Tumgik
#कोणाचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Thackeray Vs Shinde : धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढची तारीख
Thackeray Vs Shinde : धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढची तारीख
Thackeray Vs Shinde : धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढची तारीख Thackeray Vs Shinde : खरी शिवसेना कोणाची व शिवसेनेच्या धनुष्यबाणावर कोणाचा हक्क यावर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांसमोर आज सुनावणी झाली. केवळ पाच ते सात मिनिटांच्या कामकाजानंतर निवडणूक आयोगाने ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थगित केली आहे. Thackeray Vs Shinde : खरी शिवसेना कोणाची व शिवसेनेच्या…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 2 days
Text
वर्षा उसगांवकरांनी घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा आज निरोप; बाहेर पडताच म्हणाल्या,"सगळी स्वप्न..."
‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मिड वीक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राच्या लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं होतं. वर्षा उसगांवकर, अभिजीत…
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
क्वाड समुहाच्या शिखर परिषदेसाठी अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि जपानचे संबंध अधिक मजबुत करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये हिंद-प्रशांत परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे ��ाम करण्याविषयी चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेली चर्चा ही दोन्ही देशांसाठी उपयोगी ठरली आहे.
****
श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी काल झालेल्‍या मतदानानंतर लागलीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये नॅशनल पिपल्स पॉवर म्हणजेच एनपीपी पक्षाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांनी मोठी आघाडी घेतल्याचं वृत्त आहे. आज सकाळपर्यंत झालेल्या मतमोजणीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि साजिथ प्रेमदासा यांना प्रत्‍येकी १९ टक्‍के मते  मिळाली आहेत. दरम्यान, देशात मतमोजणी होईपर्यंत संचरबंदी लागू करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना, परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कालही धाराशिव आणि बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. तर उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदच अवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात नाशिक इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सदस्य नसतांनाही विद्यमान आमदार असल्याचं पत्र शासकीय कार्यालयांना दिले, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबादास खैरे यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी या याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यापूर्वीही अनेकदा ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर सुमारे ४२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री  नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल पुणे इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिव��� घाट -हडपसर मार्गाचं चौपदरीकरण आणि विविध विकास कामांच्या भुमीपुजन गडकरी त्यावेळी बोलत होते.
****
राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची काल भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
****
रेल्वे रूळांच्या पाहणी आणि दुरूस्तीसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दौंड निजामाबाद ही गाडी उद्या मुदखेड ते निजामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर परवा निजामाबाद इथून निघणारी निजामाबाद पंढरपूर ही गाडी निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या कांद्याची आता पुन्हा नाशिक रोड आणि लासलगाव इंथल्या रेल्वेस्थानकातून निर्यात होणार आहे. त्यासाठी रेल्वे मालवाहु डब्बे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखेडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं आहे. या संदर्भात काल नाशिक इथं जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी त्यांनी बैठक घेतली. दरम्यान, मालखेडे यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबेसुकेणे इथं रेल्वे स्थानकाची पाहणी करून निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
****
चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने आपल्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा ६ बाद २०५ धावा केल्या आहेत. त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद २८७ धावांवर घोषित करत बांदलादेशाला ५१५ धावाचं लक्ष दिलं होतं.
****
0 notes
dhanu-j-92 · 2 months
Text
📖 *ज्ञान गंगा* 📖
Tumblr media
.
*कर्म काण्डा विषयी*
*सत्य कथा*
माझे (संत रामपाल दास यांचे) पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना सोळाव्या वर्षी एका महात्म्याचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि ते महात्माजींसोबत निघून गेले.
घरातील व्यक्तींनी जेव्हा त्यांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जंगलामध्ये हाडांजवळ त्यांचे फाटलेले कपडे दिसले. घरच्यांना वाटले, की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाल्ले असावे. त्यांनी ती कपडे आणि हाडे उचलून घरी आणली आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर दहावा, तेरावा, वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी श्राद्ध घालणे सुरूच झाले.
