#मुंबई क्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांचं प्रबोधन
राज्यभरात १८ जिल्ह्यांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं दोन टप्प्यात सौरऊर्जीकरण
औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप तसंच बजरंग दलाचं सोमवारी आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू
आणि
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
****
जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात आला. यानिमित्ताने आज सर्वत्र विविध कार्यक्रम घेण्यात आले. ग्राहकांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारून न्याय्य पध्दतीनं वाटचाल करण्याला प्रोत्साहन द्यावं, अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये, यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ते एका वेबिनारला संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, जोशी यांनी नमूद केलं.
केंद्र सरकारच्या वतीनं जागो ग्राहक जागो हा उपक्रम राबवला जातो. ई-कॉमर्समधला अनुचित व्यापार टाळण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक संरक्षण नियम, २०२० अधिसूचित केले आहेत. या नियमांद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांची दायित्व, रूपरेषा आणि बाजारपेठेतलं त्यांचं अस्तित्व याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे.
****
सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
****
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील लातूरसह १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौरऊर्जीकरण करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सौरऊर्जीकरणाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील २५० प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ऊर्जेबाबत स्वावलंबी होणार असून, विजेच्या देयकांमध्ये मध्ये मोठी बचत होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची २४ तास अखंड वीज पुरवठ्याची गरजही यामुळे पूर्ण होणार असून, आरोग्य सेवा अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.
****
मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव, तसंच आधा�� प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्यावर विस्तृत चर्चा होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
इंग्लंडच्या सेंट्रल बँकिंगने भारतीय रिझर्व्ह बँकेची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ साठी निवड केली आहे. बँकेने विकसित केलेल्या आणि बँकेने राबवलेल्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठीही बँकेला पुरस्कार देण्यात आला आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे कागदाचा वापर कमी झाल्याचं निरीक्षण पुरस्कार समितीनं नोंदवलं आहे. सारथी प्रक्रिया स्वयंचलित करून बँकेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत झाली, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते व्हावं, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथल्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात आज दीक्षांत सोहळ्यात गडकरी बोलत होते. शिक्षणामुळे फक्त संबंधित विद्यार्थ्यांचाच विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो, असं गडकरी यांनी नमूद केलं.  
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार यांनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी सिंधुदुर्ग इथून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली, कुडाळ इथं पत्रकारांशी साधलेल्या संवादात सपकाळ यांनी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वापरली जाणारी भाषा दुर्देवी असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
****
पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्य���ची आवश्यकता असल्याचं, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशुखाद्य प्रकल्पाचं भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा हा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० ��ार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन पॅट चाचण्या एकाच वेळी घेण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला आहे. त्यानुसार शाळांनी ८ ते २५ एप्रिल दरम्यान या परीक्षा आणि चाचण्या घ्यायच्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने परवा सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन औरंगजेबची कबर त्वरित हटवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडी या परिसरात तैनात करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील रुई, राळगा आणि वरवंटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय, नवनिर्मित तसंच चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि २८ फेब्रुवारी २०२५ अखेर रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत झालेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी इथले रहिवासी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होणार आहे. यंदाचा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३५४ कोटी ३७ लाख रु��यांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. आज विद्यापीठात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठकीत अर्थसंकल्पासह विविध विषय मंजूर करण्यात आले. या बैठकीस प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह वित्त आणि लेखाधिकारी सविता जंपावाड, परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांच्यासह ६२ सदस्य बैठकीस उपस्थित होते.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
****
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात होणार आहे. रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी - 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या 'कर्मभूमी'मध्ये प्रवेशावर बंदी
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्य�� सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी – 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या ‘कर्मभूमी’मध्ये प्रवेशावर बंदी
मुंबईतील सांताक्रूझ येथील ‘लोकप्रिय’ एअर इंडिया ग्राउंड, जे पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांसारख्या टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे घर आहे, ते यापुढे इच्छुक क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध नसेल. यामुळे सुमारे 1000 प्रतिभावान क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात आले आहे. हे मैदान मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मालकीच्या क्रीडा संकुलाच्या आत आहे. ते गेल्या वर्षी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं?
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं?
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं? Irfan Pathan mumbai airport: इरफान पठाणचा आशिया कप २०२२ च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी इरफान दुबईला रवाना झाला. बुधवारी कुटुंबासह दुबईला जाण्यासाठी इरफान मुंबई विमानतळावर पोहोचला होता. यादरम्यान त्याला विमानतळावर वाईट वागणूक देण्यात आली. Irfan Pathan mumbai…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्माचे केले कौतुक, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारासाठी असे म्हटले
डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्माचे केले कौतुक, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारासाठी असे म्हटले
डेवाल्ड ब्रेविस: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्मावर मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा कर्णधार म्हणून हुशार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. तो पुढे म्हणाला की, रोहित शर्मा आपल्या खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. तो आपल्या खेळाडूंवर दबाव निर्माण होऊ देत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही तुमच्या नैसर्गिक खेळाचा आनंद घ्यावा आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे दोन लाख सौर उर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी
येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्��ण करून नमुने तपासणीचे आदेश
धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा-जालन्यात हत्तीरिसाला परंपरेचा उत्साह तर विड्यातली जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित
आणि
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
यूएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन सोबत युएफबीयूची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानं, संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.
