#प्रश्नावर
Explore tagged Tumblr posts
news-34 · 7 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहे���. पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता. बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरातल्या तीन हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होत आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळानं २७१ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून, या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याने निगराणी ठेवली जाणार आहे. तसंच, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही, असं केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांनी काल लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपरस्थित केला होता. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला, त्याला कृष्णा पाणी लवादानं मंजुरी दिली. या प्रश्नावर कोणत्याही राज्याकडून धरणाची उंची वाढवायला विरोध असल्याचा प्रस्ताव दाखल झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या धरणाचं पाणी शिरोळ तालुक्यापर्यंत पोहोचणार असून, पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे जलमय होऊ शकतात, असा दावा जलतज्ञ���ंनी यापूर्वी केला आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थ्यांना १० कोटी एलपीजी जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत दिली. एलपीजी जोडणीसाठी अजून २९ लाख अर्ज प्रलंबित असून, ते मंजूर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही असं त्यांनी सांगितलं.
रेल्वे वाहतुकीसाठी विजेची वाढती गरज लक्षात घेऊन त्याच्या पुरवठ्यासाठी आता अणुऊर्जेच्या पर्यायाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि वीज मंत्रालयाशी संपर्क साधला असल्याचं त्यांनी सांगितलं.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने धाराशिव इथं काल मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाची ध्वजारोहणाने सुरुवात झाली. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यावेळी उपस्थित होते. १९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कार्यालयाजवळच्या रोहित्राला काल आग लागली होती. नागरिकांची सतर्कता तसंच पोलीस, आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली.
0 notes
sangare-and-associates · 2 months ago
Text
Tumblr media
धर्मवीर न्यायज्योत कक्षाच्या अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विशाखा समितीचे सदस्य ॲड. प्रियंका संगारे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य विशाखा समितीचे अध्यक्ष सुजाता सौनिक यांची भेट घेऊन प्रश्नावर चर्चा केली.
English translation:
President of Dharmaveer Nyajyot chamber and member of Maharashtra state Visakha committee Adv. Priyanka Sangare met chief secretary of Maharashtra government and president of Maharashtra state Visakha committee Sujata Saunik at winter session Nagpur and discussed the issue.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४३
जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ डुलकी लागल्याने अनंतचं चित्त बऱ्यापैकी थाऱ्यावर आलं. त्याचा तणावमुक्त चेहरा बघून शुभदालाही हुरूप आला आणि त्याला 'गप्पांच्या ��ैठकीतील' मित्रांना भेटायला उशीर होऊं नये यासाठी ती रोजच्यापेक्षां लौकरच चहाच्या तयारीला लागली. चहा तयार झाल्यावर कप घेऊन ती डायनिंग टेबलापाशी आली तेव्हां अनंत मोबाईलवरून कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करीत होता. "भोसलेंना काॅल करताहांत कां?" शुभदाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवीत अनंत म्हणाला, "हो;-- पण ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याने फोन लागत नाहींये!" "आधी चहा घ्या आणि मग पुन: प्रयत्न करा! नाहींतर चहा गार होईल!" "त्यांचा आतां चालुं असलेला काॅल संपला की बहुधा मनोहरपंतच फोन करतील" म्हणत अनंतने चहाचा कप उचलला. "भोसलेंशी बोलणं होईल तेव्हां त्यांना मनोरमा कुठे आहे ते विचाराल कां? मला वाटतंय् की ती नक्की भाऊसाहेबांच्या घरी असणार! तसं असेल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन म्हणते!" त्यावर अनंतने तिला 'आतां तूं तिथे येऊन काय करणार आहेस?' असं शब्दांत विचारलं नाहीं तरी तशा अर्थाचं प्रश्नचिन्ह त्याच्या नजरेत उमटलेलं शुभदाला जाणवलं. ती खुलासा करीत म्हणाली, "तुम्हांला कदाचित् आठवत नसेल, पण माझी चांगली ओळख आहे सप्रेवहिनींशी" "ती कशी काय?" अनंतच्या थंड स्वरांतला अविश्वास लपण्याजोगा नव्हता. "अहो, असं काय करताय्? या सप्रेवहिनी म्हणजे आपल्या बबलीच्या ८ वीच्या क्लासटीचर सुहासिनी सप्रे!" शुभदाने सांगितलेली ओळख ऐकून बुचकळ्यांत पडलेल्या अनंतने आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न केला. 'बबलीची ८वीची क्लासटीचर म्हणजे जवळजवळ २० वर्षांपूर्वीची गोष्ट?' असं स्वत:ला बजावीत तो विचार करूं लागला;-- आणि अचानक वीज चमकून सगळा काळोखा आसमंत उजळावा तशी एक आठवण त्याच्या मनांत जागी झाली! "म्हणजे जयूला आपण लाडानं घरी बबली म्हणायचो त्याचं नावीन्य वाटून कौतुक करणाऱ्या क्लासटीचर कां?"
