सत्य समोर येऊनही सावरकरांनी संभाजी राजांची बदनामी सुरूच ठेवली l कॅनडा मध...
2 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत सुरू असलेल्या अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'मिफ' मध्ये आज पहिल्या 'डॉक फिल्म बाजार'चं उद्घघाटन प्रसिद्ध निर्माते अपूर्व बक्षी यांच्या हस्ते झालं. नवोदित माहितीपट निर्मात्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणं आणि संभाव्य निर्मात्यांना त्यांचं कार्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ देणं हे 'डॉक फिल्म बाजार'चं उद्दिष्ट आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी या 'डॉक फिल्म बझार'मध्ये सहभागी विविध देश आणि संस्थांच्या दालनांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
****
भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. विविध सार्वजनिक सेवा कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागाबद्दल ही नोंद झाली आहे. रेल्वेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी विविध दोन हजार स्थळांवर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये ४० लाख, १९ हजार लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, रेल्वे पूल, रस्त्यांचं उद्घघाटन, नव्या रेल्वेस्थानकांची पायाभरणीही झाली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जून रोजी रविवारी अकरा वाजता 'मन की बात' कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतील. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा हा एकशे अकरावा भाग असेल. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मन की बात कार्यक्रम असेल.
****
लातूर जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले -प्रमाणपत्रं त्यांच्या जवळच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या १८ जून ते दोन जुलैदरम्यान महाराजस्व अभियान राबवलं जाणार आहे. लातूर तालुक्यात या कालावधीत ६६ महा ई-सेवा केंद्रांद्वारे लातूरच्या दहा शाळा, अन्य आठ महसूल मंडळात होणाऱ्या शिबिरांतून दहा हजार प्रमाणपत्रं वितरणाचं प्रशासनाचं उद्दीष्ट आहे.
****
शेगावहून पंढरपूरला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज दुसऱ्या दिवशीही अकोल्यात मुक्कामी आहे. शहरात दिवसभर पालखीची परिक्रमा सुरु असून हजारो भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे. उद्या ही पालखी वाशिमकडं प्रस्थान करणार आहे. दरम्यान, काल अकोल्यात या पालखीचं आगमन झालं असून कालही मध्यरात्रीपर्यंत असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
****
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातल्या सावळी इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना काल पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते मोफत गणवेशाचं वाटप झालं. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीसह दारिद्र्य रेषेखालील मुलांना याचा लाभ झाला आहे.
दरम्यान, गणवेश तयार करण्याचं काम स्थानिक महिला बचत गटांनी केल. त्यामुळे या बचतगटांनाही अर्थसाह्य मिळाल्याचं पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी नमूद केलं.
****
निसर्ग नियमांवर आधारित आरोग्यदायी जीवनपद्धतीचं मार्गदर्शन करणाऱ्या निसर्गधारा ही मोफत कार्यशाळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं दुपारी पावणेतीन वाजता या कार्यक्रमात नाशिकच्या योग विद्या गुरुकुलचे योगगुरु डॉक्टर विश्वास मंडलीक निसर्गोपचाराची प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळं रद्द झाल्यानं उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
या स्पर्धेत भारत प्राथमिक साखळी फेरीत अ गटातून अव्वल स्थान मिळवत सुपर एट फेरीत गट एक मध्ये दाखल झाला आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया,अफगाणिस्ताननं आपलं स्थान पक्क केलं आहे. दरम्यान, या गटातील चौथ्या स्थानासाठी बांग्लादेश आणि नेदरलँड यांच्यात चुरस आहे. सुपर एटच्या गट दोन मध्ये अमेरीका, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिजनं आणि इग्लंड संघांनं आपलं स्थान पक्क केलं आहे. सुपर एट फेरीत भारताचे २०, २२ आणि २४ जून रोजी सामने होणार आहेत.
****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान, कोकणात बऱ्याच ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता आहे, येत्या तीन ते चार तासांत कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगा���ं वादळी वारे वाहण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे
****
पंजाब, हरयाणा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यासह दिल्लीत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशातही अशीच स्थिती आहे. याभागात सध्या रात्रीच्या वाढत्या तापमानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा उष्ण दिवसांचं प्रमाण जास्त आहे, असं हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. के जेनामनी यांनी आकाशवाणीला सांगितलं आहे.