****
जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा अबाधित ठेवणं, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना चालना देणं तसंच या हक्कांचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं, या उद्देशाने हा दिवस पाळण्यात येतो. शाश्वत जीवन शैलीसाठी न्यायोचित परिवर्तन ही या वर्षीच्या ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. पितांबर सरोदे यांचं काल नंदुरबार इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. सरोदे यांची ३० हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. आकाशवाणीच्या जळगाव आणि धुळे केंद्रावरून त्यांनी पन्नासहून अधिक व्याख्या��ं आणि चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता.
****
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.
****
भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने काल रात्री एक अंतराळ यान अवकाशात पाठवलं. सुनिता आणि बूच विल्मोर हे दोघं अंतराळवीर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवडाभरासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून ते तिथेच अडकून पडले आहेत.
****
जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीने जर्मन कोर्सबुक म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात जर्मन उच्चार देवनागरी लिपीतून देण्यात आले आहेत.
****
धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिकांनी कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा केल्याचं पहायला मिळालं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध असलेली राजवाडी काठीची होळी काल पहाटे साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. या अनोख्या होलिकोत्सवासह राज्यभरातल्या धुलिवंदन सोहळ्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
‘‘ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बाव��, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.
**
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते.
दरम्यान, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारीक लेंगी नृत्य सादर झालं.
**
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपारिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.
**
जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे १३६ वे वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा-प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते, त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात, असा प्रघात आहे. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवाणुकीत मोठ्या संख्यने सहभाग घेतला.
**
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
**
छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत - इस्कॉन संघटनेच्या वतीनं काल गौर पौर्णिमा उत्सव साजरा झाला. अनेक बांधव या सोहळ्यात सहभागी झाले.
दरम्यान, नांदेड इथं शीख बांधवांचा होलामोहल्ला सोहळा आज साजरा होणार आहे.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
****
ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल, भारताचा लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उ��ांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. तर, महिला दुहेरीत त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा गाभारा आणि सभामंडप काल द्राक्षांनी सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. ही द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली.
****
पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्��वला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास, मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.
दरम्यान, मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्वाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी - पाच जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. याकामाच्या आढाव्यासह टोकन पध्दतीने दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज सकाळी साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.
येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली, त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता ५६ रुपये प्रतिलीटरवरून ५८ रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री ७२ रुपये प्रतिलीटरवरून ७४ रुपये प्रतिलिटर होणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना विभागाच्या संकेतस्थळावर येत्या ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला कालपासून लातूर इथं प्रारंभ झाला. शहरातल्या पीव्हीआर टॉकीजमध्ये १७ मार्चपर्यंत चालणारा हा फेस्टिवल सर्वांसाठी नि:शुल्क आहे. लातूर तसंच मराठवाडयातील सिनेरसिकांनी या फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा असं आवाहन, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे. घरत यांनी आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरी आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला आहे. विष्णु बाबुराव सादुळे असं आरोपीचं नाव असून, त्याने शेजारी राहणाऱ्या बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता, २३ मार्च २०२३ रोजी हा प्रकार घडला होता.
जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर ��ंद पडल्याने अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वेगेट पास करत असताना अचानक मालवाहून ट्रॅक बंद पडल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहराने कळवली आहे. या अपघातात जीवीत हानी झाली नाही मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकच मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतून विस्कळीत झाली आहे.
हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे, या निर्णयाला सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे, दरम्यान, तिरुपती - आदिलाबाद - तिरुपती कृष्णा एक्सप्रेस च्या मार्गात येत्या २६ मार्च पासून बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी आता सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल १७ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यापैकी सहा नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचं बक्षीस होतं. हे नक्षलवादी 'निया नेलनार' म्हणजेच 'युअर गुड व्हिलेज' या शासनाच्या योजनेनेही प्रभावित झाले आहेत. या योजनेंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून ग्रामिण भागात मूलभूत सुविधा पुरवून विकास केला जातो आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंडिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २२० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फक्त १२६ धावाच करू शकला. भारताकडून सचिन तेंडुलकरने ४२ धावा आणि युवराज सिंगने २६ धावा केल्या तर शाहबाज नदीमने चार बळी घेतले.