जेव्हा माझे पूज्य गुरुदेव अत्यंत वृद्ध झाले, तेव्हा एकदा त्यांच्या स्वत:च्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले, की ते जिवंत आहेत आणि घर सोडून निघून गेलेले होते. घरच्यांनी सांगितले, की जेव्हा तुम्ही घर सोडून गेला, तेव्हा तुमचा फार शोध घेण्यात आला. शेवटी जंगलामध्ये तुमचे कपडे मिळाले. त्या कपड्यांजवळ काही हाडेही पडलेली दिसली, तेव्हा आम्हाला वाटले, की एखाद्या हिंस्र प्राण्याने तुम्हाला खाऊन टाकले असेल. आम्ही ते कपडे आणि हाडे घरी आणून अंतिम संस्कार केला.
नंतर मी (संत रामपाल दास) माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान बंधूंच्या पत्नीला विचारले, की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून निघून गेले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले, की जेव्हा विवाह होऊन मी या घरी आले, तेव्हा त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या हातांनी त्यांचे सुमारे सत्तर वेळा श्राद्ध घातले आहे. तिने पुढे सांगितले, की जेव्हा घरामध्ये एखादे नुकसान व्हायचे, म्हणजे म्हशीने दूध न देणे, म्हशीचे सड खराब होणे किंवा अन्य काही तरी नुकसान, त्यावेळी आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिकाकडे जायचो. तो म्हणायचा, की तुमच्या घरी कोणाचा तरी निःसंतान, लग्न न होता मृत्यू झालेला आहे. तेच तुम्हाला दु:खी करत आहे. त्यावेळी आम्ही त्या मांत्रिकाला वस्त्रे, धन इत्यादी द्यायचो.
यावर मी (रामपाल दास) म्हणालो, की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कुठे कोणाला काय दु:ख देत होते? ते तर आता सुखदाता आहेत. आता तर ते आपल्यासमोरच आहेत. आता तर श्राद्ध घालणे इत्यादी व्यर्थ साधना बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या, की ही तर आमची जुनी परंपरा आहे. हे कसे काय सोडू? याचा अर्थ असा, की “आपण आपल्या जुन्या रीती-परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत” की प्रत्यक्ष प्रमाण असूनही त्या अयोग्य परंपरा आपण सोडू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते, की श्राद्ध घालणे, पितरपूजा करणे इत्यादी सर्व व्यर्थ आहे.
0 notes
punerichalval · 5 months
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 9 months
Link
https://marmikmaharashtra.com/kiran-gaikwads-naad-the-shooting-of-prakash-pawars-naad-film-started-at-dawn/
0 notes
nandedlive · 1 year
Text
गुरुद्वारा चौकातील पादचारी उड्डाणपुल धोकादायक ; खड्डा पडला
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात बनविण्यात आलेला दक्षीण ते उत्तर असा पायी उड्डाणपुल आज घडीमध्ये अत्यंत घातक झाला आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने त्या पुलातील पदचारी रस्त्यावर खड्डे पडून लोखंड बाहेर आले आहे. यामुळे काही घातपात झाला तर त्याचा जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरूद्वारा चौरस्ता येथून दक्षीण-उत्तर हा रस्ता पार करण्यासाठी एक उड्डाणपुल तयार करण्यात आला. जेणे करून श्री.सचखंड हजुर साहिब आणि गुरूद्वारा लंगर साहिब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा व्हावा. परंतू ज्यावेळेस हा पुल तयार करण्यात आला. त्यावेळेस या कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण शासनाचे काम होते आणि त्याच हिशोबाने ते झाले पण. पण या उड्डाणपुलाचा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही एक उपयोग झाला नाही. वर्षभरातून हजारो, लाखोंच्या संख्येत भाविक नांदेडला येतात. बऱ्याच सणांच्यावेळेस हल्ला-महल्ला ही निवडणुक निघते, काही वेळेस नगर किर्तन काढले जाते. त्यावेळी या पुलावर जास्त संख्येत लोकांनी उभे राहु नये म्हणून पोलीसांनाच मेहनत घ्यावी लागते. तरी पण तर काही लोक जातातच. काही वर तर काही पुलाच्या खाली अशा पध्दतीने या पुलाचा उपयोग झाला. जून महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने जुलै महिना मात्र धुवून काढला.