****
0 notes
कॅनडा कॉर्नर येथे बिल्डरनेच केली त्या झाडाची कत्तल?
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात महापालिकेकडून बमचे पुणे महामार्गावरील रस्त्यात अडथळा मेल ठरणाऱ्या डेरेडार वृक्षांवर कुन्हाड चुक, चालविली आत असताना दुसरीकडे शल याचा फायदा घेत काही वृक्ष बटा तस्करांकडून शहरातील अन्य – ते भागातील वृक्षांवर ही कुन्हाड फिरविली जात आहे. अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांचा रात्रीस खेळ चालतो. मध्यरात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरातील विलायती चिंचेचे झाड कापून टाकण्यात…
View On WordPress
0 notes
कॅनडा: गोळीबारात 3 मुलांसह 5 ठार
https://bharatlive.news/?p=177029
कॅनडा: गोळीबारात 3 मुलांसह 5 ठार
पुढारी ऑनलाईन : कॅनडाच्या उत्तर ...
0 notes
समस्या प्रदुषणाची " प्रदुषण हा शब्द पंधरा - वीस वर्षापूर्वी आजच्याइतका प्रचलित नव्हता . आज तो सर्वतोमुखी झाला आहे . त्याविषयीची | जागरूकताही निर्माण झाली आहे . विद्यालयांमध्ये व महाविद्यालयामध्ये त्याविषयीचं प्रधान केल जातं आ अभ्यासक्रमही तयार केले जातात . " प्रदुषणा बरोबरच " पर्यावछ । ' हा शब्दाही प्रचलित होत आहे . त्याचाही अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरापासून समावेश केले जात आहे . ही स्वागतार्ह बाब आहे . " पर्यावरण विज्ञान ' ही आधुनिक विज्ञावशाखाही आज् महाविद्यालयाच्या वयुत्तर अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली आहे . ' पर्यावरण ' आणि ' प्रदुषण ' यांचा परस्परसंबंध आहे ; त्यामुळ याविषयी समाजजागरण होणं ही काळाची गरज आहे . पूर्वी ' आरोग्यशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात असे व त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नसे . खर तर त्यात वैयक्तिक व सार्वजनिक आयग्याविषयीचा किती तरी महत्वाचा विचार मांडला जात होता ; पण त्यावेळी जीवनाच्या समस्या इतक्या जटिल व बिक्रत झाल्या नव्हत्या औद्योगिकीकरण , नागरीकरण वैज्ञानिक शोध व त्यांचा मानव जीवनाशी येणारा घनिष्ठ संबंध नकळत वा हेतुत : होत गेलेली वृक्षतोड व त्यामुळे जंगलांचा व वृक्षांचा होणारा विनाश रासायनिक प्रक्रियांमुळे व वायुनिर्मिती वा वायुगळतीमुळं निर्माण झालेले धोके , ध्वनिपर्धकांमुलं एका बाजुला झालेला फायदा व दुसख्या बाजुला होणारी हानी अशा कितीतरी नवनवीन समस्यांना आपल्या जीवनाशी इतका घनिष्ठ संबंध असेल आणि त्याचे दुगामी परिणाम होतील , याची कल्पना तरी पाचपंचवीस वर्षापूर्वी आपण केली का ? पण आज या सर्व गोष्टींचा आपल्याला लागतो व बारकाईनं विचार करावाच उपाययोजनाही तातडीने करावीच तर आपल्याही वैयक्तिक व सामाजिक जीवनात भयानक उलथापालथ होण्याची शक्यता असते , त्याविषयीची लागते . तो केली नाही
जलप्रदूषण एक समस्या .. जलप्रदुषण म्हणजे पाण्याच्या स्त्रीतांचे प्रदुषण जलप्रदुषण ही एक मानव निर्मित समस्या आहे . हवा पाणी | अन्न या मानसाच्या तीन गरजांपैकी पानी हिं 51 दुसऱ्या क्रमांकांची गरज आहे . आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध 1 मिळणे हे आरोग्याच्या दृष्टिने खूपय महत्वाचे आहे . प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि बरेचसे रोग होतात पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबादार आहोत ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे . जल प्रदुषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधमयि पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवतरीत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठसते . जल प्रदुषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुधारणाम होतात किंवा पाण्याची चप बिघडते ते घाठीरडे दिसते . वा दुर्गंधीयुक्त होते . मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते . या पाण्यालाच प्रदुषित जल म्हणतात . * बदलल्याने मानव परिणाम करणारी जल पाण्याचे प्राकृतिक , रासायनिक आणि जैविक गुणधर्म जलीय सजीवांवर उपायकारक प्रदूषण ही प्रक्रिया आहे नैसगिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उठाता यांची भर पडल्यास तो पाणी प्रदुषित होऊन त्याचा मानव , इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो . जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर आहे . कॅनडा , चीन , भारत इ . देशांत ही समस्या तीव्रतेने समस्या बनली रशिया , अमेरीका जपान , जाणवते .