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि संबंधित विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर वीस बैठका नियोजित आहेत तसंच, बँकिंग कायदे - सुधारणा विधेयक, किनारी जहाज वाहतूक- कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजूरीसाठी चर्चा होईल. येत्या ४ एप्रिलपर्यंत हे सत्र सुरु असणार आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा मंगळवारी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली जाईल. **** तात्पुरत्या आणि ऑनलाइन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात ३१ हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक-खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत, प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत अशा कामगारांची संख्या जवळपास एक कोटींहून अधिक आहे. वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कामगारां��ी नोंदणी करण्याचं आवाहन कामगार मंत्रालयानं केलं आहे. **** ज्येष्ठ समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांना काल साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्ली इथं आयोजित सोहळ्यात, विविध २३ प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना यावेळी गौरवण्यात आलं. डॉक्टर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला. यासोबतच, कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार मुकेश थळी यांना त्यांच्या 'रंगतरंग ' निबंध संग्रहासाठी तर, गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या 'भगवाननी वातो' या कवितासंग्रहासाठी सन्मानित करण्यात आलं. **** जागतिक महिला दिन काल ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील कर्तबगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ५१ महिलांना आदर्श महिला पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. यवतमाळमध्ये महिला मदत केंद्रातर्फे तीन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आला तर गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील कार्यभार महिला पोलिसांकडं सोपविण्यात आला होता. अकोला इथं महिला आणि बालविकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव अभियान आणि शहरात वॉकेथॉन घेण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. महिलांनी न घाबरता सर्व क्षेत्रात अग्रेसर व्हावं असं त्या म्हणाल्या. परभणी जिल्ह्यातील दैठणा इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थिनींना परीक्षा लेखन संचाचं वाटप करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दिवसभरात किर्तन, बचत गटांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तर, पुणे इथं काल डॉक्टर सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या पंचविसाव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. ****
मध्य रेल्वे विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त काल संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांसह वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवण्यात आली. मुंबई - साईनगर शिर्डी ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव आणि सहाय्यक लोको पायलट संगीता कुमारी यांनी चालवली. श्वेता घोणे यांनी रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले तसंच मुंबई विभागासह भुसावळ विभागात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे विशेष मालगाड्या चालवण्यात आल्या. तर पुणे विभागातही, महिला रेल्वे संरक्षण दलाकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी ��ुक्कामाची सोय असणाऱ्या पहिल्या बराकीचं उद्घघाटन करण्यात आलं. **** हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर गुजरात, कर्नाटक किनारी, केरळ इथं काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज आहे. **** क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. दुबईत खेळला जाणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल. **** महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ इथं झालेल्या सामन्यात, युपी वॉरियर्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा बारा धावांनी पराभव केला. या पराभवामुळे गतविजेता RCB संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. RCB सध्या सात सामन्यांत चार गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, तर युपी वॉरियर्स स्पर्धेतून आधीच बाहेर पडला आहे. या निकालामुळं गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससोबत पुढच्या फेरी��� दाखल झाले. मुंबई इंडियन्सचा सामना उद्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होईल. **** भारतीय महिला कबड्डीपटूंनी आशिया करंडक पाचव्यांदा जिंकला आहे. इराणमध्ये तेहरान इथं सहाव्या आशिया महिला कबड्डी अजिंक्यपदाच्या सामन्यात त्यांनी काल यजमान इराणचा ३२-२५ अशा गुणांनी पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला. ****
0 notes
airnews-arngbad · 15 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
राज्य विधिमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन-विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कार्यरत
बीड जिल्ह्यात किल्ले धारूर तालुक्यात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल
आणि
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचं न्यूझीलंडसमोर २५० धावांचं आव्हान
****
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आज संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
****
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा, मात्र फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो, असं सांगत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही भूमिका जाहीर केली.
फक्त चहापानाला जाणं, म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही. खरंतर संसदीय लोकशाहीचं पालन जशी सत्ताधारी पक्षानं करणं जबाबादारी आहे, तशीच विरोधी पक्षाची पण आहे. आणि या राज्याचं हीत व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे. विरोधी पक्षाला सातत्यानं सापत्��तेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तसंच पुण्यातल्या लैगिंक अत्याचार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदशील असून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना पाहता, कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तत्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार आज घडला, त्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी ही मागणी केली आहे.
****
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित ‘परिवहन भवन’ इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, ते म्हणाले –
ॲक्सिडेंट कमी करण्याकरता ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याही अत्यंत चांगल्या आहेत. विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एकोणातीस टक्के आणि समृद्धीवर जवळपास पस्तीस टक्के ॲक्सिडेंट कमी झालेले आहेत, ती खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे. कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की आपण काहीही नियम मोडला, तर इमिजीयेट कॅमेरा कॅप्चर करतोय. आणि कॅप्चर करून जो काही आपला दंड आहे, तो आपल्या घरीच पाठवतोय. दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड भरल्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम असल्यामुळे आपण कुठलंही उल्लंघन करू नये.
या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना ‘निवृत्ती सन्मान’ योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान निधीचं वितरण करण्यात आल���.
दरम्यान, रायगड इथं उच्च न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला समारंभ��ी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, सर्वोच्च न्यायलयातले न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाकडे येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना वेगाने मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करत केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही माहिती दिली. मात्र, दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात, वेगळ्या विधानसभा मतदारसंघात, आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नोंदलेलं आहे. यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रीत असल्याने असे क्रमांक दिले गेल्याचं, आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मात्र हे एपिक नंबर आयोगानेच एकाच वेळी दोन मतदारांना दिलेले असल्यास, बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासाही आयोगाने केला आहे.
****
देशभरातल्या वेगवेगळ्या १२ प्रकरणातल्या २९ अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या युवकांचे आयुष्य खराब होत असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्यात एका शेतकऱ्याने तीन गुंठे जमिनीवर अफूची शेती पिकवल्याचं निदर्शनास आलं आहे. पिंपरवाडा, चोंडी तसंच जहागीर मोहा या तीन गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरवाडा शिवारातल्या या शेतावर पोलिस पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला २५० धावांचं आव्हान दिलं आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत, भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र भारताचे सलामीचे फलंदाज समाधानकारक खेळ न करता झटपट बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा १५, विराट कोहली ११ तर शुभमन गिल अवघ्या दोन धावांवर तंबूत परतले. श्रेयस अय्यरच्या ७९, हार्दिक पंड्याच्या ४५ आणि अक्षर पटेलच्या ४२ धावांनी भारताच्या धावसंख्येला आकार दिला. भारतीय संघ निर्धारित षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकला. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत.
