टी व्ही बंद पडला
आमचा टी व्ही बंद पडलाबातम्याच हो दिसत नाही ।पिक्चर मालिका सारेच बंदम्हणून कोणीच हसत नाही ।
सगळ्यांचा डोक्यावर हातविचारही येतात काही बाही ।सारेच बसलेत चिडी चूपकोणीच कोणाशी बोलत नाही ।
मन झाले उदास कितीभूकही आताशा लागत नाही ।वाट बघतोय डायनिंग टेबलतासन् तास कोणी जेवत नाही ।
मेकॅनिक म्हणतो विकून टाकानवीन शिवाय जमत नाही ।खिसा थोडा खालीच आहेमहागाईत तोही भरत नाही ।
लाडकी बहिण लाडका भाऊत्यांच्याशी पण…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/inter-district-burglary-gangs-rampage-silver-ornaments-weighing-60-tolas-along-with-gold-ornaments-seized/
0 notes
'...या लढाईत कोणीच नायक नाही, सारे पीडितच'
https://bharatlive.news/?p=174895
'...या लढाईत कोणीच नायक नाही, सारे पीडितच'
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes
Exam Fee : राज्यसभेतही चर्चा; पदभरती परीक्षेच्या शुल्कापोटी उमेदवारांची लुट
Exam Fee : राज्यसभेतही चर्चा; पदभरती परीक्षेच्या शुल्कापोटी उमेदवारांची लुट...
पुणे : केंद्र तसेच राज्य लोकसेवा आयोग पदभरतीसाठी परीक्षा शुल्क माफक आकारतात. खासगी संस्था मात्र हजारो रुपयांचे शुल्क घेतात. याशिवाय ही भरती वादात सापडण्याची शक्यता जास्त असते. असे असूनही खासगी संस्थांच्या भरमसाट शुल्काबद्दल कोणीच का बोलत नाही, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी विधानसभेत यावर आवाज उठविला होता. आता त्याचे पडसाद राज्यभरातही उमटत…
View On WordPress
0 notes
पावसाने माजवला हाहाकार
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अनेक जुना सरकारी इमारतींमध्ये पाणी गळत असल्याने सर्वत्र धावपळ झाली आहे. पाणी काही थांबेना आणि त्रास काही बंद होईना अशी अवस्था झाली आहे.
शहरात तुडूंब पाऊस पडत असल्याने शहरातील सकल भागांमध्ये गुडघ्या ऐवढे पाणी साचले आहे. कोणीच घराच्या बाहेर जाऊ नये अशी अवस्था झाली आहे. या अवस्थेमुळे कोणतेही कामकाज शक्य झाले नाही. वेळोवेळी रस्त्यांची उंची वाढत गेल्यामुळे तळमजल्याची दुकाने रस्तयाच्या खाली गेली आहेत. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे, घरांमध्ये पाणी शिरले आहे. पण ज्यांची घरे कच्ची आहेत, ज्यांची घरे मातीची आहेत. त्यांना मात्र अवघड झाले आहे. एकंदरीत शहरात अनेक जागी शॉर्टसर्कीटमुळे आगी लागल्या आहेत. शहरातील गुरूकृपा मार्केटसमोर असलेल्या खांबाला आग लागली आहे. अद्यापही बऱ्याच सर्व बाबी माहित झाल्या नाहीत. परंतू सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला करत आहे.