जल प्रदुषणावरील आययोजना : याची कार माहिती करून योग्य ती उपाययोजना योजली जल प्रदूषण रोखण्यासाठी पाहीजे व या संबची कडक कायदे तयार करावे लागतील १ ९ ७४ मधील Watee Act या कायद्याची अंमलबजावणी होगे आवश्यक आहे . जगामरांतील साधारण २५ टक्के | पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लीरीनचा वापर सर्वाधिक ● लोकसंखेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही . केला जातो . पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतु मरत नाहीत त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठीओ शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते 1 ) सांडपाणी व मैल पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे . ( 2 ) पिण्याच्या पाण्याचे नियमित परिक्षण करणे 3 ) पि ०० पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही , यावर नियंत्रण ठेवणे . 4 ) कवकनाशके , किटकनाशके व किडनाश के यांचा वापर मर्यादीत करने अथवा टाळणे ( 5 ) किरणोत्सारी अपशिष्ट्ये विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याचा पद्धतीचा अवलंब करणे 6 ) ओकि जल प्रदुषणामुळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान 2 ° से पेक्षा अधिक वाढणार नाही , याची खबरदारी घेगे . 7 ) खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदुषण समस्येवर उपाययोजना आखगे 8 ) कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वावी : 4 ) पिण्याच्या पाण्यातील रासायनांच्या प्रमाणाची विशिवत " मयादा असते या सहज मर्यादिपेक्षा अधिक प्रमाणाय रसायनांची वाढ होऊ नये , यासाठी ती दक्षता घेणे
-वैभव वैद्य....
0 notes
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एरोस्पेस)…
View On WordPress
0 notes
नोकरी शोधणार्यांसाठी चांगली बातमी: कॅनडामध्ये 10 लाखाहून अधिक नोकर्या रिक्त आहेत आणि त्यांची संख्या आहे
नोकरी शोधणार्यांसाठी चांगली बातमी: कॅनडामध्ये 10 लाखाहून अधिक नोकर्या रिक्त आहेत आणि त्यांची संख्या आहे
स्थलांतरित खुल्या जागा भरू शकतात आणि कायम निवासासाठी अर्ज करू शकतात
कॅनडामध्ये 10 लाखांहून अधिक नोकऱ्या रिक्त आहेत. मे 2021 पासून रिक्त पदांच्या संख्येत 3 लाखांहून अधिक वाढ झाली आहे.
मे 2022 चा लेबर फोर्स सर्व्हे अनेक उद्योगांमध्ये वाढत्या कामगारांची कमतरता आणि देशाच्या कर्मचार्यांच्या वयानुसार आणि सेवानिवृत्तीमध्ये प्रवेश करत असताना कॅनडामध्ये इमिग्रेशनची वाढलेली मागणी दर्शवते.