शुभदाने हंसून मान डोलावली तशी चकीत होत आपल्या दोन्हीं हातांनी मस्तक गच्च दाबून धरीत अनंत उद्गारला, "मला ऐनवेळी त्यांचं नांव आठवलं नसलं तरी त्यांची हंसतमुख, सडपातळ मूर्ति माझ्या पक्की लक्षांत आहे! एवढी उत्साही, हंसतमुख बाई;--आणि आज आत्महत्येचा प्रयत्न?" "तुम्ही आधी शांत व्हा!" प्रचंड उत्तेजित झाल्याने बावचळलेल्या अनंतला समजावीत शुभदा म्हणाली, "तुम्हांला आठवताहेत त्या २० वर्षांपूर्वींच्या सप्रेवहिनी! पण ��ज त्यांची मानसिक अवस्था कशी आहे ते आपल्याला थोडंच माहीत आहे?" शुभदाच्या त्या शब्दांनी भानावर येऊन स्वतःला सावरीत अनंत म्हणाला, "तुझं म्हणणं अगदी योग्य आहे! २० वर्षांच्या काळांत एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडूं शकते! प्रत्यक्षांत काय घडलं असेल ते समजण्यासाठी आपल्याला आतां मनोहरपंतांशीच बोलायला हवं!" शुभदा कीचनमधे चहाची भांडी आणि कप धूत असतांनाच भोसलेंचा फोन आला. बोलणं संपल्यावर कीचनमधे येऊन अनंत म्हणाला, " शुभदा, तुझा अंदाज खरा ठरला! मनोरमाबाई भाऊसाहेबांच्या घरीच आहेत दुपारपासून! मनोहरपंतही तिथेच होते. पण थोड्या वेळापूर्वी जवळच्या पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराची विचारपूस करायला फोन आला होता म्हणून आतां ते सगळं निस्तरायला पोलीस चौकीत जात आहेत !" शुभदा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच तो पुढे म्हणाला, " तूं पटकन तयार हो, म्हणजे तुला भाऊसाहेबांच्या घरीं सोडून मी मित्रांना भेंटायला जाईन!" "नको;-- मी रिक्षाने जाईन! तुम्ही तुमच्या मित्रांना लौकर भेटा म्हणजे तुम्ही सगळेजण लौकर येऊं शकाल भाऊसाहेबांकडे."
भाऊसाहेबांच्या निवासस्थानीं शुभदा पोहोचली तेव्हां दारांत उभी राहून मनोरमा जणूं तिचीच वाट बघत होती. तिला आंत घेऊन मनोरमाने दरवाजा हलक्या हाताने लावून घेतला. शुभदाचा प्रश्नार्थक चेहरा लक्षांत घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, "सुहासिनीला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी जरूर ती औषधं देऊन झोपवून ठेवलेलं आहे! गाढ झोपली आहे बिचारी;- पण तरीही आपण शक्यतों कमीत कमी आवाज करावा असा माझा प्रयत्न आहे!" "भाऊसाहेब बरे आहेत ना?" "हो;-- हळुहळू सावरताहेत!आतां ह्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर घडल्या प्रकारासंबंधी जबाब नोंदवायला गेले आहेत!" "समजलं!" अशा अर्थी मान हलवीत शुभदाने हातांतली पिशवी मनोरमाच्या स्वाधीन केली. निघण्यापूर्वी फोन करून तिने मनोरमाला 'कांही आणायचं आहे कां?' असं विचारल्यावर मनोरमाने मागवलेली कांही घरगुती औषधे आणि किरकोळ चीजवस्तु त्यांत होत्या. "बरं झालं येण्यापूर्वी तुला फोन करून नक्की पत्ता विचारला! सप्रेमॅडम या फ्लॅटमधे रहायला आल्याचं मला माहीतच नव्हतं! आधीचा बंगला कधी आणि कशासाठी विकला?" "१० वर्षांपूर्वी थोरल्या गिरीशच्या लग्नाच्या वेळी जुना झालेला बंगला विकून हा, सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असा, ४ बेडरूमवाला नवीन फ्लॅट मोठ्या हौसेनं घेतला भाऊसाहेबांनी!" "सगळं छान चाललेलं असतांना मॅडमनी अचानक हा आततायीपणा कां केला?" "दिसतं तसं नसतं ग बाई! बरेच दिवस घरगुती धुसफूस चालुं असल्याचं ह्यांच्या कानांवर होतं! पण त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! बरीच मोठी कर्मकहाणी आहे;- बोलूं सावकाशीने!"
