Gujarat Election Result: भाजपने केले तीन विक्रम; भाजप अध्यक्ष म्हणतात – ‘जनतेचा विश्वास फक्त भाजपवर’
Gujarat Election Result: भाजपने केले तीन विक्रम; भाजप अध्यक्ष म्हणतात – ‘जनतेचा विश्वास फक्त भाजपवर’
Gujarat Election Result: भाजपने केले तीन विक्रम; भाजप अध्यक्ष म्हणतात – ‘जनतेचा विश्वास फक्त भाजपवर’
गुजरात निवडणूक निकाल: गुजरात विधानसभा निवडणुक मतदानाची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीवरून भाजपचा 156, काॅंग्रेस 17, आणि आपला 5 ठिकाणी विजय होताना दिसून येत आहे. भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील म्हणतात की, यावेळचा विधानसभा निवडणुकीतील विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. यामध्ये…
View On WordPress
0 notes
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१२ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळ - सेबीनं हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हितसंबंध संघर्षाशी संबंधित संमस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी अंतर्गत यंत्रणा असून, त्यामध्ये प्रकटीकरण आणि समायोजनासाठी तरतूद समाविष्ट आहे, असं सेबीनं म्हटलं आहे. धारण केलेले वैयक्तिक समभाग आणि त्यांच्या हस्तांतरणाबाबत आवश्यक असलेले संबंधित खुलासे अध्यक्षांनी वेळोवेळी केले आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे. गुंतवणुकदारांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन सेबीनं केलं आहे.
दरम्यान, हिंडेनबर्ग अहवालाच्या संदर्भात भाजपने विरोधकांव��� टीका केली आहे. गेल्या काही वर्षांपासून संसदेचं अधिवेशन सुरु होण्याच्या सुमारास हा परदेशी अहवाल प्रसिद्ध होतो, असं भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खासगी कंपनीशी, असा संभ्रम निर्माण करुन विरोधकांनी देशात आर्थिक अराजकता निर्माण केल्याचा आरोप, त्यांनी केला आहे.
****
भटके-विमुक्त जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालू असं आश्वासन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. सोलापूर इथं काल भटके-विमुक्त संघटनेच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी मतं मागण्यासाठी येतील, तेव्हा त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवा, असं त्यांनी सांगितलं.
****
ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाक्के यांचा ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मेळावा काल सांगली इथं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येत नसून, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं भुजबळ यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल पुण्यात सभा घेतली. आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही आणि हटायचे नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
0 notes
उद्धव ठाकरेंचा भाजपने विश्वासघात केला शंकराचार्य..
0 notes
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा विरोध डावलून संधी
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा ...
भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी…
View On WordPress
0 notes
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ठरला? प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्रमक उमेदवार उभा करणार
सोलापूर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी २ याद्या जाहीर केल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी करत कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदें विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार भाजपकडून सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/the-ideal-level-of-corruption-should-be-reduced-by-anyone/
0 notes
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note
·
View note
हिमाचलमध्ये मतदारांनी कायम राखली 40 वर्षांची पंरपरा, तर गुजरातमध्ये भाजपने रचला इतिहास
हिमाचलमध्ये मतदारांनी कायम राखली 40 वर्षांची पंरपरा, तर गुजरातमध्ये भाजपने रचला इतिहास
हिमाचलमध्ये मतदारांनी कायम राखली 40 वर्षांची पंरपरा, तर गुजरातमध्ये भाजपने रचला इतिहास
Election Result 2022 : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जादू कायम आहे. कारण येथे भाजप सातव्यांदा सत्तेत आली आहे. भाजपने सातव्यांदा सत्ता काबिज करत इतिहास रचला आहे.तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी पंरपरा कायम ठेवली आहे. येथील मतदारांनी काँग्रेसच्या (Congress) बाजुने मतदान केलं…
View On WordPress
0 notes
राहुल म्हणाले- महिला आरक्षणातून जनगणना-परिसीमनची अट काढून टाका:आजच लागू करा; सरकार OBC जनगणनेवरून लक्ष हटवत आहे
राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘महिला आरक्षण हे चांगले पाऊल आहे, मात्र त्यावर दोन अटी घालण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी जनगणना आणि सीमांकन करावे लागेल. हे काम करायला बरीच वर्षे लागतील. महिला आरक्षणाची आजपासूनच अंमलबजावणी होऊ शकते, हे सत्य आहे. भाजपने या दोन्ही अटी काढून टाकाव्यात.राहुल पुढे म्हणाले- ही काही गुंतागुंतीची बाब नाही, पण सरकारला हे करायचे…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला दोन जागा
पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर
आणि
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण अफ्रिकेवर दहा खेळाडू राखून विजय
****
देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तर एका जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघात काल रात्री उशीरा दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजण्यास प्रारंभ झाला होता. याठिकाणचा अधिकृत निकाल अद्याप हाती आला नाही. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले. कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आहेत.
****
अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित असून, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात काल विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोन दशकांहून अधिक जुन्या मानहानी प्रकरणी, पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल असलेले विनय कुमार सक्सेना, हे २००१ मध्ये एका गैर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असतांना, त्यांनी पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साकेत न्यायालायात पाठवण्यात आलं होतं. या न्यायालयानं २५ मे रोजी पाटकर यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवलं होतं.
****
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काल याबाबतचं पत्रक जारी केलं.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
मुंबईत वसंतराव नाईक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानद्वारे वसंतराव नाईक पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कृषी पत्रकार श्रीकांत कुवळेकर यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार, धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या राहोड इथल्या कन्हैय्यालाल बहुउद्देशीय संस्थेला यंदाचा सामाईक पुरस्कार, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला उल्लेखनीय कृषी योगदान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती, तेव्हा वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या, त्यातून मोठी हरित क्रांतीदेखील घडून आली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आता आपण जवळपास ११ लाख हेक्टर सरकारी जमीन आणि १० लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकूण २१ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवडीचं उद्दीष्ट ठेवल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात, १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम काल पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. वसंतराव नाईक यांनी केलेलं काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
धाराशिव इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विकास गोडसे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. विविध पुरस्कातप्राप्त शेतकर्यांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने काल लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने काल पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
****
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजवणीबाबत काल परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. शहरातल्या नवीन मोंढा पोलिस ठाण्यात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि कायदे तज्ञ रमण दोडिया यांनी नागरीकांना कायद्यांची माहिती दिली.
****
आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरला निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मिडसावंगी इथं पार पडला. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर इथून निघालेली श्री संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली. गेवराई इथं भाविकांनी भर पावसात पालखीचं स्वागत केलं.
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला काल लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
महिला क्रिकेटमध्ये, चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या काल अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सर्वोत्तम खेळाडू ठरली. या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
बीड इथं काल बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून, नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळवण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सूचना देतं. नागरिकांनी पावसाळ्यात जल पर्यटन करतांना सतर्क राहावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
0 notes
अजित पवार शिंदेना वश करून घेतलं भाजपने..
0 notes
भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे ते ? ‘ असे म्हणत भाजपने घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःची दोस्तशाही संपवावी. लोकसभा निवडणुक मोदींविरोधात नसून लोकशाही संपवणाऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हटलेले आहे.
हिंगोली इथे रामलीला मैदानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ मी गद्दारांविषयी बोलण्यासाठी इथे आलेलो…
View On WordPress
0 notes
कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं...
ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी…
View On WordPress
0 notes