#मारला
Explore tagged Tumblr posts
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dhanu-j-92 · 3 months ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (का��ी डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होई��. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य त���ूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपोदरात २५ बेसीस पॉईंटची कपात केली असून, रेपोदर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. मुंबईत आज बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर ��ंजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहिर केला. जवळपास पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे. सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरु झाली, या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं.
जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाजही सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरुन, सहा पूर्णांक सात दशांश टक्के, इतका कमी करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर चार पूर्णांक चार दशांश टक्के आणि पुढच्या आर्थिक वर्षात चार पूर्णांक दोन टक्के राहिल, असं मल्होत्रा यांनी सांगितलं.
बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाइटच्या नावात बँक डॉट इन लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एप्रिलपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाइटच्या नावात एफ आय एन अर्थात फिन डॉट इन असा वापर केला जाईल. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर, आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यासाठी असेल, असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे.
****
आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार आदिवासी क्षेत्रात प्रत्येक नागरीकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरार आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी, गेल्या ३० वर्षात देशात माता मृत्यू दर ८३ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचं सांगितलं.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्याला आर्थिक आणि इतर सहकार्य मिळत असल्यानं, यामुळे रुग्णांना वेळेत उपचार देणं शक्य होत असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अ‍ॅलिस वाझ यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
****
उत्तर प्रदेशात प्रयागर���ज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात केंद्रीय सा��स्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातले अनेक कलाकार यावेळी संगीत, नृत्य आदी कला प्रकारांचं सादरीकरण करणार आहेत.
दरम्यान, तीन नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करत आहेत.
****
प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काल त्याच्या कुटुंबीयांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन तेंडुलकर यांनी अमृत उद्यानात फेरफटकाही मारला. त्यांनतर ‘राष्ट्रपती भवन विमर्श श्रृंखला’ या उपक्रमांतर्गत एका संवादात्मक सत्रात, तेंडुलकर यांनी क्रिकेटपटू म्हणून स्वतःच्या प्रवासातील किस्से उपस्थितांना सांगितलं.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं पंतप्रधान या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी ३६ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचं, या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी खंडन केलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. इतर ज्वलंत विषयावरचं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या पुरवल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. खासदार अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे आठ खासदार यावेळी उपस्थित होते.
****
गडचिरोली इथलं लोहखनिज उच्च दर्जाचं असून, त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत, येत्या पाच वर्षात गडचिरोली देशातलं स्टील हब म्हणून उदयास येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात होत असलेल्या, एडवांटेज विदर्भ या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
****
0 notes
krantinewsin · 8 days ago
Text
जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव
तेर प्रतिनिधी :- हरी खोटे, धाराशिव तालुक्यातील तेर येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये दिनांक १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी ५१ स्टॉल उभारले त्यातून ९० हजार रूपयांची उलाढाल झाली विशेष म्हणजे बाल आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी बनवून विक्रीसाठी ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांवर शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी तसेच…
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
आमचा पोपट का मारला ?, नगर जिल्ह्यातील प्रकरण पोहचलं कोर्टात 
आमचा पोपट का मारला ?, नगर जिल्ह्यातील प्रकरण पोहचलं कोर्टात
पाळीव पोपट का मारला म्हणून जाब विचारल्याने तीन जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना नगर जिल्ह्यात घडलेली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने तीन जणांना तीन महिन्याची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड ठोठावला आहे.  नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा इथे किसन मोरे नावाच्या एका व्यक्तीने पाळीव पोपट पाळलेला होता. 6 नोव्हेंबर 2021 रोजी हा पोपट ��ारला गेला त्यावेळी त्यांचा मुलगा सखाहरी आणि…
0 notes
gitaacharaninmarathi · 5 months ago
Text
45. जन्म-मृत्युचे भ्रामक बंध
श्रीकृष्ण म्हणतात, “समबुद्धी असलेला, कर्मांच्या फळाचा त्याग करून जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन, कोणत्याही दुर्गुणांशिवाय परम स्थितीला प्राप्त होतो” (2.51).