Read the full article
0 notes
महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पळवले : आ.नाना पटोले | नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पळवले : आ.नाना पटोले | नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
अर्जुनी-मोरगाव : भाजपमध्ये अंधार आहे, तो पुढे येत नाही. इंग्रजांनी जे राज्य केलं तसे काम भाजप करत आहे. देशात कोणीच सुखी नाही. बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. नोकरीचे गाजर दाखवले जाते, पण नोकरी मिळत नाही. ओबीसींचे प्रश्न जैसे थे आहेत. जातीनिहाय जनगणना झालीच नाही. महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पाठवले जातात, असे आरोप महाराष्ट्र प्रदेश…
View On WordPress
0 notes
मैत्री सुख
ग्रामीण भागातील राहणीमानाचा गोडवा काही वेगळाच असतो आणि ते सुख आत्मसात करायला भेटलं स्वतःला भाग्यवान समजतो पाचवी सहावी ची गोष्ट आहे आम्ही बालमित्र दिवसभर सोबत असायचो सकाळची शाळा त्यानंतर दिवसभर खेळणे असा दिनक्रम असायचा आमचे मित्र म्हणजे सर्व नमुने कोणी अभ्यासात हुशार तर कोणी भांडणात हुशार कोणी खेळात हुशार तर कोणी मस्ती करण्यात हुशार अशी आमची खेळीमेडीची सर्कस बाल वयातील मित्र जीवाला जीव देणारे होते हे मात्र नक्कीच आणि ते आताही आहेत कोणी मित्रांमध्ये गरीब होतं तर कोणी श्रीमंत कोणी नोकरी वाल्याची मुलं तर कोणी शिक्षकाची यामध्ये सर्वात वेगळा मित्र होता तो श्रीमंत घरचा आणि मारवाडी मुलगा तो नेहमी पहायचा आपल्या मित्रांकडे कोणतीही वस्तू घ्यायला पैसे नसतात आणी आपल्या मित्रा ची हौस पुर्ण होत नाही म्हणून यावर आपण काय करू शकतो म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली घरातून पैशांची पुटली घेऊन आला त्यावेळी आमची आमचे शिक्षक यांचे कडे शिकवणी असायची त्यादिवशी शिकवणी सुरू होण्याअगोदर तो मारवाडी मित्र आम्हाला सांगू लागला माझ्याकडे पैसे आहेत ते आपण सर्व मिळून वाटून घ्या आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व त्या पैशातून तुम्ही खरेदी करा म्हणजे आपले सर्व काम होईल पुस्तक, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल,सिनेमा जे वाटेल ते खरेदी करा आमचे मित्रांनी सांगितल्यावर आम्ही त्याला म्हटले की तू एवढे पैसे कुठून आणले घरून चोरून तर आणले नाहीस ना हे पैसे तर तो म्हणाला माझे बचत केलेले आहेत परंतु आम्हाला ती गोष्ट खोटी वाटली आणि सर्व मित्र मिळून ते पैसे घेण्यास आम्ही सर्व मित्रांनी नकार दिला पावसाळ्याचा तो वेळ होता गांजर गवत मोठ्या प्रमाणात असायचं आमच्या मित्राने आम्हाला म्हटलं तुम्ही जर हे पैसे घेत नसाल तर मी हे पैसे फेकून देईल तुम्ही हे पैसे मुकाट्याने घ्या परंतु आम्ही त्याला नकार दिला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे केले पैशाचं चुंबड त्याने खोललं 50 पैसे 1चे चे कलदार होते त्याने सर्व पैसे गांजर गवतामध्ये फेकले आम्हाला विश्वास सुद्धा बसला नाही तो असे करेल परंतु घनदाट असलेल्या त्या गांजर गवतामध्ये त्याने पैसे फेकल्या बरोबर आम्ही सर्व मित्र ते शोधण्यासाठी तुटून पडलो, कारण आम्हला माहित होते ते पैसे त्यानी आमच्या साठी आणले होते आणि ते चोरीचे तर नसतील ना ही शंका घेणे ही चुकीचे होते म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून ते गांजर गवतातील पैसे शोधून काढले ज्यांना जेवढे मिळाले तेवढे त्याचे, ही गोष्ट आमच्या सरांच्या कडे पोहचली सरांचा स्वभाव कडक होता काय झाले कोणीच सांगण्यास तयार नाही, परंतु आमच्या मित्राने झालेला प्रकार सांगितला मारवाडी मित्राच्या घरी चौकशी झाली की चोरी वगैरे काहीही केली नव्हती परंतु माझ्या सर्व मित्रांना सर्व सुख सुविधा भेटाव्या म्हणून त्याने स्वतःला भेटलेल्या खर्चाच्या पैशातून मित्रां चे सुख शोधले होते हाच प्रामाणिक उद्देश त्याचा ���ोता अशा मैत्रीला सलाम.
-गोपाल मुकुंदे
1 note
·
View note
गोष्टी सतत बदलत राहणार
गोष्टी सतत बदलत राहणार
आज दिवस छान होता पण उद्या कदाचित नसेल,आज जेवढी मजा केली, ती आज पुरतीच असेल..
आज खूप आनंद मिळाला पण उद्या कदाचित दुःख मिळेल,क्षणा क्षणाचा महत्व, कधीतरी आपल्याला कळेल..
आज ती व्यक्ती अशी दिसते पण उद्या कदाचित वेगळी दिसेल,हा वेगळेपण अपलयलाच, थक्क करून सोडेल..
आज अनेकांची साथ असेल पण उद्या कदाचित कोणीच नसेल,हा एकटेपणा आपल्याला, पाउलो-पाऊली नडेल..
आज उजेड आहे पण उद्या कदाचित काळोख राहील,मनासारखं…
View On WordPress
0 notes
अघटीत घडले
बसेना विश्वास कुणाचाअघटीत सारे घडले ।विचारा विचारात मगमहत्वाचे काम अडले ।सांगेना कोणीच काहीकोडे मलाही पडले ।दिवस रात्र बघत असतोव्यसन मोबाईलचे जडले ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाकीत.