****
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं एका कुक्कुटपालन केंद्रात बर्ड फ्ल्यूची या पक्षांना होणाऱ्या विषा��ुजन्य संसर्गाची बाधा झाल्याचं आढळलं आहे. इथल्या मृत कोंबड्यांच्या तपासणीतून आजाराची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेनेनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बर्ड फ्ल्यू विषयी जनजागरण करण्यासाठी  ग्रामीण भागामध्ये दवंडी देऊन माहिती नागरिकांना दिली असून सतर्कता बाळगण्याचे उपायही याद्वारे सांगितले जात आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातर्फे सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत सांख्यिकीय डेटा विश्लेषण कार्यशाळेचं तीन मार्च ते आठ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. पीएम उषा अंतर्गत होणाऱ्या या कार्यशाळेत डेटा-केंद्रित जगात डेटा विश्लेषण कौशल्यांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हे सहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योगातील गरजा पूर्ण करणे, निर्णयक्षमता सुधारणे आणि व्यावसायिक प्रगतीसाठी स्पर्धात्मकता करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्या सकाळी उद्घाटन होणार आहे. या कार्यशाळेत आत्तापर्यंत दिडशेहून अधिक संशोधकांनी नोंदणी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला. येमाई, मंगरुळ, आरळी, केमवाडी या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावं, असेही निर्देश देण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी इथं ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. यात सुमारे १३० विज्ञान प्रकल्प तसंच पोस्टरचं सादरीकरण करण्यात आलं
****
लातुर इथं सिध्देश्वर आणि रत्नेश्वर देवालय परिसरात ७ मार्च रोजी पशुपक्षी प्रदर्शनाचं तर, ८ मार्च  रोजी अश्व आणि श्वान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत नोंदणी करावी, त्यानंतर निवड प्रक्रिया होणार असल्याचं. लातूर पंचायत समितीमार्फत कळवण्यात आलं आहे. पशु प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचं स्वास्थ दाखला प्रमाणपत्र तसंच संबंधित पशुधनांच्या कानात १२ ��ंकी पशु आधार क्रमांक असणं बंधनकारक राहणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 24 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर हेलिकॉप्टरनं ते वेरुळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वराच दर्शन घेऊन वेरुळ लेणीला भेट दिल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर हेलिकॉप्टरनं त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. संविधा�� जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घघाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण आज करण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलं आहे.
****
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं येत्या २६ तारखेला महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या पवित्र स्नानाची तयारी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल महाकुंभ परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेतला.
दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६९ कोटी ३१ लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी २८ लाख भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज १९व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात सहा परिसंवाद, १४ गटचर्चा, एक विशेष व्याख्यान, चार कविसंमेलनं, साहित्य संवाद यासारखे कार्यक्रम तसंच अजिंठा दृश्य कलादालन असणार आहे.उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे.आज सकाळी औरंगपूरा परिसरातल्या महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून विचार यात्रेला सुरूवातझाली.
****
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या वेरुळ इथं २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत मोठी यात्रा भरणार आहे. या कालावधीत घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता धुळे ��ोलापूर महामार्गआणि खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरील जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत.त्यानुसार, छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, वेरुळ, खुलताबाद, दौलताबादकडे जाणारी जड वाहतूक छत्रपती संभाजीनगर -शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी- कसाबखेडा फाटा-वेरुळ बायपास मार्गे- कन्नडकडे जाईल.
तर कन्नडकडून -वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतूक कन्नड-वेरुळ बायपास- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल. तर फुलंब्रीकडून- सुलतानपूर, खुलताबाद, वेरुळकडे जाणारी जड वाहतूक फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी - कसाबखेडा फाटा- वेरुळ बायपास मार्गे कन्नडकडे जाईल.
****
क्रिकेट - महिला प्रीमियर लीगमध्ये आज संध्याकाळी बंगळुरूमध्ये यूपी वॉरियर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली यूपी वॉरियर्सनं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, तर दिल्ली कॅपिटल्सनं तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
काल बंगळुरूमध्ये झालेल्या मुंबई विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात मुंबई इंडियन्सनं बंगळुरूचा ४ खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित २० षटकांत ७ खेळाडू गमावून १६७ धावा केल्या. हे आव्हान मुंबई इंडियन्सनं १९ षटकं आणि पाच चेंडूंत सहा खेळाडू गमावून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं ५० धावा केल्या.
****
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 26 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 February 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. • राज्यभरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद. • शिवरायांचा सकलजनवाद हा खरा महाराष्ट्रधर्म-लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांचं प्रतिपादन. • पुणे ते दिल्ली धावत्या रेल्वेत ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ प्रारंभ. आणि • नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि न्यायबुद्धी तसंच त्यांच्या असामान्य नेतृत्वानं रचलेला स्वराज्याचा पाया, यांनी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालाही राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिकेनं क्रीडा भवन इथे घेतलेल्या शिवजयंती उत्सवात राज्यपाल सहभागी झाले.
शिवजयंतीचा मुख्य सोहळा पुण्यात साजरा झाला. किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरांपेक्षाही मोठे असून त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्वतंत्र आणि आत्माभिमानी भारत आज आपण पाहतो आहोत, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेऱणा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले.. आज आपण स्वतंत्र भारत पाहतोय. आत्माभिमानी अशा प्रकारचं एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय. याच्या पाठीशी कोण असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे. राज्यकारभार कसा चालवायचा याची जी मानवता त्यांनी सांगितली आहे. आपल्याला कल्पना आहे. ते केवळ योद्धे नव्हते तर उत्तम प्रशासक होते. पर्यावरण असेल, जलसंवर्धन असेल, जंगल संवर्धन असेल, वेगवेगळ्या प्रकारचं संवर्धन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. तर, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.
पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. पुण्यात काढण्यात आलेल्या पदयात्रेत, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरही सुमारे तीन हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीसह ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जालन्यात काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली इथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं
लातूर इथे जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम आणि झांज पथकांनी केलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली.
धाराशीव इथं “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” उत्साहपूर्ण वातारणात पार पडली. शहरातल्या विविध शिक्षण संस्थांमधले सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले.
शिवरायांचा सकलजनवाद हाच खरा महाराष्ट्रधर्म असल्याचं प्रतिपादन राजकीय भाष्यकार आणि ’सकलजनवादी शिवराय’ या ग्रंथाचे ले��क डॉक्टर प्रकाश पवार यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त झालेल्या व्याख्यानात ते आज बोलत होते. युरोपियन आणि मोगलांची विचारसरणी हिंसेचं गौरवीकरण करत होती, त्यावेळी महाराजांनी वाटाघाटी, चर्चा आणि संवादाद्वारे सर्वसामान्य रयतेची मतं राज्यकारभारात आणली, असं मत डॉक्टर पवार यांनी यावेळी मांडलं.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या 'सेवांकुर भारत : वन वीक फॉर द नेशन' या लघुपटाचं प्रकाशन करण्यात आलं, प्रत्येकानं एक आठवडा राष्ट्रकार्यासाठी दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल, असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.
शासनातर्फे मुंबईत इंदू मिल इथे उभारण्यात येणार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेतीनशे फूट उंचीच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या कामाची पाहणी आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन शिल्पकार राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे, आज दुपारी बारापर्यंत सुमारे पासष्ट लाख लोकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. संक्रांतीपासून आतापर्यंत छप्पन्न कोटी बारा लाख भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आरबीआय-डेटा, या नावाचं एक मोबाईल ॲप सुरू केलं आहे. या ॲपवरून लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यापक आकडेवारी मिळू शकेल. या ॲपच्या मदतीनं नागरिकांना त्यांच्या आसपासच्या वीस किलोमीटर परिघातल्या बँकिंग सुविधांची माहितीही मिळू शकणार आहे.
दिल्ली इथं होत असलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित पुणे ते दिल्ली ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ आजपासून प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत हे संमेलन होत आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं असून, रेल्वेच्या डब्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. ढोल-ताशा, मृदुंग आणि टाळपथकांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर या पुण्यातून ही रेल्वे निघाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनीही या विशेष रेल्वेत साहित्यिकांसोबत प्रवास केला. दरम्यान, दिल्ली इथं होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाब�� ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी आपलं मत व्यक्त केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल��याबद्दल पंतप्रधानांनी, अशा घोषणेनंतर जाहीर होणारा विशेष निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा भालेराव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले… साहित्य महामंडळ दरवर्षी महाराष्ट्राबाहेर जी संमेलन घेतं, त्यापाठीमागचा उद्देश हा असतो की ज्या मराठी भाषीक लोकांना आपण मराठी भाषेत त्यांच्यासोबत आहोत असं वाटावं. इथ जास्तीत जास्त परप्रांतीय इतर भाषीक लेखक कार्यक्रमाला येतील आणि त्याच्यासमोर मराठी भाषेचं वैभव कस जाईल याचा वेगळा विचार महामंडळाने करावा असं मला वाटतं. देशाचं सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान स्वत: उद्घाटनासाठी येत आहेत. जर त्यांनी स्वतंत्र निधीची तरतूद केली, काही वेगळे उपक्रम सुरु केले तर कदाचीत काही फरक पडेल, नाही तर नुसतच मराठी भाषेला दर्जा दिल्याचं प्रमाणपत्र देऊन त्याचा फारसा भाषेसाठी उपयोग होणार नाही. पण तशी निधीची तरतूद करतील अशी अपेक्षा आपण करुयात.
नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होत असून, आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान सुरू आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या ४४ षटकांत चार बाद २४० धावा झाल्या होत्या. दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती.
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, ते आज मार्सेलीस इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर इथल्याच समुद्रकिनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारुन मार्सेलीस बंदरावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आपल्याला आभार मानायचे असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्या हस्ते मार्सेलीस इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे.
प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात आज माघ पोर्णिमा स्नान सुरु आहे. यावर्षी दहा लाखाहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. १३ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
आज देशभरात संत रविदास यांची जयंती साजरी केली जात आहे. रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम इथल्या बस स्थानक परिसरात सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीने आज स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी सर्वप्रथम वाशिम बस आगाराचे व्यवस्थापक अनिरुद्ध मेहत्रे आणि माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.
थोर समाज सुधारक दयानंद सरस्वती ��ांचीही आज जयंती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली असून, स्वामी दयानंद सरस्वती यांनी लोकांना सामाजिक कुरीतींबाबत जागरूक करत, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वदेशी भावना लोकांमध्ये जागवल्या, असं म्हटलं आहे.
लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्षा कमी असलेल्या युजर्सचा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल. अशा युजर्सच्या अकाउंटवर पालकांना नियंत्रण ठेवता येईल, तसंच ॲपच्या वापराचा वेळही पालकांना निश्चित करता येणार आहे.
राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तासिका तत्वावरच्या अधिव्याख्यात्यांचं मानधन वेळेवर देण्याचे निर्देश, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तासिका तत्वावर असणाऱ्या अधिव्याख्यात्यांना दरमहा मानधन मिळेल असं नियोजन करावं असं त्यांनी म्हटलं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज गिरगाव इथल्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, अधिक तपास सुरू आहे.
मुंबई शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशीही घसरण सुरु आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला होता, तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,००० अंकांच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स २,२९० अंकांनी तर निफ्टी ६६७.४५ अंकांनी घसरला आहे.
नागपूर सिकंदराबाद या वीस डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसचे डबे कमी करण्यात येणार असून येत्या एकोणीस तारखेपासून या गाडीला आठ डबे असतील. ही गाडी दिवसा प्रवास करत असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचं दिसून आल्यानंतर मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळवण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिले दोनही सामने जिंकून ��ारताने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सांगितलं.
चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मकाउ वर पाच-शून्य असा दणदणीत विजय मिळवत आपलं उपान्त्यपूर्व फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे. आज झालेल्या फेरीत भारताच्या सतीशकुमार करुणाकरन आणि आद्या वरियथ या जोडीनं मिश्र दुहेरीत, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीत, एम आर अर्जुन आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत, तर लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत आणि मालविका बनसोडनं महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात होताच विरोधकांनी अमेरिकेहून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावरुन सभागृहाचं कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर परत कामकाजाला सुरुवात होताच अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र, विरोधकांनी याच मुद्यावर परत गोंधळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही याच मुद्यावर गोंधळ झाला. उपसभापती हरिवंश यांनी सुरुवातीला १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेहून परत आलेल्या भारतीयांच्या मुद्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर दुपारी दोन वाजता निवेदन देणार असल्याची माहिती राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत चार वाजता उत्तर देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली.
****
परीक्षा पे चर्चा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करतील. ३६ विद्यार्थी पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधणार आहेत. यावर्षी विविध माध्यमांतून सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची विक्रमी संख्या पाच कोटी एवढी आहे.
****
दहावी आणि बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन मिळणार असल्याचं सावरकर यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी आज पदभार स्वीकारला. नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि  सेवा कर विभागाचे सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
****
पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी ज्या ठिकाणी भारतीय जनता ��क्षाचे पालकमंत्री नाहीत, त्या सतरा जिल्ह्यांमध्ये पक्षानं जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केले आहेत. यामध्ये अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगर, पंकजा मुंडे बीड, जयकुमार गोरे धाराशिव, मेघना बोर्डीकर यांची हिंगोली  जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या, पनवेल-इंदापूर या ८४ किलोमीटर टप्प्याचं काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे. सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्ता पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर असून, मुख्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग-पीक्यूसीचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्राधिकरणानं दिली आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं काल वेव्ह्ज परिषदेचं मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसी मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी मुंबईतल्या विविध महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले होते. ऍनिमेशन, व्हीएफएक्स या क्षेत्रात असलेल्या संधींचा युवा वर्गानं फायदा करून घ्यावा,असं या परिषदेच्या मार्गदर्शक सरस्वती वाणी यांनी म्हटलं.
****
प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम-२०२५ आयोजित करण्यात आला आहे. बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २०२५ हे वर्ष आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे ३८ लाख ७० हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याची माहिती महाकुंभ मेळा प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे २३३ एटीएम उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत ४० लाख ८५ हजार भाविकांना शुद्ध पाणी मिळाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.
****
भारत आण�� इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात नागपूर इथं सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष संघानं ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका २-० अशी गमावली होती. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरत आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी कटकमध्ये तर शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.
****
ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. शिक्षणानं अभियंता असणारे संझगिरी हे मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. क्रीडा आणि चित्रपट या विषयांवरील त्यांचं समीक्षण वाचकांच्या विशेष पसंतीला ��तरलं. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी एकामागून प्रचारसभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आरके पुरम येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर येथील सभांना उपस्थित राहतील. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री ��गवंत मान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत एक प्रचारफेरी काढणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे दिल्लीतील अनेक भागात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुस्तफाबाद परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही राष्ट्रीय राजधानीत सभा घेणार आहेत. दरम्यान, ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे. ****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधील द्वारका इथं यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस आज डांग जिल्ह्यातल्या सापुतारा घाटातील खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिला आणि तीन पुरुषांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेऊन काल रात्री नाशिक हुन बसने यात्रेकरू निघाले होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून खोल दरीत कोसळली. या अपघातातील जखमींवर अहवा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस मधले यात्रेकरू मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातले आहेत, असं याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ई-नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीनं शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. २०२४ या वर्षाअखेर जवळजवळ ३५ लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे तेराशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव आणि बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विक्री करावा, असं आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. **** मुंबई इथं काल पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सचिन यांना सन्मानित केलं. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला २०२४ मधल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ��्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. बीसीसीआयनं यावेळी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीचं निवृत्ती घेतलेल्या आर. अश्विनचाही सत्कार केला. ****
महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकुन दक्षिण अफ्रिका संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण अफ्रिकन संघानं १३ षटकात ५ खेळाडूंच्या बदल्यात ४५ धावा केल्या आहेत. **** भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाच फेब्रुवारी, दुसरा नऊ फेब्रुवारी आणि तिसरा बारा फेब्रुवारी रोजी होणार आहे. ****