हे, यामधून,…
View On WordPress
0 notes
महिला हॉकी विश्वचषक: भारताने हॉकी विश्वचषक २०२२ मध्ये थ्रिलर जिंकून कॅनडाचा ३-२ असा पराभव केला; शूटआउटमध्ये सविता स्टार्स - हॉकी वर्ल्ड कप 2022: महिला हॉकी वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताने कॅनडाचा 3-2 ने पराभव केला
महिला हॉकी विश्वचषक: भारताने हॉकी विश्वचषक २०२२ मध्ये थ्रिलर जिंकून कॅनडाचा ३-२ असा पराभव केला; शूटआउटमध्ये सविता स्टार्स – हॉकी वर्ल्ड कप 2022: महिला हॉकी वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताने कॅनडाचा 3-2 ने पराभव केला
महिला हॉकी विश्वचषक २०२२: भारताने 12 जुलै 2022 रोजी महिला हॉकी विश्वचषक 2022 मध्ये पहिला विजय मिळवला. त्यांनी शूटआऊटमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. सामन्याच्या वेळेपर्यंत दोन्ही संघांचे गुण १-१ असे बरोबरीत होते. भारताच्या नवनीत कौरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र, भारतीय महिला संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
11 जुलै 2022 रोजी तेरेसा (स्पेन) येथे खेळल्या गेलेल्या क्रॉसओव्हर…
View On WordPress
0 notes
6 महिन्यांत 12 वेळा केली केमोथेरपी, युवराजप्रमाणे मैदानात परतल्यानंतर खेळाडूने जिंकले सुवर्णपदक
6 महिन्यांत 12 वेळा केली केमोथेरपी, युवराजप्रमाणे मैदानात परतल्यानंतर खेळाडूने जिंकले सुवर्णपदक
हिवाळी ऑलिम्पिक कॅनेडियन मॅक्स पोपटने सुवर्णपदक जिंकले: कर्करोगाशी लढा देऊन मैदानात परतणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. त्यासाठी खूप हिंमत लागते. भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग कर्करोगाने ग्रस्त होता. पण तो सावरला आणि मैदानात परतला. युवराजप्रमाणेच कॅनडाच्या एका खेळाडूने कॅन्सरशी लढा देऊन लढाई जिंकली आणि परतल्यानंतर सुवर्णपदक जिंकले.
कॅनेडियन स्नोबोर्डिंग खेळाडू मॅक्स पॅरेटने…
View On WordPress
0 notes
एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्या आपण एकदाच वापरतो, त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
देशात प्रदूषण पसरण्यामागे एकेरी वापराचे प्लास्टिक हे सर्वात मोठे कारण आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशात २०१८-१९ मध्ये ३०.५९ लाख टनपेक्षा जास्त एकल वापर प्लास्टिक कचरा निर्माण झाला आणि २०१९-२० मध्ये ३४ लाख टन एकेरी वापरल्या जाणा-या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू विघटित होऊ शकत नाहीत किंवा त्या जाळल्या जाऊ शकत नाहीत. कारण ते विषारी धुरापासून हानिकारक वायू सोडतात. अशा परिस्थितीत पुनर्वापर करण्याशिवाय स्टोरेज हा एकमेव मार्ग आहे.
जेव्हा एकाच वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली जाते तेव्हा वेगवेगळ््या गोष्टींसाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पेंढ्यांऐवजी कागदी स्ट्रॉ त्याचप्रमाणे बांबूपासून बनवलेल्या इअर बड्स, बांबूपासून बनवलेल्या आईस्क्रीमच्या काड्या, कागद आणि कापडापासून बनवलेले ध्वज, पारंपरिक मातीची भांडी इत्यादींचा वापर एकेरी वापरल्या जाणा-या प्लास्टिकऐवजी करता येईल, असे सांगण्यात आला.