काँग्रेसचे २२ आमदार फुटण्यासंदर्भातील वक्तव्य मागे घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी.
कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशानं राज्य शासन काम करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना.
शालेय पोषण आहार योजनेचं राज्यातही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं नामकरण.
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर.
****
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मोठमोठ्या घोषणा करत आहेत. यावरून राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रा��ाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं मनिषा कायंदे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, सत्ताधारी गटानं मात्र मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्��स्के यांनी आपले कार्यकर्ते टीकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचं काम सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून केलं जात असल्याचं सांगितलं. एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचं आढावा घेण्याचं काम सुरू आहे. जनतेत काम करणारी मंडळी कोणीच शिल्लक राहिलेली नसल्यामुळे शिवेसना आता द्विधा मनस्थितीत असल्याचं ते म्हणाले.
****
काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आणि ते भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं आहे. माजी खासदार खैरे यांनी न्यायालयाच्या निर्णयानं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवण्यात आहे आहेत, असा दावा केला होता.
या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून आपण शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले.
****
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी, अवघं ३१ पूर्णांक ७४ शतांश टक्के एवढं मतदान झालं आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत.
****
राज्य शासन कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९सावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज अधिक गतीनं आणि पारदर्शकपणे व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
आमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये विषय येतात त्यावेळेस, मग नवीन न्यायालय असू द्या, त्याच्यासाठी लागणारी सामग्री, नवीन नवीन पदं असू द्या, क्षणाचाही विलंब न लावता आमच्या उच्च न्यायालयाकडून आलेल्या सगळ्या सूचना असतात, त्याचं पालन तातडीनं सरकार करत असतं. शेवटी न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना सरकारची आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात हा विश्वास बाळगणारे श्री लळीत सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहतील असा देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिरातून कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असुन त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी होईल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज शिर्डी इथं राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार प्रत्यक्ष काम करतांना भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले पवार डॉक्टरच्या सल्ल्यामुळे या शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करु शकले नाहीत. सुरूवातीला काही वेळ बोलून त्यांचं उर्वरित भाषण पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
****
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारणार असल्याचं राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये कामगार विभागाच्या बैठकीत ते आज बोलत होते. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसंच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदं, प्रलंबित प्रकरणं डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कामगार नोंदणी आता फक्त १ रुपयांमध्ये होणार असून ई-श्रम कार्डची नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करावं तसंच औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टी��ं कारखान्यांचे निरीक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करावं आणि कामगारांच्या वैद्यकिय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
शालेय पोषण आहार योजनेचं नामकरण केंद्र सरकारप्रमाणेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू आहे. केंद्र सरकारनं या योजनेचं नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असं करुन २०२१-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारनही या योजनेच्या नावात बदल केला आहे. देशातील जवळपास ११ लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सिडनी इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ बाद १४१ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडनं १९ षटकं आणि चार चेंडुत सहा बाद १४४ धावा करत विजय संपादन केला. या विजयासोबत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाद झाला आहे.
उद्या भारत आणि झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड तसंच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामने होणार आहेत.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम ५८ टक्के पूर्ण झालं असून पुढील वर्षाखेरपर्यंत ते पूर्णत्वास जाईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्मारकासाठी सर्व परवानग्या काढल्या असून यासाठी झाडांची कत्तल करणार नसल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण यावेळी एका चित्रफितीद्वारे करण्यात आलं.
****
उस्मानाबाद शहरात आज भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील आदीं उपस्थित होते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला जात असल्याचं नानासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं. या यात्रेची शहरात पाच किलोमीटर पदयात्रा झाल्यानंतर मदिना चौकात सांगता झाली.
****
जालना शहरात आज भ्रष्टाचार न���र्मूलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीनं दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या प्रशिक्षणार्थी सैनिकांसह, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकानांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरातील २० ते २५ दुकाने जळून खाक झाली.
****
0 notes
शिवसेनेतून अनेकजण बाहेर गेले, पण इतका निर्लज्जपणा कोणीच दाखवला नाही: आदित्य ठाकरे
शिवसेनेतून अनेकजण बाहेर गेले, पण इतका निर्लज्जपणा कोणीच दाखवला नाही: आदित्य ठाकरे
शिवसेनेतून अनेकजण बाहेर गेले, पण इतका निर्लज्जपणा कोणीच दाखवला नाही: आदित्य ठाकरे
Maharashtra Politics | शिंदे गटाने दसर मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतला होता. मात्र, आता शिंदे गटाने परवानगीचा अर्ज दाखल केल्यानंतर पालिका काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल. दादरच्या…
View On WordPress
0 notes
Marathi Word of the Day
26th December 2020
विसरणे
[visarṇe], transitive verb
to forget
“मी अंतराळात गेल्यावर तू मला विसरशील का?” “तू अंतराळात गेल्यावर तुला कोणीच विसरणार नाही.”