नेदरलँडमध्ये काल झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सर्बियाच्या अलेक्सी श्र्नाचा पराभव केला तर विश्वविजेत्या डि. गुकेशला नेदरलँडच्या जॉर्डी व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. १२ व्या आणि शेवटच्या फेरीनंतर प्रज्ञानंदाने सलग तिसरा विजय मिळवत ८ पुर्णांक ५ गुण मिळवले. ११ व्या फेरीत गुकेश प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह यांच्यापेक्षा अर्ध्या गुणांनी आघाडीवर होता, पण आता त्याचा सामना अनिर्णित राहील्यानंतर तो प्रज्ञानंदाच्या बरोबरीत आला आहे. दुसरीकडे, अब्दुसत्तारोव्हला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीकडून पराभव पत्करावा लागला. ****
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केलेले चपळगांवकर यांनी, ७० च्या दशकात बीड इथं वकिली केली, आणि ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. माजलगाव इथं झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन तसंच वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भुषवली होती. चपळगांवकर यांची अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसे, संस्थानी माणसे, हरवलेले स्नेहबंध, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, यासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं, चपळगांवकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतचं लोकार्पण केलं आहे. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना आदरांजली वाहिली आहे, चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी शोक व्यक्त केला. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये जीवित किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालं नाही. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २ पूर्णांक ४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू दुंडा तहसीलमधील खुरकोट आणि भरणगाव वनक्षेत्र होते. काल सकाळीही उत्तरकाशीमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असलेले राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथांच्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं आपापली कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्वच सहभागींनी विविध राज्यांच्या लोकांशी संवाद साधून एक भारत श्रेष्ठ भारत भावनेला बळकटी द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरसह राज्यात वीस शहरांमध्ये सहाशेहून अधिक ठिकाणी ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि बीड या शहरांचा समावेश आहे. ई-कचरा निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. २०२१-२२ मध्ये देशात १६ लाख टन ई-कचरा तयार झाला होता. शिसं, पारा, कोबाल्ट, निकेल असे यातले रासायनिक घटक मानवासाठी आणि पर्यावरणासाठी घातक ठरतात. त्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर हा त्यावरचा उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन, पुण्यातल्या पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशननं काही संस्थांच्या मदतीनं ई-यंत्रण नावाची व्यापक ई-कचरा संकलन मोहीम आखली आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत या ठिकाणच्या सहाशेहून अधिक केंद्रांवर नागरिकांकडून ई-कचऱ्याचं संकलन केलं जाणार आहे.
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या सेवेला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आज नांदेड इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी नऊ वाजता श्री अखंड पाठ साहिबची समाप्ती होईल. सायंकाळी श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवनमध्ये विशेष गुरुमत समागम, सन्मान सोहळा आणि आभार कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील संत महापुरुष, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सहभागी आहेत.
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम् मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये सहा लाख २५ हजार कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कंपन्यांचा पुढाकार, सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत १४ नक्षलवादी ठार
आणि
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या १७ चेंडूत विजय
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या ३१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार, गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. कल्याणी उद्योगसमुहासोबत संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात, तर विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार झाले. छत्रपती संभाजीनगर इथं एबी इनबेव, अवनी पॉवर बॅटरीज आणि जेन्सोल यांची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे....
‘‘छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन कंपनी करणार आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होतील. तसंच एबी इनबेव्ह या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबतही महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार केला.’’
या सर्वच करारांच्या माध्यमातून राज्यभरात ९२ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल जागतिक आर्थिक मंचच्या कार्यक्रमांअंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात चर्चा केली.
****
जागतिक स्तरावर भारतानं एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे, राज्यघटनेने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिल्यानेच हे शक्य झालं असल्याचं, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. पाटणा इथं ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे, सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाच्या कौशल्याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओने विकसित केलेलं 'प्रलय' हे क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेला ��५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथही संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे.
दरम्यान, नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्रातल्या दोन शाळांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये इस्लामपूरच्या राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी, तसंच नाशिकच्या भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलच्या पथकांचा समावेश आहे. ही महाअंतिम फेरी परवा २४ आणि २५ जानेवारी रोजी होणार आहे.
****
तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.
****
येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
दरम्यान, या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात शाह यांनी, नक्षलवादावर हा मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं.
****
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अवघ्या १७ चेंडूत यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला. मलेशियात क्वालालांपूर इथं काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत गारद झाला, भारताच्या वैष्णवी शर्मा हिने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच धावांत पाच बळी घेत, हॅटट्रिक नोंदवली. भारतीय संघानं सलामीवीर जी त्रिशाच्या १२ चेंडूत नाबाद २७ धावांच्या बळावर अवघी दोन षटकं आणि पाच चेंडूत बिनबाद ३२ धावा करत, विजय मिळवला. वैष्णवी शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत..
‘‘वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे हेल्मेट तयार करताना, त्याची सर्व कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेट साठी डॉ. संजय ढोबळे आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.’’
****
ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिव देहावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. साखरे यांचं सोमवारी रात्री पुण्यात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.
****
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १३ ते २७ जानेवारी या कालावधीत 'जंत निर्मुलन पंधरवडा' पाळला जात आहे. त्या अनुषंगाने सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंत निर्मुलन औषधी द्यावीत, असं आवाहन बीडच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलं आहे. आपल्या पशूंना लाळ-खुरकूत लसीकरण करून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
****
जालना इथं काल महानगरपालिका आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे काल प्लास्टिक विरोधी तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये सुमारे १० किलो प्लास्टिक जप्‍त करण्‍यात आलं. यापुढे प्‍लास्‍टीक आढळून आल्‍यास दंड आकारण्‍यात येईल अशी ताकीद देण्‍यात आली.