बर्याच काळापासून, मानवजातीचा असा विश्वास होता की सूर्य स्थिर पृथ्वीभोवती फिरतो आणि नंतर शोधला की ही पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. सरतेशेवटी, आमची समज अस्तित्त्विक सत्याशी जुळली, याचा अर्थ असा की समस्या आमच्या संवेदनांच्या मर्यादांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे उद्भवलेल्या सत्याच्या चुकीच्या व्याख्यामुळे होती. जन्म-मृत्यूबद्दलच्या आपल्या भ्रमाचेही असेच आहे.
श्रीकृष्ण गीतेचा प्रारंभ ‘देही’ संकल्पनेचे वर्णन करून करतात (जो शरीरात असतो-आत्मा). हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. (2.20). ते पुढे म्हणतात की,ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो (2.22). जेव्हा तो म्हणतो की संतुलित बुद्धिमत्तेने व्यक्ती जन्माच्या बंधनातूनमुक्त होते तेव्हा त्याला हे सांगायचे आहे की ती व्यक्ती देही/आत्म्याच्या अस्तित्वात असलेल्या सत्याशी स्वत:ला जोडून घेत असते. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो या भासातून बाहेर पडणे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सत्याशी स्वत:ला जोडून घेण्यासारखे आहे ते.
आपला कल बहुतांश वेळा बहुसंख्यांकडे असतो, मात्र हे बहुसंख्य (ज्यांचा जन्म-मृत्यूवर विश्वास असतो) आपल्याला देही/आत्म्याच्या वास्तवाबद्दल मार्गदर्शन करू शकत नाही आणि ते आपण केवळ आपल्या संतुलित बुद्धिमत्तेनेच जाणून घेऊ शकतो.
श्रीकृष्ण ने ध्रुवीयतेच्या पलीकडे असलेल्या अवस्थेबद्दलही सांगितले आहे. सहसा, त्याचे वर्णन स्वर्ग असे केले जाते आणि कधीकधी परमपद असे केले जाते जे बाहेर कुठेतरी आहे. हा श्लोक सूचित करतो की हा मार्ग आपल्या आत आहे. कर्मांचा त्याग न करता कर्मफलाचा त्याग करण्याचा हा मार्ग आहे (2.47).
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Moshi : मोशी येथे दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा
एमपीसी न्यूज – गायकवाड वस्ती, मोशी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर (Moshi)पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा मारला. यामध्ये तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 5) करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थ्री अॅसीस स्ट्रक्चर अॅण्ड प्रा लि या कंपनीचे जवळ, खाणीचा रोड, गायकवाड वस्ती, मोशी येथे अर्जुन लिंबा कंजारभट याने गावठी हातभट्टीची दारु…
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
एटीएम मशीन फोडून 24 लाख 54 हजारांची रोकड केली लंपास..
कार मधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मारला जालना शहरातील एटीएम मशीनवर डल्ला.. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून 24 लाख 54 हजारांची रोकड केली लंपास.. चोरटे सीसीटिव्ही कॕमेऱ्यात कैद.. घटनेने शहरात एकच खळबळ, पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे अव्हान.. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना. 24 lakh 54 thousand cash was looted by breaking the…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 1 year ago
Text
करमाड येथील सत्कार समारंभात चोरट्याने साडे चारलाखावर मारला डल्ला
करमाड: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लाडसावंगी येथील सभेस जाण्यासाठी शनिवारी(२) रोजी दुपारी करमाड येथे आगमन झाले. त्याप्रसंगी जमलेल्या जनसागरात फिरून चोरट्यांनी सोने व रोख रकमेसह साडेचार लाख रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. या घटनेची माहिती अशी की जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी करमाड येथे जनसागर लोटला होता. त्यात महिला व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता स्वागतासाठी २१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/cultivation-of-cannabis-in-hapsapur-shivara-10-80-lakh-worth-of-goods-seized-father-lake-in-custody/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
श्रावणात खेकड्यांवर मारला ताव, स्पृहा जोशी झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले...
https://bharatlive.news/?p=137207 श्रावणात खेकड्यांवर मारला ताव, स्पृहा जोशी झाली ट्रोल; नेटकरी ...