त्यामुळे सततधार पाऊस आणि कामाचा दर्जा या दोघांची जोड जमली नाही आणि या उड्डाणपुलावर आता खड्डा पडला आहे. सततधार पाऊस कधी थांबेल याचाही काही नेम नाही. म्हणजे पाऊस आणि पुलाच्या कामाचा दर्जा याला जोडून विचार केला तर भविष्यात या पुलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणाचा घात पातपण होवू शकतो अशा प्रकारचे अनेक पुल खाली पडले आणि त्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर असतांना आता तरी प्रशासनाने हा पुल काढून घ्यावा आणि लोकांना भविष्यातील अपघातापासून वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tumblr media
Read the full article
0 notes
marathibatmi11 · 2 years
Text
विमाननगरच्या मॉलमध्ये ' भलताच ' प्रकार , मॅनेजरवर गुन्हा दाखल
पुण्यात विमाननगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मॉलमध्ये विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ही कंपनीकडे न जमा करता मॅनेजरने तब्बल 28 लाख रुपयांना कंपनीला चुना लावलेला आहे. विमानतळ पोलिसांनी या मॅनेजरला अटक केल��ली असून त्याच्या या कृत्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, फ्रान्सिस जोसेफ डेविड ( वय 35 राहणार दापोडी )…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
विमाननगरच्या मॉलमध्ये ' भलताच ' प्रकार , मॅनेजरवर गुन्हा दाखल
पुण्यात विमाननगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मॉलमध्ये विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ही कंपनीकडे न जमा करता मॅनेजरने तब्बल 28 लाख रुपयांना कंपनीला चुना लावलेला आहे. विमानतळ पोलिसांनी या मॅनेजरला अटक केलेली असून त्याच्या या कृत्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, फ्रान्सिस जोसेफ डेविड ( वय 35 राहणार दापोडी )…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं
https://bharatlive.news/?p=163236 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी ...
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल
नांदेड एटीएसकडून याच प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांची आज पुन्हा चौकशी
१८ व्या लोकसभेचं उद्यापासून पहिलं अधिवेशन
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रतेच्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित देशभरात दाखल इतर प्रकरणांचा तपासही हाती घेण्याची कार्यवाही सीबीआयकडून केली जात आहे.
दरम्यान, याच प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक-एटीएसच्या नांदेड शाखेने दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, त्यांचा या पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोघांची नावं असून, ते दोघं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी लातूर इथं मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी शिकवणी घेतात. हे दोन्ही शिक्षक लातूर इथं खाजगी शिकवणी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा गैरप्रकारात यांचा काही हात आहे का, यादृष्टीने चौकशी सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
एटीएसने कालही या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन, आज सकाळी सोडून दिलं होतं.
****
१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. हे अधिवेशन ३ जुलै पर्यंत चालेल. यासोबतच लोकसभा सभापतीपदासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार असून २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.
