#पदकांची
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होण���र आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येत��त. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
Text
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! १११ पदकांची कमाई
https://bharatlive.news/?p=180822 आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! १११ पदकांची ...
0 notes
Text
Asian Games 2023 : 19 व्या आशिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं आली, पण त्यात एकही सुवर्णपदक नव्हतं. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पाहायला मिळाली. माञ, आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशिया गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झाल्यामुळे हि 'सुवर्ण, बातमी भारतीयांसाठी अभिमानाची आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. रोइंगमध्येही भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे आशिया गेम्समधील एकुण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.
0 notes
Text
राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक
मुंबई, दि. २२ : आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत सर्वसाधारण सुवर्ण पदक पटकावले असून या स्पर्धेत विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय विद्यापीठ संघातर्फे (एआययु) १६ आणि १७ मार्च २०२३ रोजी गणपत विद्यापीठ,…
View On WordPress
0 notes
Text
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि 01 : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रो��ॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यात��ल खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित…
View On WordPress
0 notes
Text
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि 01 : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित…
View On WordPress
0 notes
Text
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: बॉक्सर नितू अंतिम फेरीत, TT Duos QF मध्ये प्रवेश | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: बॉक्सर नितू अंतिम फेरीत, TT Duos QF मध्ये प्रवेश | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022: बॉक्सर नितू कृतीत आहे.© Instagram कॉमनवेल्थ गेम्स 2022, दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: भारताच्या नितू घंगासने बॉक्सिंगमधील किमान वजन गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अमित पंघल आणि निखत जरीनसह अन्य पाच भारतीय उपांत्य फेरीत सहभागी होतील. कुस्तीपटूंनी 8 व्या दिवशी तीन सुवर्ण पदकांसह प्रसिद्धी मिळवल्यानंतर, भारतीय दल कॅमला 9व्या दिवशी आणखी पदकांची अपेक्षा आहे. कुस्तीमध्ये, विनेश फोगट आणि रवी…
View On WordPress
#कुस्ती#कॉमनवेल्थ गेम्स 2022#क्रिकेट#थेट ब्लॉग एनडीटीव्ही स्पोर्ट्स#भारतीय महिला#विनेश फोगट#स्मृती मानधना#हरमनप्रीत कौर भुल्लर#हॉकी
0 notes
Text
ज्युदोमध्ये डबल धमाका
एक रौप्य, एक कांस्य पदक पटकावले बर्मिंगहम : भारताने आज ज्युदोमध्ये डबल धमाका केल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या सुशिलादेवी लिकमाबाने ४८ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर भारताच्या विजयकुमार यादव याने ६० किलो वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली. भारताला आज ज्युदोमध्ये एक तरी सुवर्णपदक मिळावे, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण भारताला आज ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी त्यांनी दोन पदकांची कमाई केली आहे. सुशिलादेवीने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशिलादेवीने रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशिलादेवीने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावले आहे. यावेळी सुशिलादेवीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा सुशिलादेवी दमदार कामगिरी करेल, असे वाटले होते. त्यामुळेच तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. सुशिलादेवीचा अंतिम फेरीतील सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेलाबरोबर होणार आहे. सुशिलादेवी आणि मिचेला यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पण या सामन्यात सुशिलादेवीवर मिचेला भारी पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सुशिलादेवीच्या हातून सुवर्णपदक निसटले आणि तिला रौप्यपदक मिळवता आले. मिचेलाने या सामन्यात अनुभव पणाला लावला आणि सुशिलादेवीवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. सामन्याच्या सुरुवातीलाच विजय कुमार हा आक्रमक खेळ करत असल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या पाच सेकंदांमध्येच त्याने जोरदार चाल खेळली आणि तिथेच आता विजय कुमार पदक पटकावणार हे जळपास निश्चित झाले होते. एकामागोमाग एक भारतासाठी ज्युदोमध्ये हे दुसरे पदक आले. विजय कुमारने कांस्यपदकाच्या सामन्याच्या सुरुवातीच्याच मिनिटाला पेट्रोस क्रिस्टोडॉलिड्सची झटपट कामगिरी करून भारताला पदक मिळवून दिले. विजय कुमारने बेल वाजवण्याच्या अवघ्या ५ सेकंदांनंतर वाजा-अरी जिंकली आणि पुरुषांच्या ६० किलो ज्युडो स्पर्धेत इप्पोनला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी दावेदारी स्पष्ट केली. Read the full article
0 notes
Text
थाई बॉक्सिंग मध्ये सिंधदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी.