“mī aṅtarāḷāt gelyāvar tū malā visarśīl kā?” “tū aṅtarāḷāt gelyāvar tulā koṇīč visarṇār nāhī.”
“When I go to space, will you forget me?” “When you go to space, no one will forget you.”
Origin: Old Marathi विसरणे [visaraṇe], from Prakrit विस्सरइ [vissarai], from Sanskrit विस्मरति [vismarati] (to forget).
The Sanskrit word is derived from वि- [vi-] (anti-, against, going away from) + स्मृ [smṛ] (remember).
10 notes
·
View notes
पटलं तर...लाईक नाय केलं तरी चालल पण शेअर करा विकृत निर्लज्ज पैशे वाल्यानो , भष्टाचार करून पैसा कमावता अन वरून अशा पोस्ट टाकता . खालील इमेज ची पोस्ट बनविणारे , टिंगल - टवाळी करण्यासाठी ती शेअर करणारे आणि त्याच्यावर विनोदी प्रतिक्रिया देनाऱ्यानो. तुम्ही स्वतःला फार मोठे समजता... तुम्ही कोणीच नाहीत रे ....तुम्ही फक्त विकृत आहात विकृत तुमच्या पेक्षा जनावरं लै बरे ( शिव्या देण्याचे संस्कार माझ्यावर आई- बापाने केले नाहीत.नाहीतर फुल्या मारू मारू तुम्हाला शिव्या तर दिल्याचं असत्या पण पायताण काढून हाणला असता. )पण तुम्हाला लाजा वाटू द्या. तिकडे माणसं मेलीत , उपाशी मारताहेत , उध्वस्त झालीत ,अन तुम्हाला विनोद सुचत आहेत. थू तुमच्या जिंदगीवर !!! लक्षात ठेवा , एक दिवस तुम्हाला फेडावीच लागतील तुमची कर्माची पापं , अरे माज करणाऱ्या भल्या भाल्यांची वाट लागली , तुम्ही कुठले किडे रे ...इतकाच माज असेल ना तर कोरोना काळात लोकांना लुटून जो पैसा कमावलाय ना पापाने , या पूर ग्रस्तांना मदत करून ती पापे फेडण्याची संधी वाया घालू नका. नायतर तुमची पण एक दिवस वाट लागल्या शिवाय राहणार नाय .
1 note
·
View note
अफेअरमध्ये कोणीच का नाही, सुपर-4मध्ये टक्कर देत टीम इंडियाचा दबदबा
अफेअरमध्ये कोणीच का नाही, सुपर-4मध्ये टक्कर देत टीम इंडियाचा दबदबा
टीम इंडियाने आशिया चषक विजेतेपदावरचा कब्जा कायम ठेवण्याच्या दिशेने दुसरे पाऊल टाकले आहे. भारतीय संघाने स्पर्धेच्या गट टप्प्यातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला.
टीम इंडियाने हाँगकाँगचा पराभव केला
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
आशिया कप 2022 च्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने हाँगकाँगला हरवून सुपर-4 मध्ये आपला प्रवेश पक्का केला आहे. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा…
View On WordPress
0 notes
Asa Asata ka Prem? - A story by Aaradhana Kulkarni
Asa Asata ka Prem? - A story by Aaradhana Kulkarni असं असतं का प्रेम? रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते.श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या.पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते.फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची 'गर्लफ्रेंड' सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते. 'इमेज' आणि प्रेम दोन्ही जपण्यासाठी तो पैसे देत गेला.आतापर्यंत मैत्रिणीला त्याने ५५००० रु.दिले आहेत.परत मात्र एकही रुपया आलेला नाही.आता त्याचा प्रेमावरचा विश्वास उडू लागला आहे. हे सगळं सांगून त्याने ,'आता मी 'काय करु? ' असे विचारले.यावर गुरुरुपी निवेदकाने खरंच खूप चांगला सल्ला दिला. तो म्हणाला की स्वतः मदत करणे व स्वतःचा वापर करु देणे यात फरक आहे. तुझा वापर होत आहे, त्यामुळे आता मदत करणे थांबव व त्यानंतर तिचे प्रेम टिकते का बघ. मग एक गाणे वाजले. पुढची समस्या अशी होती की एका मुलीचा 'बॉयफ्रेंड' नुसतेच लग्नाचे वचन देत झुलवत ठेवत़ आहे. तर आता तिने काय करावे?