****
सरोगसीद्वारे अपत्याला जन्म देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मातृत्व आणि पितृत्व रजा लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे महिलांना १८० दिवसांची तर फक्त एक अपत्य असलेल्या केंद्रीय कर्मचारी पालक पित्याला अपत्याच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत १५ दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
****
नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. वैमनस्य असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतूनं त्यानं धमकी देणारं हे पत्र प्रसारित केलं होतं. या कृत्यामागे कोणाचा हात आहे, कुठल्या हेतूनं हे पत्रक काढलं आहे याचा संपूर्ण शोध घेतला जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्याचे वनं आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नियोजन सभागृहात कृषी विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बँकांनी विशेष शिबीरं घेऊन पीक कर्जवाटप करावं अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर थेट मंडल आयोगाविरोधात आंदोलन छेडणार, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांपैकी एकही नोंद रद्द केली तर पुढचा लढा मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल, अशा शब्दांत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबरोबरच जर मुस्लिमांची देखील कुणबी म्हणून सरकारी नोंद निघाली तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर जल वाहिनी च्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज प्रत्यक्ष कामाचा ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना सावे यांनी संबंघित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
पुष्पक या पुनर्वापर करण्यात येणाऱ्या प्रक्षेपक यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संथा-इस्रोनं दिली आहे. पुष्पकच्या यापूर्वी झालेल्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कर्नाटकात चित्रदुर्ग इथं घेतलेल्या चाचणीत आज आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक आणि स्वायत्त क्षमतांचं प्रदर्शन घडवत पुष्पक यानानं निर्धारित जागेवर अचूकपणे अवतरण केलं.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकाचे चार चेंडू शिल्लक असतांना सर्वबाद १२७ धावा करता आल्या.
सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे.
या स्पर्धेत आज अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात सुपर एट गटातला सामना होणार आहे. बारबाडोस इथं रात्री आठ वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे. तर उद्या दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना होणार आहे. अँटीग्वा इथं सकाळी सहा वाजेपासून हा सामना खेळवला जाईल.
****
बंगळुरू इथं भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकन महिला संघानं प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत ५० षटकांत आठ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी २१६ धावांची आवश्यकता असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठव्या षटकांत बिनबाद ४५ धावा झाल्या होत्या. यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकून भारतीय महिला संघानं मालिकेत दोन - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तालुका क्रीडा संकुलांना ५ कोटी तर जिल्��ा संकुलांना १० कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. इतर देशात खेळामध्ये मुलामुलींना समान संधी दिली जाते. याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला हवी, यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल, असं आश्वासन बनसोडे यांनी दिलं. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे, खेळाडूंचे सातत्य असंच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी यावेळी दिलं.
****
लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती, आजच्या पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. बाभळगावच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरु होती. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी ८०० उमेदवारांना आज बोलवण्यात आलं होतं. आज रद्द झालेल्या उमेदवारांची चाचणी परवा २५ जून रोजी घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी पहाटे चार वाजता हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक देविदास सौदागर यांचा आज धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उसवण कादंबरीतून सर्वसामान्यांचं जगणं मांडलं, ते लोकांना आपलं वाटलं, यापुढेही साहित्य सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याची भावना सौदागर यांनी यावेळी व्यक्त केली. युवा साहित्य अकादमी नामांकन मिळालेल्या केतन पुरी आणि पूजा भडांगे या युवा साहित्यिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या रहिवाशांनी आज गुंठेवारीविरोधात आंदोलन केलं. आपली घरं गुंठेवारीतून मुक्त करावी अशी मागणी आंदोलनाकांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी आंदोलकाशी संवाद साधत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
****
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली मानाची श्रीसंत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाटा इथं ही दिंडी पोहोचली. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इथं तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातीलच डिग्रस कऱ्हाळे इंथ होणार आहे. त्‍यानंतर औंढा मार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर मागील चार दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्‍व केलं असून, विविध विद्यार्थी संघटनांनी त्‍याला पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्‍टर वाल्‍मीक सरवदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली. मात्र, त्‍यात तोडगा निघाला नसल्यामुळं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवल आहे.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागांमध्ये आज दिवसभर पावसाने चांगली हजेरी लावली, यामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. दिवसभरात ११ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही आज दुपारी पाऊस झाला.
****
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years
Text
' तू खून करायला आलेला दिसतोय ' म्हणत तपासणी सुरु केली अन ..
‘ तू खून करायला आलेला दिसतोय ‘ म्हणत तपासणी सुरु केली अन ..
