क्राईम सिरियल पाहून हत्येचा कट रचला, औषधांचा ओव्हरडोस देऊन पती आणि सासऱ्याला संपवले; महिलेने असे का केले?
क्राईम सिरियल पाहून हत्येचा कट रचला, औषधांचा ओव्हरडोस देऊन पती आणि सासऱ्याला संपवले; महिलेने असे का केले?
क्राईम सिरियल पाहून हत्येचा कट रचला, औषधांचा ओव्हरडोस देऊन पती आणि सासऱ्याला संपवले; महिलेने असे का केले?
कानपूर : अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या हव्यासातून पत्नीने पतीसह सासऱ्याला औषधांचा ओव्हरडोस देऊन संपवल्याची धक्कदायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह चौघांना अटक केली आहे. सपना असे आरोपी महिलेचे तर राजू गुप्ता असे तिच्या प्रियकराचे नाव…
View On WordPress
0 notes
अनैतिक संबंधातून महिलेने पतीला संपवलं , खून केल्यावर गेले गोव्यात
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण कर्नाटकातील बेळगाव इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधातून एका विवाहित महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात नेऊन फेकून दिला आणि स्वतः पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. सदर प्रकरणात पोलिसांनी विवाहित महिलेसह चार जणांना अटक…
View On WordPress
0 notes
Chakan: माल विक्रीच्या बहाण्याने महिलेची सात लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – HRCR plate coil ह�� माल विकण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल सात लाख (Chakan)रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक 14 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 2014 या कालावधीत चाकण शिक्रापूर येथे घडली आहे.
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी फ्रान्सिस डिसिजन सेल्स सर्विस एक्झिक्युटिव्ह गुलालवाडी ,मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
0 notes
Maharashtra Live News Today: वाचा मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
Solapur Crime News: तिघा मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तिघा मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेला तिच्या दोन मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. तिघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून इज्जतीला घाबरून त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन…
View On WordPress
0 notes
महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली
रक्तक्षय, कुपोषण तसेच पोषक तत्त्वांच्या अभावामुळे होणाऱ्या आजार व व्याधी यावर मात करण्यासाठी विविध भाजीपाल्यांनी समृद्ध पोषण बाग अतिशय महत्त्वाची आहे. महिलांना पोषण बाग लावण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दरवर्षी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी च्या अंतर्गत 200 महिलांना विविध भाजीपाल्यांच्या बियाणे आणि रोपे प्रात्यक्षिकासाठी दिली जातात. यावर्षी देखील शिंपळा, दौलतापूर लघुळ तसेच इतर गावांमध्ये पोषण बागेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याच पोषण बागेचा आज दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी दौलतापूर या गावांमध्ये शेती दिन घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली. #womenshealth#healthyliving#healthiswealth#soybeans#पोषण#बाग#महिला#कुपोषणमुक्त#रक्तक्षय#भाजीपाला
1 note
·
View note
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 17 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण-केंद्रीय पाहणी पथकाचं निरीक्षण
आणि
मराठा आरक्षणासाठी मुदतवाढ देण्याचं राज्य सरकारचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण केलं जात असून, ही शहरं देशाच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपुरातून या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मेघना गुजर या कांदिवली इथल्या लाभार्थी महिलेने आपल्याला मिळालेले विविध योजनांचे लाभ आणि त्यातून साधलेला विकास याबाबत माहिती दिली..
छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. शेत फवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं. महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो दीदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक गावात जाणार असल्याचं कराड यांनी सांगितलं...
बाईट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत
मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. छत्रपती संभाजीनगर इथं राहणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थी महिलेने आपल्या भावना या शब्दांत कथन केल्या...
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात चिखली इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं. दानवे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, आवास योजना, पीएम जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना आदी योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभागी होत, विविध योजनांची माहिती घेतली. मौजे खरबी इथंही सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात हंगरगा नळ इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात आले. तसंच उपस्थितांना विकसित भारत संकल्पनेसाठी कटिबद्ध होण्याची शपथही देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात आज रविवारी अहमदपूर तालुक्यात नरवटवाडी, येलदरवाडी, औसा तालुक्या वडजी, हसलगण, भादा, नांदुर्गा, चाकूर तालुक्यात कडमुळी, जडाळा, देवणी तालुक्यात विळेगाव, नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात वांजरवाडा, लातूर तालुक्यात बिंदगीहाळ तर मुरुड तालुक्यात अकोला, रामेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या सदस्यांना सर्व पत्र लिहून ही माहिती दिली. ही समिती संसद परिसराच्या सुरक्षेसंबंधी सर्व बाबींची पाहणी करेल, आणि अशा घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तयार करेल, असं बिर्ला यांनी म्हटलं आहे. काही राजकीय पक्ष या घटनेचा खासदार निलंबनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र या घटनांचा परस्पर संबंध नसल्याचं, लोकसभाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
****
कुवेतचे राजे अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जबर अल-सबाह यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. केंद्र सरकारनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. या दुष्काळ पाहणी पथकाची, आढावा बैठक काल पुण्यात विधानभवनात झाली. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत मिळावी अशी अपेक्षा राज्यातल्या अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली आहे.