****
नांदेडमध्ये काल पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० उमेदवारांची ‍अंतिम निवड करण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, नौदलाच्या तीन युद्धनौकांचं जलावतरण
७७ व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन
छत्रपती संभाजीनगर इथं डिजीटल इंडिया आपले सेवा केंद्र प्रकल्पाच्या जनजागृती मोबाईल व्हॅनचं उद्घाटन
संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी
आणि
महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आयर्लंडवर ३०४ धावांनी विजय, मालिका तीन - शून्य अशी जिंकली
****
भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईत आज नौदलातल्या आयएनएस सूरत आणि आयएनएस नीलगिरी या दोन लढाऊ जहाजांचं तसंच आयएनएस वागशीर या लढाऊ पाणबुडीचं जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची भूमिका विस्तारवादाची नव्हे तर विकासवादाची असून, सागरी क्षेत्रात गेल्या दहा वर्षात बंदर विकास, सीमावर्ती भागांमध्ये वाढता संपर्क, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम, अशा योजना राबवण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
आज भारत पुरे विश्व और खासकर ग्लोबल साऊथ में एक भरोसे और जिम्मेदार साथी के रूप में पहचाना जा रहा है। भारत विस्तारवाद नही, भारत विकासवाद की भावना से काम करता है। भारत ने हमेशा ओपन, सेक्युअर, एन्क्ल्युसिव्ह और प्रॉस्परस इंडो पॅसिफिक रिजन का समर्थन किया है। हमारा एक समृद्ध इतिहास रहा है। अपने इतिहास से प्रेरणा लेते हुये आज का भारत दुनिया की एक मेजर मेरिटाईन पावर बन रहा है।
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची सुरुवात केली, त्या शिवरायांच्या भूमीवरून नौदलाला सामर्थ्य दिलं जात असल्याचं समाधान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक सैनिकाचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं.
आपलं सरकार नौदलासह पूर्ण सैन्यदलाला आत्मनिर्भर बनवत अधिक मजबूत करण्याला प्राधान्य देत असल्याचं सांगत, यात महाराष्ट्रातल्या नियोजित वाढवण बंदराचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह नौदलातले अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
****
सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. याच दिवशी १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती.
राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्रसेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथल्या राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात आज लष्कर दिनानिमित्त हवाई दलातल्या विमानांच्या प्रतिकृती रेडीओ कंट्रोलद्वारे उडवून चित्तथरारक कवायतींचं प्रात्याक्षिक दाखवण्यात आलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पद मिळालं आहे.
****
निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत, तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत, असे आदेश दिले.
****
केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं, डिजीटल इंडिया आपले सेवा केंद्र, हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजीटल इंडीया सेवा केंद्र बनवण्यात येणार असून, यात बॅंक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्ययावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या सर्व ८७० ग्रामपंचायतीत एक डिजीटल प्रचार रथ फिरणार आहे.
****
संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला आज बीडच्या विशेष न्यायालयानं येत्या बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणामुळे कराडविरुद्धचा खटला बीड इथल्या न्यायालयात वर्ग केल्यानंतर पोलिसांनी आज कराड याला केजहून बीडला आणलं आहे. सुनावणी झाल्यावर कराड याला न्यायालयाबाहेर नेताना त्यांचे समर्थक आणि विरोधक मोठ्या संख्येनं जमा झाले होते, त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी विष्णू चाटे तसंच वाल्मिक कराड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षानं हा निर्णय घेतला.
****
महिला क्रिकेट मध्ये राजकोट इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आयर्लंडचा ३०४ धावांनी पराभव केला. यासोबतच भारतीय महिलांनी तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली. आज झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत ४३५ अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रतिका रावलनं १५४ तर कर्णधार स्मृती मंधानानं १३५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव बत्तीसाव्या षटकांत अवघ्या १३१ धावांत संपुष्टात आला. भारताकडून दिप्ती शर्मानं तीन तर तनुजा कंवरनं दोन बळी घेतले.
****
नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातल्या पदवी, पदव्युत्तर, तसंच विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा येत्या अठरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. राज्यभरातल्या एकशे सत्त्याण्णव केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षांमध्ये सुमारे नव्वद हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यातल्या एम.बी.बी.एस. तृतीय आणि अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षांचं अशा रीतीनं संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा मानस असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांनी सैनिक कल्याणासाठी दानाचं वाण लुटलं आहे. लासूर स्टेशन, वाळूज, गंगापूर आणि पैठण इथल्या बचतगटातल्या महिलांनी सैनिक कल्याण निधीसाठी एकूण दहा हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोपवला. जिल्हाधिकाऱ्यांनी या महिलांच्या या दृष्टीकोनाचं आणि दातृत्वाचं कौतुक केलं आहे.
****
समृद्धी महामार्गावर पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा प्रवासी जखमी झाले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या ��वळ असणाऱ्या धामणगाव इथल्या आष्टानजीक घडली. जखमींना धामणगाव इथल्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे.
****
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्या���े झालेला बदल पाहता आपल्या कामाचा निपटारा लवकर होण्याच्या दृष्टीने तसंच शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असं मत राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
****
0 notes