त्यावर नकार देऊन त्याला सोडून दे व सरळ मोकळी हो असा तिला सल्ला मिळाला. मग आणखी एक गाणे वाजले. पुढची समस्या तर आणखी गंभीर होती. 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप' मध्ये असणारी एक मुलगी विचारत होती की दूर राहणाऱ्या त्या मुलाच्या प्रेमावर किती 'ट्रस्ट' करावा ? प्रेमाची साक्ष स्वतःच्या मनाला पटावी लागते. तिने तिच्या प्रेमावर विश्वास ठेवावा की नाही हे दुसरा कसं सांगणार? या विचाराने त्याचा सल्ला न ऐकता मी स्टेशन बदलले.
प्रेम ही अत्यंत सुखद, उदात्त व जीवनव्यापी भावना आहे. वरचे तिन्ही प्रश्न प्रेमाच्याच संदर्भात आहेत.तिन्ही महत्त्वाचेच आहेत. आजच्या युवा पिढीच्या विचारांची झलक यातून दिसते. सध्या कोण कोणाला कसं वापरेल याचा काही नेम नाही. तरुण पिढीसमोर आकर्षणे खूप आहेत. ��ी पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. कधी रुपाचे तर कधी रुपयांचे आमिष दाखवून संबंध ठेवले जातात. त्याला प्रेम हे नाव दिले जाते. पण ते इतके शारीरिक पातळीवर उतरते की त्यातली उदात्तता हरवून जाते. हे वास्तव कुणी नाकारु शकत नाही. मी स्टेशन बदलले खरे, पण तिकडेही असाच संवादरूपी कार्यक्रम सुरू होता. प्रेमाच्या उदात्त भावनेला छेद देणारे आणखी एक उदाहरण त्या दुसऱ्या स्टेशनवर ऐकायला मिळाले. एक तरुणी फोनवर सांगत होती की सध्याच्या 'बॉयफ्रेंड' पेक्षा त्याचा भाऊ तिला जास्त आवडू लागला आहे. त्यावर निवेदिकेने विचारले की हे तिने बॉयफ्रेंडला सांगितले आहे का? त्यावर ती म्हणाली की, "मला असं वाटतं की भावानेच त्याला सांगावे आणि त्याला असं वाटतं की तो माझा बॉयफ्रेंड असल्यामुळे मीच त्याला सांगायला हवं त्यामुळे अजून त्याला हे कोणीच सांगितलं नाही."
बॉयफ्रेंडचा भाऊ अत्यंत 'हँडसम' असल्यामुळे त्याच्या रूपाचे, त्यांच्या भेटीचे वर्णन तिने अतिशय रसभरीत शब्दात केले आणि या संवादात ती तरुणी व निवेदिका दोघीही त्या रोमांचकारी विषयाची मजा घेत बोलत होत्या. हे रेडिओ कार्यक्रम मनोरंजनासाठी असल्यामुळे काल्पनिक संहिता असेल तर चांगलेच म्हणावे लागेल.पण हे अनुभव खरे असतील तर कुठे चालली आहे आजची तरुणाई हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेमाची आजची व्याख्याच बदलली आहे काय? सतत पैसे मागत राहणे, दिलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा करणे, लग्नाची वचने देऊन तीष्ठत ठेवणे, दूरस्थ प्रेमीवर विश्वास ठेवावा की नाही याची शंका येणे आणि अगदी सहजतेने प्रेमातली व्यक्तीच बदलणे…. हे असं असतं का प्रेम?
ही तर सगळी प्रेम नसण्याचीच लक्षणे आहेत. हे प्रेम नव्हेच, यात केवळ आर्थिक लोभ आणि शारीरिक आकर्षणच आहे यात काही शंका नाही. दुसरे असे की जाहिररित्या रेडिओ कार्यक्रमात इतके व्यक्तिगत प्रश्न का जाहीर केले जातात? हे सांगणे म्हणजे स्वतःचा अपमान जगजाहीर करणे नाही का? अस्वस्थ होऊन मी रेडिओ बंद केला आणि झोपेची आराधना करू लागले, पण ती पार गायबच झाली.
खूप वर्षांपूर्वी कधीतरी वाचलेल्या ओळी आठवत राहिल्या Love is not love which alters when it alteration finds; love alters not with brief hours and weeks, but bears it out even to the edge of doom.---William Shakespeare
Read the full article
1 note
·
View note