****
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले असून, राज्यातल्या साखर उद्योगाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. इथेनॉल निर्मितीसोबत कारखान्यांना किमान १७ लाख टन साखरेचं बंधन असणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २४ डिसेंबरचा आग्रह न धरता काही मुदत देण्याचं आवाहन राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. राज्यशासनाच्या एका शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे पाटील यांची भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते. आरक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, समाजाचं हित पाहणं आवश्यक असल्याचं महाजन यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘या वेळेला कमी पडता कामा नये आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टीकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालं आणि मग ते फेटाळलं गेलं, नाकारलं गेलं असं होता कामा नये. ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. आम्ही त्यांना विनंती केली की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायम स्वरूपी टीकणारं आरक्षण द्यायचंय. आणि असं असताना अल्टीमेटल वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हीत बघायचंय.’’
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व समाजबांधवांना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
****
0 notes
Accid attack on a woman by another woman..
जुन्या भांडणाचा राग धरुन एका महिलेने दुसरीच्या अंगावर अॅसिड फेकले ! https://www.shirurvarta.in/?p=11540
1 note
·
View note
कुंभेफळ शिवारातील लाडगाव उड्डाणपुला जवळ महिलेसह कामगाराने सोबतच रेल्वेखाली उडी घेत संपवले जीवन
करमाड : कंपनीत सोबत काम करणाऱ्या विवाहित पुरुषासह महिलेने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. कुंभेफळ शिवारातील लाडगाव उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी सहा वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली.विलास विष्णू गोजे (३५, रा. कुंभेफळ, त व सीमा दिलीप मिसाळ (२९, रा. गवळीपुरा, ह.मु. कुंभेफळ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. जालना रेल्वेलाइनवर लाडगाव उड्डाणपुलाजवळ कुंभेफळ शिवारात मंगळवारी (दि. ५) सकाळी…
View On WordPress
0 notes
महिलेची सोशल मिडीयावर बदनामी,एकावर गुन्हा
एकमत ऑनलाईन
बार्शी : वाढदिवसादिवशी मोबाइलवर काढलेले फॅमिली फोटो क्रॉप करून त्यातील महिलेचा फोटो स्टेटसवर ठेवून माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे, डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैयाज खाजा शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित महिला जानेवारी २०२३ मध्ये ओळखीच्या व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी गेल्यानंतर एकाने मोबाइलवर फॅमिली फोटो काढला होता. त्यानंतर १६ एप्रिल २०२३ रोजी त्यातील फोटो क्रॉप करून त्यात फक्त पीडित महिलेचा व त्याचा स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवून त्याखाली बदनामीकारक मजकूर लिहून तो व्हायरल केला.
तसेच पीडित महिलेच्या मुलीसोबत त्याने स्वतःचा फोटो ठेवून ‘मेरी बेटी’ असा मजकूर लिहून मजकूर लिहला. हा प्रकार पाहिल्यानंतर पीडित महिलेने पतीला सांगितले. यानंतर पतीने माझ्या पत्नीची अशी बदनामी का करतोस, असे विचारताच त्याने तिचे व माझे लॉजवरील फोटो माझ्याकडे आहेत. हा ट्रेलर असून तिची बदनामी कशी करतो ते बघ, तुझी मुलगी नसून ती माझीच आहे. मुलीचा डी.एन.ए. चेक करून बघ, असा व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठविल्याने या महिलेने पोलिसात तक्रार दिली.बदनामीकारक मैसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याने पीडित महिलेने तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करत आहेत.
Read the full article
0 notes
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
View On WordPress
0 notes
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी...
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी…
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी…
मुंबईतील मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुणी…
View On WordPress
0 notes
प्रेयसीचे लव्ह बाइट पडलं महागात , आधी हॉस्पिटल अन मग..
आपल्या पार्टनरसोबत वेगवेगळ्या पद्धतीने रोमांस करण्याचे प्रकार सध्या इंटरनेट आल्यापासून जास्त प्रमाणात सुरू झालेले असून प्रेमात काही जोडप्यांना प्रेमाने चावणे देखील आवडते मात्र अशाच एका घटनेत एका महिलेने तिच्या पार्टनरला लव बाईट दिला आणि तिच्या या बाईटमध्ये या व्यक्तीचा जीव गेलेला आहे.
मेक्सिको सिटी येथील हे प्रकरण असून काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. गर्लफ्रेंड प्रेयसीने तिच्या प्रियकराला लाडात…
View On WordPress
0 notes
Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करत अज्ञात व्यक्तींनी महिलेला 26 लाखांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यात अमली पदार्थ असल्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच महिलेच्या खात्यातील रक्कम देखील काढून घेत एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.
याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने…
0 notes
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
View On WordPress
0 notes
80 वर्षीय वृद्ध महिलेने उपोषणावर बसून प्रशासनाची उडविली भंबेरी
धाराशिव : प्रशासन किती मुर्दाड असते. याचा प्रत्यय आज धाराशिव येथे आला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेची साधी मागणी पूर्ण केली नाही. शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे. महिलेचा आसा आरोप आहे की, शिवबांधावर एमएसईबी आणि संबंधितांनी संगनमत करून राजकीय दबाव निर्माण केला.…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 16 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
विकसित भारत संकल्प यात्रेतून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण-पंतप्रधानांचं प्रतिपादन.
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद;नागरिकांकडून यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद.
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; राज्यातल्या साखर उद्योगाकडून केंद्राच्या निर्णयाचं स्वागत.
आणि
महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण केलं जात असून, ही शहरं देशाच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपुरातून या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मेघना गुजर या कांदिवली इथल्या लाभार्थी महिलेने आपल्याला मिळालेले विविध योजनांचे लाभ आणि त्यातून साधलेला विकास याबाबत माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो दीदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. शेत फवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं. मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यांनी आपले अनुभव या प्रसंगी उपस्थितांच्या समोर कथन केले.
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात चिखली इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले. दानवे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना आदी योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डच वाटप करण्यात आलं
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद ग्रामस्थांनी ऐकला. विविध योजना आपल्यासाठी कशा निर्माण केल्या आहेत याबाबतची त्यांना माहिती मिळाली. मौजे खरबी इथं नागरिकांशी संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. लाभार्थ्यांनी आपला अनुभव कथन केला.
लातूर जिल्ह्यात उद्या रविवारी अहमदपूर तालुक्यात नरवटवाडी, येलदरवाडी, औसा तालुक्यात वडजी, हसलगण, भादा, नांदुर्गा, चाकूर तालुक्यात कडमुळी, जडाळा, देवणी तालुक्यात विळेगाव, नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात वांजरवाडा, लातूर तालुक्यात बिंदगीहाळ तर मुरुड तालुक्यात अकोला, रामेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
विकसित भारत संकल्प भारत यात्रा आज धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेडे गावात पोहोचली. गावातील महिलांनी जनजागृती वाहनाचं पूजन करुन यात्रेचं स्वागत केलं. यात्रेनिमित्त गावात आधार कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी शिबीरं घेण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यात्रा मार्गक्रमण करत आहे, आज सकाळी ही यात्रा कुडाळ तालुक्यातील माणगाव इथं पोहचली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे या यात्रेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आणि लाभार्थीना मार्गदर्शन केलं.
****
विजय दिवस आज साजरा केला जात आहे. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे हा दिवस साजरा केला. पाकिस्तानच्या सैन्यानं आजच्याच दिवशी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली. भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करणाऱ्या विजय दिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त कर्तव्यभावनेने भारताची सेवा करणाऱ्या सर्व शूरवीरांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांच्या साहस आणि समर्पणाचा देशाला अभिमान असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले असून, राज्यातल्या साखर उद्योगाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीच्या बंदीच्या निर्णयाचा साखर उद्योगाला मोठा फटका बसणार असल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या साखर संघांनी आवाज उठवला होता. अखेरीस सर्व बाजू लक्षात घेतल्यानंतर इथेनॉल निर्मितीवर निर्बंधांबाबतचा निर्णय केंद्रानं मागे घेतला आहे. उद्या म्हणजे रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात किमान १७ लाख टन साखरेपासून इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने इंग्लंदसमोर ४२८ धावांचं आव्हान ठेवलं, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १३६ धावा करु शकला होता. दुसरा डाव ६ गडी बाद १८६ धावसंख्येवर भारताने घोषित केल्यावर आज इंग्लंडने खेळायला सुरुवात केली. मात्र १३१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. दीप्ती शर्मानं पहिल्या डावात अवघ्या ७ धावा देत ५ खेळाडू बाद केले तर दुसऱ्या डावातही ४ बळी घेतले.
****
राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. मुं���ई इथं राज्य कौशल्य विभागातर्फे स्थापित प्री इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन लोढा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात २० महाविद्यालयं आणि संस्थांसोबत कौशल्य विभागानं अशी सेंटर्स स्थापन केली आहेत. राज्याला स्टार्टअप मध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही लोढा यांनी यावेळी दिली.
****
नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ०३ ते ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव प्रोझोन मॉल मधल्या आयनॉक्स थिएटर, प्रोझोन इथं होणार आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताचा सहभाग असणार आहे.
****
हिंगोली इथं परवा सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दालनात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल, यासाठी समस्याग्रस्त तसंच पीडित महिलांनी आपले विहित नमुन्यातले अर्ज हिंगोलीच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असं आवाहन महिला बालविकास अधिकारी माया सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था तसंच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
****
0 notes