थाई बॉक्सिंग मध्ये सिंधदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी.
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी मधील मुलांनी दमदार कामगिरी केली आहे. यात या मुलांनी दोन सुवर्ण पदक एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे.१८ वी महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा लातूर येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग च्या खेळाडूंनी…
View On WordPress
0 notes
Text
तिरंदाजी विश्वचषक: भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक जिंकले, भारतीय पुरुष स्वत:पेक्षा खालच्या क्रमांकाच्या संघाकडून पराभूत
तिरंदाजी विश्वचषक: भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक जिंकले, भारतीय पुरुष स्वत:पेक्षा खालच्या क्रमांकाच्या संघाकडून पराभूत
��ारत तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये: भारतीय महिला तिरंदाजी संघाने गुरुवारी, 19 मे 2022 रोजी दक्ष��ण कोरियाच्या ग्वांगझोऊ येथे विश्वचषक स्टेज दोनच्या रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यासह त्याच्या या विश्वचषकातील पदकांची संख्या तीन झाली आहे. रिद्धी फोरे, कोमोलिका बारी आणि अंकिता भगत यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने एकतर्फी लढतीत चायनीज तैपेईचा 6-2 (56-52, 54-51, 54-55, 55-54) असा पराभव…
View On WordPress
#komalika वळण#अंकिता भकत#अंकिता भक्त#अँडीयन तिरंदाज अंकिता भगत#इतर क्रीडा बातम्या#इतर क्रीडा बातम्या हिंदीमध्ये#इतर क्रीडा मथळे#एंडियन तिरंदाज अंकिता भगत#कोमलिका बारी#जयंत तालुकदार#जयंता तालुकदार#तरुणदीप राय#ताज्या इतर क्रीडा बातम्या#तिरंदाजी विश्वचषक#तिरंदाजी विश्वचषक २०२२#तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2#धनुर्विद्या#नीरज चौहान#भारत तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये#भारतीय तिरंदाज#भारतीय तिरंदाज कोमोलिका बारी#भारतीय महिला तिरंदाज#भारतीय महिला रिकर्व्ह संघ#महिला धनुर्धारी रिधी#रिद्धी चार#रिधी फोर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महा��गरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.
0 notes
Text
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा टोकियो : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला जपानमधील टोकियो येथे उद्यापासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक पाच पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली नाही. भारतासाठी हा धक्काच आहे. आता भारताला पदकासाठी लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय व किदांबी श्रीकांत या पुरुष एकेरीतील खेळाडूंसह…
View On WordPress
#2022#bwf#championships#world#अपेक्षा#आजची अपडेट#आताची मोठी बातमी#गुन्हेगारी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#ठळक बातम्या#ताज्या बातम्या#दैनिक मराठी#न्यूज अपडेट मराठी#न्यूज फ्लॅश#पदकांची#बातम्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी भाषिक बातम्या#मराठी समाचार#महत्वाची बातमी#महाराष्ट्र बातमी#मोठ्या बातम्या#राजकीय बातम्या#राज्यस्तरीय बातम्या#लक्ष्य#वायरल बातम्या#शासकीय बातम्या#श्रीकांतकडून
0 notes
Text
‘Police Medal’ : महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा ; अहमदनगरला दोन पदके
#‘Police Medal’ : महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा ; अहमदनगरला दोन पदके #Maharashtra
‘Police Medal’ : नवी दिल्ली, (दि २५ जानेवारी २०२२) : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ८४ पोलीस पदक
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ८४ पोलीस पदक
नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 1082 पोलीस पदक जाहीर…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ…
View On WordPress
0 notes