या देशांत सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी
जगभरातील अनेक सरकार सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात कठोर निर्णय घेत आहेत. तैवानने २०१९ पासून प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, भांडी आणि कपवर बंदी घातली. दक्षिण कोरियाने मोठ्या सुपरमार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली आहे. बांगलादेशनेही २००२ मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती. केनिया, यूके, तैवान, न्यूझीलंड, कॅनडा, फ्रान्स आणि यूएस या देशांमध्येही काही अटींसह एकेरी वापरल्या जाणा-या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
Read the full article
0 notes
अमेरिकेतील शहरांकडून व कॅनडा कडून घोषणापत्रे व प्रशंसापत्रे
अमेरिकेतील शहरांकडून व कॅनडा कडून घोषणापत्रे व प्रशंसापत्रे
फलर्टन शहर, कॅलिफोर्निया येथील नगराध्यक्ष माननीय फ्रेड जंग यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू आणि सार्वभौम " श्री कैलास " राष्ट्राचे सर्वेसर्वा परमपवित्र भगवान श्री नित्यानंद परमशिवम् यांना आदरपूर्वक घोषणापत्र अर्पण केले आहे .आणि ३ जानेवारी २०२२ हा हिंदू धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूंचा अवतरण दिवस हा '"कैलास "चे नित्यानंद दिन ' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सन २००७ मध्ये पाश्चिमात्य जगाकरीता हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू भगवान श्री नित्यानंद परमशिवम् यांनी लाॅस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया येथे जीवनमुक्त परिसंस्थेची स्थापना केली.
त्यांनी मंदिर व २५००० चौरस फूट विस्तार असलेले विश्वविद्यालयाचे क्षेत्र ब्रह्मांडीय ऊर्जेने संपृक्त केले. हे मंदिर पाश्चिमात्य जगातील वैदिक परंपरेचा कळस व्हावे असा आशिर्वाद हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी दिला आहे.
मंदिराच्या बांधकामाबांधकामात हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी स्वतः जातीने मार्गदर्शन केले आणि ९ नोव्हेंबर २००७ रोजी माॅन्टक्लेअर, कॅलिफोर्निया येथे "कैलास "लाॅस एंजेलिस चे लोकार्पण केले.
उत्तर अमेरिकेतील सर्वात जास्त उंच मूर्ती असलेल्या या मंदिरात ८० पेक्षा जास्त देवतांच्या मूर्ती आहेआहेत. हे मंदिर पूजा, ध्यान, उत्सव आणि विविध सेवाकैलास उपक्रमांचे ठिकाण बनले आहे.
हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली "कैलास "सॅन जोझ याची पण स्थापना झाली. त्या ठिकाणी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार व त्यांच्या व वेद-आगमानुसार वेगवेगळे उपक्रम, पारंपरिक विधी, मंदिरांमधील विधी, विविध कार्यक्रम पार पाडले जातात.
"कैलास "सॅन जोझ, हिंदूंमधील यथार्थ पूजाविधी,ध्यान व उत्सव साजरे करण्याचे ठिकाण बनले असून 'बे एरिया' च्या हजारो लोकांना उत्तम जीवन जगण्यासाठी जाणिवेचा स्तर उंचावून समर्थ बनण्यास मदत करतात.
स्थापना झाल्याच्या दिवसापासून म्हणजेच १६ जुलै २०१० पासून "कैलास " सॅन जोझ बे एरिया च्या मोठ्या समुदायासाठी आपले योगदान देत आहे.
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असून, ६० पैकी ३१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजूनही १४ जागांवर भाजप आघाडीवर असून, मतमोजणी अद्याप सुरू आहे. तसंच, सिक्कीममध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्त्वातल्या सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-एसकेएमला बहुमत मिळालं आहे. या पक्षानं ३२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला असून, १३ जागांवर हाच पक्ष आघाडीवर आहे. मतमोजणी अद्याप सुरू आहे.
