 3rd Term | Raje...
#youtube#मोदीजी २०२४ का चुनाव सिर्फ हिन्दुस्तनसे नहीं बल्कि दुनियासे चुनाव जीते है मोदीजी ====================== विद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. “प्रधानमंत्री मोदीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो.’’ “विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार, या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.’’
छत्तीसगढ इथं आज सकाळपासून बिजापूर-नारायणपूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. तसंच दोन सुरक्षा कर्मचारी शहीद तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असल्याचं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितलं. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा आज समा��ोप होणार आहे. या मेळ्यात पन्नास देशातले दोन हजार प्रकाशक आणि एक हजार वक्ते सहभागी झाले होते.
जर्मनी इथं सुरू असलेल्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी भारताचा डी.गुकेश बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशनं तीन पूर्णांक पाच गुणांसह हा टप्पा गाठला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं थोड्याच वेळात सुरू होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे. हा सामनाही जिंकून विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी ११ वाजता त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. आतिशी यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा राहिला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाचे नाव निश्चित करायचे यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या ��र्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अमृतकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
0 notes
Video
youtube
कारगिल दिवस पर क्या बोल गए मोदीजी #youtubeshorts #kargil #shorts
0 notes
Text
अनंत राधिका ने पीएम मोदी के पैर छूकर लिया आशिर्वाद। प्रधानमंत्री मोदीजी ने अनंत अंबानी और राधिका को नए जीवन के लिए दी शुभ कामनाएं। पीएम ने भी लिया संतों का आशीर्वाद #RadhikaMerchant #AnantwedsRadhika #MukeshAmbani #shubhashirwad
0 notes