१५ जून २०२३
0 notes
dakshadev · 5 months ago
Text
Tumblr media Tumblr media
आज मतदारसंघातील सर्व चर्मकार समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.उपस्थित राहुन भेटून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या विविध प्रश्नावर चर्चा केली.
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Chinchwad : अटक करण्‍याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक
एमपीसी न्यूज – फ्राॅड केसमध्‍ये अटक करण्‍याची भिती दाखवत (Chinchwad)एका ज्‍येष्‍ठ नागरिकाची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे 4 ते 9 सप्टेंबर 2024 रोजी घडली. याप्रकरणी 60 वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिकाने सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम…
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
*कासरा च्या मुख्य भूमिकेत जालन्याचा जनमेजय तेलंग!*निलम चित्रपट गृहात  प्रिमियर शो*
Jalna’s Janamejay Telang starring Kasara!Premier Show at Neelam Cinema* जालना ( प्रतिनिधी) :  शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित “कासरा” या चित्रपटात जालना शहरातील उभारता अभिनेता जनमेजय भागीरथ तेलंग हा मुख्य भूमिकेत दिसणार असून खास जालनेकरांसाठी रविवारी ( ता. 26) दुपारी 12.00 वा.रेल्वे स्थानक मार्गावरील निलम चित्रपट गृहात  विशेष प्रिमियर शो चे आयोजन करण्यात आले आहे. जूना जालना भागातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
आरक्षणाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया.. #ajitpawar #manojjarange...
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन
https://bharatlive.news/?p=188703 धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर ...
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
निवडणूक नसताना जनहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी कसे वागले ? , नगर चौफेर एक्सक्लुसिव्ह
निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे मतांसाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आणि उमेदवार इतर वेळी आपल्या मतदारांसोबत आणि नागरिकांसोबत कशा स्वरूपाचे वर्तन करतात याच्यासाठी नगर चौफेर न्यूज प्रतिनिधीकडून परिसरातील लोकप्रतिनिधींना संपर्क कर���न एक रिपोर्ट बनवण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन लोकप्रतिनिधींकडे उपस्थित केलेला विषय लोकहिताचा असून या प्रश्नावर लोकप्रतिनिधी यांचे वर्तन आपल्याला कितपत योग्य वाटते याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान-महाराष्ट्राला विविध सहा श्रेणीत पुरस्कार • विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू-सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्‌गार • संसदेचं काम���ाज कालही बाधित-रेल्वे सुधारणा विधेयक लोकसभेत संमत • परभणी शहर तसंच जिल्ह्यात जमावबंदी आदेश-इंटरनेटसह सर्व दूरसंचार यंत्रणाही बंद आणि • लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन
देशाला विकसित राष्ट्र घडवण्यासाठी गावं तसंच गावकऱ्यांचा विकास आणि सशक्तीकरणाचं महत्त्च अधिक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ काल नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध श्रेणींमध्ये एकूण ४५ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीला दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गट, नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायत, भंडारा जिल्ह्यातली बेला ग्रामपंचायत, तसंच पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी-यशदा ला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
विकासाच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी ते काल बोलत होते. ते म्हणाले… ‘‘आप सबसे बात करने के बाद मेरा कॉन्फिडन्स और बढ गया है की देश विकसित भारत होने के सही ट्रॅक पर है। आप जिस तत्परता से, जिस कमिटमेंट के साथ भारत की समस्याओं के इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स ढुंढ रहे है, वो अद्‌भूत है। साथीयों, आज देश की जो एक्सप्रेशन्स है, उसमें हमे हर चुनौती के लिये आऊट ऑफ द बॉक्स सोचना ही होगा।’’ महाराष्ट्राल्या मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरसह देशभरात ५१ केंद्रांवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८६ हजाराहून अधिक संघ सहभागी झाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कालही दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार बाधित झालं. राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. सभापती जगदीप धनखड यांच्यावर दाखल अविश्वास प्रस्ताव बद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. काँग्रेसनं सभापतीपदाचा अनादर केला असून त्यासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी रिजीजू यांनी केली. ** कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - एआयवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. यासंदर्भात अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव यांनी, छत्रपती संभाजीनगर इथं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबचं काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे सेमी कंडक्टर उद्योगासह शेती उत्पादनाला देखील चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल रेल्वे सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं संमत झालं. रेल्वे नियम १९८९ मध्ये सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकात आहे. रेल्वेच्या कायदेशीर चौकटीचं सुलभीकरण करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक मांडल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये एक लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच तिहेरीकरणाचं काम सुरु आहे. त्यानंतर रेल्वे थांबे वाढवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यात रेल्वेची कामं योग्य रितीने सुरु असल्याचं सुळे यांनी नमूद केलं.
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा, चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. माधव गाडगीळ यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे.
सातारा इथले तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या��ह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
परभणी इथं घडलेल्या अप्रिय घटनेचे पडसाद पाहता, शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही घोषणा करत, नागरिकांना शांतता राखण्याचं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं आवाहन केलं.. ‘‘परभणी जिल्ह्यामध्ये आपण कलम १४४, नवीन कलम १६३ प्रमाणे लागू केलेले आहेत. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं.’’ दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई असून, इंटरनेटसह सर्व दूरसंचार सेवा, झेरॉक्स केंद्र, तसंच ध्वनीक्षेपकं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, परवा घडलेल्या संबंधित घटनेनंतर जिल्ह्यात काल आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ तसंच रास्ता रोको करण्यात आल्याने, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस उपमहासंचालक शहाजी उमाप यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाची दखल घेत, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.. ‘‘मी सर्व आंदोलन करताना यानिमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलेही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधीत ठेवावी.’’
बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. याविषयावर तातडीने ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. १८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाचं आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर उद्धाटन होईल. या सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत, यामध्ये धावणे, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, स्केटिंग, लॉन टेनिस, आट्या-पाट्या, रग्बी, सायकलिंग आदी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज��न्नाथ लकडे यांनी केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांतली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं तीन शून्यने जिंकली आहे. काल ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या अखेरच्या सामन्यात यजमान संघानं भारतीय संघाचा ८३ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ���रतांना, स्मृती मंधानाच्या शतकी खेळीनंतरही भारतीय संघ २१५ धावांवर सर्वबाद झाला.
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखर गडावर आजपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला प्रारंभ होत आहे. आज पहिली पालखी निघणार असून, १४ डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. १७ डिसेंबरला काकड आरतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यानिमित्त एसटीच्या माहूर आगारातून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी आरोग्य पथकं तसंच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठवला होता, या नुकसानीपोटी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ८१२ कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
जालना इथं मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळातल्या १४ मालमत्ताधारकांना काल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन जप्तीच्या नोटीस दिल्या. कराचा भरणा न केल्यास पुढील आठवड्यात सर्व मालमत्ता सील करण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातल्या मालमत्ता धारकांनी ३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कर न भरल्यास दोन टक्के प्रति महिना व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत कराचा भरणा करावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं आहे.