****
लोकसभेची सार्वत्रिक नि���डणूक निष्पक्षपणे आणि व्यवस्थितरीत्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आयोगाचं समर्पण आणि व्यवस्थित प्रयत्नांमुळे लोकांमध्ये विश्वास वाढला असून, नागरिकांनी आत्मविश्वासानं मतदान केल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. याचबरोबरच त्यांनी निवडणुकांदरम्यान सुरक्षेसाठी काम केलेल्या सुरक्षा दलाचंदेखील कौतुक केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध मुद्यांशी निगडित सात बैठकांना संबोधित करणार आहेत. पहिली बैठक ही पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासंबंधी, तर दुसऱ्या एका बैठकीत देशात वाढणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या समस्येबाबत चर्चा होईल. जागतिक पर्यावरण दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्याच्या तयारीचादेखील ते या संबंधित बैठकीत आढावा घेतील. तसंच नव्या सरकारचे शंभर दिवस या कार्यक्रमाच्या यादीचा आढावा घेण्यासाठी ते एक बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अर्थ मंत्रालयाला चालू आर्थिक वर्षात, मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर-जीएसटीमधून एक लाख ७३ हजार कोटी एवढा महसूल मिळाला आहे. अर्थ मंत्रालयानुसार दरवर्षी या संकलनात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. मे महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा करातून सुमारे ३२ हजार कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा करातून सुमारे ४० हजार कोटी रुपये, तर एकीकृत सेवा आणि वस्तू करातून सुमारे ८७ हजार ७८१ कोटी रुपये इतका कर प्राप्त झाला आहे. चालू आर्थिक वर्षाचा आतापर्यंतचा एकूण वस्तू आणि सेवा कर-जीएसटी तीन लाख ८३ हजार कोटी रुपये एवढा असून, यामध्ये दरवर्षी ११ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबमधल्या फतेहगढ साहिब इथं आज पहाटे दोन मालवाहू रेल्वेगाड्यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका मालवाहू रेल्वेचं इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला धडकलं, मात्र पॅसेंजर रेल्वेचा वेग कमी असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. या अपघातात मालगाडीचे दोन चालक जखमी झाले असून, त्यांना पतियाळा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे भाविकांना १५ मार्चपासून मंदिरात पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरालगतच्या वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ बंदुकीची तब्बल ४३७ काडतुसं सापडली आहेत. ती गंजलेल्या अवस्थेत आहेत. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलाला ही काडतुसं दिसली. याबाबत गावकऱ्यांनी भाग्यनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, श्वानपथक घटनास्थळी पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
0 notes
असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १४ ऑक्टोबर
शनिवार, १४ ऑक्टोबर २०२३. भाद्रपद अमावस्या. वर्षा ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज वर्ज्य दिवस आहे” *सर्वपित्री दर्श अमावस्या* *आज कांकणाकृती सुर्यग्रहण आहे मात्र ते भारतातून दिसणार नाही. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅनडा येथून ग्रहण दिसेल.* नक्षत्र: हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या. टीप:…
View On WordPress
0 notes
भारत-कॅनडा व्हिसा सेवा पूर्ववत हाेईल : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
https://bharatlive.news/?p=174998
भारत-कॅनडा व्हिसा सेवा पूर्ववत हाेईल : परराष्ट्र मंत्री एस. ...
0 notes
loksatta editorial on republic of barbados zws 70
loksatta editorial on republic of barbados zws 70
बार्बाडोसच्या आधीही कॅरेबियन राष्ट्रसमूहातील राष्ट्रांनी ब्रिटनच्या सिंहासनाप्रति निष्ठा सांगणे थांबवले होते.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड अशा समृद्ध देशांचे राष्ट्रप्रमुखपद अद्यापही ब्रिटिश राणीकडेच असताना, बार्बाडोससारखा देश नव्याने प्रजासत्ताक झाला हे अप्रूपाचेच..
हल्लीसे फार देश स्वतंत्र वगैरे होत नाहीत. स्वतंत्र असूनही स्वत:ला प्रजासत्ताक म्हणून जाहीर करणारे तर अगदीच क्वचित. स्वतंत्र…
View On WordPress
0 notes
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये गोळीबारात बंदूकधारीसह ३ ठार: पोलीस
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये गोळीबारात बंदूकधारीसह ३ ठार: पोलीस
कॅनेडियन मीडियाच्या वृत्तानुसार हा माणूस शहरातील बेघर लोकांना लक्ष्य करत असावा.
मॉन्ट्रियल:
सोमवारी पहाटे व्हँकुव्हरजवळ गोळीबाराच्या मालिकेत एका बंदुकधारीने दोन जणांना ठार केले आणि दोन जण जखमी केले, पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वी त्याला ठार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वीच्या अहवालांनी असे सुचवले होते की हल्लेखोराने बेघर लोकांना लक्ष्य केले असावे, परंतु व्हँकुव्हरच्या दक्षिण-पूर्वेला…
View On WordPress
0 notes