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
"राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो"
Tumblr media
मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल, असं वडेट्टीवार म्हणालेत. तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवा��चं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. परिक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा मधल्या माछिल इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश असून, आजपासून येत्या पाच सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. दुसर्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पवार यांचं स्वागत केलं. यानंतर दुचाकी रॅलीला सुरुवा�� झाली असून, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना स्थानबद्ध केलं असून, शरद पवार गटाच्याही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
तत्पूर्वी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्याचं एकविसाव्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावर उद्यापासून दोन दिवस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या आंतरविद्याशाखीय आणि बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी देशभरातून आणि राज्यातून ७५ शोधनिबंधांची नोंदणी झाली असून, त्यांच्या सादरीकरणासाठी नऊ समांतर सत्रं होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती, राज्यनीती, शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धत या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं होणार आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त विशेष टपालतिकिटाचंही प्रकाशन केलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी दरमहा नऊ तारखेला जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येतं.  जिल्ह्यातल्या सर्व गर्भवतींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केलं आहे.
****
राज्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून, या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या कृषि पंप ग्राहकांचं अंदाजे ४६ कोटी रुपयांचं वीज बील माफ करण्यात येणार आहे. हिंगोली मंडळांतर्गत येणाऱ्या हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्याचा यात समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या नऊ सप्टेंबरला विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात हे ��ामकाज सुरू होणार असून, नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचं कामकाज होणार आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्या��ेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 6 months ago
Text
39. पुनरावृत्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे
कर्ण आणि अर्जुन हे दोघेही कुंतीच्याच पोटी जन्मले होते मात्र शेवटी दोघेही एकमेकांविरोधत लढले. कर्णाला शाप मिळाला असल्याने युद्धकौशल्याबद्दलचे त्याचे ज्ञान आणि युद्धांचा अनुभव अर्जुनाविरुद्धच्या महत्वपूर्ण लढतीत उपयोगात आले नाही. तो युद्ध हरला आणि मारला गेला.
ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना लागू होते कारण आपण सगळे कर्णासारखे आहोत, आपण आपल्या आयुष्यातून अनेक गोष्टी शिकतो, ज्ञान आणि अनुभव प्राप्त करतो. मात्र, महत्वाच्या क्षणी पूर्ण जाणिवेने वागण्याऐवजी आपल्या अंत:प्रेरणेने विचार आणि कृती करतो आणि याचे कारण आपल्या जाणिवेची पातळी आवश्यकतेपेक्षा कमी असते. कृष्णाला याची पूर्ण जाणिव आहे आणि तो गीतेमध्ये विविध पद्धतींनी वस्तुस्थिती आणि सत्य समजावून सांगतो जेणेकरून जाणिव अधिक खोलवर होऊन आवश्यक ती पातळी गाठेल.
श्रीमदभगवद्गीता म्हणते आपल्याला एक अंतरात्मा आहे आणि बाह्य शरीर आहे आणि हे नदीचे दोन काठ आहेत. सामान्यत: आपली ओळख ही आपले शरीर, आपल्या भावना, विचार आणि आपल्या भवतालचे जग यातून होत असते. श्रीकृष्ण आपल्याला सत्याची जाणीव करून घेण्यास आणि आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वास ओळखण्यास सांगतात, जे शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे, सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त आहे. आत्मज्ञानी, म्हणजेच आतील व्यक्तिमत्व, दुसर्‍या तीरावर पाहोचते आणि असा निष्कर्ष काढते की एकच किनारा आहे कारण नदीच्या पात्रात दोन्ही किनारे एक होतात. हे चित्रण दोरी-साप साधर्म्यातील मायावी सापासारखे आहे.
जागरुकतेच्या साधनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: ध्रुव ओलांडणे (द्वंद्वातीत); गुणातीत, समत्व, कर्ता होण्यापेक्षा साक्षी होणे आणि कृतींच्या परिणामांपासून मुक्तता.
शंभर पुस्तके वाचण्याऐवजी गीता अनेक वेळा विशेषत: अध्याय 2 वाचणे चांगले आहे कारण गीतेचे प्रत्येक वाचन आपल्यामध्ये एक वेगळी चव आणि चांगली भावना आणते. स्वत: ची जाणीव आणते आणि आनंद आणते.
0 notes