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
--II ● विवेक विचार ● II--
केवळ शारीरिक साहाय्य करून लोकांच्या दुःखांचा नायनाट करणे अशक्य आहे. जोपर्यंत माणसांची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे सारे शारीरिक अभाव उद्भवणारच, सारे कष्ट होणारच. दुनियेतील या दुःखांच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा म्हणजे अखिल मानवजातीला पवित्र बनवणे, सक्षम, सा़क्षर, आत्मनिर्भर, अध्यात्मिक बलसंपन्न, सामर्थ्यशाली बनवणे, स्वतःच्या पायावर उभे करणे तरच जगातून दुःख नाहीसे होईल. देशातील प्रत्येक घर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४२
शुक्रवारी सकाळी अनंतची मित्रांबरोबर गप्पा आणि खाण्याची साप्ताहिक बैठक असल्याने शुभदा तशीही निवांत असे. आज जरा अधिकच निवांत होती कारण ४ दिवसांपूर्वी 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'मधे घडलेल्या गैरप्रकारांबाबत विस्��ृत कारवाई मनासारखी झाल्याच्या समाधानांत मनोहर भोसले आज सर्व मित्रांना विशेष पार्टी देणार होते! त्यांनी स्वत: फोन करून, "वहिनी, मी तुमच्यासाठी खास भलंमोठं पार्सल पाठवणार आहे;- तरी आज चूलीला पूर्ण विश्रांती देऊन मस्त आराम करायचा!" असा निरोप दिल्याने शुभदाला आज स्वयंपाकाचाही तगादा नव्हता! त्यामुळे बर्‍याच दिवसांनी मिळालेल्या फुरसतीचा सदुपयोग करुन एक नवीन डिझाईनचा स्वेटर विणायला सुरुवात करायचा घाट तिने घातला होता. संग्रही असलेल्या लोकरींचे गुंडे तपासून कुठले ३ रंग निवडावेत याचा विचार ती करीत असतांनाच डोअरबेल वाजली! अनंतला यायला आज नेहमींपेक्षा अधिकच उशीर होणार असल्याने 'कोण आलं असावं?' असा विचार करीत तिने दार उघडलं तर बाहेर अनंत उभा! "धांदलीमधे लॅचची चावी घरीच राहिली कां?" "तूं चुकून आंतून कडी लावली होतीस कां?" त्याला पाहून चकीत झालेल्या शुभदाच्या प्रश्नावर हातांतला च��व्यांचा जुडगा पुढे करीत अनंतने विचारलं, "मी नेहमीप्रमाणेच लॅच उघडायचा प्रयत्न केला, पण उघडलंच नाही!" "जाऊं द्या! माझीच कांहीतरी गडबड झाली असेल तुम्ही गेल्यावर दार ओढून घेतांना!" नेहमी हमखास लॅच उघडून घरांत येणाऱ्या अनंतला आज लॅच उघडतां आलं नाही म्हणजे तो नक्कीच कसल्यातरी गहन विचारांत मग्न असणार हे ओळखून शुभदाने विषय वाढवला नाहीं. आपला लोकरींचा पसारा झटपट आवरून तिने अनंतला सोफ्यावर बसायला जागा करून दिली आणि थंड पाण्याचा ग्लास त्याच्या हातांत देत सहज स्वरांत विचारलं, "पण तुम्ही आज एवढे लौकर कसे परत आलांत? भोसलेंची खास पार्टी होती ना?"
"हो, आज खास पार्टीचं आयोजन मनोहर भोसलेंनी केलं होतं! त्यांनी स्वत: प्रत्येकाला फोन करून आग्रह केल्याने कधी नव्हे ते आम्ही सर्व १६ मेंबर्स आज अगदी वेळेवर हजर होतो. मनोहरपंतांनी स्वत: ठरवलेल्या मेनूला दाद मिळाली. तसंच कांही जणांनी बदलही सुचवले . त्यानुसार खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आणि चहा-काॅफीचा आस्वाद घेत गप्पाही सुरु झाल्या! पण तेवढ्यांत एक फोन आला आणि एकच गोंधळ उडाला!" "म्हणजे?" "आमचे एक मेंबर भाऊसाहेब सप्रे रहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा फोन आला की सप्रेवहिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून भाऊसाहेबांनी तांतडीने घरीं परत यावं! ते ऐकून भाऊसाहेब एवढे ��ाबरले की त्यांनाच आधी डाॅक्टरांकडे न्यावं लागणार असं वाटायला लागलं! पण सुदैवाने त्यांच्या सोसायटीतच राहणारे यशवंत माने आमच्या ग्रुपमधे आहेत. त्यांनी भाऊसाहेबांना धीर देऊन सांवरलं आणि आपल्या कारमधे त्यांना बसवून तडक घरी घेऊन गेले!" "पण मग तुम्ही नाहीं गेलांत?" "शुभदा, आमची बर्‍याच वर्षांची ओळख असली आणि ग्रुपच्या निमित्ताने हल्ली नियमित भेटतही असलो तरी माझे भाऊसाहेबांशी वैयक्तिक संबंध नाहींत! त्यामुळे अशा नाजूक आणि अवघड