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली अ��ून जळगाव जिल्ह्यात एका तरुणाला लुटण्यात आलेले आहे मात्र त्याला लुटण्यासाठी जी शक्कल वापरली ती देखील तितकीच वेगळी आहे. सदर तरुणाला ‘ तू इथे कोणाचातरी खून करण्यासाठी आलेला आहे. तुझ्याकडे चाकू आहे. आम्हाला तुझी झडती घेऊ दे ‘ असे म्हटले आणि अभिलाष रमेश येवले ( वय 28 राहणार पाचोरा ) याला दुचाकीवरील दोन जणांनी मारहाण करून लुटले. सोमवारी मध्यरात्री दीड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
‘देशाची अप्रतिष्ठा होतेय’; शिवसेनेची सामनातून नरेंद्र मोदींवर टीका
Tumblr media Tumblr media
Photo Credit- Facebook/ Narendra Modi & Uddhav Thackeray मुंबई । राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवाजीपार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये चांगलंच वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर दोन्ही गटाचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानात तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजीपार्कमध्ये झाला. हे सर्व राजकीयनाट्य सुरू असातानाच शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि विरोधकांवर खरमरीत टीका करण्याचं सत्र सुरूच आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने थेट केंद्र सरकारवरच हल्लाबोल केला आहे. रुपया हा केवळ कागदाचा तुकडा नाही, तर देशाची प्रतिष्ठा आहे, असं वक्तव्य भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी संसदेत केलं होतं. त्यावेळी म्हणजेच काँग्रेसच्या काळात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 67 वरून 68 वर गेली होती तर संसदेत भाजपने सरकार वर हल्ला चढवला. सुषमा स्वराज यांनी त्यावेळी खरं तेच सांगितलं होतं. आज तर रोजच रुपयाची किंमत कोसळत आहे आणि रोजच जागतिक पातळीवर देशाची अप्रतिष्ठा होत आहे. हे रोखण्यासाठी सरकार काही करणार आहे का?, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय. Read the full article
0 notes
shaharvarta11 · 3 years
Text
' तू खून करायला आलेला दिसतोय ' म्हणत तपासणी सुरु केली अन ..
‘ तू खून करायला आलेला दिसतोय ‘ म्हणत तपासणी सुरु केली अन ..
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून जळगाव जिल्ह्यात एका तरुणाला लुटण्यात आलेले आहे मात्र त्याला लुटण्यासाठी जी शक्कल वापरली ती देखील तितकीच वेगळी आहे. सदर तरुणाला ‘ तू इथे कोणाचातरी खून करण्यासाठी आलेला आहे. तुझ्याकडे चाकू आहे. आम्हाला तुझी झडती घेऊ दे ‘ असे म्हटले आणि अभिलाष रमेश येवले ( वय 28 राहणार पाचोरा ) याला दुचाकीवरील दोन जणांनी मारहाण करून लुटले. सोमवारी मध्यरात्री दीड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years
Text
' तू खून करायला आलेला दिसतोय ' म्हणत तपासणी सुरु केली अन ..
‘ तू खून करायला आलेला दिसतोय ‘ म्हणत तपासणी सुरु केली अन ..
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून जळगाव जिल्ह्यात एका तरुणाला लुटण्यात आलेले आहे मात्र त्याला लुटण्यासाठी जी शक्कल वापरली ती देखील तितकीच वेगळी आहे. सदर तरुणाला ‘ तू इथे कोणाचातरी खून करण्यासाठी आलेला आहे. तुझ्याकडे चाकू आहे. आम्हाला तुझी झडती घेऊ दे ‘ असे म्हटले आणि अभिलाष रमेश येवले ( वय 28 राहणार पाचोरा ) याला दुचाकीवरील दोन जणांनी मारहाण करून लुटले. सोमवारी मध्यरात्री दीड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
पक्ष कोणाचा आणि व्हीप कोणाचा? हे मीच ठरवणार; राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
https://bharatlive.news/?p=99502 पक्ष कोणाचा आणि व्हीप कोणाचा? हे मीच ठरवणार; राहुल नार्वेकरांचे ...
0 notes