परिस्थितीत माझ्यासारख्या, नाहीं म्हटलं तरी परक्या माणसाने त्यांच्या घरी जाणं मला योग्य वाटलं नाहीं! माझ्यासारखे इतरही ५-६ जण आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र विचार करून ठरवलं की आपण आत्तां लगेच त्यांच्या घरी जायचं नाहीं!" यावर काय बोलावं हे न सुचून शुभदाही गप्प राहिली. पांच-सात मिनिटे अशा अवघडलेल्या शांततेत गेल्यावर अनंत विमनस्कपणे म्हणाला, "मात्र आम्ही सगळे संध्याकाळी एकत्र भेटून ठरवणार आहोत की कधी जायचं भाऊसाहेबांना भेटायला! तोपर्यंत एकुण परिस्थितीचाही अंदाज येईल!" "आतां भाऊसाहेबांसोबत कोण आहेत याची कांही कल्पना? म्हणजे त्यांना कांही मदत लागली तर या दृष्टीने मी विचारतेय!" "त्या सगळ्या गडबड गोंधळामधे यशवंत मानेंसोबत किती, कोण गेले आठवत नाहीं" अनंत विचार करीत उत्तरला,"पण मानेंसोबत गेले नसले तरी मनोहरपंत तिथे नक्की गेले असतील! त्यांची भाऊसाहेबांशी व्यक्तीशः मैत्री आहे. शिवाय एकुणच त्यांचं सोशल नेटवर्किंग मोठं आहे;- ज्याचा अशा वेळी हमखास उपयोग होतो! मीही संध्याकाळी त्यांनाच फोन करून परिस्थिती जाणून घेणार आहे!!"
बोलत असतांना अनंतच्या चेहर्‍यावरील तणाव व आवाजातील थकवा जाणवून शुभदा म्हणाली, "हो, संध्याकाळी तुम्ही ठरल्यानुसार तुमच्या मित्रांशी सल्ला-मसलत जरूर करा, पण तोपर्यंत मात्र विश्रांती घ्यायची! उन्हातून आला आहांत म्हणून थंडगार पन्हं घेणार आहांत की तुम्हांला तुमचा तिन्हीत्रिकाळ आवडता चहाच हवा?" "मला काय हवं ते ठाऊक असूनही कशाला नसतंं नाटक ग!" म्हणतांना अनंतच्या चेहर्‍यावर प्रथमच हलकीशी स्मितरेषा उमटली. 'बरं;-- चहा आणते!' म्हणत शुभदा कीचनमधे जाण्यासाठी वळली तेव्हां तिला थांबवीत अनंत म्हणाला, "तुझी जी कुणी मैत्रीण आहे डबा देणारी, तिच्याकडून सरळ जेवण मागव! आतां कांही करीत बसूं नकोस! आज सकाळी नाश्ता न केल्याने आतां या परिस्थितीतही आपल्या दोघांना लौकरच सणसणून भूक लागणार आहे!"
८ जून ���०२३
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
कृषीमंत्र्यांनी मागितली शेतक-यांची जाहीर माफी
Tumblr media
सिल्लोड : शेतमालाला भाव नाही, खतं खरेदी करताना जात टाकावी लागणं अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या राज्यातला शेतकरी सामोरा जातो आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतक-यांन मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे. सत्तार म्हणाले, नाफेडची सध्या ४० केंद्र सुरू आहेत. कांद्याला सध्या नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. रासायनिक खतं खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये शेतक-यांना जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही. हा मुद्दा काल अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. त्यावरुन चर्चाही झाली. आपण याबद्दल केंद्र सरकारला कळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याच मुद्यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, खत खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतक-यांची माफी मागताना सत्तार म्हणाले, ‘शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतक-यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल.' Read the full article
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम तोडगा काढणार - अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज –  चऱ्होली परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावठाणाबरोबरच येथे  अनेक गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या( Charholi) असून,  साधारण 20 हजार नागरिक या परिसरात वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे.  पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने…
0 notes